Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Tuesday, 26 September 2017

आरेवाडीत उद्या दसरा मेळावा

गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षी देखिल उद्या बुधवार दि.२७ आॅक्टोबर २०१७ रोजी श्री क्षेत्र बिरोबा बन आरेवाडी येथे भव्य दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. विखूरलेला समाज एकत्रित यावा आणि समाजाचे वैचारिक प्रबोधन व्हावे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तसेच युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी केले आहे. त्यासाठी विवीध जिल्ह्यात बैठका पार पडल्या असून लाखोंच्या संख्येने समाजबांधव या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी देखिल ७ आॅक्टोबर २०१७ रोजी दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने समाजबांधव व धनगर समाजातील सर्वच नेते एकत्रित आले होते. परंतू यावर्षी सर्वपक्षिय बहुजन समाजाचा दसरा मेळावा भरवण्याचे धाडस मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी केले आहे. गेल्या वर्षी धनगर मेळावा आणि यावर्षी बहुजन मेळावा का? गेल्यावर्षी आयोजक धनगर समाज आणि यावेळी स्वता संयोजक गोपीचंद पडळकर साहेब असे का?  अशा चर्चांना सर्वत्र उधाण आले आहे. आणि त्यालाच तेल-चटणी-मीठ लावून अर्थाचे अनर्थ काढून राजकीय सूड घ्यायची प्रवृत्ती जरा जास्तच वाढत चाललेली पाहून थोडंसं लिहावसं वाटलं म्हणून केलेला हा लेखप्रपंच....
या दसरा मेळाव्याच्या आडून त्यांना आमदारकी किंवा खासदारकी मिळवायची नाही आणि मिळवायचीच असेल तर ते स्वताच्या हिंमतीवर मिळवतील ते त्यांच्या कर्तृत्वातून दिसून येत आहेच. राजकारण आणि समाजकारण हे कितीही वेगळं म्हणत बसलो तरी भारतासारख्या जातीयवादी विचारांच्या देशात त्यांची नाळ एकमेकांशीच जोडलेली आहे. धर्मनिरपेक्ष राज्यकारभार हा फक्त नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात वाचायला भेटतो मात्र वास्तवात धर्मनिरपेक्ष कुठेही आणि कधीच दिसत नाही आणि असेल तर धर्मनिरपेक्ष राज्यकारभार कुठे चालू आहे ते दाखवून द्यावे हे माझे खुले आवाहन.... राजकीय नेत्यांचेच काय घेऊन बसलाय जर राजकारण करायचे असेल तर अगदी तुम्ही स्वता सुद्धा नुसतंच समाज समाज करत बसाल तर तुमचे राजकीय भवितव्य हे अंधारातच राहील शिवाय धनगर समाजाचे नेतृत्व पुढं यायला देखिल वेळ लागेल. आज समाजासमोर अनेक आवाहने आहेत परंतू नेतृत्वाचा अभाव असल्याने ही आवाहने पुढच्या पिढीला देखिल त्रासदायक ठरू शकतात अर्थातच पुढच्या पिढीचे देखिल भवितव्य धोक्यात येऊ शकते. धनगर समाजातील सामाजिक संघटना या केवळ समाज समाज करू शकतात, समाजासाठी आंदोलन मोर्चा सर्व काही सामाजिक संघटनांना करता येते. कदाचित सामाजिक बांधिलकी असेल तर राजकीय नेते समाजाच्या मोर्चात सहभागी होऊ शकतातही पण अन्य वेळी इतर समाजाला सुद्धा सोबत घेऊन जावे लागते तेव्हा खरे नेतृत्व समाजासमोर येते..... तर आणि तरच राजकारणाच्या माध्यमातून समाजाच्या विकासाला/जडणघडणीला हातभार लावता येतो. मग तिथे धनगर अथवा कोणीही नेता असो त्यासाठी आजपर्यंतच्या आमदार खासदारांचा इतिहास वाचून बघा... म्हणून अखंड बहुजन समाजाचे वैचारिक प्रबोधन करून समाजाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची भीष्मप्रतिज्ञा गोपीचंद पडळकर या तरूण तडफदार युवा नेत्याने केली अाहे. परंतू मागच्या एक आठवड्यापासून पाहतोय की समाजात ज्या प्रकारच्या उलटसुलट चर्चा चालू आहेत त्यातून नेतृत्व खोडून टाकण्याचा सरळसरळ प्रयत्न चालू असल्याचे एक षडयंत्रच दिसून येते आहे. एका दृष्टीने पाहिले तर दिड ते दोन कोटी धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ एकच खासदार तर हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आमदार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत आहेत. कणखर दमदार कर्तृत्ववान असे नेतृत्व तयार करायला, नेतृत्व घडायला फार वेळ लागतो परंतू सोशल मिडीयासारख्या माध्यमांतून तेच नेतृत्व खोडायला फार वेळ वागत नाही पण ज्यांच्या रक्तातच कर्तृत्व आणि  नेतृत्व ठासून भरलेले असते ते नेतृत्व सहजासहजी खोडतां येत नाही हे देखिल तितकेच सत्य आहे. म्हणून समाजबांधवांना माझी विनंती आहे की ज्यांना कोणाला दसरा मेळाव्यासाठी जायचे नसेल तर त्यांनी जाऊ नका परंतू एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या नादात चुकीचे मेसेजेस करून समाजात गैरसमज पसरवू नयेत. समाजातील नेतृत्व जेवढे वाढेल तेवढे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर आहे म्हणून समाजातून जास्तीत नेतृत्व तयार करा पण खोडू नका हीच नम्र विनंती.
पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या🙏
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

