Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday 29 December 2015

चांगभलं बिरोबा अन् आरक्षणाचा खेळखंडोबा...


               डॉ बाबासाहेबांनी धनगर समाजाला राज्यघटनेत कलम ३४२ च्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अ.क्र.३६ वरती आरक्षण दिलेले आहे. केवळ शब्दच्छल झाल्याने अर्थातच "धनगर" ऐवजी "धनगड" (र चा ड) झाल्याने सगळा राडा झाला आहे. गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाज अनुसुचित जमातीच्या सवलतींपासून वंचित असल्याने धनगर समाजाचे झालेले नुकसान पुढील ६०-७० वर्षातसुद्धा भरून न येणारे आहे. यास रानोमाळी डोंगरदरीतून भटकणार्या धनगर समाजाचे अज्ञान जरी कारणीभूत असले तरी संविधानाच्या/राज्यघटनेच्या आधारावरती राज्यकारभार चालवणारे सरकार त्याहून अधिक जबाबदार आहे. धनगर समाजाला जाणूनबुजून अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचं काम प्रस्तापित व्यवस्था आणि परिणामी राज्यसरकार करत आहे. धनगर समाज जर निद्रावस्थेतून जागा झाला तर या प्रस्तापितांना त्यांची लायकी दाखवून देईल. ज्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्या समाजाची सत्ताकारणात भागीदारी लोकसंख्येच्या आधारवर तितकीच असणार आहे परंतू धनगर समाज अज्ञानाच्या खाईत होरपळला गेल्याने सत्ताकारणापासून ही जमात थोडी नाही तर खूपच दूर राहीली.
गेल्या ६५ वर्षापासून या भोळ्या भाबड्या धनगर समाजावरती अन्याय करण्याचा नंगानाच या महाराष्ट्र राज्यातील प्रस्तापित पवार पाटील देशमुख ठाकरेंनी आणि सदरच्या राज्य सरकारने चालवला आहे. धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपर्यात कुठेही पहावयास भेटत नसताना, धनगड नावाची जमातच आस्तित्वात नसताना महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात धनगड जमातीचा उल्लेख करायला डॉ.बाबासाहेब आंबेडकर काय मुर्ख होते का? हा माझा खडा सवाल मुख्यमंत्र्यांना, धनगर समाजाच्या या मागणीचा विरोध करणार्या त्या त्या आदिवाशी मंत्र्यांना आणि मेंदूला वाळवी लागलेल्या त्या वळवीला विचारायचा आहे. त्या वळवीचे म्हणणे आहे की राज्यघटनेत ३४२ च्या अनुछैद वरती ९ व्या परिशिष्टातील ३६ नंबर वरतीची जमात ही धांगड आहे आणि धांगड ही ओरॉनची तत्सम जात आहे. मग त्या वळवीने अभ्यास करावा की धांगड अथवा धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्यात कधीही जन्माला आली नव्हती मग डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जी राज्यघटना मसूदा समिती होती त्यांनी काय मुर्ख म्हणून अहवाल सादर केले होते का? एखादी जमात आस्तित्वातच नसेल तर मग राज्यघटनेत नमूद केलेल्या त्या जमातीबद्दल प्रतिवाद देखिल करता येतो.  Acre चे एकड होते, Chattisgarh चे छत्तीसगड होते, Gurgaon चे गुडगाव होते त्याचप्रमाणे Dhangar चे धनगड असे झाले आणि म्हणून त्याचाच परिणाम असा की महाराष्ट्र राज्यातील दीड ते दोन कोटी धनगर समाजबांधवांचे भविष्य अंधारातच राहिले. धनगर समाजाची हजारो पोरं आइ ए एस, आइ पी एस, डॉक्टर, इंजिनीयर, एडव्ह़केट होण्यापासून वंचित राहिली याला सर्वस्वी जबाबदार आजपर्यंतचे राज्य सरकार आहे राज्यघटनेचा अवमान करणार्या त्या त्या नेत्यांवरती देशद्रोहाचा देखिल खटला भरायला हवा.
आज इथे तर उद्या तिथे अशा प्रकारचे जीवन जगणारी धनगर जमात ही भटकी जमात असल्यामुळे १९९१ साली धनगर समाजाला अनुसुचित जमातीची मागणी डावलून महाराष्ट्र राज्यापुरतं भटक्या जमाती क मध्ये टाकण्याचे पाप पवारांनी केलं पण त्या पवारांना उचलू लागायला आमच्याच समाजाचे अज्ञानी महाबहाद्दर पुढे होते.
आदिवाशी असल्याचे निकष:
राज्यघटना मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि समितीकडून राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ ला अडॉप्ट केली होती आणि २६ जानेवारी १९५० साली आमलात आणली. २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसाच्या प्रदीर्घ काळानंतर म्हणजे जवळ जवळ ३ वर्षाचाच कालावधी लागला होता भारतीय संविधान लिहायला. राज्यघटना लिहताना त्यावेळी धनगर जमात ही माळोरानी डोंगर दरीतून भटकंती करत शेळ्या-मेंढ्यांची परिणामी स्वताच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरत असते याचा अभ्यास करूनच मसूदा समितीने आदिवाशी समाजबांधवांपेक्षा अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जगणार्या या जमातीला राज्यघटनेच्या अनुसुचित जमातीच्या यादीत अगोदरच सामाविष्ट केलेली आहे.
१) धनगर समाज ही आदिम जमात आहे शेळ्या मेंढ्या राखणे गाई-म्हैसी पाळणे हे आदिम जमातीचे व्यवसाय आहेत.
२)आदिम वैशिष्ट्ये/प्राचीन जीवनमान याचा अभ्यास केला तर डोंगरदरी माळरानावर जाऊन बघा शेळ्या-मेंढ्या राखणार्या समाजबांधवांची एकदा विचारपुस करून बघा मग समजतील आदिम वेशिष्ट्ये.
३)संस्कृति: धनगर जमातीची आदिवाशी जमातीसारखीच संस्कृति आहे खंडोबा, बिरोबा, धुळोबा हे धनगरांचे देव तसेच ढोल वाजवणे, धनगरी गजी नृत्य, धनगरी ओव्या यातून धनगर समाजाच्या संस्कृतिचा अभ्यास करता येतो. ओरॉन धनगर जमातीचे देव सुद्धा सारखेच आहेत.
४)भौगोलिक पृथक्करण: आदिवाशी जमात डोंगरदरीमध्ये जंगलामध्ये पाड्यावरती एकाच ठिकाणी स्थायिक राहते पण धनगर जमात ही डोंगर दरीमध्ये रानोमाळी, जंगलामध्ये आज इथे तर उद्या तिथे असे मुक्काम करत, अख्खा संसार घोड्याच्या पाठीवर लादून कोकरा-करडांचं आणि लेकराबाळाचं लटांबण घोड्याच्या पाठीवरील माचोळीवर मांडून तळहातावर पोट भरणारी धनगर जमात अभ्यासून पाहा.
५) लाजरे बुजरेपणा धनगर समाजातील बांधव जास्त लोकवस्तीत येत नाहीत समूहाने राहतात नागरी वस्तीत मिळत नाहीत मिसळत नाहीत कारण दिवसभर मेंढ्यांच्या पाठी पायाच्या नडग्या वाळवण्यातच कितीतरी पिढ्या बरबाद झाल्या त्यामुळे धनगर जमातीत अजूनही लाजरे बुजरे पणा तसाच आहे.
संघटितपणे लढाई महत्वाची:
धनगर समाजाला राज्यघटनेत अधिकार दिला असताना आदिवाशी पेक्षाही अत्यंत बिकट आणि हालाखीचे जीवन जगणारी धनगर जमात ही अनुसुचित जमातीमध्ये मोडत नाही असे ओरडून सांगणार्या अर्धवटांचे मला हसू येते. धनगर जमात ही भटकी जमात आहेच आहे आणि महाराष्ट्र राज्यात फक्त (केंद्रात नव्हे) धनगर जमात ही भटक्या जमाती -क मध्ये आहे. ते पण वक्रतुंडाच्या अवकृपेने १९९१ पासून पण आमच्या धनगर समाजाचं संघटन मजबूत असतं तर आज यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे साहेबांच्या प्रयत्नातून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती कधीच मिळाल्या असत्या आणि आजच्या प्रस्तापितांचे तळवे चाटणार्या नेत्यांना भिक मागायची वेळ आली नसती.
आज आदिवाशी समाजातील काही पोरं लिहू लागतात की धनगर समाजातील लोक र चा ड झाला असे सांगत रडत बसलेत पण त्या वळवी ला माझे सांगणे आहे की आम्ही रडणार्यांपैकी नाहीये जर मनात आणलं तर क्षणात एकेकाला पायाखाली घ्यायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. आजपर्यंत अन्यायाच्या विरोधात रणशिंग फुंकणारे फक्त धनगरच आहेत याचा विसर कोणास पडू नये. धनगर समाजात अज्ञान पसरवण्यास प्रस्तापित व्यवस्थाच जबाबदार असून धनगर समाजाने यास बळी न पडता सर्वानी एकजुटीने/संघटितपणे आपले हक्क हिसकावून घ्यायला हवेत नाहीतर पुढची पीढी आपल्या तोंडात शेण घालेल याचा विचार करा.
खरी चूक कोणाची??
देशाच्या स्वातंत्र्यानंतरच नव्हे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून धनगर समाजावरती सतत अन्याय होत आला आहे. आदीवाशीपेक्षाही धनगर समाज आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला असताना धनगड नावाची जमात महाराष्ट्रात नसताना राज्यघटनेत धनगड नावाचा उल्लेख करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना चुकीचे ठरवायचे की सर्वानुमते २६ जानेवारी १९५० ला आमलात आणलेल्या राज्यघटनेवरती आजचा राज्यकारभार चालवणारे राज्य सरकार चुकीचे ठरवायचे? धनगड नावाची जमात महाराष्ट्र राज्यात नाही शिवाय धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच असल्याचे संशोधकीय अहवाल असताना देखिल धनगर समाज आदिवाशींचे निकष पुर्ण करतो की नाही यासाठी टाटा इंन्सटीट्यूट अॉफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेला ६५ वर्षानंतर सर्वे करायला सांगणारे फडणवीस सरकार धनगर समाजाचे आरक्षण घशातून काढण्याचा प्रयत्न तरी करत नाही ना.??? अशी शंका कोणाच्याही मनात गोंधळ निर्माण करणारी आहे. यामुळे मागले तसेच म्होरले ही म्हण सार्थ ठरते की काय याचाच विचार सतत मनात घोळत असतो.

जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५३०००४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

⚡👉पुन्हा एक नवी दिशा...✨


अज्ञानाच्या खाईत लोटलेल्या आणि अंधकाराने ग्रासलेल्या माझ्या धनगर समाजाला खरंच एका नव्या दिशेची गरज आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या धनगर समाजाचं भट-ब्राह्मणांनी पार कंबरडंच मोडून ठेवलंय. भाकित सांगून आणि थापा मारुन भोळ्या भाबड्या धनगर समाजाला देवाधिकाच्या नादी लावायचं अन प्रशासनातील सर्व पदे काबूत ठेवायची हा त्या पाठीमागचा गणिमी कावा आज माझ्या धनगर समाजानं वेळीचं ओळखायला हवा.
५००० वर्षापूर्वी ज्या धनगर समाजानं अक्षरांचा शोध लावला तीच अक्षरे आज धनगर समाजापासून शेकडो मैल दूर आहेत असं का?? का ही अक्षरं आमच्यापर्यंत पोहचू शकली नाहीत?? ब्राह्मण शिक्षित झाले पण अक्षरांचा शोध लावणारा धनगर समाज अडाणी कसा काय राहिला याचा विचार तमाम धनगर बांधवांनी करायला हवा.
भर उन्हाळ्यात दिवसभर आग ओकणार्या सुर्याची किरणे झेलत, अंगाची काहिली होत असताना तप्त उन्हात दगडधोंडे अन काटेकुटे तुडवत शेळ्या मेंढ्या राखणार्या आई-वडिलांची अवस्था काय होते याचा विचार माझ्या धनगर समाजातील विद्यार्थी बांधवांनी  कधी केला का? पावसाळ्यामध्ये कधी कधी अवकाळी पावसाचा फटका तर गारांचा सपाटा सहन करावा लागतो. भर हिवाळ्यातील कडक थंडीमध्ये सुद्धा मेंढ्यांची राखण करावीच लागते.  इयत्ता सातवी नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लगातार दोन महिने मी शेळ्या-मेंढ्याकडेच होतो मग आज या गावी तर उद्या त्या गावी असा रोजचा प्रवास मी स्वतः अनुभवलाय. त्यामुळे उन्हाळा असो पावसाळा अथवा हिवाळा असो तिन्ही ऋतु मध्ये भयंकर ऊन, धो धो कोसळणारा मुसळधार पाऊस तसेच अंगाचा थरकाप उडवणारी कडक थंडी यांचा विचार न करता मेंढ्यामागे उभे ठाकायचे हे जणू काय धनगर समाजाच्या पाचवीलाच पुजलेलं, शिवाय इतरांसारखी कोणतीही साप्ताहिक अथवा मासिक सुट्टी माझ्या धनगर समाजातील आई-वडिलांना अनुभवता येत नाही त्यामुळेच शाळा असोत अथवा सरकारी कार्यालये यांपासून दूर राहिलेल्या धनगर समाजाला अंधकारातून प्रकाशात यायला तसा खूपच उशीर झाला आहे आणि अजूनही धनगर समाज म्हणावा तितका जागृत झालेला नाहीये.
आजचे विद्यार्थी अथवा पालक सहज बोलून जातात की शिक्षण घेवून अन् पदव्या हासिल करून काय फायदा?? नोकरीच मिळत नाही. पण त्या सर्वांना माझे एकच सांगणे आहे की बांधवांनो तुम्ही शिक्षण घेताना कधी तुमच्या आई-वडिलांच्या भावनांचा विचार केला होता का???  दिवसभर पायाच्या नडग्या दुखेपर्यंत शेळ्या-मेंढ्यांमागे उभे ठाकलेल्या आणि दुसर्यांच्या शेतात दिवसभर राबराब राबून घाम गाळून ५-५० रु कमविण्यासाठी अपार कष्ट करणार्या आपल्या आई-वडिलांच्या भावना काय असतील याचा विचार कधी केला का?? दिवसभर कष्ट करून थकून भागून घरी परतणार्या आई-वडिलांचा चेहरा अगदी सुकून जातो पण शाळेतून आपला मुलगा/मुलगी घरी आलेत की नाही याचा विचार करत ते झपाझप पावलं टाकत घरी येतात, शाळेतून आल्यानंतर घरासमोर अंगणात खेळत असलेल्या आपल्या मुलाला/मुलीला समोर पाहून त्या सुकलेल्या चेहर्यामध्ये एक विलक्षण आनंद दिसून येतो त्यांच्या ओठांवरती एक हलकसं स्मित हास्य उमटून दिसते, पण त्यांच्या त्या हास्यामध्ये भावना लपलेल्या असतात आणि त्यांना आपल्याकडून काही अपेक्षा देखिल असतात याची जाणीव तुमच्या-माझ्या सारख्यांना असायला हवी. जर तुम्ही आम्ही त्यांच्या भावना समजू शकत नसू तर मग आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला अन् आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. त्या भावना आणि त्यांच्या  अपेक्षा ज्यांना पुर्ण करता येत नसतील तर स्वतःला त्याची लाज वाटायला हवी. आपल्या मुला/मुलीनं खूप शिकावं IAS/IPS/Engineer/Advocate/Doctor/BUSINESSMEN तसेच इतर उच्च पदावरती पोहचावं, स्वतःचं तसेच आई-वडिलांचं नाव रोषण करावं या त्यांच्या भावना असतात मग त्या भावना ज्यांना ज्यांना समजतात तेच यशस्वी होतात.
ज्यांना आई वडिलांच्या हाताला बसणार्या चटक्याची जाण असते त्याला समाजावरती होणार्या अन्यायाचं भान असतं हे नाकारता येत नाही.
 एकदा आजोळी गेल्यानंतर तेथील शेजारच्या आजीनं मला सांगितलेलं एक वाक्य आयुष्यभर माझ्या लक्षात राहील ते म्हणजे "आयबाप आडाणी हायत म्हणून मेंढरं राखत्याती. पोरांनो तुमी तर शिका खूप मोठं व्हा अन् आय-बा च्या पायातली कुरपं मुजवा नायतर तुमीपण मेंढरं राखत बसचाल" त्या आजीच्या वाक्यामुळं आज माझं जीवन बदलले आहे. माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही तर आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव मला झाली होती कारण मी सुद्धा दोन-तीन महिने त्यांच्यासोबत गावोगावी फिरुन पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढ्या राखलेत तर कधी कधी मला एकट्यालाही दिवसभर मेंढ्यासोबत राहायचा योग आला होता कधी कोण्या शेतकर्यांच्या शिव्या तर कधी मार सुद्धा खावा लागायचा. मला ते अनुभवलेले दिवस नको होते म्हणून मी सरळ बोर्डिंग गाठलं होतं. धनगर समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ही उणीव  भासली नाही पाहिजे, आई-वडिलांच्या कष्टाची प्रत्येकाला जाण असेल तर उद्या भविष्यात धनगर समाजाची पोरं IAS/IPS/Doctor/Engineer/Advocate/Businessman या क्षेत्रात चमकतील, पुढच्या काही वर्षामद्ये भारताचं राजकारण आणि प्रशासन हे धनगर समाजातील पोरांच्या हातात येऊ शकते पण समाजातील तरुण-तरूणींना मार्गदर्शन आणि योग्य दिशा देणे गरजेचे आहे.जर पुन्हा एकदा समाजातील युवक युवतींना योग्य दिशा मिळाली तर मेंढ्यांच्या मागे नडग्या वाळवून घेणार्या आई-वडिलांना मेंढ्या राखायची गरज पडणार नाही.हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज पडणार नाही आणि ही एक दगडावरची रेषा आहे.
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
जय यशवंत!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३

nitinrajeanuse.blogspot.com

Wednesday 16 December 2015

धनगर सारा एक होऊ दे...

