Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday, 17 March 2016

एक धनगर लाख सिकंदर... :नितीनराजे अनुसे


         मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर भल्या-भल्या दुश्मनांना चारीमुंड्या चित करणाऱ्यांच्या जमातीत जन्माला आलेली आम्ही माणसं आमच्या थोर महापुरूषांनी सुवर्णाक्षरात कोरुन ठेवलेला आमचा दैदिप्यमान इतिहास विसरतो आणि मग तिथेच आमचा विकास खुंटतो. जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधीच प्रगती/विकास करू शकत नाही हे तितकच सत्य आहे. या भारत देशावर इंग्रजांनी आक्रमण करून फंद फितुरी करत १५० वर्षे राज्य केले तर भारतीय इतिहासकार त्या फिरंग्यांचा उदो उदो करत बसले आणि निर्लज्जप्रमाणे सांगू लागले की इंग्रजांनी भारताला १५० वर्षे गुलामगीरीत ठेवलं. पण धनगर समाजाने या भारतावरती नव्हे तर आशिया खंडाच्या विशाल भूभागावरती ३५० वर्षापेक्षा अधिक राज्यकारभार करून गुलामगीरीत ठेवले होते इंग्रजांना कापून काढत यशवंतराव होळकरांनी त्यांना सळो की पळो करून सोडले होते हे प्रत्येकाच्या लक्षात असूद्या.
       आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, राजा सम्राट अशोक, थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर, रणरागिणी राजमाता महाराणी अहिल्याई होळकर, आद्यस्वातंञ्यसेनानी महाराजा यशवंतराव होळकर, आद्यमहिला स्वातंत्र्यसेनानी वीरांगणा भिमाई होळकर अशा थोर महापुरूषांचा जमातीत जन्माला आलेले दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाचे आम्ही वारसदार, आम्हाला आमचाच इतिहास माहित नसल्याने इथल्या माजलेल्या आणि मस्तावलेल्या प्रस्तापितांची गुलामगीरी अन् चमचेगीरी करण्यातच आजच्या सरदारांनी (प्रस्तापितांच्या चपला उचलणाऱ्या नेत्यांनी) समाधानता स्विकारली हे धनगर समाजाचे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. कदाचित आमचा इतिहास चुकीचा लिहला गेला कारण आमचा इतिहास लिहणारे इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पण आमचा इतिहास दुरुस्त करण्यासाठी तरी कीतीजण प्रयत्न करतात याचा पण अभ्यास करायला हवा.
        आज जर धनगर समाजाला आपला खरा इतिहास समजला तर प्रेमळ तितकाच अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारा आणि ध्येय्यवेडा असलेला धनगर समाज पुन्हा या जगावरती राज्य करू शकतो पण आजपर्यंत आम्हाला आमचे आस्तित्व समजले नव्हते म्हणून धनगर समाजाचे फार मोठे नुकसान झाले. आज आम्हाला आमच्या आस्तित्वाची जाणीव करून घ्यावी लागेल, त्यासाठीच
आता
गरज आहे आमचा खरा इतिहास जाणून घेण्याची
गरज आहे तरुणांमध्ये स्वाभिमान जागवण्याची
गरज आहे समाजाला जाग्रूत करण्याची
गरज आहे समाज प्रबोधन करण्याची
गरज आहे समाज संघटन करण्याची
गरज आहे समाजाला योग्य दिशा देण्याची
गरज आहे समाजाचे प्रश्न समजून घेण्याची
गरज आहे ते समाजाचे प्रश्न सोडवण्याची
गरज आहे स्व.बी.के.कोकरे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची
यासाठी हवा आहे विश्वास अन् साथ फक्त तुमची
 पुन्हा एकदा खवळून उठेल धनगर समुद्रासारखा,
 पुन्हा एकदा पेटून उठेल धनगर वादळासारखा,
 पुन्हा एकदा धनगर भरवेल धडकी सह्याद्रीच्या पर्वतरांगेला अन्     पुन्हा एकदा कवेत घेईल त्या  हिमालयाला. सळसळत्या रक्तामध्ये अन्यायाची चीड आणि लालबुंद डोळ्यामध्ये रसरसलेला निखारा साठवून ठेवलेला धनगर ज्यादिवशी पेटून उठेल आणि ज्यादिवशी महाराष्ट्रातील एकाच रक्ताचा अन् हाडामांसाचा प्रत्येक धनगर जातीसाठी माती खाऊन हक्कासाठी रस्त्यावर उतरेल तेव्हा महाराष्ट्राचा फक्त हरियाणा (जाटांचे आंदोलन) होणार नाही तर यशवंतराव होळकरांच्या वारसदारांनी घडवलेल्या नवीन इतिहासाची पुस्तकं वाचायला मस्तकं शिल्लक राहणार नाहीत.
म्हणूनच म्हणतो खबरदार जर आम्हावर अन्याय कराल तर उद्याचा सुर्य उगवू देणार नाही.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५ ३००० ४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com