Monday, 25 September 2017

पै संदीप रासकर यशस्वी उद्योजक पुरस्काराने सन्मानित



कडेगाव तालुक्यांतील पैलवानकी क्षेत्रातील रासकर कुटूंब हे एक नावाजलेले प्रसिद्ध कुटूंब आणि या कुटुंबाला स्व.पै.खाशाबा रासकर यांच्याकडून लाभलेला पैलवानकीचा वारसा आणि याच जोरावर सिनेसृष्टीला देखिल भुरळ पाडणारा आंतरराष्ट्रीय खिलाडी कुस्तिपट्टू अर्थातच कुस्त्यांमधला जादूगार म्हणून ज्यांना ओळखले जाते असे पै.कृष्णा रासकर उर्फ आप्पा आणि पै.धनाजी रासकर यांचा पुतण्या व स्व.पै.खाशाबा रासकर यांचे नातू धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते पै.संदीप रासकर यांना कडेगाव मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने यशस्वी उद्योजक या पुरस्काराने काल दि.२४ सप्टेंबर २०१७ रोजी सन्मानित करण्यात आले. औद्योगिक क्षेत्रात गरूडझेप घेऊन अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने व बेरोजगारांच्या भाकरीचा प्रश्न मिटवल्याने त्यांना यशस्वी उद्योजक या पुरस्काराने गौरवण्यात आले. पाठीमागे स्व.शांता खाशाबा रासकर यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्याच घरातील त्यांचा नातू पै.संदीप रासकर यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार मिळाल्याने रासकर कुटूंब चांगलेच चर्चेत आले आहे. गरिबीच्या झळया सोसून स्वकष्टातून नावारूपास आलेले हे रासकर कुटूंब हे जीवनाचा खडतर प्रवास करून यशाच्या शिखरापर्यंत पोहचल्यावर खरंतर सर्वसामान्यांसाठी रासकर कुटूंब जणू आदर्शच ठरत आहे. आज या कुटूंबातील संख्या ही जवळपास ४० च्या घरात असून देखिल या रासकर कुटूंबाने एकत्रित कुटूंबाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यामुळे या कुटूंबाचे कौतुक करावे तेवढे थोडेच पण यापुढेदेखिल पै.संदीप रासकर यांनी अशीच गरूडझेप घ्यावी व समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लढा उभारावा तसेच बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास असेच प्रयत्नशील राहावे त्यासाठी मल्हारी मार्तंड त्यांना बळ बुद्धी व चातुर्य देवो हीच प्रार्थना व यशस्वी उद्योजक पुरस्कार मिळल्याबद्दल पै.संदीप रासकर यांचे त्रिवार अभिनंदन.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

