Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday, 2 November 2017

आरक्षणाच्या विकासाचं महात्म्य...

आजकाल राजकारणात, सत्ताकारणात एक क्रेझ झाली आहे ती म्हणजे शक्तिप्रदर्शन करणे आणि त्याच शक्तिप्रदर्शनाच्या जोरावर राजकारणात सत्ताकारणात चांगले पद मिळवणे. पण विकासाचं महात्म्य काय? ज्यांच्या जोरावर शक्तिप्रदर्शन केले चांगली पदे मिळवली त्या जनतेचं त्या त्या नेत्यांनी किती दायित्व राखले? खरंतर विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे खासदार पद्मश्री विकास महात्मे साहेब. साहेबांनी अनेक नेत्र चिकित्सक शिबीरं घेतली. मोफत डोळ्यांची आॅपरेशन केली आणि त्यानुषंगानेच पद्मश्री हा पुरस्कार त्यांना बहाल केला गेला. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच...
            जेव्हा १५ जुलै २०१४ ला पंढरपूर-बारामती आरक्षण दिंडी निघाली २१ जुलै ला पाच ते सहा लाख धनगर समाजबांधव बारामतीमध्ये एकत्रित आला होता. त्याठिकाणी फडणवीसांनी सत्तेत आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये १५ दिवसांत अंमलबजावणी करण्याची मागणी असताना आरक्षण देणार असल्याचे वचन दिले. पुढे सरकार सत्तेत आले १५ दिवस झाले, महिना झाला दोन महिने झाले तरीही फडणवीसांचे तोंड उघडेना आणि निर्णय काय होईना. दिवसेंदिवस आरक्षणाची चळवळ वाढीस लागल्यानंतर ४ जानेवारी २०१५ रोजी विकास महात्मेंनी नागपूर मध्येच धनगर आरक्षणाचा मोर्चा आयोजित केला. महाराष्ट्र राज्यातील लाखोंच्या संख्येने समाजबांधव नागपूरात एकवटला होता. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वता पुढील एक महिन्याच्या आत निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्याच स्टेजवरून सध्याचे कॅबिनेट ना.महादेव जानकर साहेब यांनी देखिल आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर फडणवीसांचा अजित पवार करू असे खडसावले होते. परंतू पुढेही फसणवीसांचे तेच धोरण धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झाल्याचे सांगत समाजाला भावनिक केले आणि तिथेच धनगर समाज फसला. नागपूर मेळाव्यानंतर देखिल महिन्यात निर्णय घेऊ म्हणणाऱ्या फडणवीस यांनी दोन तीन नव्हे तर तब्बल सहा महिने उलटून गेले तरी निर्णय घेतला नाही अजून अभ्यासच चालू असल्याचे ढोंग केले. २१ जुलै २०१५ रोजी बारामती मोर्चाच्या धर्तीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रेरणा दिवस आयोजित केला. एक मोठे जनआंदोलन आयोजित करण्याचे त्या प्रेरणा दिवशी ठरविले त्यास सर्व मातब्बर नेते, विकास महात्मे सह महाराष्ट्र राज्यातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी जनआंदोलनासाठी हो मध्ये हो मिळवला परंतू विदर्भात गोव्यानंतर महात्मेंनी सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता समाजाचे भांडवलीकरण करण्यासाठी ८ डिसेंबर २०१५ रोजी मोर्चा आयोजित केला. विश्वासात न घेतल्याने त्यांच्या या निर्णयास विरोध महाराष्ट्र राज्यभरातून विरोध होऊ लागला. त्यातच १० डिसेंबर २०१५ च्या दुसऱ्या मोर्चाची डाळ शिजू लागली. दोन्ही मोर्चे वेगवेगळे न करता एकत्रित व्हावेत असे समाजाचे मत होते. परंतू वेगवेगळे मोर्चे काढले तर त्याचे श्रेय कोणाच्या पारड्यात पडणार? असा श्रेयवादाचा प्रश्न निर्माण निर्माण झाला. एकत्रित आणि एकच मोर्चा व्हावा यासाठी मी स्वता दोन्ही मोर्चाच्या आयोजकांशी बोललो होतो त्याचे पुरावे देखिल आहेत, त्यासंदर्भातील नोव्हेंबर व डिसेंबर २०१५ मधील ब्लाॅग देखिल खालील