Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday 30 July 2016

मी समाजकार्य का करतोय? भाग-२

मी समाजकार्य का करतोय? भाग-२
भाग-१ वरतून क्रमश: http://nitinrajeanuse.blogspot.in/2016/07/blog-post.html?m=1
2. स्वार्थासाठी/मुलींसाठी आई बापाला सोडणाऱ्या औलादी अशी माझी बदनामी केली जातेय.
खरंतर ही जी टीका आहे ती हास्यास्पदच म्हणावी लागेल. बांधवांनो समाजकार्य करणारा प्रत्येक समाजप्रबोधक असो अथवा नेता असो तो समाजासमोर ठेवलेला एक आरसा असतो आणि त्या आरशासारखा तो वागत असतो. तो समाजप्रबोधक/नेता काय करतो? कसा वागतो? कुठे जातो? याकडे सर्व जनतेचे लक्ष असते. मग तो समाजप्रबोधक/नेता इतरांनी टीका करावी बदनामी करावी असा एकही पाॅइंट पाठीमागे ठेवत नाही. मग त्या टीका करणाऱ्या नालायकांना जरातरी अक्कल पाहिजे होती मी असा कोणता मुद्दा पाठीमागे सोडेल का.???  मी  कोणत्यातरी मुलीसाठी/स्वार्थासाठी आई-वडिलांना सोडले अशा पद्धतीने माझ्या चारित्र्यावर शिंताड्या उडवल्या. अरे असे लिहण्यागोदर कमीत कमी माझ्या घरी येऊन माझ्या आईवडिलांची विचारपूस  तरी करून जायला हवं होतं, घरी राहिले माझ्या गावात/तालुक्यात येऊन चौकशी करायला हवी होती तेव्हा तुला कळलं असतं अन् माझ्याबद्दल हे असं लिहायला तेव्हा तुला लाज देखील वाटली असती. अरे खऱ्या जन्मदात्या बापाऐवजी तु ज्या नेतृत्वाला तुझा बाप म्हणतोय कमीत कमी त्या बापाला तरी विचारायचे होते तो तुझा बाप माझ्या मातोश्रींना "आई" म्हणत तिच्या हातचे जेवण जेऊन गेला. बापाच्या नात्याने त्यांनी तुला सांगितले असते की नितीनराजे अनुसे कोणासाठी आई-वडिलांना सोडणारी/विसरणारी औलाद नव्हे. पण  मला समाजकार्यापासून परावृत्त करणाऱ्या हिजड्या प्रवृत्तीच्यांनो तुमच्यात जर धमक असेल तर समाजासाठी काम करा, तुमच्यात जर हिंमत असेल तर निस्वार्थीपणाने काम करा पण माझ्यावर टीका करायला मुद्दा सापडत नाही म्हणून माझ्या चारित्र्यावर विनाकारण शिंताड्या उडवायचा प्रयत्न करत असाल आणि मला बदनाम करायचं षड्यंत्र रचत असाल तर तो तुमचा हांडगापणा झाला.
3. १००-२०० रुपयांसाठी बाप बदलणाऱ्या औलादी अशीही माझ्यावर टीका केली जाते.
जो माझा जन्मदाता आहे तोच माझा बाप आहे माझ्या बापाची जागा दुसरं तिसरं कोणी घेऊ शकत नाही. एखादं नेतृत्व नालायक असेल, निष्क्रिय असेल, समाजाचा वापर करून स्वार्थ बघत असेल तर ते नेतृत्व अवश्य बदलायला हवं नाहीतर समाजाचं वाटोळं होईल. तुमची प्रवृत्ती अशी आहे की जो नेतृत्व करतो त्यालाच तुम्ही बाप मानता मग जन्मदात्याला काय म्हणतां कोणास ठाऊक?? असो ज्या नेतृत्वाला तुम्ही बाप मानता त्या बापाला  जाऊन विचार ज्यावेळी संघटना स्थापन केली आणि संघटनेला निधी गोळा करायचा विचार झाला तेव्हा सुरवातीपासून सात-आठ जणांमद्ये फाऊंडर मेंबर हा नितीनराजे अनुसे सुद्धा एक होता जो स्वताच्या पगारामधील दर महिन्याला हजार हजार रुपये वर्गणी देत होता. तेव्हा तो तुमचा बाप बाहेर संघटनेसाठी  दौरे करत होता. आज नितीनराजेंनी त्यांच्या चेहऱ्यावरचा चढवलेला खोटा मुकूट बाजूला केला, समाजासमोर तुमचा (निस्वार्थीपणाचा) बुरखा फाडला तेव्हा तुमच्या पायाखालची वाळू सरकली मग समाजात माझी बदनामी करायची म्हणून १००-२०० रुपयांसाठी नितीनराजे नेत्यांच्या मागे फिरतो असे लिहतां सांगता तर मग १ रुपयांसाठी जरी नितीनराजे एखाद्या नेत्यांच्या मागे पळालाय असा महाराष्ट्र राज्यात एकतरी नेता दाखवा मी तुमच्या टांगेखालून जातो. असा एकतरी नेता दाखवा ज्यांच्याकडे मी स्वार्थासाठी गेलोय.. लिहायचं स्वातंत्र्य दिलंय म्हणून बायल्यांसारखं उगाच काहीतरी लिहीत बसू नका समाज हसतोय तुमच्यावर याचं भान राखा. शेंबड्या पोरांचं सोडून द्या काहीही लिहीत बसताहेत अशिक्षित अर्धवट कुठले... पण कमीत कमी त्या मानलेल्या बापाला तरी अक्कल पाहिजे होती की पोरांवर चांगले संस्कार करावेत नाहीतर त्याला बापच जबाबदार राहतो आणि लोकं सुद्धा बापालाच नावं ठेवतात.
            बांधवांनो एवढंच नव्हे तर काही बहाद्दरांनी मला धमक्या देणे वार्नींग देणे असले प्रकार केले. नितीनराजेंना मुंबईत फिरू देणार नाही, सातारा मद्ये फिरू देणार नाही, हात पाय काढेल असल्या धमक्या त्या प्रस्तापितांच्या नव्हे तर माझ्याच धनगर समाजबांधवांच्या??? अरे काय तुमच्या बापाचं राज्य आहे का?? इथे दंडिलशाही नाही लोकशाही आहे याचं भान राखा.... पण मी असल्या फालतुक दादांच्या धमक्यांना जुमानत नाही आणि तुम्हाला धमक्या द्यायची माझी प्रवृत्ती नाही. तो काळ होता समाजावर अन्याय करणाऱ्या प्रस्तापित पवार पाटील देशमुख ठाकरे यांच्या विरोधात लिहायचं म्हटलं की त्यांची पॅंट ओली व्हायची, पाठीमागे आरक्षण लढ्यादरम्याण धनगर समाजाचा शत्रु असणाऱ्या सर्व प्रस्तापित पवार पाटील देशमुख ठाकरे यांच्यावर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी बेधडकपणे सडेतोडपणे लिहीत होतो तेव्हा आज कुठेतरी तरून पोरं डेरींग करून लिहायला लागली पण त्यातील काही दुसऱ्याला बाप माननारी ही शेंबडी कार्टी टांग वर करायला लागले याचेच वाईट वाटते. खरंतर मला हे लिहायचे नव्हते असल्या फालतु टीकेला प्रत्यूत्तर देत बसायचे नव्हते, भरपूर जणांनी मला फोन करून विचारले की नितीनराजे तुमच्यावर टीका होतेय पण तुम्ही बोलत का नाही?? प्रत्यूत्तर का देत नाही?? पण एका पत्रकाराने मला मोठ्या भावाच्या नात्याने सल्ला दिला होता की टीका वगैरे आणि प्रत्यूत्तर देत बसू नकोस समाजप्रबोधन चालूच ठेव. भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष्य देऊ नकोस तर त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांसाठी बिस्कीट फेकून पुढे चल पण दगड मारू नकोस, नाहीतर फुकटचा वेळ वाया जाईल पण माफ करा मला मी शांत राहून बघितले, एकदा पाहिलं दोनदा पाहिलं पण हे अति व्हायला लागलं, आपणच समाजप्रबोधन करत असताना असल्या फालतु गोष्टींमद्ये वेळ घालवणे यांत काही अर्थ नव्हता म्हणूनच गप्प राहिलो होतो, समाजप्रबोधन चालूच होते, अन्याय व अत्याचार याविरोधात आवाज उठण्यासाठी जवळजवळ साडेआकराशे व्हाटसप ग्रुप, फेसबुक अकौंटस, फेसबुक पेजेस, ब्लाॅग्ज या सोशल मिडीयाच्या माद्यमातून शक्य तेवढे प्रबोधन करतच होतो आजही करत आहे त्यात खंड पडू देणार नाही. पण जर कोणी विनाकारण माझ्या चारित्र्यावर शिंताड्या उडवत असेल तर त्याला त्याच शब्दात त्याची लायकी दाखविल्याशिवाय त्याला अक्कल येणार नाही म्हणून केलेला हा लेखप्रपंच.
कृपया माझी एक नम्रपणे विनंती आहे की इथून पुढे हे असले बदनामी करायचे, टीका करायचे, घाणेरडे प्रकार थांबवा टीका करायची असेल बदनामी करायची असेल तर वैयक्तिक वर यायचं असेल तर मी पण धनगराची औलाद आहे मला काही कमी समजू नका एकेकाची कापडे फाडून समाजासमोर त्याला ***उघडा करायची धमक माझ्यात आहे हे विसरू नका. पण हे माझ्यावर टीका करणाऱ्यांना नव्हे तर सर्वांनाच सांगतोय की असल्या फालतु गोष्टी मद्ये वेळ घालवत बसाल, नेत्यांवरती चिखलफेक करत बसाल तर काही साद्य करू शकणार नाही. तो चिखल उतरवता उतरवता विधानसभा/लोकसभा निघून जातील मग बसाल टाळ्या वाजवत. बांधवांनो तुमच्याकडे काही चांगले विचार असतील, समाजासाठी एखादे चांगले प्रकल्प असतील, काही योजना असतील तर त्यावरती चर्चा करून ते ते उपक्रम समाजासाठी राबवुया. मेंढपाळांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या, महिला सबलीकरण त्याचप्रमाणे धनगर आरक्षण हा एक आपल्या सर्वांचा आघाडीवर असलेला मुद्दा आहे. आणि आरक्षण आपल्या हक्काचे आहे, त्यासाठी श्रेय्यवाद बाजूला ठेवून सर्व संघटनेच्या पदाधीकाऱ्यांनी एकत्रित यावं, चर्चा करावी. एकीचे बळ हे खूप शक्तिशाली असते ते तुम्ही लहानपणापासूनच शिकला पण आहात आणि अनुभवलेलेही आहे. त्यासाठी एकत्रित या आणि एकत्रित येऊन समाजाचा विकास करूया.
रागाच्या भरात लिहताना जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर उदरांतकरणाने माफ करा🙏
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday 28 July 2016