Saturday, 23 January 2016

एक ऐसा शासक, जिसके सामने अंग्रेजों ने हरबार टेक दिए घुटने।


Dainik Bhaskar News | Feb 24,2012

भोपाल। एक ऐसा भारतीय शासक जिसने अकेले दम पर अंग्रेजों को नाकों चने चबाने पर मजबूर कर दिया था। इकलौता ऐसा शासक, जिसका खौफ अंग्रेजों में साफ-साफ दिखता था। एकमात्र ऐसा शासक जिसके साथ अंग्रेज हर हाल में बिना शर्त समझौता करने को तैयार थे। एक ऐसा शासक, जिसे अपनों ने ही बार-बार धोखा दिया, फिर भी जंग के मैदान में कभी हिम्मत नहीं हारी।
इतना महान था वो भारतीय शासक, फिर भी इतिहास के पन्नों में वो कहीं खोया हुआ है। उसके बारे में आज भी बहुत लोगों को जानकारी नहीं है। उसका नाम आज भी लोगों के लिए अनजान है। उस महान शासक का नाम है - यशवंतराव होलकर। यह उस महान वीरयोद्धा का नाम है, जिसकी तुलना विख्यात इतिहास शास्त्री एन एस इनामदार ने 'नेपोलियन' से की है। भास्कर नॉलेज पैकेज के अंतर्गत आज हम आपको इसी वीर योद्धा के बारे में बताने जा रहे हैं।
पश्चिम मध्यप्रदेश की मालवा रियासत के महाराज यशवंतराव होलकर का भारत की आजादी के लिए किया गया योगदान महाराणा प्रताप और झांसी की रानी लक्ष्मीबाई से कहीं कम नहीं है। यशवतंराव होलकर का जन्म 1776 ई. में हुआ। इनके पिता थे - तुकोजीराव होलकर। होलकर साम्राज्य के बढ़ते प्रभाव के कारण ग्वालियर के शासक दौलतराव सिंधिया ने यशवंतराव के बड़े भाई मल्हारराव को मौत की नींद सुला दिया।
इस घटना ने यशवंतराव को पूरी तरह से तोड़ दिया था। उनका अपनों पर से विश्वास उठ गया। इसके बाद उन्होंने खुद को मजबूत करना शुरू कर दिया। ये अपने काम में काफी होशियार और बहादुर थे। इसका अंदाजा इसी से लगाया जा सकता है कि 1802 ई. में इन्होंने पुणे के पेशवा बाजीराव द्वितीय व सिंधिया की मिलीजुली सेना को मात दी और इंदौर वापस आ गए।
इस दौरान अंग्रेज भारत में तेजी से अपने पांव पसार रहे थे। यशवंत राव के सामने एक नई चुनौती सामने आ चुकी थी। भारत को अंग्रेजों के चंगुल से आजाद कराना। इसके लिए उन्हें अन्य भारतीय शासकों की सहायता की जरूरत थी। वे अंग्रेजों के बढ़ते साम्राज्य को रोक देना चाहते थे। इसके लिए उन्होंने नागपुर के भोंसले और ग्वालियर के सिंधिया से एकबार फिर हाथ मिलाया और अंग्रेजों को खदेड़ने की ठानी। लेकिन पुरानी दुश्मनी के कारण भोंसले और सिंधिया ने उन्हें फिर धोखा दिया और यशवंतराव एक बार फिर अकेले पड़ गए।
उन्होंने अन्य शासकों से एकबार फिर एकजुट होकर अंग्रेजों के खिलाफ लड़ने का आग्रह किया, लेकिन किसी ने उनकी बात नहीं मानी। इसके बाद उन्होंने अकेले दम पर अंग्रेजों को छठी का दूध याद दिलाने की ठानी। 8 जून 1804 ई. को उन्होंने अंग्रेजों की सेना को धूल चटाई। फिर 8 जुलाई, 1804 ई. में कोटा से उन्होंने अंग्रेजों को खदेड़ दिया।
11 सितंबर, 1804 ई. को अंग्रेज जनरल वेलेस्ले ने लॉर्ड ल्युक को लिखा कि यदि यशवंतराव पर जल्दी काबू नहीं पाया गया तो वे अन्य शासकों के साथ मिलकर अंग्रेजों को भारत से खदेड़ देंगे। इसी मद्देनजर नवंबर, 1804 ई. में अंग्रेजों ने दिग पर हमला कर दिया। इस युद्ध में भरतपुर के महाराज रंजित सिंह के साथ मिलकर उन्होंने अंग्रेजों को उनकी नानी याद दिलाई। यही नहीं इतिहास के मुताबिक उन्होंने 300 अंग्रेजों की नाक ही काट डाली थी।
अचानक रंजित सिंह ने भी यशवंतराव का साथ छोड़ दिया और अंग्रजों से हाथ मिला लिया। इसके बाद सिंधिया ने यशवंतराव की बहादुरी देखते हुए उनसे हाथ मिलाया। अंग्रेजों की चिंता बढ़ गई। लॉर्ड ल्युक ने लिखा कि यशवंतराव की सेना अंग्रेजों को मारने में बहुत आनंद लेती है। इसके बाद अंग्रेजों ने यह फैसला किया कि यशवंतराव के साथ संधि से ही बात संभल सकती है। इसलिए उनके साथ बिना शर्त संधि की जाए। उन्हें जो चाहिए, दे दिया जाए। उनका जितना साम्राज्य है, सब लौटा दिया जाए। इसके बावजूद यशवंतराव ने संधि से इंकार कर दिया।
वे सभी शासकों को एकजुट करने में जुटे हुए थे। अंत में जब उन्हें सफलता नहीं मिली तो उन्होंने दूसरी चाल से अंग्रेजों को मात देने की सोची। इस मद्देनजर उन्होंने 1805 ई. में अंग्रेजों के साथ संधि कर ली। अंग्रेजों ने उन्हें स्वतंत्र शासक माना और उनके सारे क्षेत्र लौटा दिए। इसके बाद उन्होंने सिंधिया के साथ मिलकर अंग्रेजों को खदेड़ने का एक और प्लान बनाया। उन्होंने सिंधिया को खत लिखा, लेकिन सिंधिया दगेबाज निकले और वह खत अंग्रेजों को दिखा दिया।
इसके बाद पूरा मामला फिर से बिगड़ गया। यशवंतराव ने हल्ला बोल दिया और अंग्रेजों को अकेले दम पर मात देने की पूरी तैयारी में जुट गए। इसके लिए उन्होंने भानपुर में गोला बारूद का कारखाना खोला। इसबार उन्होंने अंग्रेजों को खदेड़ने की ठान ली थी। इसलिए दिन-रात मेहनत करने में जुट गए थे। लगातार मेहनत करने के कारण उनका स्वास्थ्य भी गिरने लगा। लेकिन उन्होंने इस ओर ध्यान नहीं दिया और 28 अक्टूबर 1806 ई. में सिर्फ 30 साल की उम्र में वे स्वर्ग सिधार गए।
इस तरह से एक महान शासक का अंत हो गया। एक ऐसे शासक का जिसपर अंग्रेज कभी अधिकार नहीं जमा सके। एक ऐसे शासक का जिन्होंने अपनी छोटी उम्र को जंग के मैदान में झोंक दिया। यदि भारतीय शासकों ने उनका साथ दिया होता तो शायद तस्वीर कुछ और होती, लेकिन ऐसा नहीं हुआ और एक महान शासक यशवंतराव होलकर इतिहास के पन्नों में कहीं खो गया और खो गई उनकी बहादुरी, जो आज अनजान बनी हुई है।

संकलन:-
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday, 21 January 2016

आक्रोश मेंढपाळांचा...


