Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday, 14 December 2017

आता याला आमदार म्हणायचं की भिताड?


गोरगरीब जनतेचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा विकास व्हावा म्हणून विधानसभा मतदारसंघांची निर्मीती करून त्या त्या प्रत्येक मतदारसंघातून एकेक लोकप्रतिनीधी निवडला जातो त्यालाच विधानसभा सदस्य अर्थातच आमदार म्हंटलं जातं. आमदार हा जनतेचा सेवक असतो जनतेवरील होणाऱ्या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सरकार दरबारी आपल्या मतदार संघातील जनतेसाठी न्याय मागत असतो पण आमच्या खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून आमच्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी विश्वास ठेवून एक आगळा वेगळाच गडी आमदार म्हणून विधानसभेत पाठवला पण त्या आमदाराने त्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या हिताचा एकही प्रश्न विधानसभेत उपस्थित केला नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. परंतू जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांनी दुष्काळात होरपळलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी असंख्य प्रश्न निर्माण केलेत. माणदेशातील आटपाडी तालुका हा बारमाही दुष्काळी असतो ही एक तालुक्याची वेगळीच ओळख महाराष्ट्र राज्यात असताना शेतीसाठी जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याची दैना होत असताना यावरती एकही उपाययोजना करण्याचे कार्य येथील निष्क्रीय आमदार अनिल बाबर यांनी कधीच केले नाही.
"पोरगं कोणाचं आणि पेढं वाटतंय कोण?" अशा आशयाचा ब्लाॅग मी गेल्या दोन वर्षांपूर्वी प्रकाशित केला होता त्याचे कारण असे होते की युवह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या फंडातून आटपाडी तालुक्यांतील रस्त्यांसाठी भरघोस निधी मिळाला असताना तो निधी आम्हीच आणला असल्याचा कांगावा करत वर्तमानपत्रातून बातम्या देऊन व रस्त्यांचे भुमिपूजन करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सध्याचे निष्क्रीय आमदार अनिल बाबर व त्यांची पिलावळ करत होती म्हणून पोरगं कोणाचं आणि पेढं वाटतंय कोण असे म्हणायला काही वावगे वाटले नाही.
पण आता तर या आमदारांनी तर हद्दच पार झाली राव... कारण २७ आॅक्टोबर २०१५ रोजी मुख्यमंत्री आटपाडी-खानापूर दौऱ्यावर आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वता अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी तब्बल ४ कोटी निधी मंजूर केला होता. पण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकण्यास गावागावात जाऊन अनिल बाबर यांनी लोकांना प्रवृत्त केले होते अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या शिवाय काळ्या फिती बांधून कशासाठी त्यांनी निषेध केला होता हे देव जाणे बुवा?? पण असे आमदार काय कामाचे?? मुख्यमंत्र्यांनी अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी ४ कोटीचा निधी मंजूर केल्यानंतर युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी लोकसहभागातून आणि शासनाच्या वतीने पाठपुरावा करून अग्रणी नदीवर आतापर्यंत एकून ११ बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण केले असताना त्याच अग्रणी नदीवरील दोन बंधाऱ्याचे काम आमदार अनिल बाबर यांनी होऊनच दिले नव्हते. मग आमदार नक्की कशासाठी असतो तेच मला कळेना? जनतेच्या विकासासाठी की मतदारसंघाच्या भकासासाठी?? ऐन दुष्काळात जनता पाण्यावाचून तडफडत असताना, मुकी जणावरं ही धगधगत्या उन्हात होरपळत असताना याच मतदारसंघाच्या आमदारांनी नदीच्या काठावर वसलेल्या बलवडी (खा) व अन्य गावांसाठी बंधाऱ्याचे काम होऊ दिले नाही ही त्यांच्यासाठी आणि लोकशाहीसाठी सर्वात मोठी लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. लोकसहभागातून आणि शासनाच्या वतीने अग्रणी नदीवर एकूण ११ बंधारे बांधण्यात आले होते. सहा महिन्यांपूर्वीच आणखीन तीन बंधाऱ्यांचे भुमिपूजन नुकतेच मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हस्ते झाले होते परंतू आमदार अनिल बाबर यांची पिलावळ मात्र जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी जे बंधारे अडवून धरले होते ते बंधारे आम्हीच मंजूर करून आणले आहेत असे सांगत अडवलेल्या दोन बंधाऱ्यांचे स्वता भुमिपूजन करून वर्तमानपत्रात बातम्या छापून द्यायचा घाणेरडा उद्योग आणि घाणेरडे राजकारण निष्क्रीय आमदार अनिल बाबर आणि त्यांच्या पिलावळीने केले. त्यांच्या असल्या उद्योगाचे हसू खानापूर मधील जनतेला आलं होत.
