महाराष्ट्र राज्याचा बुलंद आवाज गतिमान युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज दि. १ आॅक्टोबर रोजी वाढदिवस त्यानिमीत्ताने या लाडक्या नेत्याला खरंतर वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. परंतू माझा वाढदिवस साजरा करू नका असे आवाहन मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना गोरगरीब कष्टकरी व शेतकरी जनतेला केले आहे. त्याचे कारण असे की आटपाडी तालुक्यात एवढा पाऊस पडून देखिल दुष्काळ सदृश परिस्थिती अजूनही जशीच्या तशीच आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका हा खरंतर माणदेशातला एक भाग नेहमीच दुष्काळाच्या छत्रछायेखालचा प्रदेश दगडधोंडे आणि माळरानांनी व्यापलेला हा प्रदेश हिरवळीने नटलेला आम्हीतरी जन्मापासून कधी पाहिलाच नाही. कदाचित पर्जन्यवृष्टीची वक्रदृष्टी या माणदेशावर झाली असावी म्हणूनच माणदेश दुष्काळाच्या झळया सोसत आहे. त्याच माणदेशातला तरूणडफदार युवक राजकारणात येतो व राजसत्ता आणि राजपाथ कधीही मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो असे सांगत कोणताही राजकीय वारसा नसताना सत्ता तसेच कोणतेही पद नसताना सन २००७ पासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी अनेक विकासकामांचा अक्षरशा डोंगर उभा केला. जनतेच्या हितासाठी, गोरगरीबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या विकासासाठीच मी जन्म घेतला आहे असे सांगतानाच ते नेहमीच त्यांच्या सभेतून म्हणतात की जर तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय हा मिळालाच पाहिजे.
२००७ पासून आज २०१७ पर्यंत एकूण १० वर्षांच्या कार्यकिर्दीत महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात अनेक संकटांना तोंड देत तसेच प्रस्तापित व्यवस्थेच्या विरोधात (अर्थातच प्रवाहाच्या विरोधातील) सर्वात मोठा संघर्ष कोणी केला असेल तर युवकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांचे नाव सर्वात पुढे येते. मग तिथे शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असो, प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून गोरगरिब कष्टकरी जनतेचा अथवा विद्यार्थ्यांची कोणतीही समस्या असेल तर रात्री अपरात्री त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब यांची ओळख आहे. आटपाडीतील जनता पाण्यावाचून तडफडत होती तेव्हा टेंभूच्या कार्यालयाची तोडफोड करून गोपीचंद पडळकर यांनी न्याय मागितला होता, माजी मंत्री जयंत पाटील यांची गाडी अडवून पाण्याचा जाब विचारला, माजी केंद्रीय कृषिमंत्र्यांची गाडी आडवण्याचे आवाहन दिले होते पण शरद पवार घाबरूनच भिवघाटमार्गे तासगावला पळून गेले, एका रात्रीत राजेवाडी तलावाचा डावा कालवा फोडून ते पाणी आटपाडीकडे वळवले अशी एक ना अनेक आंदोलने, मोर्चे, रास्तारोखो करून कोणतेही पद नसताना सत्ता नसताना पडळकर साहेबांनी शेतकऱ्यांसाठी कामे केली तेव्हा गोपीचंद पडळकर साहेब यांच्यामुळे प्रस्तापित व्यवस्थेला जबरदस्त सुरूंग लागला म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस टाकण्यापर्यंत आर.आर.पाटील सुद्धा ...ला पाय लावून पळत होते हे अख्ख्या महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे. एवढेच नव्हे तर आटपाडी-खानापूरच नव्हे तर सांगली जिल्ह्यांच्या राजकारणातला काटा बाजूला करावा म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून पार जिल्हाहद्दपारीची नोटीस देखिल बजावली होती परंतू या कृत्याबद्दल प्रांताधिकारी यांनी प्रस्तापित व्यवस्थेला चांगलेच खडेबोल सुनावले व जिल्हाहद्दपारीची नोटीस रद्द केली होती. जो जनता के लिए लढतां है जनता उसी का साथ देता है। त्यामुळे गोपीचंद पडळकर साहेब यांचा पाण्यासाठीचा लढा हा स्वताची शेती भिजवण्यासाठी नव्हता तर आटपाडी तालुक्याची तहान भागावी म्हणून होता... आणि अजूनही त्यांचा लढा अविरतपणे चालू आहे.
