Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday, 31 May 2016

अहिल्याईंच्या प्रशासनाचा अवलंब करा...

माता अहिल्ये तुझी जगभर कीर्ती
तूच होतीस महान प्रशासनकर्ती
माते तुझी घेऊनिया स्फूर्ति
लढण्यासाठी घेऊन तलवार हाती
आम्हीही उतरतो आता रणांगणावरती.....

एक स्त्री असूनदेखिल या देशाच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्ष राज्यकारभार करणारी राज्यकर्ती, १८व्या शतकातील एक आदर्श आणि महान प्रशासक असा उल्लेख अक्षरशा ब्रिटिशांनी करून ठेवला आहे. पण आम्ही अजूनही अंधारातच आहोत. आपल्या राज्यातील प्रजेलाच नव्हे तर अखंड भारतातील प्रजेला पोटच्या लेकरांप्रमाने सांभाळणारी मायमाऊली, एवढेच नव्हे तर जाती-धर्माच्या भींती तोडून स्वताच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून समाजासमोर आदर्श ठेवणारी थोर समाजसुधारक, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मंदिरांचा जिर्णोध्दार, मंदिरांचे बांधकाम, मश्चिदींचे बांधकाम, शेतकऱ्यांसाठी शेततळे, तलाव, विहीरी, वाटसरूंसाठी बारवे, धर्मशाला, नदीवरील घाट अशी कीतीतरी विकासकामे प्रजेच्या हीतासाठी करणारी पुण्यश्लोक, वेळप्रसंगी प्रजेच्या रक्षणासाठी हाती तलवार भाले घेऊन दुश्मनांच्या चिंधड्या उडवणारी रणरागीणी, राजमाता, महाराणी, लोककल्याणकारी माता अहिल्याई होळकर यांची आज २९१ वी जयंती त्यानिमीत्त माझ्या राजमातेला मानाचा पिवळा जय मल्हार.
जाती धर्माच्या पलिकडे जाऊन प्रजाहितरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या अहिल्याई होळकर यांची जयंती फक्त धनगर समाजानेच साजरी करणे हा खरंतर अहिल्याईंचा अपमान  आहे पण जातीवादाने बरबटलेल्या या महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर अखंड भारत देशामध्ये ही जातावादाची अन् भूरसटलेल्या विचाराची पेरण करून सनातन्यांनी सर्वसामान्यांचे पार कंबरडच मोडलंय. राजमाता अहिल्याई होळकर असो अथवा अन्य कोणी थोर महापुरूष किंवा समाजसुधारक असो यांची जयंती अथवा स्मृतिदीन साजरा करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असताना त्या त्या महापुरूषांचे विचार आत्मसात करून त्या मार्गावर चालणे हे समाजाच्या हीताचे आहे. नुसतंच महापुरूषांच्या जयंत्या साजऱ्या करणं, लोकवर्गणीतून हजारो-लाखो रुपये उधळून डी जे लावून धांगडधींगा घालणे हे समाजजीगृतीचे लक्षण नसून समाजाला त्या महापुरूषांच्या विचारांपासून परावर्तित करण्याचे लक्षण आहे असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.
राजमाता महाराणी अहिल्याई होळकर यांची प्रशासन पद्धत पाहून, अहिल्याई होळकर यांचा राज्यकारभार आणि प्रशासन याचा अभ्यास करून युरोप खंडांतील देशांनी विकासाचा पल्ला गाठला, शेती, शिक्षण तसेच औद्योगिकरणातून त्या त्या देशांनी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केली पण त्याच राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा भारत देश मात्र अधोगतीच्या मार्गावर आहे यासाठी धर्मनिरपेक्षतेचा उगाच आव आणणाऱ्या भारत देशाची जातीव्यवस्था (धर्मभेद, जातीभेद) ही भारताच्या अधोगतीशी कारणीभूत आहे. आजपर्यंत सनातन्यांनी राष्ट्राप्रति सर्वस्व अर्पन करणाऱ्या महापुरूषांचा इतिहास चुकीचाच लिहला  आणि खरा इतिहास मात्र दडवून ठेवला लपवून ठेवला कारण की चुकीचा इतिहास लिहणारे इतिहासकारच खरंतर चुकीचे जन्माला आले होते.
आज धनगर समाज जागा झाला, समाजाला खरा इतिहास समजू लागला उमजू लागला पण समाजाचे भांडवलीकरण करून, समाजाला प्रस्तापितांच्या दावणीला बांधायचे काम धनगर समाजातील नेत्यांनी केले म्हणजेच आगीतून उठला अन् फुफाट्यात पडला हीच अवस्था धनगर समाजाची झाली आहे. अरे एकेकाळी राजा समाज असणारी ही जमात गुलामगीरीत का वागतेय? हे सांगून सांगून थकलो तरीही धनगर समाज अजून अज्ञानाचं, अंधश्रद्धेचं घोंगडं पांघरून गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय हे समाजाचे सर्वात मोठे दुर्दैव आणि याच कारणांमुळे धनगर समाजाचा विकास खुंटलाय असं म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.
असो आजचा युवक शिकलाय, सवरलाय, अन्यायाच्या विरोधात लिहायला, वाचायला आणि बोलायला लागलाय त्यामुळे कुठूनतरी आशेचा किरण उगवलेला दिसतोय, कुठूनतरी समाजप्रबोधनास नव अंकुर फुटलेला दिसतोय. आजचा युवक स्वाभिमानाची भाषा बोलायला लागलाय. नक्कीच आजचा यूवक हा उद्याच्या भावी पिढीसाठी एक नवा इतिहास रचून जाईल. एक वेळ अशीही येईल की राजा मल्हारराव होळकर यांचे "मल्हारतंत्र" अवगत करून, रणरागीणी अहिल्याई  होळकर यांचा आदर्श आणि एकमेव अद्वितीय महाराजा यशवंतराव होळकर यांची दूरदृष्टी डोळ्यांसमोर ठेऊन सर्व धनगर समाजबांधव, नेते एकत्रित येऊन क्रांती घडवतील हीच आशा मनी बाळगून समाजप्रबोधनासाठी चालू केलेला हा लेखनप्रपंच....
पुनःश्च एकदा राष्ट्रमाता,राजमाता पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांच्या २९१ व्या जयंतीनिमित्त (३१ मे १७२५) त्यांच्या प्रेरणादायी सक्षम विचारांना व समाज उध्दारक दैदिप्यमान कार्याला विनम्र अभिवादन...! मानाचा पिवळा जय मल्हार!! तसेच सर्व समाजबांधवांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
जय मल्हार! जय अहिल्याई!! जय यशवंत!!!
आपलाच
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ती.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Sunday, 1 May 2016

