Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday, 23 May 2015

आमच्या पाचवीलाच पुजलेली "भटकंती" : नितीनराजे अनुसे


          धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणी वरती अजूनही भिजत घोंगडे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच १९५० साली राज्यघटनेत धनगर(धनगड) समाजासाठी अनुसुचित जाती मध्ये कलम ३४२ मध्ये तरदूत करून सुद्धा धनगर समाज आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नाही असे बोंबलणार्यांनी खरंच याचा अभ्यास केला आहे का? की कोणाच्या तरी सांगण्यावरतून फालतू बडबड करत बसले आहात??"
मुंबई-पुणे यांसारख्या शहरातील दोन-चार कुटूंबांचा सर्वे केला म्हणजे धनगर समाज आदीवासी असल्याचे निकष पूर्ण करत नाही. धनगर समाजाला ST आरक्षणाची गरज नाही. असे खोटे अहवाल सादर करून ST आरक्षणासाठी आडकाठी आणण्याचे असले तुमचे उद्योगधंदे बंद करा. हजारो वर्षांपासून जंगलामध्ये वास्तव्य करून रानावनात दरी-खोर्यांत ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता पायांच्या नडग्या वाळेपर्यंत शेळ्या-मेंढ्या राखणार्या खेड्या-पाड्यातील वाड्या -वस्त्यांवरील माझ्या धनगर समाजाचा सर्वे करून बघा मग तुम्हाला कळेल की धनगर समाज कुठे राहतो आणि कसा जगतो ते...
         शेळ्या-मेंढ्यांच्या राखणीसाठी आणि त्यांच्या जडणघडणीसाठी पुरक असे वातावरण मिळावे म्हणून भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन धनगर समाज बांधव शहरांपासून दूर वाड्या-वस्त्यांवरती वास्तव्य करून आपल्या पोटाची खळगी भरू लागले. यासाठी विशेषता धनगर समाजबांधवांनी दलदलीचा भाग सोडून माळरानांचा अवलंब केला जेणेकरुन दलदलीसारख्या ठिकाणी मेंढ्यांच्या नख्यामध्ये चिखल (Mud) जर अडकला तर शेळ्या-मेंढ्यांच्या नख्या सडतात तसेच अन्य रोग उद्भवतात म्हणूनच धनगर समाज माळरानांवरती विसावला आहे. पण शेळ्या-मेंढ्यांसाठी माळरानाची निवड केल्याने निसर्गाच्या बदलत्या अवतारामुळे तिथे मुबलक प्रमाणात चारा आणि पाणी मिळू शकले नाही म्हणून धनगर समाजाला "भटकंती"साठी स्वतःचं घरदार आणि गाव सोडून या गावावरुन त्या गावी जाण्याचा अजूनही आणि आजही प्रवास करावा लागतोय म्हणजेच  हे जणू काय आमच्या पाचवीलाच पुजले आहे.
         आमची भटकंती कधी जवळून पाहिलीत का?" आमच्या भावना कधी समजून घेतलेत का? आमच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून आमच्यावर अन्याय करताना मागचा पुढचा कधी विचार केलात का??? पोटाची खळगी भरण्यासाठी ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता उपाशी-तापाशी शेळ्या-मेंढ्यामागे उभी ठाकणारी आमची जमात. टीचभर पोट भरण्यासाठी जीवनासोबत आयुष्याचा जुगार खेळावा असंच धनगर समाजाचं जगणं, निम्म्याहून अधिक आयुष्याचा संसार घोड्याच्या पाठीवर लादून आज इथे तर उद्या तिथे असंच जगणं आमच्या वाट्याला आले आहे आणि आजही तिच परिस्थिति असताना खोटे अहवाल सादर करून आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवलं जातंय. कपाळी भंडारा लेवून रानोमाळी भटकत पोरा-लेकरांचं आणि करडा-कोकर्यांचं लटांबणं सोबत घेवून जगताना समोरच्या परिस्थितिवर मात करून जीवन जगताना नाकी नऊ येतो. घोड्याच्या पाठीवर लादलेल्या माचोळीवर नुसतं धान्यच नव्हे तर अर्ध्या आयुष्याचा अख्खा संसार रचलेला असतो, माचोळीच्या बाजूला टांगलेल्या पिशव्यांमध्ये कोकरी करडं हिंदकळत असतात तर माचोळीवरती बांधलेल्या कोंबड्या आणि पाण्यासाठी भली मोठी घागर घोड्याच्या पाठीवर लटकत असते. त्याचप्रमाणे भल्यामोठ्या पाठीमध्ये संसारोपयोगी साहित्य म्हणजे पोटाची आग विझवण्यासाठी थोडीसीच पण गरजेपुरती भांडी-कुंडी डोक्यावरती घेवून मेंढकीण झपाझप पाऊले टाकत या गावावरुन त्या गावाला असा मेंढक्यासोबत प्रवास करत तीन दगडाच्या चुलीवर स्वयंपाक करून पोटाची भुख भागवावी लागते ते पण रोजच आणि प्रवास सुद्धा  रोजचाच तसेच जीवनाचा संसार ज्या घोड्याच्या पाठीवरती लादला जातो त्या घोड्याची लगाम माझ्या चिमुरड्या भावंडांच्या हातात असते, अनवानी पायाची, आईबापासोबत भटकंती करणं लहाणपणापासूनच आमच्याच वाट्याला का??? त्या शेळ्या-मेंढ्या आणि घोड्यासोबत प्रवास करणार्या माझ्या चिमुरड्या भावंडांना शिक्षणापासून देखिल वंचित रहावं लागतं मग भारत सरकार तर्फे ६-१४ वयोगटातल्या मुलांना मोफत शिक्षण दिलं जात असेल तर त्याचा माझ्या धनगर समाजाला काय फायदा?? होस्टेल्स आणि बोर्डिंग आमच्या सारख्याच भटकंती करणार्यांच्या मुला-मुलींसाठी आहेत काय?? मग तुमची मुलं मुली फुल्ल सेक्यूरिटी असलेल्या आणि फुल्ल एसी असलेल्या आलिशान गाड्यांत आणि बंगल्यात राहतात मग आमच्या सारख्या आयुष्यभर भटकंती करणार्या समाजबांधवांनी नक्की काय पाप केलंय???
