Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday, 3 November 2015

धनगर नेत्यांचे भविष्य धोक्यात येणार...


गेल्या ६५ वर्षापासून माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजावर अन्याय होत आलेला आहे. भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या ३४२ कलम वरती महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्ठात अ.क्र.३६ वरती धनगड(धनगर), ओरॉन  असा उल्लेख करुन डॉ. बाबासाहेबांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत अगोदरच स्माविष्ट केलेले आहे. पण "धनगर" (Dhangar) या शब्दाचे चे हिंदी टायपींग "धनगड"(Dhangar) {जसे की उदा.१) एकरAcre चे हिंदीमध्ये एकड, २)गुरगाव Gurgaon चे गुडगाव, ३) रेवारी Rewari चे रेवाडी} त्याचप्रमाणे "धनगर" चे "धनगड" असे झाल्याने महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित रहावे लागले अर्थातच आमच्या अज्ञानपणामुळे आमच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे. एखाद्या समाजावरती विनाकारण अन्याय होत असेल तर संबंधितांवर देशद्रोहाचा खटला भरायला हवा.
आज महाराष्ट्र राज्यातील अल्पांशीच धनगर समाज सुज्ञ आणि सुशिक्षित झाल्याने आमची खरी मागणी काय आहे याचे भान समाजातील काही नेत्यांना व समाजबांधवांना नाहीये. आम्ही नवीन आरक्षण मागतोय किंवा आम्हाला सामाविष्ट करा ही आमची मागणी नाही तर राज्यघटनेत आम्हाला दिलेलं आमच्या हक्काचं अनुसुचित जमातीच्या आरक्षण आणि अनुसुचित जमातीच्या सवलती लवकरात लवकर लागू कराव्यात ही आमची मागणी आहे.

धनगर समाजातील नेत्यांचे भविष्य धोक्यात कसे काय येणार...????
तर दि ७ डिसेंबर २०१५ पासून नागपूर विधानभवनात हिवाळी अधिवेशनाची सुरवात होणार असून धनगर समाजातील नेत्यांनी नागपूर विधानभवनावर वेगवेगळे मोर्चे आयोजित कलेले आहेत. खरंतर सर्वांची मागणी एकच आहे मग मोर्चे वेगवेगळे का?? समाजबांधवांनी नक्की कोणत्या मोर्चात सहभागी व्हायचं?? का कोणत्याच मोर्चात सहभागी व्हायचं नाही. अशा संभ्रमावस्थेत असणार्या तळागळातील धनगर समाजबांधवांकडून मी प्रतिक्रीया मागून घेतल्या होत्या. राज्यभरातील सर्व जिल्ह्यातून दोन हजारपेक्षा जास्त प्रतिक्रीया मिळाल्या त्यान्वये त्याची टक्केवारी खालीलप्रमाणे
१) ९३.७५ %
समाजातील नेत्यांनी एकत्रित येवून चर्चा करावी. एकच दिवस व एकच तारीख निश्चित करून संघटितपणे मोर्चा काढला तरच आम्ही मोर्चात सहभागी होणार. अन्यथा कोणत्याही मोर्चात सहभागी होणार नाही. विचारवंत आणि समाजप्रबोधकांवर विश्वास असून बुद्धिजीवी वर्ग जो निर्णय घेईल त्यास सहमत असल्याचे समाजबांधवांनी आपापले मत स्पष्ट केले.

२) २.२५%
डॉ. विकास महात्मे सर यांनी अगोदर आयोजित केलेला  मोर्चा असून दि ८ डिसेंबर रोजीच्या मोर्चात सहभागी होणार. पण या २.२५% मधील बहुतांशी समाजबांधवांनी प्रतिक्रीया दीली की नेत्यांपेक्षा समाजप्रबोधकांवर विश्वास असून बुद्धिजीवी वर्ग जो निर्णय घेईल तसे आम्ही करु.

३) २ %
डॉ. महात्मे सर यांनी स्वताचेच नाव पुढे करून इतरांना काहीही न विचारता मोर्चाचा दिवस ठरवल्याने माजी आ.हरिदास भदे साहेब आणि सहकारी यांनी १० डिसेंबर चा मोर्चा आयोजित केला त्यामध्ये सहभागी होणार. या २ % मधीलसुद्धा अधिकतम समाजबांधवांनी नेत्यांपेक्षा समाजप्रबोधकांवर विश्वास असून बुद्धिजीवी वर्ग जो निर्णय घेईल तसे आम्ही करु असे मत स्पष्ट केले.
४) १.५० %
समाजबांधवांचा महाराष्ट्र राज्याच्या आरक्षण कृति समितीसोबत मोर्चात सहभागी व्हायला हवे असे सांगितले.
५)  .५०%
मोर्चा काढून आरक्षण मिळेल असे वाटत नाही तर त्यासाठी कोर्टाची लढाई लढावी लागेल.
सदरची टक्केवारी ही २१०० ते २२०० समाजबांधवांनी व्हाटसप, मेसेजेस त्याचप्रमाणे कॉल करुन दिलेल्या या प्रतीक्रीया आहेत.
समाजातील सर्वच नेते मला जवळचे आहेत त्यात कोणी आपला परका असा भेदभाव केला जाणार नाही पण कोणत्याही एखाद्या नेत्याच्या विरोधात अथवा टिकात्मक बोलून अथवा लिहून माझ्याच समाजात फूट पाडावी असं सर्व बुद्धिजीवी वर्गाचं उद्दीष्ट नाही तर राजकारण, आमदारक्या स्वार्थ, मोठेपणा आणि उफाळलेला आरक्षण संदर्भातला श्रेयवाद या गौन गोष्टी बाजूला ठेऊन कमित कमी आरक्षण या मुद्द्यावरती धनगर समाजातील नेत्यांनी एकत्रित यावे. अन्यथा वेगवेगळे मोर्चे जर नागपूर विधानभवनावर घेऊन जात असाल तर आपलंच हसू होईल. कारण आजचे ९३.७५% नव्हे तर उद्याचे ९६-९७ % समाजबांधव वेगवेगळ्या मोर्चात सहभागी होणार नाहीत.  जर मोर्चा सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांसोबत  चर्चा करून संघटितपणे मोर्चा आयोजित करून एकच दिवस निश्चित केला तर २५००००० पंचवीस लाखांच्या वरती समाजबांधव नागपूरला एकत्रित येवून प्रशासन तसेच विधानभवन हादरवून टाकतील एवढी ताकत आपल्या समाजबांधवांमध्ये आहे. २५००००० यापेक्षाही जास्त समाजबांधव नागपूरला एकत्रित आणायची जबाबदारी माझी राहील.
पण जर वेगवेगळे मोर्चे काढून राज्यभरातील फक्त हजार दीड हजारच समाजबांधव तुमच्यामागे आला तर २०१९च्या विधानसभा निवडणूकीत आपल्या समाजाचं तर सोडाच पण इतर समाजबांधवांकडे तुम्ही काय म्हणून मत मागायला जाणार?? तुमचाच समाजबांधव तुमच्या पाठीशी नाही राहिला तर मग काही इज्जत राहील का??? त्यासाठी एकत्रित येऊन योग्य विचारविनीमय करुन एकच मोर्चा एकाच आयोजित केला तर महाराष्ट्रातील धनगर समाज तुमच्यासोबत राहील अन्यथा धनगर समाजातील नेत्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येईल. याचा विचार सर्वांनी करायला हवा.
जय मौर्य!! जय मल्हार!! जय अहिल्या!!

           👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

No comments:

Post a Comment