Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Thursday, 29 June 2017

होळकर कालीन बारव्यांच्या शोधात भाग-२

*पुनर्वसन व सुशोभिकरण*
दि.२९ मे २०१७ रोजी राज्य महामार्ग क्र. १४३ मल्हारपेठ-पंढरपूर रोड वरती माणदेशातील सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यांतील निंबवडे गावाच्या ईशान्येकडील माण तालुक्याच्या हद्दीत असलेल्या होळकर कालीन बारव्याची मी तसेच यशवंत युवा सेनेचे कार्यकर्ते पप्पू शिंगाडे, सुमितराव मेटकरी व अतीश कोळेकर या सर्वांनी पाहणी केलीच होती. त्याबद्दल मी सविस्तरपणे होळकर कालीन बारव्याच्या शोधात भाग-१ मध्ये वर्णन केलेले आहे


त्यानंतर दि.६ जून २०१७ रोजी त्याच राज्य महामार्ग क्र.१४३ मल्हारपेठ-पंढरपूर या मार्गावर आटपाडी तालुक्यांतील  दिघंची या गावापासून  झरे या गावाकडे जाताना दोन-तीन कि.मी. अंतरावर तशाच प्रकारचा पिंडीच्या आकाराचा होळकर कालीन बारवा पाहावयास मिळाला. सध्या त्या बारव्याची अवस्था अत्यंत बिकट स्वरूपाची असून हा बारवा पूर्णता पडझड झालेल्या अवस्थेत आहे. सध्या मी महाराष्ट्र राज्याबाहेर असल्याने मला काही शक्य झाले नाही परंतु माझे सहकारी मित्र  दिघंची गावचे सुपूत्र अजय पाटोळे यांच्या माध्यमातून संबंधित बारव्याचे फोटो संकलित केले गेले आहेत ते खालील छायाचित्रांत पाहावयास मिळतीलच.


रणरागिणी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी केवळ त्यांच्या इंदौर राज्यापुरताच मर्यादित राज्यकारभार केला नाही तर अखंड भारत देशभर त्यांनी विकासकामे केली. प्रशासन व्यवस्थेवर त्यांची चांगलीच जरब असायची. देशभर विकासकामे त्यांनी स्वताच्या खाजगीतूनच केली. मग त्यामध्ये काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि द्वारकापासून आसाम पर्यंत सर्व धार्मिक स्थळांचे बांधकाम केले काहींचा जिर्णोध्दार केला मग त्यामध्ये मशिदी असो अथवा मंदिरे... राष्ट्रमाता महाराणी अहिल्याई होळकर यांनी सर्व ज्योतिर्लिंगाचा जिर्नोद्धार केला, नद्यांवरती घाट, विहीरी, शेततळे, तलाव, आश्रमशाळा, वाटसरूंसाठी धर्मशाळा, उपहारगृहे तसेच बारवे यांचे बांधकाम केले होते. त्यातीलच हा एक होळकर राज्यकालीन बारवा. दिघंची गावाजवळील हा बारवा पडझड झालेल्या अवस्थेत असून छायाचित्रांत पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेला दिसतो परंतू या बारव्यामध्ये पुर्नता मातीचा संचय झाला असल्याने दगडी बांधकाम केवळ गुडघाभरच निदर्शनास येथे. 


सामाजिक कार्यकर्ते मा.रामभाऊ लांडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून काही संस्थांच्या मदतीने या बारव्याचे पुनर्वसन करण्यात येणार आहे त्याचबरोबर यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने यशवंत युवा सेना शाखा निंबवडे व दिघंची येथिल युवा कार्यकर्त्यांसह राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारव्याचे सुशोभिकरणदेखील करण्यात येणार आहे.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Monday, 26 June 2017

क्रांतीची धगधगती मशाल विझू देऊ नका : नितीनराजे अनुसे

         देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्ष होत आली तरीही पारतंत्र्याचं जीणं (जीवन) जगत असलेल्या माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला राज्यघटनेने दिलेले अधिकार मिळत नसतील तर त्या अधिकारांपासून/हक्कांपासून धनगर जमातीला वंचित ठेवणाऱ्या शोषणकर्त्या औलादी असलेल्या सत्तापिपासू राजकर्त्यांच्या विरोधात स्व.बी.के.कोकरे साहेबांनी जो आरक्षणाचा लढा उभा केला आहे तो लढा थांबवू नका. हक्काच्या आरक्षणासाठी (अनुसुतित जमातीच्या सवलती लागू करण्यासाठी) आरक्षणाची जी चळवळ उभा केली आहे ती चळवळ बलशाली करा. ज्या क्रांतीच्या मशाली स्व.बी.के.कोकरे साहेबांनी आम्हा युवकांच्या हातात दिल्या आहेत त्या धगधगत्या मशाली शमता (विझता) कामा नयेत त्या अशाच पेटत्या ठेवा. धनगर जमात ही एक आदिम आणि मुख्यत्वे मेंढपाळ व्यवसाय असणारी जमात असून या जमातीने कोणत्या राजाच्या पोटी जन्म घेतला नाही तर या मातीवरती होणारी परकीय शत्रुंची आक्रमणं रोखण्यासाठी छातीवर घाव झेलून आणि छातीची ढाल करून मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर दुश्मनांना सळो की पळो करून सोडणाऱ्या थोरले श्रीमंत राजे मल्हारराव होळकरांचा वारसा लाभलेली ही जमात आहे, स्त्री असून देखिल हातात शस्त्र आणि शास्त्र घेऊन दिल्लीचे तख्त अबाधित राखत भारताच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्ष राज्यकारभार करून जगातील एकमेव उत्तम प्रशासक म्हणून ज्यांचा गौरव केला जातो अशा अखंड भारतभर जाती-धर्मापलिकडेही जाऊन विकासकामांचा अद्भूत डोंगर रचणाऱ्या महाराणी रणरागीणी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची लेकरं आणि अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत(इज्जत) जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या महाराजाधिराज छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या सळसळत्या रक्ताचा वारसा असणारी जमात आहे. एखादी गोष्ट मनात आणली तर ती क्षणात हिसकावून घेण्याची धमक ज्यांच्या रक्तात आहे अशा धनगर समाजाला राज्यघटनेने दिलेले अनुसुचित जमातीचे अधिकार जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत स्व.बी.के.कोकरे साहेबांनी उभा केलेली आरक्षणाची चळवळ थांबणार नाही आणि थांबूही देणार नाही मग जर कोणी आडवा आला तर त्याला उभा चिरायची देखिल धमक आम्ही बाळगतो हे कोणी विसरू नका. एकतर आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही त्यामुळे आमच्या वाटेला जर कोणी जात असेल, तर त्यांच्या वाटेवर जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय
आम्ही आमच्या वाटेला परतत नाही हा आमुचा इतिहास आहे.
खिंचनी होगी तलवार,
अब तांडव करना ही होगा ॥
औकात भूल गये है कुछ कुत्ते,
अब इतिहास दोहराना ही होगा ॥
इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. आमुचा इतिहास आजही जिवंत आहे आणि आम्ही युवक छत्रपती महाराजा यशवंतराव होळकरांचे वारसदार तो इतिहास जिवंत ठेवण्यासोबतच नविन इतिहास घडवण्याची नुसती भाषा बोलत नाही तर ते करून देखील दाखवतो म्हणूनच धनगर समाजातील तमाम युवक-युवतींना माझे आवाहन आहे की स्वताच्या आयुष्याची राखरांगोळी करून धनगर समाजाच्या ज्या क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांनी तुमच्या-आमच्या हातात जी क्रांतीची धगधगती मशाल दिली आहे ती क्रांतीची मशाल अशीच पेटती ठेवा एकवेळ गरज पडली तर समाजावर अन्याय करण्याऱ्यांची राखरांगोळी करून टाका पण क्रांतीची धगधगती पेटती मशाल मात्र विझू देऊ नका. नाहीतर पुढची पिढी तुमच्या-आमच्या तोंडात शेण घातल्याशिवाय राहणार नाही.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१८५३०००४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com

Thursday, 22 June 2017

समाजातील संवेदनशीलता नष्ट होतेय का?

