एकेकाळी राजा समाज म्हणून जन्माला आलेली आमची जमात म्हणजेच धनगर ही आदिम जमात आज कोणतं जगण जगत आहे यावरती चिंतन केले तर आमचीच आम्हाला लाज वाटावी? कोणाच्या उपकारातून अथवा परंपरागत नव्हे तर स्वकर्तृत्वावर, स्वबळावर तलवार गाजवून आणि रक्त सांडून मिळवलेली राजेशाही मग ती आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी स्थापन केलेले मौर्य साम्राज्य (Mourya Density) अथवा मराठी साम्राजाचे आधारस्तंभ तथा थोरले सुभेदार श्रीमंत राजे मल्हारराव होळकर यांनी स्थापन केलेली होळकरशाही (Holkar Density) तसेच शुन्यातून विश्व निर्माण करणारे, स्वबळावर पुनः राज्य स्थापून इंग्रज अधिकाऱ्यांचा थरकाप उडवून त्यांच्याच शिस्तबद्ध फौजेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारे चक्रवर्ती सम्राट छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची राजेशाही ती काय भिक मागून मिळवली नव्हती तर स्वकर्तृत्वावर आणि स्वबळावर रक्त सांडून उभा केलेली राजेशाही तथा राजवैभव आजचा धनगर समाज मात्र विसरूनच गेला आहे. ज्या राष्ट्रमाता अहिल्याईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युरोपातली राष्ट्रं प्रगतीपथावर पोहचली त्याच अहिल्याईंचा महाराष्ट्र, त्याच अहिल्याईंचा भारत देश आज अधोगतीच्या मार्गावर आहे त्याचे कारण असे की आम्ही राष्ट्रमाता अहिल्याईंना विचारांची नव्हे मंदिरातील देवी (मुर्ती) बनवून टाकले, आम्ही अहिल्याईंना डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेतले आणि जयंती निमित्त डीजे लावून धांगडधिंगा घालून आपल्याच इतिहासाचे हसू करून घेतले म्हणून आज धनगर समाजाची ही अवस्था झाली आहे.
Ahilyabai Holkar was the greatest Administrator of the 18th Century म्हणजेच अठराव्या शतकातील उत्तम प्रशासक उत्तम राज्यकर्ती म्हणून जगाने माझ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा गौरव केला. पण आज एकविसाव्या शतकात राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या विचारातून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या महाराष्ट्र राज्यात परिणामी भारतात एकही लायक नेतृत्व तयार झाले नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. जर तसे नेतृत्व तयार झाले असते तर ज्या मायमाऊलीने खचलेल्या पिचलेल्या जनतेला, गोरगरीब प्रजेला न्याय मिळावा म्हणून अखंड भारतभर सर्वप्रथम न्यायालये उभा केली त्या मायमाऊलीच्या जन्मभूमीत ३१ मे २०१८ रोजी समाजासाठी न्याय मागणाऱ्या समाजबांधवांवरती निष्ठूर लाठीमार झालाच नसता. एकीकडे अहिल्याईंच्या माहेरकडील वारसदार म्हणून मिरवणारे धनगर समाजाचेच मंत्री समाजाला न्याय मिळवून देऊ शकत नसतील आणि उलट समाजबांधवांनाच अडचणीत टाकत असतील तर समाजाने न्याय नक्की मागायचा तरी कोणाला? जर आपल्याच समाजाचे मंत्री आपला राजेशाही इतिहास डोळ्यासमोर ठेऊन समाजाला न्याय देऊ शकत नसतील, समाजाचे प्रश्न सोडवू शकत नसतील म्हणजेच आपल्या इतिहासाला साजेसे नेतृत्व करू शकत नसतील तर समाजाचे ते नेतृत्व समाजासाठी लायक नाही असे म्हणायला वावगे ठरणार नाही. काही समाजबांधवांच्या मते ज्या ठिकाणी गोंधळ झाला तो दिवस आणि ते ठिकाण चुकीचे होते मग समाजबांधवांनी न्याय कुठे आणि कोणाकडे मागायचा होता? ज्या मायमाऊलीने जात धर्म न पाहता सर्वांना समान न्याय दिला त्या मायमाऊलीच्या जन्मभूमीत न्याय मागितला तर काय गुन्हा? मग धनगरांच्या शंभर काय पुढच्या पिढ्या बरबाद झाल्या तरी बेहत्तर पण आश्वासन द्यायचे कधीच थांबणार नाही आणि अंमलबजावणी कधी करणार नाही अशी भुमिका आजपर्यंत मराठावादी आणि ब्राह्मणवादी राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी तशीच कायम ठेवली आणि त्यात उड्या मारून धनगर समाजाच्या मतदानावर समाजाचे बाजारीकरण आणि भांडवलीकरण करायचे काम धनगर नेत्यांनी चोखपणे केले असे म्हणायला काही वावगे ठरणार नाही.