मी समाजकार्य का करतोय? भाग-१

मी समाजकार्य का करतोय? भाग-१

बांधवांनो गेल्या चार-पाच वर्षापासून सोशल मिडीयाच्या माद्यमातून तसेच सामाजिक कार्यक्रमातून, उपक्रमातून समाजप्रबोधन करून समाजबांधवांची डोकी नांगरून त्यामद्ये प्रबोधनाचे बियाणे पेरायचे काम आजपर्यंत  प्रामाणिकपणे करत आलोय. ज्या माणसाने स्वताच्या आयुष्याची राखरांगोळी करून अखंड महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला जागं केलं त्या स्व.बी.के.कोकरे साहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजाला जागृत करण्याचे काम चोखपणे बजावतोय. आज स्व.बी.के.कोकरे साहेबांचे नाव घेऊन समाजकारण आणि राजकारण करणारे भरपूर आहेत पण स्व.बी.के.कोकरे साहेबांचा इतिहास समाजासमोर मांडण्यासाठी मी स्वता व मा.रामभाऊ लांडे साहेब यांनी वारंवार लेख लिहून त्याचप्रमाणे भाषणातून व्याख्यानातून स्व.बी.के.कोकरे साहेब यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला करून दिली विशेषता युवा वर्ग त्यांच्या इतिहासापासून वंचित होता म्हणून मी त्यांचे जीवनचरित्र लिहतोय आणि मा.रामभाऊ लांडे साहेब हे सुद्धा लवकरच क्रांतीवीर स्व.बी.के.कोकरे यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशित करत आहेत. यांव्यतिरिक्त आजकाल झोपेतून उठून स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या नावाने स्वार्थासाठी संघटना चालवणाऱ्यांना त्या रणझुंजार नेत्याचे, वाघासारखी डरकाळी फोडून प्रस्थापितांना घाम फोडणाऱ्या रणमर्दाचे आजचे आधारहीन आई-वडील दिसत नाहीत ही खरंतर शोकांतिकाच म्हणावी लागेल. बांधवांनो मी काही फार मोठा विचारवंत नाही, फार मोठा वक्ता अथवा व्याख्याता नाही पण सर्वसामान्य मेंढपाळ कुटूंबातील पोरगा(आजही वडील मेंढ्या राखतात गरज म्हणून नव्हे तर पारंपरिक व्यवसाय म्हणून) आजपर्यंत इजिप्त, स्पेन, फ्रांस, इस्राइल, जिबूती अशा आशिया व्यतिरिक्त आफ्रिका व युरोप खंडांतील विविध देशांचे मी दौरे केले, माझ्याकडे आज घरदार नोकरी सर्व काही व्यवस्थित असताना देखील इतरांसारखे स्वतापुरते न जगता दिशाहीन समाजाला दिशा देण्यासाठी, समाजाला न्याय मिळावा म्हणून वेळात वेळ काढून समाजकार्य करतो, समाज जागृती करतो हा काही मी माझा मोठेपणा सांगत नाही. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यापासून समाजप्रबोधन करत, समाजाचा इतिहास समाजासमोर मांडत असताना समाजाच्या विरोधात काम करणाऱ्यांचा समाचार मी लेखणीच्या माध्यमातून सडेतोडपणे घेतला होता. खरंतर त्यांनी माझा बांध रेटला होता म्हणून मी त्यांच्याविरोधात लिहीत नव्हतो तर त्यांची समाजाबद्दलची भावना बदलावी व समाजाचे प्रश्न सोडवावेत या अपेक्षेने लिहीत होतो. त्याचप्रमाणे समाजाचा वापर करून घेणाऱ्यांचा (निस्वार्थीपणाचा) बुरखा फाडल्याने काहीजणांच्या पायाखालची वाळू सरकली जाते मग काय करावे हे त्या गड्यांना सुचत नव्हते पार भांबावून गेल्यानंतर मग कुठल्यातरी हिजड्या प्रवृत्तीच्या कार्ट्यांना ज्यांना साधी चड्डीची नाडी बांधता येत नाही अशा शेंबड्या पोरांना पुढे करून माझी बदनामी करणे माझ्यावर टीका करणे आणि तरीही नाहीच जमलं तर माझ्या चारित्र्यावर शिंताड्या उडवणे असले खालच्या पातळीवरचे धंदे त्यांनी केले त्याबद्दल त्यांच्यावर टीका म्हणून नव्हे तर (मला समाजकार्यापासून परावृत्त करण्यासाठी) त्यांच्या चाललेल्या त्या खटाटोपीला हे माझे प्रत्यूत्तर आहे.
1.  स्वार्थासाठी आणि मोठेपणासाठी हे सर्व उद्योग करणाऱ्या औलादी अशी माझ्यावर टीका केली जाते.
बांधवांनो जेव्हापासून धनगर आरक्षणाचा मुद्दा तापू लागला तेव्हापासून ठराविक जणांच्या प्रतिक्रिया ऐकल्या/वाचल्या. राज्यघटनेत जे आरक्षण दिले आहे ते आमच्या हक्काचे आहे आणि हे हक्काचे हिसकावून घ्यायचे असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन चर्चा करा विचारविनीमय करा अशी विनंती, आवाहन करत होतो. आरक्षणाबद्दलचे महत्व पटवून देत माझ्या अभ्यासातील पुरावे देत होतो. वेगवेगळे मोर्चे काढत बसण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित येऊन एकच विराट मोर्चा काढा असेही सांगत होतो. यांत नेमका स्वार्थ कोणता?? आणि जर मला स्वार्थासाठी करायचं असतं, मोठेपणासाठी करायचं असतं तर इतरांनी जसं मोर्चाचं नेतृत्व करून आमदारक्या/खासदारक्या मिळवल्या, तसे मी पण काहीतरी मिळतंय का ते बघू शकलो असतो आणि काहीतरी पदरात पाडून घेतले असते. तसे महाराष्ट्र राज्यभर सर्व जिल्ह्यात/तालुक्यात माझा भरपूर संपर्क आहे. पण नाही तसे मला काही करायचे नाही कारण मला समाजाला जागृत करायचं होतं आणि समुद्रात भरकटलेल्या नौकेप्रमाणे दिशाहीन समाजाला खारीचा वाटा म्हणून का होईना पण योग्य दिशा देण्यासाठी चाललेली धडपड हाच एकमेव माझा "स्वार्थ" आहे यांत कोणताही मोठेपणा नाही. कोणी म्हंटलं सामाजिक संघटनेत पद हवे होते पण दिले नाही म्हणून (निस्वार्थीपणाचा) बुरखा फाडला त्यांना समजावून सांगा मला पदाची आवश्यकता नव्हती आणि मी कोणतेही पद घेऊ शकत नव्हतो उलट जिथे होतो तिथे पदे वाटायचं काम मी स्वता करत होतो त्या संघटनेतील कीतीतरी पदे माझ्या सांगण्यावरुन दिलेली आहेत आणि आजही समाजासाठी झटणाऱ्या झगडणाऱ्या संघटनेची पदं वाटायची जबाबदारी माझ्याकडे आहे. माझे कार्य हे कोणत्याही एका संघटनेसाठी नसून सर्व समाजासाठी आहे, सामाजिक संघटनांसाठी आहे ज्या संघटना खरेखरंच समाजासाठी काम करतात. जर कोणाला पद पाहिजे असेल तर सांगा पण ज्यांना पद द्यायचे आहे ती व्यक्ती निष्कलंकित असावी, निष्क्रिय नसावी, निस्वार्थी असावी तसेच जातीसाठी माती खाणारी असावी समाजावर ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्या वेळी अन्याय करणाऱ्यांचं हात वरचेवर कलम करण्याची धमक असावी त्याला समाजातून पुढे नेता करायची जबाबदारी माझी राहिल.
पुढील झालेल्या माझ्यावरील टीका आणि प्रत्यूत्तर भाग-२ मद्ये..
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday 22 July 2016