धनगर सारा एक होऊ दे....
पुस्तकं वाचली तर मस्तकं सुधरतील आणि मस्तकं सुधरली तर क्रांती घडेल. पण आज एकविसाव्या शतकामध्ये पोट-जातींच्या विळख्यात अडकलेला धनगर समाज एकत्रित येऊन क्रांती घडवेल असे मला यथकिंचितही वाटत नाही. कारण पोटजातीमध्ये विखूरला गेलेला धनगर समाज कधीही यशाचे शिखर गाठू शकणार नाही त्यासाठी समाजातील पोट-जातींचे साखळदंड तोडावे लागतील. पोट-जातीच्या नावाखाली विखुरल्या गेलेल्या धनगर समाजाला एकत्रित केलं तर नक्कीच क्रांती घडेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज पडणार नाही. राजा महाराजांच्या, थोर महापुरूषांच्या समाजात जन्माला आलेली आम्ही माणसं आज पोट-जातींचा विचार करत बसल्याने इतर समाजापेक्षा ५०-६० वर्ष पाठीमागे आहोत हे नाईलाजानं सांगायची वेळ येतेय.
धनगर समाज ही आदिम जमात असून अश्मयुगीन कालखंडात मानवाने सुरवातीला शेळ्या-मेंढ्या राखायला सुरवात केली होती तद्नंतर जोड धंदा म्हणून शेती, शेतीसाठी/शिकारीसाठी लागणारी हत्यारे अवजारे बनवणे अशा प्रकारे व्यवसाय हळूहळू वाढत गेले मग कालांतराने शेळ्या-मेंढ्या राखणारे - धनगर, शेती करणारे -कुणबी, शेतीसाठी लाकडाची अवजारे बनवणारे -सुतार, लोखंडाची अवजारे बनवणारे -लोहार, मातीपासून भांडी बनवणारे -कुंभार, गाई-म्हैसी सांभाळून दुधाचा व्यवसाय करणारे -गवळी अशा एक ना अनेक प्रकारच्या व्यवसायानुरूप त्या त्या जाती तयार झाल्या आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचं विभाजन झालं.
आज एकविसाव्या शतकाचा जर विचार केला तर धनगर समाजातही पोट-जाती असल्याचे चित्र दिसून येते. एकाच रक्ताची अन् हाडामांसाची माणसं पोटजातीचा उदो उदो करत आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हेच सांगत सुटलेत पण नुकसान माझ्याच समाजाचं होतंय हे त्यांच्या ध्यानीमनी देखिल नाही. आजची प्रस्तापित व्यवस्था मुद्दामहून जाणूनबुजून धनगर समाजातील पोटजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय कारण पोटजातीमध्ये विखूरलेल्या धनगर समाजबांधवांची जर जनगनना झाली तर महाराष्ट्रच नव्हे तर भारतामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत एक नंबरची जमात ही धनगर जमात आहे हे सिद्ध होईल. आणि जर धनगर समाजाला आपली खरी ताकद कळली तर तर जगातील कोणतीही अशी व्यवस्था कोणतीही अशी शक्ती नाही की ती धनगर समाजाला अडवू शकेल.
धनगर समाजातील सुशिक्षित युवा वर्गानं गांभीर्यानं विचार-विनीमय करायला हवा. पोटजाती बाजूला ठेवून फक्त धनगर म्हणून जगायला शिकलो तर धनगर समाजातील मुलं-मुली आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगीरी बजावतील यात तीळमात्रही शंका नाही. रणरागीणी महाराणी अहिल्यामाई होळकर स्वताच्या मुलीचा विवाह इतर जातीमधील युवकाशी करून देतात, महाराजा यशवंतराव होळकर आणि कोल्हापुरचे राजे छत्रपति राजर्षी शाहू महाराज या दोन्ही घरचे नातेसंबंध जुळून येते तर मग आजचा धनगर समाज आपापल्याच पोट-जातीमध्येच का गुरफटून राहिलाय?? हा प्रश्न साहजिकच कोणाच्याही डोक्यात गोंधळ निर्माण करू शकतो. धनगर समाजात पोट-जातीच्या प्रथा पडल्याने समाजातील उच्चशिक्षित मुलामुलींना आपला जीवनसाथी निवडण्यासाठी कधीकदी इतर जाती-जमातींचा आधार घ्यावा लागतो हे एक फार मोठे सामाजिक नुकसान आहे. अशी कितीतरी उदाहरणे आहेत पण धनगर समाजातील रूळलेल्या पोटजातींचे दरवाजे जर खूले झाले तर मग आजच्या युवक-युवतींना इतर जातीमधील जीवनसाथी शोधण्याची गरज पडणार नाही.
यासाठी धनगर समाजातील युवकांनी समाजाच्या न्याय व हक्कासाठी आणि सामाजिक संतुलनासाठी पोटजाती बाजूला ठेवून एकत्रित येणं आवश्यक आहे. आजचा ज्वलंत प्रश्न आरक्षण अंमलबजावणीचा असो, अन्याय अत्याचाराचा असो अथवा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न किंवा विवाह बाबतीचा प्रश्न असो समाजबांधवांनी आणि समाजातील युवकांनी पोटजाती बाजूला ठेवुन एकत्रितपणे समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यावी.
 जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत
आणि गुजरातपासून आसामपर्यंत,
सह्याद्रीच्या दरी-खोर्यांतून एकच नाद घुमू दे
 प्रत्येकाच्या नसानसात ठसू दे
 आणि धनगर सारा एक होऊ दे.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Sunday 13 December 2015

आश्वासन मुख्यमंत्र्याचे पण नुकसान समाजाचे...


आरक्षणाचे नाव काढले की माझ्या तळपायाची आग अगदी मस्तकापर्यंत जाते अशीच अवस्था झाली आहे. आम्ही नक्की आमचे हक्क मागतोय की भिक मागतोय तेच आम्हाला कळेना आणि नेत्यांनाही समजेना. ज्याने त्याने उठायचे मोर्चे काढायचे आपल्या पाठीमागे कीती समाजबांधव आहे याचे शक्तिप्रदर्शन करायचे अन् मंत्र्यांना संत्र्यांना निवेदन द्यायचे त्या त्या सत्तापिपासू लोकांकडून आश्वासन घेतले की मोर्चा संपला असे जाहिर करत घराकडच्या दिशेने बोंबलत सुटायचे हेच आजपर्यंत चालत आले आहे यात वेगळे असे काहीच नाही.
आरक्षण अंमलबजावणीसाठी मोर्चे आंदोलने करणार्यांना मी विरोध करतोय अशातला विषय नाही तर राज्यघटनेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनादत्त अधिकार मिळवण्यासाठी धनगर  समाजाला ६५ वर्षानंतरही संघर्षच करावा लागतोय याचे दुख वाटते. आज स्व.बी.के.कोकरे साहेबांची खरोखरच खूप आठवण येते कारण तोच झंजावात जर आज असता तर आम्हाला भिक मागायची वेळ आलीच नसती हे शतप्रतिशत सत्य आहे आणि कोणीही नाकारू शकत नाही. १९८९ साली खंबाटकीच्या  घाटात लाखो यशवंत सैनिकांसोबत तीव्र रास्तारोखो आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांना याची दखल घ्यावी लागली आणि अनुसुचित जमातीच्या अंमलबजावणीची मागणी असताना पवारांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवत अज्ञानी नेत्यांना सोबत घेऊन धनगर समाजाला फक्त महाराष्ट्र राज्यापुरतंच भटक्या जमाती (क) NT-C मध्ये घातलं. पण केंद्रामध्ये असलेलं हक्काचं आरक्षण जाणूनबुजून डावलले गेले कारण धनगर समाजातील पोरं शिकली सवरली, आइ ए एस, आइ पी एस झाली तर भारताचं प्रशासन धनगर समाजातील पोरांच्या हातात जाईल या भीतीने वक्रतुंडाने खेळ मांडला आणि धनगर समाजातील लाखो युवकांना याचा फटका बसला.
२०१३ पासून पुन्हा नव्याने आरक्षण अंमलबजावणीसाठीची चळवळ महाराष्ट्रात पुन्हा थैमाण घालू लागली मग डिसेंबर २०१३ चे नागपूर अधिवेशन असो, १५-२१ जुलै २०१४ दरम्याणची पंढरपूर-बारामती आरक्षण दींडी आणि तद्नंतर ५-६ लाख समाजबांधवांचा बारामती येथिल ठिय्या आणि ९ दिवसाचे आमरण उपोषण, महाराष्ट्र राज्यभर आयोजित केलेला चक्काजाम, रास्तारोखो, तहसिल/जिल्हाधिकारी कार्यालयावरील आंदोलने मोर्चे, मुंबई मधील १ अॉगस्ट रोजीचा आझाद मैदानवरचा मोर्चा, १४ अॉगस्ट २०१४ रोजी धनहर समाजबांधवांनी केलेला रेल्वे रोखो, ४ जानेवारी २०१५ ची धनगर परिषद, २३ मार्च चा मोर्चा, ९ जुलै रोजी सर्व आमदारांना  व १५ जुलैला सर्व सर्व तहसिल/जिल्हाधिकार्यांना दिलेले निवेदन त्याचप्रमाणे १५ जुलै रोजी मंत्रालयासमोर गांधीगीरी मार्गाने केलेले आंदोलन. २१ जुलै चा बारामती येथील प्रेरणा दिवस आणि त्यानंतर ८ व १० डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावरील मोर्चा. अजून कीती मोर्चे काढायचे?? अजून कीती आंदोलने करायची?? तळहातावरती पोट भरणारे धनगर समाजबांधव उन वारा पाउसाचा विचार न करता आरक्षणाची अंमलबजावणी होईल माझ्या पोराला/पोरीला चांगलं शिक्षण देईल, समाजाला पुरेसा निधी मिळेल, मुलं/मुली शिकली सवरली तर आइ ए एस, आइ पी एस होतील डॉक्टर, इंजीनीयर होतील, यापेक्षा धनगर समाजालाच राजकीय क्षेत्रात आरक्षणामुळे संधी मिळेल व समाजाची प्रगती होईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी समाजव्यवस्थेतील समानता आणि डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांचे महासत्ता देश बनण्याचे स्वप्न साकार होईल या अनुषंगाने पोटात अन्नाचा कण नसताना नागपूरच्या त्या स्टेडियममध्ये कडाक्याच्या थंडीत कुडकुडत आरक्षणाची अंमलबजावणी होईल म्हणून चातकासारखी वाट पाहणार्या माझ्या समाजबांधवांवरती शेवटी आश्वासनांचीच टांगती तलवार आली.
सरकार आल्यावर १० दिवसात देतो, १५ दिवसात निर्णय घेतो, अजून अभ्यास करतोय आणि आज चक्क ९ महिन्याने निर्णय घेतो म्हणजे बाळंतपण करायचा विचार आहे की काय यांचा? स्वार्थी विचाराने बरबटलेले आरक्षणाचे श्रेय लाटण्यासाठी खटाटोप करणारे आमचे नेते जर शहाणे असते तर १० दिवसाचा १५ दिवसाचा जाब विचारला असता पण त्यांना समाजाशी आणि आरक्षण अंमलबजावणीशी काहीही घेणेदेणे नाही. पुन्हा ९ महिन्याची वाट बघायची का? TISS चे अहवाल नक्की काय सांगतील?? TISS वाले पुणे-मुंबई सारख्या ठिकाणच्या धनगर बांधवांचा सर्वे करून अहवाल सादर करणार की पोटाची खळगी भरण्यासाठी रानोमाळी, डोंगरदरीतून उन वारा पाउसाचा विचार न करता पायाच्या नडग्या वाळेपर्यंत मेंढ्यांची राखण करणार्या धनगर समाजाचा सर्वे करणार?? असे असंख्य प्रश्न सर्वसामान्य समाजबांधवांच्या डोक्यात गोंधळ करून बसलेत. जिथं अन्याय दिसेल तिथे लाथ मारणार्या राजामहाराजांच्या समाजात जन्माला आलेल्या आम्ही औलादी आज मुकाटपणे अन्याय सहन करतोय याचीच खंत वाटतेय. आश्वासनांवरती आश्वासने देऊन धनगर समाजाची चक्क दिशाभूल केली जात आहे हे नेत्यांच्या ध्यानीमनी येत नाही प्रत्येकजण स्वार्थाने बरबटलेल्या विचारांची पेरण करत बसतोय मग बुद्धीजीवी वर्गाने नेमकी कोणती भुमिका घ्यावी यातच सगळा राडा होतोय आणि मग प्रस्थापितांचे फावतेय. सुशिक्षीत अर्थात शिकला सवरलेला धनगर समाजबांधव बिनढोक नेत्यांची ओझी वाहत बसल्यामुळे धनगर समाज अजूनही अंज्ञानाच्या खाईत ढकलला जातोय. त्यासाठी सुशिक्षीत सुज्ञान युवा वर्गाने समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यावी.

जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday 3 December 2015

महापराक्रमी योद्याची जयंती त्यानिमीत्त.....

आज

 पहाटे पहाटेची वेळ होती, गाढ साखर झोपेत असताना अचानक कोणीतरी गालावर जोरदार चपराक मारण्याचा भास झाला, कोण?? कोण ?? असं म्हणत गालावर हात फिरवत डोळे चोळत उठून बसतो तोच समोर एक आकृति दिसली. धिप्पाडच्या धिप्पाड शरीरयष्टी, अंगावर जरदारी रेशमी वस्त्रे परिधान केलेली, भरदार दाढी आणि कोरीव मिशा, डोक्यावर शिलेदार हिरेजडित टोप आणि त्यामध्ये खोचलेला तुरा असा वेष धारण केलेल्या व्यक्तिच्या डोळ्यात एकदम तेज निखार होता, कमरेला म्याणात तलवार लटकत होती. मी त्या व्यक्तिला ओळखलं तोच तोंडातून शब्द फुटले की महाराज तुम्ही?? आणि इथं कसं काय???
ती व्यक्ति दुसरी तिसरी कोणी नव्हती तर इंग्रजांविरुद्ध कधीही न हारता एकूण १८ लढाया जिंकणारे आणि वीठोजीराव होळकर यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी  पुण्यात येवून शिंद्यांना-पेशव्यांना ताणून ताणून मारणारे मुत्सद्दी लढवय्ये महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर होते.
मी केलेल्या प्रश्नाचं मला खडसावतच महाराजांनी उत्तर दिलं, "तिकडं माझा धनगर समाज डोळ्यांवरती अज्ञानाचं घोंगडं पांघरुन गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय त्या माझ्या धनगर समाजाला कोण जागं करणार???"
महाराजांना काय उत्तर द्यायचं मलाच सुचत नव्हतं. माझे ओठ पुटपुटत होते तेवढ्यात महाराज पुन्हा गरजले "अरे काय दातखीळी बसली की काय?? मी विचारलेल्या प्रश्नाचं मला उत्तर हवंय...
मी बोललो की महाराज आजचा धनगर समाज अजून गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय ही गोष्ठ खरी आहे याची मला खंत देखिल वाटते आणि त्यांना जागं करायचा मी पुरेपूर प्रयत्न सुद्धा करतोय. पण काहीजण जागे आहेत त्यांनी मात्र झोपेचं सोंग घेतलंय. महाराज एक म्हणसुद्धा आहे की "एकवेळ झोपलेल्यांना जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेणार्यांना जागं करता येत नाही."
तेवढ्यात महाराज ओरडले "अरे झोपेचं सोंग घेणार्यांना लाथा घालून उठवायचं असतं, एवढीपण अक्कल नाही का???. " वेड्याला जोड्याचा मार अन शहाण्याला शब्दांचा मार द्यायचा असतो."
मी पुन्हा बोललो "महाराज हा आपला पुर्वीचा धनगर समाज नाही राहिला की ज्याला अन्यायाची जाण, लढण्याची हिंमत आणि स्वाभिमानाची किंमत होती. आज या महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज प्रस्थापितांच्या दावणीला बांधला गेलाय. महाराज आजचा धनगर समाज स्वाभिमानाची भाषाच विसरून गेलाय. अन्यायाच्या विरोधात कसे पेटून उठायचे तेच आमच्या मावळ्यांना समजत नाही. का आजच्या धनगर समाज बांधवांमध्ये लढण्याची हिंमतच नाही तेच मला समजत नाही. जो धनगर समाज बांधव स्वतःचा स्वाभिमान दुसर्यांच्या बुटाखाली गहाण टाकतोय त्याला मी कसं जागं करू??? ज्या धनगर समाजाला आपला इतिहासच माहीत नाही ते काय इतिहास घडविणार???
पहाटेचे वातावरण एकदम शांत असताना महाराज एकाएकी कडाडले शांतता दुभांगल्यागत झाले आणि आगीचे लोळ जसे बाहेर पडावेत तसे महाराज आग ओकू लागले "अरे आम्ही घडवलेला इतिहास जर तुम्हाला आठवत नसेल तर मग तुम्ही धनगरांचे वारसदार कशासाठी म्हणवून घेता?? हाडाची काडं करून आपले वंशज ते बहाद्दर लढले होते अन आम्हीसुद्धा तलवारीच्या टोकावर दुश्मनांना नाचवलं होतं तेव्हा रक्ताचं पाटच्या पाट पाण्यासारखं वाहत होतं एवढं बलिदान नेमकं कोणासाठी होतं?? छातीची ढाल करून मनगटाच्या जोरावर लढलेल्या महापुरुषांची अन पुर्वजांनी सांडलेल्या रक्ताचीच जाणीव जर आजच्या धनगर समाजाला नसेल तर या गोष्ठीची आपल्या पुर्वजांना देखिल लाज वाटत असेल की आरे आपण कोणत्या समाजात जन्माला आलो?? आणि याचा देखिल त्यांना खेद वाटत असेल"
महाराजांचे डोळे लालबुंद झाले होते आणि महाराज खरोखरच जाम चिडले होते.
धनगर समाजानं ३५० वर्षापेक्षा अधिक काळ या हिंदुस्थानावर केलेलं राज्य मग आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्या पासून राजा बिंदुसार, राजा सम्राट अशोका ते राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी अहिल्यामाई होळकर, शुरवीर राजे यशवंतराव होळकर तुकोजीराव होळकर विरांगणा भिमाई होळकर यांचा राष्ट्राप्रती बलिदान दिलेला सुवर्णाक्षरात कोरलेला धनगर समाजाचा इतिहास ते माझ्यासमोर मांडत होते. तलवारीच्या जोरावर मिळवलेल्या यशाच्या गाथा गिरवत होते. स्वातंत्र्यासाठी लढणारे आद्यप्रणेते राजे यशवंतराव होळकरच होते, हे आम्हापासून लपवून ठेवलं गेलं आणि चुकीचा इतिहास लिहला गेला कारण इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते.
इंग्रजांनी भारतावर आक्रमण केलं होतं. अनेक संस्थानांच्या राजांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती, महाराज प्रत्येक संस्थानाच्या राजांना पत्र लिहून इंग्रजांविरूद्ध एकत्र लढण्याचे आवाहन करत होते. एवढेच नव्हे तर शिख आणि मुस्लिम धर्म स्विकारणार असे महाराजांनी जाहीर केले होते ते फक्त त्या त्या धर्माच्या राजा-महाराजांनी फीरंग्यांच्या विरोधात लढण्यासाठी एकत्रित यावे म्हणून पण प्रत्येक संस्थानच्या राजा महाराजांना देशाबद्धल काही सोयरसुतक नव्हतं तर प्रत्येकजण स्वतापुरतं पहात होता. अख्खा हिंदुस्थान इंग्रजांपुढे झुकला गेला होता पण माझा राजा कोणापुढे न झुकता ताठ मानेनं कोरीव मिश्यांना ताव देत स्वाभिमानानं जगत होता, झुंजत होता १८ लढायामध्ये इंग्रजांना पराभूत करत वायूवेगाने इंग्रजांच्या सैन्याना कापत सुटायचा, कधीकधी इंग्रज अधिकारी देखिल यशवंतराव होळकरांपुढे नतमस्तकी व्हायचे तर कधी काही इंग्रज अधिकारी रणांगणातून माघारी पळ काढायचे.
हीच ती धमक होती आणि हाच त्यांचा शूरबाणा आणि मनगटाच्या जोरावर शत्रुंना चारीमुंड्या चीत करणारी त्यांची ती तलवार माझ्या मातीवर अत्याचार करणार्यांना कापत सुटायची.
महाराज बोलत होते मी मात्र सुन्न होऊन त्यांच्या शौर्यगाथा ऐकत होतो, एकाएकी अंगावर रोमांच उठायचे, अंग शहारून निघायचे माझ्याही हाताच्या मुठी आवळल्या जायच्या पुन्हा एकदा हातात तलवार घेऊन रणांगणात उतरावं, जो माझ्या मातीवरती समाजावरती अन्याय करतोय त्याला उभाच चिरून टाकावं अशी अवस्था झाली होती.
माझ्या ओठातून शब्द फुटले "महाराज मला आज्ञा द्या मी नेमकं काय करु??"
महाराज मला खडसावतच बोलले "आज समाजावरती अन्याय करणार्या  प्रस्थापितांना जर धाक दावायचा असेल तर धनगर समाजाला जागं करावं लागेल, जे जागे आहेत त्यांना उठवून उभा करावं लागेल, जे उठलेत त्यांना चालतं कर बोलतं कर लेखणीरूपी धारदार शब्दांच्या तलवारी प्रत्येकाच्या हातात दे की जे शब्द एकेकाची काळीजं चिरत जातील.
एखाद्या पिकाची मशागत करायची असेल तर अगोदर शेत नांगरावं लागतं, पिकाला वेळेवर खत पाणी द्यावं लागतं तरच पिक जोमानं वाढतं त्याचप्रमाणे अगोदर माझ्या धनगर समाजाचं डोकं नांगरलं आणि वेळेवर समाजप्रबोधनाचं खतपाणी घातलं तर भविष्यात माझ्या धनगर समाजाला कोणाकडेही गहाण पडायची वेळ येणार नाही."
जो समाज आपला इतिहास विसरतो त्या समाजाची कधीच प्रगती होत नाही. कारण इतिहास घडवणारे इतिहास विसरू शकत नाहीत अन् इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत हा एक फार मोठा इतिहास आहे. त्यासाठी आपला इतिहास सर्वांसमोर यायला हवा. आजच्या समाजाला जर जागं करून एकत्रित करायचे असेल तर इतिहासाचीच सांगड घालून द्यावी लागेल अन्यथा या स्वार्थी आणि मतलबी प्रवृत्तीच्या जगात समाजासाठी धडपडणार्यांची संख्या फारच कमी आहे. प्रत्येकजण स्वतापुरतं जगतोय, आपले पुर्वज देखिल जर राष्ट्रासाठी लढण्यापेक्षा स्वतासाठी लढले असते तर आज त्यांचा इतिहास समोर आलाच नसता. आणि इतिहासकारांनी याची दखल घेतली नसती. पण पुरोगामी विचारांच्या आणि पाखंडी पंडितांसारख्यांनी आपल्या पुर्वजांचा आणि राजा महाराजांचा इतिहास आम्हापासून दूर ठेवण्याचे कुटिल कारस्थान केले.
आज समाजावरती अन्याय व अत्याचार होत असताना माझ्याच समाजातील काही लोक हाताची घडी घालून तमाशा बघत बसताहेत तर काहीजण अवर्जून या तमाशाचे आयोजन करतात हे सांगायला देखिल मला खंत वाटते आणि त्या समाजद्रोह्यांची कीव येते. राजा महाराजांच्या जातीत जन्माला आलेल्या औलादी आज समाजावर अन्याय व अत्याचार करत असलेल्या प्रस्थापित नेत्यांच्या दावणीला कसे काय बांधले जातात तेव्हा महाराज म्हणाले... खरा इतिहास जर वेळीच समोर आला असता तर आज ही वेळ आली नसती. इतिहासाचे अज्ञान असल्याने समाजाची अधोगती झाली त्यासाठी आता समाजातील युवकांसमोर आपल्या पुर्वजांचा इतिहास मांडायला हवा. थोर महापुरूषांच्या जयंत्या साजर्या करून समाजाला एकत्रित करून इतिहासाची माहीती द्यावी. नुसतंच डीजे लावून धांगडधिंगा घालून जयंत्या साजर्या करायच्या असतील तर एकवेळ जयंत्या नसलेल्याच बरे. कारण त्या माध्यमातून समाजप्रबोधन होणे फार गरजेचे आहे. महाराजांचे शब्द ना शब्द मी मनात साठवून घेत होतो. महाराज जेवढे राकट स्वभावाचे होते तेवढेच राष्ट्रापती बलिदान देणारे  प्रेमळ स्वभावाचे होते. राजे यशवंतराव होळकरांचे नाव ऐकले तर इंग्रज अदिकार्यांना कापरं भरायचं. भांबुर्ड्याच्या लढाईत मल्हारतंत्राचा अवलंब करत लाखो माल्कमच्या सैन्यांना कापूण काढले होते तेव्हा एक इंग्रज अधिकारी त्याच्या सोबत्यांना म्हणाला की "ये यशवंतराव हुलकर आसमान से तो नहीं ना गिरा??" अशा पद्धतीने इंग्रजावरती मल्हारनीतीचा अवलंब करत हल्ले करणारे राजे यशवंतराव यांनी दुश्मनांवरती वचक बसविली होती. महाराज बोलतच होते आणि मी फक्त होतो. मात्र आता ऐकण्याची मनस्थीती नव्हती तर पुन्हा तीच तलवार घेऊन माझ्या समाजावर अन्य्य व अत्याचार करणार्यांची डोकी उडवायची होती पण अगोदर समाजाची डोकी नांगरांयची होती म्हणून महाराजांना सांगितले महाराज मी आज शपथ घेतोय की, "आज धनगर समाजाला जागं करून प्रत्येकाची डोकी नांगरल्याशिवाय मी शांत बसणार नाय. मग तिथं मला कोणीही आडवा तर त्याला तिथंच उभा चिरणार अन जर कोणी हात जोडून आला तर त्याला लोटांगण घालणार.
कारण जर आमच्या वाटेला कोणी आला तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतनार नाय हा आमुचा इतिहास आहे."
समाजबांधवांनी इतिहास जाणून घेण्यासाठी
1) झुंज : ना.सि.इनामदार
2) स्वातंत्र्य प्रणेते: संजय सोनवनी सर
3) वीरांगणा भीमाई: होमेश भुजाडे सर
4)धनगरांचा गौरवशाली इतिहास: संजय सोनवनी सर
5) होळकरांची कैफीयत: प्रा.निलेश शेळके सर
6)क्रांतीची मशाल पेटवा: ए.एस.बरींगे सर
7) थोरले सुभेदार मल्हारराव होळकर: संजय सोनवनी सर
8) The Vintage of Indore.
तसेच होळकरशाहीचा इतिहास अन्य पुस्तकांतून, संदर्भातून अभ्यासावा ही विनंती.
आज दि.३ डिसेंबर रोजी महापराक्रमी शुरवीर लढवय्या राज राजेश्वर सिहासनाधिष्ट महाराजाधिराज राजे श्रीमंत यशवंतराव होळकर यांची जयंती त्यानिमीत्त राष्ट्रापती बलिदान देणारे स्वातंत्र्याचे प्रणेते आद्य क्रांतीवीर राजे यशवंतराव होळकर यांना विनम्र जय मल्हार!!!
 कोटी कोटी प्रणाम!!!
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Wednesday 25 November 2015

