Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Wednesday, 20 December 2017

स्वच्छतेचे खरे जनक श्री संत गाडगे बाबा

माणसात देव शोधणारा संत
हल्ली स्वच्छता अभियान राबवणाऱ्याला स्वच्छतेचे जनक म्हणून संबोधले जाते एवढेच नव्हे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखिल गांधीजींचा फोटो वापरून स्वच्छ भारत अभियान सुरू केले. खरंतर टिका करायचा माझा उद्देश नाही परंतू गांधीजींनी कधी झाडू घेऊन साफसफाई केल्याचे उदाहरण इतिहासात तरी कुठे वाचायला मिळाले नाही. असो, ज्या माणसानं हातात झाडू घेऊन गावंच्या गावं साफ केली ते म्हणजे श्री संत गाडगे महाराज त्यांचा जन्म शेगांंव (अंजनगाव), कोल्हट सुर्जी तालुका, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला तर मृत्यू २० डिसेंबर इ.स. १९५६ साली वलगांव (अमरावती) येथे झाला. गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे याची नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते.
"तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |"
असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.
डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
संत गाडगे बाबांनी हातात झाडू घेऊन दिवसभर गावं साफ केली तर रात्री देवळात मुक्काम करून तेथे किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील घाण साफ केली. दिनदुबळ्यांची सेवा करताना त्यांनी समाजासमोर काही संदेश दिले आहेत ते खालीलप्रमाणे.
1. भुकेलेल्यांना = अन्न
2. तहानलेल्यांना = पाणी
3. उघड्यानागड्यांना = वस्त्र
4. गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
5. बेघरांना = आसरा
6. अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
7. बेकारांना = रोजगार
8. पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
9. गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
10. दुःखी व निराशांना = हिंमत
11. गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती आहे!
गाडगे बाबांचे बालपण
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

सामाजिक सुधारणा
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्यातोंडी गावकर्‍यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्‍न केले.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्‍न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वर्‍हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे करण्यात आले आहे.
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
* ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.
* १९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
* १९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले.
* १९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.
* "मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
* फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
* गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
* १९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
* गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
* "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.[१]
* आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
* १९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
* १९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
* गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
* डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.
* २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.
* नाशिक येथील गॊदावरी नदीवरील पुलाला गाडगे महाराजांचे नाव दिले आहे.
* श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट हा गाडगे महाराजांनी बांधलेल्या धर्मशाळांची व्यवस्था पाहतो.

             १४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."
तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.
श्री संत गाडगे महाराज हे कधीही शाळेत अशिक्षित होते परंतू त्यांचे कार्य इतके महान आहे की अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर गाडगे बाबांनी फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर ज्या शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. त्यांच्याच शिक्षण संस्थेतील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी (रहिमतपूर) ता.कोरेगाव जि.सातारा या शाळेचा माजी विद्यार्थी या नात्याने स्वच्छतेचे खरे जनक असलेले श्री संत गाडगे महाराज यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम...
        ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१८५३०००४१२३
https://nitinrajeanuse123.blogspot.in

Friday, 15 December 2017

महाराष्ट्र देशा! जातीयवाद्यांच्या देशा! तरी तु महान? : नितीनराजे अनुसे

महाराष्ट्र देशा! जातीयवाद्यांच्या देशा! तरी तु महान?

महाराष्ट्राला संतांची भुमी म्हणून संबोधले जाते पण याच मातीने अनेक थोर राजा-महाराजांना, महापुरूषांना त्याचप्रमाणे समाजाचा उद्धार करणाऱ्या थोर समाजप्रबोधकांना/समाजसुधारकांना देखिल जन्म दिला त्यांचा इतिहास लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना ज्ञात आहे शिवाय अनेक जेष्ठ साहित्यकार, इतिहास संशोधक, विचारवंत अभ्यासक यांच्या अथक प्रयत्नातून तसेच संशोधनातूनही उर्वरित इतिहास तमाम महाराष्ट्र वासियांसमोर येत आहे.
पण फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड भारतमातेच्या भुमीत जन्माला आलेल्या थोर महापुरूषांना राजा-महाराजांना जातीयतेच्या चौकटीत बसवण्याचे काम हे जाणूनबूजून व एका विशिष्ट वर्गाने अर्थातच मनुवाद्यांनी/पुरोगाम्यांनी/पुरोहितांनी केले आणि त्यामुळेच आजचा जातीयवाद उफाळला जातोय हे कोणी नाकारू शकत नाही. महाराष्ट्राचे सुपूत्र कवि गोविंदाग्रज यांनी त्यांच्या काव्यात महाराष्ट्र देशाचे जे वर्णन केले आहे ते उल्लेखनीय अप्रतिम आणि वंदनीय अाहेच परंतू,
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!!
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा!!
असे कवि गोविंदाग्रज यांनी वर्णन केलेला त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आणि त्याबद्दलची ही भावनाच मुळात महाराष्ट्र वाशियांच्यातून लोप पावत चालली आहे असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. आज महाराष्ट्र राज्यात एक वेगळेच चित्र पहावयास मिळते ते म्हणजे ज्या महापुरूषांनी जात-पात, धर्म, संप्रदाय, प्रांत, साम्राज्य यापलीकडे जाऊन अखंड भारतवाशीयांसाठी विकासकामांचा डोंगर रचला त्या त्या महापुरूषांना त्यांच्या जन्म कुळानुसार जातीयतेच्या चौकटीत डांबले जातेय आणि त्यांना जातीयवादाच्या चौकटीत डांबण्याचे काम हे खरंतर पुरोहितवाद्यांनी/मनुवाद्यांनी केले आणि आज पुरोगाम्यांचा बुरखा पांघरणारे देखिल जातीयवादाचे भांडवलीकरण करत बसले आहेत ही या महाराष्ट्र देशाची फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. इतिहासाची पाने चाळली तर हा जातीयवादाचा प्रकार लक्षात यायला फार वेळ लागणार नाही... कारण जात-पात-धर्मांची सुरवात ही तथाकथित गौतम बुद्धांच्या जीवनकाळापासून चालत आली आहे आणि त्या जातीयवादाचे मुळ कारण दुसरे कोणी नसून फक्त आणि फक्त ब्राह्मणच होते आणि कोणताही इतिहासकार हे नाकारू शकत नाही.
आज महाराष्ट्र राज्यात शिक्षणाची गंगा घरोदारी पोहचावी म्हणून अनेक विद्यापीठांची स्थापना केली आणि त्या त्या विद्यापीठांना महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या महापुरूषांची नावे दिली आहेत हे खरंतर कौतुकास्पद आहे. पण त्यातही शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जातीयवाद उफाळतो हे मात्र नवलच म्हणावे लागेल. विद्यापीठांच्या यादीपैकी सर्वप्रथमता मराठवाडा विद्यापीठाच्या नांमातरणासाठीच मोर्चे आंदोलने करावी लागल्याची नोंद इतिहासात आहे. त्यानंतर सोलापूर विद्यापीठाचा प्रश्न काही मनुवाद्यांमुळेच ऐरणीवर आल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील ठराविक विद्यापीठांची यादी खालीलप्रमाणे आहे त्यात जुनी आणि रूढ नावे आणि (बदललेली नावे) या सर्वांचा उल्लेख आहे.
* अमरावती विद्यापीठ (कर्मयोगी गाडगेबाबा विद्यापीठ), अमरावती
* औरंगाबाद विद्यापीठ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)
* कालिदास विद्यापीठ (कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय), रामटेक
* कोल्हापूर विद्यापीठ (शिवाजी विद्यापीठ, विद्यानगर), कोल्हापूर
* गोंडवाना विद्यापीठ ((नव्याने सुचविलेले नाव - आदिवासी समाजातील क्रांतिकारी नेते बिरसा मुंडा विद्यापीठ), गडचिरोली.
* जळगाव विद्यापीठ (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ), (नव्याने सुचविलेले नाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ), जळगाव
* दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर
* नागपूर विद्यापीठ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,) नागपूर
* श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई
* नांदेड विद्यापीठ (स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ), नांदेड
* नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठ
* पुणे विद्यापीठ (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), पुणे
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड
* भारतीय विद्यापीठ व्यवस्थापन संस्था, कोल्हापूर
* मराठवाडा विद्यापीठ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)
* महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
* महाराष्ट्र पशुवैद्यकीय आणि मत्स्य विद्यापीठ, नागपूर
* मुंबई विद्यापीठ, (नव्याने सुचविलेले नाव - राजमाता जिजाऊ विद्यापीठ), मुंबई
* नाशिक मुक्त विद्यापीठ (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ), नाशिक
* श्रमिक विद्यापीठ, नागपूर
* श्रमिक विद्यापीठ (नव्याने सुचविलेले नाव - ???), निगडी
* श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्शनगर, वरळी, मुंबई – ४२२४३३.
* सोलापूर विद्यापीठ, (नव्याने सुचविलेले नाव - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ), सोलापूर

महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांची यादी
* अकोला कृषी विद्यापीठ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ), अकोला
* दापोली कृषी विद्यापीठ (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ), दापोली, जिल्हा रत्‍नागिरी
* परभणी कृषी विद्यापीठ (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ), परभणी
* राहुरी कृषी विद्यापीठ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ), राहुरी, जिल्हा अहमदनगर
शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभांपेक्षाही सर्वाधिक महत्वाचा लाभ असून दबलेल्या नि पिचलेल्या मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष आहे व तेही सर्वोच्च शिक्षण , उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगतीपथावर जाऊ शकतात. या विचाराने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे १९५० साली मिलिंद विद्यालयाची स्थापना केली त्यानंतर तिथे विद्यापीठ देखिल व्हायला हवे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली व वरील विद्यापीठांच्या यादीपैकी १९५८ मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्नपुर्ती होऊन मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले. पण त्या विद्यापीठाला काय नाव द्यायचं यासाठी दोन नावे समोर आली एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे म्हणजे शिक्षणाचा मसिहा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर. परंतू १९६२ मध्ये स्थापन झालेल्या कोल्हापूर येथील विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असे नाव अगोदरच दिल्याने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी  राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात दि.२७ जुलै १९७८ रोजी ठराव संमत झाला असताना मनुवाद्यांच्या/जातीयवाद्यांच्या पोटातील पित्त खवळून उठले आणि त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाला विरोध केला. मग दि.४ आॅगस्ट १९७८ पासून सुरू झाली ती दलितांची विद्यापीठ नामांतरणाची लढाई. या लढाईमध्ये कित्येक दलित बांधव शहीद झाले, कोणी भरचौकात स्वताला जाळून घेतले तर काहीठिकाणी याच जातीय दंगलीचा फायदा घेऊन जातीयवाद्यांनी कित्येक दलित माता-भगिनींवरती अन्याय अत्याचार बलात्कार केले, दलितांची घरे जाळली, उघड्या-नागड्या धिंडी काढल्या तरीही दलित बांधव नामांतरणाच्या लढाईपासून परावृत्तीत झाले नाहीत शेवटी तब्बल १७ वर्षाच्या लढाईनंतर १४ जानेवारी १९९४ रोजी दलितांच्या एकजुटीला, दलिंताच्या लढ्याला यश आले आणि मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण होऊन ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे झाले.
सोलापूर विद्यापीठाची स्थापना दि.१ आॅगस्ट २००४ रोजी झाली तर त्याचे रीतसर उद्घाटन हे ३ आॅगस्ट २००४ रोजी झाले त्यानंतर लगेच ४ आॅगस्ट २००४ रोजी सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे अशी धनगर समाजाच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्याई होळकर प्रेमींनी जातीयवादी कुलगुरूंनी सिनेटच्या नावाखाली डावलली तद्नंतर या मागणीसाठी अनेक मोर्चे निघाले शिवाय पत्रव्यवहार देखिल झाला परंतू शासन दरबारी त्याबद्दल कोणतीही दखल घेतली गेली नाही. दोन वर्षांपूर्वीच म्हणजे ७ जुलै २०१४ साली पुणे विद्यापीठाचे नामकरण हे सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे करण्यासाठी कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झाले असातानाच सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे अशी मागणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यानंतर भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर दि.२६ मे २०१६ रोजी सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर असे नामकरण करण्याची तत्वता मान्यता राज्य सरकारने दिली खरी पण त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालीच नाही. परंतू जर सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ वाढेल असा जावई शोध विद्यापीठ प्रशासनाने काढला तर कॅबिनेट मध्ये शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे हे मागचा पुढचा विचार न करता ज्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी पारदर्शक राज्यकारभार व उत्तम प्रशासन व्यवस्थेचा आदर्श जगासमोर ठेवला, जात-पात, धर्म, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन विकासकामांचा डोंगर रचणारी व १८ शतकातील एकमेव आदर्श प्रशासनकर्ती म्हणून जगाने त्या मातेचा गौरव केला हा इतिहास ज्ञात असताना देखिल राष्ट्रामाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ निर्माण होईल असे जाहिरपणे वक्तव्य विधीमंडळात करतात. याचा मथितार्थ म्हणजे राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांना केवळ धनगर जमातीच्या चौकटीत अडकवण्यासाठी लोकप्रतिनिधींचा हा घाणेरडा प्रकार चालू आहे. मग राज्य सरकार आणि राज्य सरकार मधील जातीयवादी आमदार/मंत्री गण काय भांग पिऊन कॅबिनेट चालवतात का? असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्यांना पडतो. परंतू त्याच कॅबिनेटमध्ये असलेले राष्ट्रमाता अहिल्याईंचे अनुयायी म्हणून मिरवणारे आणि ज्या महाराष्ट्राच्या मातीत राष्ट्रमाता अहिल्याई जन्माला आल्या त्याच महाराष्ट्राच्या मातीतले आमदार/मंत्री मात्र आळी मिळी गुप चिळीची भुमिका घेऊन त्यावरती एकही प्रतिक्रिया न देता एक ब्र देखिल न काढतां केवळ लोकप्रतिनिधींनी चालवलेला तमाशा बघत बसतात हेच आमच्या महाराष्ट्र राज्याचे सर्वात मोठं दुर्दैव म्हणावे लागेल. म्हणूनच महाराष्ट्र देशा आणिक जातीयवाद्यांच्या देशा तरी तु महान? कसा काय? असे म्हणायला मला वावगे वाटणार नाही.
परंतू विधीमंडळात अशी विधाने करून लोकप्रतिनिधींना नक्की काय साध्य करायचे आहे असा पुसटसा विचार मनात का येऊ नये? मराठवाडा विद्यापीठाच्या नामंतरणाच्या लढाईचा ज्वलंत इतिहास ज्ञात असताना देखिल, हजारो दलितांची घरे जळून खाक झाली हे माहित असताना देखिल, त्या नामांतरण लढाईचा गैरफायदा घेऊन पुरोगाम्यांनी/पुरोहितवाद्यांनी दलित माता-भगिनींवर अन्याय अत्याचार व बलात्कार केला शिवाय कित्येक दलित बांधवांनी भर चौकात स्वताला पेटवून घेतले हे माहित असताना देखिल सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरणासाठी जातीय रंग देण्याचा प्रकार जर विद्यापीठ प्रशासन व त्यापाठोपाठ राज्य सरकार स्वता करत असेल तर त्यापाठीमागचा राज्य सरकारचा उद्देश हा स्पष्ट आहे की पुन्हा एकदा जातीय दंगल व्हावी, अनेक मोर्चे निघावेत, आंदोलने व्हावीत, धनगरांची घरे जळून खाक व्हावीत उद्वस्त व्हावीत, पुरोगाम्यांनी/पुरोहितवाद्यांनी/मनुवाद्यांनी या आंदोलनाचा/जातीय दंगलीचा फायदा उठवून माता भगिनींवर अन्याय अत्याचार करावेत व त्यांचा आळ धनगरांवरती यावा शिवाय अनेक धनगर बांधव या दंगलीत मारले जाऊन धनगर समाजाचे नेतृत्व दिशाहीन व्हावे व ज्याप्रमाणे बारामतीच्या आरक्षण आंदोलनाप्रमाणे धनगरांना सहानुभुति देऊन आम्हीच तुमचे नेते आहोत असा विश्वास देऊन पुरोगाम्यांनी/मनुवाद्यांनी/पुरोहितवाद्यांनी धनगरांच्या जिवावर राज्यकारभार करावा हा आरएसएसच्या विचारावर चाललेल्या सरकारचा स्पष्ट छुपा उद्देश तर नसावा ना? आणि जरी असेल तरी राज्य सरकारचा हा उद्देश कधीही लयाला जाऊ न देता सोलापूर विद्यापीठाला रणधुरंदर, रणरागीणी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव सन्मानानेच लावून घेण्यासाठी धनगर समाजातील सर्व संघटना एकत्रित येत आहेत. प्रत्येक नाण्याला ज्याप्रमाणे दोन बाजू असतात त्याप्रमाणे धनगर समाजाचे देखिल आहे. एका बाजूने प्रामाणिकपणा इमानदारपणा असला तरी दुसऱ्या विनाकारण अन्याय करणाऱ्यांचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची छातीत जिगर धमक ठेवतात त्याला हजारो वर्षांचा इतिहास साक्ष आहे.
लेखक व व्याख्याते
     ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           ७६६६९९४१२३
Email:- nitsanuse123@gmail.com

Thursday, 14 December 2017

आता टोलनाक्यावर देखिल भारतीय सैनिकांना सॅल्यूट मिळणार...



आपल्या जिवाची पर्वा न करता ऊन, वारा, पाऊस असो अथवा सियाचीन सारखा बर्फाच्छादित प्रदेश असो जंगल दऱ्याखोऱ्यात देशरक्षणासाठी सीमेवरती उभ्या ठाकलेल्या सैनिकांना टोलनाक्यावरती मिळणारी अपमानास्पद वागणूक लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या वतीने भारतीय सैनिकांना टोल नाक्यांवरती सलाम (सॅल्यूट) करण्याचा आदेश टोल नाका स्टाफ ला देण्यात आला आहे. भारत देश सोडला तर अन्य देशांमध्ये देशरक्षक आणि शिक्षक यांना व्ही आय पी दर्जा देण्यात येतो त्याउलट भारतामध्ये सैनिकांची अवहेलना करण्यात येते. भूदल (आर्मी), नौदल (नेव्ही) तसेच वायुदल (एअरफोर्स) या भारतीय सशस्त्र दलामधील मधील मातृभूमीचे आणि तमाम भारतवासीयांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना भारतीयांकडूनच अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर त्यांनी देशसेवा करावी की करू नये असा प्रश्न उपस्थित होतो. एखादा सैनिक रेल्वेने प्रवास करत असला तरी त्याला रेल्वेच्या पॅसेज मध्ये खाली बसून प्रवास करावा लागतो परंतू भारतीय नागरिक आरामात बसून प्रवास करत असतात मग त्या सैनिकांनी नक्की आराम कधी करायचा? रात्री-अपरात्री एखादा टिकेट चेकर समोरचा व्यक्ति फौजी आहे सैन्यदलातील आहे हे माहित असून देखिल त्याच्याशी उद्धटपणे वागतो, अपमानास्पद वागणूक देऊन एका डब्ब्यातून दुसऱ्या डब्ब्यात पाठवतो तेथेही एखादी रिकामी अथवा बसण्यापूरती जागा असेल तरीदेखिल तेथिल लोक त्याला उठवून लावतात हे अनेक वेळा अनुभवलेले आणि मी पाहिलेले आहे. कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयात एखादा सैनिक वैयक्तिक कामासाठी ड्युटीवरून वेळ काढून गेला तरी त्याचे काम वेळेत पूर्ण होत नाही. सैनिक जर ड्युटीवर तैनात असेल तर त्यांच्या कुटूंबियांना जमिन अथवा घराच्या वादातून नाहक त्रास मिळत असतो. एक भारतीय या नात्याने प्रत्येक सैनिकाला मान सन्मान मिळायला हवा. इतर राष्ट्राप्रमाणेच भारतामध्ये देखिल शिक्षक व फौजी यांना व्ही आय पी दर्जा मिळायला हवा तरच देशासाठी जीव द्यायला अनेक तरून युवक देशरक्षणासाठी भारतीय सैन्य दलात भरती होतील.
असो National Highway Authority of India च्या वतीने टोलनाक्यावरील स्टाफ ला तसे ट्रेनिंग देण्यात येणार असल्याचे NHAI चे चेअरमन मा.दिपक कुमार यांनी सांगितले अाहे. जर भारतीय सशस्त्र सैन्यदलाचा  सैनिक टोलनाका क्राॅस करून जात असेल तर त्याला मार्क आॅफ रिस्पेक्ट अर्थातच सॅल्यूट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबद्दल NHAI चे हर्दिक आभार. प्रत्येक क्षेत्रात सैनिकांना असाच मानसन्मान मिळावा ही एक भारतीय भारतीय नागरिक या नात्याने प्रामाणिक अपेक्षा.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com

आता याला आमदार म्हणायचं की भिताड?