एकाच रक्ताच्या आणि हाडामांसाच्या औलादी माझ्याच समाजावरती एवढा अन्याय करत असतील असे कधी स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. पण स्वार्थी विचाराने बरबटलेल्या धनगर समाजातील नेत्यांनी(अपवाद वगळून) समाजाचे भांडवल आणि बाजारीकरण करून धनगर समाजाला देशोधडीस लावण्याचा जणू काय ठेकाच उचललाय की काय? या प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी आनंद नामदेव कोकरे यांसारखे सुशिक्षित मेंढपाळ वाचा फोडण्यासाठी पुढे सरसावत आहेत पण धनगर समाजातील ठराविक सोडले तर बाकीचे उच्चशिक्षित उच्चविभुषित इंजिनीयर, डॉक्टर, एडव्होकेट प्रशासकीय अधिकारी मात्र हातावर हात ठेवून मौनवृत्त धारण करून धनगर नेत्यांनी आणि प्रस्तापितांनी चालवलेला नंगानाच उघड्या डोळ्यांनी बघत बसलेत याचेच दुख होते.
धनगर समाजाच्या वाट्याला आलेली भटकंती ही जणू काय पाचवीलाच पुजलेली आहे. आज इथे तर उद्या तिथे रात्रंदिवस रानोमाळी डोंगरदरीतून सावजा-माजरांचा, साप-विंचू यांचा विचार न करता दगडधोंडे आणि काटेकुटे तुडवत ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता पायाच्या नडग्या वाळवणार्या माझ्या धनगर समाजातील मायबापांचा विचार करायला आज कोणाकडे फुरसतही नाही. मी ज्या धनगर समाजात जन्माला आलो, ज्या वातवरणात शिकलो सवरलो खेळलो-बागडलो लहानाचा मोठा झालो त्या धनगर समाजाचे मी काहीतरी देणे लागतो याचा साधा पुसटसा विचारसुद्वा मनात न येणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीच्या लढ्यात धनगर समाज जागृत होताना दिसताच प्रस्तापितांच्या तुकड्यावर तुटून पडलेल्या नेत्यांना धनगर समाज दिसू लागला. तापलेल्या तव्यावरती स्वताची भाकरी भाजून घ्यावी याच विचारात काही महाबहाद्दर राजकारणात उतरले तर काही मोर्चे आंदोलने करू लागले. प्रत्येकजण ओरडतोय बोंबलतोय आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी पण धनगर म्हणून एकत्रित येण्याची त्यांची लायकी नाही कारण आरक्षणाचे श्रेय माझ्याच पारड्यात कसं पडेल अशा भ्रमात आरक्षणाचा खेळखंडोबा करणारे दुसरे तिसरे कोणी नसून धनगर समाजातील स्वताला विद्वान समजून घेणारे सर्वच नव्हे तर काही अपवाद सोडले तर बाकीचे नेतेच जबाबदार आहेत असे म्हणायला काही वावगे वाटणार नाही.
समाजसेवक मेंढपाळ आनंद कोकरे यांनी जे विश्लेषण केले याचे धनगर समाजातील नेत्यांनी, बुद्धिजीवी वर्ग तसेच उच्चशिक्षित, उच्चविभुषितांनी चिंतन, मनन आणि आत्मरिक्षण करायला हवे. धनगर समाजबांधव आजही भटकंती करत या गावावरुन त्या गावाला पायपीट करत असतात. घोड्याच्या पाठीवर आयुष्याचा संसार लादून करडा-कोकरांचं आणि पोराबाळांच लटांबण सोबत घेऊन पोटाची खळगी भरत असतात. भारत सरकारने ६-१४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाची सोय करून दिली हे खरं पण मेंढ्यामागे आईबापांसोबत गावंच्या गावं पालथी घालणार्या धनगर समाजाच्या पोरांनी नेमकं शिक्षण घ्यायचं कुठं?? रहायचं कुठं?? खायचं काय ? याचा विचार तुम्ही आम्ही करायला हवा. अनुसुचित जमातीचे आरक्षण हा एक डॉ. बाबासाहेबांनी दिलेला घटनादत्त अधिकार आहेच आहे पण त्यासाठी नेत्यांनी कोणीतरी धाकल्या बापाचं होऊन एकत्रित यायला हवं होतं पण तसे होत नाही आणि याच कारणामुळे धनगर समाजाच्या करोडो नव्हे तर अब्जावधी रूपयांचा चक्काचूर होतो आणि शेवटी हातात राहतो तो म्हणजेच बाबाजीचा ठुल्लू. पाठीमागच्या हिवाळी अधिवेशनात नेमकं तेच घडलं पण नेत्यांना याचे काय देणे घेणे?? आश्वासनांवरती आश्वासनं दिली जातात आणि त्याचा पाठपुरावा करण्यातच चार-पाच पिढ्या बरबाद होतात याला कारणीभूत म्हणजे समाजातील नेत्यांचा मनभेद-मतभेद आणि स्वार्थी भावना. या सर्व कारणामुळेच मग घोडं पेंड खाऊ लागतं... त्यासाठी एक व्हा आणि  नेक व्हा असं बुद्धिजीवी वर्ग सांगून सांगून थकला पण पालत्या घड्यावर पाणी ओतावं त्यातला प्रकार आजपर्यंत पहावयास मिळाला. एकत्रित येऊन  संघर्ष कराल तर कोई माई का लाल इस दुनिया मे पैदा नही हुआ जो धनगर समाज को रोख दे।
धनगर समाजाच्या शेळ्या-मेंढ्यांसाठी असलेली चराऊ कुरणे सरकारणे स्वताच्या घशात घालून घेतलीत एकीककडे जंगलच्या जंगल उध्वस्त करून कारखाने, सुतगिरण्या तर रासायनिक प्रकियेमुळे जिवित हानी पोहचवणार्या केमीकल कंपन्या उभारल्या जातात तर दुसरीकडे शेळ्या-मेंढ्यां, गाई-म्हैसीसाठी असलेली चराऊ कुरणे औद्योगिक संस्थांसाठी वापरली जातात मग शेळ्या-मेंढ्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती करून पोट भरण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो मग धनगर समाजातील मुलं-मुली आई-वडिलांसोबतच जातात त्यांच्या शिक्षणासाठी, राहण्यासाठी निष्क्रीय सरकार काही करू शकत नाही पण करोडो अब्जो रूपयांची राखरांगोळी करणार्या नेत्यांनी मी धनगर मी धनगर म्हणून उदो उदो करत बसण्यापेक्षा तुमच्या आंदोलनात, मोर्चात साध्या चहाची सुद्धा अपेक्षा न ठेवता प्राणपणाने झटणार्या आणि झगडणार्या भटकंती करणार्या मेंढपाळांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली तर सोन्याहून पिवळं.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Tuesday, 29 December 2015

चांगभलं बिरोबा अन् आरक्षणाचा खेळखंडोबा...


