धनगर सारा एक होऊ दे....
पुस्तकं वाचली तर मस्तकं सुधरतील आणि मस्तकं सुधरली तर क्रांती घडेल. पण आज एकविसाव्या शतकामध्ये पोट-जातींच्या विळख्यात अडकलेला धनगर समाज एकत्रित येऊन क्रांती घडवेल असे मला यथकिंचितही वाटत नाही. कारण पोटजातीमध्ये विखूरला गेलेला धनगर समाज कधीही यशाचे शिखर गाठू शकणार नाही त्यासाठी समाजातील पोट-जातींचे साखळदंड तोडावे लागतील. पोट-जातीच्या नावाखाली विखुरल्या गेलेल्या धनगर समाजाला एकत्रित केलं तर नक्कीच क्रांती घडेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज पडणार नाही. राजा महाराजांच्या, थोर महापुरूषांच्या समाजात जन्माला आलेली आम्ही माणसं आज पोट-जातींचा विचार करत बसल्याने इतर समाजापेक्षा ५०-६० वर्ष पाठीमागे आहोत हे नाईलाजानं सांगायची वेळ येतेय.
धनगर समाज ही आदिम जमात असून अश्मयुगीन कालखंडात मानवाने सुरवातीला शेळ्या-मेंढ्या राखायला सुरवात केली होती तद्नंतर जोड धंदा म्हणून शेती, शेतीसाठी/शिकारीसाठी लागणारी हत्यारे अवजारे बनवणे अशा प्रकारे व्यवसाय हळूहळू वाढत गेले मग कालांतराने शेळ्या-मेंढ्या राखणारे - धनगर, शेती करणारे -कुणबी, शेतीसाठी लाकडाची अवजारे बनवणारे -सुतार, लोखंडाची अवजारे बनवणारे -लोहार, मातीपासून भांडी बनवणारे -कुंभार, गाई-म्हैसी सांभाळून दुधाचा व्यवसाय करणारे -गवळी अशा एक ना अनेक प्रकारच्या व्यवसायानुरूप त्या त्या जाती तयार झाल्या आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचं विभाजन झालं.
आज एकविसाव्या शतकाचा जर विचार केला तर धनगर समाजातही पोट-जाती असल्याचे चित्र दिसून येते. एकाच रक्ताची अन् हाडामांसाची माणसं पोटजातीचा उदो उदो करत आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हेच सांगत सुटलेत पण नुकसान माझ्याच समाजाचं होतंय हे त्यांच्या ध्यानीमनी देखिल नाही. आजची प्रस्तापित व्यवस्था मुद्दामहून जाणूनबुजून धनगर समाजातील पोटजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय कारण पोटजातीमध्ये विखूरलेल्या धनगर समाजबांधवांची जर जनगनना झाली तर महाराष्ट्रच नव्हे तर भारतामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत एक नंबरची जमात ही धनगर जमात आहे हे सिद्ध होईल. आणि जर धनगर समाजाला आपली खरी ताकद कळली तर तर जगातील कोणतीही अशी व्यवस्था कोणतीही अशी शक्ती नाही की ती धनगर समाजाला अडवू शकेल.
धनगर समाजातील सुशिक्षित युवा वर्गानं गांभीर्यानं विचार-विनीमय करायला हवा. पोटजाती बाजूला ठेवून फक्त धनगर म्हणून जगायला शिकलो तर धनगर समाजातील मुलं-मुली आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगीरी बजावतील यात तीळमात्रही शंका नाही. रणरागीणी महाराणी अहिल्यामाई होळकर स्वताच्या मुलीचा विवाह इतर जातीमधील युवकाशी करून देतात, महाराजा यशवंतराव होळकर आणि कोल्हापुरचे राजे छत्रपति राजर्षी शाहू महाराज या दोन्ही घरचे नातेसंबंध जुळून येते तर मग आजचा धनगर समाज आपापल्याच पोट-जातीमध्येच का गुरफटून राहिलाय?? हा प्रश्न साहजिकच कोणाच्याही डोक्यात गोंधळ निर्माण करू शकतो. धनगर समाजात पोट-जातीच्या प्रथा पडल्याने समाजातील उच्चशिक्षित मुलामुलींना आपला जीवनसाथी निवडण्यासाठी कधीकदी इतर जाती-जमातींचा आधार घ्यावा लागतो हे एक फार मोठे सामाजिक नुकसान आहे. अशी कितीतरी उदाहरणे आहेत पण धनगर समाजातील रूळलेल्या पोटजातींचे दरवाजे जर खूले झाले तर मग आजच्या युवक-युवतींना इतर जातीमधील जीवनसाथी शोधण्याची गरज पडणार नाही.
यासाठी धनगर समाजातील युवकांनी समाजाच्या न्याय व हक्कासाठी आणि सामाजिक संतुलनासाठी पोटजाती बाजूला ठेवून एकत्रित येणं आवश्यक आहे. आजचा ज्वलंत प्रश्न आरक्षण अंमलबजावणीचा असो, अन्याय अत्याचाराचा असो अथवा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न किंवा विवाह बाबतीचा प्रश्न असो समाजबांधवांनी आणि समाजातील युवकांनी पोटजाती बाजूला ठेवुन एकत्रितपणे समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यावी.
जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत
आणि गुजरातपासून आसामपर्यंत,
सह्याद्रीच्या दरी-खोर्यांतून एकच नाद घुमू दे
प्रत्येकाच्या नसानसात ठसू दे
आणि धनगर सारा एक होऊ दे.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
- नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
पुस्तकं वाचली तर मस्तकं सुधरतील आणि मस्तकं सुधरली तर क्रांती घडेल. पण आज एकविसाव्या शतकामध्ये पोट-जातींच्या विळख्यात अडकलेला धनगर समाज एकत्रित येऊन क्रांती घडवेल असे मला यथकिंचितही वाटत नाही. कारण पोटजातीमध्ये विखूरला गेलेला धनगर समाज कधीही यशाचे शिखर गाठू शकणार नाही त्यासाठी समाजातील पोट-जातींचे साखळदंड तोडावे लागतील. पोट-जातीच्या नावाखाली विखुरल्या गेलेल्या धनगर समाजाला एकत्रित केलं तर नक्कीच क्रांती घडेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज पडणार नाही. राजा महाराजांच्या, थोर महापुरूषांच्या समाजात जन्माला आलेली आम्ही माणसं आज पोट-जातींचा विचार करत बसल्याने इतर समाजापेक्षा ५०-६० वर्ष पाठीमागे आहोत हे नाईलाजानं सांगायची वेळ येतेय.
धनगर समाज ही आदिम जमात असून अश्मयुगीन कालखंडात मानवाने सुरवातीला शेळ्या-मेंढ्या राखायला सुरवात केली होती तद्नंतर जोड धंदा म्हणून शेती, शेतीसाठी/शिकारीसाठी लागणारी हत्यारे अवजारे बनवणे अशा प्रकारे व्यवसाय हळूहळू वाढत गेले मग कालांतराने शेळ्या-मेंढ्या राखणारे - धनगर, शेती करणारे -कुणबी, शेतीसाठी लाकडाची अवजारे बनवणारे -सुतार, लोखंडाची अवजारे बनवणारे -लोहार, मातीपासून भांडी बनवणारे -कुंभार, गाई-म्हैसी सांभाळून दुधाचा व्यवसाय करणारे -गवळी अशा एक ना अनेक प्रकारच्या व्यवसायानुरूप त्या त्या जाती तयार झाल्या आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचं विभाजन झालं.
आज एकविसाव्या शतकाचा जर विचार केला तर धनगर समाजातही पोट-जाती असल्याचे चित्र दिसून येते. एकाच रक्ताची अन् हाडामांसाची माणसं पोटजातीचा उदो उदो करत आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हेच सांगत सुटलेत पण नुकसान माझ्याच समाजाचं होतंय हे त्यांच्या ध्यानीमनी देखिल नाही. आजची प्रस्तापित व्यवस्था मुद्दामहून जाणूनबुजून धनगर समाजातील पोटजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय कारण पोटजातीमध्ये विखूरलेल्या धनगर समाजबांधवांची जर जनगनना झाली तर महाराष्ट्रच नव्हे तर भारतामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत एक नंबरची जमात ही धनगर जमात आहे हे सिद्ध होईल. आणि जर धनगर समाजाला आपली खरी ताकद कळली तर तर जगातील कोणतीही अशी व्यवस्था कोणतीही अशी शक्ती नाही की ती धनगर समाजाला अडवू शकेल.
धनगर समाजातील सुशिक्षित युवा वर्गानं गांभीर्यानं विचार-विनीमय करायला हवा. पोटजाती बाजूला ठेवून फक्त धनगर म्हणून जगायला शिकलो तर धनगर समाजातील मुलं-मुली आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगीरी बजावतील यात तीळमात्रही शंका नाही. रणरागीणी महाराणी अहिल्यामाई होळकर स्वताच्या मुलीचा विवाह इतर जातीमधील युवकाशी करून देतात, महाराजा यशवंतराव होळकर आणि कोल्हापुरचे राजे छत्रपति राजर्षी शाहू महाराज या दोन्ही घरचे नातेसंबंध जुळून येते तर मग आजचा धनगर समाज आपापल्याच पोट-जातीमध्येच का गुरफटून राहिलाय?? हा प्रश्न साहजिकच कोणाच्याही डोक्यात गोंधळ निर्माण करू शकतो. धनगर समाजात पोट-जातीच्या प्रथा पडल्याने समाजातील उच्चशिक्षित मुलामुलींना आपला जीवनसाथी निवडण्यासाठी कधीकदी इतर जाती-जमातींचा आधार घ्यावा लागतो हे एक फार मोठे सामाजिक नुकसान आहे. अशी कितीतरी उदाहरणे आहेत पण धनगर समाजातील रूळलेल्या पोटजातींचे दरवाजे जर खूले झाले तर मग आजच्या युवक-युवतींना इतर जातीमधील जीवनसाथी शोधण्याची गरज पडणार नाही.
यासाठी धनगर समाजातील युवकांनी समाजाच्या न्याय व हक्कासाठी आणि सामाजिक संतुलनासाठी पोटजाती बाजूला ठेवून एकत्रित येणं आवश्यक आहे. आजचा ज्वलंत प्रश्न आरक्षण अंमलबजावणीचा असो, अन्याय अत्याचाराचा असो अथवा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न किंवा विवाह बाबतीचा प्रश्न असो समाजबांधवांनी आणि समाजातील युवकांनी पोटजाती बाजूला ठेवुन एकत्रितपणे समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यावी.
जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत
आणि गुजरातपासून आसामपर्यंत,
सह्याद्रीच्या दरी-खोर्यांतून एकच नाद घुमू दे
प्रत्येकाच्या नसानसात ठसू दे
आणि धनगर सारा एक होऊ दे.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
- नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
Jay Mahlar
ReplyDelete