वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिल्यास असे लक्षात येईल की परिवर्तन हा एक निसर्गाचा नियम आहे. निसर्गात वारंवार बदल होत असतात त्यामुळे तर निसर्गाचा समतोल राखला जातो. त्याचप्रमाणे समाजात सुद्धा परिवर्तनाची नितांत आवश्यकता असून त्यावरच समाजाची प्रगल्भता अवलंबून आहे. मग तिथे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक असो अथवा राजकीय क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रांत बदल आवश्यक आहे अर्थातच परिवर्तन असायलाच हवे.
आज समाजात वावरताना असे दिसून येते की इतर समाजाच्या तुलनेत धनगर समाजाची सामाजिक प्रगल्भता कुठेतरी कमी पडत आहे. सोशल मिडीयावर तर धनगर समाजातील तरूणांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे ते काही आज नवे नाही. या अगोदर सुद्धा जेव्हा जेव्हा लोकसभा, विधानसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या तेव्हा तेव्हा राजकारणात अनेक घडामोडी घडल्या अन् त्यांवरती अनेक कुरघोड्या देखील झाल्या.
नुकतेच गोपीचंद पडळकर हे वंचितला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार असल्याच्या बातम्या वर्तमानपत्र तसेच टीव्ही न्यूजप्रमाणे सोशल मिडियावरून देखील वाऱ्यासारख्या वायरल झाल्या. परंतु गोपीचंद पडळकर यांच्यावरती मात्र टिकेची झोड उठवण्यात आली त्याचे कारण असे की अखेरच्या धनगर आरक्षण लढ्यात त्यांनी आरेवाडीच्या बिरोबा बनात भाजपला मतदान न करण्याची शपथ घेतली होती आणि म्हणूनच गोपीचंद पडळकर टिकेस बळी पडले.
खरंतर इथे मी कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही अथवा कोणत्याही नेत्यांच्या निर्णयाचे समर्थन करणार नाही आणि विरोध सुद्धा नाही. कारण प्रत्येकाला संवैधानिक अधिकार आहे जसा मला लिहण्याचा... आज धनगर समाजात अनेक नेते आहेत शिवाय नवनवीन नेतृत्व उदयास येत आहेत. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या पक्षात कार्यरत आहे. परंतु समाजासाठी एकत्रित यायचे कोणी नाव घेत नाही. तसे झाले असते आज चित्र काही वेगळेच दिसले असते, असो... आमची सामाजिक प्रगल्भता तेवढी नाहीये जेवढी असायला हवी होती. आम्ही मात्र सोशल मिडियावरच एकमेकांच्या अब्रूचे धिंडवडे काढत असतो आणि आपल्याच हाताने समाजाच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत असतो. थोडक्यात काय तर तर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ....
खरंतर टिका करणाऱ्या युवकांमध्ये (मग तो कोणीही असो तो कोणत्याही पक्षाचा असो) सामाजिक प्रगल्भता असती तर तेव्हाच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ना.महादेवजी जानकर हे खासदार झाले असते. रिडालोसमधून गोपीचंद पडळकर हे २००९ साली खानापूर-आटपाडी विधानसभा लढले, २०१४ ला भाजपमधून लढले तर २०१९ ला सांगलीची लोकसभा निवडणूक वंचित मधून लढले होते मग सामाजिक प्रगल्भता असती तर ते सुद्धा आमदार खासदार झाले असते. २०१४ ला बाळासाहेब गावडे बारामती मधून आणि प्रकाश शेंडगे जत मधून आमदार झाले असते ना.... आता २०१९ ला डॉ यशपाल भिंगे आणि सखाराम बोबडे हे सुध्दा परभणीमधून खासदार झाले असते. असे कितीतरी धनगर समाजातील उमेद्वार सहज निवडून आले असते पण काय करणार यास सर्वस्वी जनतेबरोबरच नेत्यांची सुद्धा प्रगल्भता महत्त्वाची आहे. इतर समाजातील कितीतरी नेते पक्ष बदलतात, कोणाचा जावई दुसऱ्या पक्षात, तर कोणाचा भाऊ, साडू, मेव्हणा, पुतण्या तिसऱ्या चौथ्या पक्षात असतो. तेव्हा मात्र ते ज्या जातीत जन्माला आले आहेत त्या जातीतील लोकांनी त्यांना कधी विरोध केला नाही त्यांच्यावर टिका केली नाही. यावरून तरी त्यांच्या सामाजिक प्रगल्भतेचा अभ्यास करायला हवा. मग धनगर समाजातच हा एवढा उपद्व्याप का?