               डॉ बाबासाहेबांनी धनगर समाजाला राज्यघटनेत कलम ३४२ च्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अ.क्र.३६ वरती आरक्षण दिलेले आहे. केवळ शब्दच्छल झाल्याने अर्थातच "धनगर" ऐवजी "धनगड" (र चा ड) झाल्याने सगळा राडा झाला आहे. गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाज अनुसुचित जमातीच्या सवलतींपासून वंचित असल्याने धनगर समाजाचे झालेले नुकसान पुढील ६०-७० वर्षातसुद्धा भरून न येणारे आहे. यास रानोमाळी डोंगरदरीतून भटकणार्या धनगर समाजाचे अज्ञान जरी कारणीभूत असले तरी संविधानाच्या/राज्यघटनेच्या आधारावरती राज्यकारभार चालवणारे सरकार त्याहून अधिक जबाबदार आहे. धनगर समाजाला जाणूनबुजून अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचं काम प्रस्तापित व्यवस्था आणि परिणामी राज्यसरकार करत आहे. धनगर समाज जर निद्रावस्थेतून जागा झाला तर या प्रस्तापितांना त्यांची लायकी दाखवून देईल. ज्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्या समाजाची सत्ताकारणात भागीदारी लोकसंख्येच्या आधारवर तितकीच असणार आहे परंतू धनगर समाज अज्ञानाच्या खाईत होरपळला गेल्याने सत्ताकारणापासून ही जमात थोडी नाही तर खूपच दूर राहीली.
गेल्या ६५ वर्षापासून या भोळ्या भाबड्या धनगर समाजावरती अन्याय करण्याचा नंगानाच या महाराष्ट्र राज्यातील प्रस्तापित पवार पाटील देशमुख ठाकरेंनी आणि सदरच्या राज्य सरकारने चालवला आहे. धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपर्यात कुठेही पहावयास भेटत नसताना, धनगड नावाची जमातच आस्तित्वात नसताना महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात धनगड जमातीचा उल्लेख करायला डॉ.बाबासाहेब आंबेडकर काय मुर्ख होते का? हा माझा खडा सवाल मुख्यमंत्र्यांना, धनगर समाजाच्या या मागणीचा विरोध करणार्या त्या त्या आदिवाशी मंत्र्यांना आणि मेंदूला वाळवी लागलेल्या त्या वळवीला विचारायचा आहे. त्या वळवीचे म्हणणे आहे की राज्यघटनेत ३४२ च्या अनुछैद वरती ९ व्या परिशिष्टातील ३६ नंबर वरतीची जमात ही धांगड आहे आणि धांगड ही ओरॉनची तत्सम जात आहे. मग त्या वळवीने अभ्यास करावा की धांगड अथवा धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्यात कधीही जन्माला आली नव्हती मग डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जी राज्यघटना मसूदा समिती होती त्यांनी काय मुर्ख म्हणून अहवाल सादर केले होते का? एखादी जमात आस्तित्वातच नसेल तर मग राज्यघटनेत नमूद केलेल्या त्या जमातीबद्दल प्रतिवाद देखिल करता येतो.  Acre चे एकड होते, Chattisgarh चे छत्तीसगड होते, Gurgaon चे गुडगाव होते त्याचप्रमाणे Dhangar चे धनगड असे झाले आणि म्हणून त्याचाच परिणाम असा की महाराष्ट्र राज्यातील दीड ते दोन कोटी धनगर समाजबांधवांचे भविष्य अंधारातच राहिले. धनगर समाजाची हजारो पोरं आइ ए एस, आइ पी एस, डॉक्टर, इंजिनीयर, एडव्ह़केट होण्यापासून वंचित राहिली याला सर्वस्वी जबाबदार आजपर्यंतचे राज्य सरकार आहे राज्यघटनेचा अवमान करणार्या त्या त्या नेत्यांवरती देशद्रोहाचा देखिल खटला भरायला हवा.
आज इथे तर उद्या तिथे अशा प्रकारचे जीवन जगणारी धनगर जमात ही भटकी जमात असल्यामुळे १९९१ साली धनगर समाजाला अनुसुचित जमातीची मागणी डावलून महाराष्ट्र राज्यापुरतं भटक्या जमाती क मध्ये टाकण्याचे पाप पवारांनी केलं पण त्या पवारांना उचलू लागायला आमच्याच समाजाचे अज्ञानी महाबहाद्दर पुढे होते.
आदिवाशी असल्याचे निकष:
राज्यघटना मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि समितीकडून राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ ला अडॉप्ट केली होती आणि २६ जानेवारी १९५० साली आमलात आणली. २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसाच्या प्रदीर्घ काळानंतर म्हणजे जवळ जवळ ३ वर्षाचाच कालावधी लागला होता भारतीय संविधान लिहायला. राज्यघटना लिहताना त्यावेळी धनगर जमात ही माळोरानी डोंगर दरीतून भटकंती करत शेळ्या-मेंढ्यांची परिणामी स्वताच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरत असते याचा अभ्यास करूनच मसूदा समितीने आदिवाशी समाजबांधवांपेक्षा अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जगणार्या या जमातीला राज्यघटनेच्या अनुसुचित जमातीच्या यादीत अगोदरच सामाविष्ट केलेली आहे.
