Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Sunday, 2 September 2018

आमखासवरील धनगरांच्या भुकंपाचे दिल्लीला हादरे : नितीनराजे अनुसे


औरंगाबाद येथील आमखास मैदानावर ऐतिहासिक मोर्चाला संबोधित करताना महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब.
आमखासवरील धनगरांच्या भूकंपाचे  दिल्लीला हादरे...
                         ✍️नितीनराजे अनुसे
        एकेकाळी महाराष्ट्र राज्याच नव्हे तर अखंड भारत देशभर प्रशासन आणि राजकारभार करणारी अर्थातच राजा समाज असणारी धनगर जमात आज आपल्या न्याय व हक्कासाठी लढत आहे झटत आहे आणि झगडत आहे. कोणीही उठले की सुटले आंदोलन मोर्चे करायला काही दुधखुळे नाहीत... त्यापाठीमागे प्रचंड तळमळ आणि अन्यायाच्या विरोधातील प्रचंड चीड असते आणि त्याचेच ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे औरंगाबाद येथील आमखास मैदानावर एकच वज्रमुठ घेऊन एकवटलेला महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाज. धनगरांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन गेल्या ७० वर्षांपासून या जमातीवर विनाकारण  वारंवार अन्याय व अत्याचार होत राहिला त्यास आजपर्यंतचे राज्य सरकार परस्पर कारणीभूत असून धनगर जमातीला त्यांच्या न्याय व हक्कापासून दूर ठेवणे यासारखा दुसरा मोठा देशद्रोह कोणताच नाही. 
समतेच्या पिवळ्या झेंड्याचे ध्वजारोहण करताना जेष्ठ समाजबांधव बल्लाळ महाराज

        शुक्रवारी ३१ ऑगस्ट २०१८ रोजी औरंगाबाद येथे जो ऐतिहासिक मोर्चा झाला त्या मोर्चाच्या अगोदर उलट-सुलट चर्चा होताना दिसत होत्या कोणी महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ गोपीचंद पडळकर साहेब व मा.उत्तम जानकर साहेब यांना भाजपचे दलाल म्हणून संबोधत होते तर कोणी भाजपची तितरं म्हणून त्यांचा उल्लेख करत होते. असो,  प्रत्येकाला आपापले मत व्यक्त करण्याचा संविधानिक अधिकार आहे. परंतु त्यांच्या आरोपाचे खंडन करण्याची मला काही गरज वाटत नाही कारण ते मोर्चा पाहून अथवा मोर्चामधील भाषण आणि उपस्थित जनसमुदाय यातून त्याचे उत्तर संबंधित समाजबांधवांना मिळालेच असेल. धनगरांचा मोर्चा रोखण्यासाठी राज्यसरकारला प्रशासकीय व्यवस्थेची गरज भासते असे का? मग तिथे रेल्वे विभाग असो, पोलिस सेवा अथवा प्रशासन विभाग असो... त्या विभागात धनगर समाजाची पोरं/पोरी जर IAS/IPS असती तर धनगर समाजाला आंदोलन करायची गरज कधी पडली नसती आणि आंदोलकर्त्यांना रोखायची देखील गरज सरकारला भासली नसती. दुसरा कोणता अभ्यास करत बसता वरील गोष्टीचा आणि घटनेचा अभ्यास त्या (सुज्ञ?) मुख्यमंत्र्यांनी करावा ज्यांनी औरंगाबादला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करायला रेल्वे प्रशासनाला भाग पाडले.
ड्रोन कैमरा द्वारे घेतलेले छायाचित्र
आमखास मैदानावर उपस्थित असलेला विराट धनगर समाज