...तेव्हा उभा महाराष्ट्र पेटलेला दिसेल.


आज महाराष्ट्र दिन या दिवशी १०५ हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली त्या शुरवीरांना खरंतर मानाचा जय मल्हार!! जय महाराष्ट्र!! कोटी प्रणाम!! तसेच कामगार दिनाच्या सर्वांना हर्दिक शुभेच्छा!!
आज राज्यभर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छांचे संदेश सर्व सोशल मिडीयावरती फिरताहेत चांगली गोष्ट आहे पण याच महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजावरती जर विनाकारण अन्याय व अत्याचार होत असेल तर मग काय म्हणून महाराष्ट्र दिन साजरा करायचा? असा प्रश्न पडतो.
      कारण काल परवाच "धनगरांना आरक्षणाचे दरवाजे बंद". अशा आशयाची बातमी वाचायला भेटली तेव्हा तळपायाची आग पार मस्तकापर्यंत गेली. केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्यूएल ओराम म्हणतात की गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या जनगनणा महासंचालनालयाने (रजिस्टर्ड जनरल ऑफ इंडिया) अर्थातच RGI ने ही मागणी फेटाळली आहे. पण खरंतर ती मागणी धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत सामाविष्ट करण्याबद्दलची होती आणि ती कोणी ? व कधी? पाठवली याबाबत माहिती उपलब्ध नाही.
सांगायची वस्तूस्थिती अशी की धनगर समाज अगोदरपासूनच अनुसूचित जमातीच्या यादीत आहे मग सामाविष्ट करण्याचा प्रश्नच येतो कुठे?? त्यातच सदरच्या राज्य सरकारने अजूनही धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात असा अनुकूल प्रस्ताव केंद्र सरकारला अर्थातच आरजीआय ला पाठवलाच नाही मग धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत सामाविष्ट करण्याचा प्रस्ताव नेमका कोणी? व कधी ? पाठवला याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, जो प्रस्ताव आरजीआय ने फेटाळला आहे. गेल्या ६६-६७ वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित आहे. दिवसभर उन्हातान्हात, थंडीवाऱ्यात धो धो कोसळणाऱ्या पावसाचा विचार न करता रानावनात, डोगरदऱ्यांत राहून जंगलात भटकंती करणाऱ्या या धनगर समाजाला शेळ्या मेंढ्या राखण्यामुळे आपण अनुसूचित जमातीमध्ये आहोत की नाही आहोत याचाच अभ्यास नव्हता अर्थातच शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या धनगर समाजाचे नेतृत्वच म्हणावे असे मजबूत आणि अभ्यासू नव्हते म्हणूनच आजपर्यंत धनगर समाजाची उपेक्षा झाली, अवहेलना झाली.
भारतीय राज्यघटनेत कलम क्र.३४२ वरती असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अ.क्र.३६ वर धनगड, ओरान असा स्पष्ट उल्लेख आहे. पण जेव्हा राज्यघटना लिहली गेली तेव्हा भारतीय समाजव्यवस्थेचे चार भागात विभाजन करून भारतामध्ये सर्वसमानता प्रस्थापित करण्यासाठी.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भविष्याचा वेध घेऊनच देशाच्या स्वातंत्र्यापुर्वी दि. ९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठात सादर केलेल्या अहवालाचा संदर्भ घेऊन भारतीय समाजव्यवस्था तयार केली. कोलंबिया विद्यापीठात सादर केलेल्या "आंबेडकर बाबासाहेब वांङमय" या अहवालात भारतीय जनजाती, संस्कृती यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जातीव्यवस्थेच्या लोकसंख्येचा आणि त्या जातीजमाती कोणत्या भागात आढळतात याचा आढावा दिला होता. त्यामध्ये "धनगड" नावाच्या जमातीचा कोठेही उल्लेख आढळून येत नाही मग स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यघटना लिहली गेली तेव्हा अचानक "धनगड" नावाची जमात कशी काय जन्माला आली ?? याचा अभ्यास करायला हवा.
