Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday 26 September 2015

मला तुमच्याशी बोलायचंय...

जय मल्हार
आरक्षणासंदर्भात तुमचं मत मला जाणून घ्यायचे आहे म्हणून वैयक्तिकरित्या बोलायचं ठरवलं. खरंतर आजपर्यंत ग्रुपवरतून मी माझे विचार व्यक्त करत होतो आणि धनगर समाजाच्या ५४३ ग्रुपमध्ये असल्याने मला आपले वैयक्तिक मत जाणून घेता आले नाही.  प्रतिक्रीयांच्या स्वरुपात तुम्ही माझ्या विचारांना जी दाद दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
राज्यघटनेनुसार धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी तुम्ही आम्ही झटतो आहोत झगडतो आहोत. प्रत्येकाने या संघर्षासाठी किमान खारीचा वाटा उचलला आहे. पण सर्व संघटना राजकीय नेते यांनी एकत्रित येऊन नागपूर विधानभवनावर एक "विराट जन आंदोलन" काढायचं असं २१ जुलै रोजी बारामती मध्ये झालेल्या प्रेरणा दिनादीवसी रणशिंग फुंकण्यात आले होते. पण डिसेंबर मद्ये होणार्या अधिवेशनादरम्याण नागपूर विधानभवनावर वेगवेगळे मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत.
नागपूर विधानभवनावर वेगवेगळे मोर्चे काढले तरी काही हरकत नाही पण समाजबाधवांमध्ये अशा वेगवेगळ्या मोर्चाबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. नेमके कोणत्या मोर्चात सहभागी व्हायचं ? असाही प्रश्न पडलेला आहे. प्रत्येक नेता आपलाच आहे आणि नेते पुढाकार घेताना दिसताहेत याचा मला सार्थ अभिमान सुद्धा वाटतो. पण प्रत्येक नेता आणि प्रत्येक समाजबांधव आपलाच असताना नेमकं कोणाच्या मोर्चात जायच?" का कोणाच्याच मोर्चामध्ये सहभागी व्हायचंच नाही अशा भरपूर प्रतिक्रीया मला समाजबांधवांकडून आल्या. मग नक्की काय करायचं असे वारंवार प्रश्न समाजबांधव करत आहेत. "धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था होऊ नये म्हणजे बरं...
मग सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांनी नेत्यांनी एकत्रित येउन चर्चा करायला हवी यासाठी सर्व समाजबांधवांनी सकारात्मक प्रतिक्रीया दिलेल्या आहेत. तर तुमचं याबद्दल मत काय आहे हे सविस्तरपणे मला सांगितले तर खूप बरं होईल. धनगर समाजातील नेते आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी मागणी करण्याऐवजी आमदारकी मागत बसल्याचे आरोप आज समाजातून होत आहेत. त्यांनी आयोजित केलेले मोर्चे म्हणजे आमदारकीसाठीचा सर्व खटाटोफ असल्याचे अनेक समाजबांधवांनी सांगितले. खरंतर धनगर समाजाचे आमदार असायला पाहिजेतच पण आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यानंतर आमदारकीला राखीव कोट्यातून धनगर समाजाचे उमेद्वार कमी पडतील अशी वेळ येईल. त्यामुळे नेत्यांनी मोर्चा काढून आमदारक्या मागत बसणं म्हणजे भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा घात केल्यासारखा प्रकार होईल. तद्नंतर शेळ्या-मेंढ्यांची राखण करणारा माझा मायबाप कोणत्याच नेत्यांवर कधीही विश्वास ठेवणार नाही. त्यासाठी सर्व नेत्यांना एकत्रित करुन एकाच विराट मोर्चासाठी चर्चा घडवून आणायचा माझा मानस आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे??
सर्व नेत्यांनी व वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकार्यांनी सर्व मतभेद व मनभेद बाजूला ठेवून एकत्रित यावं यासाठी तुम्हालाही खारीचा वाटा उचलावा लागेल.
यावरती तुमचं जे काय म्हणनं आहे ते सविस्तर कळवावे. निशब्द राहून तुमचे विचार मला समजणार नाहीत तर तुम्हाला जे योग्य वाटते ते मला निसंकोचपणे सांगावे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!

      👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆
(तुमचं वैयक्तिक मत +917666994123 या नंबरवरती मेसेज, व्हाटसप अथवा कॉल करुन कळवावे)

Wednesday 23 September 2015

आरक्षणाची अंमलबजावणी का आणि कशासाठी???

