Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Monday, 12 October 2015

धनगर समाजाचे नेतृत्व दिशाहीन...


एकेकाळी राजा समाज असणारी आमची जमात आज दिशा नसल्यामुळे भरकटलेली दिसते आहे. अंधार्या रात्री अथांग समुद्रात भरकटलेल्या नौकेसारखी अवस्था माझ्या धनगर समाजाची झाली आहे. प्रस्तापितांची चमचेगीरी अन् गुलामगीरी करण्यात धनगर नेते मग्न आहेत, त्या प्रस्तापित नेत्यांची धोतरं सांभाळायला त्यांनी समाज गहाण ठेवला आहे असे म्हणायला मला काही वावगं वाटत नाही.
अरे कमीत कमी आपल्या धनगर समाजातील महापुरुषांचा इतिहास तरी आठवायला पाहिजे. सामर्थ्यशाली अन् शक्तीशाली भारताचे स्वप्न पाहणारे आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, आशिया खंडावर प्रभुत्व गाजवणारे राजा सम्राट अशोक, अटकेपार झेंडे फडकवणारे राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी राजमाता महाराणी अहिल्यामाई होळकर, जगातला दुसरा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ज्यांना ओळखले जाते असे महाराजाधिराज शुरवीर लढवय्ये राजे यशवंतराव होळकर ज्यांनी इंग्रज अधिकार्यांना अगदी तलवारीने कापून काढून कधीही न हारता एकूण १८ लढाया जिंकल्या, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारी वीरांगणा भिमाई अशा एक ना अनेक लढवय्यांच्या, शुरवीरांच्या जातीत जन्माला आलेल्या तुम्ही आम्ही औलादी आज हक्क मागतोय की भिक मागतोय तेच समजत नाही.
यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे साहेबांनी जी क्रांतीवरी चळवळ उभा केली होती तेव्हा धनगर समाजासाठी स्व बी के कोकरे साहेब एक दिशादर्शक आणि खरे मार्गदर्शक होते. त्यांच्या पाश्चात्य धनगर समाजाला दिशा देणारं एकही नेतृत्व समोर आल्याचे दिसत नाही. म्हणूनच मा.गोपीचंद पडळकर साहेब त्यांच्या भाषणातून नेहमीच सांगतात की कोणत्या नेत्याचे अथवा देवाचे फोटो भिंतीवरती लावण्यापेक्षा स्व बी के कोकरे साहेबांचे फोटो आपापल्या घरात लावा कारण त्या माणसानं धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाव्यात म्हणून घरादाराचा विचार न करता अफाट संघर्ष केला होता. खंबाटकीच्या घाटात लाखो यशवंत सैनिकांना सोबत घेऊन तीव्र रास्तारोखो केला होता तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री पवारांनी दखल घेतली पण धनगर समाजातील धनडांडग्या नेत्यांना जवळ करुन पवारांनी एस.टी ऐवजी एन.टी मध्ये टाकले. आज धनगर समाज जो एन.टी. च्या सवलती घेतोय त्याच्यापाठीमागे स्व.बी.के. कोकरे साहेबांचा संघर्ष आहे. खरंतर मागणी अनुसुचित जमातीची होती पण पवारांनी ज्या ज्या नेत्यांना जवळ करुन स्व बी के कोकरेंची राजकीय हत्या केली त्यावेळी पवारांच्या मागे-पुढे घुटमळणार्या धनगर समाजाच्या दलालांनी अनुसुचित जमातीबद्दल एक ब्र सुद्धा काढला नाही. जर त्या धनगर नेत्यांनी स्व बी के कोकरे साहेबांना साथ दिली असती तर आज धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू करा अशी भीक मागायची वेळ आली नसती.
आज धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी धनगर समाजातील नेते (खरंतर प्रस्तापितांचे चमचे म्हटलं तरी हरकत नाही)  जो काही खटाटोप करताहेत त्याच्या पाठीमागे त्या त्या नेत्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य धनगर समाज जाणतोच आहे. तळागळातील गोरगरीब आणि सर्वसामान्य धनगर समाजाला न्याय व हक्क मिळावेत म्हणून बुद्धीजीवी वर्ग हाच समाजासाठी आई-बाप असणार आहे कारण नेत्यांवरचा विश्वास उडालेला असून उगाच नेत्यांनी जास्त खटाटोप करण्यात काही अर्थ नाही. जर नागपूर विधानभवनावर जर एकच मोर्चा निघाला तरच महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव नागपूर मध्ये मोर्चासाठी उपस्थित राहील अन्यथा जर वेगवेगळे मोर्चे निघाले तर महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांच्या भावना दुखावणार्या कोणत्याही नेत्यांच्या मोर्चामध्ये कोणीही सहभागी होणार नाही अशी भुमिका बुद्धीजीवी वर्गाची राहील. आणि यासाठी २० अॉक्टोबर पर्यंतची मुदत दोन्ही मोर्चे आयोजकांना राहील. एकच झेंडा एकच दिवस एकच मोर्चा आणि आरक्षण अंमलबजावणीची एकच मागणी जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू होण्याचा अद्यादेश निघत नाही तोपर्यंत माघार नाही असा जर अजेंडा घेऊन धनगर नेते एकत्रित आले तरच धनगर समाजाच्या संघर्षाला यश मिळेल आणि स्व बी के कोकरे साहेबांचे स्वप्न पुर्ण होईल. नाहीतर जोपर्यंत स्व बी के कोकरे साहेबांची विचारधारा या महाराष्ट्रातील तमाम युवकांच्या डोक्यात पेरली जात नाही तोपर्यंत धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढणारे हजारो बी के कोकरे तयार होणार नाहीत. ज्यादिवसी समाजातून हजारो बी के कोकरे पेटून उठतील आणि खरोखर त्यावेळी सवलती लागू करून अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र हासील करूनच शांत बसतील. त्यामुळे नेत्यांनी स्वताचे स्वार्थ, मोठेपण, आरक्षणासंदर्भातला श्रेयवाद तसेच गटतट, पक्ष संघटना बाजूला ठेऊन एकत्रित यावे. दि.२० अॉक्टोबर २०१५ पर्यंत दोन्ही मोर्चै आयोजकांनी एकत्रित यावे. तद्नंतर बुद्धीजीवी वर्ग जो निर्णय घेईल तो धनगर नेत्यांच्या भविष्याला धोका असेल आणि धनगर समाजाच्या हीताचा असेल. यासाठी धनगर समाजाला योग्य दिशा देण्याचे काम बुद्धीजीवी वर्ग प्रामाणिकपणाने करत असून समाजबांधवांचा विश्वास हा फक्त बुद्धीजीवी वर्गावर आहे हे नेत्यांनी विसरू नये. नाहीतर मग धनगर समाजाचं वाटोळं करायचा प्रयत्न कराल तर याद राखा आमच्यातला लढवय्या यशवंतराव होळकर आता जागा झाला आहे आणि आम्ही कदापी शांत बसणार नाही.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
             -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
........................................................

No comments:

Post a Comment