Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday 13 August 2019

समाजासाठी आक्रमक होऊन नेहमीच आंदोलन करणारे सुरेश होलगुंडे,शांततेच्या मार्गाने उपोषण करत जीवाची बाजी लावताहेत, सुरेश होलगुंडे आणि सर्व उपोषणकर्त्यांंना सलाम.....

महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश(भाऊ) होलगुंडे


            समाजाच्या न्याय व हक्कासाठी आमदार-खासदारांच्या गाड्या आडवणारे, न्याय व हक्कासाठी भांडणारे महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश(भाऊ) होलगुंडे हे एक हसतमुख चेहऱ्याचे व्यक्तिमत्त्व असून धनगर आरक्षण लढ्यातील एक संघर्षमय नेतृत्व सुद्धा आहे. १४ ऑगस्ट २०१४ रोजी धनगर आरक्षण संदर्भात महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले सुरेश(भाऊ) होलगुंडे हे निस्वार्थीपणे या आंदोलनात धनगर समाजाचे नेतृत्व केले होते. याच धनगर समाजाच्या आंदोलनात मुंबईची Life Line अर्थातच जीवन रेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे आडवण्यात मा.सुरेश भाऊ यांचा सिंहाचा वाटा होता. अधिवेशन काळात विधानभवनाला घेराव घालून प्रत्येक आमदारांना गुलाब पुष्प देत आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज उठवण्याचे गांधी मार्गाने केलेल्या आंदोलनात शिवाय त्यानंतरच्या अधिवेशन काळात विधानसभेत घुसून सरकार विरोधात आरक्षणाच्या घोषणा देऊन यळकोट यळकोट जय मल्हार चा गजर करण्यात देखील ते हिरारीने सहभागी झाले होते. धनगर आरक्षण संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मधुकर पिचड याचा निषेध करत राष्ट्रवादी भवनावर जे आंदोलन झाले होते त्यातही मधुकर पिचड च्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलनात मा.सुरेश भाऊ होलगुंडे सहभागी होते. अशा एक ना अनेक आंदोलनात मोर्चात सहभागी होऊन समाजहितासाठी निस्वार्थीपणे कार्य करणारे नेतृत्व, गावभागातून मुंबई मध्ये येणाऱ्या तरूणांना मार्गदर्शन तथा मदत करणाऱ्या सर्वच जाती-धर्मातील युवकांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा सांभाळणाऱ्या महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश(भाऊ) होलगुंडे यांच्या नेतृत्वाखाली पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र यशवंत सेनेच्या शिलेदारांनी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आणि पुरंदरच्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी विधानभवनाच्या प्रांगणात गोंधळ घालून घोषणाबाजी केली होती त्याच महाराष्ट्र यशवंत सेनेचे प्रमुख मा.सुरेश (भाऊ) होलगुंडे हे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पंढरपूर येथे सलग पाचव्या दिवशीही सहकाऱ्यांसह केवळ आणि केवळ समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अन्न त्यागून आमरण उपोषणात ते देखील कोणत्याही उपचाराशिवाय बसले आहेत. सुरेशभाऊ सलाम तुमच्या कार्याला
        सरकार या आंदोलनाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असले तरी धनगर समाजाने आणि समाजातील नेत्यांनी गांभीर्याने लक्ष घालून त्या ९ योद्ध्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123

Sunday 11 August 2019

लढाई हक्काच्या आरक्षणाची... ✍️नितीनराजे अनुसे

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषणास बसलेले वाघ

   भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे होत आली तरी राज्यघटनेने बहाल केलेला घटनादत्त अधिकार अर्थातच धनगर जमातीच्या हक्काचे अनुसूचित जमातीचे आरक्षण आजपर्यंत समाजाला मिळू शकले नाही हे भारत नावाच्या महा'राष्ट्रा'तील सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. वर्षानुवर्षे इथल्या प्रस्थापित औलादी आश्वासने देऊन, धनगर समाजाच्या मतांच्या जोरावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर पुन्हा त्याच समाजाची ससेहोलपट करतात हे कधीपर्यंत चालायचं?
        आजपर्यंत जे झाले गेले ते इतिहासात जमा झाले परंतु इथून पुढे तरी सर्वांनी कंबर कसून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लढायला सज्ज व्हायला हवे. नाहीतर धनगर समाजाची आणि समाजातील नेत्यांची "एक ना धड भाराभर चिंध्या" अशीच अवस्था होईल.  धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र हवे आहे जेणेकरून पुढच्या पिढ्या तरी स्वाभिमानाने जगतील नाहीतर आजच्या पिढीच्या तोंडात शेण घालायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाले तरच समाजाची प्रगती होऊ शकते. १००० कोटी रूपयांचे गाजर दाखवून धनगर समाजाची बोळवण केली जात आहे जे राज्यघटनेत नाही.
        जुलै २०१४ च्या बारामतीच्या आंदोलनात तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आजचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते ते फडणवीस यांनी पाळले नाही उलट पुन्हा अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अन्य आश्वासनांचे, सवलतींचे गाजर दाखवले आहे त्याविरोधात ९ ऑगस्ट या क्रांतीदीवशी धनगर समाजातील पांडुरंग मेरगळ (दौंड), सुरेश होलगुंडे(मुंबई), विजय तमनर (राहुरी), सतीश झंजे(माळशिरस), प्रकाश थाडके (नांदेड), धनाजी बंडगर (सांगोला), गंगाप्रसाद खारोडे (हिंगोली), राजेंद्र तागड (अ.नगर) आणि नागुराव बारसे(नांदेड) ९ लढवय्ये पंढरपूर येथे आमरण उपोषण करत आहेत. धनगर समाजाला आणि समाजातील प्रत्येक नेत्यांना, कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की त्या ९ योद्ध्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. आजच गंगाप्रसाद खारोडे या उपोषणकर्त्यास पोलिस जबरदस्तीने उपचारासाठी घेऊन गेले त्यावरून असे दिसते आहे की हे आंदोलन चिरडण्यासाठी फडणवीस सरकार प्रयत्न करत आहे परंतु जोपर्यंत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवायची जबाबदारी तुमची आमची आहे. त्यासाठी पेटून उठणे ही काळाची गरज आहे अन्यथा भविष्यात कोणीही धनगर समाजाची दखल घेणार नाही हे लक्षात ठेवा.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123