Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday 3 December 2020

जातीयवाद्यांच्या तावडीत सापडलेला महान द्रष्टा योद्धा ✍ लेखन - नितीनराजे अनुसे

राष्ट्रपुरुष धुरंधर लढवय्या महाराजा यशवंतराव होळकर

        होय, मराठ्यांच्या इतिहासात मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर शत्रूंच्या चारी मुंड्या जीत करणाऱ्या, मराठ्यांचा इतिहास जाज्वल्यमान आणि दैदिप्यमान करणाऱ्या धुरंधर योद्ध्यांचा विसर मराठी माणसांना पडणे हे मराठी माणसांचेच नव्हे तर सबंध हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महा'राष्ट्रा'चे दुर्देवच म्हणावे लागेल. परंतु त्यापलीकडे जाऊन मी हेच म्हणेन की मराठ्यांच्या इतिहासात मर्दुमकी गाजवणऱ्या बहुजन समाजातील अशा धुरंधर योद्ध्यांचा इतिहास न अभ्यासने म्हणजेच त्या त्या मराठी माणसांना कदाचित जातीयवादाची झालेली कावीळ असावी...
       असेच धुरंधर लढवय्ये, शुन्यातून विश्व निर्माण करणारे  होळकर साम्राज्याचे सुभेदार तुकोजीराव होळकर यांचे धाकटे सुपूत्र म्हणजेच सळसळत्या रक्ताची आणि लखलखत्या तलवारीची धार असलेले धुरंधर योद्धे, एक महान तथा द्रष्टा योद्धा चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर. तत्कालीन हिंदुस्तानचा अर्थातच अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील क्रमांक एकचा शत्रू कोण असेल तर ब्रिटीशांचे नाव समोर येते. परंतु  छत्रपती शिवरायांपाठोपाठ असा एकला महाराजा यशवंतराव होळकर लढवय्या होता की ज्यांना स्वराज्यातीलच काही लालची शिलेदार आणि सरदारांकडून तितकाच अन्याय झाला जितका ब्रिटिशांनी या हिंदुस्तानच्या मातीवर केला. 
           तसे पहायला गेले तर तो काळ फार अंदाधुंदींचा होता, कोणाचा पायपोस कोणाच्याच पायात नव्हता. रणांगणात रक्त सांडून उभा केलेली होळकरांची दौलत घशात घालण्यासाठी पेशव्यांचेच सरदार होळकरांचे सोबती  अलिजाबहाद्दर दौलतराव शिंदे टपून होते आणि पेशवे देखील मागचा पुढचा विचार न करता त्यांस भरीस पडत गेले. अशातच  भांबुर्ड्याच्या मैदानात काशीराव होळकरांना भरीस घालून शिंद्यांनी साखरझोपेत असतानाच तुकोजी बाबांचे द्वितीय सुपुत्र महाराजा मल्हारराव होळकर (द्वितीय) यांची हत्या केली तर यशवंतराव सुखरूपपणे तिथून निसटले. अशी दुर्बुद्धी सुचलेल्या शिंद्यांना आणि पेशव्यांना समजावून सांगणारा जाणकार कोणी या स्वराज्यात नव्हता जे होते त्या नाना फडणिसांना पेशव्यांनी कैदेत ठेवले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. परंतु पुण्यातील पेशव्यांच्या व शिंद्यांच्या अशा कुटील राजकारणामुळे संपूर्ण रयत जात्यात भरडावी अशी भरडली जात होती. त्यात पेशव्यांच्या सरदारांनी खुद्द पेशव्यांच्या आज्ञेनुसार महाराजा यशवंतराव होळकर यांचे थोरले बंधू महाराजा विठोजीराजे होळकर यांना सूडबुद्धीने अटक करून हत्तीच्या पायी दिले. एखादा कसाब जनावरांना जेवढा त्रास देत नाही त्यापेक्षा क्रुर पद्धतीने विठोजीराजेंना ठार मारले ते छत्रपती शिवरायांनी स्थापित केलेल्या स्वराज्याच्या हिताचे मुळीच नव्हते. अशा वेळी शिंद्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊन होळकरांची गादी राहावी की नको याची शहानिशा करण्यासाठी समोरासमोर पेशव्यांशी मसलत करण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर दक्षिणेकडे कुच करतात. शिंद्यांची राजधानी उज्जैन काबीज करून वाटेत येणारी त्यांची ठाणी व महाल ताब्यात घेत नाशिक, बारामती  सुद्धा महाराजांच्या फौजेने ताब्यात घेतली. यालाच या मातीतले काही चुकीचे जन्माला आलेले जातीयवादी इतिहासकार म्हणतात 'होळकरी दंगा'. परंतु होळकरांचे महाल शिंद्यांनी घशात घातले होते, मल्हारराव होळकर द्वितीय यांची शिंद्यांनी हत्या केली पुढे महाराजा विठोजीराजे होळकर यांना देखील हत्तीच्या पायी देऊन क्रुर रित्या ठार मारले तेव्हा शिंद्यांचा आणि पेशव्यांचा दंगा इथल्या जातीयवादी आणि नालायक इतिहासकारांना दिसला नाही का? 

