Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Saturday, 4 November 2017

संबंधित मंत्र्यांनीच आत्मचिंतन केले तर बरे होईल


एकमेव अद्वितीय लढवय्या, महापराक्रमी शुर योद्धा ज्यांनी अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज फौजेची इभ्रत जगाच्या वेशिला टांगली अशा छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावाने महामेष योजना सुरू करून नक्की काय साध्य करायचे आहे? स्वातंत्र्याचे प्रणेते असणाऱ्या छत्रपती महाराजा यशवंतराव होळकरांच्या दैदिप्यमान, जाज्वल्य आणि नेत्रदीपक इतिहासाचा, राष्ट्रभक्तिचा आणि त्यांच्या दूरदृष्टीचा विचार करून तरी भारतीय फौजेच्या एखाद्या बटालियन अथवा इन्फंट्री ला त्यांचे नाव द्यायला हवे होते पण तसे न करता राजे यशवंतराव होळकर महामेष योजना असे त्या योजनेस नाव देऊन शेवटी त्यांना धनगर समाजाच्याच पंगतीत आणून बसवण्याचे हे महापाप नव्हे का?
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

Thursday, 2 November 2017

आरक्षणाच्या विकासाचं महात्म्य...

आजकाल राजकारणात, सत्ताकारणात एक क्रेझ झाली आहे ती म्हणजे शक्तिप्रदर्शन करणे आणि त्याच शक्तिप्रदर्शनाच्या जोरावर राजकारणात सत्ताकारणात चांगले पद मिळवणे. पण विकासाचं महात्म्य काय? ज्यांच्या जोरावर शक्तिप्रदर्शन केले चांगली पदे मिळवली त्या जनतेचं त्या त्या नेत्यांनी किती दायित्व राखले? खरंतर विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे खासदार पद्मश्री विकास महात्मे साहेब. साहेबांनी अनेक नेत्र चिकित्सक शिबीरं घेतली. मोफत डोळ्यांची आॅपरेशन केली आणि त्यानुषंगानेच पद्मश्री हा पुरस्कार त्यांना बहाल केला गेला. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच...
            जेव्हा १५ जुलै २०१४ ला पंढरपूर-बारामती आरक्षण दिंडी निघाली २१ जुलै ला पाच ते सहा लाख धनगर समाजबांधव बारामतीमध्ये एकत्रित आला होता. त्याठिकाणी फडणवीसांनी सत्तेत आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये १५ दिवसांत अंमलबजावणी करण्याची मागणी असताना आरक्षण देणार असल्याचे वचन दिले. पुढे सरकार सत्तेत आले १५ दिवस झाले, महिना झाला दोन महिने झाले तरीही फडणवीसांचे तोंड उघडेना आणि निर्णय काय होईना. दिवसेंदिवस आरक्षणाची चळवळ वाढीस लागल्यानंतर ४ जानेवारी २०१५ रोजी विकास महात्मेंनी नागपूर मध्येच धनगर आरक्षणाचा मोर्चा आयोजित केला. महाराष्ट्र राज्यातील लाखोंच्या संख्येने समाजबांधव नागपूरात एकवटला होता. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वता पुढील एक महिन्याच्या आत निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्याच स्टेजवरून सध्याचे कॅबिनेट ना.महादेव जानकर साहेब यांनी देखिल आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर फडणवीसांचा अजित पवार करू असे खडसावले होते. परंतू पुढेही फसणवीसांचे तेच धोरण धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झाल्याचे सांगत समाजाला भावनिक केले आणि तिथेच धनगर समाज फसला. नागपूर मेळाव्यानंतर देखिल महिन्यात निर्णय घेऊ म्हणणाऱ्या फडणवीस यांनी दोन तीन नव्हे तर तब्बल सहा महिने उलटून गेले तरी निर्णय घेतला नाही अजून अभ्यासच चालू असल्याचे ढोंग केले. २१ जुलै २०१५ रोजी बारामती मोर्चाच्या धर्तीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रेरणा दिवस आयोजित केला. एक मोठे जनआंदोलन आयोजित करण्याचे त्या प्रेरणा दिवशी ठरविले त्यास सर्व मातब्बर नेते, विकास महात्मे सह महाराष्ट्र राज्यातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी जनआंदोलनासाठी हो मध्ये हो मिळवला परंतू विदर्भात गोव्यानंतर महात्मेंनी सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता समाजाचे भांडवलीकरण करण्यासाठी ८ डिसेंबर २०१५ रोजी मोर्चा आयोजित केला. विश्वासात न घेतल्याने त्यांच्या या