एकमेव अद्वितीय लढवय्या, महापराक्रमी शुर योद्धा ज्यांनी अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज फौजेची इभ्रत जगाच्या वेशिला टांगली अशा छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावाने महामेष योजना सुरू करून नक्की काय साध्य करायचे आहे? स्वातंत्र्याचे प्रणेते असणाऱ्या छत्रपती महाराजा यशवंतराव होळकरांच्या दैदिप्यमान, जाज्वल्य आणि नेत्रदीपक इतिहासाचा, राष्ट्रभक्तिचा आणि त्यांच्या दूरदृष्टीचा विचार करून तरी भारतीय फौजेच्या एखाद्या बटालियन अथवा इन्फंट्री ला त्यांचे नाव द्यायला हवे होते पण तसे न करता राजे यशवंतराव होळकर महामेष योजना असे त्या योजनेस नाव देऊन शेवटी त्यांना धनगर समाजाच्याच पंगतीत आणून बसवण्याचे हे महापाप नव्हे का?
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com
No comments:
Post a Comment