"धनगर" या शब्दाचा "धनगड" असा शब्दछल झाल्याने धनगर समाज विकासापासून कोसो दूर आहे, जसे Gurgaon चे गुडगाव, Orissa चे ओडिसा, Acer चे एकड त्याचप्रमाणे Dhangar चे धनगड असा स्पेलिंग मिस्टेक झाल्याने धनगर समाजावर फार मोठा अन्याय झालेला आहे. आजही महाराष्ट्र राज्यात आणि परिणामी भारतामध्ये "धनगड" नावाची कोणतीही जमात आस्तीत्वात नाही अथवा धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी जेव्हा जेव्हा आंदोलने झाली तेव्हा "धनगड" नावाच्या जमातीचा एकही व्यक्ती विरोधात पुढे नाही. मग राज्यघटनेत उल्लेख असलेल्या धनगड जमातीचे आरक्षण नक्की कोण लाटतंय? धनगड जमात आस्तित्वातच नाही तर मग ३६ नंबर वर असलेल्या धनगड जमातीचा आदिवासी विकास निधी नेमका कोण लाटतोय याकडे गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात म्हणून सर्वप्रथम १९८९ साली यशवंत सेना संस्थापक स्व.बी.के.कोकरे साहेबांनी जेव्हा लाखो यशवंत सैनिकांना सोबत घेऊन खंबाटकीच्या घाटात आंदोलन केले होते त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी सांगली येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात पंतप्रधान राजीव गांधीच्या उपस्थितीत धनगर समाजाला "अनुसूचित जमाती" ऐवजी जाणूनबुजून "भटक्या जमातीत" घालण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी धनगर समाजाला वाटाण्याच्या अक्षता दाखवून धनगर समाजाला भटक्या जमातीत घातले आणि आजच्या धनगर समाजातील हजारो मुलामुलींचे भविष्य अंधारात ठेवले. धनगर समाजाची हजारो पोरं आय ए एस, आय पी एस बनण्यापासून वंचित राहिली याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे धनगर समाजाचा खरा शत्रू शरद पवार होय.
धनगर समाजावरती झालेल्या अन्यायाला बारामतीचा बोका जेवढा जबाबदार आहे तेवढेच धनगर समाजातील ठराविकजण सोडले तर बाकीचा सुशिक्षित वर्ग / प्रशासकीय अधिकारी  जबाबदार आहेत आणि धनगर समाजाचे भांडवलीकरण करुन समाजाचे बाजारीकरण करुन प्रस्तापित नेत्यांचे तळवे चाटणारे धनगर समाजातील पुढारी/नेते तितकेच जबाबदार आहेत. कारण त्या नेत्यांना समाजासाठी राजकारण करायचे नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचा वापर करुन स्वतःची घरं भरायची आहेत त्यामुळे त्यांना समाजाबद्दल काही घेणेदेणे नाही. यासाठी माडीत आणि साडीत गुरफटलेल्या व्यावसायिक बांधवानी सुशिक्षित वर्गाने जर प्रामुख्याने लक्ष घातलं तर धनगर समाजाला न्याय आणि आपले हक्क मिळायला क्षणमात्रही विलंब होणार नाही. आज केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्यूएल ओराम बरळतात की धनगर समाजाला आरक्षणाचे दरवाजे बंद आहेत पण ओरामांना कुठे माहित आहे की इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या यशवंतराव होळकरांचा वारसा लाभलेला क्रांतीकारी हाडाचा अन् सळसळत्या रक्ताचा प्रत्येक धनगर जेव्हा अन्यायाच्या विरोधात खवळून उठेल, पेटून उठेल तेव्हा उभा महाराष्ट्रही पेटलेला दिसेल आणि धनगर समाजाला बंद असलेले आरक्षणाचे दरवाजेे देखील आपोआप उघडलेले असतील. जिथे मराठी=मरहट्टी भाषिकांच्या प्रदेशात जर  मरहट्टींना (कर्नाटक शब्द मर=मेंढी,मेंढरू  व  हट्टीजन-मेंढ्या राखणारे, मेंढ्या पाळणारे धनगर)  यांना जर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नसेल तर मग आजचा महाराष्ट्र दिन काय म्हणून साजरा करायचा?  पाठीमागे जाटांनी हरियाना पेटवला होता तर केंद्र सरकार त्यांची दखल घ्यायला लागले पण डोळ्यावरती अज्ञानाचे घोंगडे पांघरून घेतलेले धनगराचे वाघ जेव्हा पेटून उठतील तेव्हा उभा महाराष्ट्र पेटलेला दिसेल हे मात्र नक्की.
  जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday, 29 April 2016