हुंडाबळी "प्रथा ही समाजाची-व्यथाही समाजाचीच"

हुंडाबळी
 (हुंडा ही प्रथा समाजाची-व्यथाही समाजाचीच)

        समाजामद्ये फिरताना वावरताना आसपासचे वातावरण हे सडलेल्या अंड्याप्रमाणे इतके उग्र (दुषित) झालेले पाहून अक्षरशा सामाजिक व्यवस्थेचा किळस वाटतो. दैनंदिन जीवनामध्ये रोजच काही ना काही घडतच असते पण यामद्ये सर्रास महिलांचेच का बळी जातात?? तेच समजत नाही. सरकार दरबारी महिला सबलिकरणाच्या गोष्टी मात्र हवेतच विरून जातात पण वास्तवात काहीच नसतं. रोजच वर्तमानपत्रातून स्त्रिभ्रूणहत्या, बलात्कार यांसारख्या मानवी जीवनाला काळीमा फासणाऱ्या बातम्या वाचताना डोळ्यांत पाणी येते त्यांव्यतिरिक्त हुंड्यासाठी होणारा विवाहितेचा छळ अर्थातच 'हुंडाबळी' हे सुद्धा समाजासमोरील एक मोठे आवाहनच आहे. महिलांच्या सुरक्षितेसाठी, कल्याणासाठी कायदे बनवले जातात पण कधी ते आमलातच येत नाहीत आणि जर आमलात आणले तर आरोपीला दंड आकारुन काही कालावधीची शिक्षा दिली जाते व कालांतराने ती शिक्षा माफही होते याचाच अर्थ पुन्हा गुन्हा करण्यासाठी त्या आरोपीला रान मोकळेच... मग सुड घेण्यासाठी पुन्हा कोणत्या ना कोणत्या महिला त्या लांडग्यांच्या शिकार होणार हे मात्र नक्की.
असो आपली न्यायव्यवस्था आंधळी आहे, जोपर्यंत डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे तोपर्यंत असंच चालत राहणार बाकी काय??? हुंडा न दिल्याने विवाहीतेवर छळ करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांपाठोपाठ लग्नागोदरच हुंड्याची भरमसाठ मागणी करून गोरगरीब शेतकरी कुटूंबात जन्माला आलेल्या कुमारिकेचा बळी घेणेयाचेही प्रकार आज समाजात वाढत चाललेत. पाठीमागे काही महिन्यांपूर्वी एका मुलीने आत्महत्या केली होती त्यामागचं कारण जर अभ्यासले तर आजच्या या सामाजिक व्यवस्थेचा मला धिक्कार करावासा  वाटतो. सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कुटूंबात जन्माला आलेली ती मुलगी जेमतेम चांगली शाळा शिकलेली. आर्थिक परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण शक्य नव्हतेच सोबत लहान बहिणीच्यापण शिक्षणासाठी तरतूद करावी लागणार होती. आई-वडिलांना तिच्या लग्नाची घाई झालेली नसतानादेखिल परिस्थीती त्यांना मजबूर करत होती. शिवाय धाकल्या मुलीला शिकवावी आणि लागलीच तिचंही हात पिवळे करावेत असा त्यांचा उद्देश होता. तिच्यासाठी पाहुणे यायचे मुलगी सर्वांना पसंत पडायची पण हुंड्याचा विषय निघाला की ते लग्न मोडायचं  असे कितीतरी वेळा झाले. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने हुंडा देणे शक्य नव्हते. थोडाफार हुंडा ठिक असतो पण हुंड्याचा भरमसाठ आकडा ऐकला की त्या बिचाऱ्याला, गोरगरीब शेतकऱ्याला डोक्याला हात लावावा लागायचा. अहो एवढी रक्कम तो आणणार तरी कोठून??  एकतर महाराष्ट्र राज्यांत पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण आत्महत्या हा एकमेव पर्याय नव्हे म्हणून कसंबसं आर्धीकोर भाकरी खाऊन जीवन जगायचं ठरवलं तर दुसरे संकट आ वासून उभा राहायचं.मग नक्की करायचं काय ?? मग तो गोरगरीब शेतकरी असो अथवा गोरगरीब मजूर असो त्यांच्यापुढं आत्महत्येशिवाय पर्यायच उरत नाही. मुलीला एकामागून एक पाहुणे यायचे आणि हुंड्यापायी लग्न मोडून जायचे याचा परिणाम मुलीच्या त्या कोवळ्या मनावरती होणार नाही तर काय होणार?? एकतर हुंड्यामुळे लग्न ठरत नसल्याने समाजामद्ये विविध गोष्टींवर उलट-सुलट चर्चा चालतात, पारावर बसणाऱ्या समाजातील रिकामटेकड्या लोकांना याबद्दल काहीच माहित नसताना ते मुलींलाच दोषी ठरवतात. मग खचून गेलेली मुलगी स्वताला आई-वडिलांवरचं ओझं समजून आत्महत्येचा पर्याय निवडते आणि जीवन संपवून टाकते.
मग त्या मुलीच्या आत्महत्येला कोण जबाबदार असेल?? लग्न ठरत नसल्याने समाजात चाललेल्या उलट-सुलट चर्चेला कंटाळून आत्महत्या केलेली मुलगी जबाबदार असेल?? का हुंडा न देणारा दुष्काळामुळे खचलेला गोरगरीब शेतकरी बाप?? का ज्या प्रथा समाजानं पाडल्या तो समाज?? का ज्या समाजानं पारावर बसून चौकाचौकात त्या मुलीची बदनामी करून त्या हतबल असलेल्या पित्याची इज्जत काढली तो समाज??  कोण जबाबदार आहे याचा जरा अभ्यास कराल का हो??
       हुंडा कोणाला द्यावा?? अन् कोणाला देवू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे इट्स डजन्ट मॅटर ॲंड नो आॅब्जेक्शन, पण सोन्यासारख्या पोरींचे कन्यादान करूनही तिचा सांभाळ करावा म्हणून हुंडा द्यावा लागत असेल तर तो मुलगा काय निष्क्रिय आहे का सुस्त?   जर तो मुलगा काही कमवूच शकत नसेल तर वडिलधाऱ्यांनो तुमच्या सोन्यासारख्या पोरीचं वाटोळं कशाला करताय?? माझ्या मते एखाद्या अंध-पंगूसाठी हुंडा दिला तर ती गोष्ट वेगळी आहे कारण तो कमवू शकत नाही पण ज्याला दोन हात दोन पाय आहेत व्यवस्थित धडधाकट असूनही दोन-चार रुपये कमवता येत असूनही त्याला हुंडा देत असाल तर मग त्यांच्यात आणि अंध-पंगूमद्ये काय फरक राहिला?? आय एम साॅरी पण मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत कारण आठराव्या शतकात राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी "हुंडाबंदी" केली होती. म्हणजेच एकविसाव्या तंत्रज्ञानविकसित शतकात आजच्या सरकारला जे सुचतं ते आठराव्या शतकात माझ्या राजमाता अहिल्याईंना सुचत होते आणि प्रशासकीय व्यवस्थेमधून त्यांनी हे आमलात देखील आणले होते. पुढे अहिल्यामाईंचाच आदर्श डोळयासमोर ठेवून सतीप्रथेला, हुंडा प्रथेला थोर समाजसुधारक राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी देखील विरोध केला होता, या प्रथेच्या विरोधात ब्रिटिश सरकारने कायदे बनवले होते 'हुंडाबंदी' केली होती पण या कायद्यांना 'हुंडाबंदीला' विरोध करायचं काम बाळ गंगाधर टिळकांनी केले, बाय दि वे...  "आमुक-आमक्याने मुलींकडून एवढा हुंडा घेतला तर आम्ही पण तेवढा घेणार दोन रुपये जास्तच पण कमी नाही"अरे ही काय रस्सीखेच चाललीय का??? तुमच्या या रस्सीखेचमुळे गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरातील निष्पाप मुलींचे बळी जातायेत याचा विचार करा. आज समाजातील हुंडा घेणाऱ्या बांधवांना मला सांगायचे आहे की "स्वताचा घाम गाळून, दिवसरात्र राबराब राबून शेतीतून धान्य पिकवायचं, एकाऐवजी आर्धीकोर भाकरी खाऊन पोरालेकरांना एकवेळ उपाशी ठेवून शेतात पिकवलेलं बाजारात बाराच्या भावात विकायचं, तिथं शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे व्यापारी अधाश्यासारखं शेतकऱ्यांना लुटत असतात मग त्यातूनही आलेल्या दीडदमडीत घरसंसार चालवायचा, मुला-मुलींची शिक्षणं, मुलीचे लग्न अशा कितीतरी समस्या त्या गोरगरीब शेतकऱ्यांसमोर उभा राहतात". मग अशा दुष्काळाने खचलेल्या जगाच्या पोशिंद्याकडून जर त्याच्या मुलीसाठी लग्नात हुंड्याची मागणी करत असाल तर तुमच्यासारखा हांडगा माणूस या जगात कोणी शोधून सापडणार नाही. कदाचित माझ्या या बोलण्याचा राग येत असेल पण हुंड्यापायी लग्न मोडलेल्या त्या आत्महत्या केलेल्या मुलीचा एकवेळ भाऊ होऊन बघा तुम्हीसुद्धा माझ्यासारखीच कडवट भाषा बोलाल अथवा हुंडा न दिल्यामुळे सासरकडील लोकांनी जाळून मारलेल्या विवाहितेचा भाऊ नाहीतर एकवेळ बाप होऊन बघा तुमचे डोळे रक्तासारखे लाल होतील आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखीच डोळ्यात अंजन घालणारी भाषा बोलाल आणि शेवटी सर्व काही करूनही जर तुम्ही हतबल असाल तेव्हा तुमच्यावरसुद्धा आत्महत्या करायची वेळ येईल. म्हणूनच म्हणतो अरे कमवायचे असेल ना तर स्वताच्या हिंमतीवर स्वताच्या ताकदीवर कमवा पण मागतकऱ्यांसारखा हुंडा मागत बसू नका आणि कृपया हुंड्यापायी गोरगरीब घराण्यातील निष्पाप मुलींचे बळी घेऊ नका ही नम्र विनंती.
"हुंडाबंदीसाठी एकमेकांच्या हातात हात देऊन निष्पाप मुलींचे जीवन वाचवा एवढंच सांगायचा माझा उद्देश आहे." धन्यवाद
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१८५३०००४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Wednesday 20 July 2016

