Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Wednesday 21 March 2018

शुभेच्छांचा अभिप्राय - ✍️ नितीनराजे अनुसे

माझ्या वाढदिवसानिमीत्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल अभिप्राय...
काल दि २० मार्च रोजी माझ्या वाढदिवसानिमीत्त अखंड देशभरातून माझे आप्त, मित्रपरिवार, सहकारी वर्ग, वर्गमित्र तसेच महाराष्ट्र राज्यातील ज्ञात/अज्ञात तमाम लहानथोर समाजबांधवांनी फोन वरून, प्रत्यक्ष भेटून तसेच व्हाटसॲप फेसबुकच्या माध्यमातून प्रत्यक्षरित्या अथवा अप्रत्यक्षरित्या माझ्यावरती जो शुभेच्छांचा वर्षाव केला त्याबद्दल आणि जे शुभेच्छा देऊ शकले नाहीत त्याबद्दल देखिल तुम्हा सर्वांचा मी ह्रदयाच्या अंतकारणापासून खूप खूप आभारी आहे. मला शुभेच्छा दिल्या नाहीत असे महाराष्ट्र राज्यातील एकही गाव नाही. कारण जिथे साधे वर्तमानपत्र पोहचत नाही दूरदर्शन तरी खूप दूरची गोष्ट अशा डोंगरदऱ्यात राहणाऱ्या समाजबांधवांपर्यंत २६०० पेक्षाही जास्त व्हाटसॲप ग्रुपच्या माध्यमातून माझे समाजप्रबोधनाचे लेख त्यांच्यापर्यंत पोहचत असतात आणि ते मला नेहमी अवर्जून कळवतात देखिल.... अशा प्रत्येक वाड्या-वस्त्यावरून समाजकार्याच्या चळवळीत असलेल्या एकाच रक्ताच्या आणि हाडामांसाच्या समाजबांधवांनी शुभेच्छांच्या माध्यमातून माझ्यावरती जे प्रेम व्यक्त केले त्यातून समाजासाठी सत्कार्य करण्याची मला फार मोठी ताकद मिळते/प्रेरणा मिळते. खरंतर मी काही फार मोठा लेखक, वक्ता, व्याखाता, तत्ववेत्ता अथवा फार मोठा काही विचारवंत देखिल नाही परंतू माझ्या भोळ्या-भाबड्या समाजावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे न्यायासाठी/हक्कासाठी लढणे, झटणे आणि झगडणे हे आमच्या रक्तातच असल्याने तो अन्यायाच्या विरोधातील आवाज मी माझ्या लेखणीच्या माध्यमातून स्वाभिमानी समाजमनापर्यंत पोहोचवतो आणि मी ते माझे आद्यकर्तव्य समजतो.
     काही कारणास्तव मी महाराष्ट्र राज्याबाहेर असल्याने सर्वांची भेट घेणे, सामाजिक कार्यक्रम, जयंती सोहळा असो, समाजाचे कोणतेही आंदोलन अथवा मोर्चा असो मला प्रत्यक्षरित्या त्यामध्ये सहभागी होता येत नाही तरी माझा वर्गमित्र राहूल जावीर (RJ) याने काल सांगितल्याप्रमाणे व्हाटसॲप, फेसबुक, ट्विटर, हाइक, गुगल, ब्लाॅगर यांसारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून मी प्रत्येक समाजबांवांशी (24*7) संपर्कात असतो. धनगर समाजातीलच काही महान व्यक्ती मला म्हणाल्या की तुम्ही जातीयवाद करता... परंतू जर मला जातीयवाद करायचा असता किंवा करत असलो तर मग  जीवाला जीव देणारे अन्य जाती-धर्मातील माझे मित्र माझ्यापासून कधीच दूर झाले असते. त्यांच्या मनात देखिल असा विचार कधीच आला नाही तर मग हा न्यूनगंड माझ्याच धनगर समाजात का? असा प्रश्न मला नेहमीच पडतो... असो क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या विचारधारेतून प्रेरित होऊन समाजप्रबोधनाच्या चळवळीतील एक सर्वसामान्य मेंढपाळ कुटूंबातील एक छोटासा कार्यकर्ता नव युवा लेखक म्हणून मला जी ओळख मिळाली त्यात माझ्या आई-तात्यांसोबतच तुम्हा सर्वांचं देखिल फार मोठं योगदान आहे. त्याच जोरावर आणि माझे गुरू प्रा.श्रीकृष्ण पडळकर सर (M.Phil) यांच्या मार्गदर्शनातून अन्यायाच्या खाईत होरपळलेल्या/खचलेल्या/पिचलेल्या तसेच अंधकारात गुरफटलेल्या धनगर समाजासपुन्हा एक नवी दिशानावाचं पुस्तक येत्या एप्रिल मध्ये प्रकाशित करून वाचकांसमोर ठेवतोय. तसेच महाराष्ट्राबाहेर असल्याने फार दिवसांपासून प्रलंबित असलेले चरित्र म्हणजेच ज्या माणसानं स्वताच्या आयुष्याची राखरांगोळी करून अखंड धनगर समाजाला जागं केलं त्या क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे त्यांचे जीवन चरित्र प्रिंटींग होत असून लवकरच ते देखिल प्रकाशित होईल आणि जेव्हा मी महाराष्ट्रात येईन तेव्हा ते समाजबांधवांच्या हातात असेल
असो तुम्ही मला शुभेच्छा देऊन माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला त्याबद्दल पुनश: एकदा मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१८५३०००४१२३