एकत्रिकरणातूनच समाजाचा विकास -मा.विवेक कोकरे

एकत्रिकरणातूनच समाजाचा विकास -मा.विवेक कोकरे

समाजाच्या अज्ञानपणामुळे विखुरल्या गेलेल्या धनगर समाजाला एकत्रित करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन यशवंत सेनेचे महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष मा. विवेक कोकरे साहेब यांनी काल मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर तसेच पेन्नूर (मोहोळ) येथे आयोजित केलेल्या बैठकीदरम्याण केले. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मा.विवेक कोकरे साहेबांनी मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला तसे मोहोळ तालुक्यातील धनगर समाजबांधवांशी चर्चा केली होती. कोणतीही व्यक्ती समाजापेक्षा मोठी नाही तर समाज सर्वापेक्षा मोठाच असतो म्हणून समाजाला कोणी वेठीस धरू नये अथवा स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचे कोणी भांडवलीकरण करू नये असेही त्यांनी सांगितले. धनगर समाज पोटजाती मध्ये विभागला आहेच शिवाय अज्ञानपणामुळे विखुरला गेला. या भरकटलेल्या समाजाला जर एकत्रित केले तरच समाजाचा विकास होऊ शकतो आणि त्यासाठी मी अहोरात्र कार्य करायला तयार असल्याचे यशवंत सेना युवक प्रदेशाध्यक्ष मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यामध्ये मा.एडव्होकेट रविकिरण कोळेकर साहेब आणि सहकाऱ्यांनी बैठकीचे अतिशय उत्कृष्टरित्या नियोजन केले होते त्यावेळी ३०-३५ युवक बैठकीसाठी उपस्थित होते तर पंढरपूर येथे मा.नानासाहेब खांडेकर व सांगोला येथे मा.विशाल वाघमोडे, अवधूत वाघमोडे यांनी बैठकीचे नियोजन केले होते. काल दि.२७ रोजी.लग्नसराई चे दिवस असतानादेखिल प्रत्येक ठिकाणी मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव चर्चेसाठी उपस्थित राहिले होते यारुनच लक्षात येते धनगर समाज प्रगतीच्या दिशेने जायला सज्ज झाला असून स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करुन अखंड महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या  क्रांतीची मशाल देणाऱ्या यशवंत सेना संस्थापक स्व बी.के.कोकरे साहेबांच्या क्रांतीकारी संघटनेच्या माध्यमातून एकत्रित येत असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या नात्याने युवा पिढी यशवंत यशवंत सेनेत सहभागी होत आहेत. यशवंत सेना नेहमीच व्यक्तीपेक्षा समाज मोठा या तत्वाने काम करत राहील असे यशवंत सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष मा.विवेक कोकरे साहेब बोलताना म्हणाले.
मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, मोहोळ येथील दौऱ्यामध्ये मा.विवेक कोकरे साहेबांसोबत मा. विशाल वाघमोडे, मा.विशाल कोकरे, मा.राजाराम वाघमोडे आदी युवक सहभागी झाले होते.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Tuesday, 19 April 2016

...तर धनगर म्हणवून घेऊ नका