धनगर बांधवांनो गांभीर्य लक्षात घ्या...


   अज्ञानाच्या खाईत बुडलेल्या अन् अंधश्रद्धेत गुरफटलेल्या समाजाला ज्ञानरूपी कंदिलाची आवश्यकता आहे. आज जर पाहिले तर शहरापासून दूर  रानावनात डोंगरदऱ्यातून भटकंती करण्यामुळे शिक्षणाचे प्रमाण समाजात फार कमी आहे त्यातूनही आजचा युवा वर्ग सुशिक्षीत झाला शिकला सवरला, लिहायला लागला, वाचायला लागला बोलायला लागला. अन्यायाच्या विरोधात पेटून उठू लागला. धनगर समाजाचा खरा इतिहास जाणूनबुजून लपवून ठेवला गेला यापाठीमागे सनातन्यांचे आणि प्रस्तापितांचे फार मोठे षड्यंत्र आहे. तरीही धनगर समाजाच्या इतिहासावरती संशोधन झाले लपवून ठेवलेला धनगर समाजाचा खरा इतिहास समाजासमोर आला. आज धनगर समाजातील वक्ते, व्याख्याते जीव तोडून समाजाला इतिहास सांगतात आणि समाजप्रबोधन करतात.  इतिहासकार, लेखक, विचारवंत आपला अमुल्य वेळ काढून निस्वार्थीपणाने समाजाचे प्रबोधन करण्यासाठी अहोरात्र झटत असतात. विस्कटलेला अन् विखुरलेला धनगर समाज आज कुठेतरी एकत्रित येतोय, महापुरूषांच्या जयंत्या साजऱ्या करून युवा वर्ग एकोप्याचे दर्शन घडवून आणतात.
पण समाजातील काही लोक जरा प्रमाणापेक्षाही जास्तच शिकले आणि अतिशहाणे झाले असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. कदाचित माझ्या या बोलण्याचा कोणालाही राग येऊ शकतो पण त्याची मला पर्वा नाही. कारण कालपरवा आयबीएन लोकमत वरती "जानकर हे हटकर तर राम शिंदे खुटेकर" या आशयाची बातमी पाहिली अन् माझ्या मस्तकाची शिरच उठली. आजपर्यंत नव्हते पण आता कुठेतरी धनगर समाजातील नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. एकीकडे अहिल्यामाईंचे माहेरकडील वंशज मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांची राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्रिपदावरती वर्णी लागली तर दुसरीकडे २५ वर्ष वणवण फिरून बहुजन समाजाला न्याय मिळावा म्हणून घरादाराचा त्याग करणाऱ्या मा.ना.महादेवजी जानकर साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले, मेंढपाळाचा पोरगा राज्याचा मंत्री बनला. धनगर समाजातील दोन नेते कॅबिनेट मंत्री झाले या पण नेत्यांना पोटजातीत अडकवायचे काम समाजातील खूप शिकलेले अतिशहाणे लोक करताहेत तेव्हा नाइलाजाने म्हणावेसे वाटते की शिकलेल्यापेक्षा जर हे लोक अडाणी असते तर कमीत कमी पोटजातीचा डंका पिटून समाजाचं वाटोळं करून घ्यायची दुर्बुद्धी त्यांना सुचली नसती. आज पोटजातीत विखुरलेला धनगर समाज एकत्रित यावा म्हणून समाजातील इतिहासकार, लेखक, विचारवंत हे वारंवार सांगतात की पोटजाती सोडून "धनगर" म्हणून एकत्रित या पण समाजातील अतिशहाणे लोक मात्र पोटजातीचा डंका पिटत आम्हीच कसे काय श्रेष्ठ हे सांगत जुन्या विचारातच गुरफटलेले दिसून येतात. पण त्यांना पोटजातीचा एवढा डंका पिटून नक्की काय साद्य करायचे आहे राम जाणं....
     माझ्या या बोलण्याचा काहीजणांना राग आला असेल, काहींना पटलेही नसेल पण माझे विचार सर्वांनाच पटावेत असे काही बंधन नाही. मी हटकर, मी खुटेकर, सनगर, झेंडे, बंडे, डंगे अहिर तर कोणी म्हणतो घोंगडी धनगर असे म्हणण्यात व आम्ही श्रेष्ठ की तुम्ही श्रेष्ठ करण्यातच आमचे आयुष्य संपले आणि पोटजातीत विभागला गेल्यामुळे धनगर समाज आजपर्यंत मागासलेलाच राहिला. समाजाला प्रगतीपथावर घेवून जाणाची भाषा करत असतानाच नेत्यांना पोटजातीत अडकवून समाजाला विभागायची भाषा करणारे सुद्धा आपल्याच रक्ताचे आपलेच सगेसोयरे करताहेत याचेच दुःख वाटते. एकाच आईची लेकरं एकाच रक्ताची माणसं हाडवैरी कशी काय बनताहेत?? तेच कळत नाही. ज्याप्रमाणे घरातील गोष्टी चव्हाट्यावर येतात त्याचप्रमाणे आपआपसांत पोटजातीत भांडत बसलेल्या आपल्याच माणसांमुळे आयबीएन लोकमत सारखी प्रसिद्धी माद्यमे (Electronic media, print media, Social media) ही आपल्या धनगर समाजातील नेत्यांना पोटजातीच्या चौकटीत अडकवताहेत. पोटजातीचा अहंकार बाळगणाऱ्यांना हे पाहायला कदाचित आज बरं वाटत असेल पण पोटजातीला खतपाणी घालत बसलो तर उद्या भविष्यात धनगर समाजातील नेत्यांना आपल्याच धनगर समाजबांधवांच्या मतांची भिक मागावी लागेल हे भयानक आणि कटू सत्य आहे. जानकर साहेबांना हटकर मद्ये तर राम शिंदे साहेबांना खुटेकर मद्ये अडकवून आपण आपल्याच पायावर दगड मारतोय याची जाणीव ठेवा. घराला घरपण तेव्हाच असतं जेव्हा घरातील प्रत्येक सदस्य घराशी एकरूप झालेला असतो आणि घरातील एखाद्या सदस्यावर जर अन्याय झाला तर घरातील सर्व सदस्य एकत्रित येतात पण जर घरात एकमेकांचे पटत नसेल, या ना त्या कारणावरून वाद होत असतील तर तुमच्या घराचं वाटोळं करायला टपलेल्या गिधाडांना आयतीच संधी मिळते मग ते तुमच्या घरातील समस्यांचा कसा वापर करून घेतील आणि तुमच्या घराचं कसं वाटोळं करतील ते सांगता येणार नाही. म्हणूनच ओरडून ओरडून सांगतोय की धनगर समाजबांधवांनो पोटजातीत भांडत बसण्यापेक्षा "धनगर" म्हणूनच सर्वांनी एकत्रित या, समाजाचा विकास करा नाहीतर समाजाचं वाटोळं करायला बाकीची गिधडं टपूनच बसलेत याची जाणीव असुद्या. आपापल्यातील पोटजातीचा वाद विकोपाला जाऊ शकतो त्यातून भविष्यात आपलेच नुकसान होईल याचं गांभीर्य जरा लक्षात घ्या.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Monday 18 July 2016

शाब्बास रं पट्ट्या शाब्बास ....