Image may contain: sky and outdoor
धनगर म्हंटलं की रांगडा गडी, एकेकाला लाल मातीत लोळवणारा बलशाली, पैलवान (ताकदवान), बुद्धिमान, चपळ अशी कितीतरी विशेषणे लावली तरी कमीच पडतील, शत्रूंशी लढताना निधड्या छातीवर तलवारींचे  वार झेलणारा लढवय्या आणि तितकाच सर्वांशी आपुलकीने वागणारा एक प्रेमळ आणि मनमिळावू व्यक्ति अशीच ओळख असणारा धनगर हा मुक्या जनावरांची शेळ्या-मेंढ्यांची तहान-भूक जाणू शकतो तर आम्हांसारख्या चालत्या बोलत्या माणसाच्या भावना समजणे त्याला काहीच अवघड नाही. पण हल्ली धनगर समाजातील संवेदनशीलताच लोप पावत चाल्लीय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.
खरंतर हे इतर दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या समाजाला उद्देशून लिहीत नाहीये तर मतलबी दुनियेमध्ये स्वताचा स्वाभिमान विसरणाऱ्या धनगर समाजातील समाजबांधवांना हे उद्देशून लिहतोय कदाचित काहीजनांच्या हे जिव्हारी लागेल पण त्यागोदर मी त्यांची जाहीर माफी देखिल मागतो. कारण माफी न मागण्याइतपत तरी मी काही निर्दयी आणि निष्ठूर नाहीये. खरंतर दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाचे वारसदार असलेल्या जमातीला उद्देशून लिहायची गरज पडायला नको होती पण आपल्याच धनगर समाजाने मला मजबूर केले म्हणून लिहावेसे वाटले त्याचे कारण असे सोमवार दि.१२ जून २०१७ रोजी घडलेली घटना ही सर्वांना माहीतच असावी. कारण आजकालची जवळपास ७५ ते ८० % युवा पिढी फेसबुक/व्हाटसप सारख्या सोशल मिडीयामध्येच रमलेली दिसते. असो... "श्रीमंत थोरले मल्हारराव होळकर प्रतिष्ठान पुणे"चे श्री.संतोष वाघमोडे साहेब यांनी त्यांच्या फेसबुक अकौंट वरतून तसेच व्हाटसपच्या माध्यमातून सदरच्या घटनेचा सविस्तर असा वृत्तांत दिला होता शिवाय त्या पिडीत कुटूंबियांना मदत करण्याचे त्यांनी आवाहन देखील केले होते. घडलेली घटना खरंतर घडायलाच नको होती अशी अगदी ह्रदय पिळवटून टाकणारी ती घटना ह्रदयाचे पार ठोके बंद पाडणारी होती. अरे पोटच्या पोरासारखं ज्यांना जपलं, तळहातावरच्या फोडासारखी ज्यांची काळजी घेतली, चराऊ कुरणे सरकारच्या घशात गेली म्हणून ज्यांच्या चाऱ्याच्या शोधात दरवर्षी सहा-सात महिने घरदार सोडून वणवण केली, पोरंबाळं शिकून मोठे होतील खुर्चीवरची नोकरी करून चार पैसे मिळवतील म्हणून ऊन-वारा-पाऊस यांचा विचार न करता पायाच्या नडग्या वाळेपर्यंत ज्यांची राखण केली अशा काळजाच्या तुकड्यासारख्या बाळू गोपाळा शिंगटे व आबू गोपाळा शिंगटे या कुटूंबियांच्या एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ४५ शेळ्या आणि मेंढ्यांवरती निसर्गाने घाला घातला. डोळ्यादेखत पोटच्या लेकराचा मृत्यू व्हावा अशी काळजाच्या तुकड्यासारखी जपलेली जितराबं वीज पडून एका क्षणात मृत्यूमुखी पडत असतील तर काळजाचा ठोका चुकणार नाही तर आणखीन काय होणार? डोळ्यादेखत त्या वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या शेळ्या-मेंढ्या जेसीबी मशीनच्या साहाय्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढतानाचा तो शिंगटे कुटूंबियांचा आक्रोश कदाचित तुमच्या कानावर पडला नसावा... ज्यांच्या घरात आजपर्यंत शेळ्या-मेंढ्या नाहीत त्यांना या घटनेबद्दल कदाचित काहीच वाटले नसेल असे मी मानतो पण ज्यांच्या घरात कधीतरी शेळ्या मेंढ्या होत्या किंवा आजही आहेत त्यांची ह्रदयं नक्कीच पिळवटली असतील. पण आजची परिस्थिती जणू अशी झाली आहे की माझ्या धनगर समाजातील संवेदनशीलताच कमी झाली अाहे मग कशी काय पिळवटतील कोणाची ह्रदयं?  कसे काय चुकतील कोणाच्यातरी काळजाचे ठोके?
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुकास्थित ढवळपुरी गावचे हे शिंगटे हे मेंढपाळ कुटूंब करडा-कोकऱ्यांचे आणि लेकरांचे लटांबणे घोड्याच्या पाठीवर लादून चाऱ्याच्या शोधात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका येथे पोहचले असताना सोमवार दि.१२ जून २०१७ रोजी सायंकाळी सुदवडी येथे मेंढ्या चारत असतानाच निसर्गाचा कोप झाला आणि एका क्षणात हे शिंगटे कुटूंब उघड्यावर आले. पारंपरिक व्यवसाय असला तरी  पोटाची खळगी भरण्यासाठी उदरनिर्वाचा एकमेव पर्याय म्हणून जवळपास ६ ते ७ लाखाची मालमत्ता असलेल्या शेळ्या-मेंढ्यांची डोळ्यांसमोर अगदी माती माती होऊन जात असेल कोणाचा टाहो फुटणार नाही ओ?? पण आजकाल धनगर समाजातील ह्रदय एवढी असंवेदनशील होतील असे स्वप्नातदेखील वाटले नाही त्याचे कारण असे की संतोष वाघमोडे साहेब यांनी "श्रीमंत थोरले मल्हारराव होळकर प्रतिष्ठान पुणे" यांच्यावतीने १०००० रूपये देणार असल्याचे सांगितले शिवाय समाजबांधवांनी ज्यांना जमेल त्या पद्धतीने १००, २००, ५००, १००० अशी आर्थिक मदत करून त्या उघड्यावर पडलेल्या शिंगटे कुटूंबियांना आधार द्यावा असे आवाहन केले होते. शासकीय मदत मिळेलच परंतु सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी गत असते हे सर्वांना ठाऊकच आहे परंतू धनगर समाजबांधवांना मदतीसाठी आवाहन करणारी ती पोस्ट आजपर्यंत १००० पेक्षा जास्त व्यक्तींनी व्हाटस/फेसबूकच्या माध्यमातून शेअर व फाॅरवर्ड केली शिवाय कमीत कमी ५०००० (पन्नास हजार) पेक्षाही जास्त व्यक्तींनी सदरची घटना फेसबुक/व्हाटसपच्या माध्यमातून पाहिली व ती पोस्ट आवडली म्हणून दर्शवले (किती निर्लज्जपणाचा कळस म्हणावा). शिवाय आतापर्यंत ५०० पेक्षाही जास्त फोन सदर घटनेतील पिडीत कुटूंबातील संतोष आबू शिंगटे यांच्या संपर्क क्रमांकावरती आले व मदत करण्याचे आश्वासन दिले. पण १२ जून पासून आतापर्यंत या शिंगटे कुटूंबियाच्या अकौंट वरती अवघे २४ हजार रूपये जमा झालेत. यालाच संवेदनशील समाज म्हणायचे का? नुसताच फोन करून पुळका दाखवणे आणि फेसबुक/व्हाटसप च्या माध्यमातून भावनिक आणि अतिसंवेदनशील असल्याचे दाखवणे हे कितपत योग्य आहे.?
Image may contain: one or more people, people standing and outdoor
एकीकडे अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचे हक्क मिळवण्यासाठी याच मेंढपाळ बांधवांना आणि त्यांच्या पोटच्या पोरासारख्या असलेल्या शेळ्या-मेंढ्यांना दाखवून सरकार दरबारी आरक्षणासाठी भिक मागता आणि दुसरीकडे याच मेंढपाळ बांधवांवरती आणि शेळ्या-मेंढ्यावरती जर निसर्गाचा कोप झाला, निसर्गाने घाला घातला तर प्रसिद्धी माध्यमातून तुम्ही स्वता प्रसिद्ध होता पण त्या त्या पिडीत कुटुंबाकडे दुर्लक्ष करता एवढे स्वार्थी कसे काय झाला तुम्ही? ज्या धनगर समाजाची ओळख ही शेळ्या-मेंढ्या राखणारा समाज म्हणून होते त्याच शेळ्या-मेंढ्या राखणाऱ्या या मेंढपाळ बांधवांना आपल्याच समाजातील काहीजण स्वताला ब्राह्मण समजणारे धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांना वाऱ्यावर सोडून दुय्यम दर्जाची वागणूक देत असतील तर समाज एकत्रिकरणाला काय अर्थ आहे? आंदोलनात मेंढपाळ पाहिजेत, मोर्चासाठी, रास्तारोखोसाठी त्यांच्या शेळ्या-मेंढ्या पाहिजेत पण जेव्हा याच शेळ्यामेंढ्या महामार्गावर ट्रकच्या खाली मुंगीसारख्या चिरडल्या जातात तेव्हा त्या मेंढपाळ बांधवांला साधं विचारायलाही कोणी धजत नाही किंवा पुढे येत नाही किती निर्लज्जपणाची ही गोष्ट म्हणायची? जर शेळ्या-मेंढ्यांसाठी चराऊ कुरणे उपलब्ध नसतील तर भटकंती करण्याशिवाय माझे वडिलधारे असलेल्या मेंढपाळांकडे पर्यायच नाही मग अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ काय नुसते मुंबई-पुणे सारख्या शहरात राहणाऱ्यांना आणि कोणताही डाग न पडलेले पांढरे कपडे घालून समाजाचे लेबल लावणाऱ्यांनाच आरक्षण पाहिजे का? तसे असेल तर मग आरक्षणाच्या लढाईत माझ्या मेंढपाळ बांधवांचा आणि पोटच्या लेकरासारखं जपलेल्या शेळ्या-मेंढ्यांचा वापर करू नका तुम्हाला आरक्षण कसे मिळते तेच बघूया....
एकीकडे दारूसाठी, गुटखा, तंबाखू, विमल, पान, सिगारेट यांच्या व्यसनासाठी दिवसा हजारों रूपये खर्च करणारी भरपूर मंडळी धनगर समाजात आहेत, मित्रांना बोलावून पार्टीमध्ये एका रात्रीत ५० हाजरांपेक्षा जास्त पैसे उधळणारे देखिल धनगर समाजात आहेत, लाखो करोडों रूपयांच्या अलिशान वातानुकुलीत गाड्यांतून फिरणारे देखिल धनगर समाजात आहेत पण अतिक्रमणात घरं उध्वस्त झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीमधून रस्त्यावर आलेल्या माझ्या बेघर आणि आधारहीन गोरगरीब मेंढपाळ बांधवांना जर तुमच्याकडून १००-२०० रूपयाची मदत मिळत नसेल तर त्याच मेंढपाळ बांधवांच्या नावावर स्वताची प्रसिद्धी करणारे आणि त्यांच्याच नावावर आरक्षणाची भिक मागणारे तुमच्या सारखे स्वार्थी आणि निर्लज्ज  या जगात कोणी नसतील.
Image may contain: one or more people and outdoor
अजूनही समाजात जर संवेदनशीलता शिल्लक असेल तर खालील पिडीत कुटूंबाच्या अकौंट वर तुम्हाला शक्य होईल तसे १००, २००, ३००, ५०० अथवा १००० किंवा त्यापेक्षा अधिक ज्यांच्या त्यांच्या परीने शक्य असेल त्यांनी पाठवून सामाजिक बांधिलकी जोपासावी अन्यथा समाज एकत्रितकरणाची भाषा वापरू नये.
Account Holders Name:-
Santosh Abu Shingate
ICICI Bank
Acc.No. 032101646506
IFSC code - ICICI0000321
आपल्यातीलच एक सर्वसामान्य मेंढपाळ कुटूंबातील पोरगा...
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday, 15 June 2017