१) धनगर समाज ही आदिम जमात आहे शेळ्या मेंढ्या राखणे गाई-म्हैसी पाळणे हे आदिम जमातीचे व्यवसाय आहेत.
२)आदिम वैशिष्ट्ये/प्राचीन जीवनमान याचा अभ्यास केला तर डोंगरदरी माळरानावर जाऊन बघा शेळ्या-मेंढ्या राखणार्या समाजबांधवांची एकदा विचारपुस करून बघा मग समजतील आदिम वेशिष्ट्ये.
३)संस्कृति: धनगर जमातीची आदिवाशी जमातीसारखीच संस्कृति आहे खंडोबा, बिरोबा, धुळोबा हे धनगरांचे देव तसेच ढोल वाजवणे, धनगरी गजी नृत्य, धनगरी ओव्या यातून धनगर समाजाच्या संस्कृतिचा अभ्यास करता येतो. ओरॉन धनगर जमातीचे देव सुद्धा सारखेच आहेत.
४)भौगोलिक पृथक्करण: आदिवाशी जमात डोंगरदरीमध्ये जंगलामध्ये पाड्यावरती एकाच ठिकाणी स्थायिक राहते पण धनगर जमात ही डोंगर दरीमध्ये रानोमाळी, जंगलामध्ये आज इथे तर उद्या तिथे असे मुक्काम करत, अख्खा संसार घोड्याच्या पाठीवर लादून कोकरा-करडांचं आणि लेकराबाळाचं लटांबण घोड्याच्या पाठीवरील माचोळीवर मांडून तळहातावर पोट भरणारी धनगर जमात अभ्यासून पाहा.
५) लाजरे बुजरेपणा धनगर समाजातील बांधव जास्त लोकवस्तीत येत नाहीत समूहाने राहतात नागरी वस्तीत मिळत नाहीत मिसळत नाहीत कारण दिवसभर मेंढ्यांच्या पाठी पायाच्या नडग्या वाळवण्यातच कितीतरी पिढ्या बरबाद झाल्या त्यामुळे धनगर जमातीत अजूनही लाजरे बुजरे पणा तसाच आहे.
संघटितपणे लढाई महत्वाची:
धनगर समाजाला राज्यघटनेत अधिकार दिला असताना आदिवाशी पेक्षाही अत्यंत बिकट आणि हालाखीचे जीवन जगणारी धनगर जमात ही अनुसुचित जमातीमध्ये मोडत नाही असे ओरडून सांगणार्या अर्धवटांचे मला हसू येते. धनगर जमात ही भटकी जमात आहेच आहे आणि महाराष्ट्र राज्यात फक्त (केंद्रात नव्हे) धनगर जमात ही भटक्या जमाती -क मध्ये आहे. ते पण वक्रतुंडाच्या अवकृपेने १९९१ पासून पण आमच्या धनगर समाजाचं संघटन मजबूत असतं तर आज यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे साहेबांच्या प्रयत्नातून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती कधीच मिळाल्या असत्या आणि आजच्या प्रस्तापितांचे तळवे चाटणार्या नेत्यांना भिक मागायची वेळ आली नसती.
आज आदिवाशी समाजातील काही पोरं लिहू लागतात की धनगर समाजातील लोक र चा ड झाला असे सांगत रडत बसलेत पण त्या वळवी ला माझे सांगणे आहे की आम्ही रडणार्यांपैकी नाहीये जर मनात आणलं तर क्षणात एकेकाला पायाखाली घ्यायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. आजपर्यंत अन्यायाच्या विरोधात रणशिंग फुंकणारे फक्त धनगरच आहेत याचा विसर कोणास पडू नये. धनगर समाजात अज्ञान पसरवण्यास प्रस्तापित व्यवस्थाच जबाबदार असून धनगर समाजाने यास बळी न पडता सर्वानी एकजुटीने/संघटितपणे आपले हक्क हिसकावून घ्यायला हवेत नाहीतर पुढची पीढी आपल्या तोंडात शेण घालेल याचा विचार करा.
खरी चूक कोणाची??
देशाच्या स्वातंत्र्यानंतरच नव्हे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून धनगर समाजावरती सतत अन्याय होत आला आहे. आदीवाशीपेक्षाही धनगर समाज आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला असताना धनगड नावाची जमात महाराष्ट्रात नसताना राज्यघटनेत धनगड नावाचा उल्लेख करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना चुकीचे ठरवायचे की सर्वानुमते २६ जानेवारी १९५० ला आमलात आणलेल्या राज्यघटनेवरती आजचा राज्यकारभार चालवणारे राज्य सरकार चुकीचे ठरवायचे? धनगड नावाची जमात महाराष्ट्र राज्यात नाही शिवाय धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच असल्याचे संशोधकीय अहवाल असताना देखिल धनगर समाज आदिवाशींचे निकष पुर्ण करतो की नाही यासाठी टाटा इंन्सटीट्यूट अॉफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेला ६५ वर्षानंतर सर्वे करायला सांगणारे फडणवीस सरकार धनगर समाजाचे आरक्षण घशातून काढण्याचा प्रयत्न तरी करत नाही ना.??? अशी शंका कोणाच्याही मनात गोंधळ निर्माण करणारी आहे. यामुळे मागले तसेच म्होरले ही म्हण सार्थ ठरते की काय याचाच विचार सतत मनात घोळत असतो.

जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५३०००४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

⚡👉पुन्हा एक नवी दिशा...✨


अज्ञानाच्या खाईत लोटलेल्या आणि अंधकाराने ग्रासलेल्या माझ्या धनगर समाजाला खरंच एका नव्या दिशेची गरज आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या धनगर समाजाचं भट-ब्राह्मणांनी पार कंबरडंच मोडून ठेवलंय. भाकित सांगून आणि थापा मारुन भोळ्या भाबड्या धनगर समाजाला देवाधिकाच्या नादी लावायचं अन प्रशासनातील सर्व पदे काबूत ठेवायची हा त्या पाठीमागचा गणिमी कावा आज माझ्या धनगर समाजानं वेळीचं ओळखायला हवा.
५००० वर्षापूर्वी ज्या धनगर समाजानं अक्षरांचा शोध लावला तीच अक्षरे आज धनगर समाजापासून शेकडो मैल दूर आहेत असं का?? का ही अक्षरं आमच्यापर्यंत पोहचू शकली नाहीत?? ब्राह्मण शिक्षित झाले पण अक्षरांचा शोध लावणारा धनगर समाज अडाणी कसा काय राहिला याचा विचार तमाम धनगर बांधवांनी करायला हवा.
भर उन्हाळ्यात दिवसभर आग ओकणार्या सुर्याची किरणे झेलत, अंगाची काहिली होत असताना तप्त उन्हात दगडधोंडे अन काटेकुटे तुडवत शेळ्या मेंढ्या राखणार्या आई-वडिलांची अवस्था काय होते याचा विचार माझ्या धनगर समाजातील विद्यार्थी बांधवांनी  कधी केला का? पावसाळ्यामध्ये कधी कधी अवकाळी पावसाचा फटका तर गारांचा सपाटा सहन करावा लागतो. भर हिवाळ्यातील कडक थंडीमध्ये सुद्धा मेंढ्यांची राखण करावीच लागते.  इयत्ता सातवी नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लगातार दोन महिने मी शेळ्या-मेंढ्याकडेच होतो मग आज या गावी तर उद्या त्या गावी असा रोजचा प्रवास मी स्वतः अनुभवलाय. त्यामुळे उन्हाळा असो पावसाळा अथवा हिवाळा असो तिन्ही ऋतु मध्ये भयंकर ऊन, धो धो कोसळणारा मुसळधार पाऊस तसेच अंगाचा थरकाप उडवणारी कडक थंडी यांचा विचार न करता मेंढ्यामागे उभे ठाकायचे हे जणू काय धनगर समाजाच्या पाचवीलाच पुजलेलं, शिवाय इतरांसारखी कोणतीही साप्ताहिक अथवा मासिक सुट्टी माझ्या धनगर समाजातील आई-वडिलांना अनुभवता येत नाही त्यामुळेच शाळा असोत अथवा सरकारी कार्यालये यांपासून दूर राहिलेल्या धनगर समाजाला अंधकारातून प्रकाशात यायला तसा खूपच उशीर झाला आहे आणि अजूनही धनगर समाज म्हणावा तितका जागृत झालेला नाहीये.
आजचे विद्यार्थी अथवा पालक सहज बोलून जातात की शिक्षण घेवून अन् पदव्या हासिल करून काय फायदा?? नोकरीच मिळत नाही. पण त्या सर्वांना माझे एकच सांगणे आहे की बांधवांनो तुम्ही शिक्षण घेताना कधी तुमच्या आई-वडिलांच्या भावनांचा विचार केला होता का???  दिवसभर पायाच्या नडग्या दुखेपर्यंत शेळ्या-मेंढ्यांमागे उभे ठाकलेल्या आणि दुसर्यांच्या शेतात दिवसभर राबराब राबून घाम गाळून ५-५० रु कमविण्यासाठी अपार कष्ट करणार्या आपल्या आई-वडिलांच्या भावना काय असतील याचा विचार कधी केला का?? दिवसभर कष्ट करून थकून भागून घरी परतणार्या आई-वडिलांचा चेहरा अगदी सुकून जातो पण शाळेतून आपला मुलगा/मुलगी घरी आलेत की नाही याचा विचार करत ते झपाझप पावलं टाकत घरी येतात, शाळेतून आल्यानंतर घरासमोर अंगणात खेळत असलेल्या आपल्या मुलाला/मुलीला समोर पाहून त्या सुकलेल्या चेहर्यामध्ये एक विलक्षण आनंद दिसून येतो त्यांच्या ओठांवरती एक हलकसं स्मित हास्य उमटून दिसते, पण त्यांच्या त्या हास्यामध्ये भावना लपलेल्या असतात आणि त्यांना आपल्याकडून काही अपेक्षा देखिल असतात याची जाणीव तुमच्या-माझ्या सारख्यांना असायला हवी. जर तुम्ही आम्ही त्यांच्या भावना समजू शकत नसू तर मग आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला अन् आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. त्या भावना आणि त्यांच्या  अपेक्षा ज्यांना पुर्ण करता येत नसतील तर स्वतःला त्याची लाज वाटायला हवी. आपल्या मुला/मुलीनं खूप शिकावं IAS/IPS/Engineer/Advocate/Doctor/BUSINESSMEN तसेच इतर उच्च पदावरती पोहचावं, स्वतःचं तसेच आई-वडिलांचं नाव रोषण करावं या त्यांच्या भावना असतात मग त्या भावना ज्यांना ज्यांना समजतात तेच यशस्वी होतात.
ज्यांना आई वडिलांच्या हाताला बसणार्या चटक्याची जाण असते त्याला समाजावरती होणार्या अन्यायाचं भान असतं हे नाकारता येत नाही.
 एकदा आजोळी गेल्यानंतर तेथील शेजारच्या आजीनं मला सांगितलेलं एक वाक्य आयुष्यभर माझ्या लक्षात राहील ते म्हणजे "आयबाप आडाणी हायत म्हणून मेंढरं राखत्याती. पोरांनो तुमी तर शिका खूप मोठं व्हा अन् आय-बा च्या पायातली कुरपं मुजवा नायतर तुमीपण मेंढरं राखत बसचाल" त्या आजीच्या वाक्यामुळं आज माझं जीवन बदलले आहे. माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही तर आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव मला झाली होती कारण मी सुद्धा दोन-तीन महिने त्यांच्यासोबत गावोगावी फिरुन पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढ्या राखलेत तर कधी कधी मला एकट्यालाही दिवसभर मेंढ्यासोबत राहायचा योग आला होता कधी कोण्या शेतकर्यांच्या शिव्या तर कधी मार सुद्धा खावा लागायचा. मला ते अनुभवलेले दिवस नको होते म्हणून मी सरळ बोर्डिंग गाठलं होतं. धनगर समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ही उणीव  भासली नाही पाहिजे, आई-वडिलांच्या कष्टाची प्रत्येकाला जाण असेल तर उद्या भविष्यात धनगर समाजाची पोरं IAS/IPS/Doctor/Engineer/Advocate/Businessman या क्षेत्रात चमकतील, पुढच्या काही वर्षामद्ये भारताचं राजकारण आणि प्रशासन हे धनगर समाजातील पोरांच्या हातात येऊ शकते पण समाजातील तरुण-तरूणींना मार्गदर्शन आणि योग्य दिशा देणे गरजेचे आहे.जर पुन्हा एकदा समाजातील युवक युवतींना योग्य दिशा मिळाली तर मेंढ्यांच्या मागे नडग्या वाळवून घेणार्या आई-वडिलांना मेंढ्या राखायची गरज पडणार नाही.हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज पडणार नाही आणि ही एक दगडावरची रेषा आहे.
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
जय यशवंत!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३

nitinrajeanuse.blogspot.com

Wednesday, 16 December 2015

धनगर सारा एक होऊ दे...