नसानसात सळसळतं ते रक्तच असतं धनगराचं,
अन्यायाच्या विरोधात पेटून उठतं ते रक्तच असतं धनगराचं,
कीतीही आली संकटे तरी कधीच मागे हटत नसतं
कारण,
जिंकण्याचं सामर्थ्य ज्यामद्ये असतं ते रक्तच असतं धनगराचं.
            मनगटाच्या आणि बुद्धीच्या जोरावर सामर्थ्यशाली आणि शक्तिशाली दुश्मनांच्या चिंद्या उडवणारी आमची औलाद. शत्रुंच्या चारी मुंड्या चित करून त्यांना आस्मान दाखविण्याचा आमचा वारसा आम्ही कधीच विसरत नाही कारण "मल्ल"राक्षसाला हरवणाऱ्या "मल्हार"चे आम्ही भक्त, शत्रुंना धूळ चारून अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या श्रीमंत मल्हारराव होळकरांचे आम्ही वारसदार आमचा धनगरी बाणा आणि कणा जसाच्या तसाच आजही आहे. पाठीमागे पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या "स्व.खाशाबा जाधव दुसऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धे"त धनगराच्या वाघाने, धनगराच्या पट्ट्याने म्हणजेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याच्या पै.वैभव रास्कर याने ९६ किलो वजनी गटातून सुवर्णपदक पटकावले. त्याबद्दल या धनगराच्या वाघाचं हर्दिक हर्दिक अभिनंदन.
पै वैभव रास्कर हा माजी सैनिक पै.कृष्णा रास्कर (सर्वांचे लाडके "रास्कर आप्पा") यांचा मुलगा असून भारतीय नौदलात कार्यरत असताना भारताचं नेतृत्व  करावे असे रास्कर आप्पांना वाटत होते पण त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले ही खंत त्यांचा मुलगा पै.वैभव रास्कर याने पुर्ण करावी आणि भारताचा तिरंगा जगात फडकवावा ही त्यांची इच्छा आहे. ही त्यांची इच्छा पुर्ण होवो ही मल्हारचरणी प्रार्थना
पै. वैभव रास्कर चे चुलते पै.धनाजी रास्कर हे सुद्धा भारतीय नौदलात पैलवानच आहेत खरंतर धनगर समाजालाच पैलवानकीचा वारसा लाभलेला आहे. सांगली जिल्ह्यातील बोरगावचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांना ओळखले जाते ते बापू बिरू वाटेगावकर (आप्पा) हे सुद्धा पैलवानच आहेत आज कुठेही कुस्तीचा फड असला तरी आप्पा अवर्जून उपस्थित राहून पैलवानांना कुस्तीपटूंना प्रोत्साहन देतात चांगल्या पैलवानास विजेत्यास स्वता बक्षिसही देतात. धनगर समाजातला पै.वैभव रास्कर सुद्धा असाच पोरगा आज महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आपल्या आई-वडिलांचे समाजाचे नाव रोषण करत भारताचं नेतृत्व करण्यासाठी पुढे येतोय त्याबद्दल सुवर्णपदक विजेता पै.वैभव रास्कर याने घवघवीत यश मिळवल्याबद्दल त्याचे पुनःश्च एकदा त्रिवार अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हर्दिक हर्दिक शुभेच्छा!!!
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday 15 July 2016

सळसळते रक्त जेव्हा विचारते मला...

सहज मनाशीच विचार करत बसलो असताना नसानसात सळसळ करणाऱ्या माझ्या सळसळत्या रक्तानंच एकेदिवशी मला  प्रश्न विचारला की "धनगर समाज एवढा षंढ कसा काय झालाय??" डोक्याला शाॅकच बसला राव, अचानक या विचारलेल्या प्रश्नामुळे आसपासचे वातावरणही गंभीर झाल्याचे जाणवले, सगळीकडे निरव शांतता पसरलेली होती, डोक्यात विचाराची चक्रं सुरू झाली, रक्तवाहिण्या पहिल्यापेक्षाही जलद गतीने रक्ताचा पुरवठा करण्यासाठी धावू लागल्या, या एकाच प्रश्नामुळे लाखो विचारांचा अक्षरशा आगडोंब उसळला, एकामागून एक अशा विचारांनी थैमान घातले मग पाठीमागे इतिहासांत डोकावून पाहिलं तेव्हा "एवढं आम्ही षंढ कसे काय झालोय?" याची मला स्वतःलाच लाज वाटायला लागली.
अरे एकेकाळी राजा समाजात जन्माला आलेल्या आम्ही औलादी आज नक्की कोणतं गुलामगीरीतलं जगणं जगतोय तेच आम्हाला कळत नाही आणि कळलं तर वळत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका. धनगर पुत्र आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य चे आम्ही वारसदार, आशिया खंडावर प्रभुत्व गाजवणाऱ्या राजा सम्राट अशोकाच्या तलवारीची आम्ही तळपती धार, अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या श्रीमंत मल्हारराव होळकरांचे मावळे, महान आणि उत्तम प्रशासक म्हणून अख्ख्या जगाने जिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला त्या रणरागीणी राष्ट्रमाता अहिल्यामाईंचे आम्ही भक्त, अजिंक्य मानल्या जाणाऱ्या शिस्तबद्ध ब्रिटिश फौजांना सलग अठरा वेळा कापून काढून त्यांची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकरांच्या सळसळत्या रक्ताचे आम्ही वारसदार आज स्वताला या सर्व महापुरूषांचे मर्दमावळे म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो. पण वास्तवात मात्र प्रस्तापितांची चाकरी/चमचेगीरी/दलाली करण्यातच आमच्या समाजाचे आणि नेत्यांचे आयुष्य संपून जाते मग आउटपुट येते ते फक्त शून्य आणि शून्यच.... आज भारतातीलच काही नालायक इतिहासकार छाती फूगवून सांगतात की ब्रिटिशांनी १५० वर्ष भारतावर राज्य करून भारतीयांना गुलाम बनवलं पण त्यांना जावून सांगा अरे या जगाच्या पाठीवर हजारो वर्षापेक्षाही जास्त काळ राज्यकारभार केला आहे तो फक्त माझ्या धनगर समाजाने मग आम्ही कोणाकोणाला गुलामगीरीत वागवलं याचा इतिहास काढून बघा तुम्हाला तो सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला इतिहास वाचायला तुमचं आयुष्य पुरणार नाही.
ज्या माणसाने स्वताच्या आयुष्याची राखरांगोळी करून अखंड महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला जागे करून माझ्या सारख्या युवकांच्या हातात क्रांतीची मशाल दिली त्या स्व बी के कोकरे साहेबांची विचारधारा आज धनगर समाजाला प्रगतीपथावर घेवून जावू शकते पण त्या स्व बी के कोकरे साहेबांना खरंतर प्रस्तापितांनी संपवले पण ती बंदूक धनगर समाजातील नेत्यांच्याच खांद्यावर ठेवून मस्तावलेल्या आणि माजग्या प्रस्तापितांनी स्व बी के कोकरे साहेबांची राजकीय हत्या केली. याचा अर्थ आमच्याच माणसांना आम्हीच संपवले, संपवण्यासाठी मदत केली कीती लाजिरवाणी गोष्ट म्हणावी ही. पाठीमागे एक पोस्ट सोशल मिडीयाच्या माद्यमातून व्हायरल होत असताना पाहिले त्यामद्ये कुत्र्याच्या आणि गाढवाच्या शर्यतीचे वर्णन केले आहे. गाढवापेक्षा कुत्रा हा धावण्यामद्ये चपळ असतो तेज असतो पण दुर्दैव त्याचे असे की प्रत्येक गल्लीगल्लीत, चौकाचौकात रस्त्यारस्त्यावर त्यांच्याच जातबांधवांनी भूंकून त्याला हुसकावून लावले विरोध केला कारण की "हर कुत्ता अपने इलाखें का शेर होता है।" तसेच झाले पण गाढवाला मात्र कोणीच विरोध केला नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे धावण्यामद्ये चपळ असलेल्या कुत्र्याच्या अगोदर गाढव त्या सिंहासनावर जाऊन बसतो. त्यावेळी कुत्रा स्वतालाच म्हणतो की माझ्याच जातबांधवांनी मला विरोध केला नसता तर आज त्या उकिरंड्यात लोळणाऱ्या गाढवाऐवजी मी सिंहासनावर बसलो असतो.
माझ्याही धनगर समाजाचे अगदी त्या कुत्र्याच्या आणि गाढवांच्या गोष्टीप्रमाणेच झाले आहे. एकेकाळी राजा समाजात जन्माला आलेल्या आम्ही औलादी, दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाचे वारसदार आणि शुरवीरांच्या आणि थोर महापुरूषांचा वारसा लाभलेल्या माझ्या धनगर समाजातील आपलीच माणसं आपल्याच माणसाच्या पायात पाय अडकवताहेत आणि पुढे जाणाऱ्याला पाडताहेत म्हणूनच आपण सिंहासनावर बसू शकत नाही. अरे एखादा पुढे जात असेल तर त्याला प्रेरणा द्या, प्रोत्साहन द्या, मदत करा तरच धनगर समाज इतिहास घडवू शकतो. त्यासाठी ज्या दिवशी धनगर समाजातील एकमेकांचे पाय ओढायचे आणि पायात पाय अडकवायची ही खेकडा प्रवृत्ती नाहीशी होईल तेव्हा मात्र धनगर समाज सिंहासनावर बसून भारतावर राज्यकारभार करेल हे त्रिकालबाधित सत्य आहे. आज धनगर समाज विकासपासून कोसो मैल दूर असून दुसऱ्यांची गुलामगीरी करण्यात अन एकमेकांना शिव्या घालण्यात आमची उर्जा खर्च करत बसतो. खरंतर सळसळत्या रक्ताला मात्र इतिहासाची जाण आहे पण सनातनी विचारांचा पगडा पडल्यामुळे आम्ही आमच्या इतिहासाकडे दुर्लक्ष करतो आणि आमच्या इतिहासापासून आम्हाला दूर ठेवणे यापाठीमागे ब्राह्मणांचे खूप मोठे षड्यंत्र काम करत आहे याची जाणीव सर्वांना असायला हवी. अवर्जून सांगावेसे वाटते की झाडूमधील काड्या ज्यावेळी एकत्रित असतात त्यावेळी कचरा साफ करतात पण त्या काड्या ज्यावेळी बाजूला पडून विस्कटल्या जातात तेव्हा मात्र कचरा बनून जातात म्हणून वेगळे होऊन कचरा बनू नका तर एकत्रित येऊन समाजाचा विकास करा. म्हणूनच म्हणतो उठ धनगरा उगार मूठ, तूच थांबव आता तुझी लूट. महाराजा यशवंतराव होळकरांचे तुम्ही आम्ही वारसदार मग एवढा अन्याय होत असताना "षंढ होऊन थंड राहण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात बंड करून गुंड झालेले अधिक बरे."
(सुचना:- कृपया वरील कुत्र्याच्या आणि गाढवांच्या शर्यतींमधील जी प्रवृत्ती सांगितलेली आहे ती आपल्या धनगर समाजातील असलेली घाणेरडी प्रवृत्ती दर्शविली आहे. ती प्रवृत्ती कोणा एखाद्या व्यक्तिसाठी प्रत्यक्षरित्या अथवा अप्रत्यक्षरित्या उद्देशून नाही लिहली. चूकून कोणीही ती स्वतावरती ओढवून घेऊ नये. कारण गैरसमज करून घेण्याचे प्रमाण आजकाल जास्तच वाढले आहे पण धनगर समाजाच्या विकासासाठी ही खेकडा प्रवृत्ती समाजातून मुळासह उखडून टाकायला हवी त्यासाठी तुम्ही-आम्ही सर्वांनी एकत्रित यायला हवे. त्यानिमीत्ताने केलेला हा लेखप्रपंच..)
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
        ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
https://nitinrajeanuse123.blogspot.in