राष्ट्रपती पुरस्कार विजेता टिंग्या फेम मा.शरद गोयेकर यांची यशवंत युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष पदी निवड



आज गुरूवार दि.१५ जून २०१७ रोजी आटपाडी ता.आटपाडी दि.सांगली येथे झालेल्या यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या विशेष बैठकी दरम्यान यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती पुरस्कार विजेता व आपल्या सर्वांचा लाडका टिंग्या अर्थातच बब्या चित्रपटाचे युवा
दिग्दर्शक मा.शरद गोयेकर यांची
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या
युवक प्रदेशाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली.
या विशेष बैठकी दरम्याण झालेल्या सर्व निवडी पुढील प्रमाणे...
1. मा.शरद गोयेकर. (युवक प्रदेशाध्यक्ष यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य)
2. मा.श्री.पै.राहूल रूपनवर-पाटील. (सांगली जिल्हा प्रमुख यशवंत युवा सेना)
3. मा.श्री.तानाजीराजे गोयेकर. (मुंबई विभाग प्रमुख यशवंत युवा सेना)
4. मा.मयुर कुदनर. (अहमदनगर जिल्हा प्रमुख यशवंत युवा सेना)
5. मा.श्री. महेश कचरे (सातारा जिल्हा प्रमुख यशवंत युवा सेना)
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही एक क्रांतीकारी आणि लढवय्या संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून समाजाचे, वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निस्वार्थीपणाने अहोरात्र कार्य करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार विजेता टिंग्या फेम तथा बब्या चित्रपटाचा युवा दिग्दर्शक मा.शरद गोयेकर यांनी केले. त्याचप्रमाणे यशवंत युवा सेना प्रमुखांनी दिलेली जबाबदारी निस्वार्थीपणाने व यशस्वीरित्या पार पाडणार असल्याची शपथ नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी घेतली. यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब म्हणाले की यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना कोणत्याही स्वार्थी हेतूने समाजकार्य करत नाही तर स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारवरती ही संघटना मार्गक्रमण करत आहे, त्यांनी उभा केलेली आरक्षणाची चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी निस्वार्थीपणाने समाजासाठी अहोरात्र झटत आहे झगडत आहे. यशवंत युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची व यशवंत सैनिकांची ही तळमळ पाहूनच राष्ट्रपती पुरस्कार विजेता टिंग्या फेम मा.शरद गोयेकर यांनी यशवंत युवा सेनेच्या युवकप्रदेशाध्यक्ष या पदाचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे यशवंत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता नुसतेच पद लावून न घेता जबाबदारीने व निस्वार्थीपणाने काम करावे असे आदेश दिले आहेत.
यशवंत युवा सेनेच्या या विशेष बैठकीसाठी यशवंत युवा सेनेचे प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, यशवंत युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मा.अवधूत वाघमोडे साहेब, यशवंत युवा सेना माण तालुका प्रमुख मा.दिनेश(दादा) हुबाले, आटपाडी तालुक्याचे युवा नेतृत्व मा.आबासाहेब भानवसे तसेच यशवंत युवा सेनेचे अन्य पदाधिकारी व छत्रपती महाराजा यशवंतराव होळकरांचे मावळे उपस्थित होते.
यशवंत युवा सेनेच्या वरील सर्व नवनिर्वाचित पदीधिकाऱ्यांचे झालेल्या निवडीबद्दल हर्दिक हर्दिक त्रिवार अभिनंदन तसेच तुमच्या हातून समाजासाठी निस्वार्थीपणाचे कार्य घडो व त्यातूनच अत्याचारविरहीत सुज्ञ, सुशिक्षित, सतर्क व सजग अशा राजा समाजाचा जन्म व्हावा हीच माफक अपेक्षा व त्यास हर्दिक हर्दिक शुभेच्छा.
शुभेच्छूक,
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Saturday, 3 June 2017

निंबवडे येथे राष्ट्रमाता अहिल्याई जयंतीनिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन

निंबवडे ता. आटपाडी जि.सांगली येथे राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या २९२ व्या जयंती निमित्त उद्या रविवार दि. ४ जून २०१७ रोजी  भव्य जंगी मिरवणूक व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदरच्या
 कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा.गोपीचंद पडळकर साहेब
(महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ)

प्रमुख वक्ते
मा.विवेक कोकरे साहेब
(प्रमुख:- यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य)
मा.स्वप्निल दडस
(बाल व्याख्याते)
मा.सौ.किर्ती नितीनराजे अनुसे

प्रमुख पाहुणे
मा.तुषारशेठ विरकर
(नगराध्यक्ष म्हसवड नगरपरिषद)
मा.प्रा.सचिन होनमाने
(यशवंत युवा सेना प्रदेशाध्यक्ष म.राज्य)
मा.जयवंतराव सरगर
(सो.मि.अध्यक्ष भाजप सांगली जिल्हा)
मा.विष्णू देशमुख
(यशवंत युवा सेना कार्याध्यक्ष महा.राज्य)
मा.प्रभाकर (शेठ) पुजारी
(तालुक्याचे नेते)
मा.विनायक मासाळ
(उद्योगपति)

सत्कारमुर्ति
मा.ब्रह्मानंद पडळकर साहेब
(समाजकल्याण सभापती जि.प.सांगली)
मा.तानाजी (शेठ) यमगर
(उपसभापति पंचायत समिती आटपाडी)
मा.सौ.पुष्पाताई जयवंत सरगर
(सदस्य पंचायत समिती आटपाडी)
मा.दादासो मरगळे
(सदस्य पंचायत समिती आटपाडी)
मा.सौ.भुमिका बेरगळ
(सदस्य पंचायत समिती आटपाडी)

सन्माननीय उपस्थिती
मा.मंगेश (दादा) मगदूम
(सरपंच ग्रामपंचायत निंबवडे)
मा.सुरेश मुढे
(सरपंच ग्रामपंचायत मुढेवाडी)
मा.दिलीप कोकरे
(सरपंच ग्रामपंचायत वाक्षेवाडी)

राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या जयंतीनिमीत्त जंगी मिरवणूक
वार रविवार
दि.४ जून २०१७
वेळ. सायं ५:०० वाजता.
मुख्य कार्यक्रमाची वेळ
सायं. ७:०० वाजता.

स्थळ:-
निंबवडे ग्रामपंचायत जवळ
निंबवडे ता.आटपाडी जि.सांगली

आयोजक;
    समस्त धनगर समाज
निंबवडे, मुढेवाडी, वाक्षेवाडी,
  अनुसेवाडी व यशवंतनगर
  ता.आटपाडी जि.सांगली

Tuesday, 30 May 2017

होळकर कालीन बारव्यांच्या शोधात भाग-१

*पुरातन बांधकामाचे सुशोभिकरण*
काल दि. २९ मे २०१७ रोजी राज्य महामार्ग क्र. १४३ मल्हारपेठ-पंढरपूर रोड वरती माणदेशातील सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यांतील निंबवडे गावाच्या ईशान्येकडील माण तालुक्याच्या हद्दीत असलेल्या होळकर कालीन बारव्याची पाहणी करताना मी स्वता व आमचे मित्र यशवंत युवा सेनेचे कार्यकर्ते पप्पू शिंगाडे, सुमितराव मेटकरी व अतीश कोळेकर.
रणरागिणी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी केवळ त्यांच्या इंदौर राज्यापुरताच मर्यादित राज्यकारभार केला नाही तर अखंड भारत देशभर त्यांनी विकासकामे केली. प्रशासन व्यवस्थेवर त्यांची चांगलीच जरब असायची. देशभर विकासकामे त्यांनी स्वताच्या खाजगीतूनच केली. मग त्यामध्ये काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि द्वारकापासून आसाम पर्यंत सर्व ज्योतिर्लिंगाचा जिर्नोद्धार, नद्यांवरती घाट, विहीरी, शेततळे, तलाव, आश्रमशाळा, वाटसरूंसाठी धर्मशाळा, उपहारगृहे तसेच बारवे यांचे बांधकाम केले होते. त्यातीलच हा एक होळकर राज्यकालीन बारवा. सद्या हा बारवा पडझड झालेल्या अवस्थेत असून  यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने यशवंत युवा सेना शाखा निंबवडे येथिल युवा कार्यकर्त्यांसह राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारव्याचे सुशोभिकरण व बांधकाम करणार आहोत.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
http://nitinrajeanuse.blogspot.in/2017/05/blog-post_30.html?m=1

