Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Monday 5 September 2016

षंढ राहू नका अन्यायाविरोधात बंड करा...


आजकाल कोपर्डी प्रकरणाचे निमित्त लावून मराठा मुक मोर्चा निघताहेत. खरोखरच त्या निषेधार्थ मूक मोर्चे, आंदोलने झालीच पाहिजेत. त्या पिडीत मुलीच्या कुटूंबियांना न्याय मिळालाच पाहिजे पण लोकशाहीने मोर्चे आंदोलने काढण्याचा अधिकार दिला म्हणजे असे नाही की आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या खचलेल्या पिचलेल्या धनगर आणि दलित समाजाचे घटनेनं दिलेले अधिकार हिसकावून घ्यायची तुमची भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची नसून घरात बसून शंतरंजीचा खेळ खेळणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्यांची ही चाल आहे. त्याचे कारण असे की कधी नव्हे इतिहासांत पहिल्यांदाच धनगर समाजातील दोन नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले शिवाय भारताच्या इतिहासांत पहिल्यांदाच धनगर समाजाचा खासदार लोकसभेत नव्हे तर राज्यसभेवर गेला म्हणून त्या घरात बसलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागले. मग वजीरांना (बिनडोक मराठा अभ्यासक ज्याच्याशी फोनवरून माझे बोलणे झाले होते त्यांना) सांगून प्याद्यांना रस्त्यावर उतरवून दलित समाजाचा अधिकार असलेल्या ॲट्राॅसिटी कायद्याचे हक्क रद्द करण्याची मागणी म्हणजेच शिवरायांच्या राज्यात केलेला जातीयवाद आहे हे विसरू नका. शिवाय त्या अभ्यासकाबरोबर (???) माझी बाचाबाची झाली कारण तो म्हणत होता की धनगर समाजाला ॲट्राॅसिटीचे संरक्षण मिळावे म्हणून धनगर समाज अनुसुचित जमातीचे म्हणजेच आदीवाशींचे आरक्षण मागतोय ही त्या बिनडोकने केलेली बिनबुडाची भाषा होती. पुढे तो हे पण म्हणाला की या लढाईमद्ये आदीवाशींच्या बाजूने मराठा समाज ठामपणे उभे राहणार असून धनगर समाजाच्या आरक्षणाला आम्ही विरोध करू. पण मराठा समाजातल्या कोणत्याही नेत्यांना जाऊन विचारा की बाबांनो मराठा समाज आरक्षणाची मागणी करत होता तेव्हा धनगर समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. मग आम्ही आमच्या हक्काचे मागतोय जे आम्हाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत दिले आहे. आम्हाला ॲट्राॅसिटीचे संरक्षण मिळायला पाहिजे म्हणून आम्ही आरक्षण मागतोय यातला विषय नाही. अरे तुम्ही "ख्वाडा" चित्रपट पाहिलाच असेल जातीवरून शिवीगाळ केली अन्याय केला तर आम्ही काय करू शकतो ते त्या चित्रपटाच्या माध्यमातून शिकून घ्या. एकतर आजपर्यंत मी मराठा समाजाच्या विरोधात बोललो नव्हतो लिहलंही नव्हते पण तुमच्याच मराठा समाजातले बिनडोक अभ्यासक मला लिहायला भाग पाडताहेत. पुढे त्या मराठा समाजाचे अभ्यासक म्हणतात धनगर समाजातील नेत्यांना जातीचा फायदा करून घ्यायची सवय आहे म्हणूनच धनगर समाजाच्या नेत्यांना खासदार व मंत्रीपद दिले जाते. मग मराठा समाजाचे अभ्यासक म्हणवून घेणाऱ्या बिनआकलेच्या कांद्यांनो आजपर्यंतचा इतिहास काढून बघा महाराष्ट्र राज्याचे जेवढे मुख्यमंत्री झाले त्यातील एक-दोन सोडले तर सर्वच मराठा समाजाचे होते मग बाकीच्या खात्यात मराठा समाजाचे कीती मंत्री होते याचा आकडा तुम्हीच काढा मग सांगा की महाराष्ट्र राज्यात जातीयवाद कोणी केला?? आज जरी तुमच्या (जातीयवादी) राजांनी घरात बसून शंतरजचा खेळ मांडला असेल तर मांडू द्या कारण आम्ही पण शंतरंज च्या खेळात माहीर आहोत. कोण कशी चाल करतोय याची खबर ना खबर आम्हाला असते. कारण जगजेत्या सिकंदराला पराभूत करणाऱ्या आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य , राजा सम्राट अशोक, थोरले मल्हारराव होळकर , राष्ट्रमाता अहिल्याई होळकर, अजिंक्यवीर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जमातीत जन्माला आलेल्या आम्ही औलादी आहोत आणि स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या नादाला लागू नका. नाद केला तर बाद करायला आम्हाला वेळ लागणार नाही. आज तुम्ही कोपर्डीच्या प्रकरणाचे निमित्त लावून जरूर एकत्रित या कारण लोकशाहीने तुम्हा-आम्हाला अधिकार दिला आहे पण आमच्या विरोधात जर तुम्ही आमच्या दलित बांधवाचे व धनगर समाजाचे हक्क हिसकावून पाहू इच्छित असाल तर माझा एक धनगर समाजबांधव शंभरजनांना पुरून उरेल हे लक्षात ठेवा.