          आमच्या समाजातील लहान मुले आई-वडिलांसोबत घोड्याचा लगाम धरून वनवन फिरतात याचा कोणीच कसा काय विचार करत नाही?? पुरावे पाहिजे असतील तर  nitinrajeanuse123.blogspot.com ला भेट द्या मग वास्तव समजेल तुम्हाला.. असं आमचं जगणं आदिवासी सारखं नव्हे त्यांच्यापेक्षाही अतिशय हालाकीचं जगणं असताना आमच्या हक्काच्या ST आरक्षणावरती गदा आणायचा प्रकार कुठपर्यंत चालणार??
         परवा मी एका मेंढ्याच्या कळपाजवळ जाऊन फोटो घेण्यासंबधी  विनंती केली तेव्हा त्या अशिक्षित मेंढक्याच्या तोंडून ऐकलेलं वाक्य हृदयावरती घाव घालण्यासारखं आहे. फोटो कशाला काढताय??? यावरती मी सांगितले की आपल्या समाजाला ST आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्हाला धनगर समाजाच्या भटकंतीवरतीच्या फोटोंचे प्रेजेंटेशन सादर करायचे आहे. हे सांगितल्यानंतर त्या युवकानं विचारलेला प्रश्न तो असा की "आरक्षण म्हंजी काय असतं? ते भेटल्यावर आपल्याला काय फायदा व्हल का??"  याचा अर्थ असा होतो की आमचा धनगर समाज अजूनही अज्ञान आणि अशिक्षित आहे. यातून मला सांगायचा मुद्दा असा की सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या माझ्या धनगर समाजाला ST आरक्षणाच्या अंमलबजावणीपासून का वंचित ठेवलं जातंय??? आणि हे कुठपर्यंत??? आज आमच्या धनगर समाजाची हजारो पोरं IAS/IPS बनण्यापासून वंचित राहिली त्याला जबाबदार कोण?? त्यासाठी आपलीच माणसं विधानभवनात आणि संसदभवनात पाठवा ज्यांच्यामुळे धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी कायदे बनवले जातील. त्यामुळे आपल्यांचे दु:ख काय असते ते फक्त आपल्यानाच कळते इतरांना नाही.
जय मल्हार। जय अहिल्या।। जय यशवंतराजे
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१८५३०००४१२३
 nitinrajeanuse123.blogspot.com
..........................................................

Tuesday, 12 May 2015

चारित्र्यसंपन्न नेत्यांना बदनाम करण्याचं चैनल..

.
शनिवार दि.०९ मे २०१५ रोजी नगर-पुणे रोडवरती नव्याने सुरू झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कीर्ती फैमिली रेस्टोरेंट ची कीर्ती काल जगजाहिर करण्याचं काम मिडीयावाल्यांनी केलं.
कीर्ति फैमिली रेस्टोरेंट हे रायरी पार्क, सुपा टोलनाक्यावळ, सुपा ता पारनेर जि अहमदनगर (नगर-पुणे रोड). खरंतर तिथं रायरी पार्कमध्ये रायरी बियरबार होता तिथेच कीर्ती फैमिली रेस्टोरेंट नव्याने सुरू झाले. त्या रेस्टोरेंट च्या उद्घाटनास महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री मा ना प्रा राम शिंदे साहेब तसेच ग्रामविकास मंत्री मा दिपक केसरकर उपस्थित होते पण त्या अगोदर तिथे रायरी पार्क हा बियर बार होता सध्याच्या मालकाने रायरी पार्क खरेदी करुन तिथे फैमिली रेस्टोरेंट सुरू केले आहे.
Z24 तास आणि ABP MAZA या मिडीयावाल्यांनी बातम्यासाठी सर्वात पुढे राहण्याच्या स्पर्धेमध्ये एका चारित्र्यसंपन्न नेत्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जातेय हे कितपत योग्य आहे.
आजपर्यंत धनगर समाजाचे मोर्चे झाले राजमाता अहिल्याईच्या जयंत्या असोत अथवा यशवंतराव होळकर, राजे मल्हारराव होळकर यांची जयंती असो हे मिडीयावाले तिथपर्यंत कधीच पोहचले नाहीत. पाठीमागे शिरूर येथील मंडनगड मध्ये धनगर समाज बांधवांवरती घोर अन्याय झाला अख्खा महाराष्ट्र हा प्रकार पाहत होता पण सर्वात अगोदर आमच्या चैनल वरती असे म्हणनारी विकाऊ मिडीया सर्वात शेवटी पण पोहचू शकली नव्हती.