निर्णयास विरोध महाराष्ट्र राज्यभरातून विरोध होऊ लागला. त्यातच १० डिसेंबर २०१५ च्या दुसऱ्या मोर्चाची डाळ शिजू लागली. दोन्ही मोर्चे वेगवेगळे न करता एकत्रित व्हावेत असे समाजाचे मत होते. परंतू वेगवेगळे मोर्चे काढले तर त्याचे श्रेय कोणाच्या पारड्यात पडणार? असा श्रेयवादाचा प्रश्न निर्माण निर्माण झाला. एकत्रित आणि एकच मोर्चा व्हावा यासाठी मी स्वता दोन्ही मोर्चाच्या आयोजकांशी बोललो होतो त्याचे पुरावे देखिल आहेत, त्यासंदर्भातील नोव्हेंबर व डिसेंबर २०१५ मधील ब्लाॅग देखिल खालील Nitinraje Anuse ब्लाॅग स्थळावर जाऊन तुम्ही वाचू शकता. ना नेता ना संघटना फक्त आणि धनगर समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन व्हावे ही सर्वांची प्रामाणिकपणे अपेक्षा होती. परंतू हेच विकासांचे महात्मे ऐकायला तयार नव्हते पाठपुरावा कोण करणार म्हणून ते त्यांच्या संघटनेच्या बॅनर खालीच मोर्चा निघणार या मतावर ठाम होते. शेवटी त्यांनी तेच केले आणि धनगर समाजाचे विभाजन झाले पाच-पन्नास हजार समाजबांधव नागपूर मध्ये ८ डिसेंबर २०१५ रोजी एकत्रित आला. १० डिसेंबर रोजी देखिल हजारांच्या संख्येत लोक उपस्थित राहिले होते. परंतू ८ डिसेंबर रोजीच्या मोर्चात मुख्यमंत्री निवेदन स्विकारण्यासाठी आलेच नव्हते. त्या मोर्चातून खरंतर काहीच निष्पन्न झाले नाही उलट आरक्षणाची अंमलबजावणी दूरच राहिली पण पदरात पडले ते म्हणजे TISS संशोधनाचे गाजर. जर एखाद्या जाती/जमतीला अनुसुचित जाती/जमातीमध्ये सामाविष्ट करायचे असल्यास त्यासंदर्भातील अहवाल सादर करावा लागतो आणि तो अहवाल तयार करण्यासाठी त्या ८ डिसेंबरच्या मोर्चातून TISS या संस्थेची नेमणूक करण्यात आली. परंतू धनगर समाज मात्र अगोदरपासूनच अनुसुचित जमातीच्या यादीत असताना अहवाल सादर करायला लावून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवायचे फार मोठे षड्यंत्र फडणवीसांनी रचले आणि धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी त्यास सहखुशीने अनुमोदनही दिले. दोन टप्प्यांत अर्थातच सहा महिने ते नऊ महिन्यांच्या कालावधीमध्येच धनगर समाजाला आरक्षण (असताना) देऊ म्हणणाऱ्या फडणवीस सरकारचे नऊ दहा महिन्यांतर नव्हे तर एका वर्षांनंतरही अजून आरक्षणाचे बाळंतपणच झाले नाही हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. मध्यंतरीच्या काळात या दोन्ही मोर्चाच्या पार्शभूमीवर ३१ मे २०१६ याच दिवशी महात्मेंना खासदारकी देऊन राज्यसभेवर घेतले. मग ती खासदारकी धनगर समाजामुळेच मिळाली हे कोणीही नाकारू शकणार नाही. पुढे सध्याचे कॅबिनेट मंत्री ना.प्रा.राम शिंदे व ना.महादेवजी जानकर यांना मंत्रीपद देऊन धनगर समाजाला गप्प बसवायचा प्रकार केला. परंतू धनगर समाज असा कसा गप्प बसेल? आणि शांत बसेल तो धनगर कसला? खासदारकी मिळाल्यानंतर विकास महात्मे मात्र गप्प बसले २०१५ नंतर २०१६ मध्ये त्यांनी एकाही मोर्चाचे आयोजन केले नाही. परंतू आपण स्वता एक समाजाचे प्रतिनिधी आहोत याची जाण असताना देखिल खासदार विकास महात्मे यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या स्टेटमेंटची पाठराखण केली. धनगर आरक्षणास मोदींचा नकार अशा बातम्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया वरतून झळकल्या, सोशल मिडीयावरती त्या वायूवेगापेक्षाही जास्त गतीने व्हायरल झाल्या. त्याचवेळी खासदार विकास महात्मे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की मोदींनी घेतलेल्या खासदारांच्या शाळेत धनगर आरक्षणाचा धडा नव्हताच. मग त्या विकास महात्मेंना माझे प्रश्न आहेत ते म्हणजे...
1. त्या खासदारांच्या शाळेत आरक्षणाचा धडा नव्हता तर मग हे त्या मोदींनी कबुल करायला पाहिजे होते तुम्हीच का पत्रकार परिषद घेऊन कबुल केले?