धनगर सारा एक होऊ दे....
पुस्तकं वाचली तर मस्तकं सुधरतील आणि मस्तकं सुधरली तर क्रांती घडेल. पण आज एकविसाव्या शतकामध्ये पोट-जातींच्या विळख्यात अडकलेला धनगर समाज एकत्रित येऊन क्रांती घडवेल असे मला यथकिंचितही वाटत नाही. कारण पोटजातीमध्ये विखूरला गेलेला धनगर समाज कधीही यशाचे शिखर गाठू शकणार नाही त्यासाठी समाजातील पोट-जातींचे साखळदंड तोडावे लागतील. पोट-जातीच्या नावाखाली विखुरल्या गेलेल्या धनगर समाजाला एकत्रित केलं तर नक्कीच क्रांती घडेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज पडणार नाही. राजा महाराजांच्या, थोर महापुरूषांच्या समाजात जन्माला आलेली आम्ही माणसं आज पोट-जातींचा विचार करत बसल्याने इतर समाजापेक्षा ५०-६० वर्ष पाठीमागे आहोत हे नाईलाजानं सांगायची वेळ येतेय.
धनगर समाज ही आदिम जमात असून अश्मयुगीन कालखंडात मानवाने सुरवातीला शेळ्या-मेंढ्या राखायला सुरवात केली होती तद्नंतर जोड धंदा म्हणून शेती, शेतीसाठी/शिकारीसाठी लागणारी हत्यारे अवजारे बनवणे अशा प्रकारे व्यवसाय हळूहळू वाढत गेले मग कालांतराने शेळ्या-मेंढ्या राखणारे - धनगर, शेती करणारे -कुणबी, शेतीसाठी लाकडाची अवजारे बनवणारे -सुतार, लोखंडाची अवजारे बनवणारे -लोहार, मातीपासून भांडी बनवणारे -कुंभार, गाई-म्हैसी सांभाळून दुधाचा व्यवसाय करणारे -गवळी अशा एक ना अनेक प्रकारच्या व्यवसायानुरूप त्या त्या जाती तयार झाल्या आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचं विभाजन झालं.
आज एकविसाव्या शतकाचा जर विचार केला तर धनगर समाजातही पोट-जाती असल्याचे चित्र दिसून येते. एकाच रक्ताची अन् हाडामांसाची माणसं पोटजातीचा उदो उदो करत आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हेच सांगत सुटलेत पण नुकसान माझ्याच समाजाचं होतंय हे त्यांच्या ध्यानीमनी देखिल नाही. आजची प्रस्तापित व्यवस्था मुद्दामहून जाणूनबुजून धनगर समाजातील पोटजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय कारण पोटजातीमध्ये विखूरलेल्या धनगर समाजबांधवांची जर जनगनना झाली तर महाराष्ट्रच नव्हे तर भारतामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत एक नंबरची जमात ही धनगर जमात आहे हे सिद्ध होईल. आणि जर धनगर समाजाला आपली खरी ताकद कळली तर तर जगातील कोणतीही अशी व्यवस्था कोणतीही अशी शक्ती नाही की ती धनगर समाजाला अडवू शकेल.
धनगर समाजातील सुशिक्षित युवा वर्गानं गांभीर्यानं विचार-विनीमय करायला हवा. पोटजाती बाजूला ठेवून फक्त धनगर म्हणून जगायला शिकलो तर धनगर समाजातील मुलं-मुली आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगीरी बजावतील यात तीळमात्रही शंका नाही. रणरागीणी महाराणी अहिल्यामाई होळकर स्वताच्या मुलीचा विवाह इतर जातीमधील युवकाशी करून देतात, महाराजा यशवंतराव होळकर आणि कोल्हापुरचे राजे छत्रपति राजर्षी शाहू महाराज या दोन्ही घरचे नातेसंबंध जुळून येते तर मग आजचा धनगर समाज आपापल्याच पोट-जातीमध्येच का गुरफटून राहिलाय?? हा प्रश्न साहजिकच कोणाच्याही डोक्यात गोंधळ निर्माण करू शकतो. धनगर समाजात पोट-जातीच्या प्रथा पडल्याने समाजातील उच्चशिक्षित मुलामुलींना आपला जीवनसाथी निवडण्यासाठी कधीकदी इतर जाती-जमातींचा आधार घ्यावा लागतो हे एक फार मोठे सामाजिक नुकसान आहे. अशी कितीतरी उदाहरणे आहेत पण धनगर समाजातील रूळलेल्या पोटजातींचे दरवाजे जर खूले झाले तर मग आजच्या युवक-युवतींना इतर जातीमधील जीवनसाथी शोधण्याची गरज पडणार नाही.
यासाठी धनगर समाजातील युवकांनी समाजाच्या न्याय व हक्कासाठी आणि सामाजिक संतुलनासाठी पोटजाती बाजूला ठेवून एकत्रित येणं आवश्यक आहे. आजचा ज्वलंत प्रश्न आरक्षण अंमलबजावणीचा असो, अन्याय अत्याचाराचा असो अथवा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न किंवा विवाह बाबतीचा प्रश्न असो समाजबांधवांनी आणि समाजातील युवकांनी पोटजाती बाजूला ठेवुन एकत्रितपणे समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यावी.
 जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत
आणि गुजरातपासून आसामपर्यंत,
सह्याद्रीच्या दरी-खोर्यांतून एकच नाद घुमू दे
 प्रत्येकाच्या नसानसात ठसू दे
 आणि धनगर सारा एक होऊ दे.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Sunday, 13 December 2015

आश्वासन मुख्यमंत्र्याचे पण नुकसान समाजाचे...