धनगर समाजात जन्माला आलेली एकाच मातेची अर्थातच अहिल्याईची आम्ही लेकरं आज पोटजातीच्या विळख्यात अडकून बसलोय म्हणूनच माझा धनगर समाज इतरांपेक्षा ५०-६० वर्ष पाठीमागे आहे असे म्हणायला काही वावगं वाटणार नाही. आज कोणी म्हणतो मी हटकर, कोणी म्हणतो मी खूटेकर, कोणी म्हणतो झेंडे धनगर, तर कोणी म्हणतो बंडे धनगर, कोणी म्हणतो अहिर, तर कोणी म्हणतो डंगे धनगर, कोणी म्हणतो अमुक धनगर तर कोणी म्हणतो तमूक धनगर. अशा रीतीने प्रत्येकाने व्यवसायनुरूप, कुळानुरूप आणि कर्तव्याच्या आधारावर पोटजाती वाटून घेतल्या आणि एकत्रित गुण्यागोविंदाने जगणाऱ्या माझ्या धनगर समाजाचे विभाजन केले. अरे नुसतेच विभाजन केले नाही तर पार वाटोळे केले माझ्या धनगर समाजाचे, पण आजच्या सुशिक्षित युवा वर्गाने तरी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा. असाच पोटजातींचा डंका मिरवत बसला तर आरक्षणाची अंमलबजावणी दुरच सोडा ज्या ज्या वेळी समाजातील आपल्याच आई-बहिणींवरती अन्याय अत्याचार  होईल त्या त्या वेळी पोटजातीच्या अहंकाराने माजलेली आपलीच माणसं मदतीला धावून येणार नाहीत हे सत्य नाकारू शकत नाही.
एकाच रक्ताच्या आम्ही औलादी अर्थातच मल्हारबांचे मावळे, लोककल्याणकारी रणरागिणी महाराणी अहिल्याईची आम्ही लेकरं, अद्वितीय महाराजा भारताचा नेपोलीयन बोनापार्ट म्हणून अख्खं जग ज्यांना ओळखते त्या राजे यशवंतराव होळकरांचे आम्ही वारसदार आज पोटजातीच्या नावाखाली वेगवेगळे बस्तान बसवतोय अन् प्रस्तापित जातींना डोक्यावर घेऊन मिरवतोय कीती दुर्दैव आमचे... जेवढे धनगर म्हणून जगाल आणि धनगर म्हणूनच एकत्रित याल तरच आपले हक्क/अधिकार आपण हिसकावून घेऊ शकतो पण पोटजातींचा स्वाभिमान बाळगून आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत हे बोंबलत बसला तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही उलट धनगर समाज अजून जास्तच पोटजातीत विभागला जाईल आणि एकदा का धनगर समाज विभागला गेला तर या महाराष्ट्र राज्यात नव्हे तर अखंड भारतात सनातनी विचारांनी बरबटलेली आणि ज्यांनी धनगर समाजाला आजपर्यंत अंधारात ठेवले होते अशी प्रस्तापित पिलावळ एकेकाळी राजा समाज असणाऱ्या जमातीवर राज्यकारभार करायला एकहाती मोकळी होइल याचा विचार माझ्या धनगर समाजातील तरुण बांधवानी करावा.
आज समाजात विवाह असो अथवा कोणताही कार्यक्रम सोहळा असो जिथे तिथे पोटजातींचेच साखळदंड आडवे येताहेत मग पोटजातींचा अहंकार बाळगणारे धनगर कसले? असाच प्रश्न मला पडतो. होळकर(विरकर)-शिंदे यांचा हकटर-खुटेकर मधील रोटी बेटी व्यवहार, तद्नंतर अहिल्याईंनी मुक्ताचा विवाह यशवंतराव फणसे यांच्याशी करुन दिला होता, राजर्षि छत्रपती शाहू महाराज आणि महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर यांच्यातील भोसले-होळकर कुटुंबात झालेला रोटी-बेटी व्यवहार आजही चालत आहे मग त्याच माझ्या धनगर  समाजात आज आम्हाला पोटजातींचा अडथळा कशासाठी?? जर तसे असेल  तर धनगर समाजबांधवांनो ज्यांना ज्यांना  पोटजातीला प्राधान्य द्यायचे असेल, पोटजातींचा डंका मिरवायचा असेल अथवा पोटजातींचाच उदोउदो करायचा असेल तर धनगर जमातीच्या प्रमाणपत्राऐवजी त्या त्या पोटजातींचीच प्रमाणपत्रे घ्या अन् स्वताला धनगर म्हणवून घेऊ नका.
एक कट्टर धनगर
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday, 17 March 2016