Wednesday 13 July 2016

वारी वारी आरक्षणाची वारी...

...वारी वारी आरक्षणाची वारी...
आजकाल कोणीही उठतोय अन् राज्यघटनेत नसतानाही आरक्षण मागत बसतोय अशी परिस्थिती या महाराष्ट्र राज्यात दिसून येतेय. ज्या वंचित घटकाला राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करून ठेवली होती त्या आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिक व राजकीयदृष्ट्या मागासलेल्या धनगर समाजाला अजूनही अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तोपर्यंत इतर समाज पायात पाय अडकवण्याठी आरक्षणाची वारी वारी करत  बसलेत हे कीती मोठे दुर्दैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्र राज्याचे.??
बाबासाहेबांच्या विचारावरती, राज्यघटनेवरती हे संबंध राष्ट्र सुरळितपणे मार्गक्रमण करते आहे पण सनातनी आणि पुरोगामी विचारांनी बरबटलेल्या राजकारण्यांना फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि भारतीय राज्यघटनाच मान्य नाही असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. आणि जर राज्यघटना मान्य असती तर आज धनगर समाजाला घटनादत्त अधिकार असलेले अनुसूचित जमातीची अंमलबजावणी कधीच झाली असती. डाॅ.बाबासाहेबांनी राज्यघटनेमद्ये शोषित समाजाच्या उद्धारासाठी राज्यघटनेत तरतूद केली नसती तर आज धनगर-बहुजन समाजातील पोरं ब्राह्मनांच्या घरी धुणे-भांडी करत बसली असती हे सत्य विसरून चालणार नाही. इतिहासांतही डोकावून पाहिले तर बहुजन समाजाच्या त्याचप्रमाणे दलित अस्पृश्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या महात्मा फुलेंचे विचार हे बाळ गंगाधर टिळकांना पटत नव्हते कारण टिळक हे सनातनी विचारांचे होते. आजही महाराष्ट्र राज्यांत नव्हे तर अखंड भारतामद्ये बहुजन समाजाच्या विकासाचा जर चढता आलेख पाहिला तर सनातन्यांच्या ज्या औलादी राजकारण करताहेत त्यांच्या पोटात दुखू लागते.
आज इतर समाजाच्या तुलनेत धनगर समाज हा विकासपासून कोसो दूर आहे. जन्मापासूनच आयुष्याचा संसार लादलेल्या घोड्याच्या पाठीवर बसून आमची भटकंती सुरू झाली, कोकऱ्या-करडांचं लटाबणं सोबत घेऊन वेळप्रसंगी काट्या-कुट्यांचा, दगडधोंड्यांचा विचार न करता अनवाणी पायानं पोटाची खळगी भरण्यासाठी गावच्या गावं पालथी घालणारी आमची धनगर जमात रानावनात आणि जंगलातच राहिली. पोरं-बाळं सोबत घेऊन रोजच्या भाकरीसाठी वणवण फिरण्यामुळे धनगर समाजातील मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. समाजात शिक्षणाची कमतरता असल्याने विकासाच्या प्रवाहापासून ही धनगर जमात दूरच राहिली. ६-१४ वयोगटातील मुलां-मुलींना मोफत शिक्षणाची व्यवस्था करून काय फायदा?? गावोगाव भटकंती करणाऱ्या मेंढपाळांची पोरं आई-वडिलांसोबतच या गावावरून त्या गावाला भटकंती करणार मग ६-१४ वयोगटातील मुलं-मुली शिक्षण घेणार तरी कोठून??
शेळ्या-मेंढ्यांसाठी असलेली चराऊ कुरणे, गायराने ही सरकारने हडपली. काही ठिकाणी मस्तावलेल्या माजग्या पुढाऱ्यांनी स्वताच्या खाजगी कंपन्या उभा केल्या तर सर्रास चराऊ कुरणांवरती वनखात्याने मेंढपाळांना पाबंदी घातली. मग शेळ्या-मेंढ्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती करण्याशिवाय मेंढपाळांसमोर पर्यायच उरत नाही मग धनगर जमातींमधील मुलं-मुली शिक्षण घेणार कोठून? रानावनात, जंगलात राहणाऱ्या, तीन दगडाच्या चुलींवर स्वयंपाक करून आदिवासी जीवन जगणाऱ्या या जमातीचा सर्व अभ्यास करूनच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर जमातीला अनुसुचित जमातीचे आरक्षण दिले होते पण "र" चा "ड" झाल्यामुळे सगळा राडा झाला आणि धनगर समाजाची हजारो मुलं-मुली आय ए एस, आय पी एस, डाॅक्टर, इंजीनीयर, वकील होण्यापासून वंचित राहिली.
आजपर्यंत धनगर समाज अज्ञानाचं घोंगडं पांघरून गाढ निद्रावस्थेत झोपी गेला होता पण आता समाज कुठेतरी जागृत होऊ लागला आहे. त्यामुळे समाजातील जागृत युवा वर्गाने तरून-तरूनींनी समाजाच्या न्याय व हक्कासाठी धनगर समाजाच्या आरक्षण लढ्यात सहभागी व्हावे. जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होतं नाही तोपर्यंत धनगर समाजाचा काहीच उद्धार होणार नाही. जर धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजीवणी झाली तरच उद्याची पीढी सुज्ञान आणि सुशिक्षीत असेल. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर हजारो IAS/IPS, Advocates, Doctors, Engineers या समाजातूनच उदयाला येतील आणि भारताचं प्रशासन चालवतील, अखंड भारताचा राज्यकारभार धनगर समाजातील पोरं चालवतील तेव्हा राष्ट्रमाता अहिल्यामाईंचे स्वप्न साकार होईल अन्यथा उद्याच्या पिढीवरही आजच्यासारखे अन्याय व अत्याचार सहन करायची वेळ आली तर उद्याची पिढी तुमच्या-आमच्या तोंडात शेण घातल्याशिवाय राहणार नाही. "र" चा "ड" झाला म्हणून धनगर समाज रडत बसलाय ही भाषा बोलणाऱ्यांनो पुन्हा बोलताना थोबाड सांभाळून बोला नायतर ही धनगराची औलाद तुम्हाला बोलायला तुमचे थोबाडच जाग्यावर ठेवणार नाही हे लक्षात ठेवा. आम्ही इतरांसारखे राज्यघटनेत नसताना भिक मागत बसत नाही तर डाॅ.बाबासाहेबांनी राज्यघटनेत दिलेले आमचे हक्काचे मागतोय पण आमचा जर संयम सुटला तर लाथा घालून हिसकावून घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाही कारण आमच्या नसानसात महाराजा यशवंतराव होळकरांचं रक्त सळसळतंय.... राज्यघटनेत आरक्षण दिले नसताना देखील इतर समाजातील समाजबांधव आणि त्या त्या समाजातील नेते पक्ष, संघटना, गट-तट बाजूला ठेवून आरक्षणासाठी एकत्रित येतात, चर्चा करतात आणि आंदोलन मोर्चे रास्तारोखो करतात पण धनगर समाजातील नेते मात्र मी मोठा होतोय की तू मोठा होतोय म्हणून भांडत बसलेत अन् एकमेकांची जिरवाजिरवी करत बसलेत त्यामुळे धनगर समाजाचे वाटोळं होतंय. धनगर समाजाचे एखादं संघटन मजबूत असावं म्हणून एखाद्याला उठवून उभा करून घोड्यावर बसवला तर तो धनगर समाजाला फाट्यावर मारून समाजातील नेत्यांनाच विरोध करत स्वार्थासाठी स्वताचंच घोडं दामटत बसतोय मग या सर्व प्रकाराला नक्की काय म्हणायचे?? तरी एक म्हण सर्वज्ञात आहेच "धनगरी जत्रा अन कारभारी सतरा" असे नाइलाजाने मला म्हणावेसे वाटतेंय.
बाभळीच्या काट्याला तलवार बनवलं असतं,
पळसाच्या पानाला ढाल बनवलं असतं,
माझ्याच धनगर समाजात आज एकी नाहीये,
नाहीतर.....महाराष्ट्रावर नव्हे तर
अख्ख्या भारतावर फक्त आमचंच राज्य असतं.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Tuesday 5 July 2016

