Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Tuesday, 30 May 2017

होळकर कालीन बारव्यांच्या शोधात भाग-१

*पुरातन बांधकामाचे सुशोभिकरण*
काल दि. २९ मे २०१७ रोजी राज्य महामार्ग क्र. १४३ मल्हारपेठ-पंढरपूर रोड वरती माणदेशातील सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यांतील निंबवडे गावाच्या ईशान्येकडील माण तालुक्याच्या हद्दीत असलेल्या होळकर कालीन बारव्याची पाहणी करताना मी स्वता व आमचे मित्र यशवंत युवा सेनेचे कार्यकर्ते पप्पू शिंगाडे, सुमितराव मेटकरी व अतीश कोळेकर.
रणरागिणी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी केवळ त्यांच्या इंदौर राज्यापुरताच मर्यादित राज्यकारभार केला नाही तर अखंड भारत देशभर त्यांनी विकासकामे केली. प्रशासन व्यवस्थेवर त्यांची चांगलीच जरब असायची. देशभर विकासकामे त्यांनी स्वताच्या खाजगीतूनच केली. मग त्यामध्ये काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि द्वारकापासून आसाम पर्यंत सर्व ज्योतिर्लिंगाचा जिर्नोद्धार, नद्यांवरती घाट, विहीरी, शेततळे, तलाव, आश्रमशाळा, वाटसरूंसाठी धर्मशाळा, उपहारगृहे तसेच बारवे यांचे बांधकाम केले होते. त्यातीलच हा एक होळकर राज्यकालीन बारवा. सद्या हा बारवा पडझड झालेल्या अवस्थेत असून  यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने यशवंत युवा सेना शाखा निंबवडे येथिल युवा कार्यकर्त्यांसह राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारव्याचे सुशोभिकरण व बांधकाम करणार आहोत.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
http://nitinrajeanuse.blogspot.in/2017/05/blog-post_30.html?m=1

पंढरीत यशवंत युवा मेळावा उत्साहात साजरा

देवाची पंढरी, विठ्ठलाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीतील नेपतगाव येथे राष्ट्रमाता रणरागिणी अहिल्याई होळकर यांच्या २९२ व्या जयंतीनिमीत्त यशवंत युवा सेना शाखा नेपतगाव च्या वतीने भव्य यशवंत युवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. न्यायालयीन लढाई संदर्भात बोलताना मा.निवांत कोळेकर सर यांनी समाजाला योगदान देण्यास प्रवृत्त केले.  ७५० वर्षापेक्षाही जास्त राज्यकारभार या भारत देशावर आणि आशिया खंडावर केला असताना देखिल आज धनगर समाज प्रस्तापितांच्या राजकीय आणि सामाजिक दबावाखाली पिचत पडला असून धनगर समाजाला इथून पुढे सक्षम आणि सशक्त करण्यासाठी सर्वप्रथम समाजातील मुले-मुली सुशिक्षीत व्हायला हवीत, समाजाचा आर्थिक समतोल मजबूत असायला हवा त्यासाठी विशेषता युवा वर्गालाच जबाबदारीने काम करावे लागणार असल्याचे टिंग्या फेम व बब्या चित्रपटाचे युवा दिग्दर्शक शरद गोयेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर समाजाच्या न्याय व हक्कासाठी सर्वोतपरी जी काही मदत लागेल त्यास हातभार लावणार असल्याचे देखिल दिग्दर्शक शरद गोयेकर यांनी सांगितले.
समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपले नेतृत्व सक्षम असायला हवे कारण ज्या घराचा कर्ता हा लायक असेल सक्षम असेल मजबूत असेल तर त्या  घरावरती भिक मागायची वेळ कधी येणार नाही आणि त्या धराचा कर्ता जर बलशाली असेल तर त्या घराकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत कोणाची होणार नाही असे प्रतिपादन यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाद्यक्ष मा.प्रा.सचिन होनमाने सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी फसणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला तर गेल्या वर्षी ३१ मे २०१६ ला आश्वासनाच्या माध्यमातून सोलापूर विद्यापीठाचे नामकरण राष्ट्रमाता अहिल्याई होळकर विद्यापीठ करणार असल्याचे सांगितले होते पण तसे जाहीर केले नाही पण जर या ३१ मे २०१७ रोजी अशी घोषणा झाली नाही तर पुढील १० दिवसाच्या आत सोलापूर विद्यापीठावर हजारोंच्या लाखोंच्या संख्येने जाऊन यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने आंदोलन करणार असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले. त्यासाठी समाजबांधवांनी त्या सरकारला बरं वाटल असे काही करू नये तर त्या सरकारच्या नाकात दम ठोकायची धमक फक्त मल्हारबांच्या मावळ्यात असल्याची जाणीव त्या सरकारला करून द्यावी. शिवाय राजा महाराजांच्या धनगर जमातीत जन्माला आलो असताना गुलामाचे जगणे सोडून द्यावे असे प्रतिपादन यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी केले.
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा राजकीय पक्षांशी काहीएक संबंध नसून राजकीय नेतृत्व घडवण्यासाठी व ती मजबूत करण्यासाठी यशवंत युवा सेना ही क्रांतीकारी संघटना कार्य करतेय असे स्व.बी.के.कोकरे साहेबांतचे वारसदार मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत युवा सेना प्रमुख कोकरे साहेब होते तर यशवंत युवा सेना नेपतगाव या शाखेचे उद्घाटन टिंग्या फेम शरद गोयेकर, प्रा.सचिन होनमाने सर,निवांत कोळेकर सर, मा.तानाजी खरात साहेब तसेच अन्य प्रमुख पाहुणे व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Saturday, 27 May 2017