एक धनगर लाख सिकंदर... :नितीनराजे अनुसे


         मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर भल्या-भल्या दुश्मनांना चारीमुंड्या चित करणाऱ्यांच्या जमातीत जन्माला आलेली आम्ही माणसं आमच्या थोर महापुरूषांनी सुवर्णाक्षरात कोरुन ठेवलेला आमचा दैदिप्यमान इतिहास विसरतो आणि मग तिथेच आमचा विकास खुंटतो. जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधीच प्रगती/विकास करू शकत नाही हे तितकच सत्य आहे. या भारत देशावर इंग्रजांनी आक्रमण करून फंद फितुरी करत १५० वर्षे राज्य केले तर भारतीय इतिहासकार त्या फिरंग्यांचा उदो उदो करत बसले आणि निर्लज्जप्रमाणे सांगू लागले की इंग्रजांनी भारताला १५० वर्षे गुलामगीरीत ठेवलं. पण धनगर समाजाने या भारतावरती नव्हे तर आशिया खंडाच्या विशाल भूभागावरती ३५० वर्षापेक्षा अधिक राज्यकारभार करून गुलामगीरीत ठेवले होते इंग्रजांना कापून काढत यशवंतराव होळकरांनी त्यांना सळो की पळो करून सोडले होते हे प्रत्येकाच्या लक्षात असूद्या.
       आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, राजा सम्राट अशोक, थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर, रणरागिणी राजमाता महाराणी अहिल्याई होळकर, आद्यस्वातंञ्यसेनानी महाराजा यशवंतराव होळकर, आद्यमहिला स्वातंत्र्यसेनानी वीरांगणा भिमाई होळकर अशा थोर महापुरूषांचा जमातीत जन्माला आलेले दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाचे आम्ही वारसदार, आम्हाला आमचाच इतिहास माहित नसल्याने इथल्या माजलेल्या आणि मस्तावलेल्या प्रस्तापितांची गुलामगीरी अन् चमचेगीरी करण्यातच आजच्या सरदारांनी (प्रस्तापितांच्या चपला उचलणाऱ्या नेत्यांनी) समाधानता स्विकारली हे धनगर समाजाचे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. कदाचित आमचा इतिहास चुकीचा लिहला गेला कारण आमचा इतिहास लिहणारे इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पण आमचा इतिहास दुरुस्त करण्यासाठी तरी कीतीजण प्रयत्न करतात याचा पण अभ्यास करायला हवा.
        आज जर धनगर समाजाला आपला खरा इतिहास समजला तर प्रेमळ तितकाच अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारा आणि ध्येय्यवेडा असलेला धनगर समाज पुन्हा या जगावरती राज्य करू शकतो पण आजपर्यंत आम्हाला आमचे आस्तित्व समजले नव्हते म्हणून धनगर समाजाचे फार मोठे नुकसान झाले. आज आम्हाला आमच्या आस्तित्वाची जाणीव करून घ्यावी लागेल, त्यासाठीच
आता
गरज आहे आमचा खरा इतिहास जाणून घेण्याची
गरज आहे तरुणांमध्ये स्वाभिमान जागवण्याची
गरज आहे समाजाला जाग्रूत करण्याची
गरज आहे समाज प्रबोधन करण्याची
गरज आहे समाज संघटन करण्याची
गरज आहे समाजाला योग्य दिशा देण्याची
गरज आहे समाजाचे प्रश्न समजून घेण्याची
गरज आहे ते समाजाचे प्रश्न सोडवण्याची
गरज आहे स्व.बी.के.कोकरे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची
यासाठी हवा आहे विश्वास अन् साथ फक्त तुमची
 पुन्हा एकदा खवळून उठेल धनगर समुद्रासारखा,
 पुन्हा एकदा पेटून उठेल धनगर वादळासारखा,
 पुन्हा एकदा धनगर भरवेल धडकी सह्याद्रीच्या पर्वतरांगेला अन्     पुन्हा एकदा कवेत घेईल त्या  हिमालयाला. सळसळत्या रक्तामध्ये अन्यायाची चीड आणि लालबुंद डोळ्यामध्ये रसरसलेला निखारा साठवून ठेवलेला धनगर ज्यादिवशी पेटून उठेल आणि ज्यादिवशी महाराष्ट्रातील एकाच रक्ताचा अन् हाडामांसाचा प्रत्येक धनगर जातीसाठी माती खाऊन हक्कासाठी रस्त्यावर उतरेल तेव्हा महाराष्ट्राचा फक्त हरियाणा (जाटांचे आंदोलन) होणार नाही तर यशवंतराव होळकरांच्या वारसदारांनी घडवलेल्या नवीन इतिहासाची पुस्तकं वाचायला मस्तकं शिल्लक राहणार नाहीत.
म्हणूनच म्हणतो खबरदार जर आम्हावर अन्याय कराल तर उद्याचा सुर्य उगवू देणार नाही.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५ ३००० ४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com