पंढरीत यशवंत युवा मेळावा उत्साहात साजरा

देवाची पंढरी, विठ्ठलाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीतील नेपतगाव येथे राष्ट्रमाता रणरागिणी अहिल्याई होळकर यांच्या २९२ व्या जयंतीनिमीत्त यशवंत युवा सेना शाखा नेपतगाव च्या वतीने भव्य यशवंत युवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. न्यायालयीन लढाई संदर्भात बोलताना मा.निवांत कोळेकर सर यांनी समाजाला योगदान देण्यास प्रवृत्त केले.  ७५० वर्षापेक्षाही जास्त राज्यकारभार या भारत देशावर आणि आशिया खंडावर केला असताना देखिल आज धनगर समाज प्रस्तापितांच्या राजकीय आणि सामाजिक दबावाखाली पिचत पडला असून धनगर समाजाला इथून पुढे सक्षम आणि सशक्त करण्यासाठी सर्वप्रथम समाजातील मुले-मुली सुशिक्षीत व्हायला हवीत, समाजाचा आर्थिक समतोल मजबूत असायला हवा त्यासाठी विशेषता युवा वर्गालाच जबाबदारीने काम करावे लागणार असल्याचे टिंग्या फेम व बब्या चित्रपटाचे युवा दिग्दर्शक शरद गोयेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर समाजाच्या न्याय व हक्कासाठी सर्वोतपरी जी काही मदत लागेल त्यास हातभार लावणार असल्याचे देखिल दिग्दर्शक शरद गोयेकर यांनी सांगितले.
समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपले नेतृत्व सक्षम असायला हवे कारण ज्या घराचा कर्ता हा लायक असेल सक्षम असेल मजबूत असेल तर त्या  घरावरती भिक मागायची वेळ कधी येणार नाही आणि त्या धराचा कर्ता जर बलशाली असेल तर त्या घराकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत कोणाची होणार नाही असे प्रतिपादन यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाद्यक्ष मा.प्रा.सचिन होनमाने सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी फसणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला तर गेल्या वर्षी ३१ मे २०१६ ला आश्वासनाच्या माध्यमातून सोलापूर विद्यापीठाचे नामकरण राष्ट्रमाता अहिल्याई होळकर विद्यापीठ करणार असल्याचे सांगितले होते पण तसे जाहीर केले नाही पण जर या ३१ मे २०१७ रोजी अशी घोषणा झाली नाही तर पुढील १० दिवसाच्या आत सोलापूर विद्यापीठावर हजारोंच्या लाखोंच्या संख्येने जाऊन यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने आंदोलन करणार असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले. त्यासाठी समाजबांधवांनी त्या सरकारला बरं वाटल असे काही करू नये तर त्या सरकारच्या नाकात दम ठोकायची धमक फक्त मल्हारबांच्या मावळ्यात असल्याची जाणीव त्या सरकारला करून द्यावी. शिवाय राजा महाराजांच्या धनगर जमातीत जन्माला आलो असताना गुलामाचे जगणे सोडून द्यावे असे प्रतिपादन यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी केले.
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा राजकीय पक्षांशी काहीएक संबंध नसून राजकीय नेतृत्व घडवण्यासाठी व ती मजबूत करण्यासाठी यशवंत युवा सेना ही क्रांतीकारी संघटना कार्य करतेय असे स्व.बी.के.कोकरे साहेबांतचे वारसदार मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत युवा सेना प्रमुख कोकरे साहेब होते तर यशवंत युवा सेना नेपतगाव या शाखेचे उद्घाटन टिंग्या फेम शरद गोयेकर, प्रा.सचिन होनमाने सर,निवांत कोळेकर सर, मा.तानाजी खरात साहेब तसेच अन्य प्रमुख पाहुणे व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Saturday, 27 May 2017