आरक्षण एक घटनादत्त अधिकार...

आरक्षण घटनादत्त अधिकार
आरक्षण म्हटलं की आजकाल काही लोक सनातनी आणि बाजारबुणग्या  बांडगुळांचे ऐकूण लंगड्यासाठी जशा कुबड्या असतात जणू तसाच काहीसा अर्थ काढतात आणि उगंच काहीतरी वाचाळ बडबड करत बसतात. आरक्षण म्हणजे समाजाच्या विकासासाठी वापरल्या जाणार्या कुबड्या नसून भारतीय राज्यघटनेत समाजव्यवस्थेतील प्रत्येक जाती/जमातीला दिलेला घटनादत्त अधिकार आहे ही भावना सर्वांमध्ये रुजायला हवी. यासाठी भारतीय संविधानाची ओळख असणे फार गरजेचे आहे. खरंतर आरक्षणाची सुरवात ही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून झाली नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळात १८९३ मध्ये आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या छत्रपति राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरवात केली होती. त्याकाळी ब्राह्मणेत्तर मागासवर्गीयांना त्यांनी शिक्षण, शिष्यवृत्ती, नोकरी अशा विवीध क्षेत्रामध्ये ५०% आरक्षण लागू केले होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ९ मे १९१६ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात "बाबासाहेब डॉ.अम्बेडकर वाङमय" नावाचा प्रबंध सादर केला होता. त्या वाङमय मधील खंड क्र.१ मध्ये "भारत में जातिप्रथा, संरचना, उत्पत्ति और विकास" या भागात पृष्ठ क्र २३४ आणि २३५ वरती सर्व जाती जमातींचा लोकसंख्येसह उल्लेख केलेला आहे. कोल्हापुरचे राजे छत्रपति राजर्षी शाहू महाराज यांनी आरक्षण पद्धत लागू केल्याने भारतीय समाजव्यवस्थेमध्ये झालेला बदल लक्ष्यात घेऊन तसेच अन्य देशातील संविधानांचा अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहली आणि भारतीय समाजव्यवस्थेचे चार वर्ग करुन त्या त्या वर्गाला लोकसंख्येच्या तसेच सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर आणि निकषावर भारतीय राज्यघटनेत समाजव्यवस्थेचे १)खुला वर्ग २)इतर मागास वर्ग ३)अनुसुचित जाती ४)अनुसुचित जमाती असे एकूण चार वर्ग करून सर्वांना त्या त्या निकषावर आरक्षण लागू केले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय राज्यघटना १९५० साली आमलात आली. तिथून पुढे देशाचा राज्यकारभार अगदी सुरळितपणे चालू लागला पण धनगर समाजावर मात्र फार मोठा अन्याय झाला. भारतीय राज्यघटनेमध्ये अनुसुचित जमातीच्या कलम क्र ३४२ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्ठात अ.क्र.३६ वरती ओरॉन,धनगर ऐवजी ओरॉन, धनगड असा उल्लेख झाल्याने गेल्या ६५ वर्षापासून हा धनगर समाज अन्याय सहन करतोय. "धनगर" चा "धनगड" अर्थात "र" चा "ड" झाल्यामुळे सगळा राडा झाला आहे असे म्हणायला मला काही वावगं वाटणार नाही. खरंतर राज्यघटनेत उल्लेख केल्याप्रमाणे धनगड नावाची जमात महाराष्ट्र राज्यात कोठेही आढळून येत नाही, या जमातीची एकही व्यक्ति नाही त्यांचा इतिहास सुद्धा नाही हे बाबासाहेब डॉ अंम्बेडकर या वाङमयावरून सिद्ध होते आहे. याशिवाय ज्या ज्या वेळी धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी रस्त्यावर उतरला तेव्हा धनगड नावाच्या जमातीचा एकही व्यक्ति धनगर समाजाच्या विरोधात रस्त्यावर आला नाही. जर "धनगड" नावाच्या जमातीचा एक जरी व्यक्ति रस्त्यावर उतरला असता तर "धनगर" समाजाने अनुसुचित जमातीची अंमलबजावणीबाबत मागणी केलीच नसती.
सन १९५० साली राज्यघटना आमलात आणल्यापासून आज २०१५ पर्यंत जवळ जवळ ६५ होऊन गेली तरी अनुसुचित जमातीच्या यादीमधील  या धनगर समाजाच्या नावे येणारा करोडो रूपयांचा वार्षिक विकास निधी मग शैक्षणिक निधी असो अथवा सामाजिक निधी तो धनगर समाजापर्यंत पोहचलाच नाही. प्रस्तापित नेते आणि आदीवाशी मंत्री यांनी हा निधी लाटायचं काम केले. कधीकधी हा निधी वापरला न गेल्याने जसाच्या तसा सरकार दरबारी परत गेला आणि धनगर समाजाच्या वाट्याला मात्र पाचवीलाच पुजलेली भटकंती आली केवढी मोठी ही शोकांतिका.
संसदीय वाद-विवाद "राज्य सभा" अधिकारीय प्रतिवेदन २२ डिसेंबर १९८९ भारत सरकार मार्फत प्रकाशित होणारे हे प्रतिवेदन अभ्यासले तर कळेल की राज्य सभेमध्ये खा.सुर्यकांता पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना तत्कालीन राज्यसभेचे सभापती रामविलास पासवान यांनी सुद्धा कबूल केले होते की राज्यघटनेत नमूद केलेली जमात ही "धनगड" अथवा "धांगड" नसून ती धनगर हीच जमात आहे. संबधित धनगर जमातीला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळायला हव्यात यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला फक्त  एक शिफारस पत्र पाठवण्याची आवश्यकता आहे. याशिवाय महाराष्ट्र शासन राजपत्र शुक्रवार १२ जुलै १९९६ व महाराष्ट्र शासन राजपत्र सोमवार १९ मार्च २००१, त्याचप्रमाणे जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००७-०८ व जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००९-१० या सर्व महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या राजपत्रामध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अ.क्र.३६ वर ओरॉन, धनगर असा स्पष्ट उल्लेख सुद्धा आहे.
तद्नंतर १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारला अशी कोणतीही शिफारस न पाठवता धनगर समाजावर अन्यायाची टांगती तलवार ठेवली. कारण जर धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू केल्या तर महाराष्ट्र राज्यातील अनेक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ धनगर समाजासाठी राखीव होतील त्यामुळे प्रस्थापित नेत्यांचे धनगर समाजाच्या जीवावर पोट भरण्याचे धंदे बंद पडतील अर्थातच त्यांचे भवितव्य धोक्यात येईल. याशिवाय महाराष्ट्र राज्यातील एकूण विधानसभा मतदारसंघापैकी १४६ मतदारसंघामध्ये धनगर समाजाचे मताधिक्य जास्त आहे आणि धनगर समाजानं जर मनात घेतलं तर राज्याचा मुख्यमंत्री धनगर समाजाचा होऊ शकतो हे त्रिकालबाधित सत्य आहे असे म्हटलं तरी हरकत नाही. पण धनगर समाजातील अज्ञानामुळे या गोष्टी धनगर समाजाला माहीत नाहीत. आज राज्यातील जनगननेच्या उपक्रमामध्ये जनावरांची जनगनना होते पण धनगर समाजाची जनगनना होत नाही. जर धनगर समाजाची जनगनना झाली तर राज्यातच नव्हे तर भारतातील एक नंबरची लोकसंख्या फक्त धनगर समाजाची असेल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजातील आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणाचा विचार करून सर्वांना समानतेने वागणूक मिळावी या उद्देशाने आरक्षणाची अंमलबजावणी केली होती. पण केवळ शब्दच्छल झाल्याने धनगर समाजावार फार मोठा अन्याय झाला. धनगर समाजाला पुर्वीपासूनच सवलतींचा लाभ झाला असता तर आज धनगर समाजातील मुले-मुली आय ए एस, आय पी एस, आय एफ एस, तहसीलदार, डॉक्टर, इंजिनीयर, वकिल झाली असती. राजकारणाचा विचार केला असता तर केंद्रात आणि राज्यात कमीत कमी १० ते १२  कैबिनेटमंत्री  व राज्यमंत्री असते. अर्थात भारताच्या राजकारणात आणि प्रशासनात धनगर समाजाची पोरं चमकली असती. उद्योग, व्यापार, नोकरी या क्षेत्रात धनगर समाजाची पोरं उठून दिसली असती, भारताचं प्रशासन धनगर समाजाच्या ताब्यात असतं हे नाकारू शकत नाही. पण प्रस्तापीत व्यवस्थेला हे मान्य नव्हते. केवळ "र" चा "ड" झाल्याने किती मोठा राडा झाला आहे याचा नुसता  विचार जरी केला तर तळपायाची आग मस्तकापर्यंत जाते मग डोक्यात विचारांचे थैमान माजले जाते आणि नकळत शब्द बाहेर पडतात की जर आमचा समाज अज्ञानाच्या आणि सनातनी व भोंदूबाबांच्या विळख्यात सापडला नसता तर या देशावर पुन्हा एकदा आम्हीच राज्य केलं असतं.
आरक्षणाच्या लढाईसाठी यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे साहेबांनी डिसेंबर १९८९ मध्ये सातारा-पुणे महामार्गावर लाखो यशवंत सैनिकांच्या उपस्थितीमध्ये तीव्र रास्तारोखो करून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नाकात दम ठोकला होता. बारामतीमधूनच तयार झालेला स्व.बी.के.कोकरे साहेबांचा झंजावात आणि दबदबा पाहून शरद पवारांनी संभाव्य धोका ओळखला आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या धनगर समाजातीलच स्व शिवाजी बापू शेंडगे यांना पुढे करून सांगली मध्ये २१ जानेवारी १९९० रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा ढोल पवारांनी बडवला व २३ मे १९९० रोजी धनगर समाजाची मुळ मागणी लाथाडून राजकीय कपटाच्या दृष्टीने पवारांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती देण्याऐवजी भटक्या जमाती (क) च्या वेगळ्या यादीमध्ये धनगर समाजाचा सामावेश केला.
धनगर समाजाला भटक्या जमाती (क) मध्ये सामाविष्ट करून ३.५% आरक्षण लागू केले ते फक्त महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादितच. पण केंद्रातील अनुसुचित जमातीच्या सवलती डावलून महाराष्ट्र राज्यापुरत्या सवलती लागू केल्याने धनगर समाजातील विद्यार्थ्यांना लोकसेवा परिक्षेसाठी तसेच राज्याबाहेरील परीक्षेसाठी नोकरीसाठी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागते. लोकसंख्येच्या मानाने १६ ते १७% धनगर समाजाला लोकसंख्येच्या निमपट म्हणजे ५०% च्या हिशोबाने किमान ८% आरक्षण हवे असताना भ.ज.(क) मध्ये ३.५% आक्षण देऊन उर्वरित ५६.२५% धनगर समाजावर उपासमारीची वेळ आणायचे काम प्रस्तापित व्यवस्थेने केले. याच कारणामुळे धनगर समाजातील हजारो पोरं आय ए एस, आय पी एस होण्यापासून वंचित राहिली आणि पारंपरिक शेळ्या मेंढ्या व सोबत शेतीचा जोडधंदा हे व्यवसाय करू लागली.
आज धनगर समाज आरक्षण या मुद्द्यावर चांगलाच पेटून उठला असला तरी सत्ताधारी पक्ष आणि प्रस्तापित व्यवस्थेला हे होऊ द्यायचे नाही. धनगर समाजातील ज्या काही संघटना, चळवळी आरक्षणाच्या मुद्द्यावरती पुढे येतील त्यांच्यामध्ये फुट पाडण्याचे काम प्रस्तापित व्यवस्था चोखपणे बजावत आहे. पण माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाच्या मात्र हे लक्षात सुद्धा येत नाही ही फार दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. सुशिक्षीत आणि सुज्ञ बुद्धीजीवी वर्ग यासाठी प्राणपणाने पोटतिडकीने आणि तळमळीने कार्य करताहेत त्यासाठी समाजातील तरुण युवकांनी सामाजिक बांधीलकी जोपासत बुद्धीजीवी वर्गासोबत राहून  रस्त्यावरची त्याचप्रमाणे न्यायालयीन लढाईसाठी हातभार लावावा तरच उद्याची पीढीला अशा अन्यायांना सामोरे जावे लागणार नाही, अन्यथा उद्याची पीढी आपल्या तोंडात शेण घालेल यासाठी गाफील न राहता सर्वांनी सक्रीय होऊन खारीचा वाटा उचलला तर आरक्षणाची अंमलबजावणी काही दूर नाही हे मात्र निश्चित. धनगर समाज कोणाच्या खिशातले मागत नाही तर स्वताच्या हक्काचे मागतोय हे जोपर्यंत सरकारच्या आणि प्रस्थापितांच्या कानठाळीत मारून आरक्षणाची अमलबजावणी व्हावी असे त्यांच्या डोक्यात आपण घालत नाही तोपर्यंत आपला कोणीही विचार करणार नाही. त्यासाठी एक व्हा आणि नेक व्हा.
उठ धनगरा जागा हो। आरक्षणाचा धागा हो।
जय मल्हार!! जय अहिल्या!! जय यशवंत!!
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday 19 November 2015

येळकोट येळकोट जय मल्हार

मल्हाररावांचे मर्द मावळे आम्ही,
महाराणी अहिल्यामाईचे भक्त।

नसानसात सळसळतंय आमच्या,
शुरवीर यशवंतरावांचेच रक्त।

भिडतात तलवारीला तलवारी तेव्हा,
दुश्मनांना आम्ही रणांगणातच कापतो।

कारण लाव्हारस आमच्या रक्तातला,
आजही तसाच उफाळतो।

पोलादी छातीवरती झेलतो आम्ही,
तीक्ष्ण तलवारीचे वार।

कपाळी भंडारा लेवून गरजतो,
येळकोट येळकोट जय मल्हार।

जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday 13 November 2015

समाजबांधवांनो प्रवाहात सामील व्हा...