      खरंतर औरंगाबादच्या आमखास मैदानावर जेवढा धनगर समाज उपस्थित राहिला होता तो एकूण लोकसंख्येच्या १०% देखील नव्हता कारण धनगर समाजातील जवळपास ५०% धनगर जमात आजही शेळ्या-मेंढ्या राखतेय तर ३०% धनगर समाज शेतीवरती अवलंबून आहे, १६-१७% धनगर समाज  छोट्या मोठ्या नोकऱ्या तर ३% धनगर समाज शासकीय नोकरी आणि व्यवसाय या क्षेत्रात कार्यरत आहे. कोणत्याही मोर्चात माझा सर्वच मेंढपाळ बांधव सहभागी होऊ शकत नाही तर नोकरदार वर्ग महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहणार होता परंतु आंदलनाची दाहकता, पार्श्वभूमी तथा आक्रमता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याच्या दळभद्री सरकारने मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक तसेच नागपूर वरुन औरंगाबादच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करून आंदोलन हानून पाडण्याचा प्रयत्न केला त्यासाठी वाटेल त्या कुरघोड्या केल्या. हे आंदोलन भाजप पुरस्कृत असल्याचे थोतांड देखील त्यांनी माजवले परंतु प्रसतापितांचे ऐकून हार मानतील ते धनगर कसले? मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या बसने, मोटारसायकलवरुन धनगर समाजबांधव औरंगाबाद येथील आमखास मैदानावर पोहचले आणि महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ मा.गोपीचंद पडळकर साहेब व मा.उत्तमराव जानकर साहेब यांच्या प्रयत्नाला त्यांच्या तळमळीला यश आले आणि अखेरच्या धनगर आरक्षण लढ्याचा औरंगाबाद येथील आमखास मैदानावरील मोर्चा यशस्वी झाला. त्याबद्दल प्रत्येक स्वाभिमानी धनगर समाजबांधवांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. तरीही एवढ्यावरच भागणार नाही तर धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसूचित जमातीच्या सवलती जोपर्यंत धनगर समाजाला मिळत नाहीत आणि अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (S T Certificate) जोपर्यंत धनगर समाजातील शेवटच्या व्यक्तीला मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार. तोपर्यंत सरकारला बेजार करून त्यांच्या नाकीनऊ आणून सोडा. महाराष्ट्र राज्याच्या नवव्या परिशिष्टात अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर जी जमात आहे ती दुसरी तिसरी कोणती धनगड जमात नसून ती फक्त धनगर हीच जमात आहे त्यामुळे लक्षात ठेवा या भारतामध्ये भिक मागून तुम्हाला कधीही काहीच मिळत नाही जर पाहिजेच असेल तर लाथ घालून हिसकावून घ्यायची सवय धनगर समाजाने लावून घेतली पाहिजे. 
महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब

            गेल्या दोन महिन्यांपासून घरदार सोडून गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तमराव जानकर साहेब अहोरात्र तळमळीने पोटतिडकीने समाजासाठी पायाला भिंगरी लावून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ते झटले आणि झगडले प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समाजबांधवांनी देखील हा मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून तन मन धनाने मदत केली. धनगर समाजाचं दैवत असलेले आदरणीय आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब हे त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत त्यांच्या ऐवजी मोर्चाला उपस्थित असलेले धनगर समाजातील जेष्ठ व्यक्ति आदरणीय शिवाजी बल्लाळ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली धनगर आरक्षणाचा मोर्चा पार पडला हे मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कोणत्याही जाती-धर्माला न दुखवता, कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय मालमत्तेला हानी न पोहचवता अद्भुतरम्य तथा ऐतिहासिक मोर्चा पार पडला याचे श्रेय प्रत्येक धनगर समाजबांधवांना जाते. महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या रूपाने समाजाला खरंतर पुन्हा एक क्रांतीसुर्य मिळाला थोडक्यात सांगायचे झाल्यास युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्यामध्ये आम्ही क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांना पाहतोय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. काही जण म्हणत होते की गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तम जानकर साहेब यांना आमदार खासदार व्हायचे असेल म्हणून त्यांना आता समाज आठवला. अरे मग तुम्ही त्यांच्याच भोवती घिरट्या मारुन कशाला भुंकत बसताय, होऊ द्या ना त्यांना आमदार खासदार आणि तुम्ही पण व्हा. या महाराष्ट्र राज्यात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत तुम्हाला वाटेल त्या मतदारसंघातून निवडणूक लढवा सर्व धनगर समाज तुमच्या पाठीशी आहे. कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त १०० तरी आमदार आणि खासदार धनगर समाजातून विधानसभा आणि संसदभवन मध्ये जायला हवेत. आपल्याच माणसांचे पाय ओढत बसण्यापेक्षा खेकडा प्रवृत्ती बाजूला ठेवून आपल्याच माणसांना सपोर्ट करा तरच समाजावरील अन्याय व अत्याचार थांबेल.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५३०००४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com

8 comments:

  1. Replies
    1. जय मल्हार. ..
      खुप छान.

      Delete
  2. अप्रतिम लिखान राजे
    आणि महाराष्ट्राच्या या २ ढान्या वाघाना त्रिवार मानवंदना...

    ReplyDelete
    Replies
    1. सर खरोखर अप्रतिम लेख आहे खरतर दिशाहीन झालेल्या समाजाला एक क्रांतीसुर्य मा.गोपीचंद पडळकरसाहेबांच्या रुपाने मिळाला आहे जे काम महादेव जानकरसाहेबांना करायला पाहिजे ते काम पडळकरसाहेब करत आहेत युवकांमध्ये एक नवीन उम्मेद निर्माण झाली आहे एक जिगरबाज नेतृत्त्व मा गोपीचंद पडळकरसाहेब

      Delete