गोरगरीब जनतेचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा विकास व्हावा म्हणून विधानसभा मतदारसंघांची निर्मीती करून त्या त्या प्रत्येक मतदारसंघातून एकेक लोकप्रतिनीधी निवडला जातो त्यालाच विधानसभा सदस्य अर्थातच आमदार म्हंटलं जातं. आमदार हा जनतेचा सेवक असतो जनतेवरील होणाऱ्या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सरकार दरबारी आपल्या मतदार संघातील जनतेसाठी न्याय मागत असतो पण आमच्या खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून आमच्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी विश्वास ठेवून एक आगळा वेगळाच गडी आमदार म्हणून विधानसभेत पाठवला पण त्या आमदाराने त्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या हिताचा एकही प्रश्न विधानसभेत उपस्थित केला नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. परंतू जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांनी दुष्काळात होरपळलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी असंख्य प्रश्न निर्माण केलेत. माणदेशातील आटपाडी तालुका हा बारमाही दुष्काळी असतो ही एक तालुक्याची वेगळीच ओळख महाराष्ट्र राज्यात असताना शेतीसाठी जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याची दैना होत असताना यावरती एकही उपाययोजना करण्याचे कार्य येथील निष्क्रीय आमदार अनिल बाबर यांनी कधीच केले नाही.
"पोरगं कोणाचं आणि पेढं वाटतंय कोण?" अशा आशयाचा ब्लाॅग मी गेल्या दोन वर्षांपूर्वी प्रकाशित केला होता त्याचे कारण असे होते की युवह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या फंडातून आटपाडी तालुक्यांतील रस्त्यांसाठी भरघोस निधी मिळाला असताना तो निधी आम्हीच आणला असल्याचा कांगावा करत वर्तमानपत्रातून बातम्या देऊन व रस्त्यांचे भुमिपूजन करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सध्याचे निष्क्रीय आमदार अनिल बाबर व त्यांची पिलावळ करत होती म्हणून पोरगं कोणाचं आणि पेढं वाटतंय कोण असे म्हणायला काही वावगे वाटले नाही.
पण आता तर या आमदारांनी तर हद्दच पार झाली राव... कारण २७ आॅक्टोबर २०१५ रोजी मुख्यमंत्री आटपाडी-खानापूर दौऱ्यावर आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वता अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी तब्बल ४ कोटी निधी मंजूर केला होता. पण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकण्यास गावागावात जाऊन अनिल बाबर यांनी लोकांना प्रवृत्त केले होते अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या शिवाय काळ्या फिती बांधून कशासाठी त्यांनी निषेध केला होता हे देव जाणे बुवा?? पण असे आमदार काय कामाचे?? मुख्यमंत्र्यांनी अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी ४ कोटीचा निधी मंजूर केल्यानंतर युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी लोकसहभागातून आणि शासनाच्या वतीने पाठपुरावा करून अग्रणी नदीवर आतापर्यंत एकून ११ बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण केले असताना त्याच अग्रणी नदीवरील दोन बंधाऱ्याचे काम आमदार अनिल बाबर यांनी होऊनच दिले नव्हते. मग आमदार नक्की कशासाठी असतो तेच मला कळेना? जनतेच्या विकासासाठी की मतदारसंघाच्या भकासासाठी?? ऐन दुष्काळात जनता पाण्यावाचून तडफडत असताना, मुकी जणावरं ही धगधगत्या उन्हात होरपळत असताना याच मतदारसंघाच्या आमदारांनी नदीच्या काठावर वसलेल्या बलवडी (खा) व अन्य गावांसाठी बंधाऱ्याचे काम होऊ दिले नाही ही त्यांच्यासाठी आणि लोकशाहीसाठी सर्वात मोठी लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. लोकसहभागातून आणि शासनाच्या वतीने अग्रणी नदीवर एकूण ११ बंधारे बांधण्यात आले होते. सहा महिन्यांपूर्वीच आणखीन तीन बंधाऱ्यांचे भुमिपूजन नुकतेच मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हस्ते झाले होते परंतू आमदार अनिल बाबर यांची पिलावळ मात्र जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी जे बंधारे अडवून धरले होते ते बंधारे आम्हीच मंजूर करून आणले आहेत असे सांगत अडवलेल्या दोन बंधाऱ्यांचे स्वता भुमिपूजन करून वर्तमानपत्रात बातम्या छापून द्यायचा घाणेरडा उद्योग आणि घाणेरडे राजकारण निष्क्रीय आमदार अनिल बाबर आणि त्यांच्या पिलावळीने केले. त्यांच्या असल्या उद्योगाचे हसू खानापूर मधील जनतेला आलं होत.
आज मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी बांधव, गोरगरीब जनता ही अज्ञानी राहीली नसून सुशिक्षीत झालेली आहे त्यामुळे जनतेच्या प्रतिनीधींनी असे उलट-सुलट प्रकार करून स्वताच्या प्रसिद्धीसाठी उतावीळ होऊ नये. खरी समाजसेवा ही रक्तातच असावी लागते नुसताच दिखाऊपणा करून विकासकामे होत नाहीत तर विकासकामे करण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी मंत्रालयाच्या पायऱ्या कोणत्याही पदासाठी अथवा दिखाऊगीरी करण्यासाठी झिजवल्या नाहीत तर त्यांनी कोणतेही पद नसताना जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडले आहेत प्रत्यक्ष जलसंधारण मंत्री, जलसंपदा मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांशी भेटून जल शिवार योजनेतून बंधारे, तलाव, शेततलाव यांना मंजूरी मिळवून आणली कारण दुष्काळात उमललेलं एक संघर्ष फूल म्हणूनच पडळकर साहेबांची ओळख महाराष्ट्र राज्यभर आहे आणि पडळकर साहेब देखिल वरील दिलेल्या उपाधीस त्यांच्या कार्यातून पात्र ठरतात.
असो, पोरगं कोणा दुसऱ्यांच असताना या लोकांना पेढं वाटण्यात का आनंद वाटतो याचं गणित आम्हासारख्या सर्वसामान्य जनतेला न कळण्या इतपत आम्ही काय बोळ्याने दुध पित नाही त्यामुळे त्या आमदारांना आणि त्यांच्या पिलावळीस आतातरी शहाणपण यायला हवे. कालच हा आमदार नागपूर येथिल हिवाळी अधिवेशनात बोलताना सभागृहातच गोंधळून गेला. कारण ५१ लाखांचा निधी गोपीचंद पडळकर साहेबांच्या विशेष प्रयत्नातून मतदारसंघासाठी मिळाला असताना त्याचे श्रेय लाटण्यासाठी हा आमदार गडी सभागृहातच बरळायला लागला. ५१ लाखांचा निधी पाहून त्याला विश्वासच बसला नाही चष्मा चढवून/उतरवून पाहिलं तरी आकडा तोच होता पण कोणत्या गावांसाठी किती निधी आणला आहे हे त्याला सांगता आलं नाही याचं गणित त्याची त्याला उमजलं नाही. म्हणून काल दिवसभर उपाशी राहून हा गडी विचार करत बसला होता की "सर्वसामान्य घराण्यातलं कालचं तरूण पोरगं प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटून राजकारणात येतं आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा" मानून दिवसरात्र दुष्काळात होरपळलेल्या जनतेसाठी राबराब राबतंय. ना कोणते पद ना स्वार्थ, केवळ जनतेचा विकास हात ध्यास मनात ठेवून पायाला भिंगरी, तोंडात साखर तर वेळप्रसंगी अन्यायाच्या विरोधात मुखातून आगीचे लोळ फेकणारे व्यक्तिमत्व आणि जनतेसाठी अखंड अविरतपणे झटणारे असे मुर्तिमंत उदाहरण उभ्या महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. निष्क्रिय आमदारांना आता पुढच्या आमदारकीचे चांगलेच डोहाळे लागले आहेत त्यामुळे गोरगरीब जनतेच्या हीतासाठी शेतकऱ्यांसाठी एखादी उपाययोजना राबवतां आली नाही म्हणून ज्या योजना युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून राबवल्या गेल्या त्या कशा हायजॅक करून पुढच्या विधानसभा डोळ्यांसमोर ठेऊन बंधाऱ्यांचे तसेच रस्त्यांचे भुमिपूजन करायचे असा प्रकार निष्क्रीय आमदारांनी चालवला आहे पण काल मात्र ५१ लाखांचा निधी स्वता आणल्याचे सांगतानाच गड्याची मात्र बोबडी वळाली. मग अशा लोकप्रतिनिधींना आमदार म्हणायचं की भिताड? जनता आता दुधखूळी राहीली नसून ती सतर्क आणि सुज्ञ झाली आहे याचा गांभिर्याने विचार करावा शिवाय धमक असेल तर त्यांनी जनतेच्या हीताचं गोरगरीबांच्या हीताचं राजकारण करावं अन्यथा तसे जमत नसल्यास राजकारणातून संन्यास घ्यावा ही विनंती.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com

Saturday, 9 December 2017

आम्हीच आमच्या मनाचे राजे....