आजपर्यंत माझा धनगर समाज आणि दलित मराठा समाजातील नेत्यांच्या मागे-पुढे करत होता आजही धनगर समाजाचे नेते मराठा समाजाच्या समाजातील नेत्यांची चमचेगीरी, हुजरेगीरी करत आहेत पण आता इथून पुढे ते शक्य नाही. पण बांधवांनो मराठा समाजातील नेत्यांनी प्यादे रस्त्यावर उतरवून स्वता घरात बसून वजीरांच्या साह्याने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात चाल खेळली, दलित समाजाची ॲट्राॅसिटी काढून घेण्यासाठी चाल खेळली पण ही चाल खेळून त्यांचाच म्हणजेच मराठा समाजातील नेत्यांच्याच पराभव झाला त्यामुळे तुम्ही आम्ही जिंकलो आहोत. पण आता इथून पुढे षंढ बसू नका प्रस्तापित यंत्रणा जातीयवाद करत तुमच्या आमच्या विरोधात आवाज उठवत आहेत मग डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणेच "थंड राहून षंढ बसण्यापेक्षा अन्यायाविरोधात बंड करून गुंड झालेलं बरं" या सल्ल्याप्रमाणे बंड करायला पुढे यावे नाहीतर त्या गोडबोल्या औलादी सुखाने जगू देणार नाहीत. बांधवांनो ज्याप्रमाणे मराठा समाज गट-तट, पक्षभेद, संघटना भेद बाजूला ठेवून एकत्रित येत असेल तर मग तुम्ही-आम्ही सुद्धा पक्षभेद, मनभेद, मतभेद, गट-तट बाजूला ठेवून अन्यायाच्या विरोधात बंड करायला पुढे यावं हीच नम्र विनंती.
जय मल्हार। जय अहिल्या।। जय यशवंत।।
 जय भीम।। जय ज्योती।। जय शिवराय।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

जातीयवाद काय असतो ते आता मी शिकवतो...

जातीयवाद काय असतो ते आता मी शिकवतो...
सुरवातीलाच मी सांगू इच्छितो की आमचेच धनगर समाजातील नेते नालायक असल्यामुळे प्रस्तापितांची धनगर समाजाला विरोध करण्याइतपत मजल जाते. अगोदरपासूनच मी सांगत आलोय की धर्मनिरपेक्ष राज्यकारभार या महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर अखंड भारतामद्ये कुठेही दिसून येत नाही. जिकडे-तिकडे जाती-पातीचा आणि धर्माचा अवडंब माजलाय. आजपर्यंत धनगर समाजात जागृती करत असताना मला काहीजण म्हणत होते की नितीनराजे अनुसे जातीयवाद करतोय पण आता मी शिकवतो की जातीयवाद नेमका काय असतो ते. कदाचित माझा मित्रपरिवांर असलेल्या मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावतीलही पण कृपया त्यांनी वस्तूस्थिती समजून घ्यावी गैरसमज करू नयेत. माझा विरोध हा सर्व गोरगरीब मराठा समाजाला नाही तर बिनआकलेच्या अभ्यासकांना व नेत्यांना आहे. आजकाल कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यातून मराठा समाजाचे मुक मोर्चे निघाले आणि अजूनही निघणार आहेत. त्यामद्ये लाखो मराठा समाजबांधव माता-भगिणी सहभागी झाल्या. खरंतर कोपर्डीमधील हे प्रकरण म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारेच होते. त्याचा निषेध केलाच पाहिजे त्याविरोधात आवाज उठवून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण आरोपी हा आरोपी असतो, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्याला कोणती जात अथवा धर्म नसतो. पण निमित्त कोपर्डीं प्रकरणाचे लावून जर दलित-आदीवाशींच्या हक्कावर गदा आणायचा प्रयत्न करत असाल तर त्यातून स्पष्ट दिसून येते की तुम्ही (मराठा) कोपर्डीमधील मुलीला न्याय मिळावा म्हणून मुक मोर्चे काढत नाही तर तुमच्या डोळ्यात सतत खुपत असणाऱ्या दलितांना आणि धनगर समाजाला विरोध करायचा म्हणून केलेला हा उद्योग आहे.
