Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Monday 21 May 2018

...तर मग तिसऱ्या आघाडीचा पर्याय योग्यच - ✍️नितीनराजे अनुसे

पंढरपूर येथील धनगर समाज आयोजित सत्ता संपादन निर्धार महामेळाव्यास उपस्थित जनसमुदाय

     गेल्या ७० वर्षांपासून कॉंग्रेस राष्ट्रवादी यांनी मिळून धनगर समाजेत्तर इतर बहुजन समाजाचा वापर करून त्यांना सत्तेपासून राजकारणापासून उपेक्षितच ठेवले आहे त्यातच पंढरपूर-बारामतीच्या आरक्षण दींडी मुळे बारामती मध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून धनगर समाजाची जी आक्रमता व्यक्त केली त्याची सहानुभूती दाखवून भाजप सरकारने धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवून सत्ता हस्तगत केली मात्र धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून आघाडी सरकार प्रमाणेच वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या....
     माझा भोळा धनगर समाज हा धनगर समाजातील नेत्यांच्या भूलथापांना बळी पडला, गेल्या ७० वर्षांपासून प्रस्तापित मस्तवाल नेत्यांच्या अन्यायाखाली पिचत पडलेला समाज हा कवडस्यातून पडलेल्या आशेच्या किरणाप्रमाणे समाजाचा कुठेतरी विकास होईल म्हणून देवेंद्र फसणवीस यांच्या गुळमुळीत भाषणाला भुलून आगीतून उठला खरा पण पुन्हा फुफाट्यातच पडला. आघाडी सरकार प्रमाणेच केंद्र सरकारला धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीची साधी शिफारस न पाठवणारे हे भाजप-शिवसेना सरकार देखील नपुंसक ठरले. मग धनगर समाजाने बघायचे कोणाकडे? त्यात धनगर समाजाचे नेते देखील त्याच लायकीचे एखादे आमदारकीचे, खासदारकीचे, मंत्रीपदाचे हाडूक चाटायला भेटले तर विधानसभेत, राज्यसभेत आरक्षण प्रश्नावर साधा ब्र देखील काढायचा नाही आणि निवडणुकीत मात्र ह्यांना धनगर समाज हवा असतो तो फक्त मतदानापुरताच... पाठीमागे काहीजण विचारत होते की धनगर समाजाला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी सरकार नको, भाजप-शिवसेना युती नको तर पर्याय तरी कळवा...  तर मग हा घ्या तिसऱ्या आघाडीचा पर्याय डॉ बाळासाहेब आंबेडकर यांचा भारिप आणि धनगर समाज मिळून सत्ता हस्तगत करा... काहीजण म्हंटले डॉ बाळासाहेब आंबेडकर नको. तर का नको? तुम्हाला धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणारे नेते चालतात ज्यांनी धनगर आणि धनगड चा घोळ घालून केंद्र सरकारला उलट-सुलट रिपोर्ट पाठवले... तुम्हाला ते नेते चालतात जिथे गरज नसताना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कडून अहवाल मागविले जातात आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवायचे षडयंत्र रचतात मग भारिप का नको? चाखू द्या ना त्यांना सत्तेची फळं... बाकीच्यांनी सत्तेची फळं चाखली तर ती तुम्हाला चालतात मात्र इथेच का तुमच्या जातीयवादाचे घोडे पेंड खात बसले आहे. ज्यांनी मानवतेला लाजवणारी मनुस्मृती जाळून देशाचे संविधान लिहिले आणि माणसासारखे जगायला शिकवले त्यांच्या वारसदारांनी फळे चाखली तर मनुवाद्यांच्या आणि त्यांची विचारसरणी जोपासणाऱ्यांच्या पोटात माथेसुळ उठणारच यात काही शंकाच नाही.
         आघाडी सरकार आणि युती सरकार यांना त्रासलेल्या धनगर समाजाचा असंतोष शिगेला पोहोचण्याचे कारण म्हणजे आजपर्यंत धनगर समाजाची झालेली फसवणूक त्यामुळे तिसरी आघाडी धनगर समाजाला सत्तेत घ्यायला तयार आहे पण धनगर समाजातील किती नेतृत्व यासाठी पणाला लागणार आहे याचा देखील करणे गरजेचं आहे. आजपर्यंत धनगर समाजातील सामाजिक संघटनांनी आणि बोटावर मोजण्याइतपत धनगर नेत्यांनी धनगर समाजातून लोकसंख्येच्या तुलनेने पाहिजे असे सक्षम नेतृत्वच घडवले नाही उलट एखादे तयार होत असेल तर माझ्यापेक्षा तो मोठा होईल या भितीने हातातोंडाशी आलेले नेतृत्व बाद करण्याचेच राजकारण केले त्यामुळे धनगर समाजाचा विधानसभेतील आणि लोकसभेतील टक्का वाढलाच नाही. एकमेकांच्या जिरवाजिरवीच्या आणि एकमेकांच्या उरावर बसण्याच्या स्पर्धेत धनगर नेत्यांनी धनगर समाजाचे फार मोठे वाटोळे केले आहे.
      काल पंढरपूर येथील धनगर समाज आयोजित सत्ता संपादन निर्धार महामेळाव्यात प्रचंड संख्येने धनगर समाजेत्तर बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता तेव्हा आंबेडकर म्हणाले की धनगर समाजाने आता सावज न होता शिकारी बनायला हवं. मग आता धनगर समाजातील संघटनांनी धनगर समाजातील नेत्यांनी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करायला हवे की जर धनगर समाजाला शिकारी व्हायचेच असेल कोण-कोणत्या आणि किती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातून तुम्ही शिकार करणार? कोण आणि कशी करणार? कारण निवडणूका तर जवळ आल्यात... आणि एवढ्या अल्पावधीतच समाजातून किती नेतृत्व घडणार या प्रश्नांनी डोक्यात नुसता धुमाकूळ घातलाय.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com