बारामती मध्ये झालेल्या आंदोलन आणि उपोषणाची शक्य तितक्या लवकर या मिडीयावाल्यांनी दखल का घेतली नव्हती??? रुई ता अंबड येथील धनगर समाजातील महिलेवरती अत्याचार झाला पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी यांनी राष्ट्रवादीच्या मस्तवाल नेत्यांची म्हणजेच बलात्कार करणार्यांची पाठराखण केली त्यावेळी मिडीयावाले झोपले होते का?? धनगर समाज माळरानावरती दगड-धोंडे अन् काटे-कुटे तुडवत पायांच्या नडग्या वाळेपर्यंत थंडी ऊन वारा पावसाचा विचार न करता रणरणत्या उन्हात शिजत असतो रानोमाळ भटकत असतो मग त्या ठिकाणी तुमची विकाऊ मिडिया सर्वात अगोदच नव्हे तर कधीच पोहचू शकली नाही. पण सत्ताधारी पक्षात एकमेव धनगर समाजाचा मंत्री असताना त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र कोण आणि कोठून करते हे सांगायची गरज पडणार नाही. कोणत्याही पुराव्या अभावी एखाद्या नेत्यांवरती बदनामीच्या बातम्या द्यायला तुम्ही सर्वात अगोदर येता पण  माझ्या समाजावर अन्याय होत असेल तर तुमच्यासारखे भिकारडे आणि विकले गेलेले Z24 आणि ABP Maza कधीच अन्यायाची वाचा फोडत नाहीत मग तुम्ही जी भडवेगीरी अन् चमचेगीरी करताय त्याला लगाम लावायला धनगर समाज समर्थ आहे.
झी २४ तास आणि एबीपी माझा या मिडिया चैनल वाल्यांनी मा ना प्रा राम शिंदे साहेबांची जाहिर माफी मागावी नाहीतर त्यांना त्यांची असल्या चमचेगीरीची आणि खोट्या बातम्या देण्याची दुकाने बंद करावी लागतील याची नोंद घ्यावी. कोणाच्या तरी सांगण्यावरुन आणि कोणाच्या तरी पैशावरती पळणारे मिडीयावाल्यांकडून धनगर समाजातील नेत्यांना बदनाम करायचं कुटील कारस्थान रचलं जातंय आणि हे जर असंच चालू राहिलं तर याद राखा आम्ही धनगराच्या औलादी आहोत शांत बसणार नाही. धनगर समाज एक सोता हूआ शेर है अगर जग जाएगा तो चीरफाड देगा यावरतून तुम्ही समजून घ्या...
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Saturday, 9 May 2015

आज माझ्या धनगर समाजातील पोरं जागी झाली शिकली सवरली, बोलायला लागली, लिहायला लागली तसतशी प्रस्थापितांच्या ह्रदयात धडकी भरु लागली, हीच धनगर समाजातील पोरं जागी झाली तर प्रस्थापित घराणेशाहीला सुरंग लावतील असे भाकित धनगर समाजाचे राजकीय शत्रू असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी केले होते आणि ते आज खरं होत आहे. शिक्षण हे एक वाघिणीचं दुध आहे जो पितो आणि पचवतो तो वाघाचा बछडा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. आज धनगर समाजातील पोरं जागी झाली असली तरी आपल्या-आपल्यातच लढू लागली भांडू लागली हे सर्वात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल.
देश स्वातंत्र्य झाल्यापासून गेली ६७ वर्षे झाली माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजावरती अन्याय होत आला मग आमच्यावरती होणार्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आमच्यासारखी तरुण पोरं जागी व्हायला लागली अन् धारदार शब्दरूपी तलवारीनं वैचारिक लढाई एवं प्रसंगी रस्त्यावरती उतरून आपले हक्क हिसकावून घेवू लागली तेव्हा माजलेल्या अन् मस्तावलेल्या प्रस्थापितांची बोलती बंद झाली. डॉ बाबासाहेबांनी घटनेत दिल्याप्रमाणे आरक्षण असो अथवा आमचे अन्य हक्क असोत ते आम्ही हिसकावून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही हा आमचा पवित्रा आहे प्रसंगी समाजासाठी अन हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी बेहतर या वृत्तीनं आम्ही आज लढतो आहे झगडतो आहे.
भट जातींनी आणि प्रस्थापित घराणेशाहींनी लोकशाहीच्या नावावरती गोरगरीब आणि रानावनात भटकंती करणार्या धनगर समाजाचं आर्थिक, राजकिय, शैक्षणिक आणि सामाजिक शोषण केलं आहे त्या सत्तापिपासू भडव्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. एकेकाळी राजा समाज असणारी आमची औलाद आज दुसर्यांच्या गुलामगीरीत का जगतेय?? हा प्रश्न मनात गोंदळ करुन जातो. धनगर समाजाची दलाली अन् शरद पवाराची चमचेगीरी करणार्या धनगर समाजातील भडव्यांना घरात बसविल्याशिवाय ही धनगराची औलाद शांत बसणार नाही कारण आजपर्यंत धनगर समाजावरती अन्याय करण्याचं काम धूर्त आणि आमच्या धनगर समाजाचा राजकीय शत्रु असलेल्या शरद पवारांनी केलंय मग त्यांची चमचेगीरी अन् चाकरी करणार्या दलालांनी वेळीच शहाणं व्हावं. स्व बी के कोकरे साहेबांची राजकीय हत्या करणार्या हत्यारांना रस्त्यावरती आणाल्याशिवाय मी शांत बसणार नाही मग तो माझ्या धनगर समाजाचा असो अथवा कोणीही हे प्रत्येकांच्या लक्षात असू द्या. सत्य नेहमी कटू असलं तरी नेहमी सत्याचाचाच विजय होतो म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांनी  "सत्यमेव जयते" हे ब्रीदवाक्य आहे दिले आहे ते अगदी प्रेरक आणि सार्थक ठरते. विठ्ठला कोणता झेंडा घेवू हाती?? म्हणनार्यांना एवढी अक्कल कशी काय नाही की पंढरीचा विठोबा (पांडूरंग) धनगरच आहे म्हणून महात्मा फुलेंनी दिलेला समतेचा पिवळा झेंडा हाती घेवूनच आज आम्ही सत्याच्या मार्गानं वाटचाल करतोय मग दुसरा झेंडा का म्हणून हातात घ्यायचा??? हा झेंडा घेवून सत्याच्या मार्गानं जाताना जर कोणी आमच्या वाटेला गेला तर त्याच्या वाटेवरती जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवरती परत येणार नाही हा धनगर समाजाचा इतिहास आहे हे संबंधितांनी विसरू नये आणि जो समाज इतिहास घडवतो तो इतिहास विसरू शकत नाही अन् इतिहास विसरणारे कधी इतिहास घडवू शकत नाहीत हा सुद्धा मोठा इतिहास आहे. आद्य लढवय्ये बादशाह चंद्रगुप्त मौर्य पासून राजा सम्राट अशोक ते होळकर घराणेशाहीपासून बोरगावचा ढाण्या वाघ बापू बीरु वाटेगांवकर व स्व बी के कोकरे साहेबांचा खरा इतिहास समाजासमोर मांडून तो  समाजापर्यंत पोहचवण्याचा एक प्रामाणिक आणि छोटासा प्रयत्न सदैव करत राहील. मग जर कोणी माझ्या आडवा आला तर त्याला उभा चिरायची धमक या मल्हारराव होळकर आणि अहिल्याईच्या भक्तामध्ये आहे हे विसरू नका.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Sunday, 3 May 2015

परिवर्तनासाठी एक छोटासा प्रयत्न..