अहिल्या शिक्षण मंडळात भोंगळ कारभार

समाजातील विद्यार्थीनींची शिक्षणाबाबतची गैरसोय होऊ नये त्याचप्रमाणे स्पर्धात्मक परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी यासाठी पुणे येथिल पंढरी असलेली अहिल्या शिक्षण संस्था ज्या हेतूने स्थापण करण्यात आली तो हेतू धनगर समाजातील काही नालायक नेत्यांच्या भ्रष्टपणामुळे लालसीपणामुळे कुठेतरी लोप पावतोय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. पुणे येथील अहिल्या शिक्षण संस्थेत जो काही प्रकार चालू आहे तो धनगर समाजाला लाजवणारा असून ज्यांच्या बापजाद्यांनी सरकारी खात्याच्या जमिनीवर ही अहिल्या शिक्षण संस्था उभी केली त्या स्व.शिवाजीराव शेंडगे यांचे वारसदार सुरेश शेंडगे यांनी त्यावरती मालकी हक्क दाखवून अहिल्या शिक्षण संस्थेची जागा व इमारत बळकावण्याचा घाणेरडा प्रकार केलेला आहे याकडे धनगर समाजातील संघटनांचे दुर्लक्ष झाले आहे हे एक दुर्दैवच म्हणावे लागेल. धनगर समाजातील मेंढपाळांची मुले उच्चशिक्षणासाठी पुणे येथे आल्यानंतर त्यांच्या राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शासकीय मालकीच्या जागेवर अहिल्या शिक्षण मंडळाची वास्तू उभी राहिली व त्याचा लाभ मेंढपाळांच्या मुला-मुलींना होत होता परंतु स्व.शिवाजीराव शेंडगे यांच्या पाश्चात्य त्यांचे वारसदार सुरेश शेंडगे व सचिव कुंडलिक वळकुंदे यांनी मनमानी कारभार करून धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेले वसतिगृह व वसतिगृहाच्या खालील असलेले पार्किंग (वाहनतळ) बंद करून तेथे स्वताच्या नावाने सुरेश शेंडगे अभ्यासिका चालू केलेली आहे.
एवढेच नव्हे तर अहिल्या शिक्षण मंडळ पुणे येथिल वसतिगृहाची काही इमारत ही आयसीआयसीआय बॅंकेस व एका शोरूमसाठी भाड्याने देण्यात आली असून धनगर समाजातील विद्यार्थ्यांवर टांगती तलवार आली आहे. पुर्वी जवळजवळ १००० विद्यार्थी या अहिल्या शिक्षण मंडळ पुणे येथे प्रवेश घेत होते पण आयसीआयसीआय बॅंक व शोरूम साठी जागा भाड्याने दिल्याने आता फक्त ५००-७०० विद्यार्थी येथे वास्तव्यास आहेत. पैशांच्या लालसेपोटी या महाभागांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून १००० रू प्रति महिना शुल्क आकारला आहे. म्हणजेच एका विद्यार्थ्यांपाठीमागे प्रत्येक महिन्याला १००० ₹ तर ५०० विद्यार्थ्यांचे ५ लाख रूपये होतात तसेच आयसीआयसीआय बॅंक व शोरूमचे प्रत्येक महिन्याला अंदाजे ४०-५० हजार रूपये सुरेश शेंडगे यांच्या खिशात जातात याची चौकशी आजपर्यंत कोणीच केली नाही. सुरेश शेंडगे व कुंडलिक वळकुंदे यांच्या या मनमानी कारभाराबद्दल जर कोणी आवाज उठवला तर स्थानिक गुंड पाठवून त्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे घाणेरडे प्रकार केलेले आहेत शिवाय ज्यांनी ज्यांनी या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला त्या त्या विद्यार्थ्यांना १०-१५ हजार रूपये देऊन मॅनेज करणे अथवा आवाज उठवणाऱ्यांना मोफत प्रवेश देऊन प्रकरण थांवण्याचा प्रकार अहिल्या शिक्षण संस्था पुणे येथे घडत असल्याने त्याचा परिणाम नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. शिवाय सुरेश शेंडगे आणि त्यांचे इतर सर्व बंधू हे दलबदलू अाहेत व विविध पक्षाचे लागेबंध असल्याने त्यांच्यावर कोणाचेही बर्डन अर्थातच दबाव नाही त्यामुळेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
सुरक्षेच्या नावाखाली महिलांना संस्थेत घेऊन तर नविनच षड्यंत्र शेंडगे यांनी रचले असून या नेत्यांच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त झालेला एखादा नविन विद्यार्थी जर संस्थेतील कमीटीवरती कार्यवाही करण्यासाठी तक्रार देत असेल तर त्या विद्यार्थ्याला विनयभंगाच्या कायद्यात अडकवण्याचेही घाणेरडे राजकारण अहिल्या शिक्षण संस्था पुणेचे सुरेश शेंडगे आणि त्यांचे सहकारी करत आहेत त्यासाठी त्यांनी पवार या महिलेला पुढे करून विद्यार्थ्यांना अडकवण्याचे घाणेरडे प्रकार केलेले आहेत. जर कोणी नविन विद्यार्थी प्रवेश घ्यायला या संस्थेत गेले तर त्यांना पवार नावाची महिला ही *धनगर* ऐवजी एन टी सी च्या जागा संपल्या आहेत असे सांगून दमदाटी करत असते त्या पवार नावाच्या बाईला धनगर म्हणायची खरंतर लाज वाटतेय की काय कोणास ठाऊक?? कारण संस्था ही फक्त धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी असताना एन टी सी चा संबंधच काय? जर कोणी विद्यार्थी वरचडपणा करत असेल तर त्याने विनयभंग केल्याचे स्वःताच सांगते व खालच्या पातळीचे शब्द वापरून विद्यार्थ्यांना त्रास देत असते याची खरोखर त्या महिलेऐवजी विद्यार्थ्यांनाच लाज वाटते. तिथे महिला असल्या कारणाने तेथिल विद्यार्थी काहीच न बोलता हतबल होऊन जातात हे कुठेतरी थांबायला हवे यासाठी सर्व सामाजिक संघटनांनी अशा पैशासाठी हपापलेल्या धनसंपती पिपासू लोकांना धडा शिकवावा व समाजातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. २०१६ मध्ये शनिवार वाडा येथे कार्यक्रमानिमीत्त मा.प्रकाश शेंडगे यांना विद्यार्थ्यांनी गेहराव घालून या प्रकाराबाबतचा जाब विचारला असता स्व.शिवाजीराव शेंडगे यांनी उभा केलेल्या अहिल्या शिक्षण मंडळाशी माझा काहीही संबंध नाही असे सांगून दाखवायचे दात वेगळेच असल्याचा आव आणला पण त्या सर्वांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे मात्र समाजबांधवांनी चांगलेच ओळखले आहे. समाजहिताचा वसा घेऊन आज प्रत्येकजन समाजासाठी संघर्ष करतोय लढतोय झगडतोय पण आपल्यातल्याच औलादी समाजातील विद्यार्थ्यांसोबत असे वागत असतील तर समाजबांधवांनी त्यांना डोक्यावर घेण्याऐवजी पायाखाली घ्यायला पाहिजे. अहिल्या शिक्षण मंडळ पुणे असे या संस्थेला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांचे नाव दिले असताना त्यांचेच वारसदार महिलेचा वापर करून विनयभंगाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करतात याची खरंतर त्या संबंधितांना लाज वाटायला हवी. काही दिवसांपूर्वीच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कार्यवाही करण्यासाठी आवाज उठवला त्यांना अभ्यासिकेतून काढून टाकण्याचे षड्यंत्र रचून नोटीस काढली होती पण कोणत्याही दिवसाची अथवा वेळेची मर्यादा किंवा अंतिम दिनांक दिली गेली नसताना परवा दोन दिवसांपूर्वीच त्या त्या विद्यार्थ्यांच्या खोल्या लाॅक करून त्यांना सील करण्यात आले आहे. तेथिल विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे तसेच दैनंदिन जीवनातील वापरात असलेले सर्व सामान हे लाॅक केले असल्याने विद्यार्थ्यांना पुणे सारख्या ठिकाणी उघड्यावर रहावे लागत आहे याची दखल समाजातील नेत्यांनी घ्यायला हवी त्याचबरोबर बापजाद्यांच्या नावावर मालकी हक्क दाखवणारी व्यवस्था बाजूला सारून अहिल्या शिक्षण प्रसारक मंडळावर प्रशासक नेमायला हवेत. समाजातील निर्दयी व्यक्तींनी केलेला हा किती भयानक प्रकार पाहायला भेटतोय हे पाहून तळपायाची आग पार मस्तकापर्यंत जाते आहे. सर्व समाजबांधवांनी कृपया अशा घटनेचा व त्या संबंधित व्यक्तींचा निषेध करायला हवा त्याचबरोबर खालील संपर्क क्रमांवरती फोन करून त्या संबंधितांना या प्रकरणाचा जाब विचारावा ही विनंती.
सुरेश शेंडगे - 9867423333
कुंडलिक वळकुंदे - 9822187596

जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday, 26 May 2017

आज वाढदिवस कोकरे साहेबांचा

  स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचा वारसा जोपासणारे त्यांच्याच विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे निर्भिड आणि निडर लढाऊ नेतृत्व यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेकजी कोकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा.
खरंतर २६ मे हा दिवस खरोखरच सुवर्णाक्षरात कोरून ठेवण्यासारखा आहे कारण याच दिवशी भारताच्या इतिहासात आठराव्या शतकात होळकरशाहीची स्थापना झाली होती. त्यामुळे २६ मे या दिवसाला अनन्य साधाराण महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्यातील तमाम युवकांचे प्रेरणास्थान म्हणून राज्यभर ज्यांचा नावलौकिक आहे असे सुप्रसिद्ध व्याख्याते आणि परखड वक्ते म्हणून त्यांची समाजात आज ओळख आहे. लहानपणापासूनच वक्तृत्वाची आवड असलेल्या कोकरे साहेबांच्या अंगी नेतृत्व गुण कसे काय विकसित होऊ लागले नाही हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. त्यांच्या अंगी असलेल्या नेतृत्वामुळे व निस्वार्थीपणाने समाजकार्य करण्याच्या त्यांच्या या प्रवृत्तीमुळे १९ जून २०१६ रोजी सांगोला जि.सोलापूर येथे यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी सामाजिक संघटनेची स्थापना करून संघटनेच्यावतीने प्रमुखपदाची धूरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली. धनगर समाजाचे क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब यांचे राहीलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा करारी बाणा, महाराजाधिराज छत्रपती यशवंतराव होळकर यांची दुरदृष्टी डोळ्यासमोर ठेऊन व अहिल्याचरणी नतमस्तक होऊन आणि भंडारा उधळून समाजाला  न्याय व हक्क मिळवून देण्यासाठीच माझा जन्म झाला आहे असे छातीठोकपणे सांगून यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे प्रमुख पद मा.विवेकजी कोकरे साहेब स्वीकारले.
आज महाराष्ट्र राज्यभर राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या जयंतीनिमीत्त समाजाचे प्रबोधन करण्यासाठी जणू काय त्यांनी विडा उतलेला आहे की काय हे कोणास ठाऊक... आपल्या व्याख्यानातून भाषणातून समाजबांधवांना मंत्रमुग्ध करून टाकणारी विवेक कोकरे साहेबांची भाषणं ऐकली तर आजही अंगावर शहारे येतात आणि खरं सांगायचं म्हणजे स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या आडनावांचा सांधर्म्य म्हणावा की योगायोग हे मला माहित पण जेव्हा जेव्हा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब जाहीर स्टेजवरून बोलायला लागतात तेव्हा ते शब्द स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या मुखातून पडत आहेत की काय असाच काही भास होतो. अर्थातच यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या रूपात आम्ही स्व.बी.के.कोकरे साहेबांना पाहतो.त्यांच्या या वक्तृत्वाने आणि नेतृत्वाने प्रेरित होऊन हजारो समाजबांधव युवा वर्ग उत्स्फूर्तपणे यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी संघटनेचे भागीदार होत आहेत. आज यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेला यशवंत मावळ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून धनगर समाजाला एका छत्रीखाली आणण्याचे स्व.बी.के.कोकरे साहेबांचे स्वप्न त्यांच्याच विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेबच पूर्ण करणार हे ही तितकेच सत्य आहे. यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांचे नेतृत्व नेहमीच समाजाच्या न्याय व हक्कासाठी कामी येवो व त्यांच्या हातून असेच निस्वार्थीपणाने अखंड आणि अविरत समाजकार्य घडो हीच त्यांच्यावाढदिवसानिमीत्त मल्हारचरणी छोटीशी प्रार्थना.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Sunday, 14 May 2017