कडक प्रहार

तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर त्यासाठी अवश्य लढा द्या,
पण जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर पूर्वीपेक्षाही अन्यायाच्या विरोधात अधिक तीव्रतेने लढा द्याल तरच तुम्हाला न्याय मिळेल.
-नितीनराजे अनुसे

Sunday, 24 September 2017

वाळवा तालुक्यात मंत्र्यांना बंदी : सागर मलगुंडे

सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे अशी मागणी सातत्याने होत आहे. परंतू सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिल्यास जातीय तेढ वाढेल असे बिनबुडाचे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले होते त्यानुषंगानेच अहिल्या भक्तांच्या भावना भडकल्या. या प्रकाराच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.२८ आॅगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने विराट मोर्चा निघाला व १५ दिवसांचे अल्टीमेटम देऊनही सरकार दरबारी दखल घेतली जात नसेल तर मग मूग गिळून गप्प बसायला आमची काय **ची औलाद नव्हे. त्याचाच परिणाम म्हणून सोलापूर येथे विनोद तावडे यांच्यावर भंडारा उधळून धनगर समाजाच्या पाच वाघांनी त्यांचा निषेध केला होता त्यांची नावे अशी की शेखर बांगळे 
1. शेखर बांगळे
2. उमेश काळे
3. शरणू हांडे
4. महेश घोडके आणि 
5. म्हाळाप्पा नवले
तर सातारा येथे विनोद तावडेंवर बुक्का उधळणारा धनगराचा वाघ
6. मारूती जानकर
आम्ही आमच्या औकातीवर आलो तर काय करू शकतो आणि काय नाही याचा विचार कोणी करू शकत नाही त्यामुळे आमच्या नादाला लागू नका असे आवाहान करत सांगली जिल्ह्यातील वाळवा (इस्लामपूर) तालुक्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही आणि जर एखादा फिरला तर त्याची गाडी फोडल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही असे आवाहन यशवंत युवा सेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख मा.सागर (भाऊ) मलगुंडे यांनी केले आहे. 
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

Friday, 22 September 2017

पुन्हा एकदा धनगरी हिसका: सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा

सोलापूर विद्यापीठाला लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ वाढेल असे प्रतिपादन करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अर्थातच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुन्हा एकदा धनगरी हिसका अनुभवला. काही दिवसांपूर्वीच सोलापूर येथे शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांच्यावरती भंडारा उधळून अहिल्याभक्तांनी नामांतरण लढ्याची खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर तरी सरकार ताळ्यावर यायला हवं होतं पण तसे काहीच झाले नाही याचा अर्थ राज्य सरकारला धनगर समाजाच्या मागण्यांशी काहीच देणे घेणे नाही. केवळ धनगर समाजामुळेच भाजप सरकार आज सत्तेत आहे असे स्वता मुख्यमंत्री यांनी अनेक जाहिर सभेतून वक्तव्य केलेले आहे आणि हे सत्य देखिल आहे हे कोणी नाकारू शकत नाही. परंतू ज्या धनगर समाजाच्या जिवावर हे बहाद्दर सत्तेवर आले त्या धनगर समाजाला वाटाण्याच्या अक्षता दाखवायला हे सरकार कधीच कमी पडले नाही. आश्वासनांवरती आश्वासने देऊन धनगर समाजाच्या मागण्या कधीच पूर्ण न करण्याची शपथच जणू या सत्ताधाऱ्यांनी खाल्ली आहे. मग धनगर समाजाच्या संयमाचा पारा वाढणारच आणि शेवटी संयम सुटल्यावर काय होते ते सोलापूर येथे विनोद तावडेंनी अनुभवले होते पण आज पुन्हा एकदा सातारा येथे मारोती जानकर नावाच्या धनगराच्या वाघाने विनोद तावडेंवर बुक्का फेकून नामांतरण लढ्याचा आक्रोश व्यक्त केला.
धनगर आरक्षणाचे आणि सोलापूर विद्यापीठाच्या नांमांतरणाचे गाजर दाखवून सत्ता हडपली खरी पण जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही आणि सोलापूर विद्यापीठाला लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले जात नाही तोपर्यंत एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार आणि फिरला तर काय अवस्था होते याचा अनुभव त्यांना आलाच आहे. सरकार माय बाप हो आतातरी ताळ्यावर या आणि आमच्या मागण्यांची पुर्तता करा नाहीतर आम्ही पेटलेले आहोत मग तुम्हाला पेटवायला आम्ही कमी पडणार नाही.
धनगर समाजबांधवांनो एक विचार सदैव लक्षात राहूद्या आणि त्या विचारावरती मार्गक्रमण करा...
जर तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय मात्र मिळालाच पाहिजे.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

