Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Friday, 15 December 2017

महाराष्ट्र देशा! जातीयवाद्यांच्या देशा! तरी तु महान? : नितीनराजे अनुसे

महाराष्ट्र देशा! जातीयवाद्यांच्या देशा! तरी तु महान?

महाराष्ट्राला संतांची भुमी म्हणून संबोधले जाते पण याच मातीने अनेक थोर राजा-महाराजांना, महापुरूषांना त्याचप्रमाणे समाजाचा उद्धार करणाऱ्या थोर समाजप्रबोधकांना/समाजसुधारकांना देखिल जन्म दिला त्यांचा इतिहास लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना ज्ञात आहे शिवाय अनेक जेष्ठ साहित्यकार, इतिहास संशोधक, विचारवंत अभ्यासक यांच्या अथक प्रयत्नातून तसेच संशोधनातूनही उर्वरित इतिहास तमाम महाराष्ट्र वासियांसमोर येत आहे.
पण फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड भारतमातेच्या भुमीत जन्माला आलेल्या थोर महापुरूषांना राजा-महाराजांना जातीयतेच्या चौकटीत बसवण्याचे काम हे जाणूनबूजून व एका विशिष्ट वर्गाने अर्थातच मनुवाद्यांनी/पुरोगाम्यांनी/पुरोहितांनी केले आणि त्यामुळेच आजचा जातीयवाद उफाळला जातोय हे कोणी नाकारू शकत नाही. महाराष्ट्राचे सुपूत्र कवि गोविंदाग्रज यांनी त्यांच्या काव्यात महाराष्ट्र देशाचे जे वर्णन केले आहे ते उल्लेखनीय अप्रतिम आणि वंदनीय अाहेच परंतू,
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!!
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा!!
असे कवि गोविंदाग्रज यांनी वर्णन केलेला त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आणि त्याबद्दलची ही भावनाच मुळात महाराष्ट्र वाशियांच्यातून लोप पावत चालली आहे असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. आज महाराष्ट्र राज्यात एक वेगळेच चित्र पहावयास मिळते ते म्हणजे ज्या महापुरूषांनी जात-पात, धर्म, संप्रदाय, प्रांत, साम्राज्य यापलीकडे जाऊन अखंड भारतवाशीयांसाठी विकासकामांचा डोंगर रचला त्या त्या महापुरूषांना त्यांच्या जन्म कुळानुसार जातीयतेच्या चौकटीत डांबले जातेय आणि त्यांना जातीयवादाच्या चौकटीत डांबण्याचे काम हे खरंतर पुरोहितवाद्यांनी/मनुवाद्यांनी केले आणि आज पुरोगाम्यांचा बुरखा पांघरणारे देखिल जातीयवादाचे भांडवलीकरण करत बसले आहेत ही या महाराष्ट्र देशाची फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. इतिहासाची पाने चाळली तर हा जातीयवादाचा प्रकार लक्षात यायला फार वेळ लागणार नाही... कारण जात-पात-धर्मांची सुरवात ही तथाकथित गौतम बुद्धांच्या जीवनकाळापासून चालत आली आहे आणि त्या जातीयवादाचे मुळ कारण दुसरे कोणी नसून फक्त आणि फक्त ब्राह्मणच होते आणि कोणताही इतिहासकार हे नाकारू शकत नाही.
आज महाराष्ट्र राज्यात शिक्षणाची गंगा घरोदारी पोहचावी म्हणून अनेक विद्यापीठांची स्थापना केली आणि त्या त्या विद्यापीठांना महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या महापुरूषांची नावे दिली आहेत हे खरंतर कौतुकास्पद आहे. पण त्यातही शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जातीयवाद उफाळतो हे मात्र नवलच म्हणावे लागेल. विद्यापीठांच्या यादीपैकी सर्वप्रथमता मराठवाडा विद्यापीठाच्या नांमातरणासाठीच मोर्चे आंदोलने करावी लागल्याची नोंद इतिहासात आहे. त्यानंतर सोलापूर विद्यापीठाचा प्रश्न काही मनुवाद्यांमुळेच ऐरणीवर आल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील ठराविक विद्यापीठांची यादी खालीलप्रमाणे आहे त्यात जुनी आणि रूढ नावे आणि (बदललेली नावे) या सर्वांचा उल्लेख आहे.
* अमरावती विद्यापीठ (कर्मयोगी गाडगेबाबा विद्यापीठ), अमरावती
* औरंगाबाद विद्यापीठ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)
* कालिदास विद्यापीठ (कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय), रामटेक
* कोल्हापूर विद्यापीठ (शिवाजी विद्यापीठ, विद्यानगर), कोल्हापूर
* गोंडवाना विद्यापीठ ((नव्याने सुचविलेले नाव - आदिवासी समाजातील क्रांतिकारी नेते बिरसा मुंडा विद्यापीठ), गडचिरोली.
* जळगाव विद्यापीठ (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ), (नव्याने सुचविलेले नाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ), जळगाव
* दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर
* नागपूर विद्यापीठ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,) नागपूर
* श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई
* नांदेड विद्यापीठ (स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ), नांदेड
* नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठ
* पुणे विद्यापीठ (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), पुणे
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड
* भारतीय विद्यापीठ व्यवस्थापन संस्था, कोल्हापूर
* मराठवाडा विद्यापीठ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)
* महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
* महाराष्ट्र पशुवैद्यकीय आणि मत्स्य विद्यापीठ, नागपूर
* मुंबई विद्यापीठ, (नव्याने सुचविलेले नाव - राजमाता जिजाऊ विद्यापीठ), मुंबई
* नाशिक मुक्त विद्यापीठ (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ), नाशिक
* श्रमिक विद्यापीठ, नागपूर
* श्रमिक विद्यापीठ (नव्याने सुचविलेले नाव - ???), निगडी
* श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्शनगर, वरळी, मुंबई – ४२२४३३.
* सोलापूर विद्यापीठ, (नव्याने सुचविलेले नाव - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ), सोलापूर

महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांची यादी
* अकोला कृषी विद्यापीठ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ), अकोला
* दापोली कृषी विद्यापीठ (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ), दापोली, जिल्हा रत्‍नागिरी
* परभणी कृषी विद्यापीठ (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ), परभणी
* राहुरी कृषी विद्यापीठ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ), राहुरी, जिल्हा अहमदनगर
शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभांपेक्षाही सर्वाधिक महत्वाचा लाभ असून दबलेल्या नि पिचलेल्या मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष आहे व तेही सर्वोच्च शिक्षण , उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगतीपथावर जाऊ शकतात. या विचाराने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे १९५० साली मिलिंद विद्यालयाची स्थापना केली त्यानंतर तिथे विद्यापीठ देखिल व्हायला हवे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली व वरील विद्यापीठांच्या यादीपैकी १९५८ मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्नपुर्ती होऊन मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले. पण त्या विद्यापीठाला काय नाव द्यायचं यासाठी दोन नावे समोर आली एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे म्हणजे शिक्षणाचा मसिहा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर. परंतू १९६२ मध्ये स्थापन झालेल्या कोल्हापूर येथील विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असे नाव अगोदरच दिल्याने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी  राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात दि.२७ जुलै १९७८ रोजी ठराव संमत झाला असताना मनुवाद्यांच्या/जातीयवाद्यांच्या पोटातील पित्त खवळून उठले आणि त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाला विरोध केला. मग दि.४ आॅगस्ट १९७८ पासून सुरू झाली ती दलितांची विद्यापीठ नामांतरणाची लढाई. या लढाईमध्ये कित्येक दलित बांधव शहीद झाले, कोणी भरचौकात स्वताला जाळून घेतले तर काहीठिकाणी याच जातीय दंगलीचा फायदा घेऊन जातीयवाद्यांनी कित्येक दलित माता-भगिनींवरती अन्याय अत्याचार बलात्कार केले, दलितांची घरे जाळली, उघड्या-नागड्या धिंडी काढल्या तरीही दलित बांधव नामांतरणाच्या लढाईपासून परावृत्तीत झाले नाहीत शेवटी तब्बल १७ वर्षाच्या लढाईनंतर १४ जानेवारी १९९४ रोजी दलितांच्या एकजुटीला, दलिंताच्या लढ्याला यश आले आणि मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण होऊन ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे झाले.
सोलापूर विद्यापीठाची स्थापना दि.१ आॅगस्ट २००४ रोजी झाली तर त्याचे रीतसर उद्घाटन हे ३ आॅगस्ट २००४ रोजी झाले त्यानंतर लगेच ४ आॅगस्ट २००४ रोजी सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे अशी धनगर समाजाच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्याई होळकर प्रेमींनी जातीयवादी कुलगुरूंनी सिनेटच्या नावाखाली डावलली तद्नंतर या मागणीसाठी अनेक मोर्चे निघाले शिवाय पत्रव्यवहार देखिल झाला परंतू शासन दरबारी त्याबद्दल कोणतीही दखल घेतली गेली नाही. दोन वर्षांपूर्वीच म्हणजे ७ जुलै २०१४ साली पुणे विद्यापीठाचे नामकरण हे सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे करण्यासाठी कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झाले असातानाच सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे अशी मागणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यानंतर भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर दि.