Saturday, 23 January 2016

एक ऐसा शासक, जिसके सामने अंग्रेजों ने हरबार टेक दिए घुटने।


Dainik Bhaskar News | Feb 24,2012

भोपाल। एक ऐसा भारतीय शासक जिसने अकेले दम पर अंग्रेजों को नाकों चने चबाने पर मजबूर कर दिया था। इकलौता ऐसा शासक, जिसका खौफ अंग्रेजों में साफ-साफ दिखता था। एकमात्र ऐसा शासक जिसके साथ अंग्रेज हर हाल में बिना शर्त समझौता करने को तैयार थे। एक ऐसा शासक, जिसे अपनों ने ही बार-बार धोखा दिया, फिर भी जंग के मैदान में कभी हिम्मत नहीं हारी।
इतना महान था वो भारतीय शासक, फिर भी इतिहास के पन्नों में वो कहीं खोया हुआ है। उसके बारे में आज भी बहुत लोगों को जानकारी नहीं है। उसका नाम आज भी लोगों के लिए अनजान है। उस महान शासक का नाम है - यशवंतराव होलकर। यह उस महान वीरयोद्धा का नाम है, जिसकी तुलना विख्यात इतिहास शास्त्री एन एस इनामदार ने 'नेपोलियन' से की है। भास्कर नॉलेज पैकेज के अंतर्गत आज हम आपको इसी वीर योद्धा के बारे में बताने जा रहे हैं।
पश्चिम मध्यप्रदेश की मालवा रियासत के महाराज यशवंतराव होलकर का भारत की आजादी के लिए किया गया योगदान महाराणा प्रताप और झांसी की रानी लक्ष्मीबाई से कहीं कम नहीं है। यशवतंराव होलकर का जन्म 1776 ई. में हुआ। इनके पिता थे - तुकोजीराव होलकर। होलकर साम्राज्य के बढ़ते प्रभाव के कारण ग्वालियर के शासक दौलतराव सिंधिया ने यशवंतराव के बड़े भाई मल्हारराव को मौत की नींद सुला दिया।
इस घटना ने यशवंतराव को पूरी तरह से तोड़ दिया था। उनका अपनों पर से विश्वास उठ गया। इसके बाद उन्होंने खुद को मजबूत करना शुरू कर दिया। ये अपने काम में काफी होशियार और बहादुर थे। इसका अंदाजा इसी से लगाया जा सकता है कि 1802 ई. में इन्होंने पुणे के पेशवा बाजीराव द्वितीय व सिंधिया की मिलीजुली सेना को मात दी और इंदौर वापस आ गए।
इस दौरान अंग्रेज भारत में तेजी से अपने पांव पसार रहे थे। यशवंत राव के सामने एक नई चुनौती सामने आ चुकी थी। भारत को अंग्रेजों के चंगुल से आजाद कराना। इसके लिए उन्हें अन्य भारतीय शासकों की सहायता की जरूरत थी। वे अंग्रेजों के बढ़ते साम्राज्य को रोक देना चाहते थे। इसके लिए उन्होंने नागपुर के भोंसले और ग्वालियर के सिंधिया से एकबार फिर हाथ मिलाया और अंग्रेजों को खदेड़ने की ठानी। लेकिन पुरानी दुश्मनी के कारण भोंसले और सिंधिया ने उन्हें फिर धोखा दिया और यशवंतराव एक बार फिर अकेले पड़ गए।
उन्होंने अन्य शासकों से एकबार फिर एकजुट होकर अंग्रेजों के खिलाफ लड़ने का आग्रह किया, लेकिन किसी ने उनकी बात नहीं मानी। इसके बाद उन्होंने अकेले दम पर अंग्रेजों को छठी का दूध याद दिलाने की ठानी। 8 जून 1804 ई. को उन्होंने अंग्रेजों की सेना को धूल चटाई। फिर 8 जुलाई, 1804 ई. में कोटा से उन्होंने अंग्रेजों को खदेड़ दिया।
11 सितंबर, 1804 ई. को अंग्रेज जनरल वेलेस्ले ने लॉर्ड ल्युक को लिखा कि यदि यशवंतराव पर जल्दी काबू नहीं पाया गया तो वे अन्य शासकों के साथ मिलकर अंग्रेजों को भारत से खदेड़ देंगे। इसी मद्देनजर नवंबर, 1804 ई. में अंग्रेजों ने दिग पर हमला कर दिया। इस युद्ध में भरतपुर के महाराज रंजित सिंह के साथ मिलकर उन्होंने अंग्रेजों को उनकी नानी याद दिलाई। यही नहीं इतिहास के मुताबिक उन्होंने 300 अंग्रेजों की नाक ही काट डाली थी।
अचानक रंजित सिंह ने भी यशवंतराव का साथ छोड़ दिया और अंग्रजों से हाथ मिला लिया। इसके बाद सिंधिया ने यशवंतराव की बहादुरी देखते हुए उनसे हाथ मिलाया। अंग्रेजों की चिंता बढ़ गई। लॉर्ड ल्युक ने लिखा कि यशवंतराव की सेना अंग्रेजों को मारने में बहुत आनंद लेती है। इसके बाद अंग्रेजों ने यह फैसला किया कि यशवंतराव के साथ संधि से ही बात संभल सकती है। इसलिए उनके साथ बिना शर्त संधि की जाए। उन्हें जो चाहिए, दे दिया जाए। उनका जितना साम्राज्य है, सब लौटा दिया जाए। इसके बावजूद यशवंतराव ने संधि से इंकार कर दिया।
वे सभी शासकों को एकजुट करने में जुटे हुए थे। अंत में जब उन्हें सफलता नहीं मिली तो उन्होंने दूसरी चाल से अंग्रेजों को मात देने की सोची। इस मद्देनजर उन्होंने 1805 ई. में अंग्रेजों के साथ संधि कर ली। अंग्रेजों ने उन्हें स्वतंत्र शासक माना और उनके सारे क्षेत्र लौटा दिए। इसके बाद उन्होंने सिंधिया के साथ मिलकर अंग्रेजों को खदेड़ने का एक और प्लान बनाया। उन्होंने सिंधिया को खत लिखा, लेकिन सिंधिया दगेबाज निकले और वह खत अंग्रेजों को दिखा दिया।
इसके बाद पूरा मामला फिर से बिगड़ गया। यशवंतराव ने हल्ला बोल दिया और अंग्रेजों को अकेले दम पर मात देने की पूरी तैयारी में जुट गए। इसके लिए उन्होंने भानपुर में गोला बारूद का कारखाना खोला। इसबार उन्होंने अंग्रेजों को खदेड़ने की ठान ली थी। इसलिए दिन-रात मेहनत करने में जुट गए थे। लगातार मेहनत करने के कारण उनका स्वास्थ्य भी गिरने लगा। लेकिन उन्होंने इस ओर ध्यान नहीं दिया और 28 अक्टूबर 1806 ई. में सिर्फ 30 साल की उम्र में वे स्वर्ग सिधार गए।
इस तरह से एक महान शासक का अंत हो गया। एक ऐसे शासक का जिसपर अंग्रेज कभी अधिकार नहीं जमा सके। एक ऐसे शासक का जिन्होंने अपनी छोटी उम्र को जंग के मैदान में झोंक दिया। यदि भारतीय शासकों ने उनका साथ दिया होता तो शायद तस्वीर कुछ और होती, लेकिन ऐसा नहीं हुआ और एक महान शासक यशवंतराव होलकर इतिहास के पन्नों में कहीं खो गया और खो गई उनकी बहादुरी, जो आज अनजान बनी हुई है।

संकलन:-
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday, 21 January 2016

आक्रोश मेंढपाळांचा...