धनगर समाजाचे उपकार नेत्यांनी विसरू नयेत

धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालो असे जाहीर वक्तव्य स्वता देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणातून करतात कदाचित फसणवीसांची धनगर समाजाला फसवण्याची ही वेगळीच खेळी असू शकते. पण खैर त्याच सत्ताधारी पक्षामध्ये ना.प्रा.राम शिंदे साहेब आणि ना.महादेव जानकर साहेब हे कॅबिनेट मंत्री आहेत ते फक्त आणि फक्त माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजामुळे आहेत हे विसरून चालणार नाही. *धनगर समाजामुळे मी मंत्री झालो नाही* हे मंत्री महोदय ना.जानकर साहेबांनी जे विधान केले ते त्यावरती गेल्या आठवड्यापासून उलट सुलट चर्चा ऐकायला भेटतात परंतु हे समाजाच्या भावना दुखावणारे विधान ना.जानकर साहेबांना भविष्यात महागात पडू शकते यात काही शंकाच नाही. ना.जानकर साहेबांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी हे विधान केले असेल ते त्यांच्या परीने योग्य आहे कारण एकट्या धनगर समाजाच्या जोरावर पक्ष चालवणे हे शक्य नाही.  त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे आणि जानकर साहेब हे बहुजनांचे नेते आहेत ते एकट्या धनगर समाजाचे नेते नाहीत. म्हणून त्यांनी केलेल्या विधानाकडे राजकीय वर्तुळातून पाहिल्यास काहीच गैर नाही पण सामाजिक वर्तुळातून त्याकडे जर कटाक्ष टाकला तर ते विधान माझ्या धनगर समाजाच्या जिव्हारी लागल्याशिवाय राहणार नाही.
१९९३ नंतर जेव्हा स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या यशवंत सेनेचा सरसेनापती होण्यासाठी मुलाखती घेतल्या गेल्या तेव्हा जानकर साहेबांना सरसेनापती घोषित करण्यात आले त्यानंतर सामाजिक चळवळीत झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांनी संघटनेच्या प्रचार व प्रसारासाठी निधी उभा केला तो केवळ धनगर समाजामुळेच... यशवंत सेना गावागावत वाडीवस्तीवर पोहचली होती ती केवळ धनगर समाजामुळेच... आटपाडीमधील कार्यकर्त्यांनी विटा.ता.खानापूर जि.सांगली येथे यशवंत सेना सरसेनापती जानकर साहेब यांना स्काॅर्पियो प्रदान करण्यात आली होती ती केवळ धनगर समाजबांधवांनी दिलेल्या निधीमुळेच... २००३ साली त्याच यशवंत सेनेचे राष्ट्रीय समाज पक्षात विलीनीकरण केले गेले तेव्हा राज्यभर आणि महाराष्ट्र राज्याबाहेर जानकर साहेब दौरे करायचे ते ही धनगर समाजातील समाजबांधवांनी पेट्रोलसाठी स्वताच्या खिशातून शंभर-दोनशे रूपये दिल्यामुळेच... जोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाने बाळसे धरले नव्हते तोपर्यंत धनगर समाजातील कार्यकर्त्यांनीच स्वताच्या खिशाला झळ लावली, ऐन दुष्काळात जनावरांसाठी छावण्या असताना देखिल आपलाच माणुस म्हणून जानकर साहेबांना दौऱ्यासाठी पेट्रोलसाठी खिसे रिकामे केले आणि जानकर साहेब राज्यभर नव्हे तर अखंड देशभर पक्षाचा प्रचार व प्रसार करू लागले तेही धनगर समाजामुळेच... जसजसा पक्ष वाढला तसतशी राजकारणाची हुकी आलेले धनगर व धनगरेतर बलाढ्य, धनाढ्य नेते पक्षप्रवेश करून पक्षाला पैसा पुरवू लागले तेव्हा आजपर्यंत यशवंत सेनेसाठी आणि राष्ट्रीय समाज पक्षासाठी झिजलेले हाडामांसाचे धनगर समाजातील कार्यकर्ते हळूहळू बाजूला होत गेले व इतर समाजातील धनाढ्य बलाढ्य पैसेवाले राजकीय नेते जानकर साहेबांच्या जवळ जाऊ लागले मागेपुढे करू लागले त्यातूनच बहुजनांचा पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष अशी ओळख आम्हीच म्हणजे धनगर समाजातील कार्यकर्ते सांगू लागलो.
आज राष्ट्रीय समाज पक्ष लहानाचा मोठा झाला, हाडामांसाचे चळवळीत झिजलेले कार्यकर्ते पैशाने गरीब असल्याने आपोआप बाजूला वळचणीला पडले ते फक्त झेंडे वागवण्यासाठीच... पण झेंडा खाली तरी कसा टाकणार कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे झाड हे खडकावर लावल्याने फळे उशिरा येतील पण ज्यांना लवकर फळे चाखायची असतील ते पक्षातून बाहेर पडतील असा समज राष्ट्रीय समाज पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आहे पण २० फेब्रुवारी २०१३ रोजीचा कटगुण जि.सातारा येथील (कार्यक्रमास मी स्वता उपस्थित होतो) तो प्रसंग आठवला तर मला तो 'लवकर अथवा उशिरा फळांबाबतचा' जो समज आहे असे काही वाटतच नाही. कारण ज्या पश्चिम महाराष्ट्र राज्यातून यशवंत सेना व तद्नंतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या चळवळीचा जन्म झाला त्या पश्चिम महाराष्ट्रातून सर्वप्रथमता निधी जमा करून जानकर साहेबांना गाडी प्रदान केली त्याच पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजाला गाडी (एसटी) गेल्यावर गाडीला हात करायची सवय आहे या जानकर साहेबांच्या वक्तव्यानेच मला हैरान केले होते कारण गाडी (एस टी) आल्यानंतर सर्वात पहिले तिकीट काढलेला पश्चिम महाराष्ट्रातील माझा भोळा भाबडा धनगर समाज सढळ हातानेच पक्षासाठी खिशातून पैसा काढत होता. मग आजपर्यंत चळवळीत संघटनेसाठी आणि पक्षासाठी झिजलेल्या कार्यकर्त्यांची काय किंमत राहिली?? असो... हा लेख त्यांना विरोध करण्यासाठी अथवा समर्थन करण्यासाठी नसून वस्तुस्थिती सांगण्यासाठी आहे कोणीही वाईट घेऊ नये.
पण गेल्यावर्षी एका ठुकार पत्रकाराने बातमी दिली की जानकर साहेब म्हणताहेत "धनगर समाजाने मला फसवले" या बातमी नंतर आम्ही त्या ठुकार पत्रकाराचा चांगलाच समाचार घेतला होता, भगवानगडावरील पवारांच्या विरोधातील वक्तव्यांने अख्खा महाराष्ट्र उलट सुलट चर्चा करत असताना जानकर साहेबांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय असे ब्लाॅगच्या माध्यमातून जानकर साहेबांवर केलेले आरोप आम्ही खोडून काढले http://nitinrajeanuse.blogspot.in/2016/10/blog-post.html?m=1 महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाज तेव्हा जानकर साहेबांचे समर्थन करत होता. जेव्हा जेव्हा धनगर समाजाचे नाव पुढे करून जानकर साहेबांना अडवण्याचे घाणेरडे राजकारण केले जायचे तेव्हा दुसरे कोणी नव्हे तर धनगर समाजातील कार्यकर्ते आपापल्या परीने लढायचे आणि आजही लढताहेत. १५ जुलै ते २१ जुलै २०१४ आरक्षण दींडी निघाल्यानंतर आमरण उपोषण सोडण्याच्या दिवशी स्वता देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेट मध्ये धनगर जमातीला आरक्षण देणार असल्याचे कबुल केले तेव्हा आरक्षण दिंडी मध्ये स्वता जानकर साहेब देखिल सामिल झाले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाने एकगठ्ठा मतदान धनगर समाजातील नेत्यांमुळेच भाजपाच्या पारड्यात टाकले आणि भाजपला सत्तेवर आणले. भाजपासोबत युती झाली असल्याने व धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते शिवाय धनगर समाजाला दोन कॅबिनेट मंत्री पद द्यायची बोलणी देखिल झाली असल्याने त्यानुषंगाने भाजपचेच विधानसभा सदस्य ना.प्रा.राम शिंदे हे गृहराज्य मंत्री असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष असलेल्या जानकर साहेबांना कॅबिनेट मंत्री पद देणे उचित वाटत नव्हते. म्हणून प्रथमता ना.प्रा.राम शिंदे साहेब यांना कॅबिनेट मंत्री व तद्नंतर ना.महादेवजी जानकर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. हे सर्व झाले ते फक्त धनगर समाजामुळेच झाले कारण भाजप सरकारला आणि परिणामी आघाडी सरकारला देखिल कळून चुकले होते की धनगर समाज मनात आणलं तर काय करू शकतो आणि काय नाही... त्यामुळे धनगर समाजामुळे मी मंत्री झालो नाही हे विधान सामाजिक वर्तुळातून समाजाच्या भावना दुखावणारे आहे.
काहीजण म्हणाले की जर शरद पवार यांनी असे मराठा समाजाबद्दल वक्तव्य केले असते तर मराठा समाजबांधवांनी अभिमानाने सांगितले असते की आमचा नेता अठरा पगड जातीला सोबत घेऊन जातो पण हे नुसतेच बोलून नव्हे तर कृतीतून दाखवून द्यायचे असते. शरद पवारांनी बहुजनांच्या नावाखाली सत्ता गाजवली पण कामं फक्त त्यांच्याच जातीतील पाहुण्याराऊळ्यांचीच केली. त्यांनी आपापली आणि आपापल्या बगलबच्च्यांची घरे भरली आहेत आणि त्यांचे बगलबच्चे देखिल तीच पवार नीती वापरत आहेत म्हणून त्यांना फरक पडत नाही तर फरक पडतो तो आपल्या शेळ्या-मेंढ्या राखून पायाच्या नडग्या वाळवणाऱ्या माझ्या वडिलधारांना मेंढपाळांना... ज्यांनी ऊन वारा पावसाचा विचार न करता पै पै कमवली होती ती चळवळीसाठी पक्षासाठी दिली... फरक पडतो त्या हाडामांसाच्या कार्यकर्त्यांना ज्यांनी काॅलेज शाळा बुडवून  पक्षाचा प्रचार प्रसार केला जे आज बेरोजगारीच्या नावखाली सडत पडलेले दिसतात.... फरक पडतो त्या तरूणांना जे पक्षाच्या प्रचार व प्रसारासाठी नोकरीवर टांगती तलवार ठेवून घरादाराचा विचार न करता पक्षासाठी रस्त्यावर उतरतात... राजकारण हे नेहमीच राजकारणाच्या पद्धतीनेच चालावे व समाजकारण हे समाजकारणाच्याच पद्धतीने... पण जर राजकारण करत असताना समाजबांधवांच्या भावना समजून घेणे फार महत्वाचे असते. ना.जानकर साहेबांच्या या वक्तव्याचे समर्थन करताना आणि या वक्तव्याचा विरोध करताना दोन्हीकडील कार्यकर्ते कोणत्या थराला जाऊन समर्थन करत आहेत याचे भान त्यांना राहत नाही म्हणून मला थोडंफार लिहावसं वाटलं.
खरंतर कोणीही या बाबतीत गैरसमज करून घेऊन नये कारण सांगायची वस्तुस्थिती अशी की नेता अथवा मंत्री मग तिथे कोणीही असो ज्या समाजात तो जन्माला आला आहे त्या समाजाशी त्याची नाळ जोडलेली असते हे सर्वज्ञात असतेच पण उगाचच केवळ राजकारणासाठी मी या समाजामुळे मंत्री झालो नाही त्या समाजामुळे झालो नाही असे जाहीर वक्तव्य करू नये. अशा वक्तव्यातून तुम्हाला इथपर्यंत पोहचवणाऱ्या माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाच्या भावना दुखवू नयेत अन्यथा हा भोळा भाबडा धनगर समाज जवळ यायच्या ऐवजी तुमच्यापासून खूप  दूर जाईल अर्थातच हा समाज पुन्हा जर का अंधकारात ढकलला गेला तर या समाजाला पुन्हा प्रकाशात यायला फार काळ लागेल.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