काल कोणीतरी म्हंटलं...
हातात तलवारी घेऊन आणि नावांपुढे सरदार, सरकार, राजे लावणारे आज आमुक आमक्याचे आणि तमुक तमक्याचे वारसदार/वंशज म्हणून सांगताहेत... याबद्दल माझा काहीच आक्षेप नाही कारण आम्ही त्या त्या महापुरूषांच्या वंशावळ मध्ये आहोत की नाही हे पुराव्यांशिवाय तरी स्पष्ट सांगू शकत नाही.
पण...
आम्ही कुरूवंशीय धनगर पुत्र भारताचा पहिला चक्रवर्ती सम्राट राजा ययाति, सामर्थ्यशाली आणि शक्तिशाली भारताचे स्वप्न पाहणारे धनगरपुत्र आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, महायोद्धा धनगरपुत्र चक्रवर्ती सम्राट राजा अशोक, क्षत्रिय कुलवंतस छत्रपती शिवाजी महाराज, होळकरशाहीचे संस्थापक अटकेपार झेंडे फडकवणारे थोरले श्रीमंत राजे मल्हारराव होळकर, राष्ट्रमाता महाराणी अहिल्याई होळकर, महापराक्रमी योद्धा चक्रवर्ती सम्राट छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर अशा धुरंदर लढवय्यांच्या समाजात जन्माला आलेले आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. महत्वाचं म्हणजे वारसा हा फक्त वंशावळ पद्धतीचा नसतो तर तो विचारांचा देखिल असतो हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. अरे आम्ही त्या त्या महापराक्रमी महापुरूषांचे वारसदार आहोत हे सांगायला आम्हाला कशाची लाज आणि कोणाची भिती वाटत नाही. आजही जर राजेशाही पुन्हा जन्माला आली तर छाती ठोकपणे सांगतो की नुसते नावांपुढेच राजे लावून नव्हे तर सळसळत्या रक्ताचे आम्ही वारसदार छातीची ढाल करून मनगटाच्या जोरावर तलवार गाजवून आम्ही राजे बनू शकतो आणि ती धमक आणि तोच दरारा आजही आमच्यात आहे हे कोणीही विसरू नका. त्यामुळे नावांपुढचं काय घेऊन बसलाय? कोणाच्या चहाच्या मिंद्यात न राहणारे आम्ही आमच्या स्वताच्या हिंमतीवर स्वकर्तृत्वाच्या जोरावर स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगणारे आम्हीच आमच्या मनाचे राजे आहोत. आणखी एक गोष्ट लक्षात असुद्या पुन्हा सांगितलं नाय म्हणून सांगायचं नाय... जोपर्यंत वाघ शांत आहे तोपर्यंत तो शांतच असतो पण एकदा का जर वाघाला डिवचलं तर तो सरळ फाडून टाकतो.
त्यामुळे आम्हाला कोणीही विनाकारण डवचू नका🙏
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
          ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
Email:- nitsanuse123@gmail.com
https://nitinrajeanuse123.blogspot.in

Sunday, 3 December 2017

एक ऐसा महान भारतीय शासक इतिहास के पन्नो मे खोया...

