Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Friday, 22 December 2017

तुम्हा सर्वांचे हर्दिक हर्दिक अभिनंदन... - नितीनराजे अनुसे

तुम्हा सर्वांचे हर्दिक अभिनंदन... -नितीनराजे अनुसे
           महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात आजपर्रंत केवळ दोनच विद्यापीठाच्या नामांतरणासाठी लढा उभारावा लागल्याचे उदाहरण सापडते त्यातील पहिले म्हणजे सन १९५८ मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्नपुर्ती होऊन जे मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले. पण त्या विद्यापीठाला काय नाव द्यावं यासाठी दोन नावे समोर आली होती. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे म्हणजे शिक्षणाचा मसिहा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर. परंतू १९६२ मध्ये स्थापन झालेल्या कोल्हापूर येथील विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असे नाव अगोदरच दिल्याने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी  राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात दि.२७ जुलै १९७८ रोजी ठराव संमत झाला असताना मनुवाद्यांच्या/जातीयवाद्यांच्या पोटातील पित्त खवळून उठले आणि त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाला विरोध केला होता मग दि.४ आॅगस्ट १९७८ पासून सुरू झाली ती दलितांची विद्यापीठ नामांतरणाची लढाई. या लढाईमध्ये कित्येक दलित बांधव शहीद झाले, कोणी भरचौकात स्वताला जाळून घेतले तर काहीठिकाणी याच जातीय दंगलीचा फायदा घेऊन जातीयवाद्यांनी कित्येक दलित माता-भगिनींवरती अन्याय अत्याचार बलात्कार केले, दलितांची घरे जाळली, दलित बंधू-भगिनींच्या उघड्या-नागड्या धिंडी काढल्या तरीही दलित बांधव नामांतरणाच्या लढाईपासून परावृत्तीत झाले नव्हते. शेवटी तब्बल १७ वर्षाच्या लढाईनंतर १४ जानेवारी १९९४ रोजी दलितांच्या एकजुटीला, दलिंताच्या लढ्याला यश आले आणि मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण होऊन ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे झाले.
         दुसरे उदाहरण म्हणजे सोलापूर विद्यापीठाची स्थापना दि.१ आॅगस्ट २००४ रोजी झाली तर त्याचे रीतसर उद्घाटन हे ३ आॅगस्ट २००४ रोजी झाले त्यानंतर लगेच ४ आॅगस्ट २००४ रोजी सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे अशी धनगर समाजाच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्याई होळकर प्रेमींनी मागणी केली होती परंतू जातीयवादी कुलगुरूंनी सिनेटच्या नावाखाली ती मागणी डावलली तद्नंतर या मागणीसाठी अनेक मोर्चे निघाले शिवाय पत्रव्यवहार देखिल झाला परंतू शासन दरबारी त्याबद्दल कोणतीही दखल घेतली गेली नाही. दोन वर्षांपूर्वीच म्हणजे ७ जुलै २०१४ साली पुणे विद्यापीठाचे नामकरण हे सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे करण्यासाठी कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झाले असातानाच सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे अशी मागणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यानंतर भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर दि.२६ मे २०१६ रोजी सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर असे नामकरण करण्याची तत्वता मान्यता राज्य सरकारने दिली खरी पण त्याची अंमलबजावणी झालीच नव्हती. परंतू जर सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ वाढेल असा जावई शोध विद्यापीठ प्रशासनाने काढला तर कॅबिनेट मध्ये शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांनी मागचा पुढचा विचार न करता ज्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी पारदर्शक राज्यकारभार व उत्तम प्रशासन व्यवस्थेचा आदर्श जगासमोर ठेवला, जात-पात, धर्म, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन विकासकामांचा डोंगर रचणारी व १८ शतकातील एकमेव आदर्श प्रशासनकर्ती म्हणून जगाने त्या मातेचा गौरव केला हा इतिहास ज्ञात असताना देखिल राष्ट्रामाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ निर्माण होईल असे जाहिरपणे वक्तव्य विधीमंडळात केले होते. त्यानंतर धनगर समाजाचा संयम सुटला आणि २८ आॅगस्ट २०१७ ला लाखोंच्या संख्येने धनगर समाजबांधव सोलापुरात दाखल झाले होते तरीही सरकारने काही ठोस पाऊले न उचलल्याने धनगर समाजबांधवांची उदासीनता आणि संताप वाढत चालला होता. शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमासाठी गेले त्या त्या ठिकाणी त्यांच्या निषेधात त्यांच्यावर भंडारा फेकून बुक्का (अबीर) फेकून सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण प्रकरणी समाजबांधवांनी रोष व्यक्त केला होता. त्या कृत्याबद्दल काही समाजबांधवांवरती पोलिस केसेस देखिल पडल्या परंतू कोणी हार मानली नाही. पुढे नागपूर येथील आरक्षण निर्णायक मेळाव्यात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाला नाव देणार असल्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते तेव्हा कुठेतरी आमचा पारा कमी झाला होता परंतू काही दिवसांपूर्वीच अचानक शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांनी सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव देणार नसल्याचे वक्तव्य केले तेव्हा धनगर समाजाचा उतरलेला पारा पुन्हा वायूवेगाने चढला. ज्याला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे आणि भाजप सरकारच्या निषेधाचा दणका सुरू झाला. सोशल मिडीयावरती तर पिवळे वादळ आगच ओकू लागले होते. सर्वत्र नाराजीचा सुर उमटलेला दिसून येत होता. अखंड महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे साहेब यांच्याशी सोमवार दि. १८ डिसेंबर २०१७ रोजी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली आणि नागपूर येथिल अधिवेशनातच शिक्कामोर्तब करू असे आश्वासन दिले.
आज दि. २२ डिसेंबर २०१७ रोजी मंत्रिमंडळात ठराव झाला आणि सोलापूर विद्यापीठाचे आगामी नाव हे राष्ट्रमाता अहिल्याई होळकर विद्यापीठ सोलापूर असा ठराव संमत झाला आणि राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला दिल्याबाबत शिक्कामोर्तब झाला. सदरचा विद्यापीठ नामांतरण लढा हा कोण्या एकट्या-दुकट्याचा नव्हता तर तो लढा अखंड धनगर समाजाचा होता. प्रत्येकाचे यामध्ये काही ना काही योगदान आहेच. त्यामुळे राज्यसरकार असो, नोकरदार वर्ग असो अथवा सामान्यातील असामान्य असे माझे मेंढपाळ बांधव असोत आपण सर्वांनी ही लढाई ज्याला जमेल त्या पद्धतीने पण प्रामाणिकपणे लढली आणि आपल्या सर्वांच्या विद्यापीठ नामांतरण लढ्याला यश प्राप्त झाले. म्हणून सोशल मिडीया असो अथवा रस्त्यावरची लढाई असो प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या लढ्यात सहभागी झालेल्या/न झालेल्या सर्व एकाच रक्ताच्या आणि हाडामांसाच्या माझ्या सर्व समाजबांधवांचे आणि सर्व माता-भगिनींचे हर्दिक हर्दिक अभिनंदन...
लेखक व व्याख्याते
     ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           ७६६६९९४१२३
Email:- nitsanuse123@gmail.com

No comments:

Post a Comment