Wednesday, 20 September 2017

वाघांनो तुम्हाला मानाचा पिवळा जय मल्हार


एकदा मागून पाहिलं दोनदा मागून पाहिलं एवढंच नव्हे तर अनेकदा मागून पाहिले पण सोलापूर विद्यापीठाला लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव द्यायला आडदांड सरकार राजीच होत नाही. नेहमीच आश्वासनांवरती आश्वासने देवून अक्षरशा आश्वासनांचा अगदी महापूर येऊन धडकला तरी निर्दयी सरकार मात्र शांतच बसले आहे तेव्हा धनगरांच्या संयमाचा बंधारा फार काळ टिकणार नव्हता आणि शेवटी तेच झाले धनगर समाजाचा संयम अखेर सुटला... काल परवा अखंड महाराष्ट्र राज्याने याची देही याची डोळा दुरदर्शन, वर्तमानपत्र तसेच सामाजिक माध्यमातून (सोशल मिडीयातून) पाहिले. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणासाठी शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे हे सोलापूर येथे आले असताना मंचावरून भाषण करत होते तेवढ्यात विद्यापीठाच्या नामांतरण संदर्भात घोषणा देत व यळकोट यळकोट जय मल्हार असा जय जयकार करत मल्हार मावळ्यांनी सभागृह दणाणून सोडले. शिक्षणामंत्र्यांच्या निषेधार्थ पत्रके भिरकावली व भंडारा देखिल उधळला. पिवळ्या भंडाऱ्याची ताकद काय असते हे लवकरच समजेल सत्ताधाऱ्यांना पण ज्या यशवंतसैनिकांनी भंडारा उधळला त्या पाच वाघांची अर्थातच स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या वारसदारांची नावे पुढीलप्रमाणे
1. शेखर बांगळे
2. उमेश काळे
3. शरणू हांडे
4. महेश घोडके आणि
5. म्हाळाप्पा नवले
या पाच वाघांना मानाचा पिवळा जय मल्हार व त्यांचे त्रिवार अभिनंदन. खरंतर कौतुक करावे तेवढे कमीच पण  क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचा वारसा असाच जपत रहा ही खरी काळाची गरज आहे. तरच समाजाला न्याय मिळू शकतो, धनगर समाज अन्यायाच्या साखळदंडातून मुक्त होऊ शकतो. जर तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर त्यांच्या तोंडात वाजवून न्याय मिळवू या विचाराचे आम्ही आहोत हे एकदा सरकारला दाखवून दिले आणि इथून पुढे देखिल असेच दाखवून देऊ.
अगोदर कितीतरी वेळा सांगितले पण त्यांना समजले नव्हते म्हणून आता सांगतो की, सर्व गोष्टीला अंत होता म्हणूनच धनगर शांत होता पण एक लक्षात ठेवा आता आमची शांतता भंग झाली आहे त्यामुळे आता पेटलेला एकेक धनगर महाराष्ट्र पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

Wednesday, 13 September 2017

यळकोट यळकोट जय मल्हार

अटकेपार झेंडे फडकावून
राखिले आणि रक्षिले दिल्लीचे तख्त
    आता पुन्हा उठा आणि खेळवा
           तुमच्या नसानसात
    मर्द धनगरांचे सळसळते रक्त
-✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspaot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