यशवंत युवा सेनेची बैठक उत्साहात पार पडली

यशवंत युवा सेनेची बैठक उत्साहात पार पडली

रविवार दि.३ जुलै २०१६ रोजी पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात यशवंत युवा सेनेची पहिली बैठक उत्साहात पार पडली. पश्चिम महाराष्ट्रातून यशवंत मावळे बहुसंख्येने या बैठकीमद्ये सहभागी झाले होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडासा व्यत्यय आला यामुळेच काही भागातील कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित राहू शकले नव्हते. धनगर-बहुजन समाजातील वंचिताच्या न्याय व हक्कासाठी, प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानी युवा वर्ग यशवंत युवा सेनेच्या माध्यमातून एकत्रित येत असल्याचे चित्र सांगोला येथे पार पडलेल्या बैठकीतून दिसून आले.
धनगर-बहुजन समाजावरती परकीयांप्रमाणेच स्वकीयांनीसुद्धा अन्याय व अत्याचार केलेला आहे आणि आजही करत आहेत याचा समाचार घेण्यासाठीच युवकांनी भंडारा उचलला असून धनगर-बहुजन समाजावर झालेला अन्याय अत्याचार सहन करून घेतला जाणार नाही असे प्रतिपादन यशवंत युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाद्यक्ष मा.प्रा.सचिन होनमाने सर यांनी केले. त्याचप्रमाणे समाजातील नेत्यांमधील चाललेले वाद, एकमेकांवरची टीकाटीपनी संपवून युवा वर्गाने यशवंत युवा सेनेच्या माद्यमातून एकत्रित यावे व समाजहितासाठी हातभार लावावा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मा.अनिल महारनवर साहेब यांनी केले. धनगर समाज त्याचप्रमाणे बहुजन समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच स्वाभिमानी आणि स्वावलंबी युवकांनी एकत्रित येवून यशवंत युवा सेनेची स्थापना केली असून या संघटनेची जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिलेली आहे आणि मी ती जबाबदारी स्वीकारली असून माझ्या हातून समाजहीताचेच कार्य पार पडेल. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठीच त्याचप्रमाणे महिला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे व पक्ष, गट-तट बाजूला ठेवून धनगर समाजातील युवकांनी महाराजा यशवंतराव होळकरांचा वारसा जपत नविन इतिहास घडिविण्यासाठी यशवंत युवा सेनेत सहभागी व्हावे असे आवाहन करत कोणत्याही नेत्याला विरोध न करता समाजाच्या हीतासाठी पिवळ्या भंडाऱ्याची शपथ युवकांनी घेतली असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले.
या बैठकीदरम्यान उपस्थित समाजबांधवांनी तसेच धडाडीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे पदांचा कार्यभार स्वीकारला. यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य प्रदेशाद्यक्ष मा.प्रा.सचिन होनमाने साहेब तसेच बहुसंख्य धनगर समाजातील त्याचप्रमाणे बहुजन समाजातील समाजबांधवांच्या उपस्थितीमध्ये विविध पदांवरती कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून ती पुढील प्रमाणे...
१)मा.विष्णू देशमुख साहेब
(कार्याद्यक्ष यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य)
 मो.नं.+91 99-60-444256

२)मा.अॅड.रविकिरण कोळेकर साहेब
(सरचिटणीस यशवंत युवा सेना महा.राज्य)
मो.नं.+91 8275-206651

३)मा.अवधूत वाघमोडे साहेब
(यशवंत युवा सेना संपर्क प्रमुख महा.राज्य)
मो.नं.+91 98-90-506501

४)मा.ज्ञानेश पाटील सर
(सांगली जिल्हा संपर्क प्रमुख यशवंत युवा सेना)
मो.नं.+91 91-45-131950

५)मा. आण्णासाहेब कोळेकर
(आटपाडी तालुका प्रमुख यशवंत युवा सेना)
मो.नं.+91 96-89-136365

६)मा.दिनेश हुबाले (दादा)
(माण तालुका प्रमुख यशवंत युवा सेना)
मो.नं.+91 97-65-127726

     या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची भंडारा लावून निवड करण्यात आली त्याचप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनेची व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निष्ठा राखणार त्याचप्रमाणे ज्या समाजासाठी या यशवंत युवा सेना संघटनेची स्थापना त्या समाजासाठी अहोरात्र कार्य करणार असल्याची शपथ सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्याबरोबर स्व बी के कोकरे साहेबांचे नुसतेच विचार सांगून नव्हे तर ते कृतीतून दाखवून देणार असल्याचीही शपथ नवनिर्वाचित युवा पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्याबद्दल त्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनापासून हार्दिक हर्दिक अभिनंदन, समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी त्याचप्रमाणे माता-भगिणी व समाज रक्षणासाठी तुमच्या हातून चांगले कार्य घडो हीच मल्हारचरणी प्रार्थना.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

ह्रदयं झालीत दगडाची, संवेदना कोठून येणार??