            असो किमान यानंतर तरी पेशव्यांनी समजदारीने विचार विनिमय करायला हवा होता परंतु 'विनाशकाली विपरीत बुद्धी' या म्हणीप्रमाणे महाराजा यशवंतराव होळकरांच्या फौजेला अडवण्यासाठी पेशव्यांनी शिंद्यांच्या आणि त्यांच्या कारभाऱ्यांच्या सांगण्यावरून सदाशिवराव बक्षी यांची कसलेली फौज उत्तरेतून बोलवली. राजधानीत रयतेच्या हिताची खलबते व्हायच्या ऐवजी होळकरांना कसं संपवायचे याचेच विडे उचलले जात होते. मराठ्यांच्या दौलतीत ज्या होळकरांनी भर घातली, उत्तर हिंदूस्थान घोड्याच्या टापांखाली आणून दिल्लीचे तख्तच नव्हे तर ज्या होळकरांनी अटकेपार मराठ्यांचे झेंडे फडवले त्या होळकरांना संपवायची कटकारस्थाने शिंद्यांनी चालवली होती. परंतु रणांगणातून माघार घेइन तो जातीवंत योद्धा कसला?  यशवंतराव होळकर देखील काय कमी नव्हते, ऐन पंचविशीतलं रांगडं धनगराचे पोरगं ते, अख्ख्या हिंदूस्थानभर गाजलेली नावाजलेली फौज यशवंतरावांकडे होती. हडपसरच्या माळावर महाराजा यशवंतराव होळकर यांची छावणी पडली होती. पाराजीपंतांनी समजावून सांगूनही पेशव्यांनी शिंद्यांच्याच कारभाऱ्यांचे ऐकून घेतले आणि तिथेच छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेल्या स्वराज्याचा घात झाला. शेवटी ऐन दिवाळीला अभ्यंगस्नानादिवशी सकाळी सकाळी लढाईला तोंड फुटले सरकारी फौजेकडून (शिंदे व पेशव्यांच्या फौजेकडून) वीस-पंचवीस तोफांचे बार उडाल्यानंतरच यशवंतरावांनी त्यांना प्रत्युत्तर द्यायला आपल्या फौजेला हुकूम दिला आणि बघता बघता होळकरांच्या फौजेने शिंद्यांची-पेशव्यांची फौज कापत ती वानवडी पर्यंत रेटत नेली. होळकरांचे सरदार आपापले मोर्चे शिताफीने सांभाळत शत्रूंवर चाल करत होते. मार्तंड मार्तंड असा जयघोष करत फौजेला प्रोत्साहित करत महाराजांनी लंकेवरून (महाराजा यशवंतराव होळकर यांची घोडी- लंका) खाली उडी मारली आणि दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन शिंद्यांच्या फौजेत घुसले आणि बघतो न बघतो तोपर्यंत सपासप वार करत हजार दोन हजार फौज त्यांनी कापून काढली होती. महाराजांची फौज देखील महारांजांचे अनुकरण करत शत्रूंवर तुटून पडत होते. त्याच आवेशात महाराजांनी विंचूरकरांना ओरडून सांगितले की तुम्ही माघारी फिरा तुम्ही आमचे शत्रू नाही तर शिंदे आणि शिंद्यांचे सरदार आमचे शत्रू आहेत. तोच विंचूरकरांना त्यांच्या फौजेने माघारी ओढले तोपर्यंत महाराजांच्या दांडपट्ट्याच्या फटक्यात सदाशिवराव बक्षींचे शिर धडावेगळे झाले. सगळीकडे शिंद्यांच्या-पेशव्यांच्या सैनिकांची हाडे पसरली होती. शेवटी शिंदे-पेशव्यांचे काही सरदार रणांगणातूनच पळून गेले. यशवंतरावांच्या तोफांच्या माऱ्याने पुणे जळले, आगीचे लोळ आकाशात उंच उंच दिसत होते. तोपर्यंतच कोण जिंकले कोण हारले हे न बघता भितीपोटी खुद पेशवा आणि बाळोजी हे मल्हारबाबांचा(द्वितीय) पुत्र  खंडेराव होळकर (द्वितीय) यांना घेऊन कोकणात पळून गेले. ते पुन्हा यशवंतराव होळकरांनी विनवणी करून देखील माघारी आलेच नाहीत. शेवटी फौजेच्या दाणागोट्यासाठी, अन्नपाण्यासाठी मंदिरातील पैसा बाहेर काढावा लागला. 