स्वताचा स्वाभिमान दुसऱ्याच्या बुटाखाली गहाण ठेवून समाजाचे जिव्हाळ्याचे प्रश्न न सोडवता समाजाला प्रस्थापितांच्या म्हणजेच लांडग्यांच्या दावणीला बांधायचे काम धनगर समाजातील नेते खासदार आमदार मंत्री करत असतील तर कित्येक पिढ्या बरबाद झाल्या तरी समाजाला न्याय मिळणार नाही. त्यासाठी धनगर समाजातील सामाजिक संघटनांनी जबाबदारी घेऊन समाजातून एक नव्हे तर अनेक नवनवीन नेतृत्व घडवून त्यांना राजप्रवाहात आणायला हवे. परंतु जे नेतृत्व आपण घडवतोय त्याला आई-वडिलांच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जान आणि समाजावरती होणाऱ्या अन्यायाचे भान असायला हवे तर आणि तरच ते नेतृत्व समाजासाठी लायक ठरेल आणि धनगर समाजातील आजच्या नेतृत्वाची शोकांतिका दूर होईल.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+91 853 000 4123
Email :- nitinrajeanuse123@gmail.com
Ahilyabai Holkar was the greatest Administrator of the 18th Century म्हणजेच अठराव्या शतकातील उत्तम प्रशासक उत्तम राज्यकर्ती म्हणून जगाने माझ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा गौरव केला. पण आज एकविसाव्या शतकात राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या विचारातून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या महाराष्ट्र राज्यात परिणामी भारतात एकही लायक नेतृत्व तयार झाले नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. जर तसे नेतृत्व तयार झाले असते तर ज्या मायमाऊलीने खचलेल्या पिचलेल्या जनतेला, गोरगरीब प्रजेला न्याय मिळावा म्हणून अखंड भारतभर सर्वप्रथम न्यायालये उभा केली त्या मायमाऊलीच्या जन्मभूमीत ३१ मे २०१८ रोजी समाजासाठी न्याय मागणाऱ्या समाजबांधवांवरती निष्ठूर लाठीमार झालाच नसता. एकीकडे अहिल्याईंच्या माहेरकडील वारसदार म्हणून मिरवणारे धनगर समाजाचेच मंत्री समाजाला न्याय मिळवून देऊ शकत नसतील आणि उलट समाजबांधवांनाच अडचणीत टाकत असतील तर समाजाने न्याय नक्की मागायचा तरी कोणाला? जर आपल्याच समाजाचे मंत्री आपला राजेशाही इतिहास डोळ्यासमोर ठेऊन समाजाला न्याय देऊ शकत नसतील, समाजाचे प्रश्न सोडवू शकत नसतील म्हणजेच आपल्या इतिहासाला साजेसे नेतृत्व करू शकत नसतील तर समाजाचे ते नेतृत्व समाजासाठी लायक नाही असे म्हणायला वावगे ठरणार नाही. काही समाजबांधवांच्या मते ज्या ठिकाणी गोंधळ झाला तो दिवस आणि ते ठिकाण चुकीचे होते मग समाजबांधवांनी न्याय कुठे आणि कोणाकडे मागायचा होता? ज्या मायमाऊलीने जात धर्म न पाहता सर्वांना समान न्याय दिला त्या मायमाऊलीच्या जन्मभूमीत न्याय मागितला तर काय गुन्हा? मग धनगरांच्या शंभर काय पुढच्या पिढ्या बरबाद झाल्या तरी बेहत्तर पण आश्वासन द्यायचे कधीच थांबणार नाही आणि अंमलबजावणी कधी करणार नाही अशी भुमिका आजपर्यंत मराठावादी आणि ब्राह्मणवादी राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी तशीच कायम ठेवली आणि त्यात उड्या मारून धनगर समाजाच्या मतदानावर समाजाचे बाजारीकरण आणि भांडवलीकरण करायचे काम धनगर नेत्यांनी चोखपणे केले असे म्हणायला काही वावगे ठरणार नाही.
स्वताचा स्वाभिमान दुसऱ्याच्या बुटाखाली गहाण ठेवून समाजाचे जिव्हाळ्याचे प्रश्न न सोडवता समाजाला प्रस्थापितांच्या म्हणजेच लांडग्यांच्या दावणीला बांधायचे काम धनगर समाजातील नेते खासदार आमदार मंत्री करत असतील तर कित्येक पिढ्या बरबाद झाल्या तरी समाजाला न्याय मिळणार नाही. त्यासाठी धनगर समाजातील सामाजिक संघटनांनी जबाबदारी घेऊन समाजातून एक नव्हे तर अनेक नवनवीन नेतृत्व घडवून त्यांना राजप्रवाहात आणायला हवे. परंतु जे नेतृत्व आपण घडवतोय त्याला आई-वडिलांच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जान आणि समाजावरती होणाऱ्या अन्यायाचे भान असायला हवे तर आणि तरच ते नेतृत्व समाजासाठी लायक ठरेल आणि धनगर समाजातील आजच्या नेतृत्वाची शोकांतिका दूर होईल.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+91 853 000 4123
Email :- nitinrajeanuse123@gmail.com
No comments:
Post a Comment