रविवार दि ४ अॉक्टोबर २०१५  रोजी  दु: २:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पटेल चौक, गणपती पेठ सांगली येथे "आदिम जमात धनगर समाज एक सायंटिफिक प्रबोधन" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त युवा वर्ग महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केलेले आहे.
गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाजाला जाणूनबूजून अनुसुचित जमातीच्या सवलती दिल्या नाहीत पण आज सनातनी संस्थांच्या शिकवणीतून आणि प्रस्थापितांच्या नादाला लागून धनगर समाजातीलच काही समाजबांधव आम्हाला आरक्षणच नको समानता हवी असे म्हणत अज्ञानपणाच्या आणि मुर्खपणाच्या बाता करताना दिसून येताहेत. धनगर समाजाला अथवा अन्य इतर समाजाला स्वातंत्र्यानंतरच आरक्षण दिले गेले  अथवा राज्यघटनेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केली अशातला विषय नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळातही आरक्षणाचे जनक छत्रपति राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरवात केली होती.
आरक्षण पद्धत बंद करुन या देशात समानता असायला हवी असं प्रत्येकाला वाटते यास मी सुद्धा अपवाद नाही. पण आजच्या घडीला शैक्षणिक संस्था, सोसायट्या, सुतगिरण्या, कारखाने, लघूउद्योग त्याचप्रमाणे मोठमोठे उद्योग, भांडवलशाहीत, प्रशासनात अन् राजकारणात कोणता समाज प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळतो याचा अभ्यास कधी केलात का?? प्रस्तापित नेते आणि सनातनी व्यवस्था व संस्था यांनी देशाची तिजोरी लूटून ते आज भांडवलदार बनले आहेत. मग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार प्रत्येकाला शैक्षणिक क्षेत्रात वाटा मिळेल असं म्हणनार्यांनी माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजातील शेळ्या-मेंढ्यांमागे भटकंती करणार्या माझ्या लहान बहिण-भावंडांचा कधी विचार केलात का?? आजचे माजलेले आणि मस्तावलेले शिक्षण सम्राट सहजासहजी माझ्या या भावडांना खरंच शिक्षण/न्याय देतील का?? या देशातील जनतेला बाबासाहेबांनी लोकशाहीचा मार्ग दाखवून दिला त्या राज्यघटनेनुसार या देशाचा राज्यकारभार सुरळितपणे चालला आहे आणि चालतही राहील पण जर आरक्षण पद्धत बंद केली असती तर आज देशात लोकशाहीची जागा ठोकशाहीने घेतली असती अन् तुम्ही-आम्ही या देशातल्या माजलेल्या धनदांडग्याची अन् सनातनी समजल्या जाणार्या औलादींची धुणी-भांडी करत बसलो असतो. हे तुम्हा-आम्हाला कधी समजणार?? कोणताही मागचा पुढचा विचार न करता नुसतंच उचलली जिभ अन् लावली टाळ्याला असंच करत बसला तर त्या सनातन्यांचे उद्दीष्ट साध्य व्हायला काही वेळ लागणार नाही. गुणवत्तेनुसार अथवा वार्षिक उत्पन्नानुसार आरक्षण असावं असं म्हणत असाल तर गेल्या ६७ वर्षापासून सतत डोंगरदरीत राहून वास्तव्य करणारा, पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरणारा, शैक्षणिक, राजकीय त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या अतिमागासलेपणा असलेला माझा धनगर समाज कधीच प्रवाहात येणार नाही अन् आमच्या उद्याच्या पिढीला शिक्षण, रोजगार, उद्योग यातील काहीच मिळनार नाही तसेच प्रशासनातून आणि राजकारणातून आम्ही शेकडो मैल दूर लोटलो जाऊ.
त्यासाठीच उद्याच्या भावी पिढीच्या भल्यासाठी आजचा युवा वर्ग जागरूक व्हाव हे उद्दीष्ट ठेवून दि ४ अॉक्टोबर रोजी सांगली येथे आदिम जमात धनगर समाज एक सायंटिफिक प्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्व विद्यालयीन, महाविद्यालयीन, विद्यार्थी-विद्यार्थीनींनी, समाजातील सुशिक्षित आणि सुज्ञ  युवक/युवतींनी, शिक्षकवर्ग त्याचप्रमाणे बुद्धिजीवी समाजबांधवांनी व राज्यातील सर्व संघटनांनी मतभेद विसरुन आणि राजकिय पक्षाच्या चपला बाहेर ठेवून सर्व पक्षातील नेत्यांनी सदरच्या कार्यक्रमास उपस्थीत राहून आरक्षणासंदर्भातील भ्रम दूर करून वास्तव काय आहे याचा अभ्यास करावा आणि अवलोकन करावे.
सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर तसेच आसपासच्या जिल्ह्यातून व राज्यभरातून या कार्यक्रमास येणार्या समाजबांधवांनी आपला सहभाग नोंदवावा जेणेकरून संयोजकांना उपस्थित राहणार्या समाजबांधवांची योग्य ती व्यवस्था करता येईल.
सहभाग नोंदणी आणि अधिक माहितीसाठी
संपर्क:-
अभिषेक  धडस 9021094360
नितिनराजे  अनुसे 7666994123
रेवाप्पा खोत 9623474597
मंगेश लंबाडे 8552854200
भारत  व्हणमाने 8806113906

जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।
जय यशवंत!! जय वीरांगणा भिमाई!!!

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Tuesday 22 September 2015

धनगर समाजातील यूवकांनो जागृत व्हा...