       वसई ला जाऊन पेशव्यांनी गोऱ्यांशी तह करून महाराजा यशवंतराव होळकर यांना होळकर दौलत ब्रिटीशांच्या स्वाधीन करण्याची पत्रे पाठवली तेव्हा महाराजा यशवंतराव होळकर संतापले. पेशव्यांच्या तहानुसार ब्रिटिश फौज पुण्यावर चालून येत आहे असे समजताच त्यांच्या फौजेस फुटकी कवडी देखील मिळू नये या उद्देशाने व राष्ट्र बांधणी साठी फौजेच्या लष्करी खर्चासाठी मंदिरातील दाग दागिने पैसा महाराजा यशवंतराव होळकर यांनी बाहेर काढला, पेशव्यांची राजधानी असलेला शनिवार वाडा सोडला तर इतर सरदारांचे महाल लुटून फस्त केले. याचाच इतिहासात उल्लेख करताना तेव्हाचा शत्रू असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, लेखकांनी महाराजा यशवंतराव होळकर यांना बंडखोर लुटारू, होळकरी दंगा अशी विभूषणं लावून महाराजांना बदनाम करण्याची एकही कसर सोडली नाही आणि त्यांचीच री ओढत खोलात जाऊन अभ्यास न करता इथल्या जातीयवादी लेखकांनी इतिहासकारांनी यशवंतराव होळकर यांना तीच विभूषणं लावून त्यांचा खरा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला.
         परंतु महाराजा यशवंतराव होळकर काही कमी नव्हते. जे इंग्रज भारतभुमीवर पाय पसरू लागले होते त्यांच्या विरोधात स्वकर्तृत्वावर दंड थोपटून ते उभे राहिले. भानपुऱ्यात त्यांनी तोफांचा आणि गोळाबारूदांचा कारखाना सुरू करून लढाईची धोरणं आखली. थोरले सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर म्हणायचे की गादीचा खरा वारसदार तोच असतो जो मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर लढाया मारून, कर्तृत्व गाजवून स्वराज्याचे रक्षण करतो. महाराजा यशवंतराव होळकर हे त्याच तालमीतून पुढे आलेला एक द्रष्टा योद्धे. होळकर साम्राज्याच्या, स्वराज्याच्या पलिकडे जाऊन त्यांनी ब्रिटीशांना मातृभूमीतून हाकलून लावण्यासाठी हिंदूस्थान अवघे एक राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून तलवारीची मूठ घट्ट पकडली आणि घोड्याच्या पाठीवर मांड टाकून डोळ्यांच्या पापण्या पडायच्या आत समोरासमोरील लढाईत जगभर गाजलेल्या ब्रिटिश फौजेला कापून काढत, इंग्रज अधिकाऱ्यांना गुडघे टेकायला भाग पाडून त्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आणि अशा शिस्तबद्ध अजिंक्य मानल्या जाणाऱ्या ब्रिटीश कवायती फौजेची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली. एक नव्हे, दोन नव्हे तर ब्रिटीश फौजेशी मुकाबला करत तब्बल एकणिस लढायांमध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांनी विजय मिळवला होता. समोरासमोरील लढाईत तर कधी कधी सपाट मैदानावर देखील गणिमी काव्याने ब्रिटीश फौजेवर चढाई करणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकरांच्या फौजेसमोर नवनवीन शस्त्रं असलेल्या ब्रिटिश फौजेचा टिकाव लागत नव्हता तेव्हा ब्रिटीशांनी होळकरांच्या सरदारांना फंद फितुरी करून होळकरांची फौज कमी करायला सुरुवात केली. हिंदूस्थातील सर्व राजा महाराजांना पत्रं पाठवून, विनवणी करून देखील एकही खरा माइचा लाल इंग्रजांच्या विरोधात लढायला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या सोबत आला नाही हे या राष्ट्राचे दुर्दैव होते. अन्यथा गोऱ्यांनी भारतावर कधीच राज्य केले नसते. योगायोगाने युरोपात नेपोलियन बोनापार्ट याची सुद्धा लढाई ब्रिटीशांच्या विरोधात होती. त्यावर सुप्रसिद्ध शाहीर अमर शेख पोवाडा गाताना म्हणतात की,
"करीन रक्तबंबाळ देश मी ब्रिटीशानो तुमचा,
भारत भुमीच्या तसुतसुवर हक्क फक्त अमुचा.
फंदफितुरी बंद करा अन या मैदानाला,
मेल्या आईचे दुध होळकर नाही हो प्याला.
नेपोलियन युरोपात... ह्यो होळकर हिकडं...
अडकित्यातील जशी सुपारी करु तुकडं तुकडं"
      पुढे शाहीर म्हणतात की
शिवरायांमागे राजा एकला यशवंतराव
ज्याचं नाव पोवाड्यातून गावं आणि शाहीरानं डोक्यावर घेऊन नाचावं...
डोक्यावर घेऊन नाचावं... 

      अशा मुत्सद्दी योद्ध्याचा जन्म पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे वाफगावच्या भुईकोट किल्ल्यात दि. ३ डिसेंबर १७७६ रोजी झाला. आज महाराजा यशवंतराव होळकर यांची २४४ वी जयंती आहे. त्यामुळे द्रष्टा योद्धा तथा राष्ट्रपुरुष महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास खोलात जाऊन अभ्यासने व राष्ट्र उभारणी साठी त्यांच्या दूरदृष्टीचा अवलंब करणे हे आजच्या युवा वर्गासमोर एक आवाहन आहे.
जय मल्हार। जय अहिल्या। जय यशवंतराजे।
          ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +91 853 000 4123

Saturday 16 May 2020

आम्ही नेमकं चुकतोय कुठे?