https://m.facebook.com/nitinrajeanuse123/

Thursday, 4 May 2017

धनगर समाजाला प्रबोधनाची गरज

एकेकाळी राजा जमात असलेल्या धनगर समाजाची स्वातंत्र्यानंतर अवहेलनाच झाली. आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, राजा सम्राट अशोक, श्रीमंत थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, राष्ट्रमाता रणरागीणी अहिल्याई होळकर, छत्रपती महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर, विरांगणा भिमाई होळकर अशा थोर महापुरूषांचा राजामहाराजांचा वारसा लाभलेल्या या धनगर जमातीची पिचेहाट का झाली? कोणामुळे झाली? कशी झाली? याचा विचार केला, त्यावरती चिंतन केले, मनन केले तर खरोखर एकेकाच्या तळपायाची आग पार मस्तकापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे धनगर जमातीचे अज्ञान आहे आणि धनगर जमातीच्या याच अज्ञानाचा फायदा घेऊन प्रस्तापित व्यवस्थांनी आजपर्यंत कुरघोडीचे राजकारण केले. आजकाल धनगर समाज जागृत झाला शिकला सवरला, लिहायला लागला वाचयला आणि बोलायला लागला अन्यायाच्या विरोधात आवाज देखिल उठवू लागला पण आपल्याच माणसाचे पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती समाजाला अधोगतीकडे घेऊन गेली त्यामुळेच प्रगतीचे द्वार धनगर समाजाला उघडतां आले नाही ही माझ्या धनगर समाजाची सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
आजकाल धनगर समाजाचे एखादे नेतृत्व पुढे येऊ पाहत असेल तर आपल्याच समाजातील लोक त्याचे पाय ओढून त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात ही खेकडा प्रवृत्ती समाजातून जर नष्ट झाली आणि एकमेकांच्या हातात हात देऊन जर आपण चालत राहिलो तर या देशाचे अर्थकारण, राजकारण, सत्ताकारण आणि समाजकारणाचा केंद्रबिंदू केवळ धनगर समाजच असेल तेव्हा आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, राजा सम्राट अशोकांचे आणि राष्ट्रमाता अहिल्याईंचे स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत धनगर समाजाचे निस्वार्थी, अभ्यासू आणि सक्षम नेतृत्व पुढे येणार नाही तोपर्यंत प्रस्तापितांच्या सत्ताकारणात धनगर समाज असाच पिचत पडेल. त्यासाठी नेतृत्व करणारा नेता हा कोणत्याही पक्षाचा असला तरी चालेल पण त्या त्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना अथवा पक्षांना प्रथम प्राधान्य देण्यागोदर माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाला सर्वप्रथमता प्राधान्य दिले तर समाजाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. धनगर समाजाचे भांडवलीकरण करून जर कोणी नेता स्वताचा स्वार्थ साधत असेल तर त्या नेत्याला डोक्यावर घेण्याऐवजी त्याला पायाखाली घ्यायला समाज मागेपुढे पाहणार नाही त्यासाठी समाजप्रबोधन आणि समाज जागृती फार महत्वाची ठरते. धनगर समाजाच्या संघटनात्मक बाबी या कुमकवत असल्या कारणाने धनगर समाजाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामध्ये पुणे-मुंबई सारख्या शहरातील धनगर समाज सोडला तर खेड्यापाड्यात डोंगरदऱ्यांतून शेळ्या मेंढ्याची राखण करणाऱ्या धनगर समाजाला अनेत समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यासाठी धनगर समाजाचे संघटन मजबूत असायला हवे. धनगर आरक्षण, मेंढपाळांच्या समस्या, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्राबाबतचे प्रश्न, महिला सबलीकरण अशी एक ना अनेक आवाहने धनगर समाजासमोर असताना समाजातील युवकांनी स्वतावरती जबाबदारी घेऊन एकत्रित येऊन समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे.
आजकाल फेसबुक व्हाटसपच्या माध्यमातून पाहत असताना निदर्शनास आलेली गोष्ट म्हणजे धनगर समाजात पोटजातीचं विष विनाकारण कालवले जात आहे ते कुठेतरी थांबावयास हवं अन्यथा एकसंघ होऊ पाहणारा धनगर समाज पोटशाखांमध्ये विखूरला जाईल व भविष्यात एकत्रित नसल्याचा फटका अखंड धनगर समाजास सोसावा लागेल. पोटजाती भेद थांबवा असे सांगणाऱ्या जेष्ठ लेखकांना, समाजप्रबोधक, विचारवंताना शिवीगाळ करण्याचे प्रकार थोरले श्रीमंत सुभेदार मल्हारराजे होळकरांच्या मावळ्यांना शोभत नाहीत कृपया ते समाजहीतासाठी थांबवावेत. आजच्या पिढीला पोटशाखांच्या नावाखाली विनाकारण भडकवले जात आहे त्यामुळे सळसळत्या रक्ताचे तरूण भरकटताना दिसत आहेत ही फार मोठी शोकांतिका असून त्यासाठी युवा वर्गाने पोटशाखा भेद टाळून आंतरपोटजातीय विवाह करून धनगर समाजाला एकत्रित करण्यासाठी योगदान द्यावे व त्यास समाजातील विवीध संस्था तसेच संघटनांनी प्रोत्साहन द्यावे. असे केले तर नक्कीच समाजात जागृती होईल समाजाचे प्रबोधन होईल व त्यानुसरून धनगर समाज एकसंघ व्हायला फार वेळ लागणार नाही.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Tuesday, 25 April 2017

*यशवंत युवा सेना प्रमुख राज्यभर करणार अहिल्यामाईचा जागर*


३१ मे म्हणजे राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा ३९२ वा जयंती महोत्सव अगदी जवळच येऊन ठेपला आहे आणि विशेष म्हणजे त्याचेच औचित्य साधून सामाजिक व क्रांतीकारी संघटना असलेल्या यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेने यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब अहिल्यामाईचा व समाजाचा जागर संपूर्ण महाराष्ट्रबर करणार असल्याचे यशवंत युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मा.उमेशराजे अनुसे यांनी सांगितले. त्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यांतील गावोगावी जाऊन धनगर समाजात व्याख्यानाच्या व समाजप्रबोधनाच्या माध्यमातून जागर करून समाजाला संघटित करणार आहोत असेही सांगितले. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील तमाम यशवंत मावळ्यांनी समाजाला योग्य दिशा देण्यासाठी व समाज संघटित करण्यासाठी सहकार्य करावे

*व्याख्यानासाठी संपर्क*

*निर्भिड व सुप्रसिद्ध व्याख्याते*
*मा.विवेक कोकरे साहेब*
*(प्रमुख यशवंत युवा सेना महा.राज्य)*
*98814 59509*

        🙏यशवंत युवा सेना🙏
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍नितीनराजे अनुसे✍*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday, 20 April 2017

मोदींच्या एकाधिकारशाहीत धनगर समाज भरडतोय...

