Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday, 2 June 2015

नाराज झालाय माझा कामगार बांधव...
आज माणगंगा सहकारी सागर कारखाना लि सोनारसिद्धनगर आटपाडी येथील मतमोजणी पार पडली व शेवटी हापाहापाचा माल गपापाला अशीच अवस्था झाली. विजय जरी घराणेशाहीचा झाला असला तरी सभासदांचा व स्वाभिमानी शेतकर्यांचा पुन्हा एकदा विश्वासघात झाला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. ज्या कामगारांचा पगार गेल्या २९ महिन्यापासून दिला नाही तो कामगार वर्ग मात्र दुखी आहे नाराज आहे कारण मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी पैनल लावताच त्या सर्व कामगारांचा ३ महिन्याचा पगार एकदम दिला. पडळकर साहेबांनी परिवर्तन पैनल लावल्याने कामगार वर्ग खूश होता पण राजेंद्र देशमुख यांच्या संस्थेतील लाचार/गुलाम बुद्धिजीवी वर्गामुळे माणगंगा सहकारी साखर कारखान्यातील गोरगरीब कामगारांच्या आनंदावरती जणू काय विरझन पडले. त्याच कामगारांच्या खाते उतार्यावरती सव्वासे कोटींचे कर्ज काढून स्वतःच्या घशात घालणार्या राजेंद्र देशमुख यांना त्या गोरगरीब कामगारांच्या भावना कधी समजणार?? सदरच्या साखर कारखान्याची डागडुजी करण्यात आली पण ज्या मशनरी कारखान्यात बसवल्या आहेत त्या जुन्या  कारखान्याच्या असून ३०रु किलो वजनाने विकत घेतलेल्या आहेत आणि कारखान्यात नवीन मशनरी बसवल्याचा दावा करुन करोडो रूपये घशात घालण्याचा काळाबाजार उघड्या डोळ्यांनी पाहवत नाही, आज १००/२०० रुपयासाठी  लाचार झालेल्या सभासदांनी कामगारांस तसेच सांगोला, आटपाडी आणि माण या तालुक्यातील ऊस उत्पादकांना योग्य न्याय दिला नाही. खरंतर निष्ठूर आणि निर्दयी लोक माझ्या गोरगरीब शेतकर्यांच्या आणि कामगारांच्या भावना काय समजणार??? आज राजेंद्र देशमुख यांच्या पैनल चे उमेद्वार विजयी झाले असले तरी त्यांनी कधी शेतामध्ये ऊस लावला आहे का?? शेतीला पाणी देताना काय अडचणी येतात ते या उमेद्वारांना कधी माहीतच नाही. खरंतर राजेंद्र देशमुख यांच्या संस्थेत काम करणारा वर्ग हा बुद्धिजीवी वर्ग असला तरी एका ट्रैक्टर ड्राइवर च्या ईशार्यावरती नाचन्याची कला त्यांच्या अंगी चांगलीच उतरली असून त्याच राजेंद्र देशमुख यांच्या  संस्थेत नोकरी मिळावी म्हणून १०-२० लाख रूपये देवून ते बुद्धिजीवी (बुद्धिजीवी कसले हे स्वतःची बुद्धि दुसर्यांच्या बुटाखाली गहाण टाकणारे) लोक लोकांनी मान्य केलेल्या संस्थेत नोकरी करतात. या संस्था आणि कारखाने काय त्या देशमुखाच्या बापाची जहागिरदारी नव्हे..
श्रीमंत भवानराव पंत यांनी बक्षिसपत्र दिलेल्या जमिनीवरती ही संस्था ऊभी झाली ती पण लोकवर्गणीतून आणि कष्टातून...
खरंतर अन्यायाच्या विरोधात वाचा फोडायला हवी असं आम्हाला  शाळेत शिकवलं जातं पण याच संस्थेतील  शिक्षकांनी चक्क अन्याय करणार्या अपराध्याला सहाय्य करणे कितपत योग्य वाटते?? त्यांच्याच संस्थेतील काही लोक मला बोलले की देशमुखाच्या संस्थेत एक मजबूरी म्हणून आम्ही काम करतोय. एखादा अपवाद वगळला तर आज थकल्या भागलेल्या माझ्या गोरगरीब कामगार बांधव आणि ऊस ऊत्पादक बांधव यांच्यावर वेळोवेळी अन्याय करणारे जल्लाद म्हणजे राजेंद्र देशमुख यांच्या ताटाखालचे मांजर बनून राहिलेला लाचार आणि स्वार्थी वर्ग.
हाडाची काडं करून कारखान्यात काम करणार्या माझ्या बांधवांवर आज कुर्हाड कोसळली आहे आता राहिलेल्या २६ महिन्याच्या पगाराची आशाच गोरगरीब कामगारांनी सोडून दिली आहे. पैशाच्या लालसेपोठी दीनदुभळ्या आणि दुष्काळाच्या खाईत होरपळलेल्या सभासदांना आणि मतदार बांधवांना खरेदी करणार्याचा घाणेरडा प्रकार जिथं चालतो मग याला काय लोकशाही म्हणायचं का?? राजेंद्र देशमुखाने कारखाना लुटून दुष्काळात संस्था चालवल्या असतील त्यामुळेच कारखान्यावर सव्वासे कोटी रुपयांचे कर्ज झाले. त्या राजेंद्र देशमुखाने टाकलेल्या तुकड्यावर पळणार्या आणि छौ म्हणले की भुंकणार्या कुत्र्यांना राजकारण काय असते आणि कशासाठी केले जाते याची जाणीव त्यांना मुळीच नाहीये.
आज जरी पडळकर साहेबांच्या परिवर्तन पैनल चा पराभव झाला असला तरी ३ महिन्याचा पगार मिळाल्यामुळं कामगार बांधवांच्या चेहर्यावरती जे समाधान दिसलं त्यातच आमचा खरा विजय आहे.
     
       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

No comments:

Post a Comment