गोपीचंद पडळकर साहेब यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करून सांगितले आहे की माझा वाढदिवस कुठेही साजरा करू नका, कुठेही डीजीटल फ्लैक्स, फेटे, केक, हार, तुरे (पुष्पगुच्छ) या गोष्टींवर निरर्थक पैसा खर्च करू नका त्याऐवजी एखाद्या गरजूंना मदत करा. तुमच्या शुभेच्छां आणि तुमचे प्रेम सदैव माझ्यासोबत आहे त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी वेळ पैसा खर्च न करता त्याऐवजी गोरगरिब जनतेची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची सुखदुःख जाणून घ्या शक्य तेवढी त्यांना मदत करा. शेतकरी वाचला तरच देश वाचेल म्हणून माझ्या बळीराजाच्या अडीअडचणी समजून घ्या प्रशासन विभाग असो मंत्रालय असो तिथे तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा त्यांचा पाठपुरावा करा. शासकीय योजना सर्व तळागळातील जनतेपर्यंत पोहचवा, सध्या बेरोजगारी वाढत चालली असून रोजगारवाढीसाठी रोहयो सारख्या उपयुक्त असणाऱ्या योजनांची माहिती मिळवून त्या योजना आमलात आणा. औद्योगिकीकरणामुळेच देशाचा विकास होतो म्हणून तरूण-तरुणींनी औद्योगिकीकरणाकडे वळावे. राष्ट्रमाता अहिल्याईंचा आदर्श अख्ख्या जगाने घेतला त्याच राष्ट्रमातेचा आदर्श घेऊन झाडे लावा झाडे जगवा ची योजना कागदोपत्रापुरतीच मर्यादित न ठेवतां आमलात आणा. पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेखाली शेततळे, बांध, बंधारे बांधण्यासाठी सरकार खात्यातून निधी घ्या व शेतात जास्तीत जास्त पाण्याचा साचा. निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. माझ्या वाढदिवसासाठी खर्च करायचाच असेल तर मुलींच्या जन्माचे स्वागत करा, मुलींच्या सुरक्षेसाठी मुलींना तायक्वांदो, कराटे ज्यूडो यांचे मोफत प्रशिक्षण द्या. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तोट्या बसवा, जणावरांसाठी जास्तीत जास्त चारा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पुस्तके पेन वह्या यांचे वाटप करा. तरूणांना नोकरी तसेच उद्योग क्षेत्रांतील माहितीसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करा. सामाजिक प्रबोधन तसेच जागृती करा अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरित करा. एकमेकांच्या मदतीला धावून जा असे केले तर प्रत्येक दिवस हा माझा वाढदिवस साजरा केल्यासारखाच आहे असे गोपीचंद पडळकर साहेब म्हणाले.
मनासारखा नेता आणि राजासारखं मन असलेला हा सर्वसामान्यातील एक असामान्य नेता, तरूणतडफदार गतिमान युवा नेतृत्व, महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा. गोरगरिब जनतेच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या हातून असेच कार्य घडो हीच मल्हारी मार्तंड चरणी प्रार्थना🙏
💐💐💐💐💐💐💐💐
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com
२००७ पासून आज २०१७ पर्यंत एकूण १० वर्षांच्या कार्यकिर्दीत महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात अनेक संकटांना तोंड देत तसेच प्रस्तापित व्यवस्थेच्या विरोधात (अर्थातच प्रवाहाच्या विरोधातील) सर्वात मोठा संघर्ष कोणी केला असेल तर युवकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांचे नाव सर्वात पुढे येते. मग तिथे शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असो, प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून गोरगरिब कष्टकरी जनतेचा अथवा विद्यार्थ्यांची कोणतीही समस्या असेल तर रात्री अपरात्री त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब यांची ओळख आहे. आटपाडीतील जनता पाण्यावाचून तडफडत होती तेव्हा टेंभूच्या कार्यालयाची तोडफोड करून गोपीचंद पडळकर यांनी न्याय मागितला होता, माजी मंत्री जयंत पाटील यांची गाडी अडवून पाण्याचा जाब विचारला, माजी केंद्रीय कृषिमंत्र्यांची गाडी आडवण्याचे आवाहन दिले होते पण शरद पवार घाबरूनच भिवघाटमार्गे तासगावला पळून गेले, एका रात्रीत राजेवाडी तलावाचा डावा कालवा फोडून ते पाणी आटपाडीकडे वळवले अशी एक ना अनेक आंदोलने, मोर्चे, रास्तारोखो करून कोणतेही पद नसताना सत्ता नसताना पडळकर साहेबांनी शेतकऱ्यांसाठी कामे केली तेव्हा गोपीचंद पडळकर साहेब यांच्यामुळे प्रस्तापित व्यवस्थेला जबरदस्त सुरूंग लागला म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस टाकण्यापर्यंत आर.आर.पाटील सुद्धा ...ला पाय लावून पळत होते हे अख्ख्या महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे. एवढेच नव्हे तर आटपाडी-खानापूरच नव्हे तर सांगली जिल्ह्यांच्या राजकारणातला काटा बाजूला करावा म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून पार जिल्हाहद्दपारीची नोटीस देखिल बजावली होती परंतू या कृत्याबद्दल प्रांताधिकारी यांनी प्रस्तापित व्यवस्थेला चांगलेच खडेबोल सुनावले व जिल्हाहद्दपारीची नोटीस रद्द केली होती. जो जनता के लिए लढतां है जनता उसी का साथ देता है। त्यामुळे गोपीचंद पडळकर साहेब यांचा पाण्यासाठीचा लढा हा स्वताची शेती भिजवण्यासाठी नव्हता तर आटपाडी तालुक्याची तहान भागावी म्हणून होता... आणि अजूनही त्यांचा लढा अविरतपणे चालू आहे.
