अज्ञानाचं घोंगडं पांघरुण निद्रावस्थेत गाढ झोपी गेलेल्या माझ्या धनगर समाजाला खरोखरंच आज प्रबोधनाची गरज आहे. ज्या प्रमाणे शेताची नांगरणी करून मशागत करून त्यामध्ये बियाणे पेरले जातात आणि त्याला वेळेवर खतपाणी घातले तरच पिक जोमाने वाढते आणि भरभरून उत्पन्न/धान्य मिळते. त्याचप्रमाणे आजच्या सनातन्यांच्या नादाला लागलेल्या, भोळ्या-भाबड्या आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या, प्रस्थापितांच्या अन्याय अत्याचाराखाली खचलेल्या पिचलेल्या माझ्या धनगर समाजबांधवांची सर्वप्रथमता डोकी नांगरून त्यामद्ये समाजहीताचे बियाणे (बीज) पेरले आणि समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराची जाणीव करून देत त्यास समाज प्रबोधनाचे खतपाणी घातले तर उद्या माझ्या याच समाजातून अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारे, समाजप्रबोधन करणारे लाखो धनगर समाजबांधव तयार होतील. तरच धनगर समाज हा प्रगतीपथावर मार्गक्रमण करेल. सत्ताकारणात, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये धनगर समाजाची पोरं चमकतील हे सांगायला कोणा विद्वानाची गरज नसावी. म्हणूनच समाजहीताचे विचार पेरत चला त्यातून समाजहीताचेच विचार उगवतील. इतिहासाला साक्षी ठेवून आजच्या अंधकारातून, बिकट परिस्थितीतून वाट काढत निघालो तर उद्या नक्कीच आपण प्रकाशाकडे पोहचू...
जय मल्हार!! जय अहिल्या!! जय यशवंत!!
- नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+918530004123
nitinrajeanuse123.blogspot.com
No comments:
Post a Comment