मस्त झोपलाय हो माझा धनगर समाज शांत झोपूद्या. गाढ निद्रावस्थेत निपचित पडलाय उगाच डवचू नका. कशाला उगंच बोंबाबोंब करताय?? खरंतर एकवेळ झोपलेल्यांना जागे करता येते पण झोपेचं सोंग घेणार्यांना जागं करता येत नाही मा म्हणीचा अर्थ धनगर समाजासाठी सार्थ ठरतो. अहो ज्यांना आपला इतिहासच माहीत नाही ते काय खाक इतिहास घडविणार आहेत का???
उगाच व्हाटसप आणि फेसबुक वरतून वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे??? जिथं स्वाभिमान गहाण टाकून प्रस्थापितांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या आणि प्रस्थापितांचे बुट चाटायची सवय लागलेल्या समाजातील दलालांना कीतीही सांगून समजावले तरीही धूतलेल्या गाढवासारखी त्यांची अवस्था होते कारण "गाढव कितीही धूतलं तरी उकिरंड्यातच लोळतं" (ही म्हण मला नाईलाजानं वापरावी लागतेय). मग त्या दलालांना स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचे बाजारीकरण करायचं एवढंच त्यांना माहीत आहे. त्यांना पैशाची तलप लागली आहे मग ते प्रस्थापितांकडुन लाखो नव्हे तर करोडो रुपये घेवून येतात अन शे-दोनशे रूपये देवून सर्वसामान्य जनतेला आणि दिवसरात्र शेळ्या-मेंढ्या राखून पायाच्या नडग्या वाळवलेल्या गोरगरीब धनगर  समाजाला भुलवायचं काम करताहेत.
आम्ही मात्र व्हाटसप वरती समाजाला एकत्रित करण्याच्या बढाया मारतोय. काहीजण बोलतात स्वतःच्या प्रसिद्दीसाठी लिहीताय, कोणी कोणी तर आम्हाला विद्वान आहात असे कमेंट करतात तर कोणी "हा एक चिमुरडा आम्हाला ज्ञान शिकवायला लागलाय " म्हणून बोंबा मारताहेत. मग नक्की काय करायचं तेच सुचत नाही. पण माझी गप्प राहून तमाशा बघत बसणार्यांची औलाद नाही तर हे विचार तळागळातील युवा वर्गापर्यंत पोहचवायचे आहेत. जर युवा वर्ग जागृत झाला तर अन्यायाच्या विरोधात पेटून उठेल अन् एकेकांना पेटवून टाकेल. दिवसेंदिवस समाजाला भुलवणारे दलाल मोठे होत चाललेत अन रानमाळावर दगड-धोंड्यातून काटे-कुटे तुडवणारा माझा माय-बाप अजून अज्ञानीच आहे. प्रस्थापित धुर्त नेते जसे सांगतील तसंच  धनगर समाजातील नेते करताहेत त्याला काहीजण अपवाद आहेत. माझ्या गोरगरीब आणि दुष्काळाच्या खाईत होरपलेल्या मायबापांना  खरं राजकारण काय आहे हेच माहीत नाही. ज्यादिवसी प्रत्येक धनगर बांधवांना खरं राजकारण कळेल त्यादिवशी  बारामतीच्या बोक्याच्या व त्याचे बुट चाटणार्या धनगर समाजातील  नेत्यांच्या  टाळूवरची केसं शिल्लक राहणार नाहीत कारण त्या हरामखोरांच्या स्वागताला पायातलं पायतान हातात घेवूनच धनगर समाज बांधव उभे असतील हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज पडणार नाही. पण शेतामळ्यात राबराब राबणार्या अन् माळरानावर दिवसरात्र शेळ्या-मेंढ्या राखणार्या धनगर समाजाला खरं राजकारण माहीत होत नसेल तर मग व्हाटसप आणि फेसबुक वरतून आम्ही समाजात काय परिवर्तन करू शकतो.? म्हणजे आम्हाला काय काम नाहीत असा त्याचा अर्थ होतो.