आरक्षणाचे नाव काढले की माझ्या तळपायाची आग अगदी मस्तकापर्यंत जाते अशीच अवस्था झाली आहे. आम्ही नक्की आमचे हक्क मागतोय की भिक मागतोय तेच आम्हाला कळेना आणि नेत्यांनाही समजेना. ज्याने त्याने उठायचे मोर्चे काढायचे आपल्या पाठीमागे कीती समाजबांधव आहे याचे शक्तिप्रदर्शन करायचे अन् मंत्र्यांना संत्र्यांना निवेदन द्यायचे त्या त्या सत्तापिपासू लोकांकडून आश्वासन घेतले की मोर्चा संपला असे जाहिर करत घराकडच्या दिशेने बोंबलत सुटायचे हेच आजपर्यंत चालत आले आहे यात वेगळे असे काहीच नाही.
आरक्षण अंमलबजावणीसाठी मोर्चे आंदोलने करणार्यांना मी विरोध करतोय अशातला विषय नाही तर राज्यघटनेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनादत्त अधिकार मिळवण्यासाठी धनगर  समाजाला ६५ वर्षानंतरही संघर्षच करावा लागतोय याचे दुख वाटते. आज स्व.बी.के.कोकरे साहेबांची खरोखरच खूप आठवण येते कारण तोच झंजावात जर आज असता तर आम्हाला भिक मागायची वेळ आलीच नसती हे शतप्रतिशत सत्य आहे आणि कोणीही नाकारू शकत नाही. १९८९ साली खंबाटकीच्या  घाटात लाखो यशवंत सैनिकांसोबत तीव्र रास्तारोखो आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांना याची दखल घ्यावी लागली आणि अनुसुचित जमातीच्या अंमलबजावणीची मागणी असताना पवारांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवत अज्ञानी नेत्यांना सोबत घेऊन धनगर समाजाला फक्त महाराष्ट्र राज्यापुरतंच भटक्या जमाती (क) NT-C मध्ये घातलं. पण केंद्रामध्ये असलेलं हक्काचं आरक्षण जाणूनबुजून डावलले गेले कारण धनगर समाजातील पोरं शिकली सवरली, आइ ए एस, आइ पी एस झाली तर भारताचं प्रशासन धनगर समाजातील पोरांच्या हातात जाईल या भीतीने वक्रतुंडाने खेळ मांडला आणि धनगर समाजातील लाखो युवकांना याचा फटका बसला.
२०१३ पासून पुन्हा नव्याने आरक्षण अंमलबजावणीसाठीची चळवळ महाराष्ट्रात पुन्हा थैमाण घालू लागली मग डिसेंबर २०१३ चे नागपूर अधिवेशन असो, १५-२१ जुलै २०१४ दरम्याणची पंढरपूर-बारामती आरक्षण दींडी आणि तद्नंतर ५-६ लाख समाजबांधवांचा बारामती येथिल ठिय्या आणि ९ दिवसाचे आमरण उपोषण, महाराष्ट्र राज्यभर आयोजित केलेला चक्काजाम, रास्तारोखो, तहसिल/जिल्हाधिकारी कार्यालयावरील आंदोलने मोर्चे, मुंबई मधील १ अॉगस्ट रोजीचा आझाद मैदानवरचा मोर्चा, १४ अॉगस्ट २०१४ रोजी धनहर समाजबांधवांनी केलेला रेल्वे रोखो, ४ जानेवारी २०१५ ची धनगर परिषद, २३ मार्च चा मोर्चा, ९ जुलै रोजी सर्व आमदारांना  व १५ जुलैला सर्व सर्व तहसिल/जिल्हाधिकार्यांना दिलेले निवेदन त्याचप्रमाणे १५ जुलै रोजी मंत्रालयासमोर गांधीगीरी मार्गाने केलेले आंदोलन. २१ जुलै चा बारामती येथील प्रेरणा दिवस आणि त्यानंतर ८ व १० डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावरील मोर्चा. अजून कीती मोर्चे काढायचे?? अजून कीती आंदोलने करायची?? तळहातावरती पोट भरणारे धनगर समाजबांधव उन वारा पाउसाचा विचार न करता आरक्षणाची अंमलबजावणी होईल माझ्या पोराला/पोरीला चांगलं शिक्षण देईल, समाजाला पुरेसा निधी मिळेल, मुलं/मुली शिकली सवरली तर आइ ए एस, आइ पी एस होतील डॉक्टर, इंजीनीयर होतील, यापेक्षा धनगर समाजालाच राजकीय क्षेत्रात आरक्षणामुळे संधी मिळेल व समाजाची प्रगती होईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी समाजव्यवस्थेतील समानता आणि डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांचे महासत्ता देश बनण्याचे स्वप्न साकार होईल या अनुषंगाने पोटात अन्नाचा कण नसताना नागपूरच्या त्या स्टेडियममध्ये कडाक्याच्या थंडीत कुडकुडत आरक्षणाची अंमलबजावणी होईल म्हणून चातकासारखी वाट पाहणार्या माझ्या समाजबांधवांवरती शेवटी आश्वासनांचीच टांगती तलवार आली.
सरकार आल्यावर १० दिवसात देतो, १५ दिवसात निर्णय घेतो, अजून अभ्यास करतोय आणि आज चक्क ९ महिन्याने निर्णय घेतो म्हणजे बाळंतपण करायचा विचार आहे की काय यांचा? स्वार्थी विचाराने बरबटलेले आरक्षणाचे श्रेय लाटण्यासाठी खटाटोप करणारे आमचे नेते जर शहाणे असते तर १० दिवसाचा १५ दिवसाचा जाब विचारला असता पण त्यांना समाजाशी आणि आरक्षण अंमलबजावणीशी काहीही घेणेदेणे नाही. पुन्हा ९ महिन्याची वाट बघायची का? TISS चे अहवाल नक्की काय सांगतील?? TISS वाले पुणे-मुंबई सारख्या ठिकाणच्या धनगर बांधवांचा सर्वे करून अहवाल सादर करणार की पोटाची खळगी भरण्यासाठी रानोमाळी, डोंगरदरीतून उन वारा पाउसाचा विचार न करता पायाच्या नडग्या वाळेपर्यंत मेंढ्यांची राखण करणार्या धनगर समाजाचा सर्वे करणार?? असे असंख्य प्रश्न सर्वसामान्य समाजबांधवांच्या डोक्यात गोंधळ करून बसलेत. जिथं अन्याय दिसेल तिथे लाथ मारणार्या राजामहाराजांच्या समाजात जन्माला आलेल्या आम्ही औलादी आज मुकाटपणे अन्याय सहन करतोय याचीच खंत वाटतेय. आश्वासनांवरती आश्वासने देऊन धनगर समाजाची चक्क दिशाभूल केली जात आहे हे नेत्यांच्या ध्यानीमनी येत नाही प्रत्येकजण स्वार्थाने बरबटलेल्या विचारांची पेरण करत बसतोय मग बुद्धीजीवी वर्गाने नेमकी कोणती भुमिका घ्यावी यातच सगळा राडा होतोय आणि मग प्रस्थापितांचे फावतेय. सुशिक्षीत अर्थात शिकला सवरलेला धनगर समाजबांधव बिनढोक नेत्यांची ओझी वाहत बसल्यामुळे धनगर समाज अजूनही अंज्ञानाच्या खाईत ढकलला जातोय. त्यासाठी सुशिक्षीत सुज्ञान युवा वर्गाने समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यावी.

जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com