Saturday 17 March 2018

धनगरांच्या अर्ध्या भाकरीचा चंद्र...

धनगर म्हणजे धगधगणारा पिवळा ज्वालामुखी
या जगाच्या पाठीवर हजारो वर्षापेक्षाही जास्त काळ राज्यकारभार केलेल्या थोर महापुरूषांच्या जातीत जन्माला आलेल्या आम्ही औलादी, धुरंदर लढवय्यांचे शुरवीरांचे आम्ही वारसदार पण आज आम्ही कोणतं जगणं जगतोय ते पाहून खरोखरंच लाज वाटतेंय. अरे एकेकाळी राजा समाजात जन्माला आलेल्या आम्ही औलादी आज गुलामगीरीतलं जगणं जगतोय याची जरा तरी लाज वाटायला हवी का नको?? मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर शत्रुंना तोलून त्यांच्या छाताडावर थायथाय नाचणाऱ्या थोर महापुरूषांच्या जातीत जन्माला यायला नशिब लागतं त्याच वाघाच्या काळजाच्या आम्ही औलादी, शत्रूंच्या चिंद्या चिंद्या उडवून  स्वबळावर अनेक किल्ले, परगणे, महाल हासील करून साम्राज्य उभे करणाऱ्यांपैकी आम्ही आज आमच्या हक्काच्याच आरक्षणाची भिक मागत बसलोय याचीच लाज वाटतेंय. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण दिले पण आमच्या अज्ञानपणामुळे त्या अनुसुचित जमातीच्या सवलतींचा आम्ही लाभ घेऊ शकलो नाही त्यातच मस्तावलेल्या आणि माजलेल्या प्रस्तापित औलादी "धनगड" आणि "धनगर" एकच असताना ते वेगळे असल्याचे उलट-सुलट रिपोर्ट देऊन धनगर आरक्षणाचं घोंगडं भिजत ठेवायला यशस्वी झाले
आज तेच लोक त्यांचे सरकार ढासळल्यानंतर आम्ही आरक्षण देणार आरक्षण देणार असा दिंडोरा पिटू लागलेत. त्यांना जाऊन सांगा कोणीतरी आरं आम्हाला नव्याने कोणते आरक्षण नको आहे पण आम्हाला जे राज्यघटनेत दिले आहे त्याची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे. आज महाराष्ट्र राज्यात दीड-दोन कोटींच्या घरात अर्थातच एकूण लोकसंख्येच्या १७-१८ % धनगर समाजाची लोकसंख्या असताना धनगर समाजाला मात्र .% मद्ये अडकवून ठेवायचे काम पवारांनी केले. मुळात धनगर अनुसुचित जमातीमद्ये असताना त्या सवलती लागू कराव्यात यासाठी स्व.बी.के.कोकरे साहेबांनी खंबाटकीच्या घाटात जेव्हा आंदोलन केले तेव्हा त्या आंदोलनाची दखल घेत धनगर समाजाचा शत्रू असलेल्या पवारांनी धनगर समाजातील नेत्यांना हाताशी धरून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू करण्याऐवजी धनगर समाजाला महाराष्ट्र राज्यात भटक्या जमाती () मद्ये वेगळी सुची बनवून दिली. त्यामुळे केंद्रात धनगर समाजाला ओबीसी मद्ये अडकविल गेलं. धनगर समाजाला अनुसुचित जमातीऐवजी महाराष्ट्र राज्यात भटक्या जमाती () तर केंद्रात ओबीसी मद्ये घालून पवारांनी फार मोठे पाप