जिथं लोकांची मनं बदलली जात नाहीत तिथं आम्ही  काय बदल घडविणार??? राजेशाही थाटात जगणार्या आणि एकेकाळी राजा समाज असणार्या  आम्ही  औलादी असताना देखील आज चमचेगीरी अन् गुलामगीरी प्रवृत्ति समाजात वाढत चाललेय. धनगर समाजाला एकमेकांच्या विरोधात लढायला प्रवृत्त केले जाते तिथं माझ्या धनगर समाजाला कधीच वरती येवू द्यायचं नाही हा प्रस्थापितांचा उद्देश्य आमच्या ध्यानात कधी येणार??? अरे पण प्रस्थापितच नव्हे तर आज धनगर समाजातीलच वरीष्ठ नेते एकमेकांची जिरवण्यासाठी राजकारण करताहेत कीती लज्जास्पद बाब आहे ही.
मला त्यांची नावे घ्यायची नाहीत कारण त्यांना कळालेही असेल मी कोणाबद्दल बोलतोय ते...
आज धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जरी असला तर प्रत्येकाला वाटतंय आरक्षण मिळावं पण त्याचं श्रेय स्वतःच्या पारड्यात पडावं ही कटूनीती धनगर समाजातील नेत्यांची झाली आहे त्यामुळे प्रस्थापितांना दोष देण्यात अर्थ नाही. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ही म्हण माझ्याच धनगर समाजातील नेत्यांना वापरावी लागेल. मग तिथं कोण लहान असेल अथवा मोठा.
धनगर समाजातील नेत्यांना वाटत असेल की धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे तर ज्या पक्षात ज्या संघटनेत आज तुम्ही समाजाची चमचेगीरी करताय त्या त्या पक्षाचा तुम्ही राजीनामा द्या अन पिवळ्या झेंड्याखाली एकत्रित येवून मंत्रालय गाठा तुम्हाला आरक्षण कोण देत नाही तेच मी बघतो.
मग कोणी भाजपचा असेल शिवसेना, माकप, भाकप, शेकाप, राष्ट्रवादी असेल कोंग्रेस असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असो शिवसंग्राम असो जनसंग्राम असो अथवा जनता दल असो अथवा अलान फलान कोणते असतील तर त्या त्या पक्षातील धनगर समाजातील नेत्यांना माझी विनंती आहे की जर तुम्ही धनगर असाल आणि जर तुमच्या नसात धनगरांचं रक्त सळसळत असेल तर प्रत्येकांनी राजीनामे देवून पिवळ्या झेंड्याखाली एकत्र या नाहीतर आरक्षणाच्या आणि समाजविकासाच्या फालतू आणि पोकळ बडबड करत बसू नका. खरे मल्हारराव होळकरांचे वारसदार असाल तर थोडा कमीपणा घ्यायला शिका कोणीतरी धाकल्या बापाचं व्हायला शिका सतराशे साठ संघटना तयार करून समाजाचे विभाजन करत बसू नका आणि महत्वाचं म्हणजे धनगर समाजातील ५२ पोटजातींना एकत्रित करून राज्य पातळी तसेच राष्ट्र पातळीवरती एकत्रित येवून चर्चा विनीमय करा आणि तुम्हाला एकत्रितपणे येवून चर्चा करायची नसेल तर याचा अर्थ तुम्ही माझ्या धनगर समाजाचं सरळ सरळ विभाजन करताय मग तुमच्या संघटना काय पेटवायला आहेत का??
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
आपलाच समाजबांधव
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Thursday, 23 April 2015

पुन्हा एक नवी दिशा...

⚡👉पुन्हा एक नवी दिशा...✨
अज्ञानाच्या खाईत लोटलेल्या आणि अंधकाराने ग्रासलेल्या माझ्या धनगर समाजाला खरंच एका नव्या दिशेची गरज आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या धनगर समाजाचं भट-ब्राह्मणांनी पार कंबरडंच मोडून ठेवलंय. भाकित सांगून आणि थापा मारुन भोळ्या भाबड्या धनगर समाजाला देवाधिकाच्या नादी लावायचं अन प्रशासनातील सर्व पदे काबूत ठेवायची हा त्या पाठीमागचा गणिमी कावा आज माझ्या धनगर समाजानं वेळीचं ओळखायला हवा.
५००० वर्षापूर्वी ज्या धनगर समाजानं अक्षरांचा शोध लावला तीच अक्षरे आज धनगर समाजापासून शेकडो मैल दूर आहेत असं का?? का ही अक्षरं आमच्यापर्यंत पोहचू शकली नाहीत?? ब्राह्मण शिक्षित झाले पण अक्षरांचा शोध लावणारे अडाणी कसे काय राहिले याचा विचार तमाम धनगर बांधवांनी करायला हवा.
भर उन्हाळ्यात दिवसभर आग ओकणार्या सुर्याची किरणे झेलत, अंगाची काहिली होत असताना तप्त उन्हात दगडधोंडे अन काटेकुटे तुडवत शेळ्या मेंढ्या राखणार्या आई-वडिलांची अवस्था काय होते याचा विचार माझ्या धनगर समाजातील विद्यार्थी बांधवांनी  कधी केला का? पावसाळ्यामध्ये कधी कधी अवकाळी पावसाचा फटका तर गारांचा सपाटा सहन करावा लागतो. भर हिवाळ्यातील कडक थंडीमध्ये सुद्धा मेंढ्यांची राखण करावीच लागते.  इयत्ता सातवी नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लगातार दोन महिने मी शेळ्या-मेंढ्याकडेच होतो मग आज या गावी तर उद्या त्या गावी असा रोजचा प्रवास मी स्वतः अनुभवलाय. त्यामुळे उन्हाळा असो पावसाळा अथवा हिवाळा असो तिन्ही ऋतु मध्ये भयंकर ऊन, धो धो कोसळणारा मुसळधार पाऊस तसेच अंगाचा थरकाप उडवणारी कडक थंडी यांचा विचार न करता मेंढ्यामागे उभे ठाकायचे हे जणू काय धनगर समाजाच्या पाचवीलाच पुजलेलं, शिवाय इतरांसारखी कोणतीही साप्ताहिक अथवा मासिक सुट्टी माझ्या धनगर समाजातील आई-वडिलांना अनुभवता येत नाही त्यामुळेच शाळा असोत अथवा सरकारी कार्यालये यांपासून दूर राहिलेल्या धनगर समाजाला अंधकारातून प्रकाशात यायला तसा खूप उशीर झाला.