Monday 14 May 2018

सामाजिक संघटनांनी आत्मपरिक्षण करावे : नितीनराजे अनुसे

        समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक संघटनांची उभारणी करण्यात येते स्थापना करण्यात येते परंतु संघटनेचे मुळ उद्धिष्ट बाजूला राहून समाजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी नुसती बैनरबाजी आणि स्वतःची प्रसिद्धी करण्यात व्यस्त असलेल्या मंडळींना/संघटनांना समाजाकडे वळून पाहायला आज फुरसत देखील नाही. सामाजिक संघटनेच्या माध्यमातून धनगर समाजातून नवनवीन नेतृत्व घडायला हवे होते पण तसे झाले नाही. स्वताच नेते बनून एखादी विधानपरिषद मिळतेय का .. यावरती डोळा ठेवून असलेले संघटनांचे नेते समाजाचा काय खाक विकास करणार का? काल परवा कोणीतरी म्हंटले आमचा इतिहास आमूक आहे आमचा इतिहास तमूक आहे म्हणून आमच्याकडे नेतृत्व द्या... अरे नेतृत्व हे काय मागून घ्यायची गोष्ट आहे का? राजसत्ता आणि राजपथ हा मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. आज तुम्ही ज्या संघटना उभा केल्या आहेत त्यातून नेतृत्व घडवा आणि त्या त्या नेतृत्वाखाली समाजाचे प्रश्न सोडवा , मेंढपाळांचे प्रश्न सोडवा, मेंढपाळांच्या पोरांचे, शिक्षणाचे, नोकरीचे तसेच पारंपरिक व्यवसायाचे प्रश्न सोडवा तर आणि तरच समाज तुमचे नेतृत्व मान्य करेल आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तयार झालेले नेतृत्व विधानसभेत आणि लोकसभेत लोकप्रतिनिधी म्हणून जातील तेव्हाच धनगर समाजाचा टक्का लोकसभेत आणि विधानसभेत वाढेल.
         समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, समाजाच्या एकत्रिकरणासाठी जर सामाजिक संघटना कार्यरत नसतील अथवा एकत्रित येत नसतील समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार वरती दबाव आणू शकत नसतील तर त्या संघटना काय जाळायला काढल्यात का? हा प्रश्न मला एकट्याला पडत नाही तर प्रत्येक धनगर समाजबांधवांना पडतोय म्हणून सामाजिक संघटनांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करून समाजहितासाठी कार्यरत रहावे. धनगर समाजाचे नेतृत्व जर मजबूत आणि लायक असेल तर धनगर समाजाला कोणाकडे भिक मागायची गरज पडणार नाही.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com