रविवार दि ४ अॉक्टोबर २०१५ रोजी दु: २:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पटेल चौक, गणपती पेठ सांगली येथे "आदिम जमात धनगर समाज एक सायंटिफिक प्रबोधन" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त युवा वर्ग महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केलेले आहे.
गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाजाला जाणूनबूजून अनुसुचित जमातीच्या सवलती दिल्या नाहीत पण आज सनातनी संस्थांच्या शिकवणीतून आणि प्रस्थापितांच्या नादाला लागून धनगर समाजातीलच काही समाजबांधव आम्हाला आरक्षणच नको समानता हवी असे म्हणत अज्ञानपणाच्या आणि मुर्खपणाच्या बाता करताना दिसून येताहेत. धनगर समाजाला अथवा अन्य इतर समाजाला स्वातंत्र्यानंतरच आरक्षण दिले गेले अथवा राज्यघटनेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केली अशातला विषय नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळातही आरक्षणाचे जनक छत्रपति राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरवात केली होती.
आरक्षण पद्धत बंद करुन या देशात समानता असायला हवी असं प्रत्येकाला वाटते यास मी सुद्धा अपवाद नाही. पण आजच्या घडीला शैक्षणिक संस्था, सोसायट्या, सुतगिरण्या, कारखाने, लघूउद्योग त्याचप्रमाणे मोठमोठे उद्योग, भांडवलशाहीत, प्रशासनात अन् राजकारणात कोणता समाज प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळतो याचा अभ्यास कधी केलात का?? प्रस्तापित नेते आणि सनातनी व्यवस्था व संस्था यांनी देशाची तिजोरी लूटून ते आज भांडवलदार बनले आहेत. मग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार प्रत्येकाला शैक्षणिक क्षेत्रात वाटा मिळेल असं म्हणनार्यांनी माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजातील शेळ्या-मेंढ्यांमागे भटकंती करणार्या माझ्या लहान बहिण-भावंडांचा कधी विचार केलात का?? आजचे माजलेले आणि मस्तावलेले शिक्षण सम्राट सहजासहजी माझ्या या भावडांना खरंच शिक्षण/न्याय देतील का?? या देशातील जनतेला बाबासाहेबांनी लोकशाहीचा मार्ग दाखवून दिला त्या राज्यघटनेनुसार या देशाचा राज्यकारभार सुरळितपणे चालला आहे आणि चालतही राहील पण जर आरक्षण पद्धत बंद केली असती तर आज देशात लोकशाहीची जागा ठोकशाहीने घेतली असती अन् तुम्ही-आम्ही या देशातल्या माजलेल्या धनदांडग्याची अन् सनातनी समजल्या जाणार्या औलादींची धुणी-भांडी करत बसलो असतो. हे तुम्हा-आम्हाला कधी समजणार?? कोणताही मागचा पुढचा विचार न करता नुसतंच उचलली जिभ अन् लावली टाळ्याला असंच करत बसला तर त्या सनातन्यांचे उद्दीष्ट साध्य व्हायला काही वेळ लागणार नाही. गुणवत्तेनुसार अथवा वार्षिक उत्पन्नानुसार आरक्षण असावं असं म्हणत असाल तर गेल्या ६७ वर्षापासून सतत डोंगरदरीत राहून वास्तव्य करणारा, पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरणारा, शैक्षणिक, राजकीय त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या अतिमागासलेपणा असलेला माझा धनगर समाज कधीच प्रवाहात येणार नाही अन् आमच्या उद्याच्या पिढीला शिक्षण, रोजगार, उद्योग यातील काहीच मिळनार नाही तसेच प्रशासनातून आणि राजकारणातून आम्ही शेकडो मैल दूर लोटलो जाऊ.
त्यासाठीच उद्याच्या भावी पिढीच्या भल्यासाठी आजचा युवा वर्ग जागरूक व्हाव हे उद्दीष्ट ठेवून दि ४ अॉक्टोबर रोजी सांगली येथे आदिम जमात धनगर समाज एक सायंटिफिक प्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्व विद्यालयीन, महाविद्यालयीन, विद्यार्थी-विद्यार्थीनींनी, समाजातील सुशिक्षित आणि सुज्ञ युवक/युवतींनी, शिक्षकवर्ग त्याचप्रमाणे बुद्धिजीवी समाजबांधवांनी व राज्यातील सर्व संघटनांनी मतभेद विसरुन आणि राजकिय पक्षाच्या चपला बाहेर ठेवून सर्व पक्षातील नेत्यांनी सदरच्या कार्यक्रमास उपस्थीत राहून आरक्षणासंदर्भातील भ्रम दूर करून वास्तव काय आहे याचा अभ्यास करावा आणि अवलोकन करावे.
सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर तसेच आसपासच्या जिल्ह्यातून व राज्यभरातून या कार्यक्रमास येणार्या समाजबांधवांनी आपला सहभाग नोंदवावा जेणेकरून संयोजकांना उपस्थित राहणार्या समाजबांधवांची योग्य ती व्यवस्था करता येईल.
सहभाग नोंदणी आणि अधिक माहितीसाठी
संपर्क:-
अभिषेक धडस 9021094360
नितिनराजे अनुसे 7666994123
रेवाप्पा खोत 9623474597
मंगेश लंबाडे 8552854200
भारत व्हणमाने 8806113906
जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।
जय यशवंत!! जय वीरांगणा भिमाई!!!
