Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Sunday, 11 August 2019

लढाई हक्काच्या आरक्षणाची... ✍️नितीनराजे अनुसे

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषणास बसलेले वाघ

   भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे होत आली तरी राज्यघटनेने बहाल केलेला घटनादत्त अधिकार अर्थातच धनगर जमातीच्या हक्काचे अनुसूचित जमातीचे आरक्षण आजपर्यंत समाजाला मिळू शकले नाही हे भारत नावाच्या महा'राष्ट्रा'तील सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. वर्षानुवर्षे इथल्या प्रस्थापित औलादी आश्वासने देऊन, धनगर समाजाच्या मतांच्या जोरावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर पुन्हा त्याच समाजाची ससेहोलपट करतात हे कधीपर्यंत चालायचं?
        आजपर्यंत जे झाले गेले ते इतिहासात जमा झाले परंतु इथून पुढे तरी सर्वांनी कंबर कसून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लढायला सज्ज व्हायला हवे. नाहीतर धनगर समाजाची आणि समाजातील नेत्यांची "एक ना धड भाराभर चिंध्या" अशीच अवस्था होईल.  धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र हवे आहे जेणेकरून पुढच्या पिढ्या तरी स्वाभिमानाने जगतील नाहीतर आजच्या पिढीच्या तोंडात शेण घालायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाले तरच समाजाची प्रगती होऊ शकते. १००० कोटी रूपयांचे गाजर दाखवून धनगर समाजाची बोळवण केली जात आहे जे राज्यघटनेत नाही.
        जुलै २०१४ च्या बारामतीच्या आंदोलनात तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आजचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते ते फडणवीस यांनी पाळले नाही उलट पुन्हा अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अन्य आश्वासनांचे, सवलतींचे गाजर दाखवले आहे त्याविरोधात ९ ऑगस्ट या क्रांतीदीवशी धनगर समाजातील पांडुरंग मेरगळ (दौंड), सुरेश होलगुंडे(मुंबई), विजय तमनर (राहुरी), सतीश झंजे(माळशिरस), प्रकाश थाडके (नांदेड), धनाजी बंडगर (सांगोला), गंगाप्रसाद खारोडे (हिंगोली), राजेंद्र तागड (अ.नगर) आणि नागुराव बारसे(नांदेड) ९ लढवय्ये पंढरपूर येथे आमरण उपोषण करत आहेत. धनगर समाजाला आणि समाजातील प्रत्येक नेत्यांना, कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की त्या ९ योद्ध्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. आजच गंगाप्रसाद खारोडे या उपोषणकर्त्यास पोलिस जबरदस्तीने उपचारासाठी घेऊन गेले त्यावरून असे दिसते आहे की हे आंदोलन चिरडण्यासाठी फडणवीस सरकार प्रयत्न करत आहे परंतु जोपर्यंत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवायची जबाबदारी तुमची आमची आहे. त्यासाठी पेटून उठणे ही काळाची गरज आहे अन्यथा भविष्यात कोणीही धनगर समाजाची दखल घेणार नाही हे लक्षात ठेवा.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123

No comments:

Post a Comment