एकाच रक्ताच्या आणि हाडामांसाच्या औलादी माझ्याच समाजावरती एवढा अन्याय करत असतील असे कधी स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. पण स्वार्थी विचाराने बरबटलेल्या धनगर समाजातील नेत्यांनी(अपवाद वगळून) समाजाचे भांडवल आणि बाजारीकरण करून धनगर समाजाला देशोधडीस लावण्याचा जणू काय ठेकाच उचललाय की काय? या प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी आनंद नामदेव कोकरे यांसारखे सुशिक्षित मेंढपाळ वाचा फोडण्यासाठी पुढे सरसावत आहेत पण धनगर समाजातील ठराविक सोडले तर बाकीचे उच्चशिक्षित उच्चविभुषित इंजिनीयर, डॉक्टर, एडव्होकेट प्रशासकीय अधिकारी मात्र हातावर हात ठेवून मौनवृत्त धारण करून धनगर नेत्यांनी आणि प्रस्तापितांनी चालवलेला नंगानाच उघड्या डोळ्यांनी बघत बसलेत याचेच दुख होते.
धनगर समाजाच्या वाट्याला आलेली भटकंती ही जणू काय पाचवीलाच पुजलेली आहे. आज इथे तर उद्या तिथे रात्रंदिवस रानोमाळी डोंगरदरीतून सावजा-माजरांचा, साप-विंचू यांचा विचार न करता दगडधोंडे आणि काटेकुटे तुडवत ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता पायाच्या नडग्या वाळवणार्या माझ्या धनगर समाजातील मायबापांचा विचार करायला आज कोणाकडे फुरसतही नाही. मी ज्या धनगर समाजात जन्माला आलो, ज्या वातवरणात शिकलो सवरलो खेळलो-बागडलो लहानाचा मोठा झालो त्या धनगर समाजाचे मी काहीतरी देणे लागतो याचा साधा पुसटसा विचारसुद्वा मनात न येणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीच्या लढ्यात धनगर समाज जागृत होताना दिसताच प्रस्तापितांच्या तुकड्यावर तुटून पडलेल्या नेत्यांना धनगर समाज दिसू लागला. तापलेल्या तव्यावरती स्वताची भाकरी भाजून घ्यावी याच विचारात काही महाबहाद्दर राजकारणात उतरले तर काही मोर्चे आंदोलने करू लागले. प्रत्येकजण ओरडतोय बोंबलतोय आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी पण धनगर म्हणून एकत्रित येण्याची त्यांची लायकी नाही कारण आरक्षणाचे श्रेय माझ्याच पारड्यात कसं पडेल अशा भ्रमात आरक्षणाचा खेळखंडोबा करणारे दुसरे तिसरे कोणी नसून धनगर समाजातील स्वताला विद्वान समजून घेणारे सर्वच नव्हे तर काही अपवाद सोडले तर बाकीचे नेतेच जबाबदार आहेत असे म्हणायला काही वावगे वाटणार नाही.
समाजसेवक मेंढपाळ आनंद कोकरे यांनी जे विश्लेषण केले याचे धनगर समाजातील नेत्यांनी, बुद्धिजीवी वर्ग तसेच उच्चशिक्षित, उच्चविभुषितांनी चिंतन, मनन आणि आत्मरिक्षण करायला हवे. धनगर समाजबांधव आजही भटकंती करत या गावावरुन त्या गावाला पायपीट करत असतात. घोड्याच्या पाठीवर आयुष्याचा संसार लादून करडा-कोकरांचं आणि पोराबाळांच लटांबण सोबत घेऊन पोटाची खळगी भरत असतात. भारत सरकारने ६-१४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाची सोय करून दिली हे खरं पण मेंढ्यामागे आईबापांसोबत गावंच्या गावं पालथी घालणार्या धनगर समाजाच्या पोरांनी नेमकं शिक्षण घ्यायचं कुठं?? रहायचं कुठं?? खायचं काय ? याचा विचार तुम्ही आम्ही करायला हवा. अनुसुचित जमातीचे आरक्षण हा एक डॉ. बाबासाहेबांनी दिलेला घटनादत्त अधिकार आहेच आहे पण त्यासाठी नेत्यांनी कोणीतरी धाकल्या बापाचं होऊन एकत्रित यायला हवं होतं पण तसे होत नाही आणि याच कारणामुळे धनगर समाजाच्या करोडो नव्हे तर अब्जावधी रूपयांचा चक्काचूर होतो आणि शेवटी हातात राहतो तो म्हणजेच बाबाजीचा ठुल्लू. पाठीमागच्या हिवाळी अधिवेशनात नेमकं तेच घडलं पण नेत्यांना याचे काय देणे घेणे?? आश्वासनांवरती आश्वासनं दिली जातात आणि त्याचा पाठपुरावा करण्यातच चार-पाच पिढ्या बरबाद होतात याला कारणीभूत म्हणजे समाजातील नेत्यांचा मनभेद-मतभेद आणि स्वार्थी भावना. या सर्व कारणामुळेच मग घोडं पेंड खाऊ लागतं... त्यासाठी एक व्हा आणि  नेक व्हा असं बुद्धिजीवी वर्ग सांगून सांगून थकला पण पालत्या घड्यावर पाणी ओतावं त्यातला प्रकार आजपर्यंत पहावयास मिळाला. एकत्रित येऊन  संघर्ष कराल तर कोई माई का लाल इस दुनिया मे पैदा नही हुआ जो धनगर समाज को रोख दे।
धनगर समाजाच्या शेळ्या-मेंढ्यांसाठी असलेली चराऊ कुरणे सरकारणे स्वताच्या घशात घालून घेतलीत एकीककडे जंगलच्या जंगल उध्वस्त करून कारखाने, सुतगिरण्या तर रासायनिक प्रकियेमुळे जिवित हानी पोहचवणार्या केमीकल कंपन्या उभारल्या जातात तर दुसरीकडे शेळ्या-मेंढ्यां, गाई-म्हैसीसाठी असलेली चराऊ कुरणे औद्योगिक संस्थांसाठी वापरली जातात मग शेळ्या-मेंढ्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती करून पोट भरण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो मग धनगर समाजातील मुलं-मुली आई-वडिलांसोबतच जातात त्यांच्या शिक्षणासाठी, राहण्यासाठी निष्क्रीय सरकार काही करू शकत नाही पण करोडो अब्जो रूपयांची राखरांगोळी करणार्या नेत्यांनी मी धनगर मी धनगर म्हणून उदो उदो करत बसण्यापेक्षा तुमच्या आंदोलनात, मोर्चात साध्या चहाची सुद्धा अपेक्षा न ठेवता प्राणपणाने झटणार्या आणि झगडणार्या भटकंती करणार्या मेंढपाळांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली तर सोन्याहून पिवळं.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com