2. खासदार साहेब तुम्हाला त्या शाळेत समाजाचे प्रतिनिधी म्हणून बसवले आहे ते नेत्यांची पाठराखण करायला नव्हे तर जनतेचे समाजाचे प्रश्न सोडवायला. मग धनगर समाजामुळे तुम्हाला खासदारकी मिळाली आहे हे तुम्ही कार्यक्रमांमधून जाहिर केलेलेच आहे. मग धनगर आरक्षणाबद्दल तुम्ही त्या शाळेत शंका का उपस्थित केली नाही?
3. खासदार साहेब तुमचे समर्थक म्हणतात की राज्यसभेत/लोकसभेत आपले संख्याबळ कमी पडते मग महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत आमदार बच्चू कडू हे अपक्ष असताना देखिल अपंगासाठी किती लढतात आणि झटतात हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलंय. मग त्याप्रमाणेच धनगर आरक्षणाचा मुद्दा तुम्ही का उपस्थित करू शकला नाही.?
बर असो एवढे सगळे करून देखिल तुम्ही पुढच्या २०१९ च्या लोकसभा डोळयासमोर ठेऊन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ५ नोव्हेंबर २०१७ ला निर्णायक मेळावा आयोजित केला. त्याबद्दल माझे काही दुमत नाही परंतू आजपर्यंत नागपुरातील तुम्ही घेतलेल्या मोर्चाचे काय पारिपत्य केले? काय निर्णय झाला? म्हणून निर्णायक मेळावा आयोजित केला याचे स्पष्टीकरण तरी द्या. उठ की सुठ नुसतंच तुम्ही आरक्षण मेळावा पुकारला की आमच्या शेळ्या-मेंढ्या वाडग्यात कोंडून आम्ही नागपूरला यायचं का? हजारो नोकरदारांनी नोकऱ्या सोडून तरूनांनी ट्रेन मधून आदळआपट करत, हजारो लिटर डिजेल जाळत आणि करोडो रूपयांचा चुराडा करत तुमच्या भावी खासदारकीसाठी आम्ही तिथं नागपूरला यायचं का? आरक्षणाचा निर्णयच न झाल्याने मानसिक आणि शारिरिक नुकसान, आर्थिक नुकसान हे कधीही भरून न येणारे आहे. निर्णय झालाच नसताना मग निर्णायक मेळावा कसे काय म्हणायचे बरं? तसे प्रा.विष्णू कावळे सर यांनी देखिल तुम्हाला आवाहन केले आहे की आरक्षणाचा निर्णय करूनच तुम्ही मोर्चाला या आम्ही तुमचे स्वागत करू.
           नाहीतर सातारच्या मारूती जानकर यांनी ५ नोव्हेंबरचा नागपूरचा मोर्चा उधळण्याचे ठाण मांडलेच आहे. परंतू काहीतरी ठोस निर्णय घ्यायचा सोडून लोकशाही आहे म्हणून तुम्ही फोनवरून धमक्या देता मग त्यास काय म्हणावे? मारूती जानकर यांच्या निर्णयास आम्ही चालना देतोय असा विषय नाही परंतू त्यांचे उद्दीष्ट स्पष्ट आणि निस्वार्थीपणाचे आहे एक सामाजिक बांधिलकी या नात्याने मुख्यमंत्री यांना ते जाब विचारणारच कारण आंबेडकरांनी जनतेला लोकशाही बहाल केली आहे ना... तो त्यांचा मुलभूत अधिकार असून खोटी आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनीधींना फसवणूक केल्याबद्दल जाब विचारणारच कारण गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाज हा अनुसुचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे आणि माझ्या मते तब्बल ६७ वर्षे एखाद्या समाजावर राज्यघटनेत अधिकार दिले असताना देखिल विनाकारण अन्याय करणाऱ्यांवरती देशद्रोहाचा खटला का भरू नये? धनगर आरक्षण हा माझ्या एकट्याचा अथवा मारूती जानकर यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असा विषय नसून अखंड महाराष्ट्र राज्यातील एकाच रक्ताच्या आणि हाडामांसाच्या धनगर समाजबांधवांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जन्मापासूनच घोड्याचा लगाम हातात धरून अणवानी पायानं भटकंती करणाऱ्या भोळ्या-भाबड्या मेंढपाळांच्या मुला-बाळांचा हा प्रश्न आहे त्यामुळे न्याय हा मिळालाच पाहिजे. मग तोंड वाजवून जर न्याय मिळत नसेल त्यांच्या तोंडात वाजवून तरी न्याय मिळवा पण न्याय मात्र मिळालाच पाहिजे.
           खासदार विकास महात्मे यांनी ५ नोव्हेंबर ला मोर्चा घ्यावा अथवा घेऊ नये किंवा समाजबांधवांनी त्या मोर्चाला जावं कि जाऊ नये याबद्दल आमचे दुमत नाही. ज्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न परंतू माझ्या अज्ञानी असलेल्या आणि भोळ्या-भाबड्या मेंढपाळ बांधवांच्या नावावर भांडवलीकरण करून समाजाला कोणाच्यातरी ऐऱ्यागैऱ्यांच्या दावणीला बांधायचा प्रयत्न करू नये ही विनंती...
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com
nitinrajeanuse123.blogspot.com

Monday, 30 October 2017

भावपूर्ण श्रद्धांजली...

*भावपूर्ण श्रद्धांजली*
आमचे बंधुतुल्य, समाजसेवक तसेच पैठण तालुक्याचे उगवते नेतृत्व कायदेपंडित ॲड.मच्छिॅद्र कर्डिले साहेब यांचे काळाच्या ओघाने नियतीला मान्य नसताना अचानक अपघाती दुःखद निधन झाल्याने त्यांच्या आत्म्यास चिरकाल शांती लाभो.
शोकाकुल
   *यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य*
*सर्व धनगर समाजबांधव महाराष्ट्र राज्य*

Saturday, 28 October 2017

चांगभलं बिरोबा अन् आरक्षणाचा खेळखंडोबा...

चांगभलं बिरोबा अन् आरक्षणाचा खेळखंडोबा…
खरंतर दोन वर्षांपूर्वी लिहलेला हा ब्लाॅग आज मुद्दामहून पुन्हा प्रकाशित करतोय.... वस्तुस्थिती अजून काही बदललेली दिसतच नाही. डॉ बाबासाहेबांनी धनगर समाजाला राज्यघटनेत कलम ३४२ च्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अ.क्र.३६ वरती आरक्षण दिलेले आहे. केवळ शब्दच्छल झाल्याने अर्थातच “धनगर” ऐवजी “धनगड” (र चा ड) झाल्याने सगळा राडा झाला आहे. गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाज अनुसुचित जमातीच्या सवलतींपासून वंचित असल्याने धनगर समाजाचे झालेले नुकसान पुढील ६० ते ७० वर्षातसुद्धा भरून न येणारे आहे. यास रानोमाळी डोंगरदरीतून भटकणार्या धनगर समाजाचे अज्ञान जरी कारणीभूत असले तरी संविधानाच्या/राज्यघटनेच्या आधारावरती राज्यकारभार चालवणारे राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्याहून अधिक जबाबदार आहे. धनगर समाजाला खरंतर जाणूनबुजून अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचं काम प्रस्तापित व्यवस्था आणि परिणामी पाठीमागचे आणि सद्याचे राज्यसरकार करत आहे. धनगर समाज जर निद्रावस्थेतून जागा झाला तर या प्रस्तापितांना त्यांची लायकी दाखवून देईल परंतू झोपेचं सोंग घेणाऱ्या समाजाचं कसं होईल हे राम जाणे??? ज्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्या समाजाची सत्ताकारणात भागीदारी लोकसंख्येच्या आधारवर तितकीच असणार आहे परंतू धनगर समाज अज्ञानाच्या खाईत होरपळला गेल्याने सत्ताकारणापासून ही जमात थोडी नाही तर खूपच दूर राहीली.
             गेल्या ६५ वर्षापासून या भोळ्या भाबड्या धनगर समाजावरती अन्याय करण्याचा नंगानाच या महाराष्ट्र राज्यातील प्रस्तापित व्यवस्थेने आणि सदरच्या राज्य सरकारने चालवला आहे. धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्याच्या कानाकोऱ्यात कुठेही पहावयास भेटत नसताना, धनगड नावाची जमातच आस्तित्वात नसताना महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात धनगड जमातीचा उल्लेख करायला डॉ.बाबासाहेब आंबेडकर काय मुर्ख होते का? हा माझा खडा सवाल मुख्यमंत्र्यांना, धनगर समाजाच्या या मागणीचा विरोध करणाऱ्या त्या त्या आदिवाशी मंत्र्यांना आणि मेंदूला वाळवी लागलेल्या त्या वळवीला विचारायचा आहे. त्या वळवीचे म्हणणे आहे की राज्यघटनेत ३४२ च्या अनुछैद वरती ९ व्या परिशिष्टातील ३६ नंबर वरतीची जमात ही धांगड आहे आणि धांगड ही ओरॉनची तत्सम जात आहे. मग त्या वळवीने अभ्यास करावा की धांगड अथवा धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्यात कधीही जन्माला आली नव्हती मग डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जी राज्यघटनेची मसूदा समिती होती त्यांनी काय मुर्ख म्हणून अहवाल सादर केले होते का?
            एखादी जमात आस्तित्वातच नसेल तर मग राज्यघटनेत नमूद केलेल्या त्या जमातीबद्दल प्रतिवाद देखिल करता येतो.  Acre चे एकड होते, Chattisgarh चे छत्तीसगड होते, Gurgaon चे गुडगाव होते त्याचप्रमाणे Dhangar चे धनगड असे झाले आणि म्हणून त्याचाच परिणाम असा की महाराष्ट्र राज्यातील दीड ते दोन कोटी धनगर समाजबांधवांचे भविष्य अंधारातच राहिले. धनगर समाजाची हजारो पोरं आइ ए एस, आइ पी एस, डॉक्टर, इंजिनीयर, एडव्ह़केट होण्यापासून वंचित राहिली याला सर्वस्वी जबाबदार आजपर्यंतचे राज्य सरकार आहे राज्यघटनेचा अवमान करणार्या त्या त्या नेत्यांवरती देशद्रोहाचा देखिल खटला भरायला हवा.
              आज इथे तर उद्या तिथे अशा प्रकारचे जीवन जगणारी धनगर जमात ही भटकी जमात असल्यामुळे १९९१ साली धनगर समाजाला अनुसुचित जमातीची मागणी डावलून महाराष्ट्र राज्यापुरतं भटक्या जमाती क मध्ये टाकण्याचे पाप पवारांनी केलं पण त्या पवारांना उचलू लागायला आमच्याच समाजाचे अज्ञानी महाबहाद्दरच पुढे होते.

राज्यघटनेतील आदिवाशी असल्याचे निकष:
राज्यघटना मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि समितीकडून राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ ला अडॉप्ट केली होती आणि २६ जानेवारी १९५० साली आमलात आणली. २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसाच्या प्रदीर्घ काळानंतर म्हणजे जवळ जवळ ३ वर्षाचाच कालावधी लागला होता भारतीय संविधान लिहायला. राज्यघटना लिहताना त्यावेळी धनगर जमात ही माळोरानी डोंगर दरीतून भटकंती करत शेळ्या-मेंढ्यांची परिणामी स्वताच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरत असते याचा अभ्यास करूनच मसूदा समितीने आदिवाशी समाजबांधवांपेक्षा अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या जमातीला राज्यघटनेच्या अनुसुचित जमातीच्या यादीत अगोदरच सामाविष्ट केलेली आहे.

1. धनगर समाज ही आदिम जमात आहे शेळ्या मेंढ्या राखणे गाई-म्हैसी पाळणे हे आदिम जमातीचे व्यवसाय आहेत.

2. आदिम वैशिष्ट्ये/प्राचीन जीवनमान याचा अभ्यास केला तर डोंगरदरी माळरानावर जाऊन बघा शेळ्या-मेंढ्या राखणार्या समाजबांधवांची एकदा विचारपुस करून बघा मग समजतील आदिम वेशिष्ट्ये.

3. संस्कृति: धनगर जमातीची आदिवाशी जमातीसारखीच संस्कृति आहे खंडोबा, बिरोबा, धुळोबा हे धनगरांचे देव तसेच ढोल वाजवणे, धनगरी गजी नृत्य, धनगरी ओव्या यातून धनगर समाजाच्या संस्कृतिचा अभ्यास करता येतो. ओरॉन धनगर जमातीचे देव सुद्धा सारखेच आहेत.

4. भौगोलिक पृथक्करण: आदिवाशी जमात डोंगरदरीमध्ये जंगलामध्ये पाड्यावरती एकाच ठिकाणी स्थायिक राहते पण धनगर जमात ही डोंगर दरीमध्ये रानोमाळी, जंगलामध्ये आज इथे तर उद्या तिथे असे मुक्काम करत, अख्खा संसार घोड्याच्या पाठीवर लादून कोकरा-करडांचं आणि लेकराबाळाचं लटांबण घोड्याच्या पाठीवरील माचोळीवर बांधून तळहातावर पोट भरणारी धनगर जमात अभ्यासून पाहा.

