Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Wednesday, 16 September 2015

हक्कासाठी सघर्ष...एक कट्टर धनगर

हक्कासाठी संघर्ष...एक कट्टर धनगर
काल परवाची "समजेना हक्क मागतोय की भिक??" ही पोस्ट आज महाराष्ट्रभर फिरत आहे. मी स्वत: धनगर समाजातील व्हाटसपच्या ५१५ ग्रुपवरती आहेच आहे त्याप्रमाणे व्हाटसप च्या अन्य ग्रुपवरतून, ब्लॉग्स आणि फेसबूक च्या माध्यमातून ही पोस्ट लाखो समाजबांधवांपर्यंत पोहचली. परवापासून मला हजारोंच्या वरती समाजबांधवांनी फोन केले आणि माझे अभिनंदन केले. व्हाटसपद्वारे तसेच फेसबूक वरतुन देखिल समाजबांधवांनी कौतुक करून सत्य परिस्थिती असल्याचं सांगितलं. खरंतर मला माझं कौतुक करवून घ्यावयाचे नाही, मला कोणाची शाबासकी मिळवायची आहे अथवा मला प्रसिद्धी मिळवायची आहे अशातला विषय नाही. समाजकार्यासाठी प्रोत्साहन देणं गैर नाही त्यामुळे खरंतर सर्वांचे मी आभार मानतो. पण माझी तळमळ आणि माझा संघर्ष हा माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी व प्रसिद्धीसाठी नसून सर्व तळागळातील धनगर समाजबांधवांसाठी आहे. धनगर समाजातील नेत्यांचा मला खरोखरच अभिमान वाटतो आणि धनगर समाजातून जास्तीत जास्त युवक राजकारणात कसे पुढे येतील त्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असतो. कोणत्याही नेत्यांच्या विरोधात लिहावं असं मला मुळीच वाटत नाही पण समाजाच्या न्याय व हक्कासाठी सर्व नेत्यांनी एकत्रित यावं आणि संघटित होऊन संघर्ष करावा यासाठी मी समाजप्रबोधन करतोय. जर नेत्यांना समाजाशी काही घेणं देणं नसेल आणि ते संबंधित नेते धनगर समाजाचा फक्त त्यांच्या स्वार्थासाठी वापर करत असतील तर त्या त्या माजलेल्या नेत्यांचे कपडे फाडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आज महाराष्ट्रात धनगर समाजाच्या अनेक संघटना उदयास येवू लागल्यात. सामाजिक संघटन असायला पाहिजे त्याबद्दल माझं काही दुमत नाही. पण एखाद्या समाजबांधवांवरती अन्याय होत असताना, समाजातील आई-बहिणींवरती अत्याचार होत असताना त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जर तुमच्या संघटना पुढे येत नसतील तर मग जाळायला संघटना काढल्यात का?? गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाजावरती अन्याय होत आला आहे आणि आजही होतोय. पण धनगर समाजाच्या नावावरती काढण्यात आलेल्या संघटना स्वार्थासाठी चालवल्या जात आहेत असा आरोप करायला मला काही वावगं वाटणार नाही. जर तुमच्या संघटनेचं उद्दिष्ट हे समाजाच्या हितासाठीचंच असेल तर मग राज्य पातळीवर आणि राष्ट्र पातळीवर सर्व संघटना व त्यांचे पदाधिकारी यांनी एकत्रित येवून चर्चा, विचार-विनीमय करावा. अन्यथा स्वताचिच जाहिरातबाजी अन् बैनरबाजी करून तुमच्या स्वार्थासाठी समाजाचा वापर तुम्ही करायचा प्रयत्न करत असाल तर ते होऊ देणार नाही. समाजाचं बाजारीकरण करून समाजाला लांडग्यांच्या अर्थातच प्रस्थापितांच्या दावणीला नेऊन बांधायचा प्रयत्न कराल तर त्या बाजारबुणग्यांचा समाचार घ्यायला मी खंबीर आहे अन् त्यांना राजकीय संन्यास घ्यायला लावून घरात बसवल्याशिवाय शांत बसणार नाही. आज व्हाटसप फेसबुक वरतुन पाहायला भेटतंय की जो तो उठतोय अन् म्हणतोय मी मी धनगर समाजाचा नेता आहे. समाजातून नवनवीन नेते उदयास येताहेत त्याबद्दल काही वाद नाही पण प्रत्येकाने अखंड धनगर समाजाचा नेता म्हणवून घेणं म्हणजे समाजात विभाजन करत असल्याचं चित्र दिसून येतंय. जर समाजात विभाजन करायचं नसेल तर त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या विभागातून तालुक्याचे, जिल्ह्याचे नेतृत्व करून राज्यपातळी अन् राष्ट्रपातळीवरती एकत्रित यावे तरच समाज संघटित झाल्याचं दिसून येईल. अन्यथा प्रत्येकजण आरक्षणाचं श्रेय आपल्याच पारड्यात पडावं म्हणून उपद्व्याप करत बसला तर पुढच्या १०० पीढ्या जरी बरबाद झाल्या तरी आरक्षण मिळणार नाही हे सुद्धा तितकच सत्य आहे. यासाठी धनगर समाजातील पोटजाती बाजूला ठेऊन, धनगर समाजाच्या नेत्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता आजी/माजी आमदारांनी एकत्रित येऊन चर्चा करावी आणि एखादा दिवस निश्चित करून नागपूर विधानभवनावर "विराट जन आंदोलन" उभा करावं. २५००००० लाखांच्या वरती धनगर समाजाला नागपूर विधानभवनावर एकत्रित आणायची जबाबदारी माझी राहील पण वेगवेगळे मोर्चे आयोजित करून राजकिय पोळी भाजून घ्यायचा तुमचा डाव हाणून पाडल्याशिवाय सोडणार नाही अर्थातच तुमचा स्वार्थापोटीचा मोर्चा यशस्वी होऊ दिला जाणार नाही. ही विनंती समजा नाहीत धमकी. कारण प्रस्तापितांची खेळी आहे की तुम्ही वेगवेगळे मोर्चे आयोजित करून समाजात विभाजन घडवून आणावं जेणेकरुन धनगर समाजाला आपल्या ध्येयापर्यंत सहजासहजी पोहचता येणार नाही. हे प्रस्तापितांचे राजकारण आज तरी समजून घ्या तुम्ही वेगवेगळे मोर्चे काढून जर विधानभवनावर गेला तर आपलंच हसू होईल यासाठी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एकाच दिवसी संघटितपणे निश्चित केलेला मोर्चा यशस्वी होण्यासाठी प्रत्येक समाजबांधव प्राणपणाने कार्य करेल पण वेगवेगळे मोर्चे जर विधानभवनावर घेऊन जात असाल तर तुमच्या स्वार्थीपणाचं उद्दीष्ट कधीही साध्य होऊ देणार नाही.

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

No comments:

Post a Comment