Old Post...
आज जनावरांची म्हणजेच कुत्र्या-मांजरांची जनगनना होते पण माझ्या धनगर समाजाची जनगनना होत नाही. का होत नाही? कशासाठी होत नाही?? असा आम्ही कधी विचारच केला नाही. कारण तितका विचार करण्याइतपच आमची बुद्धि पार भ्रष्ट झाली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही.
आज देशामध्ये गाई-म्हैसी, कुत्री-मांजरे एवढंच नव्हे तर जंगली प्राण्याची देखिल जनगनना होते. कुठे आणि कधी मोजायला जातात ते कोणास ठाऊक? म्हणजे भारत सरकारला जनावरांची जनगनना करायला वेळ, पैसा सर्व काही आहे पण माणसांची म्हणजे माझ्या धनगर समाजाची जनगनना करायला त्यांना सवड नाही.
जनगनना न झाल्याचा परिणाम काय? तर
राज्य घटनेत बाबासाहेबांनी कलम ३४२ मध्ये क्र ३६ वरती धनगड(धनगर) समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये १९५० साली सामावेश केला असून आमच्या अज्ञानपणामुळे आम्हाला ते माहीत नव्हते.  आज धनगर समाजाची जनगनना न झाल्याने धनगर समाजाची खरी लोकसंख्या कीती आहे हे अजूनही अंधारातच आहे. "र" आणि "ड" च्या फरकामुळे धनगर आणि धनगड हे एकच आहेत त्यासाठी अनुसुचित जमातीची अंमलबजावणी व्हावी म्हणून खंबाटकीच्या घाटामध्ये स्व बी के कोकरे साहेबांनी सर्वप्रथम रास्तारोखो केल्यानंतर सांगली मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीच्या उपस्थिति मध्ये धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी करण्याऐवजी धनगर समाजाला भटक्या जमाती-क मध्ये घातलं. आज धनगर समाज हा राज्य पातळीवरती भटक्या जमाती-क (Nomadic Tribes-C) च्या सवलतींचा लाभ घेतोय तर महाराष्ट्राबाहेर हा धनगर समाज इतर मागास वर्ग  (Other Backward Class) च्या सवलतींचा लाभ घेतोय. त्यावेळी राज्य पातळीवरती धनगर समाजातील लोकसंख्येचा विचार करून (धनगर समाजातील पोटजातींचा विचार न करता) भटक्या जमाती-क मध्ये ३.५% आरक्षण दिले. पण धनगर समाजाच्या अनेक पोटजाती या महाराष्ट्र राज्यात आहेत त्यां सर्वांची जर जनगनना केली तर फक्त महाराष्ट्र राज्यात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये धनगर समाज हा सर्वात जास्त आणि लोकसंख्येने १ क्रमांकाचा समुह असणारी जमात आहे. पण निश्चित लोकसंख्या ही सर्व जनगनना झाल्यानंतरच समजेल. मग सरकार जाणूनबुजून धनगर समाजाची जनगनना का करत नाही?? त्याचं उत्तर असं आहे की महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज हा भटक्या जमाती-क मध्ये आहे आणि पोटजातींचा विचार न करता भ.ज.-क (NT-C) चे ३.५% आरक्षण धनगर समाजाला दिलं गेलं आणि आमच्यातल्या आमच्यातच पोटजातींमध्ये भांडण लावायचं काम प्रस्थापितांनी केलं. याचा अर्थ असा की या राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक १ वरती असणार्या धनगर समाजाला फक्त ३.५% मध्ये गुंतवायचं आणि बाकीचा मलिदा इतरमागास वर्गातील व खुल्या वर्गातील समाजाला द्यायचा ही रणनीति आम्ही कधी अभ्यासणार???
एकुण लोकसंख्येच्या टक्केवारीवरुन त्याच्या निमपट आरक्षण द्यायचं अशी तरतूद असताना ३.५% आरक्षण म्हणजे महाराष्ट्र राज्यात धनगर समाज फक्त ७% एवढाच आहे का?? आज जर जनगनना केली तर धनगर समाज १७% नव्हे तर त्याहूनही अधिक आहे मग आमच्या बांधवांनी फक्त ३.५% मध्येच स्पर्धा करायची का??