5. लाजरे बुजरेपणा धनगर समाजातील बांधव जास्त लोकवस्तीत येत नाहीत समूहाने राहतात नागरी वस्तीत मिळत नाहीत मिसळत नाहीत कारण दिवसभर मेंढ्यांच्या पाठी पायाच्या नडग्या वाळवण्यातच कितीतरी पिढ्या बरबाद झाल्या त्यामुळे धनगर जमातीत अजूनही लाजरे बुजरे पणा तसाच आहे.
*संघटितपणे लढाई महत्वाची:*
         धनगर समाजाला राज्यघटनेत अधिकार दिले असताना आदिवाशी पेक्षाही अत्यंत बिकट आणि हालाखीचे जीवन जगणारी धनगर जमात ही अनुसुचित जमातीमध्ये मोडत नाही असे ओरडून सांगणाऱ्या अर्धवटांचे मला हसू येते. धनगर जमात ही भटकी जमात आहेच आहे आणि महाराष्ट्र राज्यात फक्त (केंद्रात नव्हे) धनगर जमात ही भटक्या जमाती -क मध्ये आहे. ते पण वक्रतुंडाच्या अवकृपेने १९९१ पासून पण आमच्या धनगर समाजाचं संघटन मजबूत असतं तर आज यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे साहेबांच्या प्रयत्नातून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती कधीच मिळाल्या असत्या आणि आजच्या प्रस्तापितांचे तळवे चाटणार्या नेत्यांना भिक मागायची वेळ आली नसती.
            आज आदिवाशी समाजातील काही पोरं कोणाच्यातरी सांगण्यावरून लिहू लागतात की धनगर समाजातील लोक र चा ड झाला असे सांगत रडत बसलेत पण त्या वळवी ला माझे सांगणे आहे की आम्ही रडणाऱ्यांपैकी नाहीये. जर मनात आणलं तर क्षणात उध्वस्त करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. आजपर्यंत अन्यायाच्या विरोधात रणशिंग फुंकणारे फक्त धनगरच आहेत याचा विसर कोणास पडू नये. धनगर समाजात अज्ञान पसरवण्यास प्रस्तापित व्यवस्थाच जबाबदार असून धनगर समाजाने यास बळी न पडता सर्वानी एकजुटीने/संघटितपणे आपले हक्क हिसकावून घ्यायला हवेत नाहीतर पुढची पीढी आपल्या तोंडात शेण घालेल याचा विचार करा.
खरी चूक कोणाची??
देशाच्या स्वातंत्र्यानंतरच नव्हे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून धनगर समाजावरती सतत अन्याय होत आला आहे. आदीवाशीपेक्षाही धनगर समाज आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला असताना धनगड नावाची जमात महाराष्ट्रात नसताना राज्यघटनेत धनगड नावाचा उल्लेख करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना चुकीचे ठरवायचे की सर्वानुमते २६ जानेवारी १९५० ला आमलात आणलेल्या राज्यघटनेवरती आजचा राज्यकारभार चालवणारे राज्य सरकार चुकीचे ठरवायचे? धनगड नावाची जमात महाराष्ट्र राज्यात नाही शिवाय धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच असल्याचे संशोधकीय अहवाल असताना देखिल धनगर समाज आदिवाशींचे निकष पुर्ण करतो की नाही यासाठी टाटा इंन्सटीट्यूट अॉफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेला ६५ वर्षानंतर सर्वे करायला सांगणारे फडणवीस सरकार धनगर समाजाचे आरक्षण घशातून काढण्याचा प्रयत्न तरी करत नाही ना.??? अशी शंका कोणाच्याही मनात गोंधळ निर्माण करणारी आहे. यामुळे मागले तसेच म्होरले ही म्हण सार्थ ठरते की काय याचाच विचार सतत मनात घोळत असतो.
          धनगर समाजात नेतृत्वाचा अभाव आहे शिवाय जे जे नेतृत्व करत आहेत ते देखिल समाजाचे भांडवलीकरण करून स्वताचा स्वार्थ साधत आहेत अशीच परिस्थिती आजही पाहायला भेटते आहे. समाजाच्या नावावरती ज्यांना आमदारक्या, मंत्रीपदं मिळाली, खासदारकी मिळाली त्यांना कधी समाजाची आठवण झालीच नाही. पहिल्या कॅबिनेट मध्येच आरक्षणाची तरतुद करू म्हणणाऱ्या फसणवीसांचा ३ वर्षे झाले तरी अजून अभ्यास चालूच आहे त्यात देखिल गरज नसताना TISS चे भूत मानगुटीवर बसवले त्याला धनगर समाजातील संबंधित निष्क्रिय नेते जबाबदार आहेत. आणि तेच नेते चांगभलं बिरोबा म्हणत आरक्षणाचा खेळखंडोबा करत बसलेत. त्यामुळे समाजाचा आक्रोश अजून दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसुचित जमातीच्या सवलती अजून समाजाला न मिळाल्याने समाजाचे वाटोळे झाले आहे मग ते लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी बुद्धीजीवी वर्ग झटत असताना झगडत असताना समाजाची बाजू मांडणारेच लेखक हे विनाकारण बुद्धी पाजळवत आहेत असे मत समाजातील काही नेत्यांची धोतरं सांभाळणाऱ्यांचे आहे ते खरंतर चुकीचे ठरते असे म्हणायला मला वावगं वाटणार नाही. कदाचित माझ्या या वाक्याचा काहीजनांना राग येईल पण मला त्याची पर्वा नाही. कारण समाजापेक्षा कोणतीही व्यक्ति थोर नाही.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             – नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com

Friday, 20 October 2017

इडा पिडा जाऊ दे अन् बळीचं राज्य येऊ दे...