आज एकविसाव्या शतकातसुद्धा माझा धनगर समाज अज्ञानी आणि भोळा-भाबडाच राहिलेला दिसून येतोय आणि हे नाईलाजानं म्हणावं लागतंय. आज आम्हाला आमच्या थोर महापुरुषांनी तलवारीशी खेळून प्रसंगी रणांगणात रक्त सांडून सुवर्णाक्षरात कोरून ठेवावा असा इतिहास घडवला असताना त्याचा आम्हास विसर पडतो. खरंतर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरु शकत नाहीत अन् इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. मग या देशावर ३५० वर्षाहूनही अधिक आमच्या महापुरुषांनी राज्यकारभार केला असताना आम्ही आमच्या इतिहासापासून अजूनही वंचित का??  का आम्हाला आमच्या महापुरूषांची ओळख झाली नाही?? का आम्हाला त्यांचा इतिहास माहितच पडला नाही.??? एकीकडे युरोप खंडासारख्या तंत्रज्ञान विकसित देशामध्ये रणरागीणी कर्मयोगीणी लोककल्याणकारी महाराणी अहिल्यामाईंच्या प्रशासनाचा आदर्श समोर ठेवून त्या त्या देशांचे प्रशासन/राज्यकारभार सुरळितपणे चालवला जातो. पण ज्या देशात अहिल्यामाई जन्माला आल्या त्या देशामधील प्रशासनाची गोष्ट दूरच ठेवा पण अहिल्यामाईंच्या वारसदारांनादेखिल याबद्दल काहीच माहित नसावं??  अरे अटकेपार झेंडे फडकवले ते अभिमानाने सांगतो, मल्हार आया मल्हार आया असं म्हणताच दुश्मनांना कापरं भरायचं. एवढी ताकद मल्हाररावांच्या नावातच होती. पानीपतची लढाई मराठ्यांच्या जीवावर बेतली आणि त्याला सर्वस्वी पेशवे जबाबदार होते कारण पेशव्यांनी मल्हारतंत्र वापरले नाही. ही लढाई जिंकणारा अफगाणिस्तानचा अब्दाली मल्हाररावांच्या तलवारबाजीवर फिदा होऊन मल्हाररावांवर कौतुकास्पद लिहून जातो. पण भारतातले परिणामी महाराष्ट्रातील अतिज्ञानी जातीयवादी इतिहासकार धुरंदर लढवय्ये राजे मल्हारराव होळकरांवरती पाणीपतमध्ये झालेल्या पराभवाचे खापर फोडत बसतात. मग आम्हाला मल्हाररावांच्या गणिमीकाव्याची अर्थातच मल्हारतंत्राची जाणीव का नसावी?? आजच्या एकविसाव्या शतकात सुद्धा धनगर समाजाला खरोखरच मल्हारतंत्राची उणीव भासते आहे हे नाकारू शकत नाही.
आमचा खरा इतिहास लपवून ठेवल्याचं आम्ही वारंवार म्हणतो, इतरांना सांगतो आणि भरसभेतून  बोंबलतो आणि प्रस्तापित आणि सनातनी व्यवस्थेला दोषी ठरवतो. पण खरंच आमच्या समाजातील युवकांना इतिहासाचा अभ्यास करायची आवड आहे का?? समाजातील युवकांना इतिहास अभ्यासायची सवय आहे का?? इतिहास खरा लिहलेला असो अथवा खोटा, त्या त्या इतिहासकारांनी त्यांच्या स्वार्थापोटी लिहलेला इतिहास खरा की खोटा हे तेव्हाच समजणार जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू. पण जर लिहलेला इतिहास खोटा वाटत असेल तर मग खरा इतिहास काय आहे याचं संशोधन करून खरा इतिहास समाजासमोर मांडता येईल. पण उठ की सुठ प्रस्तापित आणि सनातनींना नावे ठेवण्यात काय अर्थ आहे?? मान्य आहे की त्यांनी आम्हावर अन्याय केला, जाणूनबुजून आमच्या पुर्वजांचा इतिहास लपवून ठेवला.पण अन्याय करणार्यांपेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार ठरतो. मग सदैव असंच अन्याय सहन करत रडत बसायचं का अन्यायाच्या विरोधात मुठ उगारायची??  आज संजय सोनवनी सर यांच्या सारख्या थोर इतिहासकारांनी "धनगरांचा गौरवशाली इतिहास" लिहून ठेवला आहे. विख्यात लेखक तथा इतिहासकार आदरनीय होमेश भुजाडे सर यांनी देखिल धनगर समाजातील महापुरुषांचा खरा इतिहास समाजासमोर ठेवला आहे. धनगर समाजातील बुद्धिजीवी वर्ग समाजप्रबोधन करण्यासाठी लेखणीरुपी तलवार घेऊन एकेकाची काळीजं चिरुन टाकावीत अशा सडेतोड शब्दात समाजाच्या अज्ञानपणावर प्रत्यक्ष अप्रत्यिक्षरित्या वार करून समाज जागृती करताहेत पण माझ्या धनगर समाजातील युवक/युवती तो खरा इतिहास आणि समाजप्रबोधनात्मक विचार कीती गांभीर्यानं अभ्यासणार, वाचणार आहेत याची शंका वाटते. कारण आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाचन करायला कोणाकडे वेळ आहे?? सर्वांकडे स्मार्ट फोन आल्याने या स्मार्ट दुनियेत वाचन करणारा युवा वर्ग फार कमी प्रमाणात आहे. या अत्याधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानाबरोबरच वाचन, चिंतन, मनन, आकलन व अवलोकन या पाच शस्त्रांचा दैनंदीन जीवनात वापर केला तर १००% आपल्या धनगर समाजातून लेखक/कवी/साहित्यिक तयार होतील, प्रत्येकामध्ये स्वाभिमानाची आग निर्माण होईल, प्रत्येकजण अन्यायाच्या विरोधात पेटून उठेल. थोर महापुरुषांचा इतिहास जर अभ्यासला तर प्रत्येकाच्या नसानसात थोर महापुरुषांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढे धनगर समाजबांधवांची होणारी ससेहोलपटही थांबेल. धनगर समाजातील सुशिक्षित युवकांनी सुरवात स्वतापासून केली तर उद्या वाड्या वस्त्या, गाव तसेच शहरातील युवा वर्ग जागृत होईल अन् अन्यायाच्या विरोधात पेटून उठेल. यासाठी समाजबांधवांनी समाजोपयोगी पुस्तकं, कथा कादंबरी वाचाव्यात कारण जर मस्तकं सुधरायची असतील तर पुस्तकं वाचली पाहिजेत. तरच उद्या धनगर समाजातील पोरं देशाचं प्रशासन आणि राज्यकारभार चालवण्या लायक बनतील, अन्यथा दोन रूपयांची कवडी देणार्या नोकर्या आणि शेळ्या-मेंढ्यांची राखन करुन अविरत भटकंती करणं आमच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. धनगर समाजातील युवकांनी थोर महापुरुषांच्या जयंत्या आज डी जे लावून साजर्या करण्यापेक्षा अहिल्यामाईंसारख्या महान जगविख्यात प्रशासक कशा होत्या, त्यांच्या विचारांचा,प्रशासनाच्या आणि राज्यकारभाराच्या कार्यपद्धतीचा आजच्या दैनंदीन जीवनात अवलंब कसा करता येईल यादृष्टीनं अभ्यास करुन त्यासंबंधी प्रबोधन केलं तर भारताचं प्रशासन धनगर समाजातील युवक/यूवती चालवतील यात काही तीळमात्रही शंका नाही.