              महाराजा छत्रपती यशवंतराव होलकर सुभेदार तुकोजी होलकर का चौथा पुत्र था। उनका जन्म पुना (पुणे) जिले मे खेड तहसिल इलाखें स्थित वाफगाव में ३ दिसंबर १७७६ मे हुआ था। वह उद्दंड होते हुए भी बड़ा साहसी तथा दक्ष सेनानायक था। पिताजी सुभेदार तुकोजी महाराज की मृत्यु पर (1797) उत्तराधिकार के प्रश्न पर काशिनाथराव होलकर जो अपाहीज था उसको उकसाकर होलकरोंकी दौलत मुठी मे करने की चाहत रखनेवाले दौलतराव शिंदे के हस्तक्षेप तथा तज्जनित युद्ध में यशवंतराव के ज्येष्ठ भ्राता मल्हरराव के वध (1797) के कारण, प्रतिशोध की भावना से प्रेरित हो यशवंतराव ने खुद की फौज बनाना शुरू किया और अपने युद्ध कौशल को प्रेरित करते हुए शुन्य से विश्व निर्माण कर के शिंदे के राज्य में निरंतर लूट-मार आरंभ कर दी। इंदौर और महेश्वर स्थित अहिल्या बाई होलकर का संचित कोष हाथ आ जाने से 1800ई के बाद उसकी शक्ति और भी बढ़ गई। पुणे स्थित शनिवारवाडा के सामने पेशवा और बालाजी विश्वनाथ ने यशवंतराव होलकर का बडा भाई विठोजीराव होलकर की क्रुर हत्या कर दी दी उसके कारण और अपने परिवार (जो शिंदे के कैद मे थे।) को छुडाने के कारण 1802 में उसने पेशवा तथा शिंदे को सम्मिलित सेना को पूर्णतया पराजित किया था। जिसमे शिंदे और पेशवा के सैनिकों को बहुत ही भारी नुकसान पहुंचा था। हडपसर से लेकर वानवडी और पार्वती तक शिंदे और पेशवा के सैनिकों को अकेले के दम पर मार गिराकर महाराजा यशवंतराव होलकर ने अपनी युद्ध कला दिखाई थी और खुद एक महायोद्धा के रूप में स्थापित किया था। आज भी माना जाता है की उस युद्ध मै पेशवा और शिंदे की सेना की इतनी हड्डीयां गिरी थी की इसके पाश्चात उस इलाखें का नाम हडपसर रखा गया। मानते है की मराठी सैन्य आपस में लढे जिसमें मराठी सेना का ही नुकसान हुवा और यशवंतराव ने पुना (पुणे) जलाकर रख दिया। लेकीन सोचनेवाली बात ये है की अगर अपने परिवार वालों को बिना बजह से कोई बंदी बना ले और लाख कोशिश और बिनती करने के बावजूद भी ना छोडे तो महाराजा यशवंतराव होलकर ही क्या उसी जगह आप मे से भी कोई होता तो अन्याय के खिलाफ जरूर शस्त्र उठा लेता। यशवंतराव होलकर ने भी यही और सही किया था। लेकीन मतलबी और जातीयवादी इतिहासकारों ने छत्रपती यशवंतराव होलकर को बंडखोर और लूटमार करनेवाला कहलाया। अपनी फौज की चारापानी के लिए पैसा जमा करना, राज्य की रक्षा करना यही फौज का कर्म और धर्म था और वही धर्म यशवंतराव होलकर ने निभाया था जो की किंतू उसके लिए नही बल्कि फौज और राज्य के लिए सहीं था। नहीं तो छत्रपती शिवाजी महाराज ने भी जिसे आज भारत का मॅंचेस्टर करते है उस सुरत (गुजरात) शहर की लुटमार की थी तो शिवाजी महाराज को भी चोर कहोगे क्या? उपरसे पेशवा महाराजा यशवंतराव होलकर की लाखों की सेना को कोई निधी पुंजी नहीं देता था तो सैनिक कैसे लढेंगे ? घोडे हत्ती के लिए चारा कहां से लाए? और बडे भाई विठोजीराव होलकर घिनौनी तरीके से जो क्रूर हत्या कर दी उसका कारण पुछने के लिए और शिंदे ने कैद किये हुये माॅ यमुनाबाई, पत्नी लाडाबाई, कन्या भिमाई और मल्हारराव द्वितीय का पुत्र खंडेराव इस अपने परिवार  को साथ लेकर जाने के लिए आये हुये यशवंतराव के सामने शिंदे और पेशवा अपने सेना खडी कर दी जिसमे शिंदे और पेशवा का पराभव हुवा। जिससे पेशवा ने कोकण भागकर अपनी जान बचाई और उसके बाद बसई भागकर अंग्रेजों से संधि की (31 दिसम्बर 1802)। उसके बाद फलस्वरूप द्वितीय आंग्ल-मराठा युद्ध छिड़ गया। शिंदे से वैमनस्य के कारण मराठासंघ छोड़ने में यशवंतराव ने बड़ी गलती की क्योंकि भोंसले तथा शिंदे क पराजय के बाद, होलकर को अकेले अंग्रेजों से युद्ध करना पड़ा। महाराजा यशवंतराव होलकर ने मॉनसन पर 1804 मै विजय पाई जिससे अंग्रेजों की पैर के निचेसे जमिन खिसक गई। उसके बाद माल्कम, डूडरनेक जैसे ब्रिटिश अधिकारी और उनकी सेना को एक एक करके श्रीमंत सुभेदार राजे मल्हारराव होलकर की युद्धनिती को सामने रखकर अंग्रेज फौज को ऐसा चून के मारा की अंग्रेज अधिकारी यशवंतराव होलकर के सामने घुटने टेकने लगे। अकेले दम पर अजिंक्य कहलानेवाले ब्रिटिश सेना को अपनी तलवार का ऐसा पानी चखाया जिससे खुद माल्कम ने लिख राखा है की अकेले दम पर लढनेवाला यशवंतराव होलकर जैसा महासोद्धा पुरी दुनिया मे ढुंढकर भी नही मिलेगा। क्यूंकि यशवंतराव होलकर को खुद राजा नही बनना था लेकीन सुभेदार तुकोजीराव होलकर का वारीस होवो के नाते वे मल्हारराव होलकर (द्वितीय) का पुत्र खंडेराव होलकर( द्वितीय) के नाम पर राजगादी और प्रजा की रक्षा करना चाहता था लेकीन अपने ही लोग उनकी टांग खिंचते थे इसलिए यशवंतराव होलकर अस्वस्थ थे।
                 महाराजा यशवंतराव होलकर एक ऐसा योद्धा था जो दूरदृष्टी याने की अानेवाले समय की सोच रखता था। ब्रिटिश सेना व्यापार के तौर पर हिंदूस्थान मे आकर अपना राज्य स्थापित करना चाहती थी। इसलिए अंग्रेजों के खिलाफ लढने के लिए महाराजा यशवंतराव होलकर ने हिंदूस्थान के सारे राजा महाराजाओं से मदत माॅंगी थी लेकीन किसी ने भी उसका साथ नही दिया। फिर उन्होने शिख और इस्लामी राजाओ के सामने धर्म बदलाव का प्रस्ताव भी रखा लेकीन कुछ फायदा नही हुआ क्यूंकि बाकी सारे राजामहाराजा खुद को अंग्रेजो के प्रति बिक चुके थे। अंग्रेजों को करारा जवाह देने के लिए महाराजा यशवंतराव होलकर ने भारी वजन और तेजी से निशाने पर मारा करनेवाली तोफ बनाने की फैक्टरी डाली जो भानपुरा मे है। महाराजा यशवंतराव होलकर ने अंग्रेजों के खिलाफ कुल 18 युद्ध किये जिसमे अंग्रेजो को पराजित करते हुये सारे सारे के युद्ध यशवंतराव होलकर ने अकेले दम पर प्राणों की बाजी लगाते हुए जित चुके थे। तभी तो अजिंक्य कहलाने वाले अंग्रेज सेना की धज्जीयाॅ उडातर उनकी लज्जा (इज्जत) दुनिया की द्वार पर टांगनेवाला महाराजा छत्रपती यशवंतराव होलकर ही था। अंत में, पूर्ण विक्षिप्तावस्था में, तीस वर्ष की आयु में उसकी मृत्यु हो गई (28 अक्टूबर 1811)।
             एक ऐसा भारतीय शासक जिसने अकेले दम पर अंग्रेजों को नाकों चने चबाने पर मजबूर कर दिया था। इकलौता ऐसा शासक, जिसका खौफ अंग्रेजों में साफ-साफ दिखता था। एकमात्र ऐसा शासक जिसके साथ अंग्रेज हर हाल में बिना शर्त समझौता करने को तैयार थे। एक ऐसा शासक, जिसे अपनों ने ही बार-बार धोखा दिया, फिर भी जंग के मैदान में कभी हिम्मत नहीं हारी।
इतना महान था वो भारतीय शासक, फिर भी इतिहास के पन्नों में वो कहीं खोया हुआ है। उसके बारे में आज भी बहुत लोगों को जानकारी नहीं है। उसका नाम आज भी लोगों के लिए अनजान है। उस महान शासक का नाम है - महाराजाधिराज राजराजेश्वर छत्रपती यशवंतराव होलकर। यह उस महान वीरयोद्धा का नाम है, जिसकी तुलना विख्यात इतिहास शास्त्री एन एस इनामदार ने 'नेपोलियन' से की है।
पश्चिम मध्यप्रदेश की मालवा रियासत के महाराज यशवंतराव होलकर का भारत की आजादी के लिए किया गया योगदान महाराणा प्रताप और झांसी की रानी लक्ष्मीबाई से कहीं कम नहीं है। यशवतंराव होलकर का जन्म 1776 ई. में हुआ। इनके पिता थे - तुकोजीराव होलकर। होलकर साम्राज्य के बढ़ते प्रभाव के कारण ग्वालियर के शासक दौलतराव सिंधिया ने यशवंतराव के बड़े भाई मल्हारराव को मौत की नींद सुला दिया।
इस घटना ने यशवंतराव को पूरी तरह से तोड़ दिया था। उनका अपनों पर से विश्वास उठ गया। इसके बाद उन्होंने खुद को मजबूत करना शुरू कर दिया। ये अपने काम में काफी होशियार और बहादुर थे। इसका अंदाजा इसी से लगाया जा सकता है कि 1802 ई. में इन्होंने पुणे के पेशवा बाजीराव द्वितीय व सिंधिया की मिलीजुली सेना को मात दी और इंदौर वापस आ गए।
इस दौरान अंग्रेज भारत में तेजी से अपने पांव पसार रहे थे। यशवंत राव के सामने एक नई चुनौती सामने आ चुकी थी। भारत को अंग्रेजों के चंगुल से आजाद कराना। इसके लिए उन्हें अन्य भारतीय शासकों की सहायता की जरूरत थी। वे अंग्रेजों के बढ़ते साम्राज्य को रोक देना चाहते थे। इसके लिए उन्होंने नागपुर के भोंसले और ग्वालियर के सिंधिया से एकबार फिर हाथ मिलाया और अंग्रेजों को खदेड़ने की ठानी। लेकिन पुरानी दुश्मनी के कारण भोंसले और सिंधिया ने उन्हें फिर धोखा दिया और यशवंतराव एक बार फिर अकेले पड़ गए।
उन्होंने अन्य शासकों से एकबार फिर एकजुट होकर अंग्रेजों के खिलाफ लड़ने का आग्रह किया, लेकिन किसी ने उनकी बात नहीं मानी। इसके बाद उन्होंने अकेले दम पर अंग्रेजों को छठी का दूध याद दिलाने की ठानी। 8 जून 1804 ई. को उन्होंने अंग्रेजों की सेना को धूल चटाई। फिर 8 जुलाई 1804 ई. में कोटा से उन्होंने अंग्रेजों को खदेड़ दिया।
11 सितंबर 1804 ई. को अंग्रेज जनरल वेलेस्ले ने लॉर्ड ल्युक को लिखा कि यदि यशवंतराव पर जल्दी काबू नहीं पाया गया तो वे अन्य शासकों के साथ मिलकर अंग्रेजों को भारत से खदेड़ देंगे। इसी मद्देनजर नवंबर, 1804 ई. में अंग्रेजों ने दिग पर हमला कर दिया। इस युद्ध में भरतपुर के महाराज रंजित सिंह के साथ मिलकर उन्होंने अंग्रेजों को उनकी नानी याद दिलाई। यही नहीं इतिहास के मुताबिक उन्होंने 300 अंग्रेजों की नाक ही काट डाली थी।
अचानक रंजित सिंह ने भी यशवंतराव का साथ छोड़ दिया और अंग्रजों से हाथ मिला लिया। इसके बाद सिंधिया ने यशवंतराव की बहादुरी देखते हुए उनसे हाथ मिलाया। अंग्रेजों की चिंता बढ़ गई। लॉर्ड ल्युक ने लिखा कि यशवंतराव की सेना अंग्रेजों को मारने में बहुत आनंद लेती है। इसके बाद अंग्रेजों ने यह फैसला किया कि यशवंतराव के साथ संधि से ही बात संभल सकती है। इसलिए उनके साथ बिना शर्त संधि की जाए। उन्हें जो चाहिए, दे दिया जाए। उनका जितना साम्राज्य है, सब लौटा दिया जाए। इसके बावजूद यशवंतराव ने संधि से इंकार कर दिया।
वे सभी शासकों को एकजुट करने में जुटे हुए थे। अंत में जब उन्हें सफलता नहीं मिली तो उन्होंने दूसरी चाल से अंग्रेजों को मात देने की सोची। इस मद्देनजर उन्होंने 1805 ई. में अंग्रेजों के साथ संधि कर ली। अंग्रेजों ने उन्हें स्वतंत्र शासक माना और उनके सारे क्षेत्र लौटा दिए। इसके बाद उन्होंने सिंधिया के साथ मिलकर अंग्रेजों को खदेड़ने का एक और प्लान बनाया। उन्होंने सिंधिया को खत लिखा, लेकिन सिंधिया दगेबाज निकले और वह खत अंग्रेजों को दिखा दिया।
इसके बाद पूरा मामला फिर से बिगड़ गया। यशवंतराव ने हल्ला बोल दिया और अंग्रेजों को अकेले दम पर मात देने की पूरी तैयारी में जुट गए। इसके लिए उन्होंने भानपुर में गोला बारूद का कारखाना खोला। इसबार उन्होंने अंग्रेजों को खदेड़ने की ठान ली थी। इसलिए दिन-रात मेहनत करने में जुट गए थे। लगातार मेहनत करने के कारण उनका स्वास्थ्य भी गिरने लगा। लेकिन उन्होंने इस ओर ध्यान नहीं दिया और 28 अक्टूबर 1811 ई. में सिर्फ 35 साल की उम्र में वे स्वर्ग सिधार गए।
इस तरह से एक महान शासक का अंत हो गया। एक ऐसे शासक का जिसपर अंग्रेज कभी अधिकार नहीं जमा सके। एक ऐसे शासक का जिन्होंने अपनी छोटी उम्र को जंग के मैदान में झोंक दिया। यदि भारतीय शासकों ने उनका साथ दिया होता तो शायद तस्वीर कुछ और होती, लेकिन ऐसा नहीं हुआ और एक महान शासक यशवंतराव होलकर इतिहास के पन्नों में कहीं खो गया और खो गई उनकी बहादुरी, जो आज अनजान बनी हुई है। चक्रवर्ती सम्राट ययाति, आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, चक्रवर्ती सम्राट राजा अशोक, श्रीमंत राजे मल्हारराव होलकर, चोल, होयसळ, हक्क-बुक्क राय, यादव राजे जैसा ही धनगर समाज में जनम लेने वाला छत्रपती महाराजा यशवंतराव होलकर एक बहादुर एकमेवाद्वितीय महायोद्धा था जिनकी तुलना नेपोलियन बोनापार्ट ये की गई है लेकीन नेपोलियन बोनापार्ट और छत्रपती महाराजा यशवंतराव होलकर समकालीन थे। नेपोलियन बोनापार्ट का जनम १५ अगस्त १७६९ मे हुआ और मृत्यू ५ मई १८२१ मे जब की छत्रपती महाराजा यशवंतराव होलकर का जनम ३ दिसंबर १७७६ और मृत्यू २८ अक्तूबर १८११ में हुई थी। इससे अनुमान लगाया जा सकता है की यशवंतराव होलकर नेपोलियन बोनापार्ट से प्रेरित नही हुये थे बल्कि नेपोलियन बोनापार्ट ही छत्रपती महाराजा यशवंतराव होलकर से प्रेरित हो गया होगा।
ऐसे जिगरबाज बहादुर रणसम्राट को सम्राटों का सम्राट याने चक्रवर्ती कहा जाता है, उस चक्रवर्ती सम्राट महाराजाधिराज राजराजेश्वर छत्रपती महाराजा यशवंतराव होलकर की आज २४२ वी जन्मशताब्दी है। उनकी कार्यनिष्ठा, युद्धकुशलता, राष्ट्रभक्ति और शुरविरता को तहे दिल से विनम्र अभिवादन करता हू।
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंत!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com
https://nitinrajeanuse123.blogspot.in

Tuesday, 28 November 2017

माझ्या छत्रपती यशवंतराव होळकरांना परत पाठव...