ज्या प्रमाणे कडक उन्हाळ्यानंतर वळव्याच्या पावसाचे वातावरण तयार होते अचानक आकाशात ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट सुरू होतो शांतप्रीय वातावरण दुभंगून जाते जिकडे तिकडे आहाकार माजतो आणि हळूच पावसाचे थेंब एकेक करून जमिनीवरती कोसळू लागतात, ऊनाने तापलेली माती पावसाच्या थेंबाच्या स्पर्शाने हवेत सुगंध पसरवते. वातावरण अगदी त्या मातीच्या सुगंधाने दरवळून जाते आणि मनाला सुखद आणि विलक्षण आनंद देऊन जाते.
 मग पावसाचे पडलेले थेंब हळू हळू एकत्रित येतात, तिथे मोठा पाण्याचा साठा तयार होतो. जमिनीवरती एकत्रित झालेले पाणी उताराकडच्या दिशेने वाहायला लागते. त्याचा एक छोटासा प्रवाह तयार होतो. असे अनेक छोटे मोठे प्रवाह ओढ्या-वगळीकडच्या दिशेने वाहू लागतात आणि शेवटी नाले, विहरी, तलाव तुडूंब भरून जातात. हा प्रवाह असाच पुढे गेला तर नदी देखिल ओसांडून वाहू लागते तो प्रवाह साधा सुधा नसतो तर कधी कधी त्या नदीच्या पाण्याला अडवण्यासाठी बांधलेले बंदारे देखिल प्रवाहाबरोबर वाहून जातात आणि सरतेशेवटी तो प्रवाह समुद्राला जाऊन मिळतो. तिथेपण त्या प्रवाहाचे पाणी कधी शांत नसते कधी भरती तर कधी ओहोटी. कधी मोठाल्या लाटा धपकण किणार्यावर आदळतात तर कधी कधी कित्येक जहाजे आणि जीव सागरामध्ये गुडुप होऊन जातात.
आज धनगर समाजाला देखिल अशाच तीव्र प्रवाहाची गरज भासतेय. तो प्रवाह दुसरा तिसरा कोणता नसून स्वताच्या संसाराची राखरांगोळी करून स्व बी के कोकरे साहेबांनी स्थापण केलेली आक्रमक संघटना म्हणजेच एक आक्रमक प्रवाह तो म्हणजे यशवंत सेनेचा. यशवंत सेनेच्या सुरवातीला सर्वात अगोदर पावसाच्या थेंबा थेंबा प्रमाणे समाजबांधवांना एकत्रित केले. शेतीच्या मशागतीसारखी समाजबांधवांची डोकी नांगरून त्यामध्ये अन्याय व अत्याचाराच्या विरोधात पेटून उठण्याचे "प्रबोधन"रूपी बियाणे पेरले गेले. निद्रावस्थेत झोपी गेलेला धनगर समाजातील यूवा वर्ग कडाडून जागा झाला. आज एक एक करून सर्व एकत्रित येऊ लागले त्याचा एक प्रवाह तयार झाला. अनेक छोटे मोठे प्रवाह एकत्रित आल्यानंतर त्यातूनच एक भले मोठे संघटन उभे राहीले होते. हळू हळू तालुका जिल्हा राज्य आणि राष्ट्र पातळीवर हे संघटन आणि संघटनेतील यशवंत सैनिक आक्रमकपणे, निस्वार्थीपणे समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढू लागले.
ज्याप्रमाणे पाणी आडवण्यासाठी बांधलेला बंदारा एखाद्या तीव्र प्रवाहासमोर गुडघे टेकतो त्याला भेगा पडतात त्याचप्रमाणे स्व बी के कोकरे साहेबांच्या विचारधारेवरती चालणारी यशवंत सेना हा एक तीव्र प्रवाह आहे आणि या प्रवाहासमोर प्रस्तापीत यंत्रणा गुडघे टेकायला भाग पडेल पण त्यासाठी आपली आक्रमकता, तीव्रता, जिद्ध व चिकाटी महत्वाची आहे. समाजात एकी होणे गरजेचे आहे. कारण एकीचे बळ ही कथा तुम्हा-आम्हाला माहीतच आहे. स्व बी के कोकरे साहेबांची यशवंत सेना आज मुंबईमधून चालू झाली अनेक जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते तयार झाले अन् कामालाही लागले. यशवंत सरसेनापती मा.माधव (भाऊ) गडदे यांच्या नेतृत्वाखाली  आजचा युवा वर्ग एकत्रित येतोय. यासाठी समाजातील समाजबांधवांनी तसेच छोट्या मोठ्या संघटनांनी यशवंत सेनेच्या या तीव्र आणि आक्रमक प्रवाहात सामील झाल्यास समाजचे ध्येय फार दूर नसेल. आज समाजात अनेक छोट्या मोठ्या संघटना आहेत आणि संघटना त्या त्या संस्थापकांच्या मालकीच्या असल्या तरी संघटनांनी एकमेकांसी सहाय्य करून चालल्यास प्रस्तापितांना सळो की पळो करू शकतो. यासाठी एक प्रवाह असणे गरजेचे आहे म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की समाजबांधवांनी सामाजिक बांधीलकी जोपासून मी समाजाचे काहीतरी देणं लागतो, मला समाजासाठी काहीतरी करायचे आहे असा प्रत्येकाने विचार करायला हवा आणि एका तीव्र प्रवाहात सामील व्हायला हवे.
एक व्हा समाजासाठी नेक व्हा.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Tuesday 3 November 2015

धनगर नेत्यांचे भविष्य धोक्यात येणार...


गेल्या ६५ वर्षापासून माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजावर अन्याय होत आलेला आहे. भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या ३४२ कलम वरती महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्ठात अ.क्र.३६ वरती धनगड(धनगर), ओरॉन  असा उल्लेख करुन डॉ. बाबासाहेबांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत अगोदरच स्माविष्ट केलेले आहे. पण "धनगर" (Dhangar) या शब्दाचे चे हिंदी टायपींग "धनगड"(Dhangar) {जसे की उदा.१) एकरAcre चे हिंदीमध्ये एकड, २)गुरगाव Gurgaon चे गुडगाव, ३) रेवारी Rewari चे रेवाडी} त्याचप्रमाणे "धनगर" चे "धनगड" असे झाल्याने महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित रहावे लागले अर्थातच आमच्या अज्ञानपणामुळे आमच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे. एखाद्या समाजावरती विनाकारण अन्याय होत असेल तर संबंधितांवर देशद्रोहाचा खटला भरायला हवा.
आज महाराष्ट्र राज्यातील अल्पांशीच धनगर समाज सुज्ञ आणि सुशिक्षित झाल्याने आमची खरी मागणी काय आहे याचे भान समाजातील काही नेत्यांना व समाजबांधवांना नाहीये. आम्ही नवीन आरक्षण मागतोय किंवा आम्हाला सामाविष्ट करा ही आमची मागणी नाही तर राज्यघटनेत आम्हाला दिलेलं आमच्या हक्काचं अनुसुचित जमातीच्या आरक्षण आणि अनुसुचित जमातीच्या सवलती लवकरात लवकर लागू कराव्यात ही आमची मागणी आहे.

धनगर समाजातील नेत्यांचे भविष्य धोक्यात कसे काय येणार...????
तर दि ७ डिसेंबर २०१५ पासून नागपूर विधानभवनात हिवाळी अधिवेशनाची सुरवात होणार असून धनगर समाजातील नेत्यांनी नागपूर विधानभवनावर वेगवेगळे मोर्चे आयोजित कलेले आहेत. खरंतर सर्वांची मागणी एकच आहे मग मोर्चे वेगवेगळे का?? समाजबांधवांनी नक्की कोणत्या मोर्चात सहभागी व्हायचं?? का कोणत्याच मोर्चात सहभागी व्हायचं नाही. अशा संभ्रमावस्थेत असणार्या तळागळातील धनगर समाजबांधवांकडून मी प्रतिक्रीया मागून घेतल्या होत्या. राज्यभरातील सर्व जिल्ह्यातून दोन हजारपेक्षा जास्त प्रतिक्रीया मिळाल्या त्यान्वये त्याची टक्केवारी खालीलप्रमाणे
१) ९३.७५ %
समाजातील नेत्यांनी एकत्रित येवून चर्चा करावी. एकच दिवस व एकच तारीख निश्चित करून संघटितपणे मोर्चा काढला तरच आम्ही मोर्चात सहभागी होणार. अन्यथा कोणत्याही मोर्चात सहभागी होणार नाही. विचारवंत आणि समाजप्रबोधकांवर विश्वास असून बुद्धिजीवी वर्ग जो निर्णय घेईल त्यास सहमत असल्याचे समाजबांधवांनी आपापले मत स्पष्ट केले.

२) २.२५%
डॉ. विकास महात्मे सर यांनी अगोदर आयोजित केलेला  मोर्चा असून दि ८ डिसेंबर रोजीच्या मोर्चात सहभागी होणार. पण या २.२५% मधील बहुतांशी समाजबांधवांनी प्रतिक्रीया दीली की नेत्यांपेक्षा समाजप्रबोधकांवर विश्वास असून बुद्धिजीवी वर्ग जो निर्णय घेईल तसे आम्ही करु.

३) २ %
डॉ. महात्मे सर यांनी स्वताचेच नाव पुढे करून इतरांना काहीही न विचारता मोर्चाचा दिवस ठरवल्याने माजी आ.हरिदास भदे साहेब आणि सहकारी यांनी १० डिसेंबर चा मोर्चा आयोजित केला त्यामध्ये सहभागी होणार. या २ % मधीलसुद्धा अधिकतम समाजबांधवांनी नेत्यांपेक्षा समाजप्रबोधकांवर विश्वास असून बुद्धिजीवी वर्ग जो निर्णय घेईल तसे आम्ही करु असे मत स्पष्ट केले.
४) १.५० %
समाजबांधवांचा महाराष्ट्र राज्याच्या आरक्षण कृति समितीसोबत मोर्चात सहभागी व्हायला हवे असे सांगितले.
५)  .५०%
मोर्चा काढून आरक्षण मिळेल असे वाटत नाही तर त्यासाठी कोर्टाची लढाई लढावी लागेल.
सदरची टक्केवारी ही २१०० ते २२०० समाजबांधवांनी व्हाटसप, मेसेजेस त्याचप्रमाणे कॉल करुन दिलेल्या या प्रतीक्रीया आहेत.
समाजातील सर्वच नेते मला जवळचे आहेत त्यात कोणी आपला परका असा भेदभाव केला जाणार नाही पण कोणत्याही एखाद्या नेत्याच्या विरोधात अथवा टिकात्मक बोलून अथवा लिहून माझ्याच समाजात फूट पाडावी असं सर्व बुद्धिजीवी वर्गाचं उद्दीष्ट नाही तर राजकारण, आमदारक्या स्वार्थ, मोठेपणा आणि उफाळलेला आरक्षण संदर्भातला श्रेयवाद या गौन गोष्टी बाजूला ठेऊन कमित कमी आरक्षण या मुद्द्यावरती धनगर समाजातील नेत्यांनी एकत्रित यावे. अन्यथा वेगवेगळे मोर्चे जर नागपूर विधानभवनावर घेऊन जात असाल तर आपलंच हसू होईल. कारण आजचे ९३.७५% नव्हे तर उद्याचे ९६-९७ % समाजबांधव वेगवेगळ्या मोर्चात सहभागी होणार नाहीत.  जर मोर्चा सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांसोबत  चर्चा करून संघटितपणे मोर्चा आयोजित करून एकच दिवस निश्चित केला तर २५००००० पंचवीस लाखांच्या वरती समाजबांधव नागपूरला एकत्रित येवून प्रशासन तसेच विधानभवन हादरवून टाकतील एवढी ताकत आपल्या समाजबांधवांमध्ये आहे. २५००००० यापेक्षाही जास्त समाजबांधव नागपूरला एकत्रित आणायची जबाबदारी माझी राहील.
पण जर वेगवेगळे मोर्चे काढून राज्यभरातील फक्त हजार दीड हजारच समाजबांधव तुमच्यामागे आला तर २०१९च्या विधानसभा निवडणूकीत आपल्या समाजाचं तर सोडाच पण इतर समाजबांधवांकडे तुम्ही काय म्हणून मत मागायला जाणार?? तुमचाच समाजबांधव तुमच्या पाठीशी नाही राहिला तर मग काही इज्जत राहील का??? त्यासाठी एकत्रित येऊन योग्य विचारविनीमय करुन एकच मोर्चा एकाच आयोजित केला तर महाराष्ट्रातील धनगर समाज तुमच्यासोबत राहील अन्यथा धनगर समाजातील नेत्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येईल. याचा विचार सर्वांनी करायला हवा.
जय मौर्य!! जय मल्हार!! जय अहिल्या!!

           👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

समाजप्रबोधनाचे बीज... ✍️नितीनराजे अनुसे

       
        अज्ञानाचं घोंगडं पांघरुण निद्रावस्थेत गाढ झोपी गेलेल्या माझ्या धनगर समाजाला खरोखरंच आज प्रबोधनाची गरज आहे. ज्या प्रमाणे शेताची नांगरणी करून मशागत करून त्यामध्ये बियाणे पेरले जातात आणि त्याला वेळेवर खतपाणी घातले तरच पिक जोमाने वाढते आणि भरभरून उत्पन्न/धान्य मिळते. त्याचप्रमाणे आजच्या सनातन्यांच्या नादाला लागलेल्या, भोळ्या-भाबड्या आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या, प्रस्थापितांच्या अन्याय अत्याचाराखाली खचलेल्या पिचलेल्या माझ्या धनगर समाजबांधवांची सर्वप्रथमता डोकी नांगरून त्यामद्ये समाजहीताचे बियाणे (बीज) पेरले आणि समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराची जाणीव करून देत त्यास समाज प्रबोधनाचे खतपाणी घातले तर उद्या माझ्या याच समाजातून अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारे, समाजप्रबोधन करणारे लाखो धनगर समाजबांधव तयार होतील. तरच धनगर समाज हा प्रगतीपथावर मार्गक्रमण करेल. सत्ताकारणात, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये धनगर समाजाची पोरं चमकतील हे सांगायला कोणा विद्वानाची गरज नसावी. म्हणूनच समाजहीताचे विचार पेरत चला त्यातून समाजहीताचेच विचार उगवतील. इतिहासाला साक्षी ठेवून आजच्या अंधकारातून, बिकट परिस्थितीतून वाट काढत निघालो तर उद्या नक्कीच आपण प्रकाशाकडे पोहचू...
जय मल्हार!! जय अहिल्या!! जय यशवंत!!
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +918530004123
nitinrajeanuse123.blogspot.com

Monday 12 October 2015

धनगर समाजाचे नेतृत्व दिशाहीन...


एकेकाळी राजा समाज असणारी आमची जमात आज दिशा नसल्यामुळे भरकटलेली दिसते आहे. अंधार्या रात्री अथांग समुद्रात भरकटलेल्या नौकेसारखी अवस्था माझ्या धनगर समाजाची झाली आहे. प्रस्तापितांची चमचेगीरी अन् गुलामगीरी करण्यात धनगर नेते मग्न आहेत, त्या प्रस्तापित नेत्यांची धोतरं सांभाळायला त्यांनी समाज गहाण ठेवला आहे असे म्हणायला मला काही वावगं वाटत नाही.
अरे कमीत कमी आपल्या धनगर समाजातील महापुरुषांचा इतिहास तरी आठवायला पाहिजे. सामर्थ्यशाली अन् शक्तीशाली भारताचे स्वप्न पाहणारे आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, आशिया खंडावर प्रभुत्व गाजवणारे राजा सम्राट अशोक, अटकेपार झेंडे फडकवणारे राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी राजमाता महाराणी अहिल्यामाई होळकर, जगातला दुसरा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ज्यांना ओळखले जाते असे महाराजाधिराज शुरवीर लढवय्ये राजे यशवंतराव होळकर ज्यांनी इंग्रज अधिकार्यांना अगदी तलवारीने कापून काढून कधीही न हारता एकूण १८ लढाया जिंकल्या, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारी वीरांगणा भिमाई अशा एक ना अनेक लढवय्यांच्या, शुरवीरांच्या जातीत जन्माला आलेल्या तुम्ही आम्ही औलादी आज हक्क मागतोय की भिक मागतोय तेच समजत नाही.
यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे साहेबांनी जी क्रांतीवरी चळवळ उभा केली होती तेव्हा धनगर समाजासाठी स्व बी के कोकरे साहेब एक दिशादर्शक आणि खरे मार्गदर्शक होते. त्यांच्या पाश्चात्य धनगर समाजाला दिशा देणारं एकही नेतृत्व समोर आल्याचे दिसत नाही. म्हणूनच मा.गोपीचंद पडळकर साहेब त्यांच्या भाषणातून नेहमीच सांगतात की कोणत्या नेत्याचे अथवा देवाचे फोटो भिंतीवरती लावण्यापेक्षा स्व बी के कोकरे साहेबांचे फोटो आपापल्या घरात लावा कारण त्या माणसानं धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाव्यात म्हणून घरादाराचा विचार न करता अफाट संघर्ष केला होता. खंबाटकीच्या घाटात लाखो यशवंत सैनिकांना सोबत घेऊन तीव्र रास्तारोखो केला होता तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री पवारांनी दखल घेतली पण धनगर समाजातील धनडांडग्या नेत्यांना जवळ करुन पवारांनी एस.टी ऐवजी एन.टी मध्ये टाकले. आज धनगर समाज जो एन.टी. च्या सवलती घेतोय त्याच्यापाठीमागे स्व.बी.के. कोकरे साहेबांचा संघर्ष आहे. खरंतर मागणी अनुसुचित जमातीची होती पण पवारांनी ज्या ज्या नेत्यांना जवळ करुन स्व बी के कोकरेंची राजकीय हत्या केली त्यावेळी पवारांच्या मागे-पुढे घुटमळणार्या धनगर समाजाच्या दलालांनी अनुसुचित जमातीबद्दल एक ब्र सुद्धा काढला नाही. जर त्या धनगर नेत्यांनी स्व बी के कोकरे साहेबांना साथ दिली असती तर आज धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू करा अशी भीक मागायची वेळ आली नसती.
आज धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी धनगर समाजातील नेते (खरंतर प्रस्तापितांचे चमचे म्हटलं तरी हरकत नाही)  जो काही खटाटोप करताहेत त्याच्या पाठीमागे त्या त्या नेत्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य धनगर समाज जाणतोच आहे. तळागळातील गोरगरीब आणि सर्वसामान्य धनगर समाजाला न्याय व हक्क मिळावेत म्हणून बुद्धीजीवी वर्ग हाच समाजासाठी आई-बाप असणार आहे कारण नेत्यांवरचा विश्वास उडालेला असून उगाच नेत्यांनी जास्त खटाटोप करण्यात काही अर्थ नाही. जर नागपूर विधानभवनावर जर एकच मोर्चा निघाला तरच महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव नागपूर मध्ये मोर्चासाठी उपस्थित राहील अन्यथा जर वेगवेगळे मोर्चे निघाले तर महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांच्या भावना दुखावणार्या कोणत्याही नेत्यांच्या मोर्चामध्ये कोणीही सहभागी होणार नाही अशी भुमिका बुद्धीजीवी वर्गाची राहील. आणि यासाठी २० अॉक्टोबर पर्यंतची मुदत दोन्ही मोर्चे आयोजकांना राहील. एकच झेंडा एकच दिवस एकच मोर्चा आणि आरक्षण अंमलबजावणीची एकच मागणी जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू होण्याचा अद्यादेश निघत नाही तोपर्यंत माघार नाही असा जर अजेंडा घेऊन धनगर नेते एकत्रित आले तरच धनगर समाजाच्या संघर्षाला यश मिळेल आणि स्व बी के कोकरे साहेबांचे स्वप्न पुर्ण होईल. नाहीतर जोपर्यंत स्व बी के कोकरे साहेबांची विचारधारा या महाराष्ट्रातील तमाम युवकांच्या डोक्यात पेरली जात नाही तोपर्यंत धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढणारे हजारो बी के कोकरे तयार होणार नाहीत. ज्यादिवसी समाजातून हजारो बी के कोकरे पेटून उठतील आणि खरोखर त्यावेळी सवलती लागू करून अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र हासील करूनच शांत बसतील. त्यामुळे नेत्यांनी स्वताचे स्वार्थ, मोठेपण, आरक्षणासंदर्भातला श्रेयवाद तसेच गटतट, पक्ष संघटना बाजूला ठेऊन एकत्रित यावे. दि.२० अॉक्टोबर २०१५ पर्यंत दोन्ही मोर्चै आयोजकांनी एकत्रित यावे. तद्नंतर बुद्धीजीवी वर्ग जो निर्णय घेईल तो धनगर नेत्यांच्या भविष्याला धोका असेल आणि धनगर समाजाच्या हीताचा असेल. यासाठी धनगर समाजाला योग्य दिशा देण्याचे काम बुद्धीजीवी वर्ग प्रामाणिकपणाने करत असून समाजबांधवांचा विश्वास हा फक्त बुद्धीजीवी वर्गावर आहे हे नेत्यांनी विसरू नये. नाहीतर मग धनगर समाजाचं वाटोळं करायचा प्रयत्न कराल तर याद राखा आमच्यातला लढवय्या यशवंतराव होळकर आता जागा झाला आहे आणि आम्ही कदापी शांत बसणार नाही.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
             -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
........................................................