केले. गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाज या सवलतीला मुकल्यामुळे धनगर समाज आर्थिकदृष्ट्या तर मागासच राहिला शिवाय राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्याही धनगर समाजाची वाताहात झाली. धनगर समाजाचे आजपर्यंत जे वाटोळं झालं ते धनगर समाजातील नेत्यांमुळेच झाले ज्यांनी पवारांवरती विश्वास ठेवला आणि आजही तेच दौंडी पिटताहेत की पवार देणार पवार देणार पण त्यांना हे कुठे माहितीय की एका बाजूला पिचडला धनगर समाजाच्या विरोधात बोलायला लावायचं आणि दुसऱ्या बाजूला धनगर समाजातील नेत्यांना पुढे करून धनगर समाजाला फसवायचं ही पवारांची राजनीती आमच्या धनगर समाजबांधवांना कोण समजावून सांगणार?? पाठीमागच्या सरकार प्रमाणेच आताचे भाजप सरकार देखिल तितकेच नपूसंक ठरले धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून आश्वासनांवरती आश्वासनांचा पाऊस पाडून महाराष्ट्रात देवेंद्र आणि देशात नरेंद्र हे धनगरांच्या हक्काच्या अर्ध्या भाकरीचा चंद्र हिसकावून घेण्याचा आणि धनगर समाजाला नागविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. आता हे कुठेतरी थांबायला हवं यासाठी आरक्षण चळवळीत सहभागी व्हा संघटना कोणतीही असो उद्देश मात्र समाजाच्या विकासाचा असला पाहिजे ज्या संघटना स्वार्थासाठी आणि श्रेयासाठी काम करतात त्यांना समाजाचे काहीही पडलेले नसते. एखादा कोणी चांगले काम करत असेल तर संघटनेच्या नावाखाली त्याला फोन करून धमक्या देणे, टीका करणे, त्याच्या पायात पाय अडकवणे असे प्रकार चालू आहेत. अरे संघटना या समाजाच्या विकासासाठी असतात चांगले काम करणाऱ्यांना धमकवण्यासाठी नव्हे. कुठलीतरी स्टंटबाजी केली म्हणजे तुम्ही समाजासाठी काम करताय असे होत नाही. त्यातून फलित काय झाले हे महत्वाचे असते... अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या राजा मल्हारराव होळकरांचे आम्ही मावळे, राष्ट्रमाता अहिल्याई होळकरांचे आम्ही भक्त, महाराजा यशवंतराव होळकरांचे आम्ही वारसदार अशा धुरंदर लढवय्यांच्या जातीत जन्माला आलेली माणसं राजकारणावेळी राजकारण अवश्य करावे पण धनगर समाजाचा जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित होईल जेव्हा जेव्हा धनगर समाजावर अन्याय होईल तेव्हा आपापल्या नेत्यांची आपापल्या पक्षांची धोतरं सांभाळत बसण्यापेक्षा समाजासाठी, समाजाच्या न्याय हक्कासाठी एकत्रित येवून लढा द्या हीच नम्र विनंती.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१८५३०००४१२३

https://nitinrajeanuse123.blogspot.com