२६ मे २०१६ रोजी सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर असे नामकरण करण्याची तत्वता मान्यता राज्य सरकारने दिली खरी पण त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालीच नाही. परंतू जर सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ वाढेल असा जावई शोध विद्यापीठ प्रशासनाने काढला तर कॅबिनेट मध्ये शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे हे मागचा पुढचा विचार न करता ज्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी पारदर्शक राज्यकारभार व उत्तम प्रशासन व्यवस्थेचा आदर्श जगासमोर ठेवला, जात-पात, धर्म, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन विकासकामांचा डोंगर रचणारी व १८ शतकातील एकमेव आदर्श प्रशासनकर्ती म्हणून जगाने त्या मातेचा गौरव केला हा इतिहास ज्ञात असताना देखिल राष्ट्रामाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ निर्माण होईल असे जाहिरपणे वक्तव्य विधीमंडळात करतात. याचा मथितार्थ म्हणजे राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांना केवळ धनगर जमातीच्या चौकटीत अडकवण्यासाठी लोकप्रतिनिधींचा हा घाणेरडा प्रकार चालू आहे. मग राज्य सरकार आणि राज्य सरकार मधील जातीयवादी आमदार/मंत्री गण काय भांग पिऊन कॅबिनेट चालवतात का? असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्यांना पडतो. परंतू त्याच कॅबिनेटमध्ये असलेले राष्ट्रमाता अहिल्याईंचे अनुयायी म्हणून मिरवणारे आणि ज्या महाराष्ट्राच्या मातीत राष्ट्रमाता अहिल्याई जन्माला आल्या त्याच महाराष्ट्राच्या मातीतले आमदार/मंत्री मात्र आळी मिळी गुप चिळीची भुमिका घेऊन त्यावरती एकही प्रतिक्रिया न देता एक ब्र देखिल न काढतां केवळ लोकप्रतिनिधींनी चालवलेला तमाशा बघत बसतात हेच आमच्या महाराष्ट्र राज्याचे सर्वात मोठं दुर्दैव म्हणावे लागेल. म्हणूनच महाराष्ट्र देशा आणिक जातीयवाद्यांच्या देशा तरी तु महान? कसा काय? असे म्हणायला मला वावगे वाटणार नाही.
परंतू विधीमंडळात अशी विधाने करून लोकप्रतिनिधींना नक्की काय साध्य करायचे आहे असा पुसटसा विचार मनात का येऊ नये? मराठवाडा विद्यापीठाच्या नामंतरणाच्या लढाईचा ज्वलंत इतिहास ज्ञात असताना देखिल, हजारो दलितांची घरे जळून खाक झाली हे माहित असताना देखिल, त्या नामांतरण लढाईचा गैरफायदा घेऊन पुरोगाम्यांनी/पुरोहितवाद्यांनी दलित माता-भगिनींवर अन्याय अत्याचार व बलात्कार केला शिवाय कित्येक दलित बांधवांनी भर चौकात स्वताला पेटवून घेतले हे माहित असताना देखिल सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरणासाठी जातीय रंग देण्याचा प्रकार जर विद्यापीठ प्रशासन व त्यापाठोपाठ राज्य सरकार स्वता करत असेल तर त्यापाठीमागचा राज्य सरकारचा उद्देश हा स्पष्ट आहे की पुन्हा एकदा जातीय दंगल व्हावी, अनेक मोर्चे निघावेत, आंदोलने व्हावीत, धनगरांची घरे जळून खाक व्हावीत उद्वस्त व्हावीत, पुरोगाम्यांनी/पुरोहितवाद्यांनी/मनुवाद्यांनी या आंदोलनाचा/जातीय दंगलीचा फायदा उठवून माता भगिनींवर अन्याय अत्याचार करावेत व त्यांचा आळ धनगरांवरती यावा शिवाय अनेक धनगर बांधव या दंगलीत मारले जाऊन धनगर समाजाचे नेतृत्व दिशाहीन व्हावे व ज्याप्रमाणे बारामतीच्या आरक्षण आंदोलनाप्रमाणे धनगरांना सहानुभुति देऊन आम्हीच तुमचे नेते आहोत असा विश्वास देऊन पुरोगाम्यांनी/मनुवाद्यांनी/पुरोहितवाद्यांनी धनगरांच्या जिवावर राज्यकारभार करावा हा आरएसएसच्या विचारावर चाललेल्या सरकारचा स्पष्ट छुपा उद्देश तर नसावा ना? आणि जरी असेल तरी राज्य सरकारचा हा उद्देश कधीही लयाला जाऊ न देता सोलापूर विद्यापीठाला रणधुरंदर, रणरागीणी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव सन्मानानेच लावून घेण्यासाठी धनगर समाजातील सर्व संघटना एकत्रित येत आहेत. प्रत्येक नाण्याला ज्याप्रमाणे दोन बाजू असतात त्याप्रमाणे धनगर समाजाचे देखिल आहे. एका बाजूने प्रामाणिकपणा इमानदारपणा असला तरी दुसऱ्या विनाकारण अन्याय करणाऱ्यांचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची छातीत जिगर धमक ठेवतात त्याला हजारो वर्षांचा इतिहास साक्ष आहे.
लेखक व व्याख्याते
     ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           ७६६६९९४१२३
Email:- nitsanuse123@gmail.com

No comments:

Post a Comment