Wednesday 7 October 2015

वेगवेगळे मोर्चे पण नुकसान समाजाचे...


जय मल्हार योद्ध्यांनो
पाठीमागे राज्यभरातील सर्व समाजबांधवांच्या प्रतिक्रीया मिळवून मी एक सर्वे केला होता त्यामध्ये ९३.७५% समाजबांधव वेगवेगळ्या मोर्चात सहभागी होणार नसून एकच मोर्चा असावा असे त्यांचे मत होते. आज अशा प्रतिक्रीया देणार्या समाजबांधवांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून त्यांची सरासरी ९६% वरती पोहचली आहे. वेगवेगळे मोर्चे आयोजित करणार्या नेत्यांनी याची दखल घ्यायला हवी कारण भविष्यात तुमचं नेतृत्व धोक्यात येण्याची चिन्हे आज दिसू लागली आहेत. डोळ्यावरती नव्हे तर नेत्यांनी स्वताच्या इगोवरती (अहंकारावरती) घोंगडी पांघरूण घालून डोळे उघडे ठेवून पुढे वाटचाल करावी तरच तुमचं आणि समाजाचं भविष्य उज्वल ठरेल अन्यथा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थीती होईल.
धनगर समाजातील सर्व समाजबांधवांनी व नेत्यांनी एकत्रित येऊन आरक्षण अंमलबजावणीसाठी संघटनातून संघर्ष करावा यासाठी प्रबोधनाच्या आणि समाजजागृतीच्या माध्यमातून आज बुद्धीजीवी वर्ग पोटतिडकीने आणि तळमळीने काम करतो आहे. सर्व बुद्धीजीवी वर्ग हा निस्वार्थीपणे समाजासाठी झटत आणि झगडत असल्याने आजच्या ९६% धनगर समाजबांधवांचा विश्वास हा बुद्धीजीवी वर्गावर असून समाजातील विचारवंत, तज्ञ, लेखक जो निर्णय घेतील तो समाजाच्या हीताचा असणार आहे. म्हणून वेगवेगळे मोर्चे काढणार्या नेत्यांनी या गोष्टीची दखल घ्यायला हवी.
  यशवंत सेनेचे संस्थापक स्व बी के कोकरे साहेब यांच्या क्रांतीकारी चळवळीनंतर समाजाला योग्य दिशादर्शक नसल्याने समाज अंधार्या रात्रीच्या दिशाहीन जहाजाप्रमाणे वाटेल तिकडे भरकटत गेला आहे. प्रस्थापितांची चमचेगीरी अन् गुलामगीरी करत धनगर समाजाच्या नेत्यांनी समाजाला लांडग्यांच्या दावणीला बांधायचं महापाप केलेले आहे. आज खरंच समाजामध्ये स्व बी के कोकरे साहेबांची उणीव भासते आहे. जोपर्यंत या महाराष्ट्रातील युवकांच्या डोक्यात स्व. बी के कोकरे साहेबांची विचारधारा पेरली जाणार नाही तोपर्यंत हा समाज पेटून उठणार नाही अन् एकत्रितही येणार नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे. ज्यादिवसी हा अखंड धनगर समाज पेटून उठेल तेव्हाच आपली कुठेतरी दखल घेतली जाईल. एवढंच नव्हे तर सांगलीमध्ये कार्यक्रमात बोलताना मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी सुद्धा स्व.बी.के.कोकरे साहेब आज समाजात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
समाजाचे नुकसान.....
८ आणि १० डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर दोन वेगवेगळे मोर्चे घेऊन जाण्यासाठी धनगर नेते कंबर कसून उभे राहीलेत खरे पण या वेगवेगळ्या मोर्चातून काही साध्य होणार नाही उलट धनगर समाजाचे  आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे याचा अभ्यास बुद्धीजीवी वर्गासोबत नेत्यांनी सुद्धा करायला हवा.
१)आर्थिक नुकसान:- महाराष्ट्रातून धनगर समाजबांधव वेगवेगळ्या मोर्चात सहभागी झालाच तर पश्चिम महाराष्ट्रातून नागपूरमध्ये येण्यासाठी एका समाजबांधवाला कमीत कमी २००० रुपये खर्च येतो.
१ समाजबांधव =२०००
१००×२०००=२०००००
१०००×२०००= २००००००
१००००×२०००= २०००००००
फक्त दहा हजार समाजबांधव पश्चिम महाराष्ट्रातून नागपूरमधील वेगवेगळ्या मोर्चात सहभागी झाला तर येण्या-जाण्याचे दोन कोटी रुपये खर्च होतील. मग लाखो समाजबांधव फक्त पश्चिम महाराष्ट्रातून गेले तर २० कोटी रुपये खर्च होतील मग उर्वरीत कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून समाजबांधव नागपूरमध्ये आला तर अब्जावधी रुपयांचे आर्थिक नुकसान होईल आणि त्याशिवाय समाजबांधवांच्या जेवणखाण्याचा खर्च, समाजबांधवांनी घेतलेल्या रजा(सुट्ट्या), त्यांच्या कामांचे खाडे याचा हिशोब केला तर हा आकडा कुठच्या कुठे जाईल ते सांगता येणार नाही.
२) सामाजिक नुकसान:- वेगवेगळे मोर्चे काढल्याने शेता-मळ्यात तसेच रानावनात शेळ्या मेंढ्यांची राखण करून तळहातावरती पोट भरणारा समाजबांधव आरक्षणाच्या नावाखाली नागपूर मध्ये येणार पण त्यांच्या पदरात नेमकं पडणार तरी काय?? नेत्यांचीच अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य समाजबांधवांच्या नशीबी नुसती निराशाच येईल आणि नेत्यांच्या या विश्वासघातकी प्रवृत्तीमुळे पुढे भविष्यात होणार्या सामाजिक कार्यक्रमात, मोर्चे असो अथवा आंदोलन त्यामध्ये सर्वसामान्य धनगर समाज सामील होणार नाही हे सामाजिक नुकसान पुन्हा कधीही भरून काढता येणार नाही.
३) राजकीय नुकसान:- वेगवेगळे मोर्चे आयोजित केल्याने नक्की कोणत्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं असा समाजबांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. संबंधित नेत्यांनी इगो बाजूला ठेवून आरक्षणाचा श्रेयवाद, राजकीय स्वार्थ, मोठेपणा तसेच त्यांच्या पक्षश्रेष्ठींना खूश करण्याची उठाठेव बंद करून एकच मोर्चा आयोजित करावा अन्यथा कोणत्याच मोर्चात सहभागी होणार नाही असे ९६% समाजबांधवांचे मत आहे. मग पुढच्या विधानसभा/लोकसभा निवडणूकीत मत मागताना नेमकं काय म्हणून मत मागणार?? जिथे धनगर समाज तुमच्या सोबत नसेल तर बाकीच्या समाजाकडे काय म्हणून भिक मागणार? आणि अशामुळे त्या संबंधित नेत्यांचेच नव्हे तर सर्व धनगर नेत्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येणार हे सर्वात मोठे राजकीय नुकसान आहे.
अशा प्रकारे आर्थिक, समाजिक आणि राजकीय नुकसान फार मोठ्या प्रमाणात होईल पण तसे त्यातून वेगवेगळे मोर्चे काढले तर एक-दोन तासापुरती सभा अन् तद्नंतर  निवेदन घोषणा दिल्या की तिथंच समारोप करुन मोर्चा संपला असं जाहीर करणार असाल तर Output=Zero असणार आहे. समाजाचं भांडवल करून तुम्ही स्वताच्या नावावर जर समाजाचा बाजार मांडत असाल तर समाज तुम्हाला साथ देणार नाही. आणि कधी माफही करणार नाही. आज धनगर समाजातील युवा तरूण वर्ग सुशिक्षित सुज्ञ आणि जागृत झालेला असून बुद्धीजीवी वर्ग जो निर्णय घेईल तो मान्य करून संघर्ष करण्यासाठी तयार आहेत पण श्रेयवादापोटी आणि राजकीय स्वार्थापोटी समाजात विभाजन करू पाहणार्या नेत्यांना अद्दल घडवली पाहीजे. वेगवेगळ्या मोर्चाचे नेतृत्व करणार्यांपैकी कोणीतरी वैयक्तिक स्वार्थ आणि श्रेयवाद बाजूला ठेवून दोन पाउले मागे घ्यावीत आणि एकाच मोर्चाचे आयोजन करून समाजकार्यात भर घालावी असे माझे वैयक्तिक मत असून यात समाजाचे परिणामी धनगर नेत्यांचे भले आहे अन्यथा "मलाही नको अन् नको तुला तर घाल कुत्र्याला" अशी अवस्था होईल. धनगर समाजातील नेत्यांनी वरील सर्व गोष्टींचे भान ठेऊन विचारविनीमय करावा. आज राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात मीटींग घेऊन तुमचे पैसे खर्च करण्यात काही अर्थ नाही फक्त तुम्ही एकत्रित येऊन एकाच मोर्चाचा एकच दिवस निश्चित करा तर आम्ही पंचवीस लाखाच्या वरती नागपूरमध्ये पोहचू हवं तर मी ती सर्व जबाबदारी घेतो अन्यथा वेगवेगळ्या मोर्चात सहभागी होणे म्हणजे समाजाचे विभाजन करणे होय. मोर्चे जर वेगवेगळे असतील तर मी सुद्धा कोणत्याच मोर्चात सहभागी होणार नाही.
जय मल्हार जय!! अहिल्या!!!
            -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
........................................................

Saturday 26 September 2015

मला तुमच्याशी बोलायचंय...

जय मल्हार
आरक्षणासंदर्भात तुमचं मत मला जाणून घ्यायचे आहे म्हणून वैयक्तिकरित्या बोलायचं ठरवलं. खरंतर आजपर्यंत ग्रुपवरतून मी माझे विचार व्यक्त करत होतो आणि धनगर समाजाच्या ५४३ ग्रुपमध्ये असल्याने मला आपले वैयक्तिक मत जाणून घेता आले नाही.  प्रतिक्रीयांच्या स्वरुपात तुम्ही माझ्या विचारांना जी दाद दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
राज्यघटनेनुसार धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी तुम्ही आम्ही झटतो आहोत झगडतो आहोत. प्रत्येकाने या संघर्षासाठी किमान खारीचा वाटा उचलला आहे. पण सर्व संघटना राजकीय नेते यांनी एकत्रित येऊन नागपूर विधानभवनावर एक "विराट जन आंदोलन" काढायचं असं २१ जुलै रोजी बारामती मध्ये झालेल्या प्रेरणा दिनादीवसी रणशिंग फुंकण्यात आले होते. पण डिसेंबर मद्ये होणार्या अधिवेशनादरम्याण नागपूर विधानभवनावर वेगवेगळे मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत.
नागपूर विधानभवनावर वेगवेगळे मोर्चे काढले तरी काही हरकत नाही पण समाजबाधवांमध्ये अशा वेगवेगळ्या मोर्चाबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. नेमके कोणत्या मोर्चात सहभागी व्हायचं ? असाही प्रश्न पडलेला आहे. प्रत्येक नेता आपलाच आहे आणि नेते पुढाकार घेताना दिसताहेत याचा मला सार्थ अभिमान सुद्धा वाटतो. पण प्रत्येक नेता आणि प्रत्येक समाजबांधव आपलाच असताना नेमकं कोणाच्या मोर्चात जायच?" का कोणाच्याच मोर्चामध्ये सहभागी व्हायचंच नाही अशा भरपूर प्रतिक्रीया मला समाजबांधवांकडून आल्या. मग नक्की काय करायचं असे वारंवार प्रश्न समाजबांधव करत आहेत. "धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था होऊ नये म्हणजे बरं...
मग सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांनी नेत्यांनी एकत्रित येउन चर्चा करायला हवी यासाठी सर्व समाजबांधवांनी सकारात्मक प्रतिक्रीया दिलेल्या आहेत. तर तुमचं याबद्दल मत काय आहे हे सविस्तरपणे मला सांगितले तर खूप बरं होईल. धनगर समाजातील नेते आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी मागणी करण्याऐवजी आमदारकी मागत बसल्याचे आरोप आज समाजातून होत आहेत. त्यांनी आयोजित केलेले मोर्चे म्हणजे आमदारकीसाठीचा सर्व खटाटोफ असल्याचे अनेक समाजबांधवांनी सांगितले. खरंतर धनगर समाजाचे आमदार असायला पाहिजेतच पण आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यानंतर आमदारकीला राखीव कोट्यातून धनगर समाजाचे उमेद्वार कमी पडतील अशी वेळ येईल. त्यामुळे नेत्यांनी मोर्चा काढून आमदारक्या मागत बसणं म्हणजे भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा घात केल्यासारखा प्रकार होईल. तद्नंतर शेळ्या-मेंढ्यांची राखण करणारा माझा मायबाप कोणत्याच नेत्यांवर कधीही विश्वास ठेवणार नाही. त्यासाठी सर्व नेत्यांना एकत्रित करुन एकाच विराट मोर्चासाठी चर्चा घडवून आणायचा माझा मानस आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे??
सर्व नेत्यांनी व वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकार्यांनी सर्व मतभेद व मनभेद बाजूला ठेवून एकत्रित यावं यासाठी तुम्हालाही खारीचा वाटा उचलावा लागेल.
यावरती तुमचं जे काय म्हणनं आहे ते सविस्तर कळवावे. निशब्द राहून तुमचे विचार मला समजणार नाहीत तर तुम्हाला जे योग्य वाटते ते मला निसंकोचपणे सांगावे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!

      👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆
(तुमचं वैयक्तिक मत +917666994123 या नंबरवरती मेसेज, व्हाटसप अथवा कॉल करुन कळवावे)

Wednesday 23 September 2015

आरक्षणाची अंमलबजावणी का आणि कशासाठी???

रविवार दि ४ अॉक्टोबर २०१५  रोजी  दु: २:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पटेल चौक, गणपती पेठ सांगली येथे "आदिम जमात धनगर समाज एक सायंटिफिक प्रबोधन" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त युवा वर्ग महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केलेले आहे.
गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाजाला जाणूनबूजून अनुसुचित जमातीच्या सवलती दिल्या नाहीत पण आज सनातनी संस्थांच्या शिकवणीतून आणि प्रस्थापितांच्या नादाला लागून धनगर समाजातीलच काही समाजबांधव आम्हाला आरक्षणच नको समानता हवी असे म्हणत अज्ञानपणाच्या आणि मुर्खपणाच्या बाता करताना दिसून येताहेत. धनगर समाजाला अथवा अन्य इतर समाजाला स्वातंत्र्यानंतरच आरक्षण दिले गेले  अथवा राज्यघटनेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केली अशातला विषय नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळातही आरक्षणाचे जनक छत्रपति राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरवात केली होती.
आरक्षण पद्धत बंद करुन या देशात समानता असायला हवी असं प्रत्येकाला वाटते यास मी सुद्धा अपवाद नाही. पण आजच्या घडीला शैक्षणिक संस्था, सोसायट्या, सुतगिरण्या, कारखाने, लघूउद्योग त्याचप्रमाणे मोठमोठे उद्योग, भांडवलशाहीत, प्रशासनात अन् राजकारणात कोणता समाज प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळतो याचा अभ्यास कधी केलात का?? प्रस्तापित नेते आणि सनातनी व्यवस्था व संस्था यांनी देशाची तिजोरी लूटून ते आज भांडवलदार बनले आहेत. मग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार प्रत्येकाला शैक्षणिक क्षेत्रात वाटा मिळेल असं म्हणनार्यांनी माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजातील शेळ्या-मेंढ्यांमागे भटकंती करणार्या माझ्या लहान बहिण-भावंडांचा कधी विचार केलात का?? आजचे माजलेले आणि मस्तावलेले शिक्षण सम्राट सहजासहजी माझ्या या भावडांना खरंच शिक्षण/न्याय देतील का?? या देशातील जनतेला बाबासाहेबांनी लोकशाहीचा मार्ग दाखवून दिला त्या राज्यघटनेनुसार या देशाचा राज्यकारभार सुरळितपणे चालला आहे आणि चालतही राहील पण जर आरक्षण पद्धत बंद केली असती तर आज देशात लोकशाहीची जागा ठोकशाहीने घेतली असती अन् तुम्ही-आम्ही या देशातल्या माजलेल्या धनदांडग्याची अन् सनातनी समजल्या जाणार्या औलादींची धुणी-भांडी करत बसलो असतो. हे तुम्हा-आम्हाला कधी समजणार?? कोणताही मागचा पुढचा विचार न करता नुसतंच उचलली जिभ अन् लावली टाळ्याला असंच करत बसला तर त्या सनातन्यांचे उद्दीष्ट साध्य व्हायला काही वेळ लागणार नाही. गुणवत्तेनुसार अथवा वार्षिक उत्पन्नानुसार आरक्षण असावं असं म्हणत असाल तर गेल्या ६७ वर्षापासून सतत डोंगरदरीत राहून वास्तव्य करणारा, पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरणारा, शैक्षणिक, राजकीय त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या अतिमागासलेपणा असलेला माझा धनगर समाज कधीच प्रवाहात येणार नाही अन् आमच्या उद्याच्या पिढीला शिक्षण, रोजगार, उद्योग यातील काहीच मिळनार नाही तसेच प्रशासनातून आणि राजकारणातून आम्ही शेकडो मैल दूर लोटलो जाऊ.
त्यासाठीच उद्याच्या भावी पिढीच्या भल्यासाठी आजचा युवा वर्ग जागरूक व्हाव हे उद्दीष्ट ठेवून दि ४ अॉक्टोबर रोजी सांगली येथे आदिम जमात धनगर समाज एक सायंटिफिक प्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्व विद्यालयीन, महाविद्यालयीन, विद्यार्थी-विद्यार्थीनींनी, समाजातील सुशिक्षित आणि सुज्ञ  युवक/युवतींनी, शिक्षकवर्ग त्याचप्रमाणे बुद्धिजीवी समाजबांधवांनी व राज्यातील सर्व संघटनांनी मतभेद विसरुन आणि राजकिय पक्षाच्या चपला बाहेर ठेवून सर्व पक्षातील नेत्यांनी सदरच्या कार्यक्रमास उपस्थीत राहून आरक्षणासंदर्भातील भ्रम दूर करून वास्तव काय आहे याचा अभ्यास करावा आणि अवलोकन करावे.
सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर तसेच आसपासच्या जिल्ह्यातून व राज्यभरातून या कार्यक्रमास येणार्या समाजबांधवांनी आपला सहभाग नोंदवावा जेणेकरून संयोजकांना उपस्थित राहणार्या समाजबांधवांची योग्य ती व्यवस्था करता येईल.
सहभाग नोंदणी आणि अधिक माहितीसाठी
संपर्क:-
अभिषेक  धडस 9021094360
नितिनराजे  अनुसे 7666994123
रेवाप्पा खोत 9623474597
मंगेश लंबाडे 8552854200
भारत  व्हणमाने 8806113906

जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।
जय यशवंत!! जय वीरांगणा भिमाई!!!