धनगर, हटकर, व्हटकर, खुटकर, कुचेकर, सनगर, झेंडे धनगर, बंडी धनगर, खांडा धनगर अजूनही अधिक पोटजाती धनगर समाजात आहेत या सर्वांना महाराष्ट्र राज्यात फक्त ३.५% मध्ये अडकवलंय आणि बाकीचा इमाव मध्ये कमी लोकसंख्या असणारा समाज उरलेलेल्या २३.५%चा मलिदा खातोय त्याचाच परिणाम माळोरानी, रानावनातून भटकणार्या धनगर समाजाला याचा लाभच घेता आला नाही. आमचा धनगर समाज डोंगरदरी आणि दूर माळोरानी वास्तव्य करत आहे. काही ठिकाणी धनगर समाजाच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथे ना विजेची सोय आहे ना पाण्याची सोय  नाही शिक्षणाची व्यवस्था. त्यांच्याजवळ मी भारतीय आहे असे दाखवण्यासाठी आणि सांगण्यासाठी साधं रेशन कार्ड सुद्धा नाही. भारतामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याबद्दल त्यांना काहीच माहीत नाही. विजेची सोय नसल्यामुळे टीवी (दुरदर्शन), वृत्तपत्र  काय असतं तेच त्यांना माहीत नाही.
मग त्या आमच्या धनगर समाजबांधवांची जनगनना झाली का?? आणि झाली तर जनगनना कधी होणार?? तोपर्यंत आमची पुढची पीढी बरबाद करायचं सरकारचं धोरण आहे का?? कधी जाऊन तर बघा त्या ठिकाणी मग कळेल त्या सावरा-पिचड-मोघे-पुरकेला की हा धनगर समाज आदिवासी पेक्षाही अत्यंत हालाखीचं जीवन जगतोय की नाही ते... नुसत्याच शहरातील चार दोन कुटुंबांचा सर्वे करून हे भुंकु लागलेत.
 आज राष्ट्र पातळीवरती आमच्या समाजातील युवकांना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागतेय हे कीती दुर्दैव म्हणावे लागेल. आज राज्यघटनेत बाबासाहेबांनी तरतूद केल्याप्रमाणे जर अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळाले तर धनगर समाजाची पोरं राखीव आरक्षणातून राज्य आणि राष्ट्र पातळीवर नक्कीच पुढे येतील आणि शैक्षणिक राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात उच्च पदावरती पोहचतील. आज दहावी-बारावीचे निकाल झाले सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या तरी सरकार आल्यावर १० दिवसात आणि तद्नंतर १५ दिवसांत निर्णय घेणार असे म्हणनारे मुख्यमंत्री धनगर आरक्षणावरती कसली पीएचडी करताहेत तेच समजत नाही?? आज धनगर समाजातील हजारो विद्यार्थ्यांना ३.५% स्पर्धा करावी लागणार आणि खुल्या वर्गात तर आमच्या पोरांना संधीच देत नाहीयेत मग कुठल्यातरी खाजगी विद्यालयात लाखो रूपये डोनेशन फी भरून प्रवेश घ्यावा लागणार हे मात्र नक्की पण आर्थिक मागासलेपणा असलेला समाज एवढे पैसे आणणार कुठून??? जर आरक्षण दिले तर महाराष्ट्र राज्यात शरद पवाराच्या पै-पाहुण्यांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांना पैसे कोठून भेटणार याचं गणित तुमच्या डोक्यात कसं काय येत नाही??? आम्ही अशा गोष्टींचा विचार करत नसलेमुळे आम्हा स्वतःचे व पर्यायानं धनगर समाजाचे फार मोठं नुकसान झाले आहे. यासाठी आमची जनगनना व्हायला हवी म्हणून सरकारवरती जर दबाव आणला तर आपले हक्क आपल्याला मिळतील व त्याचा लाभ माझ्या धनगर समाजातील गोरगरीब समाजबांधवाला नक्कीच होईल  हे सांगायला मला काही वावगं वाटणार नाही. आम्ही आजपर्यंत चुकत आलोय कारण आम्ही अज्ञानी होतो आणि अज्ञानपणामुळं आमच्या मागण्या काय आहेत हे आम्ही सांगू शकलो नाही. पण आता आम्ही शिकलो-सवरलो एवढंच नव्हे तर लिहायला लागलो आणि बोलायला देखिल लागलो. आता येथून पुढे पोटजाती बाजूला ठेवून अखंड धनगर समाजबांधवांनी फक्त "धनगर" म्हणून एकत्रित यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. तरच आम्ही सरकारला गुडघ्यावर टेकायला भाग पाडू आता आम्ही नुसतंच मागत बसणार नाही तर आमच्या हक्काचं हिसकावून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही ही आमची धनगराची औलाद आहे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         8530004123
 nitinrajeanuse123.blogspot.com
..........................................................