Monday, 11 September 2017

वाढदिवस आमच्या रामभाऊंचा


समाजाविषयी तळमळीने संशोधन आणि लेखन करणारे धनगर समाजाच्या प्रश्नांचे गाढे अभ्यासक, समाज प्रबोधक, थोर विचारवंत, धडाकेबाज व्याख्याते, थोर समाजसेवक तसेच आमचे मार्गदर्शक बंधूतुल्य परममित्र यशवंत सेनेचे सरचिटणीस मा.रामभाऊ लांडे साहेब यांना वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा!!
💐💐💐💐💐💐💐
मा.रामभाऊ लांडे साहेब यांच्या कार्यावरती आणि जिवनावरती लिहावं तेवढं कमीच आहे हे सर्वांना ज्ञातच आहे तरीही त्यांच्या हातून असेच अभूतपूर्व आणि अतुलनीय समाजकार्य घडो हीच त्यांच्या वाढदिवसानिमीत्त मल्हारी मार्तंड चरणी छोटीशी प्रार्थना🙏🙏🙏
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
शुभेच्छूक,
        ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspaot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

Tuesday, 29 August 2017

सोलापूर विद्यापीठ लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

सोमवार दि.२८ आॅगस्ट २०१७ ला झालेला सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा खरोखर यशस्वी झाला. २१ जुलै २०१४ च्या मोर्चा नंतर सरकारला धनगर समाजाची ताकद पुन्हा एकदा कळाली. २५-५० लांखाच्या संख्येने धनगर समाजाचा मोर्चा सोलापूरात घोषणा देत सरकारचा निषेध करत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. तिथे अनेक मान्यवरांची भाषणे झाली. सोलापूर विद्यापीठाला लवकरात लवकर राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव द्यावे असे शासनाला आठ दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखंड धनगर समाजाने दिला आहे. आणि सरकारला काहीही करून सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावेच लागेल यात काही वादच नाही. या लढ्यात धनगर समाज सर्व ताकदीने रस्त्यावर उतरला आणि सोलापूर शहर पिवळ्या भंडाऱ्यात न्हाऊन निघाले. सर्व माता-भगिनी, समाजबांधव भर पावसात भिजत आंदोलनात उभे होते.
जेव्हा काल रात्री मी स्वता "ही तर येणाऱ्या वादळाची पूर्वसुचना आहे" या आशयाचा पहिला ब्लाॅग लिहला  त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव व पद वापरले नव्हते. केवळ धनगर समाजाच्या नेतृत्वामुळेच अहिल्या कन्यांमुळे आणि तुम्हा आम्हांमुळे मोर्चा यशस्वी झाला असे लिहले व यापुढेही असेच एकत्रित येऊन सरकारला गुडघ्यावर आणू शकतो असेदेखिल सांगितले. परंतू काहीजनांनी बोहल्यावर चढल्यासारखे आपापल्या नेत्यांची नावे पुढे करून मोर्चाचा श्रेयवाद उकळायचा प्रकार चालवला, तर काही जाणकारांनी जाणूनबुजून काहीजनांची नावे डावलली म्हणून त्यासंदर्भात केलेला हा लेखप्रपंच....
सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढ्यासाठी सर्वप्रथमता पहिली उडी घेतली ती यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेनेच... सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव द्यावे यासाठी मोटारसायकल रैली व मोर्चा यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने आयोजित करणार आहोत असे शुक्रवार दि.२६ मे २०१७ रोजी नेपतगाव ता.पंढरपूर जि.सोलापूर येथे सर्वप्रथमता कोकरे साहेबांनी त्यांच्या भाषणातून जाहिर केले होते. त्या कार्यक्रमास मी स्वता उपस्थित होतो, पंढरपूर चे विठ्ठल नाना, मोहोळचे संजय(आण्णा) क्षीरसागर, सामाजिक विचारवंत मा.निवांत कोळेकर सर, यशवंत सेनेचे सरचिटणीस मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब, अभिनेता टिंग्या अर्थात यशवंत युवा सेनेचे युवकप्रदेशाध्यक्ष मा.