Nitinraje Anuse ब्लाॅग स्थळावर जाऊन तुम्ही वाचू शकता. ना नेता ना संघटना फक्त आणि धनगर समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन व्हावे ही सर्वांची प्रामाणिकपणे अपेक्षा होती. परंतू हेच विकासांचे महात्मे ऐकायला तयार नव्हते पाठपुरावा कोण करणार म्हणून ते त्यांच्या संघटनेच्या बॅनर खालीच मोर्चा निघणार या मतावर ठाम होते. शेवटी त्यांनी तेच केले आणि धनगर समाजाचे विभाजन झाले पाच-पन्नास हजार समाजबांधव नागपूर मध्ये ८ डिसेंबर २०१५ रोजी एकत्रित आला. १० डिसेंबर रोजी देखिल हजारांच्या संख्येत लोक उपस्थित राहिले होते. परंतू ८ डिसेंबर रोजीच्या मोर्चात मुख्यमंत्री निवेदन स्विकारण्यासाठी आलेच नव्हते. त्या मोर्चातून खरंतर काहीच निष्पन्न झाले नाही उलट आरक्षणाची अंमलबजावणी दूरच राहिली पण पदरात पडले ते म्हणजे TISS संशोधनाचे गाजर. जर एखाद्या जाती/जमतीला अनुसुचित जाती/जमातीमध्ये सामाविष्ट करायचे असल्यास त्यासंदर्भातील अहवाल सादर करावा लागतो आणि तो अहवाल तयार करण्यासाठी त्या ८ डिसेंबरच्या मोर्चातून TISS या संस्थेची नेमणूक करण्यात आली. परंतू धनगर समाज मात्र अगोदरपासूनच अनुसुचित जमातीच्या यादीत असताना अहवाल सादर करायला लावून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवायचे फार मोठे षड्यंत्र फडणवीसांनी रचले आणि धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी त्यास सहखुशीने अनुमोदनही दिले. दोन टप्प्यांत अर्थातच सहा महिने ते नऊ महिन्यांच्या कालावधीमध्येच धनगर समाजाला आरक्षण (असताना) देऊ म्हणणाऱ्या फडणवीस सरकारचे नऊ दहा महिन्यांतर नव्हे तर एका वर्षांनंतरही अजून आरक्षणाचे बाळंतपणच झाले नाही हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. मध्यंतरीच्या काळात या दोन्ही मोर्चाच्या पार्शभूमीवर ३१ मे २०१६ याच दिवशी महात्मेंना खासदारकी देऊन राज्यसभेवर घेतले. मग ती खासदारकी धनगर समाजामुळेच मिळाली हे कोणीही नाकारू शकणार नाही. पुढे सध्याचे कॅबिनेट मंत्री ना.प्रा.राम शिंदे व ना.महादेवजी जानकर यांना मंत्रीपद देऊन धनगर समाजाला गप्प बसवायचा प्रकार केला. परंतू धनगर समाज असा कसा गप्प बसेल? आणि शांत बसेल तो धनगर कसला? खासदारकी मिळाल्यानंतर विकास महात्मे मात्र गप्प बसले २०१५ नंतर २०१६ मध्ये त्यांनी एकाही मोर्चाचे आयोजन केले नाही. परंतू आपण स्वता एक समाजाचे प्रतिनिधी आहोत याची जाण असताना देखिल खासदार विकास महात्मे यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या स्टेटमेंटची पाठराखण केली. धनगर आरक्षणास मोदींचा नकार अशा बातम्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया वरतून झळकल्या, सोशल मिडीयावरती त्या वायूवेगापेक्षाही जास्त गतीने व्हायरल झाल्या. त्याचवेळी खासदार विकास महात्मे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की मोदींनी घेतलेल्या खासदारांच्या शाळेत धनगर आरक्षणाचा धडा नव्हताच. मग त्या विकास महात्मेंना माझे प्रश्न आहेत ते म्हणजे...
1. त्या खासदारांच्या शाळेत आरक्षणाचा धडा नव्हता तर मग हे त्या मोदींनी कबुल करायला पाहिजे होते तुम्हीच का पत्रकार परिषद घेऊन कबुल केले?
2. खासदार साहेब तुम्हाला त्या शाळेत समाजाचे प्रतिनिधी म्हणून बसवले आहे ते नेत्यांची पाठराखण करायला नव्हे तर जनतेचे समाजाचे प्रश्न सोडवायला. मग धनगर समाजामुळे तुम्हाला खासदारकी मिळाली आहे हे तुम्ही कार्यक्रमांमधून जाहिर केलेलेच आहे. मग धनगर आरक्षणाबद्दल तुम्ही त्या शाळेत शंका का उपस्थित केली नाही?