।। जय मल्हार।। जय अहिल्या।।

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Thursday 17 September 2015

रणरागीणी वीरांगणा भिमाई होळकर


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आद्यमहिला स्वातंत्र्यसेनानी सेनानी विरांगणा भिमाई होळकर यांना पुर्वीच्या इतिहासकारांनी जाणूनबुजूण उपेक्षित ठेवलं असा आरोप करायला मला वावगं वाटणार नाही. खरंतर त्यावेळचे इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते. भारताच्या आधुनिक इतिहासामद्ये झाशीच्या राणीचा उदो उदो करून तिचा इतिहास आम्हासमोर ठेवला पण झाशीची राणी कधीच तलवार घेऊन रणांगणात उतरली नाही तर इंग्रजांशी बंड करुन झुंज देणारी  ती राणी लक्ष्मीबाई नसून  विरांगणा झलकारीबाई होती हा खरा इतिहास आहे. आणि या झलकारीबाईंना देखिल उपेक्षित ठेवायचं काम इतिहासकारांनी जाणूनबुजूनच केलेलं आहे.
दुसरा नेपोलियन बोनापार्ट म्हणून जगभर ओळखले जाणारे आणि राजा शिवछत्रपति नंतर स्वताचा राज्याभिषेक करून घेणारे महाराजाधिराज शुरवीर धुरंदर लढवय्ये राजे यशवंतराव होळकर यांना धर्मपत्नी लाडाबाई पासून १७ सप्टेंबर १७८५ कन्यारत्न झाले त्याच विरांगणेची म्हणजेच रणरागीणी भिभाई होळकर यांची आज २२० वी जयंती. पुण्यात असताना मल्हारराव दुसरे, राजे यशवंतराव व विठोजी होळकर यांच्या डेर्यावर दौलतराव शिंद्यांनी काशीरावच्या मदतीने अचानकपणे पहाटेच्या सुमारास हल्ला केला त्यात मल्हारराव दुसरे गंभीर जखमी झाले होते आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला. यशवंतराव होळकर त्या अंधार्या रात्री गर्दीतून कसेबसे बाहेर पडले होते या हल्ल्यात त्यांच्या हातातून तलवार निसटून पडली होती पण यशवंतरावांच्या मातोश्री यमुनाबाई, पत्नी लाडाबाई व कन्या भिमाई, तसेच मल्हारराव दुसरे यांचे पुत्र खंडेराव यांना शिद्यांनी कैद करून पुण्यात ठेवले. भिमाईंचे बालपण कैदेतच गेले. राजे यशवंतराव होळकर हे त्यांचे सावत्र भाऊ मल्हारराव दुसरे यांच्यावरील हल्ल्याचा बदला आणि पेशव्यांनी शनिवारवाड्यापुढे केलेल्या सख्ख्या भावाच्या म्हणजे विठोजी होळकर यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी पुण्यावर चालून आले. पुण्याच्या वाणवडी पासून हडपसर पर्यंत दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन बेभान होऊन शिंद्यांच्या सैनिकांना कापत सुटले आणि ती हडपसरची लढाई जिंकून त्यांनी मातोश्री यमुनाबाई, पत्नी लाडाबाई व भिमाई यांची सुटका केली पण ज्याच्या नावाने सुभेदारीची वस्त्रे घेऊन राज्यकारभार करायचा होता त्या मल्हारपुत्र खंडेरावांना सोबत घेऊन पेशवे कोकणात पळून गेले होते याचं दुख यशवंतरावांना होतं.
भिमाईंस वडिलांप्रमाणे म्हणजेच यशवंतरावांसासरखे घोड्यावर बसून तलवारबाजी, बाणभाले चालवायची आवड होती. कधीकधी तर फजरफटका मारण्यासाठी मुद्दामहून अट्टहास धरून भिमाई आपल्या वडिलांसोबत जायच्या. यशवंतराव होळकर पेशव्यांच्या दौलतीचा कारभार अमृतरावावर सोपवून इंदौरला निघून गेले त़च पुण्यातून पेशव्यांनी पत्र पाठवून होळकर संस्थान फिरंगी लेकसाहेबाकडे विलीन करावं असं सांगितलं होतं पण लेक साहेब नावाच्या फिरंग्याने उत्तरेत पाय पसरायला सुरवात केली होती आणि हिंदुस्थानातली अनेक संस्थाने ताब्यात घेऊन भारतावर राज्य करण्याचा फिरंग्यांचा डाव यशवंतराव होळकर ओळखून होते. पण इंग्रजांना शरण न जाता प्रत्येक लढाया जिंकत ते इंग्रजांना कापून काढायचे. कधीकधी इंग्रज अधिकारी रणांगणातून माघारी पळ काढायचे. भिमाई होळकर ही बुळे घराण्याची सून झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षाच्या आतच त्यांच्या पतीचे निधन झाले. अशा प्रकारे त्यांच्या पदरी दुख वाढून ठेवलं असताना भिमाई आपल्या वडिलांच्या सैन्यात दाखल होऊन सैन्यांचं नेतृत्व करू लागल्या. कालांतराने यशवंतरावांचे निधन झाल्यानंतर मल्हारराव (तिसरे) यांना गादीवर बसवून यशवंतरावांची दुसरी पत्नी तुळसा राज्यकारभार बघू लागल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली  विरांगणा भिमाई व मल्हारराव तिसरे हे सैन्यांचं नेतृत्व करू लागले.
महिदपूरच्या युद्धापूर्वी माल्कमने  यशवंतरावांचे सरदार गफुरखान याला फितवले व ९ नोव्हेंबर १७१७ रोजी होळकर कुटंबियांना ठार मारायचे ठरवले पण यशवंतरावांचा सुरवातीपासूनचा अनुयायी धर्मा याच्यामुळे तुळसाबाईंना ठार मारायचा माल्कमचा प्रयत्न फसला पण गफूरखानने धर्माला ठार करून त्याच्यावरच हा कट उलटवला. स्वातंत्र्यासाठी लढणार्या तुळसाचा अखेर शिरच्छेद करून माल्कमने मृतदेह नदीत फेकून दिला तिकडे महिदपूरचाया युद्धात विरांगणा भिमाई होळकर व ८ वर्षाचा मल्हारराव होळकरांच्या सैन्यांचं नेतृत्व करत सैन्यांना प्रोत्साहन देत होते त्यांचं कौतुक करताना माल्कमने लिहून ठेवलंय "आमच्या देशात असे लढवय्ये का जन्माला येत नाहीत आणि आलेच असते तर आम्ही या जगावर राज्य केलं असतं." महिदपूरच्या युद्धात होळकरांकडे पंधरा हजारांचं घोडदळ व दहा हजाराचे पायदळ होते पण ठरल्याप्रमाणे माल्कमने फितवलेल्या गफूरखानने आपले सैन्य बाजूला करून रणांगणातून पळ काढला. वाघीणीसारख्या भिमाईला फक्त ३००० पेढार्यांसोबत जीव मुठीत धरून रणांगणातून बाहेर पडावं लागलं. यशवंतराव व तुळसाबाई यांच्यानंतर भिमाई यांनी उत्तरेत इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. भिमाई लहानपणापासूनच निर्भिड होत्या त्यांच्यां डोळ्यात एक विलक्षण तेज होतं. त्या न डगमगता इंग्रजांशी लढायला सज्ज असायच्या. यशवंतराव  होळकरांप्रमाणे भिमाई सुद्दा शिस्तबद्ध आणि तोफासहित सज्ज असलेल्या इंग्रजांना वायूवेगानं कापत सुटायच्या. रणांगणात एक स्त्री सैन्याचं नेतृत्व करुन दुश्मनांना वायूवेगाने कापून काढते आहे हे पाहून माल्कम चक्क आश्चर्यानं तोंडात बोटं घालून बघत बसायचा. गफूरखानने गद्दारी केल्यानंतर विरांगणा भिमाईनं छुप्या पद्धतीनं माल्कमच्या तळावर हल्ले करून, लुटालुट करून माल्कमला अगदी हातघाईला आणलं होतं. माल्कमच्या लष्कराचा दाणागोटा लुटायच, तळावर हल्ले करायचे हे षडयंत्रच भिमाईने रचले होते. इंग्रज अधिकार्यांची पुरती दमच्छाक झाली होती. विरांगणा भिमाईनं हिंदुस्थानातील सर्व संस्थानाच्या राजांना पत्रव्यवहार करून इंग्रजाच्या विरोधात लढण्यास आवाहन केले परंतू सर्व संस्थाने इंग्रजांशी विलीन झाली होती. शेवटी भिमाई सोबत असलेले पेंढारीही माल्कमला फितुर झाले आणि त्यांनी भिमाईला कैद करून दिलं. माल्कमने अशा या रणरागीणीला तुरूंगात डांबून खून केला. रणांगणात कधीही भिमाईला इंग्रज हारवू शकले नव्हते अशा एका स्त्रीला कैद करून ठार मारणं याला कोणतं पौरूषार्थ म्हणायचं?? पण शेवटपर्यंत ही वाघिणी, रणरागीणी हातात तलवार घेऊन स्वातंत्र्यासाठी लढत राहीली. होळकरशाहीची दौलत ही रक्त सांडून मिळवलेली होती ती भिमाईंनी रक्त सांडेपर्यंत हातातून जाऊ दिली नाही. आजच्या भारतदेशवाशीयांना आध्यमहिला स्वांतंत्र्यसेनानी वीरांगणा भिमाईचा खरोखरच विसर पडला आहे ही  सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. आज अशा या विरांगणेला २२० व्या जयंतीनिमीत्त मानाचा मुजरा व विनम्र जय मल्हार!!
जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।
जय यशवंत!! जय वीरांगणा भिमाई!!!