अहिल्या शिक्षण मंडळात भोंगळ कारभार

समाजातील विद्यार्थीनींची शिक्षणाबाबतची गैरसोय होऊ नये त्याचप्रमाणे स्पर्धात्मक परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी यासाठी पुणे येथिल पंढरी असलेली अहिल्या शिक्षण संस्था ज्या हेतूने स्थापण करण्यात आली तो हेतू धनगर समाजातील काही नालायक नेत्यांच्या भ्रष्टपणामुळे लालसीपणामुळे कुठेतरी लोप पावतोय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. पुणे येथील अहिल्या शिक्षण संस्थेत जो काही प्रकार चालू आहे तो धनगर समाजाला लाजवणारा असून ज्यांच्या बापजाद्यांनी सरकारी खात्याच्या जमिनीवर ही अहिल्या शिक्षण संस्था उभी केली त्या स्व.शिवाजीराव शेंडगे यांचे वारसदार सुरेश शेंडगे यांनी त्यावरती मालकी हक्क दाखवून अहिल्या शिक्षण संस्थेची जागा व इमारत बळकावण्याचा घाणेरडा प्रकार केलेला आहे याकडे धनगर समाजातील संघटनांचे दुर्लक्ष झाले आहे हे एक दुर्दैवच म्हणावे लागेल. धनगर समाजातील मेंढपाळांची मुले उच्चशिक्षणासाठी पुणे येथे आल्यानंतर त्यांच्या राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शासकीय मालकीच्या जागेवर अहिल्या शिक्षण मंडळाची वास्तू उभी राहिली व त्याचा लाभ मेंढपाळांच्या मुला-मुलींना होत होता परंतु स्व.शिवाजीराव शेंडगे यांच्या पाश्चात्य त्यांचे वारसदार सुरेश शेंडगे व सचिव कुंडलिक वळकुंदे यांनी मनमानी कारभार करून धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेले वसतिगृह व वसतिगृहाच्या खालील असलेले पार्किंग (वाहनतळ) बंद करून तेथे स्वताच्या नावाने सुरेश शेंडगे अभ्यासिका चालू केलेली आहे.
एवढेच नव्हे तर अहिल्या शिक्षण मंडळ पुणे येथिल वसतिगृहाची काही इमारत ही आयसीआयसीआय बॅंकेस व एका शोरूमसाठी भाड्याने देण्यात आली असून धनगर समाजातील विद्यार्थ्यांवर टांगती तलवार आली आहे. पुर्वी जवळजवळ १००० विद्यार्थी या अहिल्या शिक्षण मंडळ पुणे येथे प्रवेश घेत होते पण आयसीआयसीआय बॅंक व शोरूम साठी जागा भाड्याने दिल्याने आता फक्त ५००-७०० विद्यार्थी येथे वास्तव्यास आहेत. पैशांच्या लालसेपोटी या महाभागांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून १००० रू प्रति महिना शुल्क आकारला आहे. म्हणजेच एका विद्यार्थ्यांपाठीमागे प्रत्येक महिन्याला १००० ₹ तर ५०० विद्यार्थ्यांचे ५ लाख रूपये होतात तसेच आयसीआयसीआय बॅंक व शोरूमचे प्रत्येक महिन्याला अंदाजे ४०-५० हजार रूपये सुरेश शेंडगे यांच्या खिशात जातात याची चौकशी आजपर्यंत कोणीच केली नाही. सुरेश शेंडगे व कुंडलिक वळकुंदे यांच्या या मनमानी कारभाराबद्दल जर कोणी आवाज उठवला तर स्थानिक गुंड पाठवून त्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे घाणेरडे प्रकार केलेले आहेत शिवाय ज्यांनी ज्यांनी या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला त्या त्या विद्यार्थ्यांना १०-१५ हजार रूपये देऊन मॅनेज करणे अथवा आवाज उठवणाऱ्यांना मोफत प्रवेश देऊन प्रकरण थांवण्याचा प्रकार अहिल्या शिक्षण संस्था पुणे येथे घडत असल्याने त्याचा परिणाम नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. शिवाय सुरेश शेंडगे आणि त्यांचे इतर सर्व बंधू हे दलबदलू अाहेत व विविध पक्षाचे लागेबंध असल्याने त्यांच्यावर कोणाचेही बर्डन अर्थातच दबाव नाही त्यामुळेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
सुरक्षेच्या नावाखाली महिलांना संस्थेत घेऊन तर नविनच षड्यंत्र शेंडगे यांनी रचले असून या नेत्यांच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त झालेला एखादा नविन विद्यार्थी जर संस्थेतील कमीटीवरती कार्यवाही करण्यासाठी तक्रार देत असेल तर त्या विद्यार्थ्याला विनयभंगाच्या कायद्यात अडकवण्याचेही घाणेरडे राजकारण अहिल्या शिक्षण संस्था पुणेचे सुरेश शेंडगे आणि त्यांचे सहकारी करत आहेत त्यासाठी त्यांनी पवार या महिलेला पुढे करून विद्यार्थ्यांना अडकवण्याचे घाणेरडे प्रकार केलेले आहेत. जर कोणी नविन विद्यार्थी प्रवेश घ्यायला या संस्थेत गेले तर त्यांना पवार नावाची महिला ही *धनगर* ऐवजी एन टी सी च्या जागा संपल्या आहेत असे सांगून दमदाटी करत असते त्या पवार नावाच्या बाईला धनगर म्हणायची खरंतर लाज वाटतेय की काय कोणास ठाऊक?? कारण संस्था ही फक्त धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी असताना एन टी सी चा संबंधच काय? जर कोणी विद्यार्थी वरचडपणा करत असेल तर त्याने विनयभंग केल्याचे स्वःताच सांगते व खालच्या पातळीचे शब्द वापरून विद्यार्थ्यांना त्रास देत असते याची खरोखर त्या महिलेऐवजी विद्यार्थ्यांनाच लाज वाटते. तिथे महिला असल्या कारणाने तेथिल विद्यार्थी काहीच न बोलता हतबल होऊन जातात हे कुठेतरी थांबायला हवे यासाठी सर्व सामाजिक संघटनांनी अशा पैशासाठी हपापलेल्या धनसंपती पिपासू लोकांना धडा शिकवावा व समाजातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. २०१६ मध्ये शनिवार वाडा येथे कार्यक्रमानिमीत्त मा.प्रकाश शेंडगे यांना विद्यार्थ्यांनी गेहराव घालून या प्रकाराबाबतचा जाब विचारला असता स्व.शिवाजीराव शेंडगे यांनी उभा केलेल्या अहिल्या शिक्षण मंडळाशी माझा काहीही संबंध नाही असे सांगून दाखवायचे दात वेगळेच असल्याचा आव आणला पण त्या सर्वांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे मात्र समाजबांधवांनी चांगलेच ओळखले आहे. समाजहिताचा वसा घेऊन आज प्रत्येकजन समाजासाठी संघर्ष करतोय लढतोय झगडतोय पण आपल्यातल्याच औलादी समाजातील विद्यार्थ्यांसोबत असे वागत असतील तर समाजबांधवांनी त्यांना डोक्यावर घेण्याऐवजी पायाखाली घ्यायला पाहिजे. अहिल्या शिक्षण मंडळ पुणे असे या संस्थेला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांचे नाव दिले असताना त्यांचेच वारसदार महिलेचा वापर करून विनयभंगाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करतात याची खरंतर त्या संबंधितांना लाज वाटायला हवी. काही दिवसांपूर्वीच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कार्यवाही करण्यासाठी आवाज उठवला त्यांना अभ्यासिकेतून काढून टाकण्याचे षड्यंत्र रचून नोटीस काढली होती पण कोणत्याही दिवसाची अथवा वेळेची मर्यादा किंवा अंतिम दिनांक दिली गेली नसताना परवा दोन दिवसांपूर्वीच त्या त्या विद्यार्थ्यांच्या खोल्या लाॅक करून त्यांना सील करण्यात आले आहे. तेथिल विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे तसेच दैनंदिन जीवनातील वापरात असलेले सर्व सामान हे लाॅक केले असल्याने विद्यार्थ्यांना पुणे सारख्या ठिकाणी उघड्यावर रहावे लागत आहे याची दखल समाजातील नेत्यांनी घ्यायला हवी त्याचबरोबर बापजाद्यांच्या नावावर मालकी हक्क दाखवणारी व्यवस्था बाजूला सारून अहिल्या शिक्षण प्रसारक मंडळावर प्रशासक नेमायला हवेत. समाजातील निर्दयी व्यक्तींनी केलेला हा किती भयानक प्रकार पाहायला भेटतोय हे पाहून तळपायाची आग पार मस्तकापर्यंत जाते आहे. सर्व समाजबांधवांनी कृपया अशा घटनेचा व त्या संबंधित व्यक्तींचा निषेध करायला हवा त्याचबरोबर खालील संपर्क क्रमांवरती फोन करून त्या संबंधितांना या प्रकरणाचा जाब विचारावा ही विनंती.
सुरेश शेंडगे - 9867423333
कुंडलिक वळकुंदे - 9822187596

जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday, 26 May 2017

आज वाढदिवस कोकरे साहेबांचा

  स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचा वारसा जोपासणारे त्यांच्याच विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे निर्भिड आणि निडर लढाऊ नेतृत्व यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेकजी कोकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा.
खरंतर २६ मे हा दिवस खरोखरच सुवर्णाक्षरात कोरून ठेवण्यासारखा आहे कारण याच दिवशी भारताच्या इतिहासात आठराव्या शतकात होळकरशाहीची स्थापना झाली होती. त्यामुळे २६ मे या दिवसाला अनन्य साधाराण महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्यातील तमाम युवकांचे प्रेरणास्थान म्हणून राज्यभर ज्यांचा नावलौकिक आहे असे सुप्रसिद्ध व्याख्याते आणि परखड वक्ते म्हणून त्यांची समाजात आज ओळख आहे. लहानपणापासूनच वक्तृत्वाची आवड असलेल्या कोकरे साहेबांच्या अंगी नेतृत्व गुण कसे काय विकसित होऊ लागले नाही हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. त्यांच्या अंगी असलेल्या नेतृत्वामुळे व निस्वार्थीपणाने समाजकार्य करण्याच्या त्यांच्या या प्रवृत्तीमुळे १९ जून २०१६ रोजी सांगोला जि.सोलापूर येथे यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी सामाजिक संघटनेची स्थापना करून संघटनेच्यावतीने प्रमुखपदाची धूरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली. धनगर समाजाचे क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब यांचे राहीलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा करारी बाणा, महाराजाधिराज छत्रपती यशवंतराव होळकर यांची दुरदृष्टी डोळ्यासमोर ठेऊन व अहिल्याचरणी नतमस्तक होऊन आणि भंडारा उधळून समाजाला  न्याय व हक्क मिळवून देण्यासाठीच माझा जन्म झाला आहे असे छातीठोकपणे सांगून यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे प्रमुख पद मा.विवेकजी कोकरे साहेब स्वीकारले.
आज महाराष्ट्र राज्यभर राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या जयंतीनिमीत्त समाजाचे प्रबोधन करण्यासाठी जणू काय त्यांनी विडा उतलेला आहे की काय हे कोणास ठाऊक... आपल्या व्याख्यानातून भाषणातून समाजबांधवांना मंत्रमुग्ध करून टाकणारी विवेक कोकरे साहेबांची भाषणं ऐकली तर आजही अंगावर शहारे येतात आणि खरं सांगायचं म्हणजे स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या आडनावांचा सांधर्म्य म्हणावा की योगायोग हे मला माहित पण जेव्हा जेव्हा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब जाहीर स्टेजवरून बोलायला लागतात तेव्हा ते शब्द स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या मुखातून पडत आहेत की काय असाच काही भास होतो. अर्थातच यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या रूपात आम्ही स्व.बी.के.कोकरे साहेबांना पाहतो.त्यांच्या या वक्तृत्वाने आणि नेतृत्वाने प्रेरित होऊन हजारो समाजबांधव युवा वर्ग उत्स्फूर्तपणे यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी संघटनेचे भागीदार होत आहेत. आज यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेला यशवंत मावळ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून धनगर समाजाला एका छत्रीखाली आणण्याचे स्व.बी.के.कोकरे साहेबांचे स्वप्न त्यांच्याच विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेबच पूर्ण करणार हे ही तितकेच सत्य आहे. यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांचे नेतृत्व नेहमीच समाजाच्या न्याय व हक्कासाठी कामी येवो व त्यांच्या हातून असेच निस्वार्थीपणाने अखंड आणि अविरत समाजकार्य घडो हीच त्यांच्यावाढदिवसानिमीत्त मल्हारचरणी छोटीशी प्रार्थना.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Sunday, 14 May 2017