आज सकाळी दिपावली निमित्त ओवाळून औक्षण करताना माझी ताई म्हणाली की "दिन दिन दिवाळी आणि गाई म्हैसी ओवाळी." म्हणजेच प्राचीन काळापासून पशुपालक असलेली आदिम जमात आजही प्रत्येक सन-उत्सवामध्ये गाई-म्हैस-शेळ्या-मेंढ्या-घोडे-कुत्रा अशा जनावरांची पुजा करतात. म्हणूनच धनगर जमात ही देखिल प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारी आदिम जमात आहे अर्थातच धनगर जमात ही अनुसुचित जमातीच्या आरक्षणासाठीचे निष्कर्ष पूर्ण करते.
असो... औक्षण करताना पुढे ताईने कोणते गिफ्ट मागितले नाही तर एक मागणी केली ती तमाम महाराष्ट्र राज्यातील सर्व बहिनींनी आपापल्या भावाकडे हीच मागणी केली ती म्हणजे "इडा पिडा जाऊ दे (टळू दे) आणि बळीचं राज्य येऊदे". माझ्या डोक्यात लगेच क्लिक झाले आणि गोंधळ उडाला की परवा परवाच झी गौरव पुरस्काराचे वितरण करताना एक महाशय म्हणाला की बळी नावाचा  राजा एक आसूर (राक्षस) होता आणि विष्णूने वामनाचा अवतार घेऊन बळीराजाच्या डोक्यावर पाय दिला. हे खरंतर वैदिक (ब्राह्मणी) संस्कृतीचे उदात्तीकरण करायचा धंदा आहे.
पण मला प्रश्न पडतो की जर बळी नावाचा राजा हा आसूर(राक्षस) असेल तर मग आजच्या भगिनी औक्षण करताना "इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊदे" असे का म्हणतात? खूप विचार केल्यानंतर अभ्यास केला आणि इतिहासात डोकावून पाहिलं तेव्हा समजले की प्राचीन कालीन इतिहासामध्ये बळी नावाचा एक कुरूवंशीय (धनगर) राजा होऊन गेला. ज्याच्या राज्यातील प्रजा, पशुपालक, शेतकरी हे धनधान्याने समृद्ध होता. बळी राजाच्या राज्यात पाऊस वेळेवर पडत होता आणि सर्वच गोष्टींचा सुकाळ होता. प्रजा, शेतकरी व पशुपालक हे आनंदी होते. परंतू तत्कालीन वैदिक संस्कृतीला शेतकरी तसेच प्रजा ही समृद्ध आणि आनंदी असलेली बघवत नव्हते म्हणून त्या बळीराजाला फसवून त्याला सत्तेवरून जाणूनबुजून हटवण्यात आले. अर्थातच आजकालची प्रचलित म्हण म्हणजे "बळीचा बकरा झाला." परंतू जेव्हा बळी राजाला राज्यकारभारावरून हटवण्यात आले त्यानंतर बळीच्या राज्यावरती अनेक संकटे उद्भवली. प्रजा ही रोगराईने तडफडून मरू लागली. एकेकाळी धनधान्याने समृद्ध असलेला शेतकरी दुःखांत बुडाला. बळीचं सशक्त आणि समृद्ध असलेले राज्य उध्वस्त झाले. तेव्हापासून आजपर्यंत शेतकरी हा कधीच सधन झाला नाही. हजारो शतकं उलटून गेली पण माझ्या शेतकऱ्यांना अजून न्याय मिळालाच नाही. न्याय मिळत होता तो फक्त कुरूवंशीय (धनगर) असलेल्या बळीच्या राज्यातच मिळत होता म्हणूनच आजच्या शेतकरी कुटूंबातील कुरूवंशीय धनगर असलेल्या प्रत्येक माता-भगिनी आपल्या भावाला ओवाळताना एकच मागणी करते ती म्हणजे बळी राजाचे राज्य उध्वस्त झाल्यापासून माझा शेतकरी कधीच समृद्ध झाला नाही त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांवरती जी संकटे आली आहेत ज्या काही इडा पिडा आहेत त्या टळू दे दूर होऊदे आणि जसे बळीचे समृद्ध राज्य होते तसेच राज्य आजही येऊदे.
परंतू तमाम भगिनींची ही मागणी (इच्छा) केवळ मागणीच राहिली आहे. आजही वैदिक संस्कृतीचे पाइक असलेले सनातनी व्यवस्थेचे पुरस्कर्ते आणि राज्यसरकार देखिल माझ्या शेतकऱ्यांना सुखाने जगू देत नाहीत त्यामुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. त्यामुळे तमाम भगिनींचे भाऊ आपल्या बहिणींची ही मागणी कधी पूर्ण करताहेत ते बघूया...!
इडा पिडा टळू दे अन् बळीचं राज्य येऊ दे।
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

Sunday, 15 October 2017

आजच Nitinraje Anuse नावाचे फेसबुक पेज लाइक करा

गेल्या दोन-तीन महिन्यापूर्वीच माझ्या फेसबुक खात्याची 5000 (पाच हजार) मैत्रीसाठी विनंतीची मर्यादा पूर्ण झाली आहे. त्यामुळे उर्वरित मित्रत्वासाठी आलेल्या विनंत्या मी स्विकारू शकत नाही. शक्य झाल्यास एखाद्या चुकीचे संदेश पाठवणाऱ्या अथवा गैरवर्तणूक करणाऱ्या फेसबुक खातेदारास यादीमधून काढल्यानंतर नक्कीच विनंती स्विकारून मित्रत्वाच्या यादीत सामाविष्ट केले जाईल.
तुर्तास खालील  दुवा (Link)  वापरून माझे Nitinraje Anuse हे फेसबुक पेज ला लाइक करून अद्यवते (updates) मध्ये रहा.

https://m.facebook.com/nitinrajeanuse123/?ref=bookmarks

-नितीनराजे अनुसे
(7666994123)
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
nitsanuse123@gmail.com

Friday, 13 October 2017

सळसळते रक्त अहिल्याईंचे भक्त

दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाचे वारसदार आम्हीच आहोत फक्त
तारण,
मल्हाररावांचे मावळे आम्ही अहिल्याईंचे फक्त
आमच्या नसानसात सळसळतंय
छत्रपती यशवंतराव होळकरांचे सळसळते !!
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

Wednesday, 11 October 2017

छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर


गडावरून खाली उतरून
मल्हारी मार्तंड मला जेजुरी दाखव,
हवं तर मी येतो तुझ्याकडे
पण माझ्या
चक्रवर्ती सम्राट
छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांना परत पाठव...
-नितीनराजे अनुसे
७६६६९९४१२३
nitsanuse123@gmail.com