ॲट्राॅसिटी रद्द करण्याची मागणी म्हणजे कोपर्डीमधील अत्याचारित मुलीला व त्या पिडीत कुटुंबाला न्याय मागणे नव्हे. कारण आजकाल ॲट्राॅसिटी असताना तुम्ही (मराठा व इतर तत्सम जाती तसेच ब्राह्मण) दिवसाढवळ्या दलित बांधवांना शिवीगाळ करता. मारहाण करता.तेव्हा न्याय मिळावा म्हणून दलित बांधव ॲट्राॅसिटी अधिकाराखाली तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकत होते. पण जर तुमच्या मागणीवरून ॲट्राॅसिटी रद्द केली तर (ॲट्राॅसिटी तर मुळात रद्दच होणार नाही) तुम्हाला शिवीगाळ करायला रान मोकळेच होईल ना.. मग माझ्या दलित आदीवाशी बांधवांनी कोणापुढे गाऱ्हाणं मांडायचं??? आजची वस्तूस्थिती अशी आहे की तुमचे (मराठा समाजाचे) आमदार/खासदार/मंत्री असल्यामुळे आमचा दलित-आदीवाशी अथवा धनगर समाजबांधव जर पोलिस स्टेशनला गेला तर त्याची तक्रार घेतली जात नाही, घेतलीच तर त्याची दखल घेतली जात नाही अन्यथा वरतून आमदार/खासदार/मंत्र्यांचे फोन वाजतात मग ते प्रकरण संबंधित पिडीत समाजबांधवांवर दबाव आणुन मागे घ्यायला लावले जाते ही खरी आजची वस्तूस्थिती आहे त्यात दुष्काळात तेरावा महिना जसा पडावा तसाच दलितांना दिलेला हा ॲट्राॅसिटीचा अधिकार हिसकावून घ्यायची तुम्ही भाषा बोलतां मग हा जातीयवाद नव्हे तर काय आहे??
 पुढे याच मराठा मुकमोर्चातून मराठा समाजाचे बिनडोक अभ्यासक कोणत्याही अभ्यासाशिवाय धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करून आदीवाशी बांधवांना धनगर समाजाच्या विरोधात भडकावण्याचे काम करत आहेत. परवा मी त्या बिनआकलेच्या (अभ्यासकाशी??) फोनवरून बोललो की तुम्ही काय डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा बुद्धीमान आहात का?? बाबासाहेब आंबेडकर काय मुर्ख होते का ?? आणि तुम्ही खूप शहाणे झालात का?? धनगर समाज अगोदरपासूनच राज्यघटनेत कलम क्र.३४२ वरती असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या नवव्या परिशिष्टात अ.क्र.३६ वर अनुसुचित जमातीच्या यादीत आहे. त्यासंबंधित संदर्भ तपासा  महाराष्ट्र शासन राजपत्र शुक्रवार १२ जुलै १९९६ व महाराष्ट्र शासन राजपत्र सोमवार १९ मार्च २००१, त्याचप्रमाणे जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००७-०८ व जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००९-१० या सर्व महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या राजपत्रामध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अ.क्र.३६ वर ओरॉन, धनगर असा स्पष्ट उल्लेख सुद्धा आहे. तिथे स्पष्ट उल्लेख ओराॅन धनगर असा आहे. मग ते मराठा समाजाचे बिनडोक अभ्यासक म्हणतात की धनगर समाजाला ॲट्राॅसिटीचे संरक्षण मिळावे म्हणून धनगर समाज आदीवाशींचे आरक्षण मागत आहे. म्हणून मराठा समाज धनगर समाजाच्या विरोधात आदीवाशींच्या बाजूने लढाई लढणार आहे. मग आता माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना जरातरी अक्कल यायला पाहिजे की त्या मराठा अभ्यासकांचा बोलवतां धनी कोण आहे हे माहित असताना सुद्धा त्यांची धोतरं सांभाळत बसायला लाज वाटत नाही का?? ज्यावेळी डिसेंबर १९८९ साली आमचं दैवत स्व.बी.के.