धनगर समाजाचे उपकार नेत्यांनी विसरू नयेत

धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालो असे जाहीर वक्तव्य स्वता देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणातून करतात कदाचित फसणवीसांची धनगर समाजाला फसवण्याची ही वेगळीच खेळी असू शकते. पण खैर त्याच सत्ताधारी पक्षामध्ये ना.प्रा.राम शिंदे साहेब आणि ना.महादेव जानकर साहेब हे कॅबिनेट मंत्री आहेत ते फक्त आणि फक्त माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजामुळे आहेत हे विसरून चालणार नाही. *धनगर समाजामुळे मी मंत्री झालो नाही* हे मंत्री महोदय ना.जानकर साहेबांनी जे विधान केले ते त्यावरती गेल्या आठवड्यापासून उलट सुलट चर्चा ऐकायला भेटतात परंतु हे समाजाच्या भावना दुखावणारे विधान ना.जानकर साहेबांना भविष्यात महागात पडू शकते यात काही शंकाच नाही. ना.जानकर साहेबांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी हे विधान केले असेल ते त्यांच्या परीने योग्य आहे कारण एकट्या धनगर समाजाच्या जोरावर पक्ष चालवणे हे शक्य नाही.  त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे आणि जानकर साहेब हे बहुजनांचे नेते आहेत ते एकट्या धनगर समाजाचे नेते नाहीत. म्हणून त्यांनी केलेल्या विधानाकडे राजकीय वर्तुळातून पाहिल्यास काहीच गैर नाही पण सामाजिक वर्तुळातून त्याकडे जर कटाक्ष टाकला तर ते विधान माझ्या धनगर समाजाच्या जिव्हारी लागल्याशिवाय राहणार नाही.
१९९३ नंतर जेव्हा स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या यशवंत सेनेचा सरसेनापती होण्यासाठी मुलाखती घेतल्या गेल्या तेव्हा जानकर साहेबांना सरसेनापती घोषित करण्यात आले त्यानंतर सामाजिक चळवळीत झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांनी संघटनेच्या प्रचार व प्रसारासाठी निधी उभा केला तो केवळ धनगर समाजामुळेच... यशवंत सेना गावागावत वाडीवस्तीवर पोहचली होती ती केवळ धनगर समाजामुळेच... आटपाडीमधील कार्यकर्त्यांनी विटा.ता.खानापूर जि.सांगली येथे यशवंत सेना सरसेनापती जानकर साहेब यांना स्काॅर्पियो प्रदान करण्यात आली होती ती केवळ धनगर समाजबांधवांनी दिलेल्या निधीमुळेच... २००३ साली त्याच यशवंत सेनेचे राष्ट्रीय समाज पक्षात विलीनीकरण केले गेले तेव्हा राज्यभर आणि महाराष्ट्र राज्याबाहेर जानकर साहेब दौरे करायचे ते ही धनगर समाजातील समाजबांधवांनी पेट्रोलसाठी स्वताच्या खिशातून शंभर-दोनशे रूपये दिल्यामुळेच... जोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाने बाळसे धरले नव्हते तोपर्यंत धनगर समाजातील कार्यकर्त्यांनीच स्वताच्या खिशाला झळ लावली, ऐन दुष्काळात जनावरांसाठी छावण्या असताना देखिल आपलाच माणुस म्हणून जानकर साहेबांना दौऱ्यासाठी पेट्रोलसाठी खिसे रिकामे केले आणि जानकर साहेब राज्यभर नव्हे तर अखंड देशभर पक्षाचा प्रचार व प्रसार करू लागले तेही धनगर समाजामुळेच... जसजसा पक्ष वाढला तसतशी राजकारणाची हुकी आलेले धनगर व धनगरेतर बलाढ्य, धनाढ्य नेते पक्षप्रवेश करून पक्षाला पैसा पुरवू लागले तेव्हा आजपर्यंत यशवंत सेनेसाठी आणि राष्ट्रीय समाज पक्षासाठी झिजलेले हाडामांसाचे धनगर समाजातील कार्यकर्ते हळूहळू बाजूला होत गेले व इतर समाजातील धनाढ्य बलाढ्य पैसेवाले राजकीय नेते जानकर साहेबांच्या जवळ जाऊ लागले मागेपुढे करू लागले त्यातूनच बहुजनांचा पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष अशी ओळख आम्हीच म्हणजे धनगर समाजातील कार्यकर्ते सांगू लागलो.
आज राष्ट्रीय समाज पक्ष लहानाचा मोठा झाला, हाडामांसाचे चळवळीत झिजलेले कार्यकर्ते पैशाने गरीब असल्याने आपोआप बाजूला वळचणीला पडले ते फक्त झेंडे वागवण्यासाठीच... पण झेंडा खाली तरी कसा टाकणार कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे झाड हे खडकावर लावल्याने फळे उशिरा येतील पण ज्यांना लवकर फळे चाखायची असतील ते पक्षातून बाहेर पडतील असा समज राष्ट्रीय समाज पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आहे पण २० फेब्रुवारी २०१३ रोजीचा कटगुण जि.सातारा येथील (कार्यक्रमास मी स्वता उपस्थित होतो) तो प्रसंग आठवला तर मला तो 'लवकर अथवा उशिरा फळांबाबतचा' जो समज आहे असे काही वाटतच नाही. कारण ज्या पश्चिम महाराष्ट्र राज्यातून यशवंत सेना व तद्नंतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या चळवळीचा जन्म झाला त्या पश्चिम महाराष्ट्रातून सर्वप्रथमता निधी जमा करून जानकर साहेबांना गाडी प्रदान केली त्याच पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजाला गाडी (एसटी) गेल्यावर गाडीला हात करायची सवय आहे या जानकर साहेबांच्या वक्तव्यानेच मला हैरान केले होते कारण गाडी (एस टी) आल्यानंतर सर्वात पहिले तिकीट काढलेला पश्चिम महाराष्ट्रातील माझा भोळा भाबडा धनगर समाज सढळ हातानेच पक्षासाठी खिशातून पैसा काढत होता. मग आजपर्यंत चळवळीत संघटनेसाठी आणि पक्षासाठी झिजलेल्या कार्यकर्त्यांची काय किंमत राहिली?? असो... हा लेख त्यांना विरोध करण्यासाठी अथवा समर्थन करण्यासाठी नसून वस्तुस्थिती सांगण्यासाठी आहे कोणीही वाईट घेऊ नये.