*चक्रवर्ती सम्राट छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमीत्त*
*दि.३ डिसेंबर २०१४ चा माझा ब्लाॅग मी पुन्हा शेअर करतोय...*  *-नितीनराजे अनुसे*
      
          पहाटे पहाटेची वेळ होती, गाढ साखर झोपेत असताना अचानक कोणीतरी गालावर जोरदार चपराक मारण्याचा भास झाला, कोण?? कोण ?? असं म्हणत गालावर हात फिरवत डोळे चोळत उठून बसतो तोच समोर एक आकृति दिसली. धिप्पाडच्या धिप्पाड शरीरयष्टी, अंगावर जरदारी रेशमी वस्त्रे परिधान केलेली, भरदार दाढी आणि कोरीव मिशा, डोक्यावर शिलेदार हिरेजडित टोप आणि त्यामध्ये खोचलेला मानाचा तुरा असा वेष धारण केलेल्या व्यक्तिच्या डोळ्यात एकदम तेज निखार होता, कमरेला हिरेजडित म्याणात तलवार लटकत होती. मी त्या व्यक्तिला पटकन ओळखलं... अहो मीच काय भारत राष्ट्रातील कोणीही व्यक्ति ओळखणारच... मी चक्रवर्ती सम्राट छत्रपती महाराजा यशवंतराव होळकरांना ओळखलं तोच माझ्या तोंडातून शब्द फुटले की महाराज तुम्ही?? आणि इथं कसं काय???
       खरंतर ती व्यक्ति दुसरी तिसरी कोणी नव्हती तर इंग्रजांविरुद्ध कधीही न हारता एकूण १८ लढाया जिंकणारे आणि वीठोजीराव होळकर यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी  पुण्यात येवून शिंद्यांना-पेशव्यांना ताणून ताणून मारणारे मुत्सद्दी लढवय्ये महाराजाधिराज शुरवीर अजिंक्यवीर ज्यांना जगातील दुसरा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ओळखले जाते ते छत्रपती राजे यशवंतराव होळकर होते.
   मी केलेल्या प्रश्नाचं मला खडसावतच महाराजांनी उत्तर दिलं की होय मीच यशवंतराव होळकर, "अरे तिकडं माझा धनगर समाज डोळ्यांवरती अज्ञानाचं घोंगडं पांघरुन गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय त्या माझ्या धनगर समाजाला कोण जागं करणार? त्यांचे समाजप्रबोधन कोण करणार? समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाऊन समाजाचा सर्वांगीण विकास कोण करणार?
एकामागोमाग एक अशाप्रकारे महाराज माझ्यावर प्रश्नांचा भडिमार करू लागले. महाराजांना काय उत्तर द्यायचं मलाच सुचत नव्हतं. गोंधळून गेलो, बावचळलो, आता काय आणि कसे उत्तर द्यायचे.... माझे ओठ पुटपुटत होते तेवढ्यात महाराज पुन्हा गरजले "अरे काय दातखीळी बसली की काय? मी विचारलेल्या प्रश्नाची मला उत्तर हवी आहेत...
       मी बोललो की महाराज आजचा धनगर समाज अजून गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय ही गोष्ट खरी आहे याची मला खंत देखिल वाटते आणि त्यांना जागं करायचा मी पुरेपूर प्रयत्न सुद्धा करतोय. पण काहीजण जागे आहेत पण महाराज त्यांनी मात्र झोपेचं सोंग घेतलंय. महाराज एक म्हणसुद्धा आहे की "एकवेळ झोपलेल्यांना जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्यांना कधी जागं करता येत नाही."
तेवढ्यात महाराज ओरडले "अरे झोपेचं सोंग घेणाऱ्यांना लाथा घालून उठवायचं असतं, एवढीपण अक्कल नाही का?  "वेड्याला जोड्याचा मार अन शहाण्याला शब्दांचा मार द्यायचा असतो." महाराज खरं बोलत होते तसं त्यांनी  त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध देखिल करून दाखवले होते.
मी पुन्हा बोललो "महाराज हा आपला पुर्वीचा धनगर समाज नाही राहिला की ज्याला अन्यायाची जाण, लढण्याची हिंमत आणि स्वाभिमानाची किंमत होती. आज या महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज प्रस्थापितांच्या दावणीला बांधला गेलाय. या धनगर समाजातील नेते प्रस्तापितांना फितूर झालेत जसे  तुमच्या काळात हिंदुस्तानातील राजे फिरंग्या इंग्रजांच्या भितीने फितूर होऊन त्यांचेच गुलाम होऊन बसले होते. महाराज आजचा धनगर समाज स्वाभिमानाची भाषाच विसरून गेलाय. अन्यायाच्या विरोधात कसे पेटून उठायचे तेच आजच्या मावळ्यांना समजत नाही. का आजच्या धनगर समाज बांधवांमध्ये लढण्याची हिंमतच नाही तेच मला समजत नाही. जो धनगर समाज बांधव स्वतःचा स्वाभिमान दुसऱ्यांच्या बुटाखाली गहाण टाकतोय त्याला मी कसं जागं करू? ज्या धनगर समाजाला आपला इतिहासच माहीत नाही ते काय खाक इतिहास घडविणार का? महाराज आता तुम्हीच सांगा की आम्ही नेमकं कमी कुठे कमी पडलो? आणि आता आम्हाला काय करायला हवं?
पहाटेचे वातावरण एकदम शांत असताना महाराज एकाएकी कडाडले शांतता दुभांगल्यागत झाले आणि आगीचे लोळ जसे बाहेर पडावेत तसे महाराज आग ओकू लागले "अरे आम्ही घडवलेला इतिहास जर तुम्हाला आठवत नसेल तर मग तुम्ही धनगरांचे वारसदार कशासाठी म्हणवून घेता? हाडाची काडं करून आपले वंशज ते बहाद्दर लढले होते अन आम्हीसुद्धा तलवारीच्या टोकावर दुश्मनांना नाचवलं होतं तेव्हा रक्ताचं पाटच्या पाट पाण्यासारखं वाहत होतं एवढं बलिदान नेमकं कोणासाठी होतं? अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज फौजांची इभ्रत आम्ही जगाच्या वेशीवर टांगली होती. माल्कम, डूडरनेक सारखे इंग्रज अधिकारी आमच्या तलवारींचे पाणी चाखून गुडघे टेकले होते. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटावर मोजण्याइतपत मराठी सैन्यांना सोबत घेऊन जंगलातून, डोंगरदऱ्यांतून गणिमी काव्याने मोघलांना जेरीस आणलं होतं ते आमच्यासाठी आदर्श होते. परंतू जंगलदऱ्या दूरच राहिल्या सपाट मैदानासारख्या प्रदेशात मल्हारतंत्र वापरून आम्ही इंग्रजांना कसे ताणून ताणून मारले होते ते इंग्रजांनीच लिहून ठेवलंय पण तुम्हाला मात्र आमच्या शोर्याची काहीच कदर नाही. इंग्रज सैन्यांना कापून काढत छातीची ढाल करून मनगटाच्या जोरावर लढलेल्या महापुरुषांची अन पुर्वजांनी सांडलेल्या रक्ताचीच जाणीव जर आजच्या धनगर समाजाला नसेल तर या गोष्टीची आपल्या पुर्वजांना देखिल लाज वाटत असेल की आरे आपण कोणत्या समाजात जन्माला आलो? आणि याचा खरोखरंच त्यांना खेद देखिल वाटत असेल"
महाराजांचे डोळे लालबुंद झाले होते आणि महाराज खरोखरच जाम चिडले होते.
धनगर समाजानं हजारो वर्षापेक्षाही अधिक काळ या हिंदुस्थानावर केलेलं राज्य मग आद्यचक्रवर्ती सम्राट ययाति राजा पासून भारताच्या इतिहासाची सुरवात ज्यांच्या महान कर्तृत्वाने ओळखली जाते त्या आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्या पासून राजा बिंदुसार, राजा सम्राट अशोका ते राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी अहिल्यामाई होळकर, शुरवीर राजे यशवंतराव होळकर तुकोजीराव होळकर विरांगणा भिमाई होळकर यांचा राष्ट्राप्रती बलिदान दिलेला सुवर्णाक्षरात कोरलेला धनगर समाजाचा इतिहास ते माझ्यासमोर मांडत होते. तलवारीच्या जोरावर मिळवलेल्या यशाच्या गाथा गिरवत होते. स्वातंत्र्यासाठी लढणारे आद्यप्रणेते राजे यशवंतराव होळकरच होते, हे आम्हापासून जाणूनबुजून लपवून ठेवलं गेलं आणि चुकीचा इतिहास लिहला गेला कारण इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते.