आज मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी बांधव, गोरगरीब जनता ही अज्ञानी राहीली नसून सुशिक्षीत झालेली आहे त्यामुळे जनतेच्या प्रतिनीधींनी असे उलट-सुलट प्रकार करून स्वताच्या प्रसिद्धीसाठी उतावीळ होऊ नये. खरी समाजसेवा ही रक्तातच असावी लागते नुसताच दिखाऊपणा करून विकासकामे होत नाहीत तर विकासकामे करण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी मंत्रालयाच्या पायऱ्या कोणत्याही पदासाठी अथवा दिखाऊगीरी करण्यासाठी झिजवल्या नाहीत तर त्यांनी कोणतेही पद नसताना जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडले आहेत प्रत्यक्ष जलसंधारण मंत्री, जलसंपदा मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांशी भेटून जल शिवार योजनेतून बंधारे, तलाव, शेततलाव यांना मंजूरी मिळवून आणली कारण दुष्काळात उमललेलं एक संघर्ष फूल म्हणूनच पडळकर साहेबांची ओळख महाराष्ट्र राज्यभर आहे आणि पडळकर साहेब देखिल वरील दिलेल्या उपाधीस त्यांच्या कार्यातून पात्र ठरतात.
असो, पोरगं कोणा दुसऱ्यांच असताना या लोकांना पेढं वाटण्यात का आनंद वाटतो याचं गणित आम्हासारख्या सर्वसामान्य जनतेला न कळण्या इतपत आम्ही काय बोळ्याने दुध पित नाही त्यामुळे त्या आमदारांना आणि त्यांच्या पिलावळीस आतातरी शहाणपण यायला हवे. कालच हा आमदार नागपूर येथिल हिवाळी अधिवेशनात बोलताना सभागृहातच गोंधळून गेला. कारण ५१ लाखांचा निधी गोपीचंद पडळकर साहेबांच्या विशेष प्रयत्नातून मतदारसंघासाठी मिळाला असताना त्याचे श्रेय लाटण्यासाठी हा आमदार गडी सभागृहातच बरळायला लागला. ५१ लाखांचा निधी पाहून त्याला विश्वासच बसला नाही चष्मा चढवून/उतरवून पाहिलं तरी आकडा तोच होता पण कोणत्या गावांसाठी किती निधी आणला आहे हे त्याला सांगता आलं नाही याचं गणित त्याची त्याला उमजलं नाही. म्हणून काल दिवसभर उपाशी राहून हा गडी विचार करत बसला होता की "सर्वसामान्य घराण्यातलं कालचं तरूण पोरगं प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटून राजकारणात येतं आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा" मानून दिवसरात्र दुष्काळात होरपळलेल्या जनतेसाठी राबराब राबतंय. ना कोणते पद ना स्वार्थ, केवळ जनतेचा विकास हात ध्यास मनात ठेवून पायाला भिंगरी, तोंडात साखर तर वेळप्रसंगी अन्यायाच्या विरोधात मुखातून आगीचे लोळ फेकणारे व्यक्तिमत्व आणि जनतेसाठी अखंड अविरतपणे झटणारे असे मुर्तिमंत उदाहरण उभ्या महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. निष्क्रिय आमदारांना आता पुढच्या आमदारकीचे चांगलेच डोहाळे लागले आहेत त्यामुळे गोरगरीब जनतेच्या हीतासाठी शेतकऱ्यांसाठी एखादी उपाययोजना राबवतां आली नाही म्हणून ज्या योजना युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून राबवल्या गेल्या त्या कशा हायजॅक करून पुढच्या विधानसभा डोळ्यांसमोर ठेऊन बंधाऱ्यांचे तसेच रस्त्यांचे भुमिपूजन करायचे असा प्रकार निष्क्रीय आमदारांनी चालवला आहे पण काल मात्र ५१ लाखांचा निधी स्वता आणल्याचे सांगतानाच गड्याची मात्र बोबडी वळाली. मग अशा लोकप्रतिनिधींना आमदार म्हणायचं की भिताड? जनता आता दुधखूळी राहीली नसून ती सतर्क आणि सुज्ञ झाली आहे याचा गांभिर्याने विचार करावा शिवाय धमक असेल तर त्यांनी जनतेच्या हीताचं गोरगरीबांच्या हीताचं राजकारण करावं अन्यथा तसे जमत नसल्यास राजकारणातून संन्यास घ्यावा ही विनंती.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com

No comments:

Post a Comment