२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीमध्ये धनगर समाजासमोर हात जोडून मताचा जोगवा मागणारे केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्र राज्यातील फडणवीस सरकार हे सुद्धा पाठीमागच्या आघाडी सरकार प्रमाणेच नपुसंक ठरले. धनगर समाज हा गेल्या ६७ वर्षापासून अनुसुचित जमातीच्या सवलतींपासून वंचित असताना धनगर समाजाला वाटाण्याच्या अक्षता लावायचे काम हे पेशव्यांच्या औलादींनी केले आहे त्यामुळे त्यांच्या पापांचा घडा आता भरत आला असून मल्हार मावळ्यांना आता लढाईला सज्ज व्हावे लागणार आहे. हातात तलवारी घेऊन प्रत्येक धनगर बांधवास छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांचा अवतार घ्यावा लागणार असून पेशवाई नष्ट करावी लागेल तरच धनगर समाजबांधवांना न्याय मिळेल नाही तर मोदींच्या हिटलर शाहीत माझा भोळा-भाबडा धनगर समाज विनाकारण भरडला जाईल.
२०१४ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये सोलापूर येथे व तद्नंतर बारामती येथे स्टेजवरून मोदींनी स्वताहून पवारांवर टिका करत धनगर समाजाला भावनिक करून आरक्षणाचे गाजर दाखवले आणि आज सत्ता आल्यानंतर मात्र धनगर समाजाच्या पाठीत मोदींनी खंजीर खुपसला एवढा मोठा अन्याय माझ्या धनगर समाजावर होत असताना धनगर समाजातील नेते मंडळी मात्र मूग गिळून गप्प आहेत हे कुठेतरी थांबायला हवे. सर्व नेत्यांना माझे सांगणे आहे की तुम्हाला आतातरी शहाणपण सुचू द्या... आतातरी मल्हारी मार्तंड तुम्हाला सद्बुद्धी देवो... आतातरी तुमच्या नसानसातून चंद्रगुप्त मौर्य, राजा सम्राट अशोक, राजे मल्हारराव होळकर, राष्ट्रमता अहिल्याई होळकर, छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर, विरांगणा भिमाई होळकर, स्व.बी.के.कोकरे साहेब यांचे रक्त सळसळत असताना तुम्ही षंढ होऊन थंड राहत असाल तर तुमच्या नसानसात माझ्या थोर महापुरूषांचे रक्त सळसळत नसून ते पाणी आहे असे म्हणायला मला वावगे वाटणार नाही.
समाजबांधवांनो आतातरी एकत्रित या, आतातरी एक व्हा... आतातरी पोटजाती भेद टाळा आणि धनगर म्हणून आरक्षणाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरा तरच तुमची दखल घेतली जाईल अन्यथा तुमचे आमचे हाल कोणी कुत्रे देखिल खाणार नाही. मोदींच्या आजच्या स्टेटमेंट वरून तरी तुमच्या आमच्या लक्षात यायला पाहिजे की आजपर्यंत धनगर समाजाचा वापर केवळ सत्तेसाठी केला जातोय. थोडक्यात सांगायचे म्हंटले तर use & through glass सारखी धनगर समाजाची अवस्था मोदी आणि फसणवीस सरकारने केली असून धनगर समाजाला जागृत होणे गरजेचे आहे सतर्क आणि सक्षम होणे गरजेचे आहे. सर्व सामाजिक संघटनांनी आपापसातील मतभेद दूर करून केवळ वैचारिक पातळींवर समाजासाठी एकत्रित येऊन गावोगावी, तालुका तसेच जिल्हा व राज्य पातळींवर आंदोलने मोर्चे काढण्याचे नियोजन करण्यासाठी लवकरात लवकर बैठका आयोजित कराव्यात. आजपर्यंत प्रेमाने मागून बघितले पण आता धनगर समाजाचा संयम सुटला असून आता आर या पारची लढाई करण्याशिवाय गत्यंतर नाही. हरियाणा मध्ये जाटांनी फक्त जाळपोळ केली पण उभा महाराष्ट्र पेटवून टाकायची धमक माझ्या धनगर समाजात असताना धनगर समाज अजून शांतच का?? समाजातील प्रत्येक घटकाने अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी एक व्हायला हवे. धनगर समाजातील माझ्या माता-भगिनींना विनंती आहे की आतातरी तुमच्यातल्या राष्ट्रमाता अहिल्याई जाग्या होऊ द्या. आतातरी तुमच्यातल्या वीरांगणा भिमाई पेटून उठू द्या. षंढ होऊन थंड बसण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात बंड करून गुंड झालेले बरे. धनगर समाजातील माझ्या समाजबांधवांना, युवा वर्गाला, माता-भगिनींना, सर्व नेत्यांना तसेच प्रशासकीय अधिकारी बांधवांना विनंती आहे की जर तुम्हा-आम्हाला आपले अर्थात धनगर समाजाचे आस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर धनगर समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायला शिका नाहीतर मागले तसेच म्होरले अशातला प्रकार होईल आणि शेळ्या-मेंढ्या राखून काबाडकष्ट करणारा माझा गोरगरीब व भोळा भाबडा धनगर समाज विनाकारण या मोदींच्या हिटलरशाहीत भरडला जाईल.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

धनगरांनो आतातरी पेटून उठा...