गोपीचंद पडळकर साहेब यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करून सांगितले आहे की माझा वाढदिवस कुठेही साजरा करू नका, कुठेही डीजीटल फ्लैक्स, फेटे, केक, हार, तुरे (पुष्पगुच्छ) या गोष्टींवर निरर्थक पैसा खर्च करू नका त्याऐवजी एखाद्या गरजूंना मदत करा. तुमच्या शुभेच्छां आणि तुमचे प्रेम सदैव माझ्यासोबत आहे त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी वेळ पैसा खर्च न करता त्याऐवजी गोरगरिब जनतेची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची सुखदुःख जाणून घ्या शक्य तेवढी त्यांना मदत करा. शेतकरी वाचला तरच देश वाचेल म्हणून माझ्या बळीराजाच्या अडीअडचणी समजून घ्या प्रशासन विभाग असो मंत्रालय असो तिथे तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा त्यांचा पाठपुरावा करा. शासकीय योजना सर्व तळागळातील जनतेपर्यंत पोहचवा, सध्या बेरोजगारी वाढत चालली असून रोजगारवाढीसाठी रोहयो सारख्या उपयुक्त असणाऱ्या योजनांची माहिती मिळवून त्या योजना आमलात आणा. औद्योगिकीकरणामुळेच देशाचा विकास होतो म्हणून तरूण-तरुणींनी औद्योगिकीकरणाकडे वळावे. राष्ट्रमाता अहिल्याईंचा आदर्श अख्ख्या जगाने घेतला त्याच राष्ट्रमातेचा आदर्श घेऊन झाडे लावा झाडे जगवा ची योजना कागदोपत्रापुरतीच मर्यादित न ठेवतां आमलात आणा. पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेखाली शेततळे, बांध, बंधारे बांधण्यासाठी सरकार खात्यातून निधी घ्या व शेतात जास्तीत जास्त पाण्याचा साचा. निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. माझ्या वाढदिवसासाठी खर्च करायचाच असेल तर मुलींच्या जन्माचे स्वागत करा, मुलींच्या सुरक्षेसाठी मुलींना तायक्वांदो, कराटे ज्यूडो यांचे मोफत प्रशिक्षण द्या. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तोट्या बसवा, जणावरांसाठी जास्तीत जास्त चारा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पुस्तके पेन वह्या यांचे वाटप करा. तरूणांना नोकरी तसेच उद्योग क्षेत्रांतील माहितीसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करा. सामाजिक प्रबोधन तसेच जागृती करा अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरित करा. एकमेकांच्या मदतीला धावून जा असे केले तर प्रत्येक दिवस हा माझा वाढदिवस साजरा केल्यासारखाच आहे असे गोपीचंद पडळकर साहेब म्हणाले.
मनासारखा नेता आणि राजासारखं मन असलेला हा सर्वसामान्यातील एक असामान्य नेता, तरूणतडफदार गतिमान युवा नेतृत्व, महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा. गोरगरिब जनतेच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या हातून असेच कार्य घडो हीच मल्हारी मार्तंड चरणी प्रार्थना🙏
💐💐💐💐💐💐💐💐
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com
No comments:
Post a Comment