कोकरे साहेबांनी खंबाटकीच्या घाटात अनुसुचित जमातीच्या सवलती लवकरात लवकर लागू कराव्यात म्हणून तीव्र आंदोलन केले तेव्हा २१ जानेवारी १९९० रोजी सांगली येथे तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधींच्या उपस्थितीमद्ये तात्कालीन मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा ढोल बडवला पण २३ मे १९९० रोजी धनगर समाजाची मुळ मागणी असलेल्या अनुसुचित जमातीच्या अंमलबजावणीची मागणी लाथाडून धनगर समाजाला भटक्या जमाती (क) मद्ये घालायचं पाप पवारांनी केले. आजचे मराठा अभ्यासक वल्गना करताहेत की धनगर समाज १९९० पर्यंत ओबीसी चे आरक्षण घेत होता व १९९० नंतर भटक्या जमातीच्या सवतींचा लाभ घेऊ लागला मग भटक्या जमातीचे आरक्षण आम्हाला मराठ्याच्या पवारांनीच दिले ना?? पण अरे बिनडोक असलेल्या अर्धवट अभ्यासकारांनो नीट अभ्यास करून बोला धनगर समाजाला डाॅ.बाबासाहेबांनी राज्यघटनेत अनुसुचित जमातीच्या तरतूद करून ठेवलीय पण इथल्या प्रस्तापित व्यवस्थेने अर्थातच मराठा नेत्यांनी धनगर समाजाला त्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचा अंमल होऊ दिला नाही. हे वास्तव सत्य आहे ते त्या धनगरांचा शत्रु असलेल्या पवारांना जाऊन विचारा ज्यांच्या सांगण्यावरून आज तुम्ही बोंबलताय. पण काहीही असो धनगर समाजातील दोन नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले म्हणून मराठा समाजाच्या पोटात दुखायला लागले आहे हे नाकारू शकत नाही. अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचा अंमल का होऊ दिला नाही याच्या पाठीमागे पवारांची रणनीती फार मोठी आहे ती म्हणजे  जर धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाल्या तर त्यांचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ धनगर समाजाच्या तांब्यात येईल आणि आमदार/खासदार जर धनगर समाजाचे झाले तर मराठ्यांनी जायचे कुठे??? त्यानंतर अनेक विधानसभा व लोकसभा मतदारसंघ हे धनगर समाजाच्या ताब्यात जातील म्हणून पवारांनी अनुसुचित जमातीच्या बाबतीत धनगर समाजाबद्दल उलट-सुलट रिपोर्ट देऊन धनगर आरक्षणाचा जणू काय पायंडा पाडलाय.
पाठीमागे सुद्धा रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवायला मराठा समाज पुढे आला होता कारण श्रीमंत तुकोजीराव होळकरांनी त्या वाघ्याचं स्मारक रायगडावर बसवलं होतं म्हणून मराठा समाजाच्या पोटात दुखत होते. म्हणून धनगराचा वाघ असलेल्या वाघ्याचं स्मारक मराठ्यांनी हटवले होते पण धनगर समाजाची ताकद पाहून आर.आर.पाटलांनी २४ तासाच्या आत वाघ्याचं स्मारक पुन्हा तिथे बसवले हा जिवंत इतिहास तुमच्या समोर आहे. त्यामुळे  आता लाखो मराठा रस्त्यावर आला म्हणून हूरळून जाऊ नका. कारण २०११ च्या जनगणनेनुसार फक्त ज्यांच्या जातीच्या दाखल्यावर "धनगर" असा उल्लेख आहे त्यांची लोकसंख्या दीड-दोन कोटींच्या घरात आहे पण जेव्हा हटकर, खुटेकर, काटकर, सनगर, अहिर, डंगे, ठेल्लारी, खाटीक धनगर अशा एकून धनगर समाजातील ५२  पोटजातींची जर लोकसंख्येचा जर आकडा निघाला तर महाराष्ट्र राज्यात एक क्रमांकाची लोकसंख्या एकट्या धनगर समाजाची असेल आणि याची जनगनना आता सरकारने नाही केली तरी "यशवंत युवा सेनेच्या" माध्यमातून जनगनना करत आहोत. पोटजाती विरहीत धनगर समाजाची लोकसंख्या ही महाराष्ट्र नव्हे तर भारतात एक नंबरवर असेल. मग जर मराठा समाज आज धनगर आणि दलित समाजाच्या विरोधात मुक मोर्चातून एकत्रित येत असेल तर एकटा धनगर समाज एका बाजूला झाला तर या भारतावर फक्त आणि फक्त धनगर समाजाचे वर्चस्व असेल. पण राष्ट्रमाता अहिल्याईंच्या प्रशासन आणि राज्यकारभाराचा आणि डाॅ.