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Wednesday 16 September 2015

हक्कासाठी सघर्ष...एक कट्टर धनगर

हक्कासाठी संघर्ष...एक कट्टर धनगर
काल परवाची "समजेना हक्क मागतोय की भिक??" ही पोस्ट आज महाराष्ट्रभर फिरत आहे. मी स्वत: धनगर समाजातील व्हाटसपच्या ५१५ ग्रुपवरती आहेच आहे त्याप्रमाणे व्हाटसप च्या अन्य ग्रुपवरतून, ब्लॉग्स आणि फेसबूक च्या माध्यमातून ही पोस्ट लाखो समाजबांधवांपर्यंत पोहचली. परवापासून मला हजारोंच्या वरती समाजबांधवांनी फोन केले आणि माझे अभिनंदन केले. व्हाटसपद्वारे तसेच फेसबूक वरतुन देखिल समाजबांधवांनी कौतुक करून सत्य परिस्थिती असल्याचं सांगितलं. खरंतर मला माझं कौतुक करवून घ्यावयाचे नाही, मला कोणाची शाबासकी मिळवायची आहे अथवा मला प्रसिद्धी मिळवायची आहे अशातला विषय नाही. समाजकार्यासाठी प्रोत्साहन देणं गैर नाही त्यामुळे खरंतर सर्वांचे मी आभार मानतो. पण माझी तळमळ आणि माझा संघर्ष हा माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी व प्रसिद्धीसाठी नसून सर्व तळागळातील धनगर समाजबांधवांसाठी आहे. धनगर समाजातील नेत्यांचा मला खरोखरच अभिमान वाटतो आणि धनगर समाजातून जास्तीत जास्त युवक राजकारणात कसे पुढे येतील त्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असतो. कोणत्याही नेत्यांच्या विरोधात लिहावं असं मला मुळीच वाटत नाही पण समाजाच्या न्याय व हक्कासाठी सर्व नेत्यांनी एकत्रित यावं आणि संघटित होऊन संघर्ष करावा यासाठी मी समाजप्रबोधन करतोय. जर नेत्यांना समाजाशी काही घेणं देणं नसेल आणि ते संबंधित नेते धनगर समाजाचा फक्त त्यांच्या स्वार्थासाठी वापर करत असतील तर त्या त्या माजलेल्या नेत्यांचे कपडे फाडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आज महाराष्ट्रात धनगर समाजाच्या अनेक संघटना उदयास येवू लागल्यात. सामाजिक संघटन असायला पाहिजे त्याबद्दल माझं काही दुमत नाही. पण एखाद्या समाजबांधवांवरती अन्याय होत असताना, समाजातील आई-बहिणींवरती अत्याचार होत असताना त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जर तुमच्या संघटना पुढे येत नसतील तर मग जाळायला संघटना काढल्यात का?? गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाजावरती अन्याय होत आला आहे आणि आजही होतोय. पण धनगर समाजाच्या नावावरती काढण्यात आलेल्या संघटना स्वार्थासाठी चालवल्या जात आहेत असा आरोप करायला मला काही वावगं वाटणार नाही. जर तुमच्या संघटनेचं उद्दिष्ट हे समाजाच्या हितासाठीचंच असेल तर मग राज्य पातळीवर आणि राष्ट्र पातळीवर सर्व संघटना व त्यांचे पदाधिकारी यांनी एकत्रित येवून चर्चा, विचार-विनीमय करावा. अन्यथा स्वताचिच जाहिरातबाजी अन् बैनरबाजी करून तुमच्या स्वार्थासाठी समाजाचा वापर तुम्ही करायचा प्रयत्न करत असाल तर ते होऊ देणार नाही. समाजाचं बाजारीकरण करून समाजाला लांडग्यांच्या अर्थातच प्रस्थापितांच्या दावणीला नेऊन बांधायचा प्रयत्न कराल तर त्या बाजारबुणग्यांचा समाचार घ्यायला मी खंबीर आहे अन् त्यांना राजकीय संन्यास घ्यायला लावून घरात बसवल्याशिवाय शांत बसणार नाही. आज व्हाटसप फेसबुक वरतुन पाहायला भेटतंय की जो तो उठतोय अन् म्हणतोय मी मी धनगर समाजाचा नेता आहे. समाजातून नवनवीन नेते उदयास येताहेत त्याबद्दल काही वाद नाही पण प्रत्येकाने अखंड धनगर समाजाचा नेता म्हणवून घेणं म्हणजे समाजात विभाजन करत असल्याचं चित्र दिसून येतंय. जर समाजात विभाजन करायचं नसेल तर त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या विभागातून तालुक्याचे, जिल्ह्याचे नेतृत्व करून राज्यपातळी अन् राष्ट्रपातळीवरती एकत्रित यावे तरच समाज संघटित झाल्याचं दिसून येईल. अन्यथा प्रत्येकजण आरक्षणाचं श्रेय आपल्याच पारड्यात पडावं म्हणून उपद्व्याप करत बसला तर पुढच्या १०० पीढ्या जरी बरबाद झाल्या तरी आरक्षण मिळणार नाही हे सुद्धा तितकच सत्य आहे. यासाठी धनगर समाजातील पोटजाती बाजूला ठेऊन, धनगर समाजाच्या नेत्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता आजी/माजी आमदारांनी एकत्रित येऊन चर्चा करावी आणि एखादा दिवस निश्चित करून नागपूर विधानभवनावर "विराट जन आंदोलन" उभा करावं. २५००००० लाखांच्या वरती धनगर समाजाला नागपूर विधानभवनावर एकत्रित आणायची जबाबदारी माझी राहील पण वेगवेगळे मोर्चे आयोजित करून राजकिय पोळी भाजून घ्यायचा तुमचा डाव हाणून पाडल्याशिवाय सोडणार नाही अर्थातच तुमचा स्वार्थापोटीचा मोर्चा यशस्वी होऊ दिला जाणार नाही. ही विनंती समजा नाहीत धमकी. कारण प्रस्तापितांची खेळी आहे की तुम्ही वेगवेगळे मोर्चे आयोजित करून समाजात विभाजन घडवून आणावं जेणेकरुन धनगर समाजाला आपल्या ध्येयापर्यंत सहजासहजी पोहचता येणार नाही. हे प्रस्तापितांचे राजकारण आज तरी समजून घ्या तुम्ही वेगवेगळे मोर्चे काढून जर विधानभवनावर गेला तर आपलंच हसू होईल यासाठी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एकाच दिवसी संघटितपणे निश्चित केलेला मोर्चा यशस्वी होण्यासाठी प्रत्येक समाजबांधव प्राणपणाने कार्य करेल पण वेगवेगळे मोर्चे जर विधानभवनावर घेऊन जात असाल तर तुमच्या स्वार्थीपणाचं उद्दीष्ट कधीही साध्य होऊ देणार नाही.

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Sunday 13 September 2015

समजेना हक्क मागतोय की भिक...??


आज आम्हाला खरंतर लाज वाटायला पाहिजे अरे जग जिंकायला निघालेल्या सिकंदराला भारत जिंकण्यापासून परावृत्त करणार्या आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या जातीत जन्माला आलेल्या तुम्ही-आम्ही औलादी, आशिया खंडावर अधीपत्य गाजवणार्या राजा सम्राट अशोकांचे तुम्ही-आम्ही वारसदार, अटकेपार झेंडे फडकवणारे धुरंदर लढवय्यै राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी अहिल्यामाई होळकर, महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर, वीरांगणा भिमाई होळकर अशा थोर पुरुषांचे मर्द मावळे आणि ज्यांनी आई-बहिणींच्या रक्षणासाठी अन्यायाविरोधात कुर्हाड उगारून तब्बल ३५ खून करून १४ वर्ष तुरूंगवास भोगला तरी आजही निर्दोष असलेल्या त्या बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरु वाटेगावकर म्हणजेच आमचे लाडके आप्पा आणि धनगर समाजाला जागं करुन आमच्या हातात क्रांतीची मशाल देणारे यशवंत सेनेचे संस्थापक स्व. बी के कोकरे साहेब यांच्याच जातीत जन्माला आलेल्या तुम्ही-आम्ही औलादी आज अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आज प्रस्तापितांकडे भिक मागत बसलोय याची आम्हाला खरंतर लाज वाटायला पाहिजे.
आमचे पुर्वज, थोर महापुरुष जर वरतून आमच्या नेत्यांच्या आणि समाजबांधवांच्या असल्या या पोरकट लीला बघत असतील तर कदाचीत वरतून थुंकत असतील ते आमच्यावर... त्यांनाही खेद वाटला असेल अरे कोणत्या समाजात आपण जन्माला आलो  म्हणून डोकं फोडून घेत असतील. अरे ज्यांना आपल्या न्याय व हक्कासाठी संघटित होऊन एकत्रितपणे लढता येत नाही झगडता येत नाही त्यांना अशा थोर महापुरुषांचे वारसदार म्हणायचं तरी कसं? " मल्हार आया मल्हार आया म्हटलं तर अफगाणीस्तानच्या अब्दालीला देखिल कापरं भरायचं. दुश्मनांचे डेरेच्या डेरे ओस पडायचे, तोंड कुठ लपवायचं हे शत्रुंना समजत नव्हतं अशा मल्हाररावांचे मावळे आम्ही... त्याचप्रमाणे "हे राज्य माझ्या पुर्वजांनी तलवारींशी खेळून प्रसंगी रक्त सांडून मिळवलेलं राज्य आहे. आणि मला एक अबला स्त्री समजून हे राज्य जर तुम्ही स्वताच्या घशात घालायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला साखळदंडाने बांधून हत्तीच्या पायी देईन नाहीतर सुळावर लटकवेल ....तरच मी मल्हारराव होळकरांची सून." अशा निर्भीड शब्दांत पेशव्याला खडसवणार्या अहिल्यामाईंचे मर्द मावळे म्हणवून घ्यायला आज आम्हाला लाज वाटायला पाहिजे.
अरे आज एवढं षंढ झालात तरी कसे?? कुठे गेला तो आमचा मल्हारी बाणा?? नुसत्याच महापुरूषांच्या जयंत्या आणि पुणतिथ्या साजर्या करत बसायचं का?? नुसतंच महापुरुषांच्या फोटोंची जंगी मिरवणूक काढून लाखो रुपये उधळपट्टी करुन धांगडधिंगा घालायचे धंदे आतातरी बंद करा. महापुरुषांचे विचार त्यांचा इतिहास आणि त्यांचे कार्य डोक्यात घालायला शिका. महापुरुषांचे अनुकरण करायला शिका. Ahilyadevi Holkar was the great administrator of the 18th century असं आम्हाला ब्रिटीश पार्लमेंटने सांगितलं, पण याच मातीत अहिल्यामाईंच्या मावळ्यांची दखल इथलं जातीवादी प्रशासन घेत नाही.  त्याच उत्तम राज्यकर्ती आणि उत्तम प्रशासक असलेल्या अहिल्यामाईंचे वारसदार आजच्या प्रशासनात आणि जिथे कायदे बनवले जातात तिथं नाहीयेत ही एक सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. आज धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून तहसीलदारला निवेदन द्यायला गेलं तर तो तहसीलदार त्या निवेदनाला केराची टोपली दाखवतो. मग कायद्यानुसार राज्यघटनेत दिल्याप्रमाणे धनगर समाजाला न्याय व हक्क मिळत नसतील तर मग आम्हाला लढायला पाहिजे झगडायला पाहिजे. जर प्रशासन आणि माजलेलं सरकार कायद्याप्रमाणे आणि राज्यघटनेप्रमाणे