Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Friday, 7 August 2015

"बेफामपणा" नसेल...तर जगण्यात कार अर्थ?

"बेफामपणा नसेल...तर जगण्यात काय अर्थ?
ज्या धनगर जमातीत आम्ही जन्माला आलो. शेळ्या-मेंढ्या राखत, खेळत-बागडत लहानाचे मोठे झालो शिकलो सवरलो म्हणून लिहायला लागलो अन् बोलायलाही. थोर महापुरूषांच्या आणि राजा महाराज्यांच्या जातीत जन्माला यायला नशिब नव्हे तर सळसळत्या रक्तासोबत वाघाचं काळीज असावं लागतं. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. ज्या धनगर समाजात मी जन्माला आलो त्या धनगर समाजाचं मी काहीतरी देणं लागतो. समाजासाठी मला काहीतरी करायला पाहिजे असा विचार प्रत्येक धनगर बांधवांनी करायला हवा. काहीजण सहज म्हणून जातात की समाजानं मला काय दिले??  माझे एक सांगणे आहे त्या समाजबांधवांना की समाजानं तुम्हाला काय दिलं त्यापेक्षा तुम्ही समाजाला काय दिले?? याचा विचार करा. मगच समाजाकडून अपेक्षा ठेवा. आपण सर्वजण प्रत्येकजन समाजातील एक घटक आहोत मग आपल्या जातीसाठी आपण माती खाऊ शकत नसेल तर मग दुसरा कोणी थोडीच आपल्या समाजासाठी धाऊन येणार आहे.
धनगर जमातीतील राजा महाराजांच्या इतिहासाचा वारसा असणारे आम्ही आज कोणतं जगणं जगतोय तेच आम्हाला कळत नाही. इंग्रजांनी फक्त १५० वर्ष भारतावर राज्य केले तर इंग्रजांनी भारतीयांना गुलाम बनवलं असे म्हणतात. आरे मग धनगर समाजातील राजा महाराजांनी ३५०  वर्षहून अधिकतम राज्यकारभार या देशावर केला होता मग आमची जागा काय असायला पाहिजे? आणि आमची सध्याची अवस्था काय आहे?? याचा अंदाज प्रत्येकाला घेता आला पाहिजे. ज्या इंग्रजांनी भारतावर राज्य केलं त्या इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारणारे महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर हे आद्य स्वातंत्र्यसेनानी म्हणून ओळखले जातात. स्वतः इंग्रजांशी लढा देत असताना देशातील इतर संस्थानांच्या राजा-महाराजांना इंग्रजांच्या विरोधात लढण्यास प्रवृत्त करत होते पण इतर संस्थानातील राजांनी मातृभूमिशी गद्दारी केली आणि इंग्रजांशी मुकाबला न करता त्या त्या राजांनी आपापले संस्थान ब्रिटिश पार्लमेंटकडे स्वाधीन केले. तरीही राजे यशवंतराव होळकर न खचता इंग्रजांच्या विरोधात लढत होते. शस्त्र सज्ज आणि शिस्तबद्ध फौजफाटा असणार्या इंग्रजांच्या विरोधात कधीही न हारता एकूण १८ लढाया जिंकणारे आणि इंग्रजांना रणांगणात कापून काढत ताणून ताणून मारणारे खरे भूमिपुत्र आणि आद्यस्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांची ओळख असताना त्यांचा हा खरा इतिहास राष्ट्रापासून आणि पर्यायानं धनगर समाजापासून दूर ठेवला. खरंतर धनगर समाजाचा इतिहास चुकीचाच लिहला गेला होता. कारण इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते. या पाठीमागे काहीतरी कपट होते आणि त्यामुळेच धनगर समाजात जागृति होऊ शकली नाही. आज थोर विचारवंत/इतिहासकार मा. संजय सोनवणी सर यांच्यामुळे धनगर समाजाचा खरा इतिहास समाजासमोर आला.
राजे यशवंतराव होळकर इंदौरहून पुण्याकडे येत असताना थाळनेर येथे तापी नदीच्या तीरावर मुक्काम पडला होता. पाराजीपंतांनी पुण्याहून एका चित्रकाराला पाठवून यशवंतरावांचे चित्र काढायला सांगितले होते. तेव्हा त्या चित्रकाराने शिकारीसाठी एक डोळा मिटून यशवंतराव बंदुकीचा नेम धरत असल्याचे चित्र रंगवले होते. तेव्हा महाराज तुळसाला म्हणतात की चित्रकार खूप चतुर आहे. कारण माळव्यातील खरोखरच्या  शिकारीत यशवंतराव होळकरांच्या एका डोळ्याला इजा झाली होती आणि तो दोष त्या चित्रामध्ये चित्रकाराने कुशलतेने टाळला होता.  त्यावेळी तुळसा राजेंना म्हणाली लहानपणी इकडची स्वारी खूप बेफामपणे वागत असे आणि या चित्रावरुन तोच गुण कायमचा दिसतो आहे. तेव्हा महाराज जे वाक्य बोलले ते आजच्या धनगर समाजबांधवांना प्रेरित आणि प्रोत्साहित करणारं वाक्य होतं. चौरंगावरून उठत महाराज म्हणाले "हा बेफामपणा कधीच जाणार नाही, कारण बेफामपणा आहे तोपर्यंतच आमच्या जगण्याला काही अर्थ आहे. तो बेफामपणा जेव्हा संपेल त्या क्षणी जगणंच नकोसं वाटेल".
आज धनगर समाजातील पोरं शिकली सवरली तेव्हा बेफामपणे लिहायला लागली अन् बोलायला लागली समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढू लागली. मग धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या सवलतीसाठीचा संघर्ष असो, समाजातील आई-बहिणींवरती होणारा अत्याचार, मेंढपाळ बांधवांवरती होणारा अन्याय असो अथवा विद्यार्थ्यांना बंद झालेल्या शिष्यवृत्तीचा मुद्दा असो त्या त्या ठिकाणी धनगर समाजातील यूवक बेफामपणे न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरू लागले. या संघर्षात जीव द्यावा आणि घ्यावा लागला तरी धनगर समाजातील यूवा वर्ग शांत बसू शकत नाही आणि माघारही घेऊ शकत नाही कारण माघार घेणं आमच्या रक्तातच नाही हा एक बार मोठा इतिहास आहे आणि त्याचं कारण म्हणजे राजा-महाराजांपासून थोर महापुरुषांपासून वारसानं आलेला हा "बेफामपणा" आमच्या रक्तात आणि नसानसात आहे म्हणूनच आज आमच्या जगण्याला अर्थ आहे. तो बेफामपणाच जर आमच्यात नसेल तर मग आमच्या जगण्यात तरी काय अर्थ???

जय मल्हार!! जय अहिल्या!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

No comments:

Post a Comment