आजचे विद्यार्थी अथवा पालक सहज बोलून जातात की शिक्षण घेवून अन् पदव्या हासिल करून काय फायदा?? नोकरीच मिळत नाही. पण त्या सर्वांना माझे एकच सांगणे आहे की बांधवांनो तुम्ही शिक्षण घेताना कधी तुमच्या आई-वडिलांच्या भावनांचा विचार केला होता का???  दिवसभर पायाच्या नडग्या दुखेपर्यंत शेळ्या-मेंढ्यांमागे उभे ठाकलेल्या आणि दुसर्यांच्या शेतात दिवसभर राबराब राबून घाम गाळून ५-५० रु कमविण्यासाठी अपार कष्ट करणार्या आपल्या आई-वडिलांच्या भावना काय असतील याचा विचार कधी केला का?? दिवसभर कष्ट करून थकून भागून घरी परतणार्या आई-वडिलांचा चेहरा अगदी सुकून जातो पण शाळेतून आपला मुलगा/मुलगी घरी आलेत की नाही याचा विचार करत ते झपाझप पावलं टाकत घरी येतात, शाळेतून आल्यानंतर घरासमोर अंगणात खेळत असलेल्या आपल्या मुलाला/मुलीला समोर पाहून त्या सुकलेल्या चेहर्यामध्ये एक विलक्षण आनंद दिसून येतो त्यांच्या ओठांवरती एक हलकसं स्मित हास्य उमटून दिसते, पण त्यांच्या त्या हास्यामध्ये भावना लपलेल्या असतात आणि त्यांना आपल्याकडून काही अपेक्षा देखिल असतात याची जाणीव तुमच्या-माझ्या सारख्यांना असायला हवी. जर तुम्ही आम्ही त्यांच्या भावना समजू शकत नसू तर मग आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला अन् आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. त्या भावना आणि त्यांच्या  अपेक्षा ज्यांना पुर्ण करता येत नसतील तर स्वतःला त्याची लाज वाटायला हवी. आपल्या मुला/मुलीनं खूप शिकावं IAS/IPS/Engineer/Advocate/Doctor/BUSINESSMEN तसेच इतर उच्च पदावरती पोहचावं, स्वतःचं तसेच आई-वडिलांचं नाव रोषण करावं या त्यांच्या भावना असतात मग त्या भावना ज्यांना ज्यांना समजतात तेच यशस्वी होतात.
ज्यांना आई वडिलांच्या हाताला बसणार्या चटक्याची जाण असते त्याला समाजावरती होणार्या अन्यायाचं भान असतं हे नाकारता येत नाही.
 एकदा आजोळी गेल्यानंतर तेथील शेजारच्या आजीनं मला सांगितलेलं एक वाक्य आयुष्यभर माझ्या लक्षात राहील ते म्हणजे "आयबाप आडाणी हायत म्हणून मेंढरं राखत्याती. पोरांनो तुमी तर शिका खूप मोठं व्हा अन् आय-बा च्या पायातली कुरपं मुजवा नायतर तुमीपण मेंढरं राखत बसचाल" त्या आजीच्या वाक्यामुळं आज माझं जीवन बदलले आहे. माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही तर आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव मला झाली होती कारण मी सुद्धा दोन महिने त्यांच्यासोबत गावोगावी फिरुन पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढ्या राखलेत तर कधी कधी मला एकट्यालाही दिवसभर मेंढ्यासोबत राहायचा योग आला होता कधी कोण्या शेतकर्यांच्या शिव्या तर कधी मार सुद्धा खावा लागायचा. मला ते अनुभवलेले दिवस नको होते म्हणून सरळ बोर्डिंग गाठलं होतं. धनगर समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ही उणीव नाही भासली पाहिजे, आई-वडिलांच्या कष्टाची प्रत्येकाला जाण असेल तर उद्या भविष्यात धनगर समाजाची पोरं IAS/IPS/Doctor/Engineer/Advocate/Businessman या क्षेत्रात चमकतील हे सांगायला कोणाची गरज पडणार नाही आणि ही एक दगडावरची रेषा आहे.
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday, 16 April 2015

समाजामध्ये परिवर्तन पाहिजे की परावर्तन??
यावरती थोडंपार करावे लागेल चिंतन....
आज धनगर समाज खरंच जागा आहे का??
भरकटलेल्या धनगर समाजाला जागं करण्यासाठी काही इतिहासकार, लेखक, विचारवंत तसेच शिक्षित यूवा वर्ग आज जोमाने आणि आक्रमकपणे समाजकार्य करताना दिसून येतोय पण धनगर समाजात लेखकांची आणि अभ्यासकांची संख्या खूप कमी आहे. असे असताना इतर समाजबांधव फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत असंच आजपर्यंत मला जाणवत आले आहे.