पण गेल्यावर्षी एका ठुकार पत्रकाराने बातमी दिली की जानकर साहेब म्हणताहेत "धनगर समाजाने मला फसवले" या बातमी नंतर आम्ही त्या ठुकार पत्रकाराचा चांगलाच समाचार घेतला होता, भगवानगडावरील पवारांच्या विरोधातील वक्तव्यांने अख्खा महाराष्ट्र उलट सुलट चर्चा करत असताना जानकर साहेबांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय असे ब्लाॅगच्या माध्यमातून जानकर साहेबांवर केलेले आरोप आम्ही खोडून काढले http://nitinrajeanuse.blogspot.in/2016/10/blog-post.html?m=1 महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाज तेव्हा जानकर साहेबांचे समर्थन करत होता. जेव्हा जेव्हा धनगर समाजाचे नाव पुढे करून जानकर साहेबांना अडवण्याचे घाणेरडे राजकारण केले जायचे तेव्हा दुसरे कोणी नव्हे तर धनगर समाजातील कार्यकर्ते आपापल्या परीने लढायचे आणि आजही लढताहेत. १५ जुलै ते २१ जुलै २०१४ आरक्षण दींडी निघाल्यानंतर आमरण उपोषण सोडण्याच्या दिवशी स्वता देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेट मध्ये धनगर जमातीला आरक्षण देणार असल्याचे कबुल केले तेव्हा आरक्षण दिंडी मध्ये स्वता जानकर साहेब देखिल सामिल झाले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाने एकगठ्ठा मतदान धनगर समाजातील नेत्यांमुळेच भाजपाच्या पारड्यात टाकले आणि भाजपला सत्तेवर आणले. भाजपासोबत युती झाली असल्याने व धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते शिवाय धनगर समाजाला दोन कॅबिनेट मंत्री पद द्यायची बोलणी देखिल झाली असल्याने त्यानुषंगाने भाजपचेच विधानसभा सदस्य ना.प्रा.राम शिंदे हे गृहराज्य मंत्री असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष असलेल्या जानकर साहेबांना कॅबिनेट मंत्री पद देणे उचित वाटत नव्हते. म्हणून प्रथमता ना.प्रा.राम शिंदे साहेब यांना कॅबिनेट मंत्री व तद्नंतर ना.महादेवजी जानकर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. हे सर्व झाले ते फक्त धनगर समाजामुळेच झाले कारण भाजप सरकारला आणि परिणामी आघाडी सरकारला देखिल कळून चुकले होते की धनगर समाज मनात आणलं तर काय करू शकतो आणि काय नाही... त्यामुळे धनगर समाजामुळे मी मंत्री झालो नाही हे विधान सामाजिक वर्तुळातून समाजाच्या भावना दुखावणारे आहे.
काहीजण म्हणाले की जर शरद पवार यांनी असे मराठा समाजाबद्दल वक्तव्य केले असते तर मराठा समाजबांधवांनी अभिमानाने सांगितले असते की आमचा नेता अठरा पगड जातीला सोबत घेऊन जातो पण हे नुसतेच बोलून नव्हे तर कृतीतून दाखवून द्यायचे असते. शरद पवारांनी बहुजनांच्या नावाखाली सत्ता गाजवली पण कामं फक्त त्यांच्याच जातीतील पाहुण्याराऊळ्यांचीच केली. त्यांनी आपापली आणि आपापल्या बगलबच्च्यांची घरे भरली आहेत आणि त्यांचे बगलबच्चे देखिल तीच पवार नीती वापरत आहेत म्हणून त्यांना फरक पडत नाही तर फरक पडतो तो आपल्या शेळ्या-मेंढ्या राखून पायाच्या नडग्या वाळवणाऱ्या माझ्या वडिलधारांना मेंढपाळांना... ज्यांनी ऊन वारा पावसाचा विचार न करता पै पै कमवली होती ती चळवळीसाठी पक्षासाठी दिली... फरक पडतो त्या हाडामांसाच्या कार्यकर्त्यांना ज्यांनी काॅलेज शाळा बुडवून  पक्षाचा प्रचार प्रसार केला जे आज बेरोजगारीच्या नावखाली सडत पडलेले दिसतात.... फरक पडतो त्या तरूणांना जे पक्षाच्या प्रचार व प्रसारासाठी नोकरीवर टांगती तलवार ठेवून घरादाराचा विचार न करता पक्षासाठी रस्त्यावर उतरतात... राजकारण हे नेहमीच राजकारणाच्या पद्धतीनेच चालावे व समाजकारण हे समाजकारणाच्याच पद्धतीने... पण जर राजकारण करत असताना समाजबांधवांच्या भावना समजून घेणे फार महत्वाचे असते. ना.जानकर साहेबांच्या या वक्तव्याचे समर्थन करताना आणि या वक्तव्याचा विरोध करताना दोन्हीकडील कार्यकर्ते कोणत्या थराला जाऊन समर्थन करत आहेत याचे भान त्यांना राहत नाही म्हणून मला थोडंफार लिहावसं वाटलं.
खरंतर कोणीही या बाबतीत गैरसमज करून घेऊन नये कारण सांगायची वस्तुस्थिती अशी की नेता अथवा मंत्री मग तिथे कोणीही असो ज्या समाजात तो जन्माला आला आहे त्या समाजाशी त्याची नाळ जोडलेली असते हे सर्वज्ञात असतेच पण उगाचच केवळ राजकारणासाठी मी या समाजामुळे मंत्री झालो नाही त्या समाजामुळे झालो नाही असे जाहीर वक्तव्य करू नये. अशा वक्तव्यातून तुम्हाला इथपर्यंत पोहचवणाऱ्या माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाच्या भावना दुखवू नयेत अन्यथा हा भोळा भाबडा धनगर समाज जवळ यायच्या ऐवजी तुमच्यापासून खूप  दूर जाईल अर्थातच हा समाज पुन्हा जर का अंधकारात ढकलला गेला तर या समाजाला पुन्हा प्रकाशात यायला फार काळ लागेल.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

https://m.facebook.com/nitinrajeanuse123/