राज्यकारभार करत नसेल तर मग आम्ही का म्हणून कायदे पाळायचे?? आमच्या हक्काचं आम्हाला दिलं जात नसेल तर मग आम्ही का गप्प बसायचं.?? गप्प बसण्याइतपत आता आम्हाला *** औलाद समजू नका. कायदे हातात घ्यायला आता आम्हाला वेळ लागणार नाही. आता जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुमचे कायदे आमच्या आडवे आणू नका आणि आणायचे असतील तर तुम्ही अगोदर कायद्याप्रमाणे वागा. तरच आमच्या वाटेला जा नाहीतर मग तुमच्या वाटेवर येवून तुमची वाट लावल्याशिवाय या धनगराच्या औलादी कदापी शांत बसणार नाहीत. आम्हाला आमचे हक्क मागून मिळत नसतील तर आम्ही हिसकावून घेऊ.
७ डिसेंबर २०१५ पासून नागपूर विधानभवनात हिवाळी अधिवेशन पार पडणार असून धनगर समाजातील स्वार्थी नेत्यांनी वेगवेगळे मोर्चे आयोजित करून धनगर समाजाचं विभाजन करायचं ठरवलंय. कोणी ८ डिसेंबरला मोर्चा काढायचं म्हणताहेत तर कोणी १० डिसेंबरला तर कोणी अजून तळ्यात-मळ्यातच करत बसलेत. म्हणजे "धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा" ही म्हण सार्थ कराण्यासाठी धनगर समाजातील काही स्वार्थी नेत्यांनी जणू काय सुपारीच घेतलेली दिसते आहे. धनगर समाजातील सर्व नेत्यांना/संत्र्यांना/मंत्र्यांना आजी/माजी आमदार असतील नाहीतर कोणी जहागिरदार असतील त्यांना सांगायचं आहे की बाबांनो तुम्ही वेगवेगळं मोर्चे आयोजित करून स्वताच्या स्वार्थासाठी धनगर समाजाचं विभाजन करत बसाल तर संपूर्ण धनगर समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे. आजकाल व्हाटसपवर वेगवेगळ्या पोस्ट फिरताहेत त्यात प्रत्येकजण म्हणतोय नागपूर विधानभवनावर निस्वार्थीपणाणे आमुक-आमक्याच्या अन् तमुक-तमक्याच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजबांधवांचा भव्य मोर्चा. पण कोण कशासाठी मोर्चा काढतंय ?? हे आम्हाला चांगलंच माहित आहे आम्हाला शिकवायचा कोणीही प्रयत्न करू नका. जर तुम्ही निस्वार्थीपणे मोर्चा काढत असाल प्रत्येक संघटनेच्या पदाधिकार्यांशी तुम्ही कधी चर्चा केलीत का?? ज्या आजी/माजी आमदारांनी मोर्चा काढायचं ठरवलंय त्यांनी राज्यभरातील कीती जिल्ह्यातील धनगर समाजाच्या नेत्यांसोबत बैठका आयोजित करुन चर्चा केली?? उद्या डिसेंबर मध्ये नागपूर विधानभवनावर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मोर्चा काढायचा असेल तर नेत्यांनीही आणि संघटनेच्या पदाधिकार्यांनीही एकत्रित येऊन चर्चा विनीमय करावा आणि एकच कोणतातरी दिवस निश्चित करावा अन्यथा समाजाच्या नावावर स्वताची राजकिय पोळी भाजून मलिदा खायचा धंदा बंद करावा. धनगर समाजातील आजी/माजी आमदार असतील अथवा कोणत्यातरी एखाद्या सघटनेचे नेते पदाधिकारी असतील त्यांना मी नितीनराजे अनुसे ओपन चैलैंज करतो की नागपूर विधानभवनावरील "विराट जन आंदोलन" उभे करून यशस्वी करायचे असेल सर्वांशी चर्चा करा सर्व संघटनेच्या पदाधिकार्यांना चर्चेत घेऊन कोणत्यातरी एखाद्या संघटनेचे नाव अन् झेंडा न घेता एकच दिवस निश्चित करुन सर्वांना सोबत घेऊन चला तरच पाच लाखांच्या (५०००००) ऐवजी  पंचवीस लाखांच्या (२५००००० ) वरती धनगर समाजबांधव एकत्रित आणायची जबाबदारी माझी. अन्यथा २३ मार्चच्या मोर्चासारखी अवस्था करायचं ठरवलं तर तुमच्या नातेवाईकांव्यतिरीक्त तुम्हाला हाजरीनं लोकं जमवावी लागतील अणि सच्चे स्वाभिमानी समाजबांधव घरातून बाहेर सुद्धा पडणार नाहीत याची दखल घ्यावी. मग समाजात एकी करायची का बेकी करायची हे धनगर समाजातील नेत्यांनी ठरवायचं आहे. धनगर समाजातील नेत्यांच्या मागं मागं पळाणारा आता भोळा समाज नाही राहिला तर समाजप्रबोधनातून सक्षम आणि समर्थ समाज घडवतोय तो धनगर समाजातील नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.
कळावे.
जागो उठो संघर्ष करो।👊
अपने हक हासिल करो।✊
जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Wednesday 9 September 2015