इंग्रजांनी भारतावर आक्रमण केलं होतं. अनेक संस्थानांच्या राजांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती, महाराज प्रत्येक संस्थानाच्या राजांना पत्र लिहून इंग्रजांविरूद्ध एकत्र लढण्याचे आवाहन करत होते. एवढेच नव्हे तर शिख राजांना शिख धर्म आणि मुस्लिम राजांना इस्लाम धर्म स्विकारणार असे महाराजांनी पत्राद्वारे कळवून जाहिर केले होते ते फक्त त्या त्या धर्माच्या राजा-महाराजांनी फीरंग्यांच्या विरोधात लढण्यासाठी एकत्रित यावे म्हणून पण प्रत्येक संस्थानच्या राजा महाराजांना राष्ट्राबद्दल काहीच सोयरसुतक नव्हतं तर प्रत्येकजण स्वतापुरतं पहात होता. अख्खा हिंदुस्थान इंग्रजांपुढे झुकला गेला होता पण माझा राजा छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर कोणापुढे न झुकता ताठ मानेनं कोरीव मिश्यांना ताव देत स्वाभिमानानं जगत होता, झुंजत होता १८ लढायामध्ये इंग्रजांना पराभूत करत वायूवेगाने इंग्रजांच्या सैन्याना कापत सुटत होता, कधीकधी इंग्रज अधिकारी देखिल यशवंतराव होळकरांपुढे नतमस्तकी व्हायचे तर कधी काही इंग्रज अधिकारी रणांगणातून माघारी पळ काढायचे.
हीच ती धमक होती आणि हाच त्यांचा शूरबाणा आणि मनगटाच्या जोरावर शत्रुंना चारीमुंड्या चीत करणारी त्यांची ती तलवार माझ्या मातीवर अत्याचार करणार्यांना कापत सुटायची.
महाराज बोलत होते मी मात्र सुन्न होऊन त्यांच्या शौर्यगाथा ऐकत होतो, एकाएकी अंगावर रोमांच उठायचे, अंग शहारून निघायचे माझ्याही हाताच्या मुठी आवळल्या जायच्या पुन्हा एकदा हातात तलवार घेऊन रणांगणात उतरावं, जो माझ्या मातीवरती समाजावरती अन्याय करतोय त्याला तिथेच आणि उभाच चिरून टाकावं अशी माझी अवस्था झाली होती.
माझ्या ओठातून शब्द फुटले "महाराज मला आज्ञा द्या मी आता नेमकं काय करु??"
महाराज मला खडसावतच बोलले अरे शिकलेले सवरलेले तुम्ही आन् काय करायला पाहिजे म्हणून इचारता कशाला?  "आज समाजावरती अन्याय करणाऱ्या प्रस्थापितांना जर धाक दावायचा असेल तर धनगर समाजाला जागं कर, जे जागे आहेत त्यांना उठवून उभा कर, जे उठलेत त्यांना चालतं कर बोलतं कर आणि लेखणीरूपी धारदार शब्दांच्या तलवारी प्रत्येकाच्या हातात दे की जे शब्द एकेकाची काळीजं कराकरा चिरत जातील.
       एखाद्या पिकाची मशागत करायची असेल तर अगोदर शेत नांगरावं लागतं, पिकाला वेळेवर खत पाणी द्यावं लागतं तरच पिक जोमानं वाढतं त्याचप्रमाणे अगोदर माझ्या धनगर समाजाचं डोकं तुझ्या धारदार लेखणीरूपी तलवारीने या समाजाची डोकी नांगर आणि वेळेवर समाजप्रबोधनाचं खतपाणी घाल तर भविष्यात माझ्या धनगर समाजाला कोणाकडेही गहाण पडायची वेळ येणार नाही."
जो समाज आपला इतिहास विसरतो त्या समाजाची कधीच प्रगती होत नाही. कारण इतिहास घडवणारे इतिहास विसरू शकत नाहीत अन् इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत हा एक फार मोठा इतिहास आहे. त्यासाठी आपला इतिहास सर्वांसमोर यायला हवा. आजच्या समाजाला जर जागं करून एकत्रित करायचे असेल तर इतिहासाचीच सांगड घालून द्यावी लागेल अन्यथा या स्वार्थी आणि मतलबी प्रवृत्तीच्या जगात समाजासाठी धडपडणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. प्रत्येकजण स्वतापुरतं जगतोय, आपले पुर्वज देखिल जर राष्ट्रासाठी लढण्यापेक्षा स्वतासाठी लढले असते तर आज त्यांचा इतिहास समोर आलाच नसता. आणि इतिहासकारांनी याची दखल घेतली नसती. पण पुरोगामी विचारांच्या आणि पाखंडी पंडितांसारख्यांनी आपल्या पुर्वजांचा आणि राजा महाराजांचा इतिहास आम्हापासून दूर ठेवण्याचे कुटिल कारस्थान केले.
आज समाजावरती अन्याय व अत्याचार होत असताना माझ्याच समाजातील काही लोक हाताची घडी घालून तमाशा बघत बसताहेत तर काहीजण अवर्जून या तमाशाचे आयोजन करतात हे सांगायला देखिल मला खंत वाटते आणि खरोखरच मला त्या समाजद्रोह्यांची कीव येते. राजा महाराजांच्या जातीत जन्माला आलेल्या औलादी आज समाजावर अन्याय व अत्याचार करत असलेल्या प्रस्थापित नेत्यांच्या दावणीला कसे काय बांधले जातात तेव्हा महाराज म्हणाले... खरा इतिहास जर वेळीच समोर आला असता तर आज ही वेळ आली नसती. इतिहासाचे अज्ञान असल्याने समाजाची अधोगती झाली त्यासाठी आता समाजातील युवकांसमोर आवाहन आहे आपल्या पुर्वजांचा इतिहास समाजासमोर आणि अखंड महाराष्ट्र राज्यातील मराठी माणसांसमोर मांडायला हवा. थोर महापुरूषांच्या जयंत्या साजर्या करून समाजाला एकत्रित करून इतिहासाची माहीती द्यावी. नुसतंच डीजे लावून धांगडधिंगा घालून जयंत्या साजऱ्या करायच्या असतील तर एकवेळ जयंत्या नसलेल्याच बरे. कारण त्या माध्यमातून समाजप्रबोधन होणे फार गरजेचे आहे. महाराजांचे शब्द ना शब्द मी मनात साठवून घेत होतो. महाराज जेवढे राकट स्वभावाचे होते तेवढेच राष्ट्रापती बलिदान देणारे  प्रेमळ स्वभावाचे होते. राजे यशवंतराव होळकरांचे नाव ऐकले तर इंग्रज अधिकाऱ्यांना कापरं भरायचं एवढंच नव्हे तर काहीजण लघूशंकाच करायचे.... भांबुर्ड्याच्या लढाईत मल्हारतंत्राचा अवलंब करत लाखो माल्कमच्या सैन्यांना कापूण काढले होते तेव्हा एक इंग्रज अधिकारी त्याच्या सोबत्यांना म्हणाला की "ये यशवंतराव हुलकर आसमान से तो नहीं ना गिरा??" अशा पद्धतीने इंग्रजावरती मल्हारनीतीचा अवलंब करत हल्ले करणारे राजे यशवंतराव यांनी दुश्मनांवरती वचक बसविली होती. महाराज बोलतच होते आणि मी फक्त होतो. मात्र आता ऐकण्याची मनस्थीती नव्हती तर पुन्हा तीच तलवार घेऊन माझ्या समाजावर अन्य्य व अत्याचार करणाऱ्यांची डोकी उडवायची होती पण अगोदर समाजाची डोकी माझ्या लेखणीरूपी तलवारीने नांगरांयला हवी. म्हणून महाराजांना सांगितले महाराज मी आज शपथ घेतोय की, "आज धनगर समाजाला जागं करून प्रत्येकाची डोकी नांगरल्याशिवाय मी शांत बसणार नाय. मग तिथं मला कोणीही आडवा तर त्याला तिथंच उभा चिरणार अन जर कोणी हात जोडून येत असेल तर त्याला लोटांगण घालेल.
कारण जर आमच्या वाटेला कोणी आला तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतनार नाय हा आमुचा इतिहास आहे."
युवकांनी समाजबांधवांनी इतिहास जाणून घेण्यासाठी
1) झुंज : ना.सि.इनामदार
2) स्वातंत्र्य प्रणेते: संजय सोनवनी सर
3) वीरांगणा भीमाई: होमेश भुजाडे सर
4)धनगरांचा गौरवशाली इतिहास: संजय सोनवनी सर
5) होळकरांची कैफीयत: प्रा.निलेश शेळके सर
6)क्रांतीची मशाल पेटवा: ए.एस.बरींगे सर
7) थोरले सुभेदार मल्हारराव होळकर: संजय सोनवनी सर
8) The Vintage of Indore.
तसेच होळकरशाहीचा इतिहास अन्य पुस्तकांतून, संदर्भातून अभ्यासावा ही विनंती.
दि.३ डिसेंबर रोजी महापराक्रमी शुरवीर लढवय्या राज राजेश्वर सिहासनाधिष्ट महाराजाधिराज राजे श्रीमंत छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची २४१ वी जयंती आहेत त्यानिमीत्त राष्ट्रापती बलिदान देणारे स्वातंत्र्याचे प्रणेते आद्य क्रांतीवीर राजे यशवंतराव होळकर यांना विनम्र जय मल्हार!!!
 कोटी कोटी प्रणाम!!!
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
          ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
http://nitinrajeanuse123.blogspot.com