किती दिवस थंड बसणार? किती दिवस षंढ राहणार?? सळसळत्या रक्ताचे वारसदार आपण हातात तलवारी घेऊन कधी बंड करणार?? पिढ्यांनपिढ्या शेळ्या-मेंढ्या राखून, पायाच्या नडग्या वाळवत, ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता पाचविला पुजलेली भटकंती करण्यातच आमचं अख्खं आयुष्य संपून जातं पण आमच्याच जिवावर राजकारण आणि समाजकारण करणाऱ्या औलादी मात्र ऐशोरामात एसी च्या गाडीत आणि एसीच्या माडीत राहतात. कदाचित या जगातील माणुसकीच संपली की काय असाच भास होत आहे. गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे पण प्रस्तापित मस्तवाल नेत्यांनी माझ्या धनगर समाजाचा नुसता वापर करून स्वताची घरं भरली पण आरक्षण देतो म्हणून आश्वासनांवर आश्वासनांचा भडिमार केला तरीही माझ्या धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही उलट त्या डोमकावळ्यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण  मिळू नये म्हणून अनेक पायंडे घातले. त्या प्रस्तापित मस्तवाल नेत्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत धनगर समाजाने त्यांची जागा दाखवून दिली आहे.
आजच्या सरकारची देखिल तिच अवस्था आहे. थोडक्यात सांगायचे म्हंटले तर गावाकडे एक म्हण आहे ती म्हणजे  आजा मेला अन् नातू झाला घरात माणसं तेवढीच.... म्हणजेच पाठीमागच्या पवार पाटील देशमुखांच्या आघाडी सरकारने दिले नाही आणि या फडणवीस सरकारला देखिल धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण द्यायचे नाही असेच दिसतेय. त्याचे कारण असे की फडणवीस सरकारने ज्या TISS चे भूत धनगर समाजाच्या मानगुटीवर बसवले आहे त्याची काही आवश्यकता नव्हती आणि नाही कारण एखाद्या जातीला/जमातीला अनुसुचित जाती/जमाती मध्ये नव्याने सामाविष्ट करायचे असल्यास राज्य सरकार संबंधित संस्थांची अहवाल सादर करण्यासाठी नेमणूक करू शकते पण धनगर जमात ही अगोदरपासूनच राज्यघटनेमध्ये अनुसुचित जमातीच्या ३४२ कलम वरील महाराष्ट्र राज्याच्या नवव्या परिशिष्टात अ.क्र.३६ वरती आहे तेथे असलेला उल्लेख हा ओराॅन, धनगड असून भारत सरकारकडून प्रसिद्ध झालेल्या अनेक गॅझेट्स मध्ये अ.क्र.३६ वरती ओराॅन, धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे त्याशिवाय १९८६ साली राज्यसभेत खा.सुर्यकांता पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सभापती महोदय रामविलास पासवान यांनी महाराष्ट्रातील धनगर व धनगड हे वेगळे नसून एकच आहेत असे सांगितले पुढे ते म्हणाले की राज्य सरकारने त्याबाबतीत केंद्र सरकारकडे शिफारस केली तर केंद्र सरकारकडून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळतील. मग असे असताना देखिल धनगर समाजाला आजपर्यंतही अनुसुचित जमातीच्या सवलती दिल्या जात नाहीत. माझ्या  धनगर समाजातील कित्येक पिढ्या अशाच बरबाद झाल्या, धनगर समाजातील लाखो मुले-मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहीली हजारो तरूण-तरूणी आय ए एस, आय पी एस बनण्यापासून कोसो दूर राहीली याचे एकमेव कारण म्हणजे आजपर्यंतच्या सत्ताधारी आणि सत्तापिपासू मस्तवाल नेत्यांनी आमच्या हक्कावरती गदा आणली. अनेक आंदोलने झाली, मोर्चे झाले कालच १६ मार्च रोजी दहिवडी ता.माण जि.सातारा येथे मल्हार क्रांती मोर्चा झाला पण सरकार मात्र हातावर हात ठेवूनच शांत बसलंय.
आरक्षणाबरेबरच विद्यार्थांची शिष्यवृत्ती आणि मेंढपाळांसाठीही शेळ्यामेंढ्यांच्या चाऱ्याची मोठी समस्या भेडसावत आहे. आज माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाचा शुल्क धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या खिशाला परवडणारा नाही त्यामुळे अर्ध्यातूनच शिक्षण सोडून द्यावे लागते त्याशिवाय डाॅक्टर आॅफ फिलाॅसाफि (Ph.D) च्या विद्यार्थ्यांना देखिल भरमसाठ प्रवेश शुल्क देऊन प्रवेश घ्यावा लागतो मग हे कुठे तरी थांबावयला हवे. दुसरीकडे भयानक दुष्काळ सतावत असताना मेंढपाळांना मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी वणवण फिरावे लागते पण मेंढपाळांची चराऊ कुरणे आजतागायत सरकारकडे जमा आहेत वन खाते मेंढपाळांना चराऊ कुरणात चारणीसाठी परवानगी देत नाही. भटकंती शिवाय माझ्या मेंढपाळ बांधवांचा वडिलधाऱ्यांना मार्गच सुचत नाही मग मेंढपाळांनी नक्की करायचे काय? जगायचे तर कसे जगायचे आणि मरायचे तर कसे मरायचे? असा प्रश्न पडला असताना आता जगण्यासाठी अन्यायाच्या विरोधात कुऱ्हाड भिरकवण्याशिवाय धनगरांसमोर पर्याय नाही. एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय गत्यंतर नाही. जेवढे शांत बसाल तेवढे खाली दाबायचा प्रयत्न करणारी पेशवाई पुन्हा उदयाला आली आहे त्यासाठी त्या पेशवाईचा बिमोड करण्यासाठी छत्रपती महाराजा यशवंतराव होळकरांची दुरदृष्टी डोळ्यांसमोर ठेवून लढायला सज्ज व्हा आणि आजपर्यंत झाले ते झाले पण धनगरांनो इथूनपुढे पेटून उठा आणि पेटवून टाका तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना आणि हिसकावून घ्या
आपले हक्क आणि अधिकार.....
घेऊ नका माघार.. आता करूया जागर
   येळकोट येळकोट जय मल्हार
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
       *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

हुंडाबळी

हुंडाबळी "प्रथा ही समाजाची-व्यथाही समाजाचीच"
(दि.२२ जुलै २०१६ रोजी प्रकाशित केलेला ब्लाॅग)
 (हुंडा ही प्रथा समाजाची-हुंडाबळी व्यथाही समाजाचीच)