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Tuesday 22 September 2015

धनगर समाजातील यूवकांनो जागृत व्हा...

आज एकविसाव्या शतकातसुद्धा माझा धनगर समाज अज्ञानी आणि भोळा-भाबडाच राहिलेला दिसून येतोय आणि हे नाईलाजानं म्हणावं लागतंय. आज आम्हाला आमच्या थोर महापुरुषांनी तलवारीशी खेळून प्रसंगी रणांगणात रक्त सांडून सुवर्णाक्षरात कोरून ठेवावा असा इतिहास घडवला असताना त्याचा आम्हास विसर पडतो. खरंतर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरु शकत नाहीत अन् इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. मग या देशावर ३५० वर्षाहूनही अधिक आमच्या महापुरुषांनी राज्यकारभार केला असताना आम्ही आमच्या इतिहासापासून अजूनही वंचित का??  का आम्हाला आमच्या महापुरूषांची ओळख झाली नाही?? का आम्हाला त्यांचा इतिहास माहितच पडला नाही.??? एकीकडे युरोप खंडासारख्या तंत्रज्ञान विकसित देशामध्ये रणरागीणी कर्मयोगीणी लोककल्याणकारी महाराणी अहिल्यामाईंच्या प्रशासनाचा आदर्श समोर ठेवून त्या त्या देशांचे प्रशासन/राज्यकारभार सुरळितपणे चालवला जातो. पण ज्या देशात अहिल्यामाई जन्माला आल्या त्या देशामधील प्रशासनाची गोष्ट दूरच ठेवा पण अहिल्यामाईंच्या वारसदारांनादेखिल याबद्दल काहीच माहित नसावं??  अरे अटकेपार झेंडे फडकवले ते अभिमानाने सांगतो, मल्हार आया मल्हार आया असं म्हणताच दुश्मनांना कापरं भरायचं. एवढी ताकद मल्हाररावांच्या नावातच होती. पानीपतची लढाई मराठ्यांच्या जीवावर बेतली आणि त्याला सर्वस्वी पेशवे जबाबदार होते कारण पेशव्यांनी मल्हारतंत्र वापरले नाही. ही लढाई जिंकणारा अफगाणिस्तानचा अब्दाली मल्हाररावांच्या तलवारबाजीवर फिदा होऊन मल्हाररावांवर कौतुकास्पद लिहून जातो. पण भारतातले परिणामी महाराष्ट्रातील अतिज्ञानी जातीयवादी इतिहासकार धुरंदर लढवय्ये राजे मल्हारराव होळकरांवरती पाणीपतमध्ये झालेल्या पराभवाचे खापर फोडत बसतात. मग आम्हाला मल्हाररावांच्या गणिमीकाव्याची अर्थातच मल्हारतंत्राची जाणीव का नसावी?? आजच्या एकविसाव्या शतकात सुद्धा धनगर समाजाला खरोखरच मल्हारतंत्राची उणीव भासते आहे हे नाकारू शकत नाही.
आमचा खरा इतिहास लपवून ठेवल्याचं आम्ही वारंवार म्हणतो, इतरांना सांगतो आणि भरसभेतून  बोंबलतो आणि प्रस्तापित आणि सनातनी व्यवस्थेला दोषी ठरवतो. पण खरंच आमच्या समाजातील युवकांना इतिहासाचा अभ्यास करायची आवड आहे का?? समाजातील युवकांना इतिहास अभ्यासायची सवय आहे का?? इतिहास खरा लिहलेला असो अथवा खोटा, त्या त्या इतिहासकारांनी त्यांच्या स्वार्थापोटी लिहलेला इतिहास खरा की खोटा हे तेव्हाच समजणार जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू. पण जर लिहलेला इतिहास खोटा वाटत असेल तर मग खरा इतिहास काय आहे याचं संशोधन करून खरा इतिहास समाजासमोर मांडता येईल. पण उठ की सुठ प्रस्तापित आणि सनातनींना नावे ठेवण्यात काय अर्थ आहे?? मान्य आहे की त्यांनी आम्हावर अन्याय केला, जाणूनबुजून आमच्या पुर्वजांचा इतिहास लपवून ठेवला.पण अन्याय करणार्यांपेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार ठरतो. मग सदैव असंच अन्याय सहन करत रडत बसायचं का अन्यायाच्या विरोधात मुठ उगारायची??  आज संजय सोनवनी सर यांच्या सारख्या थोर इतिहासकारांनी "धनगरांचा गौरवशाली इतिहास" लिहून ठेवला आहे. विख्यात लेखक तथा इतिहासकार आदरनीय होमेश भुजाडे सर यांनी देखिल धनगर समाजातील महापुरुषांचा खरा इतिहास समाजासमोर ठेवला आहे. धनगर समाजातील बुद्धिजीवी वर्ग समाजप्रबोधन करण्यासाठी लेखणीरुपी तलवार घेऊन एकेकाची काळीजं चिरुन टाकावीत अशा सडेतोड शब्दात समाजाच्या अज्ञानपणावर प्रत्यक्ष अप्रत्यिक्षरित्या वार करून समाज जागृती करताहेत पण माझ्या धनगर समाजातील युवक/युवती तो खरा इतिहास आणि समाजप्रबोधनात्मक विचार कीती गांभीर्यानं अभ्यासणार, वाचणार आहेत याची शंका वाटते. कारण आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाचन करायला कोणाकडे वेळ आहे?? सर्वांकडे स्मार्ट फोन आल्याने या स्मार्ट दुनियेत वाचन करणारा युवा वर्ग फार कमी प्रमाणात आहे. या अत्याधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानाबरोबरच वाचन, चिंतन, मनन, आकलन व अवलोकन या पाच शस्त्रांचा दैनंदीन जीवनात वापर केला तर १००% आपल्या धनगर समाजातून लेखक/कवी/साहित्यिक तयार होतील, प्रत्येकामध्ये स्वाभिमानाची आग निर्माण होईल, प्रत्येकजण अन्यायाच्या विरोधात पेटून उठेल. थोर महापुरुषांचा इतिहास जर अभ्यासला तर प्रत्येकाच्या नसानसात थोर महापुरुषांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढे धनगर समाजबांधवांची होणारी ससेहोलपटही थांबेल. धनगर समाजातील सुशिक्षित युवकांनी सुरवात स्वतापासून केली तर उद्या वाड्या वस्त्या, गाव तसेच शहरातील युवा वर्ग जागृत होईल अन् अन्यायाच्या विरोधात पेटून उठेल. यासाठी समाजबांधवांनी समाजोपयोगी पुस्तकं, कथा कादंबरी वाचाव्यात कारण जर मस्तकं सुधरायची असतील तर पुस्तकं वाचली पाहिजेत. तरच उद्या धनगर समाजातील पोरं देशाचं प्रशासन आणि राज्यकारभार चालवण्या लायक बनतील, अन्यथा दोन रूपयांची कवडी देणार्या नोकर्या आणि शेळ्या-मेंढ्यांची राखन करुन अविरत भटकंती करणं आमच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. धनगर समाजातील युवकांनी थोर महापुरुषांच्या जयंत्या आज डी जे लावून साजर्या करण्यापेक्षा अहिल्यामाईंसारख्या महान जगविख्यात प्रशासक कशा होत्या, त्यांच्या विचारांचा,प्रशासनाच्या आणि राज्यकारभाराच्या कार्यपद्धतीचा आजच्या दैनंदीन जीवनात अवलंब कसा करता येईल यादृष्टीनं अभ्यास करुन त्यासंबंधी प्रबोधन केलं तर भारताचं प्रशासन धनगर समाजातील युवक/यूवती चालवतील यात काही तीळमात्रही शंका नाही.

।। जय मल्हार।। जय अहिल्या।।

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Thursday 17 September 2015

रणरागीणी वीरांगणा भिमाई होळकर


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आद्यमहिला स्वातंत्र्यसेनानी सेनानी विरांगणा भिमाई होळकर यांना पुर्वीच्या इतिहासकारांनी जाणूनबुजूण उपेक्षित ठेवलं असा आरोप करायला मला वावगं वाटणार नाही. खरंतर त्यावेळचे इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते. भारताच्या आधुनिक इतिहासामद्ये झाशीच्या राणीचा उदो उदो करून तिचा इतिहास आम्हासमोर ठेवला पण झाशीची राणी कधीच तलवार घेऊन रणांगणात उतरली नाही तर इंग्रजांशी बंड करुन झुंज देणारी  ती राणी लक्ष्मीबाई नसून  विरांगणा झलकारीबाई होती हा खरा इतिहास आहे. आणि या झलकारीबाईंना देखिल उपेक्षित ठेवायचं काम इतिहासकारांनी जाणूनबुजूनच केलेलं आहे.
दुसरा नेपोलियन बोनापार्ट म्हणून जगभर ओळखले जाणारे आणि राजा शिवछत्रपति नंतर स्वताचा राज्याभिषेक करून घेणारे महाराजाधिराज शुरवीर धुरंदर लढवय्ये राजे यशवंतराव होळकर यांना धर्मपत्नी लाडाबाई पासून १७ सप्टेंबर १७८५ कन्यारत्न झाले त्याच विरांगणेची म्हणजेच रणरागीणी भिभाई होळकर यांची आज २२० वी जयंती. पुण्यात असताना मल्हारराव दुसरे, राजे यशवंतराव व विठोजी होळकर यांच्या डेर्यावर दौलतराव शिंद्यांनी काशीरावच्या मदतीने अचानकपणे पहाटेच्या सुमारास हल्ला केला त्यात मल्हारराव दुसरे गंभीर जखमी झाले होते आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला. यशवंतराव होळकर त्या अंधार्या रात्री गर्दीतून कसेबसे बाहेर पडले होते या हल्ल्यात त्यांच्या हातातून तलवार निसटून पडली होती पण यशवंतरावांच्या मातोश्री यमुनाबाई, पत्नी लाडाबाई व कन्या भिमाई, तसेच मल्हारराव दुसरे यांचे पुत्र खंडेराव यांना शिद्यांनी कैद करून पुण्यात ठेवले. भिमाईंचे बालपण कैदेतच गेले. राजे यशवंतराव होळकर हे त्यांचे सावत्र भाऊ मल्हारराव दुसरे यांच्यावरील हल्ल्याचा बदला आणि पेशव्यांनी शनिवारवाड्यापुढे केलेल्या सख्ख्या भावाच्या म्हणजे विठोजी होळकर यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी पुण्यावर चालून आले. पुण्याच्या वाणवडी पासून हडपसर पर्यंत दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन बेभान होऊन शिंद्यांच्या सैनिकांना कापत सुटले आणि ती हडपसरची लढाई जिंकून त्यांनी मातोश्री यमुनाबाई, पत्नी लाडाबाई व भिमाई यांची सुटका केली पण ज्याच्या नावाने सुभेदारीची वस्त्रे घेऊन राज्यकारभार करायचा होता त्या मल्हारपुत्र खंडेरावांना सोबत घेऊन पेशवे कोकणात पळून गेले होते याचं दुख यशवंतरावांना होतं.
भिमाईंस वडिलांप्रमाणे म्हणजेच यशवंतरावांसासरखे घोड्यावर बसून तलवारबाजी, बाणभाले चालवायची आवड होती. कधीकधी तर फजरफटका मारण्यासाठी मुद्दामहून अट्टहास धरून भिमाई आपल्या वडिलांसोबत जायच्या. यशवंतराव होळकर पेशव्यांच्या दौलतीचा कारभार अमृतरावावर सोपवून इंदौरला निघून गेले त़च पुण्यातून पेशव्यांनी पत्र पाठवून होळकर संस्थान फिरंगी लेकसाहेबाकडे विलीन करावं असं सांगितलं होतं पण लेक साहेब नावाच्या फिरंग्याने उत्तरेत पाय पसरायला सुरवात केली होती आणि हिंदुस्थानातली अनेक संस्थाने ताब्यात घेऊन भारतावर राज्य करण्याचा फिरंग्यांचा डाव यशवंतराव होळकर ओळखून होते. पण इंग्रजांना शरण न जाता प्रत्येक लढाया जिंकत ते इंग्रजांना कापून काढायचे. कधीकधी इंग्रज अधिकारी रणांगणातून माघारी पळ काढायचे. भिमाई होळकर ही बुळे घराण्याची सून झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षाच्या आतच त्यांच्या पतीचे निधन झाले. अशा प्रकारे त्यांच्या पदरी दुख वाढून ठेवलं असताना भिमाई आपल्या वडिलांच्या सैन्यात दाखल होऊन सैन्यांचं नेतृत्व करू लागल्या. कालांतराने यशवंतरावांचे निधन झाल्यानंतर मल्हारराव (तिसरे) यांना गादीवर बसवून यशवंतरावांची दुसरी पत्नी तुळसा राज्यकारभार बघू लागल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली  विरांगणा भिमाई व मल्हारराव तिसरे हे सैन्यांचं नेतृत्व करू लागले.
महिदपूरच्या युद्धापूर्वी माल्कमने  यशवंतरावांचे सरदार गफुरखान याला फितवले व ९ नोव्हेंबर १७१७ रोजी होळकर कुटंबियांना ठार मारायचे ठरवले पण यशवंतरावांचा सुरवातीपासूनचा अनुयायी धर्मा याच्यामुळे तुळसाबाईंना ठार मारायचा माल्कमचा प्रयत्न फसला पण गफूरखानने धर्माला ठार करून त्याच्यावरच हा कट उलटवला. स्वातंत्र्यासाठी लढणार्या तुळसाचा अखेर शिरच्छेद करून माल्कमने मृतदेह नदीत फेकून दिला तिकडे महिदपूरचाया युद्धात विरांगणा भिमाई होळकर व ८ वर्षाचा मल्हारराव होळकरांच्या सैन्यांचं नेतृत्व करत सैन्यांना प्रोत्साहन देत होते त्यांचं कौतुक करताना माल्कमने लिहून ठेवलंय "आमच्या देशात असे लढवय्ये का जन्माला येत नाहीत आणि आलेच असते तर आम्ही या जगावर राज्य केलं असतं." महिदपूरच्या युद्धात होळकरांकडे पंधरा हजारांचं घोडदळ व दहा हजाराचे पायदळ होते पण ठरल्याप्रमाणे माल्कमने फितवलेल्या गफूरखानने आपले सैन्य बाजूला करून रणांगणातून पळ काढला. वाघीणीसारख्या भिमाईला फक्त ३००० पेढार्यांसोबत जीव मुठीत धरून रणांगणातून बाहेर पडावं लागलं. यशवंतराव व तुळसाबाई यांच्यानंतर भिमाई यांनी उत्तरेत इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. भिमाई लहानपणापासूनच निर्भिड होत्या त्यांच्यां डोळ्यात एक विलक्षण तेज होतं. त्या न डगमगता इंग्रजांशी लढायला सज्ज असायच्या. यशवंतराव  होळकरांप्रमाणे भिमाई सुद्दा शिस्तबद्ध आणि तोफासहित सज्ज असलेल्या इंग्रजांना वायूवेगानं कापत सुटायच्या. रणांगणात एक स्त्री सैन्याचं नेतृत्व करुन दुश्मनांना वायूवेगाने कापून काढते आहे हे पाहून माल्कम चक्क आश्चर्यानं तोंडात बोटं घालून बघत बसायचा. गफूरखानने गद्दारी केल्यानंतर विरांगणा भिमाईनं छुप्या पद्धतीनं माल्कमच्या तळावर हल्ले करून, लुटालुट करून माल्कमला अगदी हातघाईला आणलं होतं. माल्कमच्या लष्कराचा दाणागोटा लुटायच, तळावर हल्ले करायचे हे षडयंत्रच भिमाईने रचले होते. इंग्रज अधिकार्यांची पुरती दमच्छाक झाली होती. विरांगणा भिमाईनं हिंदुस्थानातील सर्व संस्थानाच्या राजांना पत्रव्यवहार करून इंग्रजाच्या विरोधात लढण्यास आवाहन केले परंतू सर्व संस्थाने इंग्रजांशी विलीन झाली होती. शेवटी भिमाई सोबत असलेले पेंढारीही माल्कमला फितुर झाले आणि त्यांनी भिमाईला कैद करून दिलं. माल्कमने अशा या रणरागीणीला तुरूंगात डांबून खून केला. रणांगणात कधीही भिमाईला इंग्रज हारवू शकले नव्हते अशा एका स्त्रीला कैद करून ठार मारणं याला कोणतं पौरूषार्थ म्हणायचं?? पण शेवटपर्यंत ही वाघिणी, रणरागीणी हातात तलवार घेऊन स्वातंत्र्यासाठी लढत राहीली. होळकरशाहीची दौलत ही रक्त सांडून मिळवलेली होती ती भिमाईंनी रक्त सांडेपर्यंत हातातून जाऊ दिली नाही. आजच्या भारतदेशवाशीयांना आध्यमहिला स्वांतंत्र्यसेनानी वीरांगणा भिमाईचा खरोखरच विसर पडला आहे ही  सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. आज अशा या विरांगणेला २२० व्या जयंतीनिमीत्त मानाचा मुजरा व विनम्र जय मल्हार!!
जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।
जय यशवंत!! जय वीरांगणा भिमाई!!!