समाजासाठी तळमळीने आणि सडेतोडपणे सत्यावरती प्रकाश टाकणारे अनेक लेख लिहून समाजापर्यंत पोहचवण्याचं काम लेखक आणि विचारवंत पोडतिडकीने करत असताना समाजातून त्यांना म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. उलट सत्य समाजासमोर मांडले तर  त्यांना धमक्या आणि शिवीगाळ सुद्धा केली जाते. मग असा समाज खरंच जागा होउ शकतो का?? हा प्रश्न माझ्या मनात घोळत आहे.
धनगर समाजाचे काही अभ्यासक ,लेखक, विचारवंत तसेच शिक्षित युवा वर्ग आज आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि समर्थ आहेत, समाज जागृति करुन त्यांना काही स्वार्थ साधायचा नाही तर त्यांचा हेतू एकच आहे की गाढ निद्रावस्थेत झोपलेल्या माझ्या धनगर समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे आपल्या सोबत घेवून चालायचं आणि अंधश्रद्धेतून मुक्त करून सक्षम, समर्थ तसेच शक्तिशाली धनगर समाज बनवून समाजाची ओळख अख्ख्या भारतभुमिला करुन द्यायची. पण अंधकारातून बाहेर न पडणारा आणि अंधश्रद्धेतून मुक्त न होऊ पाहणारा समाज बदल घडवू शकतो असं मला यथकांचीतही वाटत नाही.
धनगर समाजातील अभ्यासक, विचारवंत, लेखक, कवि तसेच शिक्षित युवा वर्ग आपापल्या परीने समाज जागृति करत असताना त्यांस अडथळा आणायचे काम काही विकृत मंडळी करत आहेत, एखादा लेख अथवा कविता जर लिहून पाठवल्या तर ठराविक समाजबांधव प्रतिसाद देतात पण इतर मात्र खूप शहाणा आहेस का?? इतिहासकार आहेस का?? स्वतःला अभ्यासक समजता का?? तुम्ही काय चाणक्य आहात का?? असे कमेंट करत बसतात. मला सुद्धा काहीजण म्हणाले की तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरुन कार्य करत आहात आणि स्वतःची प्रसिद्धि करून घेत आहात. पण त्यांना मी सांगू इच्छितो की बाबांनो आम्हाला समाजाची जाण आहे आमच्यावरती होणार्या अन्यायाचं भान आहे, म्हणून आम्ही पाठीमागे राहिलेल्या समाजाला सोबत घेवून निघालोय...
जर धनगर समाज एकत्रित येवून लढू लागला तरच आपल्याला आपल्या हक्काचं ST चं आरक्षण मिळेल, आरक्षणा व्यतिरीक्त शिष्यवृत्तीची देखिल गंभीर समस्या आज विद्यार्थी बांधवांना सतावतेय. आपल्याला आरक्षण आणि शिष्यवृत्ती या समस्या जर solve झाल्या तर प्रशासनामध्ये धनगर समाजाची पोरं चमकतील. याशिवाय अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहत आहेत. आज आमच्यासारखे लेखक समाजामध्ये जागृति करत असताना आम्हास धमक्या आणि शिवीगाळ यांसारख्या गोष्टीचा त्रास होणं स्वाभाविकच आहे. कारण अमेरिका सारख्या Well developed country मध्ये अब्राहम लिंकन यांनी गुलामगीरी प्रथेला विरोध केला तर तेथील उच्चस्तरीय लोकांनी त्यांची हत्या केली,  भारतातील राजाराम मोहन रॉय यांनी विधवेशी लग्न करुन समाजासमोर आदर्श ठेवला  तेव्हा काही समाजकंटकांचा त्रास त्यांना सहन करावा लागला होता. संत तुकोबांची देखिल हत्या करण्यात आली होती, मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करणारे आणि अस्पृष्यता हटवणारे राष्ट्रपिता महात्मा फुले आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांनाही उच्चवर्णियांकडून त्रास सहन करावा लागला एवढेच नव्हे तर महात्मा फुलेंना मारेकरी धाडले होते हे सुद्धा तितकंच सत्य आहे, बी के कोकरे साहेबांची देखिल हत्या करण्यात आली. अशी अनेक उदाहरणे देता येतील..
ज्या ज्या लोकांनी सत्य मांडायचा आणि संघर्ष करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना विरोध झाला आणि आजही होत आहे.
आज जे लेखक विचारवंत आणि शिक्षित यूवा वर्ग समाजासाठी झटत असताना त्यांना नातेवाईकांकडेही लक्ष देता येत नाही नातेवाईकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच घरातील सदस्यांना वेळ देता येत नाही, मित्रपरिवारांपासून थोडंसं दूर झाल्यासारखं वाटतय पण डोळ्यासमोर समाजाची झालेली  दशा दिसत असताना समाजाला दिशा देणं गरजेचं आहे. आम्ही काय कोणावरती उपकार करत नाही पण एक सामाजिक बांधीलकी जोपासून निस्वार्थपणे समाजासाठी झटतोय आणि झगडतोय तरच आपल्या पुढच्या शंभर पिढ्या कोणाकडेही गहाण न पडता स्वाभिमानांनं जगतील, मग याची जाणीव प्रत्येक समाजबांधवांना का होत नाही???
कोल्ह्या कुत्र्यांचं जीवन जगायचंय की जागृत होऊन पुन्हा राजेशाही थाटात वावरायचंय??? याचा निर्णय जेमतेम आजच्या सुशिक्षित युवा वर्गानं तरी घ्यायला हवा.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

Sunday, 12 April 2015

सत्य नेहमी कडूच असतं...