        समाजामद्ये फिरताना वावरताना आसपासचे वातावरण हे सडलेल्या अंड्याप्रमाणे इतके उग्र (दुषित) झालेले पाहून अक्षरशा सामाजिक व्यवस्थेचा किळस वाटतो. दैनंदिन जीवनामध्ये रोजच काही ना काही घडतच असते पण यामद्ये सर्रास महिलांचेच का बळी जातात?? तेच समजत नाही. सरकार दरबारी महिला सबलिकरणाच्या गोष्टी मात्र हवेतच विरून जातात पण वास्तवात काहीच नसतं. रोजच वर्तमानपत्रातून स्त्रिभ्रूणहत्या, बलात्कार यांसारख्या मानवी जीवनाला काळीमा फासणाऱ्या बातम्या वाचताना डोळ्यांत पाणी येते त्यांव्यतिरिक्त हुंड्यासाठी होणारा विवाहितेचा छळ अर्थातच 'हुंडाबळी' हे सुद्धा समाजासमोरील एक मोठे आवाहनच आहे. महिलांच्या सुरक्षितेसाठी, कल्याणासाठी कायदे बनवले जातात पण कधी ते आमलातच येत नाहीत आणि जर आमलात आणले तर आरोपीला दंड आकारुन काही कालावधीची शिक्षा दिली जाते व कालांतराने ती शिक्षा माफही होते याचाच अर्थ पुन्हा गुन्हा करण्यासाठी त्या आरोपीला रान मोकळेच... मग सुड घेण्यासाठी पुन्हा कोणत्या ना कोणत्या महिला त्या लांडग्यांच्या शिकार होणार हे मात्र नक्की.
असो आपली न्यायव्यवस्था आंधळी आहे, जोपर्यंत डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे तोपर्यंत असंच चालत राहणार बाकी काय??? हुंडा न दिल्याने विवाहीतेवर छळ करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांपाठोपाठ लग्नागोदरच हुंड्याची भरमसाठ मागणी करून गोरगरीब शेतकरी कुटूंबात जन्माला आलेल्या कुमारिकेचा बळी घेणेयाचेही प्रकार आज समाजात वाढत चाललेत. पाठीमागे काही महिन्यांपूर्वी एका मुलीने आत्महत्या केली होती त्यामागचं कारण जर अभ्यासले तर आजच्या या सामाजिक व्यवस्थेचा मला धिक्कार करावासा  वाटतो. सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कुटूंबात जन्माला आलेली ती मुलगी जेमतेम चांगली शाळा शिकलेली. आर्थिक परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण शक्य नव्हतेच सोबत लहान बहिणीच्यापण शिक्षणासाठी तरतूद करावी लागणार होती. आई-वडिलांना तिच्या लग्नाची घाई झालेली नसतानादेखिल परिस्थीती त्यांना मजबूर करत होती. शिवाय धाकल्या मुलीला शिकवावी आणि लागलीच तिचंही हात पिवळे करावेत असा त्यांचा उद्देश होता. तिच्यासाठी पाहुणे यायचे मुलगी सर्वांना पसंत पडायची पण हुंड्याचा विषय निघाला की ते लग्न मोडायचं  असे कितीतरी वेळा झाले. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने हुंडा देणे शक्य नव्हते. थोडाफार हुंडा ठिक असतो पण हुंड्याचा भरमसाठ आकडा ऐकला की त्या बिचाऱ्याला, गोरगरीब शेतकऱ्याला डोक्याला हात लावावा लागायचा. अहो एवढी रक्कम तो आणणार तरी कोठून??  एकतर महाराष्ट्र राज्यांत पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण आत्महत्या हा एकमेव पर्याय नव्हे म्हणून कसंबसं आर्धीकोर भाकरी खाऊन जीवन जगायचं ठरवलं तर दुसरे संकट आ वासून उभा राहायचं.मग नक्की करायचं काय ?? मग तो गोरगरीब शेतकरी असो अथवा गोरगरीब मजूर असो त्यांच्यापुढं आत्महत्येशिवाय पर्यायच उरत नाही. मुलीला एकामागून एक पाहुणे यायचे आणि हुंड्यापायी लग्न मोडून जायचे याचा परिणाम मुलीच्या त्या कोवळ्या मनावरती होणार नाही तर काय होणार?? एकतर हुंड्यामुळे लग्न ठरत नसल्याने समाजामद्ये विविध गोष्टींवर उलट-सुलट चर्चा चालतात, पारावर बसणाऱ्या समाजातील रिकामटेकड्या लोकांना याबद्दल काहीच माहित नसताना ते मुलींलाच दोषी ठरवतात. मग खचून गेलेली मुलगी स्वताला आई-वडिलांवरचं ओझं समजून आत्महत्येचा पर्याय निवडते आणि जीवन संपवून टाकते.
मग त्या मुलीच्या आत्महत्येला कोण जबाबदार असेल?? लग्न ठरत नसल्याने समाजात चाललेल्या उलट-सुलट चर्चेला कंटाळून आत्महत्या केलेली मुलगी जबाबदार असेल?? का हुंडा न देणारा दुष्काळामुळे खचलेला गोरगरीब शेतकरी बाप?? का ज्या प्रथा समाजानं पाडल्या तो समाज?? का ज्या समाजानं पारावर बसून चौकाचौकात त्या मुलीची बदनामी करून त्या हतबल असलेल्या पित्याची इज्जत काढली तो समाज??  कोण जबाबदार आहे याचा जरा अभ्यास कराल का हो??
       हुंडा कोणाला द्यावा?? अन् कोणाला देवू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे इट्स डजन्ट मॅटर ॲंड नो आॅब्जेक्शन, पण सोन्यासारख्या पोरींचे कन्यादान करूनही तिचा सांभाळ करावा म्हणून हुंडा द्यावा लागत असेल तर तो मुलगा काय निष्क्रिय आहे का सुस्त?   जर तो मुलगा काही कमवूच शकत नसेल तर वडिलधाऱ्यांनो तुमच्या सोन्यासारख्या पोरीचं वाटोळं कशाला करताय?? माझ्या मते एखाद्या अंध-पंगूसाठी हुंडा दिला तर ती गोष्ट वेगळी आहे कारण तो कमवू शकत नाही पण ज्याला दोन हात दोन पाय आहेत व्यवस्थित धडधाकट असूनही दोन-चार रुपये कमवता येत असूनही त्याला हुंडा देत असाल तर मग त्यांच्यात आणि अंध-पंगूमद्ये काय फरक राहिला?? आय एम साॅरी पण मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत कारण आठराव्या शतकात राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी "हुंडाबंदी" केली होती. म्हणजेच एकविसाव्या तंत्रज्ञानविकसित शतकात आजच्या सरकारला जे सुचतं ते आठराव्या शतकात माझ्या राजमाता अहिल्याईंना सुचत होते आणि प्रशासकीय व्यवस्थेमधून त्यांनी हे आमलात देखील आणले होते. पुढे अहिल्यामाईंचाच आदर्श डोळयासमोर ठेवून सतीप्रथेला, हुंडा प्रथेला थोर समाजसुधारक राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी देखील विरोध केला होता, या प्रथेच्या विरोधात ब्रिटिश सरकारने कायदे बनवले होते 'हुंडाबंदी' केली होती पण या कायद्यांना 'हुंडाबंदीला' विरोध करायचं काम बाळ गंगाधर टिळकांनी केले, बाय दि वे...  "आमुक-आमक्याने मुलींकडून एवढा हुंडा घेतला तर आम्ही पण तेवढा घेणार दोन रुपये जास्तच पण कमी नाही"अरे ही काय रस्सीखेच चाललीय का??? तुमच्या या रस्सीखेचमुळे गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरातील निष्पाप मुलींचे बळी जातायेत याचा विचार करा. आज समाजातील हुंडा घेणाऱ्या बांधवांना मला सांगायचे आहे की "स्वताचा घाम गाळून, दिवसरात्र राबराब राबून शेतीतून धान्य पिकवायचं, एकाऐवजी आर्धीकोर भाकरी खाऊन पोरालेकरांना एकवेळ उपाशी ठेवून शेतात पिकवलेलं बाजारात बाराच्या भावात विकायचं, तिथं शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे व्यापारी अधाश्यासारखं शेतकऱ्यांना लुटत असतात मग त्यातूनही आलेल्या दीडदमडीत घरसंसार चालवायचा, मुला-मुलींची शिक्षणं, मुलीचे लग्न अशा कितीतरी समस्या त्या गोरगरीब शेतकऱ्यांसमोर उभा राहतात". मग अशा दुष्काळाने खचलेल्या जगाच्या पोशिंद्याकडून जर त्याच्या मुलीसाठी लग्नात हुंड्याची मागणी करत असाल तर तुमच्यासारखा हांडगा माणूस या जगात कोणी शोधून सापडणार नाही. कदाचित माझ्या या बोलण्याचा राग येत असेल पण हुंड्यापायी लग्न मोडलेल्या त्या आत्महत्या केलेल्या मुलीचा एकवेळ भाऊ होऊन बघा तुम्हीसुद्धा माझ्यासारखीच कडवट भाषा बोलाल अथवा हुंडा न दिल्यामुळे सासरकडील लोकांनी जाळून मारलेल्या विवाहितेचा भाऊ नाहीतर एकवेळ बाप होऊन बघा तुमचे डोळे रक्तासारखे लाल होतील आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखीच डोळ्यात अंजन घालणारी भाषा बोलाल आणि शेवटी सर्व काही करूनही जर तुम्ही हतबल असाल तेव्हा तुमच्यावरसुद्धा आत्महत्या करायची वेळ येईल. म्हणूनच म्हणतो अरे कमवायचे असेल ना तर स्वताच्या हिंमतीवर स्वताच्या ताकदीवर कमवा पण मागतकऱ्यांसारखा हुंडा मागत बसू नका आणि कृपया हुंड्यापायी गोरगरीब घराण्यातील निष्पाप मुलींचे बळी घेऊ नका ही नम्र विनंती.
"हुंडाबंदीसाठी एकमेकांच्या हातात हात देऊन निष्पाप मुलींचे जीवन वाचवा एवढंच सांगायचा माझा उद्देश आहे." धन्यवाद
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com