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Wednesday 16 September 2015

हक्कासाठी सघर्ष...एक कट्टर धनगर

हक्कासाठी संघर्ष...एक कट्टर धनगर
काल परवाची "समजेना हक्क मागतोय की भिक??" ही पोस्ट आज महाराष्ट्रभर फिरत आहे. मी स्वत: धनगर समाजातील व्हाटसपच्या ५१५ ग्रुपवरती आहेच आहे त्याप्रमाणे व्हाटसप च्या अन्य ग्रुपवरतून, ब्लॉग्स आणि फेसबूक च्या माध्यमातून ही पोस्ट लाखो समाजबांधवांपर्यंत पोहचली. परवापासून मला हजारोंच्या वरती समाजबांधवांनी फोन केले आणि माझे अभिनंदन केले. व्हाटसपद्वारे तसेच फेसबूक वरतुन देखिल समाजबांधवांनी कौतुक करून सत्य परिस्थिती असल्याचं सांगितलं. खरंतर मला माझं कौतुक करवून घ्यावयाचे नाही, मला कोणाची शाबासकी मिळवायची आहे अथवा मला प्रसिद्धी मिळवायची आहे अशातला विषय नाही. समाजकार्यासाठी प्रोत्साहन देणं गैर नाही त्यामुळे खरंतर सर्वांचे मी आभार मानतो. पण माझी तळमळ आणि माझा संघर्ष हा माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी व प्रसिद्धीसाठी नसून सर्व तळागळातील धनगर समाजबांधवांसाठी आहे. धनगर समाजातील नेत्यांचा मला खरोखरच अभिमान वाटतो आणि धनगर समाजातून जास्तीत जास्त युवक राजकारणात कसे पुढे येतील त्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असतो. कोणत्याही नेत्यांच्या विरोधात लिहावं असं मला मुळीच वाटत नाही पण समाजाच्या न्याय व हक्कासाठी सर्व नेत्यांनी एकत्रित यावं आणि संघटित होऊन संघर्ष करावा यासाठी मी समाजप्रबोधन करतोय. जर नेत्यांना समाजाशी काही घेणं देणं नसेल आणि ते संबंधित नेते धनगर समाजाचा फक्त त्यांच्या स्वार्थासाठी वापर करत असतील तर त्या त्या माजलेल्या नेत्यांचे कपडे फाडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आज महाराष्ट्रात धनगर समाजाच्या अनेक संघटना उदयास येवू लागल्यात. सामाजिक संघटन असायला पाहिजे त्याबद्दल माझं काही दुमत नाही. पण एखाद्या समाजबांधवांवरती अन्याय होत असताना, समाजातील आई-बहिणींवरती अत्याचार होत असताना त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जर तुमच्या संघटना पुढे येत नसतील तर मग जाळायला संघटना काढल्यात का?? गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाजावरती अन्याय होत आला आहे आणि आजही होतोय. पण धनगर समाजाच्या नावावरती काढण्यात आलेल्या संघटना स्वार्थासाठी चालवल्या जात आहेत असा आरोप करायला मला काही वावगं वाटणार नाही. जर तुमच्या संघटनेचं उद्दिष्ट हे समाजाच्या हितासाठीचंच असेल तर मग राज्य पातळीवर आणि राष्ट्र पातळीवर सर्व संघटना व त्यांचे पदाधिकारी यांनी एकत्रित येवून चर्चा, विचार-विनीमय करावा. अन्यथा स्वताचिच जाहिरातबाजी अन् बैनरबाजी करून तुमच्या स्वार्थासाठी समाजाचा वापर तुम्ही करायचा प्रयत्न करत असाल तर ते होऊ देणार नाही. समाजाचं बाजारीकरण करून समाजाला लांडग्यांच्या अर्थातच प्रस्थापितांच्या दावणीला नेऊन बांधायचा प्रयत्न कराल तर त्या बाजारबुणग्यांचा समाचार घ्यायला मी खंबीर आहे अन् त्यांना राजकीय संन्यास घ्यायला लावून घरात बसवल्याशिवाय शांत बसणार नाही. आज व्हाटसप फेसबुक वरतुन पाहायला भेटतंय की जो तो उठतोय अन् म्हणतोय मी मी धनगर समाजाचा नेता आहे. समाजातून नवनवीन नेते उदयास येताहेत त्याबद्दल काही वाद नाही पण प्रत्येकाने अखंड धनगर समाजाचा नेता म्हणवून घेणं म्हणजे समाजात विभाजन करत असल्याचं चित्र दिसून येतंय. जर समाजात विभाजन करायचं नसेल तर त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या विभागातून तालुक्याचे, जिल्ह्याचे नेतृत्व करून राज्यपातळी अन् राष्ट्रपातळीवरती एकत्रित यावे तरच समाज संघटित झाल्याचं दिसून येईल. अन्यथा प्रत्येकजण आरक्षणाचं श्रेय आपल्याच पारड्यात पडावं म्हणून उपद्व्याप करत बसला तर पुढच्या १०० पीढ्या जरी बरबाद झाल्या तरी आरक्षण मिळणार नाही हे सुद्धा तितकच सत्य आहे. यासाठी धनगर समाजातील पोटजाती बाजूला ठेऊन, धनगर समाजाच्या नेत्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता आजी/माजी आमदारांनी एकत्रित येऊन चर्चा करावी आणि एखादा दिवस निश्चित करून नागपूर विधानभवनावर "विराट जन आंदोलन" उभा करावं. २५००००० लाखांच्या वरती धनगर समाजाला नागपूर विधानभवनावर एकत्रित आणायची जबाबदारी माझी राहील पण वेगवेगळे मोर्चे आयोजित करून राजकिय पोळी भाजून घ्यायचा तुमचा डाव हाणून पाडल्याशिवाय सोडणार नाही अर्थातच तुमचा स्वार्थापोटीचा मोर्चा यशस्वी होऊ दिला जाणार नाही. ही विनंती समजा नाहीत धमकी. कारण प्रस्तापितांची खेळी आहे की तुम्ही वेगवेगळे मोर्चे आयोजित करून समाजात विभाजन घडवून आणावं जेणेकरुन धनगर समाजाला आपल्या ध्येयापर्यंत सहजासहजी पोहचता येणार नाही. हे प्रस्तापितांचे राजकारण आज तरी समजून घ्या तुम्ही वेगवेगळे मोर्चे काढून जर विधानभवनावर गेला तर आपलंच हसू होईल यासाठी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एकाच दिवसी संघटितपणे निश्चित केलेला मोर्चा यशस्वी होण्यासाठी प्रत्येक समाजबांधव प्राणपणाने कार्य करेल पण वेगवेगळे मोर्चे जर विधानभवनावर घेऊन जात असाल तर तुमच्या स्वार्थीपणाचं उद्दीष्ट कधीही साध्य होऊ देणार नाही.

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Sunday 13 September 2015

समजेना हक्क मागतोय की भिक...??


आज आम्हाला खरंतर लाज वाटायला पाहिजे अरे जग जिंकायला निघालेल्या सिकंदराला भारत जिंकण्यापासून परावृत्त करणार्या आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या जातीत जन्माला आलेल्या तुम्ही-आम्ही औलादी, आशिया खंडावर अधीपत्य गाजवणार्या राजा सम्राट अशोकांचे तुम्ही-आम्ही वारसदार, अटकेपार झेंडे फडकवणारे धुरंदर लढवय्यै राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी अहिल्यामाई होळकर, महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर, वीरांगणा भिमाई होळकर अशा थोर पुरुषांचे मर्द मावळे आणि ज्यांनी आई-बहिणींच्या रक्षणासाठी अन्यायाविरोधात कुर्हाड उगारून तब्बल ३५ खून करून १४ वर्ष तुरूंगवास भोगला तरी आजही निर्दोष असलेल्या त्या बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरु वाटेगावकर म्हणजेच आमचे लाडके आप्पा आणि धनगर समाजाला जागं करुन आमच्या हातात क्रांतीची मशाल देणारे यशवंत सेनेचे संस्थापक स्व. बी के कोकरे साहेब यांच्याच जातीत जन्माला आलेल्या तुम्ही-आम्ही औलादी आज अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आज प्रस्तापितांकडे भिक मागत बसलोय याची आम्हाला खरंतर लाज वाटायला पाहिजे.
आमचे पुर्वज, थोर महापुरुष जर वरतून आमच्या नेत्यांच्या आणि समाजबांधवांच्या असल्या या पोरकट लीला बघत असतील तर कदाचीत वरतून थुंकत असतील ते आमच्यावर... त्यांनाही खेद वाटला असेल अरे कोणत्या समाजात आपण जन्माला आलो  म्हणून डोकं फोडून घेत असतील. अरे ज्यांना आपल्या न्याय व हक्कासाठी संघटित होऊन एकत्रितपणे लढता येत नाही झगडता येत नाही त्यांना अशा थोर महापुरुषांचे वारसदार म्हणायचं तरी कसं? " मल्हार आया मल्हार आया म्हटलं तर अफगाणीस्तानच्या अब्दालीला देखिल कापरं भरायचं. दुश्मनांचे डेरेच्या डेरे ओस पडायचे, तोंड कुठ लपवायचं हे शत्रुंना समजत नव्हतं अशा मल्हाररावांचे मावळे आम्ही... त्याचप्रमाणे "हे राज्य माझ्या पुर्वजांनी तलवारींशी खेळून प्रसंगी रक्त सांडून मिळवलेलं राज्य आहे. आणि मला एक अबला स्त्री समजून हे राज्य जर तुम्ही स्वताच्या घशात घालायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला साखळदंडाने बांधून हत्तीच्या पायी देईन नाहीतर सुळावर लटकवेल ....तरच मी मल्हारराव होळकरांची सून." अशा निर्भीड शब्दांत पेशव्याला खडसवणार्या अहिल्यामाईंचे मर्द मावळे म्हणवून घ्यायला आज आम्हाला लाज वाटायला पाहिजे.
अरे आज एवढं षंढ झालात तरी कसे?? कुठे गेला तो आमचा मल्हारी बाणा?? नुसत्याच महापुरूषांच्या जयंत्या आणि पुणतिथ्या साजर्या करत बसायचं का?? नुसतंच महापुरुषांच्या फोटोंची जंगी मिरवणूक काढून लाखो रुपये उधळपट्टी करुन धांगडधिंगा घालायचे धंदे आतातरी बंद करा. महापुरुषांचे विचार त्यांचा इतिहास आणि त्यांचे कार्य डोक्यात घालायला शिका. महापुरुषांचे अनुकरण करायला शिका. Ahilyadevi Holkar was the great administrator of the 18th century असं आम्हाला ब्रिटीश पार्लमेंटने सांगितलं, पण याच मातीत अहिल्यामाईंच्या मावळ्यांची दखल इथलं जातीवादी प्रशासन घेत नाही.  त्याच उत्तम राज्यकर्ती आणि उत्तम प्रशासक असलेल्या अहिल्यामाईंचे वारसदार आजच्या प्रशासनात आणि जिथे कायदे बनवले जातात तिथं नाहीयेत ही एक सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. आज धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून तहसीलदारला निवेदन द्यायला गेलं तर तो तहसीलदार त्या निवेदनाला केराची टोपली दाखवतो. मग कायद्यानुसार राज्यघटनेत दिल्याप्रमाणे धनगर समाजाला न्याय व हक्क मिळत नसतील तर मग आम्हाला लढायला पाहिजे झगडायला पाहिजे. जर प्रशासन आणि माजलेलं सरकार कायद्याप्रमाणे आणि राज्यघटनेप्रमाणे राज्यकारभार करत नसेल तर मग आम्ही का म्हणून कायदे पाळायचे?? आमच्या हक्काचं आम्हाला दिलं जात नसेल तर मग आम्ही का गप्प बसायचं.?? गप्प बसण्याइतपत आता आम्हाला *** औलाद समजू नका. कायदे हातात घ्यायला आता आम्हाला वेळ लागणार नाही. आता जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुमचे कायदे आमच्या आडवे आणू नका आणि आणायचे असतील तर तुम्ही अगोदर कायद्याप्रमाणे वागा. तरच आमच्या वाटेला जा नाहीतर मग तुमच्या वाटेवर येवून तुमची वाट लावल्याशिवाय या धनगराच्या औलादी कदापी शांत बसणार नाहीत. आम्हाला आमचे हक्क मागून मिळत नसतील तर आम्ही हिसकावून घेऊ.
७ डिसेंबर २०१५ पासून नागपूर विधानभवनात हिवाळी अधिवेशन पार पडणार असून धनगर समाजातील स्वार्थी नेत्यांनी वेगवेगळे मोर्चे आयोजित करून धनगर समाजाचं विभाजन करायचं ठरवलंय. कोणी ८ डिसेंबरला मोर्चा काढायचं म्हणताहेत तर कोणी १० डिसेंबरला तर कोणी अजून तळ्यात-मळ्यातच करत बसलेत. म्हणजे "धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा" ही म्हण सार्थ कराण्यासाठी धनगर समाजातील काही स्वार्थी नेत्यांनी जणू काय सुपारीच घेतलेली दिसते आहे. धनगर समाजातील सर्व नेत्यांना/संत्र्यांना/मंत्र्यांना आजी/माजी आमदार असतील नाहीतर कोणी जहागिरदार असतील त्यांना सांगायचं आहे की बाबांनो तुम्ही वेगवेगळं मोर्चे आयोजित करून स्वताच्या स्वार्थासाठी धनगर समाजाचं विभाजन करत बसाल तर संपूर्ण धनगर समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे. आजकाल व्हाटसपवर वेगवेगळ्या पोस्ट फिरताहेत त्यात प्रत्येकजण म्हणतोय नागपूर विधानभवनावर निस्वार्थीपणाणे आमुक-आमक्याच्या अन् तमुक-तमक्याच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजबांधवांचा भव्य मोर्चा. पण कोण कशासाठी मोर्चा काढतंय ?? हे आम्हाला चांगलंच माहित आहे आम्हाला शिकवायचा कोणीही प्रयत्न करू नका. जर तुम्ही निस्वार्थीपणे मोर्चा काढत असाल प्रत्येक संघटनेच्या पदाधिकार्यांशी तुम्ही कधी चर्चा केलीत का?? ज्या आजी/माजी आमदारांनी मोर्चा काढायचं ठरवलंय त्यांनी राज्यभरातील कीती जिल्ह्यातील धनगर समाजाच्या नेत्यांसोबत बैठका आयोजित करुन चर्चा केली?? उद्या डिसेंबर मध्ये नागपूर विधानभवनावर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मोर्चा काढायचा असेल तर नेत्यांनीही आणि संघटनेच्या पदाधिकार्यांनीही एकत्रित येऊन चर्चा विनीमय करावा आणि एकच कोणतातरी दिवस निश्चित करावा अन्यथा समाजाच्या नावावर स्वताची राजकिय पोळी भाजून मलिदा खायचा धंदा बंद करावा. धनगर समाजातील आजी/माजी आमदार असतील अथवा कोणत्यातरी एखाद्या सघटनेचे नेते पदाधिकारी असतील त्यांना मी नितीनराजे अनुसे ओपन चैलैंज करतो की नागपूर विधानभवनावरील "विराट जन आंदोलन" उभे करून यशस्वी करायचे असेल सर्वांशी चर्चा करा सर्व संघटनेच्या पदाधिकार्यांना चर्चेत घेऊन कोणत्यातरी एखाद्या संघटनेचे नाव अन् झेंडा न घेता एकच दिवस निश्चित करुन सर्वांना सोबत घेऊन चला तरच पाच लाखांच्या (५०००००) ऐवजी  पंचवीस लाखांच्या (२५००००० ) वरती धनगर समाजबांधव एकत्रित आणायची जबाबदारी माझी. अन्यथा २३ मार्चच्या मोर्चासारखी अवस्था करायचं ठरवलं तर तुमच्या नातेवाईकांव्यतिरीक्त तुम्हाला हाजरीनं लोकं जमवावी लागतील अणि सच्चे स्वाभिमानी समाजबांधव घरातून बाहेर सुद्धा पडणार नाहीत याची दखल घ्यावी. मग समाजात एकी करायची का बेकी करायची हे धनगर समाजातील नेत्यांनी ठरवायचं आहे. धनगर समाजातील नेत्यांच्या मागं मागं पळाणारा आता भोळा समाज नाही राहिला तर समाजप्रबोधनातून सक्षम आणि समर्थ समाज घडवतोय तो धनगर समाजातील नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.
कळावे.
जागो उठो संघर्ष करो।👊
अपने हक हासिल करो।✊
जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Wednesday 9 September 2015

👉धनगर समाजाच्या आरक्षणाचे राजकारण


"धनगर" जमात ही आदिम काळापासूनची जमात असून आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकिय या क्षेत्रात अतिशय मागासलेली जमात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत १९५० साली धनगर समाजाचा सामावेश अनुसुचित जमातीच्या कलम ३४२ वरती महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अ.क्र.३६ वरती केलेला आहे. पण "धनगर" या शब्दाचा हिंदी शब्द प्रयोग "धनगड" असा झाल्याने प्रस्थापित व्यवस्थेने या समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळू दिल्या नाहीत. यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष स्व. बी के कोकरे साहेबांनी सातारा-पुणे हायवेवरती असलेल्या खंबाटकीच्या घाटात लाखो यशवंत सैनिकांना सोबत घेऊन तीव्र रास्तारोखो आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दखल घ्यावी लागली पण धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात अशी मागणी असताना शरद पवारांनी माजी मंत्री स्व शिवाजी बापूंना हाताशी धरून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाला वाटाण्याच्या अक्षता दावल्या. दुधाची तहान ताकावरती भागवण्याचं राजकारण पवारांनी केलं आणि धनगर समाजाला स्वतंत्र सुचि बनवून  फक्त महाराष्ट्रापुरतं भटक्या जमाती (क) (एन.टी. क च्या) यादीत टाकलं. पण राज्यघटनेत दिल्याप्रमाणे आमच्या हक्काच्या  केंद्र शासनाच्या अनुसुचित जमातीच्या सवलती धनगर समाजाला मिळू दिल्या नाहीत. त्यामुळे धनगर समाजातील हजारो मुलं-मुली आय ए एस / आय पी एस होण्यापासून वंचित राहिली इंजीनीयर, डॉक्टर, वकिल बणन्याऐवजी लाखो पोरं शेतीकडे वळली आणि शेळ्या-मेंढ्या राखू लागली . धनगर समाजासाठी येणारा दरवर्षीचा कोट्यवधी रुपयांचा निधी घशात घालायचं काम त्या प्रस्तापितांनी केलं असताना धनगर समाजितले लाचार नेते आणि  माझा अज्ञानी असलेला धनगर समाज बांधव आजही त्यांच्या पाठीमागेच जातोय याचंच दुख वाटतंय.
आजही पवारांनी समाजातील दलालांना जवळ करून आरक्षणाचं गाजर दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे पण आदिवाशी समाजाच्या नेत्यांना विरोध करण्यास सांगून आदिवासी बांधव आणि धनगर समाजात भांडण लावायचा प्रकार शरद पवार करताहेत आजचा तरी धनगर समाजातील युवा वर्ग जागृत, सुशिक्षित आणि सुज्ञ असल्यामुळे शरद पवारांच्या बळीचा बकरा कोणी बनणार नाही हे मात्र निश्चित. धनगर समाजाला अनीसुचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी धनगर समाजातील बुद्धिजीवी वर्ग कायदेशीर लढा देण्यास सक्षम असतानाच रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी धनगर समाजातील युवा वर्ग पेटून उठला आहे. धनगर समाजातील सर्व संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी एकत्रित येवून विचार विनीमय करून नागपूर विधानभवनेवरील जन आंदोलनाचा कोणतातरी एक दिवस निश्चित करावा. धनगर समाजातील नेत्यांनी वेगवेगळे मोर्चे आयोजित करून धनगर समाजाची दिशाभूल करणे, धनगर समाजाचं विभाजन करणे अथवा धनगर आरक्षणाचे श्रेय लाटण्याचे असले धंदे बंद करावेत. मला कोणत्या नेत्याच्या विरोधात बोलून स्वतावरती रोष ओढवून घ्यायचा नाही. पण आज धनगर समाज एकत्रित येत असताना जर त्यामध्ये विभाजन करून स्वताची पोळी भाजायचे तुमचे राजकारण असेल तर माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा अजिबात वापर करू नका. तुम्ही मिडीया विकत घ्याल पण आमच्याकडे सोशल मिडीया आहे त्यामाध्यमातून आम्ही जनजागृती करून समाजाला योग्य न्याय द्यायचा प्रयत्न करू. आजपर्यंत धनगर समाजातील नेत्यांनी समाजाचं पार वाटोळं केलं आहे पण इथूनपुढंही माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचं जर वाटोळं करायचं तुम्ही ठरवलं असेल तर मग आम्हाला तलवरी हातात घ्याव्या लागतील ही धमकी समजा नाहीतर चेतावणी.
धनगर समाजातील काही नेत्यांनी प्रस्तापितांसोबत विधानभवनावर मोर्चा काढायचं ठरवलंय पण त्यागोदर काही दिवसापुर्वी धनगर समाजातील काही संघटनांनी जन आंदोलनाचा दिवस निश्चित केला असताना धनगर समाजातील नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने वागू नये. त्या त्या नेत्यांनी सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांशी चर्चा करावी. आजपर्यंत तुम्ही समाजासाठी काही चांगलं काम केलं असेल आणि समाजाचं वाटोळंही केलं असेल पण आता तुमची संधी संपली. चालायचं असेल तर समाजासोबत चला नाहीतर घरात बसून गप्प राहा पण माझ्या धनगर समाजात विभाजन करू नका. नाहीतर आम्ही पण शुरवीर लढवय्ये राजे यशवंतराव होळकरांचे वारसदार आहोत मग आम्हाला आमच्या औकातीवर यायला फार वेळ लागणार नाही. आजचा युवा वर्ग पेटला तर एकेकाला पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आरक्षण मिळाल्यानंतर अनुसुचित जमातीच्या सवलतीमधून आमदार/खासदार बनण्यासाठी राजकारण करा पण आज आरक्षणाचं राजकारण करू नका. एकत्रित येवून लढा द्या.
जागो उठो संघर्ष करो।👊
अपने हक हासिल करो।✊
जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
👉nitinrajeanuse.blogspot.com
👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Wednesday 26 August 2015

खरंच धनगर असाल तर आताच पेटून उठा...