एकेकाळी या हिदूस्थानावर ३५० वर्षापेक्षा अधिक काळ राज्य करणारी आमची औलाद म्हणजेच राजा समाज असणारी आमची जमात गतकाळी अज्ञानपणामुळे गुलामगीरीत जगतेय. जगजेत्या सिकंदराला भारत जिंकण्यापासून परावर्तित करणार्या भारताचे आद्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य, अखंड भारत आणि ईशान्येकडील नेपाळ, भूटान आणि अफगानिस्तान आपल्या अधिपत्याखाली आणणर्या राजा सम्राट अशोकाचे आम्ही वारसदार आज आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून लढतोय आणि झगडतोय. धनगरपुत्र राजा सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील "अशोक स्तंभ" हा आज प्रत्येक भारतीयाच्या खिशात असलेल्या प्रत्येक नाण्यावर अभिमानानं दिसतो कारण हे भारताचं बोधचिन्ह म्हणून गौरवण्यात आलं. तद्नंतर भारतामध्ये तसेच देशोविदेशात जो भारतीय झेंडा डौलाने आणि अभिमानाने फडकतो त्यावरील जे निळसर अशोकचक्र आहे ते सुद्धा धनगरपुत्र राजा सम्राट अशोक यांचा इतिहास आणि त्यांच्या कार्याची आठवण आम्हा भारतीयांना करुन देतं. आणि आज हीच राजा समाज असलेली आमची औलाद आज गुलामगीरीचं जीवन जगतेय याचं दुख मनोमन होतंय. या राजा समाजाला आपले हक्क मागावे लागतात अशी वेळ का आली?? याला नेमकं जबाबदार कोण असेल तर माझ्याच धनगर समाजातील नेते यासाठी सर्वस्वी जबाबदार आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आमचं नेतृत्व जर सक्षम असतं तर आमच्यावर भिक मागायची वेळ आलीच नसती.
गेल्या वर्षी १५ जुलै २०१४ रोजी ता पंढरपूर जि सोलापूर येथून आरक्षण दिंडी पदयात्रा निघाली  अन् २१ जुलै २०१४ रोजी बारामतीला येवून धडकली होती आणि तिथंच अखंड महाराष्ट्रातील ४ लाखांवरती धनगर समाज ठिय्या मांडून आमरण उपोषणासाठी बसला होता. तत्कालीन सरकारने अन्याय तर केलाच होता पण सदरच्या भाजप सरकारने महाराष्ट्रात सरकार आल्यावर १० दिवसात आरक्षणाची अमलबजावणी करू असं आश्वासन दिलं होतं पण आज भाजपचं सरकार आलं १० दिवस दूरची गोष्ट पण १० महिने नव्हे तर ११ महिने उलटून गेलेे पण अजूनही आमच्या वाट्याला तोच अन्याय आणि पोकळ आश्वासनं एवढंच आले आहे. एक म्हण आहे की "आजा मेला अन् नातू झाला घरात माणसं तेवढीच" पाठीमागचं  सरकार त्या लायकीचं होतं आणि आजचं पण त्याच लायकीचं म्हणायची वेळ आली आहे.  "धनगर" आणि "धनगड" या दोन्ही जमाती वेग-वेगळ्या नसून ती एकच "धनगर" जमात आहे असे वैज्ञानिक अहवाल सादर केले. शिवाय धनगड नावाची जमातच या महाराष्ट्रात नाही हे सुद्धा सिद्ध केलं तरीही आमच्यावर अन्याय का??
मुख्यमंत्री महोदय मा देवेंद्र फडणवीस म्हणतात की धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी व्हावी यावरती अभ्यास चालू आहे. अहो फडणवीस साहेब यावरती पीएचडी केली असती एखाद्यानं अन् तुम्ही अभ्यासच कसे काय करताय अजून? आज दहावी-बारावीचे निकाल झाले त्यांची प्रवेश प्रक्रिया सुद्धा संपत आली मग आमच्या धनगर समाजातील मुला-मुलींना अगोदरच राज्यघटनेत असलेल्या डॉ बाबासाहेबांनी दिलेल्या अनुसुचित जमातीच्या सवलती कधी देणार?? आजपर्यंत आमच्यावर अन्याय होत आला आहे आणि अजूनही असंच रहाट गाडगं चालू राहिलं तर आमची पोरं आइ ए एस , आइ पी एस कधी होणार?? जर आम्हाला अनुसुचित जमातीच्या सवलती द्यायला तुम्हाला एवढा अभ्यास करावा लागत असेल तर मग तुम्ही बाबासाहेबांना चुकीचं समजता का?? त्यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये राज्यघटनेच्या कलम ३४२ मध्ये क्र ३६ वर सामाविष्ट केले आहे. फक्त शब्दविवेचन करताना त्याचे टायपिंग करताना र ऐवजी ड झाला आणि या र ड मुळे माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा सगळा राडा च झाला. आज (Chattisgarh)छत्तीसगर ला हिंदीमध्ये छत्तीसगढ़ म्हणतात, (Gurgaon)गुरगाव ला गुढगाव म्हणतात, (Ekar)एकर ला एकर त्याचप्रमाणे (Dhangar)धनगर चा धनगड(Dhangad) झाला आणि आज ६५ वर्षे आमच्यावरती अन्यायच अन्याय झाला मग हा अन्याय आमच्यावरती बाबासाहेबांनीच केला का??
राज्यघटनेमध्ये दुरूस्ती करण्याचा अधिकार जर सर्वोच्च न्यायालयाला असेल तर मग न्यायदेवतेनं डोळ्यावरची पट्टी काढून आंधळेपणा बंद करावं, महाराष्ट्र राज्यात एकही धनगड समाजाची व्यक्ति नसताना आमच्या हक्काचं अनुसुचित जमातीचं आरक्षण आम्हास देऊन आम्हाला न्याय द्यावा. त्यासाठी राज्य सरकारने जी शिफारस करावयाची आहे ती शिफारस लवकरात लवकर करावी यासाठी धनगर समाजातील पक्षविरहीत समाजबांधवांनी १५ जुलै २०१५ रोजी पंढरपूर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन केले आहे.
धनगर समाजातील लाखो समाजबांधव दि १५ जुलैला आरक्षणाची ज्योत पेटती ठेवण्यासाठी पंढरपूर येथे उपस्थित राहणार आहेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बुद्धिजीवी वर्गाने घेतलेला हा निर्णय आहे आणि सर्व बुद्धिजीवी वर्गाने या आंदोलनाचे आयोजन केले आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी अथवा राजकीय दृष्टीकोणातून आयोजित केलेले हे आंदोलन नाही. आजपर्यंत निमूटपणे आपण अन्याय सहन करत आलो आहोत हे कुठेतरी थांबायला पाहिजे, आपल्या इतिहासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून आपली ओळख काय आहे आणि आपण काय करतोय याचा गांभिर्यानं विचार करुन उद्याच्या पीढीवर अन्याय सहन करायची वेळ येवू देवू नका यासाठी जातीवंत धनगर सभाजबांधवांनी पुनःशा संघटित होऊन आपल्या हक्कासाठी एकत्रित पणे लढाई लढावी. ज्या सरकारला धनगर समाजानं एक गठ्ठा मतदान केलं आणि सत्तेत आणलं ते सरकार आज चांगलंच झोपलंय आणि या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी दि १५ जुलै रोजी अखंड महाराष्ट्र राज्यातील समाज बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे ही नम्र विनंती...

