Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday, 30 August 2018

परिक्षा धनगरांच्या एकीच्या बळाची : नितीनराजे अनुसे

परिक्षा धनगरांच्या एकीच्या बळाची : नितीनराजे अनुसे
       गेल्या ७० वर्षापासून आजपर्यंत माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजावरती विनाकारण अन्याय व अत्याचार होत आला आहे ते आम्ही निमूटपणे सहन करत आलो पण जातीचा धनगर आता शांत बसणार नाही.  आर नाहीतर पार ही भूमिका घेऊन धनगर समाजातील युवा वर्ग आक्रमकपणे अखेरच्या आरक्षण लढ्यात तन मन धनाने सहभागी होतोय.  धनगर समाजाचा स्वाभिमान जागा झाला असून आता प्रस्थापितांची खैर नाही हे निश्चित आहे.
      आजपर्यंत धनगर समाज हा गटातटात विभागल्याने लढाईला यश आले नाही याला इतिहास देखील साक्ष आहे परंतु उद्या दि.  ३१ ऑगस्ट रोजी होणार्या औरंगाबाद येथील आमखास मैदानावर महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाज एकत्रित येणार आहे. कधी काळी शाळेत असताना गुरूजींनी "एकीचे बळ" यावरती एक गोष्ट सांगितलेली आठवते ती गोष्ट आज मुद्दामहून तुम्हा सर्वांना सांगतोय.  "एका आश्रमात गुरू आचार्य त्यांच्या शिष्यांना शिक्षण देत असताना ते पाचही शिष्यांना आश्रमाबाहेर बोलावतात. शिष्य गोंधळून जातात की आज गुरूंनी आपल्याला बाहेर का बोलवलं असावं?  पाचही शिष्य बाहेर आल्यानंतर गुरूवर्य प्रत्येकाच्या हातात एकेक काठी देतात व ती हाताने तोडायला सांगतात.  तेव्हा एकेक करून प्रत्येकजण ती काठी गुडघ्यावर वाकवून तोडून दाखवतात.  तेव्हा शिष्यांना काहीच विशेष वाटत नाही परंतु हे झाल्यावर आता गुरूवर्यांनी एका काठीऐवजी पाच काठ्यांचा गठ्ठा तयार करून पहिल्या शिष्याच्या हातात दिला व तो गठ्ठा तोडायला सांगितले. आता मात्र खरी कसोटी होती. पहिल्या शिष्याने हवे तसे खूप प्रयत्न करून देखिल तो गठ्ठा तुटला नाही.  एवढेच नव्हे तर तो दुसर्या तीसर्या चौथ्या पाचव्या शिष्यांना देखिल तुटला नाही. शेवटी त्यानी गुरूवर्य आचार्यांना विचारले की गुरूजी आम्ही एकेक काठी सहजपणे तोडली पण हा पाच काठ्यांचा गठ्ठा आम्ही खूप प्रयत्न करूनही तुटला नाही असे का? तेव्हा गुरूवर्य आचार्य म्हणाले की तुम्ही जर जीवनात एकटेच लढत बसाल तर तुम्ही त्या एकट्या काठीप्रमाणे तुटून पडाल आणि जर तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन लढाल तर तुम्ही कधीच तुटून जाणार नाही.
       धनगर समाजातील तमाम समाजबांधवांना मला एवढंच सांगायचे आहे की आजपर्यंत आपण वेगवेगळे गटातटात लढत बसलो होतो म्हणुन आपली दखल कोणी घेतली नाही आणि इथून पुढेही घेणार नाहीत. पण उद्याच्या ३१ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील आमखास मैदानावर लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून धनगर समाजाची एकी दाखवून दिली तर जगातील कोणतीच शक्ति आपल्याला पराभूत करू शकणार नाही ही काळ्या दगडावरील रेखा आहे. एकजुटीचा नेहमी विजय होत असतो एवढी त्यामध्ये असते म्हणून एकीचं बळ महत्वाचं आहे. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळायला हवे यासाठी सर्वांनी एकत्रित येणे काळाची गरज आहे. उद्याच्या पिढीच्या भवितव्याचा विचार करूनच धनगर समाजातील तळागळातील धनगर समाजबांधवांनी उद्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा. वेगवेगळ्या चुल्हा मांडून वेगवेगळा संसार मांडत बसण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित या.  सळसळत्या रक्ताचे वारसदार असणारा धनगर समाज कधीच षंढ होणार नाही हे अख्खा जगाला कळू द्या आणि महत्वाचं म्हणजे थंड राहून षंढ राहण्यापेक्षा बंड करून गुंड झालेले अधिक बरे.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंराजे!!
           नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        +918530004123
nitinrajeanuse123@gmail.com

No comments:

Post a Comment