समाजातील माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजबांधवांच्या भावना व सद्य परिस्थिति लक्ष्यात  घेवून तसेच अनुभवातूनही माळरानावर आणि डोंगरदरीमध्ये वर्षानुवर्षे भटकंती करणार्या समाजबांधवांच्या भाषेत समाजातील सुशिक्षित शिकल्या सवरलेल्या सुज्ञ वर्गाला उद्देशुन रचलेलं हे काव्य आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक युवकांपर्यंत हे काव्य पोहचावं आणि त्यातून समाजप्रबोधन व्हावं हीच अपेक्षा. कदाचित माझे काही चुकत असेल तर समाजातील एक छोटासा समाजसेवक म्हणून मला माफ करावे ही विनंती.
  - नितीनराजे अनुसे
 
जिथं तिथं समाजाच्या नावावर घेऊनशान कोठा
खूप खूप शिकूनशान लय झाला रं तुम्ही मोठा
गडगंज पगार घेऊनशान जगताय तुम्ही आरामात
पण माझा भोळा समाज अजून माखतोय रं घामात

काय पाप केलं होतं रं या भोळ्या लोकांनी??
तुमचं कौतुक केलं रं समाजातल्या सगळ्यांनी
तुम्ही सगळीजण शिकूनशान गेला निघून तिकडं
आरं माघारी तर वळून बघा या माझ्या समाजाकडं

समाजातल्या नेत्यांनी फक्त वापरच करून घेतलाय
नुसतं "मत" नव्हं तर आमचा त्यांनी जीवच घेतलाय
निवडणूक जवळ येताच झोपडीत येवून हात जोडत्यातं
अन् निवडणूक झाली का पुन्हा पाच वर्सानंच दिसत्यातं

तुम्ही शिकलाय सवरलाय आता तुम्ही तर नीट वागा
कुणावर विस्वास ठेवायचा ते आता तुम्हीच सांगा
माझ्या समाजासाठी न्याय हक्क आतातरी मागा
नायतर आपल्या समाजाची अब्रू येशीवरच टांगा

बरं वाटतंय ना तुम्हाला असलं सगळं वाचायला??
समाजाचा पार तमाशा करून थायथाय नाचायला
अन्यायाविरोधात आवळा आता तलवारीच्या मुठा
लेकांनो खरंच धनगर असाल तर आताच पेटून उठा
           खरंच धनगर असाल तर आताच पेटून उठा

जय मल्हार!! जय अहिल्या!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Friday 7 August 2015

"बेफामपणा" नसेल...तर जगण्यात कार अर्थ?

"बेफामपणा नसेल...तर जगण्यात काय अर्थ?
ज्या धनगर जमातीत आम्ही जन्माला आलो. शेळ्या-मेंढ्या राखत, खेळत-बागडत लहानाचे मोठे झालो शिकलो सवरलो म्हणून लिहायला लागलो अन् बोलायलाही. थोर महापुरूषांच्या आणि राजा महाराज्यांच्या जातीत जन्माला यायला नशिब नव्हे तर सळसळत्या रक्तासोबत वाघाचं काळीज असावं लागतं. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. ज्या धनगर समाजात मी जन्माला आलो त्या धनगर समाजाचं मी काहीतरी देणं लागतो. समाजासाठी मला काहीतरी करायला पाहिजे असा विचार प्रत्येक धनगर बांधवांनी करायला हवा. काहीजण सहज म्हणून जातात की समाजानं मला काय दिले??  माझे एक सांगणे आहे त्या समाजबांधवांना की समाजानं तुम्हाला काय दिलं त्यापेक्षा तुम्ही समाजाला काय दिले?? याचा विचार करा. मगच समाजाकडून अपेक्षा ठेवा. आपण सर्वजण प्रत्येकजन समाजातील एक घटक आहोत मग आपल्या जातीसाठी आपण माती खाऊ शकत नसेल तर मग दुसरा कोणी थोडीच आपल्या समाजासाठी धाऊन येणार आहे.
धनगर जमातीतील राजा महाराजांच्या इतिहासाचा वारसा असणारे आम्ही आज कोणतं जगणं जगतोय तेच आम्हाला कळत नाही. इंग्रजांनी फक्त १५० वर्ष भारतावर राज्य केले तर इंग्रजांनी भारतीयांना गुलाम बनवलं असे म्हणतात. आरे मग धनगर समाजातील राजा महाराजांनी ३५०  वर्षहून अधिकतम राज्यकारभार या देशावर केला होता मग आमची जागा काय असायला पाहिजे? आणि आमची सध्याची अवस्था काय आहे?? याचा अंदाज प्रत्येकाला घेता आला पाहिजे. ज्या इंग्रजांनी भारतावर राज्य केलं त्या इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारणारे महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर हे आद्य स्वातंत्र्यसेनानी म्हणून ओळखले जातात. स्वतः इंग्रजांशी लढा देत असताना देशातील इतर संस्थानांच्या राजा-महाराजांना इंग्रजांच्या विरोधात लढण्यास प्रवृत्त करत होते पण इतर संस्थानातील राजांनी मातृभूमिशी गद्दारी केली आणि इंग्रजांशी मुकाबला न करता त्या त्या राजांनी आपापले संस्थान ब्रिटिश पार्लमेंटकडे स्वाधीन केले. तरीही राजे यशवंतराव होळकर न खचता इंग्रजांच्या विरोधात लढत होते. शस्त्र सज्ज आणि शिस्तबद्ध फौजफाटा असणार्या इंग्रजांच्या विरोधात कधीही न हारता एकूण १८ लढाया जिंकणारे आणि इंग्रजांना रणांगणात कापून काढत ताणून ताणून मारणारे खरे भूमिपुत्र आणि आद्यस्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांची ओळख असताना त्यांचा हा खरा इतिहास राष्ट्रापासून आणि पर्यायानं धनगर समाजापासून दूर ठेवला. खरंतर धनगर समाजाचा इतिहास चुकीचाच लिहला गेला होता. कारण इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते. या पाठीमागे काहीतरी कपट होते आणि त्यामुळेच धनगर समाजात जागृति होऊ शकली नाही. आज थोर विचारवंत/इतिहासकार मा. संजय सोनवणी सर यांच्यामुळे धनगर समाजाचा खरा इतिहास समाजासमोर आला.
राजे यशवंतराव होळकर इंदौरहून पुण्याकडे येत असताना थाळनेर येथे तापी नदीच्या तीरावर मुक्काम पडला होता. पाराजीपंतांनी पुण्याहून एका चित्रकाराला पाठवून यशवंतरावांचे चित्र काढायला सांगितले होते. तेव्हा त्या चित्रकाराने शिकारीसाठी एक डोळा मिटून यशवंतराव बंदुकीचा नेम धरत असल्याचे चित्र रंगवले होते. तेव्हा महाराज तुळसाला म्हणतात की चित्रकार खूप चतुर आहे. कारण माळव्यातील खरोखरच्या  शिकारीत यशवंतराव होळकरांच्या एका डोळ्याला इजा झाली होती आणि तो दोष त्या चित्रामध्ये चित्रकाराने कुशलतेने टाळला होता.  त्यावेळी तुळसा राजेंना म्हणाली लहानपणी इकडची स्वारी खूप बेफामपणे वागत असे आणि या चित्रावरुन तोच गुण कायमचा दिसतो आहे. तेव्हा महाराज जे वाक्य बोलले ते आजच्या धनगर समाजबांधवांना प्रेरित आणि प्रोत्साहित करणारं वाक्य होतं. चौरंगावरून उठत महाराज म्हणाले "हा बेफामपणा कधीच जाणार नाही, कारण बेफामपणा आहे तोपर्यंतच आमच्या जगण्याला काही अर्थ आहे. तो बेफामपणा जेव्हा संपेल त्या क्षणी जगणंच नकोसं वाटेल".
आज धनगर समाजातील पोरं शिकली सवरली तेव्हा बेफामपणे लिहायला लागली अन् बोलायला लागली समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढू लागली. मग धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या सवलतीसाठीचा संघर्ष असो, समाजातील आई-बहिणींवरती होणारा अत्याचार, मेंढपाळ बांधवांवरती होणारा अन्याय असो अथवा विद्यार्थ्यांना बंद झालेल्या शिष्यवृत्तीचा मुद्दा असो त्या त्या ठिकाणी धनगर समाजातील यूवक बेफामपणे न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरू लागले. या संघर्षात जीव द्यावा आणि घ्यावा लागला तरी धनगर समाजातील यूवा वर्ग शांत बसू शकत नाही आणि माघारही घेऊ शकत नाही कारण माघार घेणं आमच्या रक्तातच नाही हा एक बार मोठा इतिहास आहे आणि त्याचं कारण म्हणजे राजा-महाराजांपासून थोर महापुरुषांपासून वारसानं आलेला हा "बेफामपणा" आमच्या रक्तात आणि नसानसात आहे म्हणूनच आज आमच्या जगण्याला अर्थ आहे. तो बेफामपणाच जर आमच्यात नसेल तर मग आमच्या जगण्यात तरी काय अर्थ???

जय मल्हार!! जय अहिल्या!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Thursday 6 August 2015

धनगर समाजातील न्यूनगंड कसा दूर होईल?


ज्या धनगर समाजानं ५००० वर्षापुर्वी अक्षरांचा शोध लावला तीच अक्षरं आज धनगर समाजापर्यंत पोहचली नाहीत हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. ती अक्षरं आमच्यापर्यंत का पोहचली नाहीत? याचा उलगडा आम्ही कधी केलाच नाही. तितका विचार करण्याइतपत आम्ही सक्षम आहोत तरी कुठे? इंडोनेशिया मध्ये धनगर समाजातील एका मेंढपाळाने लोहचुंबकाचा शोध लावला त्या  चुंबकीय शक्तीच्या आधारे आजच्या तंत्रज्ञानाने जगात एवढी प्रगति केली की प्रत्येक क्षेत्रात लोहचुंबाकाचा सर्रास वापर केला गेला आणि वैज्ञानिक क्षेत्रात एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवला.
खरंतर धनगर समाजाने अक्षरांचा शोध लावला, लोहचुंबकाचा शोध लावला, जग जिंकायला निघालेल्या सिकंदराला भारत जिंकण्यापासून परावृत्त करणारा आद्य मौर्य सम्राट राजा चंद्रगुप्त मौर्य यांनी समृद्ध आणि शक्तिशाली भारताचे स्वप्न पाहिले, तद्नंतर राजा बिंदुसारा यांचा पुत्र म्हणजेच राजा चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू राजा सम्राट अशोक यांनी भारताच्या दक्षिणेकडील काही भाग वगळता आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर अफगानिस्तान सह इशान्येकडील नेपाळ, भूटानपर्यंतचा प्रदेश एका छत्रीखाली एकत्रित आणला होता. पाकिस्तानातील अटकेपार झेंडे फडकवणारे राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी कर्मयोगिणी महाराणी अहिल्यामाई होळकर, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे व शिवाजी महाराजानंतर राज्याभिषेक करून घेणारे महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर अर्थातच भारतीय नेपोलियन बोनापार्ट. वीरांगणा भिमाई होळकर, धनगर समाजाला हाक देऊन जागे करणारे लढवय्ये स्व बी के कोकरे साहेब व अन्यायाविरोधात आसूड उगारणारे आणि आजच्या तरूणांना लाजवणारे व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांचे लाडके आप्पा अर्थातच बोरगावचा ढाण्यावाघ बापू बिरू वाटेगावकर.
धनगर समाजाचा असा सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला इतिहास जर आम्ही अभ्यासला तर आजच्या धनगर समाजाबांधवांच्या मनातील न्यूनगंड दूर झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तितकेच सत्य आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "जो समाज आपला इतिहास विसरतो त्या समाजाचा कधीही विकास होत नाही". धनगर समाजाच्या बाबतीत अगदी असंच घडलंय. पण आमचा खरा इतिहास आमच्यासमोर का आला नाही?? याचा आम्ही कधी विचारच करत नाही. धनगर समाजातील अशा थोर महापुरुषांचा इतिहास अभ्यासू नये आणि याचा विचार धनगर बांधवांनी कधी करूच नये म्हणून समाजाला लाचार आणि गुलाम बनवनारी सनातनी आणि प्रस्थापित व्यवस्था या भारतात असल्यामुळेच धनगर समाजाचा विकास खुंटला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या भाषणात समाजाला केलेला उपदेश असा की, "देवाधिकाच्या भोदूबाबांच्या आणि भट-ब्राह्मणांच्या नादाला लागून तुमचा कधीच उद्धार होणार नाही. जर समाजाचा उद्धार करायचा असेल तर भारतीय संविधानानुसार जे कायदे बनवलेत त्या कायद्यांच्या आधारे राजसत्ता आणि राजपाठ हा मार्ग निवडला तरच समाजाचा उद्धार होऊ शकतो". आज धनगर समाज अज्ञानी असल्यामुळे अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला आहे आणि विकासापासून शेकडो मैल दूर असलेल्या या धनगर समाजाला विकासाच्या प्रगतिपतावर यायचं/आणायचं असेल तर धनगर समाजबांधवांच्या डोळ्यावरील अज्ञानाचं घोंगडं झटकून अंधश्रद्धेपासून त्यांची सुटका केली पाहिजे.
कोणीतरी माझ्या मदतीला येउन माझा उद्धार करेन हा न्यूनगंड जर मनातून काढून टाकला तर धनगर समाज यशाच्या वाटेवरती असेल. धनगर समाजाच्या मदतीला कोणीही धावून येणार नाही, धनगर समाजाचं नेतृत्व जर निस्वार्थी, सक्षम आणि सामर्थ्यशाली असेल तर धनगर समाजाची वाताहात होणार नाही. आजपर्यंत धनगर समाजाच्या मताधिक्याचा वापर परकियांनीच करून घेतला आणि आजही घेत आहेत पण धनगर समाजाच्या वाट्याला मात्र पाचवीला पुजलेलीच भटकंती आली आहे. राजकारण आपलं काम नव्हे असे म्हणून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष्य केल्याने प्रस्थापित जाती व्यवस्था धनगर समाजाच्या मताचा वापर करून स्वताची घरं भरू लागली. धनगर समाजाच्या मतावर प्रस्तापित आणि सनातनी लोक सरपंच, पं स. सभापति, जि.प. अध्यक्ष, आमदार, खासदार तसेच मंत्री झाले पण धनगर समाजाला या क्षेत्रात त्यांनी कधीच पुढे येवू द्यायचं नाही आणि या समाजावर सतत अन्याय करायचा असा त्यांनी डाव आखला.
दूरदृष्टी असलेले यशवंतराव चव्हाण त्यावेळी शरद पवारांना कानमंत्र देतात की धनगर समाजाला एकाऐवजी दोन घोंगडीने झोपवा कारण धनगर समाज जर जागा झाला तर या महाराष्ट्र राज्यात प्रस्तापितांना राजकारण करता येणार नाही. आज प्रस्तापितांचा एखादा उमेद्वार विधानसभा लढवत असेल तर आमचा भोळा-भाबडा धनगर समाज त्यांना मतदान करताना कधीही जातिभेद करत नाही पण धनगर समाजाचा एखादा उमेद्वार एखादी निवडणूक लढवत असेल तर प्रस्तापित आणि सनातनी व्यवस्थेतील लोक धनगर समाजाच्या उमेद्वाराला मतदान करत नाहीत हे वास्तव आणि सत्य आहे. कारण धनगर समाज्याच्या उमेद्वाराला मतदान करायला त्यांना लाज वाटतेय अशातला विषय नसून धनगर समाजाला विधानभवनात आणि संसदभवनेत पाठवायचं नाही हा त्यापाठीमागचा खरा उद्देश्य आहे. जिथं कायदे बनवले जातात तिथंच जर धनगर समाजाची माणसं नसतील तर मग काय खाक धनगर समाजाचा विकास होईल?? मग यावरून आतातरी धनगर समाजाला कळायला हवं की जातिभेद नक्की कोण करतंय? धनगर समाजाचा खरा शत्रु नक्की कोण आहे?
आज धनगर समाजाची अवस्था अशी आहे की आपापल्यातच एकमेकांचे पाय ओढायची सवय लागून गेली आहे. बरणीतल्या खेकड्यांसारखी प्रवृत्ति  जोपासल्याने धनगर समाजाची माणसं विधानभवनात आणि संसदभवनेत पोहचू शकत नाही आणि अशा प्रवृत्तीमुळे याचा फायदा प्रस्थापित आणि सनातनी व्यवस्थेला होतो, मग आम्ही आमच्यातल्या आमच्यात भांडायला सुरवात करतो. एकमेकांची जिरवाजिरवी अन् एकमेकांची डोकी फोडायला काठ्या कुल्हाडी हातात घेतो. महाराष्ट्र राज्यात परिणामी भारतात धनगर समाजाची लोकसंख्या अव्वल क्रमांकावरती असल्यामुळे प्रस्तापित पक्षांची मक्तेदारी संपवून धनगर समाजाच्या संघटना व पक्षाच्या उमेद्वारांना ग्रामपंचायतीपासून, सोसायट्या, कारखाने, मार्केट कमिटी, सुतगिरणी, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद, विधानसभा अथवा लोकसभा असो प्रत्येक ठिकाणी धनगर समाजाचा जर एखादा उमेद्वार निवडणूक लढवत असेल तर त्याच्या विरोधात निवडणूक लढवण्याऐवजी सर्वांनी त्या उमेद्वारास मतदान करून निवडून आणायला पाहिजे तरच धनगर समाजाला विविध पदे मिळतील. दक्षिण सोलापूर मध्ये मा. सिद्धेश्वर आवारे साहेब यांच्या "जय मल्हार युवा मंच महाराष्ट्र राज्य" या संघटनेनं हा उपक्रम राबविला आहे आणि असाच उपक्रम जर महाराष्ट्र राज्यभर राबविला तर २०१९ चा मुख्यमंत्री धनगर समाजाचा असेल हे मी अवर्जून आणि अभिमानानं सांगेन.
धनगर समाज जर एक झाला तर नेते आपोआप एकत्र येतील कारण कोणताही नेता हा समाजापेक्षा मोठा नसतो. त्यामुळे धनगर समाज कधीच एकत्रित येणार नाही अशी वायफळ आणि फालतू बडबड करण्याऐवजी प्रत्येकांनी सकारात्मक विचार करून, आजपर्यं चालत आलेला पारंपरिक विचार आणि मनातील न्यूनगंड दूर करुन स्वतःपासून १% जरी समाजजागृतीचे कार्य केले तर धनगर समाज १००% प्रगतिपथावर असेल. राज्यात धनगर समाजाच्या भरपूर संघटना आणि पक्ष सुद्धा आहेत पण राज्य पातळीवरती आणि राष्ट्रीय पातळीवरती त्या सर्व संघटना व पक्ष समाजहितासाठी/समाजरक्षणासाठी एकत्रित आले तरच राजा सम्राट अशोकांचं स्वप्न साकार होईल नाहीतर मग धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा असंच म्हणत बसायची वेळ येईल.

जय मल्हार!! जय अहिल्या!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................