ना माझ्यासाठी ना माझ्या स्वार्थासाठी, नाही कोण्या व्यक्तिसाठी...

ही लढाई आहे फक्त आणि फक्त माझ्या धनगर समाजासाठी...

उठ धनगरा हो जागा अन् लढ तुझ्या हक्कासाठी..

उचल तलवार आणि उगार मुठ नाहीतर घे हाती काठी...

कर येळकोट येळकोटचा गजर अन् लाग प्रस्थापितांच्या पाठी...

अन्यायावरती उगार आसूड उद्याच्या भावी पीढीसाठी...

तुम्हावर अन्याय होत असेल तर अखंड समाज असेल तुमच्या पाठी...

हिम्मत हारू नकोस प्रयत्न सोडू नकोस जर
कितीही आणि कोणीही आले तुला आडवण्यासाठी,

फक्त एकदाच "जय मल्हार" बोल अन् लढ धनगर समाजाच्या अस्मितेसाठी. फक्त लढ धनगर समाजाच्या अस्मितेसाठी.

म्हणून आरक्षणाच्या या लढाई साठी दि १५ जुलै २०१५ रोजी पंढरपूर ता पंढरपूर जि सोलापूर येथे सामाजिक बांधीलकी लक्षात घेवून प्रत्येक समाजबांधवांनी सहभागी व्हावं...ही नम्र विनंती

जय मल्हार!! जय अहिल्या!!
             -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            8530004123
 nitinrajeanuse123.blogspot.com
..........................................................

Monday 11 May 2020

गोपीचंद पडळकर साहेब आणि बिरोबा : ✍️नितीनराजे अनुसे

महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मान.आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे त्रिवार अभिनंदन 💐💐💐