बाबासाहेबांच्या विचारधारेचा अादर्श ठेवून जर धनगर-दलित एक झाला तर मराठ्यांना कोणी कुत्रे विचारणार नाही हे लक्षात ठेवा. कोपर्डी प्रकरणाचे निमित्त लावून जर तुम्ही धनगर समाजाच्या आणि दलितांच्या विरोधात जर बोलत असाल तर उद्या थोरला भाऊ या नात्यांनं दलित आदीवासींना सोबत घेऊन धनगर समाज तुमच्या विरोधात उभा करू शकतो एवढी धमक आमच्याच आहे आणि बघायचंच असेल तर सांगा ते ही करून दाखवतो. कारण तुमच्या बिनडोक मराठा अभ्यासकांची सर्व महिला, शेतकरी, दलित यांना सोबत घेऊन जाण्याची गोड भाषा आम्ही जन्मापासूनच ऐकतोय पण वास्तवात मात्र इतर समाजातील महिलांवरती बलात्कार, अत्याचार करायला मराठा असतो यांचे पुरावे देतो. ज्याला जानता राजाची बिरूदावली लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या "जानता राजा" या रंजनाला कलंक लावला ते शरद पवार कृषिमंत्री असताना २००६ साली ७५०० वरती शेतकरी आत्महत्या करतात मग शेतकऱ्यांना सोबत घेऊन जाण्याची भाषा म्हणजे ही तुमची पोपटपंची आहे कारण फोडा-तोडाचं राजकारण आजपर्यंत मराठा समाजानं केलं त्यामुळे तुमच्या सोबत कोण येणार??? जातां जाता एकच सांगतो की एक म्हण आहे ती म्हणजे "एकवेळ मुठभर सराटा सोबत ठेवा पण एक मराठा नको". आता त्यापुढे जाऊन सांगतो नोव्हेंबर २०१२ साली तारीख आठवत नाही पण त्यावेळी मी केरळ मद्ये असताना थोर साहित्यिक स्व.प्रा.रा.चि.ढेरे यांच्यासोबत माझे फोनवरून बोलणे झाले त्यावेळी त्यांनी मला फोनवरून शिवाजी महाराज हे धनगरच होते याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यावेळी त्यांच्या "शनिशिंगणापुरचा शंभू महादेव" या कांदंबरीची बायंडींग झाली नव्हती ज्यांना कोणाला अभ्यासायचे असेल तर त्यांनी "शनिशिंगणापुरचा शंभू महादेव" ही कादंबरी वाचावी कारण अखंड २० वर्षे रिसर्च करून प्रा.रा.चि.ढेरे सर यांनी कादंबरी लिहली होती. पाठीमागच्या एक-दोन महिन्यापूर्वी प्रा.रा.चि.ढेरे सर यांचा मृत्यू झाला त्यांनी मला भेट घ्यायला सांगितले होते पण माझी अन् त्यांची भेट होऊ शकली नाही हे माझं दुर्दैव. आजपर्यंत मला काहीजण बोलत होते की नितीनराजे अनुसे जातीयवाद करतात तर त्यांना माझे खुले आवाहन आहे की धर्मनिरपेक्ष राज्यकारभार कुठे चालतोय ते मला अगोदर दाखवून द्या मगच माझ्यावर आरोप करा. पण ज्या दिवशी मी जातीयवाद करायला सुरवात करेल त्यादिवशी धनगर समाजबांधव एकत्रित येतील तेव्हा फक्त आणि फक्त तलवारीच हातात दिसतील हे विसरू नका. आजच्यासाठी एवढंच पुष्कळ आहे उद्याचा भाग नंतर...
जय मल्हार। जय अहिल्या।। जय यशवंत।।
 जय भीम।। जय ज्योती।। जय शिवराय।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
(धनगर समाजाच्या प्रश्नांचा अभ्यासक)