Tuesday, 10 October 2017

निवडणुकांच्या खेळात कार्यकर्त्यांचा डाव


 हल्ली ग्रामपंचायतीच्या निवडणूका अगदी तोंडावरच आल्या असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूका म्हणजे कार्यकर्त्यांसाठी जणू खेळच आहे असे समजून कार्यकर्ते आपापला डाव (खेळ) मांडत आहेत. जेवढे लोकसभा विधानसभाच्या निवडणूकांमध्ये राजकारण होत नाही तेवढे अटीतटीचे राजकारण हे ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये होत असते आणि याच अटीतटीच्या राजकारणामध्ये गावगावकीत आणि भावभावकीत वैमनस्य पेरले जाते. कोणत्यातरी एखाद्या नेत्यासाठी, कोणत्यातरी नेत्याच्या सांगण्यावरून भाऊ आपल्या भावाच्या डोक्यात काठ्या-कुऱ्हाडी घालायला देखिल कमी करत नाही हे वास्तव गावगाड्यात चालते. "राज"कारण त्या त्या गटाच्या त्या त्या पक्षांच्या नेत्यांचे होते पण त्यांच्या राजकारणात गोरगरिब कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या पोरांचा जीव जातो हे विदारक सत्य आहे. परंतू राजकीय नेत्यांच्या या राजकीय खेळीत आणि भावाभावांच्या हानीमारीत डल्ला लागतो तो म्हणजे त्या त्या राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा...
         एकमेकांवर टिकाटिप्पणी करत पार खालच्या पातळींवर जाऊन टिका करणे हे नेत्यांना जमत नाही असे नसते तर नेते मुद्दामहून तसे करत नाहीत पण कार्यकर्ते मात्र यात माहिरच म्हणायचं की... मग टिका करताना तिथे कोणीही  असो मग आपला किंवा परका हे कोण त्यांना कळतच नाही. हल्ली सोशल मिडीयावर अशा बहाद्दरांनी चांगले थैमानच घातले आहे. कोणत्याही नेत्याने दारू मटण अंडी दिली तर जाऊ नका आणि म्हणनारे सोशल मिडीया बहाद्दर असलेले कार्यकर्ते मात्र कुत्र्यांची-गाढवांची मटणं खायला सर्वात पुढे असतात. कोणत्याही नेत्यांकडून पैसे घेऊन मतदान करू नका म्हणनारे मात्र माझ्यामागे माझी भाऊकी आहे असे सांगून आपल्या
नेत्यांकडे लाखोंचे पॅकेजेस मागत असतात. एवढंच काय भावकीतल्याची किंवा गावकीतल्याची जिरवायची म्हणून एका पक्षाचे स्वाभीमानी कार्यकर्ते म्हणून काम करणारे महाबहाद्दर दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या चपला उचलून त्यांचे तळवे चाटणारे व अंडी-मटणं खाऊन चार-पाच लाख उकळणारे देखिल खूपजन स्वाभीमानी असतात हो... एकाच गावातील एकाच भावकीतील हे महाबहाद्दर गावच्या विकासासाठी व्हाटसप फेसबुकला कधीच एखादी चांगली पोस्ट शेअर करणार नाहीत लिहणार नाहीत. पण माझ्याच नेत्याला असाच का बोलला म्हणून सोशल मिडीयावर देखिल भावकीतल्यांची आई-बहिण काढायला मागेपुढे पाहात नाहीत. फार मोठे संस्कार आहेत... अरे पण एवढा उपद्व्याप कोणासाठी? खरंतर एवढा स्वाभिमान त्यांचा उतू चाललेला असतो की बोलायचे कामच नाही राव... खरंतर तो कोणाची जिरवण्यासाठी म्हणून दुसऱ्यांची अंडी-मटण खातो का त्याला विकासाचे महत्व कळते म्हणून तो करतो हे कोणास ठाऊक? पण त्यांना एवढे का कळत नाही की बाबांनो जिवंत आहे तोपर्यंत नेते नेते करत बसला तरी तुम्हाला कोणी काही आणून देणार नाही पण मेल्यावर मात्र ज्यांना तुम्ही शिव्या हासडता, ज्यांची तुम्ही डोकी फोडता, कुठल्यातरी नेत्यांच्या सांगण्यावरून ज्या भाऊभावकीतील लोकांचे कुऱ्हाडीने हातपाय तोडतां तेच भावकीतले भाऊबंद खांदा द्यायला पुढे येणार आहेत याचे भान राखा आणि गावच्या भकासासाठी नव्हे तर विकासासाठी काय करता येईल ते बघा तरच तुमचा स्वाभिमान दिसून येईल.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

Friday, 6 October 2017

आरक्षणाची भिक मागत नाही तर हक्क आहे आमुचा...

देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटून गेली पण या देशांतल्या आयुष्यभर भटकंती करणाऱ्या धनगर समाजाला राज्यघटनेने दिलेले अधिकार अजूनही मिळाले नाहीत हे भारत देशाचे खरंतर दुर्दैवच म्हणावे लागेल. राज्यघटनेत अनुसुचित जमातीच्या ३४२ व्या कलमातील महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अनु क्रमांक ३६ वरती ओराॅन, धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे परंतू केवळ शब्दच्छल झाल्याने "र" चा "ड" अर्थातच "धनगर" चा "धनगड" झाला आणि महाराष्ट्र राज्यातील संख्येने दोन कोटी असलेल्या धनगर समाजावर अन्यायाची कुऱ्हाड कोसळून पार मानगुटीमध्ये घुसली ती आजपर्यंत धनगर समाजाच्या मानगुटीतून बाहेर आलीच नाही. अहो येईलच कशी? वक्रतुंडाची कृपाच अशी की ती कुऱ्हाड बाहेर काढण्याऐवजी अजून ती खोलवर घुसवण्याचा प्रकार स्वताला जाणते राजे म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांनी केला. एकीकडून आम्ही धनगर समाजाला आरक्षण द्यायला तयार आहोत असे म्हणायचे आणि उलट सुलट अहवाल सादर करून धनगर ऐवजी धनगड या शब्दाची खुंटी मारून ठेवायचा प्रकार पवारांनीच केला. म्हणूनच धनगर समाजाने त्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणूकांत घरी बसवले पण आजा मेला अन् नातू झाला, घरात माणसं तेवढीच या म्हणीप्रमाणे भ्रष्टवादी असलेले पवारांचे राष्ट्रद्रोही सरकार सपशेल पडले आणि नपुंसक असलेले भट जात सरकार सत्तेवर आले. पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणनाऱ्यांनी सतरा कॅबिनेट झाल्या तरी तीन वर्षात अजून आरक्षणाबद्दल ब्र देखिल काढला नाही. धनगर समाजाने ज्या ज्या वेळी आरक्षणाचा जाब विचारला त्या त्या वेळी अभ्यास करतोय असेच उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.
अरे पण अभ्यास कधीपर्यंत करायचा असतो? जर पोरगंच नालायक असेल, शाळा न शिकणारे आणि अभ्यास करणारे नसेल तर बाप त्याला शाळेतून काढून टाकतो दोन चार म्हैसी-गाई घेऊन त्याला बरोबर कामाला जुंपतो. फडणवीस सरकारची पण आता तीच वेळ आली आहे तुमचा बाप धनगर समाज आहे तुम्ही अभ्यास करण्याच्या लायकीचे नाहीत त्यामुळे २०१९ च्या विधानसभेमध्ये प्रवेश घेऊ देणार नाही, तुम्हाला घरी बसवून मेंढ्याच वळायला ठेवतो ते बघा...
धनगर समाज काय आरक्षणाची भीक मागत नाही तर 
1. अगोदर दिलेले राज्यघटनेत असलेले अनुसुचित जमातीच्या कलम ३४२ वरील महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टातील अनुक्रमांक ३६ वरील ओराॅन, धनगर हक्काचे आरक्षण मागत आहे.
2. धनगर समाज अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची मागणी अजिबात करत नाही. तर राज्यघटनेतील दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी धनगर समाजाची रास्त मागणी आहे. 
3. धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये आरक्षण द्या अशाप्रकारच्या बातम्या जातीयवादी मिडीयावाले मुद्दामहून दाखवतात. खरंतर हा मिडीयीवाल्यांचा प्रकार म्हणजे धनगर समाजाला मूळ मागणीपासून परावृत्त करण्यासाठी आहे. मिडीयावाल्यांना तसे करण्यासाठी  फिडबॅक देण्याचे काम जातीयवादी असलेले भटजात सरकार करत आहे.
4. एखाद्या जातीचा/जमातीचा सामावेश जर अनुसुचित जाती/जमाती मध्ये करायवयाचा असल्यास त्याबद्दल अहवाल देण्यासाठी समिती नेमली जाते. परंतू धनगर समाज अगोदरपासूनच अनुसुचित जमातीच्या यादीत आहे त्यामुळे TISS या समितीची नेमणूक करून सरकार आणि धनगर समाजातील नेते धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल देऊ पाहत आहेत.
5. धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लवकरात लवकर लागू कराव्यात यासाठी फक्त आणि फक्त राज्य सरकारची शिफारस केंद्र सरकारला पाठवायची असताना TISS चे भूत धनगर समाजाच्या मानगुटीवर बसवून धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण लांबवण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. यासाठी धनगर नेत्यांनी वेळीच जागे व्हायला हवे अन्यथा समाजाचे वाटोळे व्हायला वेळ लागणार नाही.
                जोपर्यंत धनगर समाज पूर्णपणे जागा होत नाही जातीयवादी सरकारचे षडयंत्र हाणून पाडत नाही तोपर्यंत  समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही. माझा भोळा-भाबडा धनगर समाज रानावनातून, डोंगरदऱ्यातून काट्या कुट्याचा विचार न करता भर ऊन पावसात शेळ्या-मेंढ्याची राखण करतो. आयुष्यभर भटकंती करत असल्याने शिक्षणाचे दरवाजे तर माझ्या भावंडासाठी बंदच आहेत. चराऊ कुरणे सरकारच्या घशात आहेत. मग माझ्या भोळ्या-भाबड्या मेंढपाळ बांधवांनी जगायचे का मरायचे? असा प्रश्न डोक्यात सतत घोळत असतो मग जमातींमधील पुढारी एवढे षंढ कसे काय झालेत? खरंच तुम्ही धनगर जमातीत जन्माला आला असाल TISS चे भूत बाजूला करून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला भाग पाडा मग तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा त्या त्या पक्षाच्या वरिष्ठांचे तळवे चाटत बसण्यापेक्षा आयुष्यभर पायाच्या नडग्या वाळेपर्यंत भटकंती करणाऱ्या माझ्या समाजातील मेंढपाळ बांधवांचे प्रश्न सोडवा. नाहीतर मग लक्षात ठेवा,
कभीना कभी हर कुत्ते का समय आता है।
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे जे आरक्षण दिले होते ते राजकीय आणि सामाजिक मागासलेपणाच्या तत्वावर दिले होते. याशिवाय आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात धनगर समाज अजून मागासलेलाच आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे "भारत देश हा संविधानावर (राज्यघटनेवर) चालतो, कोणत्या राजकीय (बाहुल्यांच्या) पुतळ्यांच्या इशाऱ्यावर नव्हे. त्यामुळे धनगर समाजाची आरक्षण अंमलबजावणीची मागणी ही भारतीय संविधानाला अनुसरून आहे. नाहीतर हक्कासाठी संघर्ष करण्याचा कायदा डाॅ.बाबासाहेबांनी दिलेलाच आहे.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com