(सदरच्या ब्लॉगमधून सामाजिक तथा मानसिक भावना दुखावण्याचा हेतू मुळीच नाही यातून बोध घेऊन समाजप्रबोधन व्हावे हीच अपेक्षा)
            लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जेव्हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेव्हा ज्यांना बिरोबा कुठे आहे? कसा आहे? नक्की कोणता देव आहे? हेच माहित नव्हते त्यांना लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अखेरच्या धनगर आरक्षण लढ्यातील मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी घातलेली बिरोबाची शपथ आठवायला लागली, आयुष्यभर प्रस्थापितांची गुलामगिरी चमचेगिरी करणाऱ्यांना, प्रस्थापितांचे बूट चाटणाऱ्यांना, अंडी-दारू-मटणासाठी तडफडणाऱ्यांना, दोन-चार नोटासाठी प्रस्थापित नेत्यांसमोर लाळ गाळणाऱ्यांना आणि स्वतःचा तथा समाजाचा स्वाभिमान प्रस्थापितांच्या बुटाखाली गहाण टाकणाऱ्यांना धनगर समाजाचे दैवत असलेला बिरोबा आणि गोपीचंद पडळकर यांची बिरोबाची शपथ आठवायला लागली.  विधानसभेच्या निवडणूकांचे निकाल लागल्यावर गोपीचंद पडळकर यांच्यावर बिरोबा कोपला म्हणून बोंबलणाऱ्या औलादींना, आणि एकच छंद राजकारण बंद म्हणून पोटाची आतडी पिळवटणाऱ्यांना मला सांगायचं आहे की बाबांनो आज खऱ्या अर्थाने गोपीचंद पडळकर यांना बिरोबा पावला आहे हे विसरू नका.
          मी २००६ पासून अगदी जवळून पाहतोय की मा.गोपीचंद पडळकर साहेब नावाचा सर्वसामान्य कुटुंबातील हा युवक संघर्ष कोळून पितोय. संघर्ष जणू काय त्यांच्या पाचवीलाच पुजलाय, तरीही हा संघर्षयोद्धा कितीही संकटे आली तरी आजपर्यंत कधीही डगमगला नाही. गोपीचंद पडळकर यांना नामोहरम करण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेने कितीतरी षडयंत्र रचली, मंगळसूत्र चोरीसारख्या खोट्या केसेस दाखल केल्या, पोलिस कोठडीत ठेवले, शेवटी जिल्हा हद्दपारीचे नोटीस सुद्धा बजावले होते. तरी सुद्धा गोपीचंद पडळकर हा संघर्षयोद्धा थांबला नाही ना त्यांनी आपला संघर्षरथ थांबवला. तर हा योद्धा अन्यायाविरुद्ध लढला, प्रस्थापितांना भिडला आणि त्यांना अक्षरशः घामही फोडला. जेव्हा गोपीचंद पडळकर सांगलीच्या तुरूंगात होते तेव्हा हातात खुरपं घेऊन शेतात भांगलणारी याच संघर्षयोद्ध्याची आई म्हणाली होती की "कशाला राजकारणाच्या नादाला लागायचं, लोकं सुखानं जगू देत नाह्यती. पण पोरगं काय ऐकतच नाय." आज त्याच मायमाऊलीचं ते पोरगं, सर्वसामान्यांचं ते पोरगं शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज बनून बिनविरोध महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर निवडून आमदार झाले. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर बिरोबा कोपला नाही तर त्यांना बिरोबा पावला आहे असे म्हणायला मला वावगं वाटणार नाही.
          आज ज्यांना ज्यांना गोपीचंद पडळकर साहेबांनी घातलेली बिरोबाची शपथ आठवते त्यांनी हे पण आठवून पहा...
१) सोनलवाडी (सांगोला) येथील एका मेंढपाळाच्या मेंढ्या काही गावगुंड उचलून घेऊन गेले होते त्या मेंढ्या मेंढपाळाला परत करायला बिरोबाचं रूप घेऊन गोपीचंद पडळकर साहेबच धावले होते.
२) कोल्हापूरच्या बहिणीवरती अन्याय अत्याचार झाला होता तेव्हाही त्या बहिणीच्या पाठीशी भावाप्रमाणे ठामपणे उभा राहिलेले गोपीचंद पडळकर आठवून पहा.
३) पुरंदरच्या ताईवर अतिप्रसंग झाला होता तेव्हा बारामतीचा मोठा म्हसोबा, त्या लोकसभा मतदारसंघाची मरीआई तिथं पोहचली नाही ना साधा धीर दिला. परंतु बिरोबाच्याच रूपाने गोपीचंद पडळकरांनी भेट घेऊन पुरंदरच्या ताईला आणि तिच्या कुटुंबीयांना धीर दिला.
४) कराड परिसरात भटकंती करणाऱ्या मेंढपाळांच्या मेंढ्या काही गावगुंडांनी पळवल्या होत्या त्या पडळकर साहेबांमुळेच माघारी परत केल्या होत्या.
५) माणदेश परिसरात कोणावरही अन्याय अत्याचार झाला तर रात्री अपरात्री हाकेला धावून जाणारे गोपीचंद पडळकर साहेब माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला बिरोबाचेच रूप वाटतात. अशा कितीतरी एक ना अनेक कितीतरी घटना सांगता येतील.
त्यामुळे बिरोबा गोपीचंद पडळकर साहेबांना कोपला नाही तर पावला आहे. आणि बिरोबा खरंच कोपला असेल तर तो त्या समाजावर कोपला आहे जो अजूनही एकजूट एकसंघ होत नाही. बिरोबाची शपथ फक्त गोपीचंद पडळकर यांनीच पाळायची होती आणि समाजाने प्रस्थापितांच्या पारड्यात भरभरून मते द्यायची होती का?  हीच का बिरोबाच्या भक्तांची भक्ती? जर समाजानेही बिरोबाची शपथ पाळली असती, एकी दाखवली असती तर गोपीचंद पडळकर साहेब यांच्यासह अजून कित्येक धनगर नेते आज विधानपरिषदेतच काय तर लोकसभेत दिसले असते. कितीतरी आमदार विधानसभेत दिसले असते. परंतु समाजात एकी नसल्याने दिड-दोन कोटी धनगर समाजाचा केवळ एक आमदार विधानसभेत आणि आज एक विधान परिषदेवर ही वेळ समाजावर आली नसती.
          असो, बिरोबाच्याच आशिर्वादाने, लढाऊ प्रवृत्तीच्या आणि गोपीचंद पडळकर साहेबांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे आणि संघर्षामुळे संघर्षयोद्ध्याचा संघर्षरथ कधीही न थांबता अविरतपणे धावतच राहिला त्या संघर्षवेलीवर आज विधानपरिषदेच्या माध्यमातून आमदारकीचे गोंडस फुल बहरून आले. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सदस्य मान.आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे त्रिवार अभिनंदन  व पुढील वाटचालीस अगणित शुभेच्छा. कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, मेढपाळांचे, युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मल्हारी मार्तंड, श्री बिरोबा आपणास बळ बुद्धी तथा चातुर्य देवो हीच प्रार्थना 💐💐💐
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com