3. खासदार साहेब तुमचे समर्थक म्हणतात की राज्यसभेत/लोकसभेत आपले संख्याबळ कमी पडते मग महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत आमदार बच्चू कडू हे अपक्ष असताना देखिल अपंगासाठी किती लढतात आणि झटतात हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलंय. मग त्याप्रमाणेच धनगर आरक्षणाचा मुद्दा तुम्ही का उपस्थित करू शकला नाही.?
बर असो एवढे सगळे करून देखिल तुम्ही पुढच्या २०१९ च्या लोकसभा डोळयासमोर ठेऊन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ५ नोव्हेंबर २०१७ ला निर्णायक मेळावा आयोजित केला. त्याबद्दल माझे काही दुमत नाही परंतू आजपर्यंत नागपुरातील तुम्ही घेतलेल्या मोर्चाचे काय पारिपत्य केले? काय निर्णय झाला? म्हणून निर्णायक मेळावा आयोजित केला याचे स्पष्टीकरण तरी द्या. उठ की सुठ नुसतंच तुम्ही आरक्षण मेळावा पुकारला की आमच्या शेळ्या-मेंढ्या वाडग्यात कोंडून आम्ही नागपूरला यायचं का? हजारो नोकरदारांनी नोकऱ्या सोडून तरूनांनी ट्रेन मधून आदळआपट करत, हजारो लिटर डिजेल जाळत आणि करोडो रूपयांचा चुराडा करत तुमच्या भावी खासदारकीसाठी आम्ही तिथं नागपूरला यायचं का? आरक्षणाचा निर्णयच न झाल्याने मानसिक आणि शारिरिक नुकसान, आर्थिक नुकसान हे कधीही भरून न येणारे आहे. निर्णय झालाच नसताना मग निर्णायक मेळावा कसे काय म्हणायचे बरं? तसे प्रा.विष्णू कावळे सर यांनी देखिल तुम्हाला आवाहन केले आहे की आरक्षणाचा निर्णय करूनच तुम्ही मोर्चाला या आम्ही तुमचे स्वागत करू.
           नाहीतर सातारच्या मारूती जानकर यांनी ५ नोव्हेंबरचा नागपूरचा मोर्चा उधळण्याचे ठाण मांडलेच आहे. परंतू काहीतरी ठोस निर्णय घ्यायचा सोडून लोकशाही आहे म्हणून तुम्ही फोनवरून धमक्या देता मग त्यास काय म्हणावे? मारूती जानकर यांच्या निर्णयास आम्ही चालना देतोय असा विषय नाही परंतू त्यांचे उद्दीष्ट स्पष्ट आणि निस्वार्थीपणाचे आहे एक सामाजिक बांधिलकी या नात्याने मुख्यमंत्री यांना ते जाब विचारणारच कारण आंबेडकरांनी जनतेला लोकशाही बहाल केली आहे ना... तो त्यांचा मुलभूत अधिकार असून खोटी आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनीधींना फसवणूक केल्याबद्दल जाब विचारणारच कारण गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाज हा अनुसुचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे आणि माझ्या मते तब्बल ६७ वर्षे एखाद्या समाजावर राज्यघटनेत अधिकार दिले असताना देखिल विनाकारण अन्याय करणाऱ्यांवरती देशद्रोहाचा खटला का भरू नये? धनगर आरक्षण हा माझ्या एकट्याचा अथवा मारूती जानकर यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असा विषय नसून अखंड महाराष्ट्र राज्यातील एकाच रक्ताच्या आणि हाडामांसाच्या धनगर समाजबांधवांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जन्मापासूनच घोड्याचा लगाम हातात धरून अणवानी पायानं भटकंती करणाऱ्या भोळ्या-भाबड्या मेंढपाळांच्या मुला-बाळांचा हा प्रश्न आहे त्यामुळे न्याय हा मिळालाच पाहिजे. मग तोंड वाजवून जर न्याय मिळत नसेल त्यांच्या तोंडात वाजवून तरी न्याय मिळवा पण न्याय मात्र मिळालाच पाहिजे.
           खासदार विकास महात्मे यांनी ५ नोव्हेंबर ला मोर्चा घ्यावा अथवा घेऊ नये किंवा समाजबांधवांनी त्या मोर्चाला जावं कि जाऊ नये याबद्दल आमचे दुमत नाही. ज्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न परंतू माझ्या अज्ञानी असलेल्या आणि भोळ्या-भाबड्या मेंढपाळ बांधवांच्या नावावर भांडवलीकरण करून समाजाला कोणाच्यातरी ऐऱ्यागैऱ्यांच्या दावणीला बांधायचा प्रयत्न करू नये ही विनंती...
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com
nitinrajeanuse123.blogspot.com

4 comments: