Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Monday 11 May 2020

गोपीचंद पडळकर साहेब आणि बिरोबा : ✍️नितीनराजे अनुसे

महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मान.आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे त्रिवार अभिनंदन 💐💐💐

(सदरच्या ब्लॉगमधून सामाजिक तथा मानसिक भावना दुखावण्याचा हेतू मुळीच नाही यातून बोध घेऊन समाजप्रबोधन व्हावे हीच अपेक्षा)
            लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जेव्हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेव्हा ज्यांना बिरोबा कुठे आहे? कसा आहे? नक्की कोणता देव आहे? हेच माहित नव्हते त्यांना लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अखेरच्या धनगर आरक्षण लढ्यातील मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी घातलेली बिरोबाची शपथ आठवायला लागली, आयुष्यभर प्रस्थापितांची गुलामगिरी चमचेगिरी करणाऱ्यांना, प्रस्थापितांचे बूट चाटणाऱ्यांना, अंडी-दारू-मटणासाठी तडफडणाऱ्यांना, दोन-चार नोटासाठी प्रस्थापित नेत्यांसमोर लाळ गाळणाऱ्यांना आणि स्वतःचा तथा समाजाचा स्वाभिमान प्रस्थापितांच्या बुटाखाली गहाण टाकणाऱ्यांना धनगर समाजाचे दैवत असलेला बिरोबा आणि गोपीचंद पडळकर यांची बिरोबाची शपथ आठवायला लागली.  विधानसभेच्या निवडणूकांचे निकाल लागल्यावर गोपीचंद पडळकर यांच्यावर बिरोबा कोपला म्हणून बोंबलणाऱ्या औलादींना, आणि एकच छंद राजकारण बंद म्हणून पोटाची आतडी पिळवटणाऱ्यांना मला सांगायचं आहे की बाबांनो आज खऱ्या अर्थाने गोपीचंद पडळकर यांना बिरोबा पावला आहे हे विसरू नका.
          मी २००६ पासून अगदी जवळून पाहतोय की मा.गोपीचंद पडळकर साहेब नावाचा सर्वसामान्य कुटुंबातील हा युवक संघर्ष कोळून पितोय. संघर्ष जणू काय त्यांच्या पाचवीलाच पुजलाय, तरीही हा संघर्षयोद्धा कितीही संकटे आली तरी आजपर्यंत कधीही डगमगला नाही. गोपीचंद पडळकर यांना नामोहरम करण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेने कितीतरी षडयंत्र रचली, मंगळसूत्र चोरीसारख्या खोट्या केसेस दाखल केल्या, पोलिस कोठडीत ठेवले, शेवटी जिल्हा हद्दपारीचे नोटीस सुद्धा बजावले होते. तरी सुद्धा गोपीचंद पडळकर हा संघर्षयोद्धा थांबला नाही ना त्यांनी आपला संघर्षरथ थांबवला. तर हा योद्धा अन्यायाविरुद्ध लढला, प्रस्थापितांना भिडला आणि त्यांना अक्षरशः घामही फोडला. जेव्हा गोपीचंद पडळकर सांगलीच्या तुरूंगात होते तेव्हा हातात खुरपं घेऊन शेतात भांगलणारी याच संघर्षयोद्ध्याची आई म्हणाली होती की "कशाला राजकारणाच्या नादाला लागायचं, लोकं सुखानं जगू देत नाह्यती. पण पोरगं काय ऐकतच नाय." आज त्याच मायमाऊलीचं ते पोरगं, सर्वसामान्यांचं ते पोरगं शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज बनून बिनविरोध महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर निवडून आमदार झाले. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर बिरोबा कोपला नाही तर त्यांना बिरोबा पावला आहे असे म्हणायला मला वावगं वाटणार नाही.