म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे की एक तर एकत्रित या नसेल तर कोणीही कोणत्याही पक्षात जात असेल तर जाऊद्या, संधी मिळत असेल तिथून विधानसभा लोकसभा लढू द्या आपण सर्वांनी सामाजिक प्रगल्भता जोपासून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून विधानभवनात आणि संसदभवनात समाजाचा टक्का वाढवूया. परंतु आपल्याच समाजातील नेत्यांवर टिकेची झोड उठवून समाजाचेच वाभाडे काढू नका एवढीच नम्र विनंती.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+91 853 000 4123
आज समाजात वावरताना असे दिसून येते की इतर समाजाच्या तुलनेत धनगर समाजाची सामाजिक प्रगल्भता कुठेतरी कमी पडत आहे. सोशल मिडीयावर तर धनगर समाजातील तरूणांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे ते काही आज नवे नाही. या अगोदर सुद्धा जेव्हा जेव्हा लोकसभा, विधानसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या तेव्हा तेव्हा राजकारणात अनेक घडामोडी घडल्या अन् त्यांवरती अनेक कुरघोड्या देखील झाल्या.
नुकतेच गोपीचंद पडळकर हे वंचितला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार असल्याच्या बातम्या वर्तमानपत्र तसेच टीव्ही न्यूजप्रमाणे सोशल मिडियावरून देखील वाऱ्यासारख्या वायरल झाल्या. परंतु गोपीचंद पडळकर यांच्यावरती मात्र टिकेची झोड उठवण्यात आली त्याचे कारण असे की अखेरच्या धनगर आरक्षण लढ्यात त्यांनी आरेवाडीच्या बिरोबा बनात भाजपला मतदान न करण्याची शपथ घेतली होती आणि म्हणूनच गोपीचंद पडळकर टिकेस बळी पडले.
खरंतर इथे मी कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही अथवा कोणत्याही नेत्यांच्या निर्णयाचे समर्थन करणार नाही आणि विरोध सुद्धा नाही. कारण प्रत्येकाला संवैधानिक अधिकार आहे जसा मला लिहण्याचा... आज धनगर समाजात अनेक नेते आहेत शिवाय नवनवीन नेतृत्व उदयास येत आहेत. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या पक्षात कार्यरत आहे. परंतु समाजासाठी एकत्रित यायचे कोणी नाव घेत नाही. तसे झाले असते आज चित्र काही वेगळेच दिसले असते, असो... आमची सामाजिक प्रगल्भता तेवढी नाहीये जेवढी असायला हवी होती. आम्ही मात्र सोशल मिडियावरच एकमेकांच्या अब्रूचे धिंडवडे काढत असतो आणि आपल्याच हाताने समाजाच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत असतो. थोडक्यात काय तर तर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ....
खरंतर टिका करणाऱ्या युवकांमध्ये (मग तो कोणीही असो तो कोणत्याही पक्षाचा असो) सामाजिक प्रगल्भता असती तर तेव्हाच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ना.महादेवजी जानकर हे खासदार झाले असते. रिडालोसमधून गोपीचंद पडळकर हे २००९ साली खानापूर-आटपाडी विधानसभा लढले, २०१४ ला भाजपमधून लढले तर २०१९ ला सांगलीची लोकसभा निवडणूक वंचित मधून लढले होते मग सामाजिक प्रगल्भता असती तर ते सुद्धा आमदार खासदार झाले असते. २०१४ ला बाळासाहेब गावडे बारामती मधून आणि प्रकाश शेंडगे जत मधून आमदार झाले असते ना.... आता २०१९ ला डॉ यशपाल भिंगे आणि सखाराम बोबडे हे सुध्दा परभणीमधून खासदार झाले असते. असे कितीतरी धनगर समाजातील उमेद्वार सहज निवडून आले असते पण काय करणार यास सर्वस्वी जनतेबरोबरच नेत्यांची सुद्धा प्रगल्भता महत्त्वाची आहे. इतर समाजातील कितीतरी नेते पक्ष बदलतात, कोणाचा जावई दुसऱ्या पक्षात, तर कोणाचा भाऊ, साडू, मेव्हणा, पुतण्या तिसऱ्या चौथ्या पक्षात असतो. तेव्हा मात्र ते ज्या जातीत जन्माला आले आहेत त्या जातीतील लोकांनी त्यांना कधी विरोध केला नाही त्यांच्यावर टिका केली नाही. यावरून तरी त्यांच्या सामाजिक प्रगल्भतेचा अभ्यास करायला हवा. मग धनगर समाजातच हा एवढा उपद्व्याप का?
म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे की एक तर एकत्रित या नसेल तर कोणीही कोणत्याही पक्षात जात असेल तर जाऊद्या, संधी मिळत असेल तिथून विधानसभा लोकसभा लढू द्या आपण सर्वांनी सामाजिक प्रगल्भता जोपासून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून विधानभवनात आणि संसदभवनात समाजाचा टक्का वाढवूया. परंतु आपल्याच समाजातील नेत्यांवर टिकेची झोड उठवून समाजाचेच वाभाडे काढू नका एवढीच नम्र विनंती.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+91 853 000 4123
No comments:
Post a Comment