शरद गोयेकर तसेच धनगर समाजातील अन्य नेते देखिल उपस्थित होते. त्यानंतर अनेक ठिकाणी पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, बीड, कोल्हापूर येथे ज्या ज्या ठिकाणी अहिल्याई जयंती निमित्त कोकरे साहेब व्याख्यानासाठी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी जेष्ठ नेते आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये समाजबांधवांना, युवकांना सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण लढ्यात, मोटारसायकल रैली व मोर्चात सहभागी होण्यास आवाहन केले होते. धनगर समाजातीलच काही मोर्चांमुळे यशवंत युवा सेनेने दोन वेळा विद्यापीठ नामांतरण लढ्याचे नियोजन लांबवले होते. पण जेव्हा दि. ०९ आॅगस्ट रोजी विद्यापीठ प्रशासन व्यवस्थेचा कारभार चव्हाट्यावर आला त्याचदिवशी स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब (सरचिटणीस यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य) तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मिळून सोलापूर जिल्हा मुख्याधिकारी निवेदन देऊन १५ सप्टेंबर २०१७ रोजी पंढरपूर-सोलापूर भव्य मोटारसायकल रैली व मोर्चा असे नियोजन आखले होते. त्याचदिवशी सर्वत्र सोशल मिडीयावरती पोस्ट फिरू लागल्या, मोटारसायकल रैली १५ सप्टेंबर ला आयोजित केली असल्याचे समजताच तमाम महाराष्ट्र राज्यातील युवकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळत होता. तर दुसरीकडे जय मल्हार युवा मंच महाराष्ट्र राज्य चे मा.सिद्धेश्वर आवारे यांनी देखिल यशवंत युवा सेनेचे मोटारसायकल रैलीचे नियोजन पाहून त्याचदिवशी दुपारी ३:३० विराट मोर्चाचे आयोजन केले होते. परंतू समाजातील काहीजणांनी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्याऐवजी धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढावा असे सुचवले व दि.११ आॅगस्ट रोजी सोलापूर विश्रामगृहात बैठक झाली त्यावेळेस मोर्चा २३ आॅगस्ट ला घ्यायचे ठरले त्या बैठकीसाठी यशवंत युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि यशवंत युवा सेना २३ च्या मोर्चात सर्वताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर जर सरकारने या मागणीची दखल घेतली नाही तर १५ सप्टेंबर ला यशवंत युवा सेनेच्या वतीने पूर्वनियोजित मोटारसायकल रैली व मोर्चा काढणार असल्याचे व सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हायचे असे ठरले आणि जर का सरकारने दखल घेतली तर त्यांच्या या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन म्हणून रैली काढणार असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले. त्यानंतर लगेचच ३-४ दिवसांत मोर्चा २३ च्या ऐवजी २८ आॅगस्ट ला घ्यायचा निर्णय झाला. परंतू २८ नंतर लगेचच १५ सप्टेंबर ला काही दिवसांतच धनगर समाजाला मोर्चात सहभागी होण्यासआवाहन करणे योग्य दिसत नव्हते शिवाय समाजबांधव हे प्रत्येकवेळी नोकरी कामधंदा व्यवसाय सोडून कसे काय मोर्चात सहभागी होणार ? म्हणून १५ सप्टेंबर २०१७ ची मोटारसायकल रैली व मोर्चा रद्द करून दि.१९ आॅगस्ट रोजी मंगळवेढा येथील धनगर समाजाच्या बैठकीत यशवंत युवा सेनेने निर्णय घेतला की यशवंत युवा सेना सर्व ताकदीने २८ मोर्चात सहभागी होणार. त्यावेळी मंगळवेढा येथील बैठकीस प्रा.शिवाजीराव बंडगर सर, परमेश्वर कोळेकर, यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.सचिन होनमाने सर, सरचिटणीस मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मा.उमेशराजे अनुसे, मा.अवधूत वाघमोडे साहेब तसेच धनगर समाजबांधव मोठ्या उपस्थित होते.
त्यानंतर यशवंत युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वजण बैठका आयोजित करून, सोशल मिडीयावरती विराट मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करत होते. जय मल्हार युवा मंचचे संस्थापक सिद्धेश्वर आवारे साहेब यांनी देखिल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले, यशंवत सेना सोलापूर (रजि.) चे मा.स्वप्निल हुक्के तसेच कार्यकर्त्यांनी सोलापूर विद्यापीठावर प्रतिकात्मक बॅनर लावून विद्यापीठाचे नामांतरण केले. यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी अहमदनगर, सोलापूर तसेच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातही मोर्चाच्या संदर्भात बैठका घेऊन जास्तीत जास्त समाजबांधवांना मोर्चात सहभागी होण्यास आवाहन केले. त्यानंतर शनिवार दि.२६ आॅगस्ट रोजी मा.सिद्धेश्वर आवारे यांनी मुंडण करून जातीयवादी सरकारचा निषेध केला. त्याचा परिणाम असा झाला की राज्यातील सामाजिक वातावरण तापले गेले. व्हाटसॲप, फेसबुक, ट्वीटर, इंन्स्टाग्राम तसेच ब्लाॅगस्पाॅटच्या माध्यमातून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त समाजबांधवांपर्यंत मोर्चा संबंधी माहिती पोहचवण्यात आली. मग त्यामध्ये साप्ताहिक घोंगडी चे संपादक मा.