          आज ज्यांना ज्यांना गोपीचंद पडळकर साहेबांनी घातलेली बिरोबाची शपथ आठवते त्यांनी हे पण आठवून पहा...
१) सोनलवाडी (सांगोला) येथील एका मेंढपाळाच्या मेंढ्या काही गावगुंड उचलून घेऊन गेले होते त्या मेंढ्या मेंढपाळाला परत करायला बिरोबाचं रूप घेऊन गोपीचंद पडळकर साहेबच धावले होते.
२) कोल्हापूरच्या बहिणीवरती अन्याय अत्याचार झाला होता तेव्हाही त्या बहिणीच्या पाठीशी भावाप्रमाणे ठामपणे उभा राहिलेले गोपीचंद पडळकर आठवून पहा.
३) पुरंदरच्या ताईवर अतिप्रसंग झाला होता तेव्हा बारामतीचा मोठा म्हसोबा, त्या लोकसभा मतदारसंघाची मरीआई तिथं पोहचली नाही ना साधा धीर दिला. परंतु बिरोबाच्याच रूपाने गोपीचंद पडळकरांनी भेट घेऊन पुरंदरच्या ताईला आणि तिच्या कुटुंबीयांना धीर दिला.
४) कराड परिसरात भटकंती करणाऱ्या मेंढपाळांच्या मेंढ्या काही गावगुंडांनी पळवल्या होत्या त्या पडळकर साहेबांमुळेच माघारी परत केल्या होत्या.
५) माणदेश परिसरात कोणावरही अन्याय अत्याचार झाला तर रात्री अपरात्री हाकेला धावून जाणारे गोपीचंद पडळकर साहेब माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला बिरोबाचेच रूप वाटतात. अशा कितीतरी एक ना अनेक कितीतरी घटना सांगता येतील.
त्यामुळे बिरोबा गोपीचंद पडळकर साहेबांना कोपला नाही तर पावला आहे. आणि बिरोबा खरंच कोपला असेल तर तो त्या समाजावर कोपला आहे जो अजूनही एकजूट एकसंघ होत नाही. बिरोबाची शपथ फक्त गोपीचंद पडळकर यांनीच पाळायची होती आणि समाजाने प्रस्थापितांच्या पारड्यात भरभरून मते द्यायची होती का?  हीच का बिरोबाच्या भक्तांची भक्ती? जर समाजानेही बिरोबाची शपथ पाळली असती, एकी दाखवली असती तर गोपीचंद पडळकर साहेब यांच्यासह अजून कित्येक धनगर नेते आज विधानपरिषदेतच काय तर लोकसभेत दिसले असते. कितीतरी आमदार विधानसभेत दिसले असते. परंतु समाजात एकी नसल्याने दिड-दोन कोटी धनगर समाजाचा केवळ एक आमदार विधानसभेत आणि आज एक विधान परिषदेवर ही वेळ समाजावर आली नसती.
          असो, बिरोबाच्याच आशिर्वादाने, लढाऊ प्रवृत्तीच्या आणि गोपीचंद पडळकर साहेबांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे आणि संघर्षामुळे संघर्षयोद्ध्याचा संघर्षरथ कधीही न थांबता अविरतपणे धावतच राहिला त्या संघर्षवेलीवर आज विधानपरिषदेच्या माध्यमातून आमदारकीचे गोंडस फुल बहरून आले. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सदस्य मान.आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे त्रिवार अभिनंदन  व पुढील वाटचालीस अगणित शुभेच्छा. कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, मेढपाळांचे, युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मल्हारी मार्तंड, श्री बिरोबा आपणास बळ बुद्धी तथा चातुर्य देवो हीच प्रार्थना 💐💐💐
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

5 comments:

  1. Awsome article.....keep it up.

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेख

    ReplyDelete
  3. खरचं अप्रतिम लेख

    ReplyDelete
  4. खरचं अप्रतिम लेख

    ReplyDelete
  5. Lokana gavi patva upasmari chalu ahe mumbai kurla

    ReplyDelete