Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Wednesday 1 February 2017

पाडायला नको तर उभे करायला शिका

"बुडत्याला काडीचा आधार" ही मराठी म्हण खरोखरच समर्पक अशीच आहे. पाण्यात बुडत असताना साधा लाकडाचा ओंडका माणसालाच नव्हे तर प्रत्येक भूचरांना पाण्यात बुडण्यापासून वाचवतो त्याचप्रमाणे *आजच्या राजकारणात समाजकारणात तुमच्या-आमच्या सारख्या सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या व्यक्तिंमुळे आणि सहकार्यामुळे समाजातून नवनविन नेतृत्व घडत असतात तयार होत असतात.* अपवादात्मक काहीजण त्याचा गैरवापर करून स्वताची घरं भरत असतात म्हणून त्याचा दोष उर्वरित इतरांना देऊन चालत नाही अथवा सत्तेचा वापर केवळ जनतेच्या विकासासाठीच करणारे नेतृत्व खोडून चालणार नाही कारण ते नेतृत्व घडण्यासाठी फार मोठा संघर्ष केलेला असतो फार मोठा लढा दिलेला असतो. प्रस्तापितांकडून होणाऱ्या त्रासाला न जुमानता नजरेस नजर मिळवून छातीठोकपणे त्यांच्या विरोधत त्यांच्या नाकात दम ठोकून तयार झालेली नेतृत्व सहजासहजी मिळत नाहीत. आज धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणीसाठीचा लढा अर्थातच धनगर समाजाचा जीवनमरणाचा, आत्मियतेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण सर्वजण आपापल्या परीने वेगवेगळ्या मार्गाने लढा उभारत आहोत. मग रस्त्यावरची लढाई असो अथवा ती न्यायालयीन लढाई असो. असे असताना आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूकांमध्ये सर्वच पक्षातून तर कोणी अपक्ष मधून धनगर समाजाचे उमेद्वार जय्यत तयारी करून मैदानात उतरले आहेत. अर्थातच सामाजिक प्रबोधनातून जनजागृतीतून समाजात हळूहळू परिवर्तन होत चालल्यामुळे पुर्वीपेक्षा राजकारणात आणि समाजकारणात धनगर समाजाचा टक्का वाढतोय हे कोणीही नाकारू शकत नाही. पण एवढ्यावरच आपल्याला थांबून चालणार नाही तर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर जास्तीत जास्त उमेद्वार पाठवल्यानंतर विधानसभा/विधानपरिषद आणि लोकसभा/ राज्यसभा यांसारख्या ठिकाणी धनगर समाजाची माणसं पोहचणे आवश्यक आहे जेथून जनतेच्या विकासाच्या चाव्या फिरवल्या जातात. ज्याठिकाणी कायदे बनवले जातात त्याठिकाणी आपली माणसं असायला हवीत आणि ती काय सहजासहजी तयार होत नाहीत ते नेतृत्व घडावयास फार काळ लागतो मग *पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूकांमधून आपल्याच माणसांना पाडायचा विचार करत असाल तर महाराष्ट्र राज्यातून परिणामी भारत देशातून कित्येक नेतृत्व उभे करायच्या ऐवजी जर ते खोडायचंच काम करणार असाल तर मग कशाला हवंय समाजप्रबोधन? कशाला पाहिजे समाजजागृती?? कशाला पाहिजे समाजाला सत्तेत वाटा?? जे आजपर्यंत पुर्वीपासून चालत आले आहे तेच चालुद्या ना मग...* आम्ही पाठीमागे आहोत आमचा समाज पाठीमागे आहे, आमचा विकास होत नाही, पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये आजपर्यंत धनगर समाजाव्यतिरिक्त ज्याला ज्याला पाठवले त्यांनी समाजाचे नव्हे तर जनतेचे काहीच काम केले नाही या गोष्टी ओरडून ओरडून सांगायची गरजच काय??
आज कुठेतरी संघर्षात्मक लढा देऊन धनगर समाजातून तयार झालेले नेतृत्व उदयास येत असताना त्याचा फायदा पुढे विधानसभा/लोकसभा सारख्या निवडणुकांत समाजाला मिळेलच त्यात काही वाद नाही पण भाजपाने धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल काही पाऊले उचलली नाहीत म्हणून जर त्या पक्षातील आपल्याच जमातबांधवांना पाडणार असाल तर मग विरोधकांच्यात आणि आपल्यात फरक तर काय राहिला?? एकीकडे मराठा समाजातील काही मंडळी त्यांच्या आरक्षणासाठी जातबांधवांनाच मतदान करायचे ठरवून सर्व स्थानिक स्वराज्य संस्था कशा ताब्यात घेतां येतील याची व्यूहरचना आखत अाहेत, मग तो उमेद्वार कोणत्याही पक्षाचा असो एका पक्षातून मजबूत नेतृत्व उभा करायचे तर दुसऱ्या पक्षातून केवळ नाममात्र उमेद्वार द्यायचा जेणेकरून मजबूत आणि जनतेत ओळख असलेल्या उमेद्वारांना निवडून आणायचे ही त्यांची खेळी आहे. आपल्या समाजात मात्र तसे काही होताना दिसून येत नाही केवळ पाय ओढायचेच काम चालू आहे असे दिसून येतेय. मग आपल्यातलेच जमातबांधव आपल्यातल्याच जमातबांधवांना घरात बसवण्याच्या वल्गना करताना दिसून येतात यात कोणते शहाणपण आहे ते मला तर कळत नाही. मग कसा होणार समाजाचा विकास? कोण करणार समाजाचा विकास?? आजपर्यंत इतरांनी किती आपला केला म्हणून आता आपल्याच जमातबांधवांना घरात बसवून काय साध्य करणार आहात??
बांधवांनो मी काही फार मोठा विचारवंत आहे अशातला विषय नाही पण मला जे विचार सुचले जे योग्य वाटले म्हणून ते मी या माध्यमातून मांडले. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात त्याबद्दल दुमत नाही पण आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत, रस्त्यावरची तसेच न्यायालयीन लढाईसाठी देखिल आपण सज्ज आहोत. जर अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाल्या तर त्या आरक्षणाच्या आधारे अनेक राखीव जागा मिळतीलही पण आतापर्यंत संघर्षातून तयार झालेले आणि संघर्षातून, सामाजिक लढ्यांतून तयार होणारे नवयुवकांचे नेतृत्व खोडून टाकले तर ते पुन्हा तयार व्हायला, पुन्हा नेतृत्व घडायला फार वेळ लागेल आणि त्यामुळे अजून कितीतरी पिढ्या यामध्ये भरडल्या जातील या गोष्टीची जाण असायला हवी. *पायात पाय अडकवून पाडणाऱ्यांपेक्षा हातात हात देऊन पडलेल्यांना उठवण्यास मदत करणारा श्रेष्ठ असतो हे लक्षात असु द्या.* पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही आपल्या समाजबांधवांच्या मुलभूत गरजांची पुर्तता आपण करू शकतो म्हणूनच मला म्हणायचे आहे की *एकवेळ जास्तीत जास्त उमेद्वार उभे करायला शिका एकवेळ नाही निवडून आले तरी चालतील पण तो केवळ भाजपाचा आहे, आमुक पक्षाचा आहे तमूक गटांचा आहे म्हणून त्याला पाडायचा प्रयत्न करू नका एवढीच कळकळीची नम्र विनंती.
*
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंत!
     *✍️️नितीनराजे अनुसे✍️️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com