ह्रदयं झालीत दगडाची, संवेदना कुठून येणार??
       मी फार मोठा विचारवंत नसलो तरी सामाजिक बांधिलकीची जबाबदारी म्हणून एक लेखक या नात्याने या विषयाला हात घालावासा वाटला. कारण आजचे आसपासचे दुषित वातावरण पाहिले की माझ्या मस्तकाची शीर उठते अन् तळपायाची आग पार मस्तकापर्यंत जाते आणि मेंदूवर आघात करायला सुरवात करते. आज आजूबाजूच्या वातावरणात फिरताना/वावरताना समाजात "संवेदना" शिल्लकच राहिली नाही हे दिसून येते आणि ते तितकेच सत्यही आहे. कालपरवा कोल्हापूर मधील बोंद्रेनगर येथील घडलेली घटना ताजी असतानाच रोजच्याच वृत्तपत्रात तशाच आणि चित्रविचित्र घटना घडल्याची कीतीतरी उदाहरणे देता येतील.
       आज सकाळी मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासात खचाखच गर्दी असल्याने उभा राहूनच प्रवास करवा लागला तेव्हा बाजूलाच बाकड्यावरती बसलेल्या एका वृद्धाच्या हातात असलेल्या लोकमत वृत्तपत्रातकडे सहज नजर गेली अन् पुन्हा पुन्हा माझे डोळे त्या वृत्तपत्रातील बातमीकडे विस्फारून पाहत होते अशी "बापानेच सहा वर्षाच्या चिमुरड्या मुलीला नदीत फेकले" या आशयाची बातमी वाचली अन् अक्षरशा माझे मन सुन्नच झाले. मुलीचं आणि बापाचं नातं हे अनोख्याप्रकारचे असते कारण बाप मुलीला मुलापेक्षाही जास्त जीवापाड जपत असतो आणि बापाला सांभाळून घेणारी फक्त मुलगीच असते. वडिलांच्या आवाजात जरी बदल झाला तरी मुलगी पटकन ओळखते असे नाते असताना त्या बातमीबद्दल लाखो विचारांनी डोक्यात थैमानच घातले. बाप दगडाच्या ह्रदयाचा कसा काय बनू शकतो?? यांवर माझा विश्वासच बसत नव्हता. आजच्या परिस्थीतीचा आढावा घेतघेतच विचार मनांत येत होते. मुलींच्याच बाबतीत घडणाऱ्या या मानवाच्या वाइट प्रवृत्तीला कसा आळा घालायचा?? यासाठी डोक्यात विचारचक्र सुरू झाले मग ठरवले की ज्याप्रमाणे इतिहासांत तलवारीने शत्रूंची डोकी नांगरली जायची, सपासप कापली जायची त्याचप्रमाणे या एकविसाव्या शतकातील वासनेने हपापलेल्या, गोरगरीब मजबूर असलेल्या तरुणींच्या आब्रुचे लचके तोडणाऱ्या लांडग्यांची त्या नराधमांची जर डोकी नांगरायची असतील तर कलमच चालवावं लागेल आणि प्रतिष्ठीतेचा बुरखा पांघरलेल्या नागरिकांना एक चपराक द्यावी म्हणून यासाठी मांडलेला हा लेखप्रपंच.
     स्त्रिभ्रूणहत्या, मुलींची छेडछाड, बलात्कार, विवाहीतेवर अन्याय अत्याचार, हुंडाबळी इत्यांदी सारख्या धटनांची यादी वाढवेल तितकी वाढतच जाईल पण कमी नाही आणि अशा प्रकारच्या घटना रोजच्याच आहेत आणि त्या काही नवीन नाहीत असे एखादा रोजचाच वाचक सहज बोलून जातो मग त्या वाचकाला माझा पुढचा प्रश्न असा असेल की 'आजपर्यंत घडलेल्या घटनांमद्ये अथवा इथून पुढे घडणाऱ्या घटनांमद्ये जर तुमची मुलगी असेल, आई-बहिण असेल आणि तुमच्याच नातेवाईंकापैकी कोणी स्त्री अथवा पत्नी असेल तर तुम्ही काय केले असते??' ती घटना तुमच्यासाठी नविन नसून जूनीच असेल तर या जगात तुमच्यासारख्या संवेदनाशून्य असलेल्या व्यक्तींचा आणि प्रवृत्तीचा मी खरंतर धिक्कार करतो. कारण त्या त्या पिडीत मुलीचा बाप, भाऊ, मुलगा अथवा पती या नात्याला तुम्ही कलंक आहात असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. म्हणूनच की काय आजच्या वर्तमानपत्रातील ती घटना घडली असावी. ज्या चिमुरडीला तिच्या बापाने नदीमद्ये फेकून दिले सुदैवाने ती वाचली दहा तास मृत्यूशी झुंज देत होती. पण त्या घटनेचे कारण असे की वरील परिस्थीती भविष्यात कधीही उद्भवू शकते म्हणूनच...  या एकविसाव्या शतकात मराठी फिल्मइंडस्ट्रीच नव्हे तर बाॅलीवूड अथवा हाॅलीवूड असो यांसख्या चित्रपटातून भावना चाळवतील अशी लुभावणारी दृश्य दाखवल्याने तरूण पिढीच्या मनावरती विपरीत परिणाम झाला आणि होतही आहे. चित्रपटातील तोकडी आणि तंग कपडे पाहून भारतीय संस्कृत्ती विसरून पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करत अंगप्रदर्शन करणाऱ्यांमुळे आज समाजातील तरूणांच्या लैंगिक वासना भडकवल्या जातात मग मस्तावलेली टपोरी पोरं वाटेल तसे जीवन जगू लागतात. रस्त्यावरून एकटी चाललेली तरूणी म्हणजेच त्यांच्या बापाचा माल असे समजून तुटून पडतात, मग त्या घरच्यांचे संस्कार नसलेल्या त्या टपोऱ्या पोरांच्या हव्यासापोटीच कमजोर आणि मजबूर मुली त्या वासनाधीन लांडग्यांच्या शिकार बनतात. जर एखाद्या मुलीसोबत अशी घटना घडत असेल, कोणी तिची छेडछाड करत असेल, कोणी त्रास देत असेल तर ती मुलगी कधीही आणि कोणाकडेही तक्रार करत नाही याकडे त्या दुर्लक्ष करतात आणि जर पालकांकडे तक्रार केलीच तर बदनामी होईल म्हणून पालकच त्या मुलीची मुस्कटदाबी करून तिला शांत राहण्यास प्रवृत्त करतात मग सततच्या या त्रासाला कंटाळून पल्लवी बोडेकर सारख्या आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुली ऐन तारूण्यातच आत्महत्या करून जीवनयात्रा संपवितात.
     राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता अहिल्याई होळकर, क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या लेकी असा अन्याय अत्याचार करणाऱ्या टपोऱ्यांना त्यांच्या मुस्काडात वाजवून प्रतिकार करत नसल्याने हे प्रकार दिवसेंदिवस जास्तच वाढत चाललेत. मग अशा घटना सर्रास घडत असतानाच मुलीची बदनामी होऊ नये म्हणून इज्जतीसाठी मूग गिळून बसण्याशिवाय पर्याय नसतो मग पुढे मुलीच्या लग्नासाठी देखील खिशात आणा नसताना समाजातील हुंडापद्धतीलाही सामोरे जायचे असते, भविष्यातील मुलीच्या भल्यासाठी झटत असताना आजूबाच्या वासनेने बरबटलेल्या कुत्र्यांशी दोन हात करण्यापेक्षा दगडासारखं ह्रदय बनवून तिला गर्भात मारणे अथवा मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीचा जीव घेणं हे बापालाही मान्य नसतं पण आजूबाजूचे दुषित झालेले वातावरण त्या बापाला दगडासारखं ह्रदय बनवण्यास मजबूर करते. पण पोलिसयंत्रणा, कायदा आणि सुव्यवस्था मात्र हातावर हात बांधून शांत बसते आणि मग ज्या बापाच्या हातून हे अपराध घडतात ते बापच गुन्हेगार ठरतात, त्यांना लगेच शिक्षा होते पण मुलींची छेडछाड काढणारी, इज्जत लुटणारी, समाजातील हुंडाबळी घेणारी कुत्री मात्र मोकाटच बोंबलत फिरतात त्यांना आवर घातला पाहिजे.
      खरंतर ही जबाबदारी आता सामाजिक संघटनांवरती येऊन ठेपली असली तरी आज काही सामाजिक संघटना (सर्वच नव्हे) अशा घटनांचा (स्वार्थासाठी) निषेध करतात, पिडीतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करून त्यांची जबाबदारी स्विकारतात खरं पण स्वताच्या प्रसिद्धीसाठी त्याचा एवढा अवडंब करतात /टेंभा मिरवतात की त्यांच्याशिवाय एवढे चांगले काम कोणीच करू शकत नाहीत या अहंकारात गडी नाचत असतात बोंबलत असतात पण ज्याप्रमाणे "दिव्याखाली अंधार" असतो त्याप्रमाणे मुलींची छेडछाड, बलात्कार, स्त्रिभ्रूणहत्या, हुंडाबळी यांसारख्या घटनांना कारणीभूत असलेल्या कलंकित पोरांना सोबत घेवून अशा संघटना काम करत असतील तर तुमच्या त्या कार्याला काय अर्थ?? त्या कलंकित वृत्तीच्या आणि संकुचित बुद्धीच्या वासनेने भुकेलेल्या गिधडांना स्वताच्या आई-बहीणींदेखील दिसत नाही एवढे त्यात बुडालेले असतात मग त्या संबंधित संघटनेतला प्रत्येक कार्यकर्ता बदनामीस पात्र ठरतो. त्या कलंकितांची ह्रदयं ही दगडाची असल्याने त्यांना सोबत घेऊन काम करणाऱ्यांची ह्रदयं सुद्धा दगडाचीच आहेत असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही, मग "संवेदना" कुठे शिल्लक राहतेय तेच मला समजत नाही.???

जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com