👉धनगर समाजाच्या आरक्षणाचे राजकारण


"धनगर" जमात ही आदिम काळापासूनची जमात असून आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकिय या क्षेत्रात अतिशय मागासलेली जमात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत १९५० साली धनगर समाजाचा सामावेश अनुसुचित जमातीच्या कलम ३४२ वरती महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अ.क्र.३६ वरती केलेला आहे. पण "धनगर" या शब्दाचा हिंदी शब्द प्रयोग "धनगड" असा झाल्याने प्रस्थापित व्यवस्थेने या समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळू दिल्या नाहीत. यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष स्व. बी के कोकरे साहेबांनी सातारा-पुणे हायवेवरती असलेल्या खंबाटकीच्या घाटात लाखो यशवंत सैनिकांना सोबत घेऊन तीव्र रास्तारोखो आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दखल घ्यावी लागली पण धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात अशी मागणी असताना शरद पवारांनी माजी मंत्री स्व शिवाजी बापूंना हाताशी धरून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाला वाटाण्याच्या अक्षता दावल्या. दुधाची तहान ताकावरती भागवण्याचं राजकारण पवारांनी केलं आणि धनगर समाजाला स्वतंत्र सुचि बनवून  फक्त महाराष्ट्रापुरतं भटक्या जमाती (क) (एन.टी. क च्या) यादीत टाकलं. पण राज्यघटनेत दिल्याप्रमाणे आमच्या हक्काच्या  केंद्र शासनाच्या अनुसुचित जमातीच्या सवलती धनगर समाजाला मिळू दिल्या नाहीत. त्यामुळे धनगर समाजातील हजारो मुलं-मुली आय ए एस / आय पी एस होण्यापासून वंचित राहिली इंजीनीयर, डॉक्टर, वकिल बणन्याऐवजी लाखो पोरं शेतीकडे वळली आणि शेळ्या-मेंढ्या राखू लागली . धनगर समाजासाठी येणारा दरवर्षीचा कोट्यवधी रुपयांचा निधी घशात घालायचं काम त्या प्रस्तापितांनी केलं असताना धनगर समाजितले लाचार नेते आणि  माझा अज्ञानी असलेला धनगर समाज बांधव आजही त्यांच्या पाठीमागेच जातोय याचंच दुख वाटतंय.
आजही पवारांनी समाजातील दलालांना जवळ करून आरक्षणाचं गाजर दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे पण आदिवाशी समाजाच्या नेत्यांना विरोध करण्यास सांगून आदिवासी बांधव आणि धनगर समाजात भांडण लावायचा प्रकार शरद पवार करताहेत आजचा तरी धनगर समाजातील युवा वर्ग जागृत, सुशिक्षित आणि सुज्ञ असल्यामुळे शरद पवारांच्या बळीचा बकरा कोणी बनणार नाही हे मात्र निश्चित. धनगर समाजाला अनीसुचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी धनगर समाजातील बुद्धिजीवी वर्ग कायदेशीर लढा देण्यास सक्षम असतानाच रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी धनगर समाजातील युवा वर्ग पेटून उठला आहे. धनगर समाजातील सर्व संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी एकत्रित येवून विचार विनीमय करून नागपूर विधानभवनेवरील जन आंदोलनाचा कोणतातरी एक दिवस निश्चित करावा. धनगर समाजातील नेत्यांनी वेगवेगळे मोर्चे आयोजित करून धनगर समाजाची दिशाभूल करणे, धनगर समाजाचं विभाजन करणे अथवा धनगर आरक्षणाचे श्रेय लाटण्याचे असले धंदे बंद करावेत. मला कोणत्या नेत्याच्या विरोधात बोलून स्वतावरती रोष ओढवून घ्यायचा नाही. पण आज धनगर समाज एकत्रित येत असताना जर त्यामध्ये विभाजन करून स्वताची पोळी भाजायचे तुमचे राजकारण असेल तर माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा अजिबात वापर करू नका. तुम्ही मिडीया विकत घ्याल पण आमच्याकडे सोशल मिडीया आहे त्यामाध्यमातून आम्ही जनजागृती करून समाजाला योग्य न्याय द्यायचा प्रयत्न करू. आजपर्यंत धनगर समाजातील नेत्यांनी समाजाचं पार वाटोळं केलं आहे पण इथूनपुढंही माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचं जर वाटोळं करायचं तुम्ही ठरवलं असेल तर मग आम्हाला तलवरी हातात घ्याव्या लागतील ही धमकी समजा नाहीतर चेतावणी.
धनगर समाजातील काही नेत्यांनी प्रस्तापितांसोबत विधानभवनावर मोर्चा काढायचं ठरवलंय पण त्यागोदर काही दिवसापुर्वी धनगर समाजातील काही संघटनांनी जन आंदोलनाचा दिवस निश्चित केला असताना धनगर समाजातील नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने वागू नये. त्या त्या नेत्यांनी सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांशी चर्चा करावी. आजपर्यंत तुम्ही समाजासाठी काही चांगलं काम केलं असेल आणि समाजाचं वाटोळंही केलं असेल पण आता तुमची संधी संपली. चालायचं असेल तर समाजासोबत चला नाहीतर घरात बसून गप्प राहा पण माझ्या धनगर समाजात विभाजन करू नका. नाहीतर आम्ही पण शुरवीर लढवय्ये राजे यशवंतराव होळकरांचे वारसदार आहोत मग आम्हाला आमच्या औकातीवर यायला फार वेळ लागणार नाही. आजचा युवा वर्ग पेटला तर एकेकाला पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आरक्षण मिळाल्यानंतर अनुसुचित जमातीच्या सवलतीमधून आमदार/खासदार बनण्यासाठी राजकारण करा पण आज आरक्षणाचं राजकारण करू नका. एकत्रित येवून लढा द्या.
जागो उठो संघर्ष करो।👊
अपने हक हासिल करो।✊
जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
👉nitinrajeanuse.blogspot.com
👆👆👆👆👆👆👆👆👆👆