👉नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
जास्तीत जास्त युवा वर्ग महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केलेले आहे.
गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाजाला जाणूनबूजून अनुसुचित जमातीच्या सवलती दिल्या नाहीत पण आज सनातनी संस्थांच्या शिकवणीतून आणि प्रस्थापितांच्या नादाला लागून धनगर समाजातीलच काही समाजबांधव आम्हाला आरक्षणच नको समानता हवी असे म्हणत अज्ञानपणाच्या आणि मुर्खपणाच्या बाता करताना दिसून येताहेत. धनगर समाजाला अथवा अन्य इतर समाजाला स्वातंत्र्यानंतरच आरक्षण दिले गेले अथवा राज्यघटनेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केली अशातला विषय नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळातही आरक्षणाचे जनक छत्रपति राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरवात केली होती.
आरक्षण पद्धत बंद करुन या देशात समानता असायला हवी असं प्रत्येकाला वाटते यास मी सुद्धा अपवाद नाही. पण आजच्या घडीला शैक्षणिक संस्था, सोसायट्या, सुतगिरण्या, कारखाने, लघूउद्योग त्याचप्रमाणे मोठमोठे उद्योग, भांडवलशाहीत, प्रशासनात अन् राजकारणात कोणता समाज प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळतो याचा अभ्यास कधी केलात का?? प्रस्तापित नेते आणि सनातनी व्यवस्था व संस्था यांनी देशाची तिजोरी लूटून ते आज भांडवलदार बनले आहेत. मग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार प्रत्येकाला शैक्षणिक क्षेत्रात वाटा मिळेल असं म्हणनार्यांनी माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजातील शेळ्या-मेंढ्यांमागे भटकंती करणार्या माझ्या लहान बहिण-भावंडांचा कधी विचार केलात का?? आजचे माजलेले आणि मस्तावलेले शिक्षण सम्राट सहजासहजी माझ्या या भावडांना खरंच शिक्षण/न्याय देतील का?? या देशातील जनतेला बाबासाहेबांनी लोकशाहीचा मार्ग दाखवून दिला त्या राज्यघटनेनुसार या देशाचा राज्यकारभार सुरळितपणे चालला आहे आणि चालतही राहील पण जर आरक्षण पद्धत बंद केली असती तर आज देशात लोकशाहीची जागा ठोकशाहीने घेतली असती अन् तुम्ही-आम्ही या देशातल्या माजलेल्या धनदांडग्याची अन् सनातनी समजल्या जाणार्या औलादींची धुणी-भांडी करत बसलो असतो. हे तुम्हा-आम्हाला कधी समजणार?? कोणताही मागचा पुढचा विचार न करता नुसतंच उचलली जिभ अन् लावली टाळ्याला असंच करत बसला तर त्या सनातन्यांचे उद्दीष्ट साध्य व्हायला काही वेळ लागणार नाही. गुणवत्तेनुसार अथवा वार्षिक उत्पन्नानुसार आरक्षण असावं असं म्हणत असाल तर गेल्या ६७ वर्षापासून सतत डोंगरदरीत राहून वास्तव्य करणारा, पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरणारा, शैक्षणिक, राजकीय त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या अतिमागासलेपणा असलेला माझा धनगर समाज कधीच प्रवाहात येणार नाही अन् आमच्या उद्याच्या पिढीला शिक्षण, रोजगार, उद्योग यातील काहीच मिळनार नाही तसेच प्रशासनातून आणि राजकारणातून आम्ही शेकडो मैल दूर लोटलो जाऊ.
त्यासाठीच उद्याच्या भावी पिढीच्या भल्यासाठी आजचा युवा वर्ग जागरूक व्हाव हे उद्दीष्ट ठेवून दि ४ अॉक्टोबर रोजी सांगली येथे आदिम जमात धनगर समाज एक सायंटिफिक प्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्व विद्यालयीन, महाविद्यालयीन, विद्यार्थी-विद्यार्थीनींनी, समाजातील सुशिक्षित आणि सुज्ञ युवक/युवतींनी, शिक्षकवर्ग त्याचप्रमाणे बुद्धिजीवी समाजबांधवांनी व राज्यातील सर्व संघटनांनी मतभेद विसरुन आणि राजकिय पक्षाच्या चपला बाहेर ठेवून सर्व पक्षातील नेत्यांनी सदरच्या कार्यक्रमास उपस्थीत राहून आरक्षणासंदर्भातील भ्रम दूर करून वास्तव काय आहे याचा अभ्यास करावा आणि अवलोकन करावे.
सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर तसेच आसपासच्या जिल्ह्यातून व राज्यभरातून या कार्यक्रमास येणार्या समाजबांधवांनी आपला सहभाग नोंदवावा जेणेकरून संयोजकांना उपस्थित राहणार्या समाजबांधवांची योग्य ती व्यवस्था करता येईल.
सहभाग नोंदणी आणि अधिक माहितीसाठी
संपर्क:-
अभिषेक धडस 9021094360
नितिनराजे अनुसे 7666994123
रेवाप्पा खोत 9623474597
मंगेश लंबाडे 8552854200
भारत व्हणमाने 8806113906
जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।
जय यशवंत!! जय वीरांगणा भिमाई!!!
👉नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
No comments:
Post a Comment