Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday, 12 October 2019

संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व कधीच संपत नसते... ✍️नितीनराजे अनुसे


        लोकसभा झाल्या की लगेच विधानसभेच्या निवडणूकीचे पडघम वाजू लागल्याने राजकीय खेळींना आणि त्यावरती होणाऱ्या चर्चांना मात्र उधाण आले आहे. राजकारण म्हंटलं की चढ-वरचढ, हल्लाबोल-प्रतिहल्लाबोल, टिका-टिप्पणी इत्यादी इत्यादी आलेच. मग त्यातून काहीजण भाजून निघतात, पोळून निघतात तर काहीजण सुखावतात.
        पैशातून सत्ता मिळवून पुन्हा सत्तेतून पैसा मिळवणे व पुन्हा पुन्हा तेच चक्र चालू ठेवून काही ठराविक जातीतील प्रस्थापित नेत्यांनी राजकारण म्हणजे जणू काय परंपरागत व्यवसाय/साधन करून ठेवले आहे. मग त्यातूनच अहंकार, दादागिरी, टगेगिरी, गुंडगिरी, अरेरावी, शिवीगाळ, उगरटपणा/उर्मटपणा स्वाभाविकपणे येतोच कारण सत्तेचा आणि पैशाचा माज त्यांना चढलेला असतो. आणि विशेष म्हणजे अशी माजलेली आणि मस्तावलेली नेतृत्वं लवकर संपतात त्याचे एकमेव कारण म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र तो "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा त्याचप्रमाणे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा." डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतूनच अशा लोकशाहीसाठी मारक असलेल्या तथा माजलेल्या आणि मस्तावलेल्या प्रस्थापित व्यवस्थेला राजकारणातून संपण्याशिवाय पर्याय नाही.
       मात्र जे जे नेतृत्व संघर्षातून, खाचखळग्यातून, काट्याकुट्यातून, दगडधोंडे तुडवत, डोंगर-दऱ्यांच्या कड्याकपाऱ्यांतून वाट काढत काढत पुढे आले आहे नेतृत्व कधीच संपणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अलिकडेच भाजप ने ना.महादेवजी जानकर साहेब यांना धोका देऊन रासपच्या उमद्वारांचा भाजपच्या ए बी फॉर्म वरती उमेद्वारी अर्ज भरल्याने महादेवजी जानकर साहेबांना समाजाने ट्रोल करत भाजपने फसवणूक केल्याबद्दल चिंता व्यक्त केली शिवाय काल परवा वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये गेलेले मा.गोपीचंद पडळकर साहेब यांना मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट बारामती विधानसभा लढण्यासाठी पाठवल्याने पडळकर साहेब हे सुद्धा चांगलेच ट्रोल झाले.
       खरंतर ही दोन्ही नेतृत्वंच नाही तर धनगर समाजातील अनेक नवनवीन नेतृत्वं ही संघर्षातूनच पुढे आलेली आहेत. पावलोपावली आस्मानी सुलतानी संकटांचा सामना करत हे नेते आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्य पटलावरती येऊन पोहचले आहेत. परंतु त्यासाठी त्यांना काही राजकीय चाली खेळाव्या लागल्या आणि स्वाभाविकच ते खेळले सुद्धा. ज्या प्रमाणे बुद्धीबळाच्या खेळात प्यादे, वजीर, घोडा, उंट, हत्ती (आणि शेवटी राजाचा चेकमेट असतो ) यांच्या प्रत्येकाच्या चाली वेगवेगळ्या असतात त्याचप्रमाणे उत्तम नेतृत्वाला राजकारणाच्या प्रत्येक चाली खेळाव्या लागतात आणि त्या चाली अगदी नियोजनबद्ध पद्धतीने ना.महादेवजी जानकर साहेब व मा.गोपीचंद पडळकर साहेब खेळत आहे असे म्हणायला काही हरकत नाही. काही लोकांना वाटते की त्यांनी समाजाला धोका दिला, समाजाशी गद्दारी केली पण अभ्यासाच्या आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास मला तर तसे काही दिसून आले नाही. त्यासाठी थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास वाचायला हवा. काहीजण म्हंटले महादेव जानकर संपणार त्यांचे रासप संपणार शिवाय गोपीचंद पडळकर यांना बारामती मध्ये उभा करून बळीचा बकरा बनवले आहे अशा प्रकारच्या चर्चांना सोशल मिडियावर खरंतर उधाण आले आहे. परंतु माणदेशी मातीतले हे दोन्ही वाघ कोणताही राजकीय वारसा नसताना आज राजकारणात आहेत शिवाय आज महाराष्ट्राचे राजकारण हे या दोन्ही नावाभोवती फिरतंय याचा अभ्यास आमचे समाजबांधव कधी करणार? ना भाऊ आमदार ना काका खासदार ना वडील पंचायत समिती/जिल्हा परिषदेत नाही आई ग्रामपंचायत सदस्य तर सर्वसामान्य मेंढपाळ कुटुंबातील प्रसंगी अनवाणी पायानं रस्ता तुडवून काट्याकुट्यातून, दगडधोंड्यातून, डोंगर-दरी-खोऱ्यांतून माळरानं तुडवलेली ही नेतृत्वं आहेत ज्यांच्यावर राजकारणाच्या सुरवातीलाच येथील मस्तवाल प्रस्थापित नेत्यांनी सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर दबावतंत्र वापरून छोट्या मोठ्या खोट्या केसेस घालून ही नेतृत्वं संपवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला पण "जो हार मानून माघारी घेईल तो धनगर कसला?" ह्या "झुंज" कादंबरीतीलच नव्हे दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासातील इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आद्यस्वातंत्र्यसेनानी एकमेवाद्वितीय राजाधिराज चक्रवर्ती महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर यांच्याप्रमाणेच या नेत्यांनी कधीच हार मानली नाही. ते लढत राहिले आणि आजही लढताहेत. मान्य आहे की इथली प्रस्थापित व्यवस्था धनगर नेत्यांचे खच्चीकरण करत आहेत, धनगर नेतृत्व संपवण्याचा घाट रचत आहेत. मग तिथे भाजप-शिवसेना असो अथवा कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असो हे जातीयवादी पक्ष  धनगर नेत्यांना काळाच्या ओघात राजकारणातून बाजूला फेकायचे बघत असले तरी धनगर नेतृत्व काय मेल्या आईचं नाहीत प्याले. संघर्षातून पुढे आलेले हे नेतृत्व संपत नाही तर ते उसाळी घेत असते फक्त योग्य काळाची आणि वेळेची गरज असते. हेच संघर्ष कोळून प्यालेले नेते त्याच प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून नक्कीच दिल्लीचे तख्त पुन्हा एकदा धनगरांच्या हातात घेऊन राजा सम्राट अशोकांचं, होळकरशाहीचे संस्थापक मल्हारराजे होळकर यांचे स्वप्न साकार करतील. धनगर समाज बांधवांनी संयम राखून आपल्याच माणसाला साथ द्यायचं व त्याचे मनोबल वाढवायचं आद्यकर्तव्य बजावायला हवे असे मला वाटते. समाजात अजूनही एकीचे बळ तयार झाले नाही परंतु ज्यादिवशी हे एकीचे बळ तयार होईल तेव्हा पौराणिक कथेतील ३३ कोटी देव जरी खाली उतरले तरी समाजाचे कोणी वाकडे करू शकणार नाही हे समाजबांधवांनी लक्षात घ्यायला हवं.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

No comments:

Post a Comment