बंडू खांडेकर साहेब, साप्ताहिक महालिंगरायाचे संपादक प्रा.नागेश मासाळ सर, माणदेश नगरी, दामाजी इ.वृत्तपत्रासह सोशल मिडीया अगदी हादरवून सोडणारे समाजातील जेष्ठ विचारवंत मा.बापूसाहेब हटकर,  यशंवत सेनेचे सरचिटणीस मा.रामभाऊ लांडे साहेब, व्याख्याते अविनाश धायगुडे, निवांत कोळेकर, अवधूत लालगे, श्रावण मोटे, संदिप (दादा) बादड, यशवंत युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मा.उमेशराजे अनुसे यांनी सोशल मिडीयावर जोरदार प्रचार व प्रसार त्याचप्रमाणे आटपाडी तालुक्यात सकल धनगर समाज बैठकीचे आयोजन केले होते. ज्ञानेश्वर काळे, मा.संतोष वाघमोडे साहेब, मा.रोहित पांढरे, मधूकर हाके, अक्की बर्वे, अशोक खरात, राजू वीर, शेखर बंगाळे, स्वप्निल हुक्के, राहूल सलगर, सुरेश भावले, निवांत कोळेकर सर, प्रशांत खटके, किरण सोनवलकर, विक्रम ढोणे, राम जवान राहूल वावरे, प्रशांत खटके, आबासाहेब भानवसे, संतोष खाताळ, अविनाश कोळेकर, अविनाश मेटकरी तसेच ज्ञात अज्ञात सर्व समाजबांधवांनी आपापल्या परीने सर्वोतोपरी मदत करून मोर्चा यशस्वी केला होता. मोर्चाच्या काही दिवस अगोदर तमाम युवकांनी तीव्र इच्छा व्यक्त केली होती की युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर यांनी देखिल या मोर्चात सहभागी व्हावे जेव्हा पडळकर साहेब यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे अशी मागणी केली तेव्हा काहीजनांनी त्यांच्यावर समाजातीलच विरोधकांनी टिकाचिप्पनी करत मोर्चात त्यांनी हे उद्योग बंद करून मोर्चात सहभागी व्हावे असेही लिहायला मागेपुढे पाहिले नाही. पण भाजपचे स्टारप्रचारक असताना देखिल सर्वप्रथमता समाज आणि नंतर पक्ष या विचारप्रमाणे सोलापूर येथिल भव्य विराट मोर्चात सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन देखिल केले व ते म्हणाले की इतर विद्यापीठांना महापुरूषांची नावे देताना जातीय तेढ निर्माण झाली नाही मग या विद्यापीठाला नाव देतानाच जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणाऱ्यांना/कुलगुरूंना वेड लागले आहे की काय? शिवाय गोपीचंद पडळकर साहेब व त्यांचे बंधू सांगली जिल्हा समाजकल्याण सभापती मा.ब्रह्मानंद पडळकर साहेब यांनी मोर्चासाठी येणाऱ्या अहिल्या भक्तांसाठी वीस हजार लिटर बिस्लेरींची व्यवस्था देखिल केली होती. मोर्चामध्ये धनगर समाजाचे पितामह जेष्ठ नेते आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब, लोकनेते आण्णासाहेब डांगे, माजी आमदार प्रकाश (आण्णा) शेंडगे, आमदार राम वडकुते साहेब, आमदार रामहरी रूपनर साहेब, आमदार नारायण(आबा) पाटील, मा.संजय(आण्णा) क्षीरसागर, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष मा.विश्वासराव देवकाते (नाना पाटील), मा.शशिकांत तरंगे साहेब, मा.उत्तमराव जानकर, मा.अर्जून दादा सलगर, मा.सुरेश(भाऊ) कांबळे तसेच मा.रामभाऊ लांडे, मा.सिद्धेश्वर आवारे, स्वता मोर्चाप्रसंगी स्टेजवरून सुत्रसंचालन करणारे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब हे देखिल तमाम यशवंत युवा सैनिकांच्या फौजफाट्यासह मोर्चात सहभागी झाले होते. यशवंत युवा सेनेचे पदाधिकारी हे स्वताहून स्वयंसेवकासारखे या मोर्चात काम करत होते त्यामध्ये बिरूदेव शिंगाडे, ॲड.रविकिरण कोळेकर, उमेशराजे अनुसे, अवधूत वाघमोडे, बालाजी सलगर तसेच अन्य ज्ञात अज्ञात कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाला आठ दिवसाचे अल्टिमेटम दिले असून जर आठ दिवसांत यावरती निर्णय झाला नाही तर यशवंत युवा सेनेच्या वतीने उग्र आंदोलन करून सोलापूर विद्यापीठाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे यांनी दिला आहे.
मोर्चात सहभागी होऊन मोर्चा यशस्वीरित्या पार पाडला आणि सरकारच्या पायाखालची वाळूच सरकली त्यामुळे या मोर्चात सहभागी झालेल्या सर्व मोर्चेकऱ्यांचे, अहिल्याईंच्या लेकींचे व सर्व यशवंत मावळ्यांचे, माता-भगिनींचे हर्दिक अभिनंदन व आभार.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
आपलाच,
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Monday, 28 August 2017