आज खरं सांगायला गेलो तर लोकांना बरं वाटत नाही अन् बरं सांगायला गेलो तर खरं वाटत नाही. मग खरंबरं करत कुरबुर व्हायला सुरवात होते. अर्थातच सत्य हमेशा परेशान होता है/करता है। असंच सत्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यापासून धनगर समाजावर सतत अन्यायाचीच कुर्हाड कोसळत आली होती आणि आजही तोच प्रकार आहे. स्व बी के कोकरे साहेबांनी ती अन्यायाची कुर्हाड सावरायचा प्रयत्न करुन बारामतीतून धनगर समाजाला "यशवंत सेना" या संघटनेखाली एकत्रित आणले, पण शरद पवारांच्या मनात पाल चुकचुकली की जर धनगर समाज बी के कोकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाला तर मग भविष्यात आपल्याला राजकारण करता येणार नाही. बी के कोकरे साहेबांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने पवारांनी काट्यानं काटा काढायचा हा डाव आखला आणि आर्थिक बाबतीने समृद्ध असलेल्या  धनगर समाजातीलच स्व.शेंडगे बापूंना जवळ केले. ही सत्य परिस्थिति समाजासमोर मांडली म्हणजे आम्ही काही गुन्हा केला का?? कारण त्यावेळची अशी परिस्थिति पुन्हा उद्भवू नये हा त्या पाठीमागचा उद्देश्य आहे.
आज जे धनगर नाहीयेत असे लोक मला आर्वाच्च भाषा वापरून शिवीगाळ करताहेत त्या भामट्यांना छाती ठोकपणे सांगतो की बाबांनो ज्यांनी धनगर समाजाची दिशाभुल करून समाजाचं वाटोळं केल त्याबद्दल मी माझं मत मांडलं होतं आणि आपली बाजू स्वतंत्रपणे मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार देखिल आहे. जर तुमची बाजू स्ट्रॉन्ग असेल तर तुमचं मत तुम्ही मांडू शकता. आर्वाच्च भाषा वापरून आणि घाणेरड्या शिव्या देवून तुम्ही तुमच्यावरती झालेले आई-वडिलांचे संस्कार इतरांना दाखवून देताय हे विसरु नका. मग माझी लायकी काढण्यागोदर तुम्ही स्वतःची लायकी तपासून पहा.
तुम्ही फोन करून सांगताय की आमच्या नेत्यावर टीका करु नका, चांगली गोष्ट आहे. धनगर समाजाच्या कोणत्याही नेत्यावर मी टीका करणार नाही पण जर माझ्या धनगर समाजाचं नाव घेवून जर कोणी बारामतीच्या बोक्याचं तळवे चाटत असेल तर त्याला समाजासमोर उघडा नागडा केल्याशिवाय सोडणार नाही. माझ्या धनगर समाजावरती काय अन्याय होतोय ते पहायचं असेल तर धनगर समाजात जन्माला या.
मी कोणत्या पक्षाचा समर्थक नाही, कोणत्याही संघटनेचा सभासद देखिल नाही अन् कोणत्या नेत्याचा दलालही नाही. कोणत्या नेत्याकडून मी चहाची देखिल अपेक्षा करत नाही पण जे बाजारबुणगे धनगर समाजाची चमचेगीरी करुन धनगर समाजाला लांडग्यांच्या दावणीला बांधायचे काम करताहेत त्या त्या नेत्यांनी एकतर आपले विचार बदलावेत नाहीतर राजकीय सन्यास घ्यावा कारण माझ्या धनगर समाजाचं नाव घ्यायचा देखिल अधिकार त्यांना नाही.
मला फोन करून अथवा मेसेज पाठवून धमक्या द्यायचं बंद करा. असल्या फालतु आणि पोकळ धमक्यांना मी कधी घाबरत नाही. आणि असल्या धमक्यांना घाबरून मी माझं समाजकार्य सोडणार नाही. मी एखादा निर्णय घेत असेल तर मागचा-पुढचा विचार करूनच निर्णय घेतो. त्यानंतर मग आर या पार पुढे काय प्रसंग उद्भवतील याचीही मला जाणीव आहे आणि त्यावरती उपाय सुद्धा आहेत. असे निर्भीडपणे आपले मत मांडायला हिम्मत तर लागतेच पण तेवढी धमक देखिल असायला हवी. एखाद्या पालतू कुत्र्यानं सांगाव की आमुक-आमक्या नेत्यावर टीका करु नका, बाकी कोणावरही कर. पण जर डोळ्यादेखत माझ्या समाजाचं बाजारीकरण आणि वाटोळं होत असेल तर मुग गिळून गप्प बसायला मी काय गांडूची औलाद नाही हे तुम्ही विसरु नका. समाजाला योग्य दिशा द्यायचं काम माझ्यासारखेच भरपूर विचारवंत करताहेत आणि त्यांना सुद्धा अशा गोष्टींचा सामना करावा लागतोय. आज समाजामध्ये जागृति झाली आहे त्यामुळे दलालांना समाज चांगलाच ओळखून आहे. माझ्या विचारामुळे  याचे काय परिणाम होतील हे तुम्ही मला सांगत बसू नका कारण लहानपणापासूनच मी परिणाम झेलत आलोय त्यामुळे परिणामाची भाषा मला शिकवू नका. तुमची असभ्य भाषा ऐकुण देखिल मी सभ्यपणे तुमच्याशी संवाद साधत असेल तर त्याचवेळी तुम्हाला अक्कल यायला हवी होती तरीपण तुम्ही जर शिव्या देवून मला धमक्या देत असाल तर मग माझा सळसळत्या रक्ताचा अन् अहिल्येच्या भक्ताचा धनगरी हिसका दाखवायला मला क्षणाचाही वेळ लागणार नाही.
सर्व गोष्टीचा अंत म्हणून धनगर शांत आहे. तर तुम्ही आमचा अंत बघू नका नाहीतर....याद राखा...
खबरदार....!!!
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com