Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Friday 27 April 2018

धनगर नेत्यांनी राजकारण सोडावे का? ✒नितीनराजे अनुसे



धनगर नेत्यांनी राजकारण सोडावे का?
खरंतर हा एक चिंतेचा विषय बनून गेला आहे. कालपरवा मी मुद्दामहून दोन पोस्ट टाकल्या होत्या त्यातील पहिली म्हणजे "धनगर नेत्यांनो तुम्ही आमच्यामुळे मोठे झाला आणि गाजला पण धनगर समाजाचे प्रश्न न सोडवताच तुम्ही एवढे कसे काय माजला?" आणि कालची दुसरी पोस्ट म्हणजे "तर धनगर समाज आक्रमक होणारच " या आशयाचा लेख लिहून समाजातील समाजबांधवांच्या आणि सामाजिक संघटनांच्या भावना जाणून घेतल्या. तो लेख लिहण्यापाठीमागे कोणाचे समर्थन करणे, कोणाला शिव्या देणे हा उद्देश्य नव्हता तर धनगर समाजातील सामाजिक संघटनांचे धनगर नेत्यांबद्दल नक्की काय विचार आहेत? धनगर नेत्यांबद्दल त्यांचा किती रोष आहे?  या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी मला हे पाऊल उचलावे लागले त्यातून ज्यांनी ज्यांनी सकारात्मक आणि नकारात्मक विचार करून त्यावर मत मांडले त्याबद्दल त्यांचे खरंतर आभार.
     आता धनगर नेत्यांनी राजकारण सोडावे का?  हा प्रश्न मला एकट्यालाच नव्हे तर तळागळातील सर्व समाजबांधवांना आणि युवा वर्गाला पडलेला दिसतोय. आंबेडकरांची तिसरी आघाडी ही धनगर समाजाला कशावरून आरक्षण देऊ शकते हे आंबेडकरांनाच विचारायला हवं पण तत्पूर्वी त्या मंत्रिमंडळात धनगर समाजाच्या वाट्याला लोकसंख्येच्या तुलनेत किती विधानसभेच्या किती जागा मिळतील? धनगर समाजाचे किती मंत्री आंबेडकरांच्या मंत्रिमंडळात असतील? या बद्दल शहानिशा करणे उचित वाटते. तसे पाहायला गेले तर सध्य परिस्थितिला आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचा सांगोला विधानसभा मतदारसंघ सोडला तर अन्य कोणत्याही धनगर नेत्यांसाठी सुरक्षित असा मतदारसंघ दिसत नाही. करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील व आमदार अनिल (आण्णा)  गोटे यांचा देखिल मतदारसंघ पूर्णतः नव्हे तर काहीअंशी सुरक्षित आहे. पदुम मंत्री ना.महादेवजी जानकर साहेब, जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे साहेब, माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे, मा. गोपीचंद पडळकर साहेब, आमदार दत्ता (मामा) भरणे, आमदार रामहरी रूपनर (आप्पा), आमदार रामराव वडकुते साहेब,  माजी आमदार भदे साहेब, प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर या बोटावर मोजण्याइतपत धनगर नेत्यांना तरी सुरक्षित असा लोकसभा/विधानसभा मतदारसंघ कुठेच सुरक्षित दिसत नाही. मग तिसरी आघाडी एका वर्षात असे कोणते नेतृत्व तयार करणार आहे हे राम जाने... आणि तसेही रिडालोस (रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी) धनगर समाजाचे किती आमदार निवडून आणू शकले? एकही नाही कारण धनगर समाजातील नेत्यांसाठी एकही मतदारसंघ सुरक्षित नाही असे असताना आजपर्यंत कोणत्याही सामाजिक संघटनांनी नविन नेतृत्व बळकट करण्याचे अथवा तयार करण्याचे प्रयत्न केले नाहीत उलट धनगर समाजाचे जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याशिवाय दुसरे उद्योग त्यांना जमलेच नाही. मग तिसरी आघाडी म्हणुन मिरवल्या जाणार्या आंबेडकरांच्या मंत्रिमंडळात नक्की कोणतं नेतृत्व पुढे येणार हे कोणास ठाऊक?
         आजकाल तास अर्ध्या तासात अनेक स्वयंघोषित व बालिश नेतृत्व तयार होतात पण ज्याप्रमाणे लाल मातीत अंग घोसळलेल्या, मल्लविद्यामध्ये पारंगत असलेल्या पैलवानाला जसा पट्टीचा खेळाडू, कुस्तिपट्टू बनायला जसा काळ लागतो तसाच पट्टीचा राजकीय नेता बनायला देखिल काळ वेळ लागतो. त्यासाठी राजकीय डावपेच खेळायला जमलं पाहिजे तर आणि तरच विधानसभेत आणि लोकसभेत धनगर आमदार खासदारांचा टक्का वाढेल यासाठी सामाजिक संघटनांची भूमिका नेतृत्व घडविण्यासाठी उपयोगात यायला हवी होती पण तसे न करता सामाजिक संघटनांनी आणि संघटनांच्या पदाधिकारी यांनी धनगर नेत्यांचेच पाय ओढण्यासाठी उर्जा व्यर्थ खर्च केली म्हणून धनगर समाजाचे नेतृत्व ना घडले ना बळकट झाले.
      एखादा प्रस्थापित नेता स्टेजवर येऊन आपल्या धनगर समाजाच्या नेत्यांना शिव्या घालत असतो तेव्हा धनगर समाजातील खाली बसलेली मंडळी तसेच युवा वर्ग हा टाळ्या वाजवत बसतो हे चित्र जरा विचित्रच दिसतं. खरंतर तेव्हा लाज वाटते धनगर म्हणवून घ्यायची... पण जेव्हा तीच टाळ्या वाजवणारी तरणीबांड पोरं जेव्हा हातात चप्पल घेऊन त्या शिव्या देणार्या प्रस्थापित मस्तावलेल्या नेत्यांच्या दिशेने भिरकवतील तेव्हाच खर्या अर्थाने धनगर समाज राजकीय क्षेत्रात मुसंडी मारेल व नवनविन नेतृत्व तयार होऊन लोकसभेतील आणि विधानसभेतील सदस्यांचा टक्का वाढेल. पुढे कोणाच्या बापाची देखिल हिम्मत होणार नाही धनगर नेत्यांना शिव्या घालायची.... ज्या उद्देशाने पावलापावलावर संघटनांच्या स्थापना झाल्या तो उद्देश्य धुळीस मिळवून नेतृत्व घडविण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी अपयशी ठरलेल्या संघटना मात्र नेत्यांना शिव्या घालत आपल्याच धनगर नेत्यांच्या विरोधात दंड थोपटून उभा आहेत. आणि नेते देखिल समाजाकडे पाठ फिरवताहेत अशाने धनगर नेेतृत्वांचे नामोनिशान मिटून जाईन. ही खेकडा प्रवृति जो पर्यंत समाजातून हद्दपार होत नाही आणि धनगर नेतृत्व ना वाढणार ना बळकट होणार. त्यासाठी धनगर समाजातील युवक-युवतींनी विचार करून त्यावर आत्मचिंतन करायला हवं आणि धनगर नेतृत्व मात्र अबाधित राखायला हवं.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंराजे
✒नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
📞+918530004123
📨 nitinrajeanuse123@gmail.com