ही तर येणाऱ्या वादळाची सुरवात आहे...


आज सोमवार दि.२८ आॅगस्ट २०१७ रोजी सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण लढ्यात महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधव एकवटला होता. जिकडे पहावे तिकडे सोलापूर शहर अगदी पिवळे पिवळे झाल्याचे दिसून येत होते. सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ वाढेल असे विधान शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांनी केल्याने धनगर समाज बांधवांच्या भावना भडकल्या आणि स्वता लोकप्रतिनिधींनी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा अपमान केल्याने धनगर समाजाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा आयोजित केला होता. लाखोंच्या संख्येने धनगर समाजबांधव, माता-भगिनी, समाजातील सर्व संघटना तसेच सर्व पक्षातील धनगर समाजातील तसेच धनगरेत्तर नेते या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य सरकार हे नेहमीच धनगर समाजाच्या मांगण्याचा कधीच विचार करत नाही परंतू डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत अधिकार दिल्याने आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी लाखोंच्या संख्येने धनगर समाज रस्त्यावर उतरला व एकप्रकारे सरकारला दाखवून दिले की आम्ही अजूनही संघटित आहोत. एखाद्याला सत्तेत कसं आणायचं अथवा सत्तेतून खाली कसं खेचायचं हे आम्हाला चांगलं जमतं. जर या गोष्टींची तात्काळ अंमलबजावणी होत नसेल तर आज जसा शांततेने मोर्चा काढला होता तसा भविष्यात शांत राहणार नाही. मोर्चाला उग्र स्वरूप कसे आणायचे हे आम्हाला चांगलेच कळते. त्यामुळे राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव देऊन विद्यापीठाचा सन्मान करावा अन्यथा धनगर समाजातील युवा वर्ग शांत बसणार नाही मग होणाऱ्या परिणामास राज्य सरकार व प्रशासन व्यवस्था जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
स्त्री शक्ती ही महान शक्ती आहे त्यामुळे अहिल्याईंच्या लेकी अशाच मोर्चात सहभागी होत राहिल्या तर सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू. त्यामुळे समाजबांधवांनी जास्तीत जास्त माता-भगिनी मोर्चात कशा सहभागी होतील त्यासाठी प्रयत्नशील राहावे व अशीच धनगर समाजाची एकजूट दाखवावी ही नम्र विनंती. आजच्या या विराट मोर्चात प्रत्यक्षरित्या अथवा अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या सर्व अहिल्या कन्यांचे, माता-भगिनींचे, समाजबांधवांचे हर्दिक हर्दिक अभिनंदन.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
आपलाच,
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com