Monday, 27 November 2017

३ डिसेंबर रोजी वाड्यावस्तीवर जयंती साजरी करा...

अजिंक्य मानल्या जाणाऱ्या बलाढ्य इंग्रज फौजेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या आणि इंग्रज अधिकाऱ्यांना गुडघे टेकायला भाग पाडणाऱ्या तसेच इंग्रज सैन्यांना सळो की पळो करून त्यांना रणांगणात अक्षरशा कापून काढणाऱ्या आद्यस्वातंत्र्यसेनानी छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची ३ डिसेंबर रोजी २४१ वी जयंती अाहे. ज्या महायोद्याने स्वतर्तृत्वावर शून्यातून विश्व निर्माण केले, ज्या पेशव्यांनी हे भारत राष्ट्र देशोधडीस लावायचे षड्यंत्र रचले होते त्या पेशव्याला छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांनी कोकणात पळून जाण्यास भाग पाडले. इंग्रज फौजा हळूहळू भारतभर पाय पसरवताहेत याचा गांभीर्याने विचार करून स्वकर्तृत्वावर इंग्रजांशी दोन हात करणारा लढवय्या त्यांच्या हयातीत एकही युद्ध कधीही हरला नाही असे एकमेवाद्वितीय ठरलेले, छत्रपती शिवरायानंतर स्वताचा राज्याभिषेक करून घेणारे ज्यांना भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ओळखले जाते ते म्हणजेच धुरंदर लढवय्ये छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर होत. इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथमता तलवार उपसून सलग एकूण १८ लढायांमध्ये इंग्रजांना हरवून जिंकणारा महायोद्धा, इंग्रजांना गुडघे टेकायला भाग पाडून सळो की पळो करून सोडत, इंग्रजांना रणांगणात कापून काढणाऱ्या आद्यस्वातंत्र्यसेनानी छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांतील गावगाड्यात, वाड्यावस्तीवर जिथे शक्य आहे तिथे रविवार दि.३ डिसेंबर साजरी करून छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास तळागळापर्यंत पोहचवण्यासाठी यशवंत सैनिकांनी कंबर कसावी. मोडक्या-तोडक्या भाषेत का होईना पण त्यांचा दैदिप्यमान आणि गौरवशाली इतिहास अखंड भारतभरातील प्रत्येक माणसाच्या मनामनात आणि मस्तका-मस्तकात गिरवा.
तरच माझ्या छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांना खरे अभिवादन ठरेल. नुसतंच सोशल मिडीयावरती फोटो इमेजेस बनवून व्हायरल केल्यानेच जयंती साजरी होते अथवा अभिवादन ठरते असे नाही तर लोकांच्या मस्तकात आणि मनामनात जर महाराजांचा इतिहास गिरवला तर तो इतिहास जिवंत राहतो आणि पुन्हा दुसरा इतिहास घडवण्यासाठी त्याच त्वेषाने त्याच उर्मीने त्याच उमेदीने सळसळत्या रक्ताचे वारसदार असणारे यशवंत युवा सैनिक पुन्हा अन्यायाच्या विरोधात लढायला तयार होतील.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!
आपलाच,
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com
https://nitinrajeanuse123.blogspot.in

Saturday, 4 November 2017

संबंधित मंत्र्यांनीच आत्मचिंतन केले तर बरे होईल


एकमेव अद्वितीय लढवय्या, महापराक्रमी शुर योद्धा ज्यांनी अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज फौजेची इभ्रत जगाच्या वेशिला टांगली अशा छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावाने महामेष योजना सुरू करून नक्की काय साध्य करायचे आहे? स्वातंत्र्याचे प्रणेते असणाऱ्या छत्रपती महाराजा यशवंतराव होळकरांच्या दैदिप्यमान, जाज्वल्य आणि नेत्रदीपक इतिहासाचा, राष्ट्रभक्तिचा आणि त्यांच्या दूरदृष्टीचा विचार करून तरी भारतीय फौजेच्या एखाद्या बटालियन अथवा इन्फंट्री ला त्यांचे नाव द्यायला हवे होते पण तसे न करता राजे यशवंतराव होळकर महामेष योजना असे त्या योजनेस नाव देऊन शेवटी त्यांना धनगर समाजाच्याच पंगतीत आणून बसवण्याचे हे महापाप नव्हे का?
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

Thursday, 2 November 2017

आरक्षणाच्या विकासाचं महात्म्य...

आजकाल राजकारणात, सत्ताकारणात एक क्रेझ झाली आहे ती म्हणजे शक्तिप्रदर्शन करणे आणि त्याच शक्तिप्रदर्शनाच्या जोरावर राजकारणात सत्ताकारणात चांगले पद मिळवणे. पण विकासाचं महात्म्य काय? ज्यांच्या जोरावर शक्तिप्रदर्शन केले चांगली पदे मिळवली त्या जनतेचं त्या त्या नेत्यांनी किती दायित्व राखले? खरंतर विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे खासदार पद्मश्री विकास महात्मे साहेब. साहेबांनी अनेक नेत्र चिकित्सक शिबीरं घेतली. मोफत डोळ्यांची आॅपरेशन केली आणि त्यानुषंगानेच पद्मश्री हा पुरस्कार त्यांना बहाल केला गेला. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच...
            जेव्हा १५ जुलै २०१४ ला पंढरपूर-बारामती आरक्षण दिंडी निघाली २१ जुलै ला पाच ते सहा लाख धनगर समाजबांधव बारामतीमध्ये एकत्रित आला होता. त्याठिकाणी फडणवीसांनी सत्तेत आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये १५ दिवसांत अंमलबजावणी करण्याची मागणी असताना आरक्षण देणार असल्याचे वचन दिले. पुढे सरकार सत्तेत आले १५ दिवस झाले, महिना झाला दोन महिने झाले तरीही फडणवीसांचे तोंड उघडेना आणि निर्णय काय होईना. दिवसेंदिवस आरक्षणाची चळवळ वाढीस लागल्यानंतर ४ जानेवारी २०१५ रोजी विकास महात्मेंनी नागपूर मध्येच धनगर आरक्षणाचा मोर्चा आयोजित केला. महाराष्ट्र राज्यातील लाखोंच्या संख्येने समाजबांधव नागपूरात एकवटला होता. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वता पुढील एक महिन्याच्या आत निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्याच स्टेजवरून सध्याचे कॅबिनेट ना.महादेव जानकर साहेब यांनी देखिल आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर फडणवीसांचा अजित पवार करू असे खडसावले होते. परंतू पुढेही फसणवीसांचे तेच धोरण धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झाल्याचे सांगत समाजाला भावनिक केले आणि तिथेच धनगर समाज फसला. नागपूर मेळाव्यानंतर देखिल महिन्यात निर्णय घेऊ म्हणणाऱ्या फडणवीस यांनी दोन तीन नव्हे तर तब्बल सहा महिने उलटून गेले तरी निर्णय घेतला नाही अजून अभ्यासच चालू असल्याचे ढोंग केले. २१ जुलै २०१५ रोजी बारामती मोर्चाच्या धर्तीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रेरणा दिवस आयोजित केला. एक मोठे जनआंदोलन आयोजित करण्याचे त्या प्रेरणा दिवशी ठरविले त्यास सर्व मातब्बर नेते, विकास महात्मे सह महाराष्ट्र राज्यातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी जनआंदोलनासाठी हो मध्ये हो मिळवला परंतू विदर्भात गोव्यानंतर महात्मेंनी सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता समाजाचे भांडवलीकरण करण्यासाठी ८ डिसेंबर २०१५ रोजी मोर्चा आयोजित केला. विश्वासात न घेतल्याने त्यांच्या या निर्णयास विरोध महाराष्ट्र राज्यभरातून विरोध होऊ लागला. त्यातच १० डिसेंबर २०१५ च्या दुसऱ्या मोर्चाची डाळ शिजू लागली. दोन्ही मोर्चे वेगवेगळे न करता एकत्रित व्हावेत असे समाजाचे मत होते. परंतू वेगवेगळे मोर्चे काढले तर त्याचे श्रेय कोणाच्या पारड्यात पडणार? असा श्रेयवादाचा प्रश्न निर्माण निर्माण झाला. एकत्रित आणि एकच मोर्चा व्हावा यासाठी मी स्वता दोन्ही मोर्चाच्या आयोजकांशी बोललो होतो त्याचे पुरावे देखिल आहेत, त्यासंदर्भातील नोव्हेंबर व डिसेंबर २०१५ मधील ब्लाॅग देखिल खालील Nitinraje Anuse ब्लाॅग स्थळावर जाऊन तुम्ही वाचू शकता. ना नेता ना संघटना फक्त आणि धनगर समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन व्हावे ही सर्वांची प्रामाणिकपणे अपेक्षा होती. परंतू हेच विकासांचे महात्मे ऐकायला तयार नव्हते पाठपुरावा कोण करणार म्हणून ते त्यांच्या संघटनेच्या बॅनर खालीच मोर्चा निघणार या मतावर ठाम होते. शेवटी त्यांनी तेच केले आणि धनगर समाजाचे विभाजन झाले पाच-पन्नास हजार समाजबांधव नागपूर मध्ये ८ डिसेंबर २०१५ रोजी एकत्रित आला. १० डिसेंबर रोजी देखिल हजारांच्या संख्येत लोक उपस्थित राहिले होते. परंतू ८ डिसेंबर रोजीच्या मोर्चात मुख्यमंत्री निवेदन स्विकारण्यासाठी आलेच नव्हते. त्या मोर्चातून खरंतर काहीच निष्पन्न झाले नाही उलट आरक्षणाची अंमलबजावणी दूरच राहिली पण पदरात पडले ते म्हणजे TISS संशोधनाचे गाजर. जर एखाद्या जाती/जमतीला अनुसुचित जाती/जमातीमध्ये सामाविष्ट करायचे असल्यास त्यासंदर्भातील अहवाल सादर करावा लागतो आणि तो अहवाल तयार करण्यासाठी त्या ८ डिसेंबरच्या मोर्चातून TISS या संस्थेची नेमणूक करण्यात आली. परंतू धनगर समाज मात्र अगोदरपासूनच अनुसुचित जमातीच्या यादीत असताना अहवाल सादर करायला लावून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवायचे फार मोठे षड्यंत्र फडणवीसांनी रचले आणि धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी त्यास सहखुशीने अनुमोदनही दिले. दोन टप्प्यांत अर्थातच सहा महिने ते नऊ महिन्यांच्या कालावधीमध्येच धनगर समाजाला आरक्षण (असताना) देऊ म्हणणाऱ्या फडणवीस सरकारचे नऊ दहा महिन्यांतर नव्हे तर एका वर्षांनंतरही अजून आरक्षणाचे बाळंतपणच झाले नाही हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. मध्यंतरीच्या काळात या दोन्ही मोर्चाच्या पार्शभूमीवर ३१ मे २०१६ याच दिवशी महात्मेंना खासदारकी देऊन राज्यसभेवर घेतले. मग ती खासदारकी धनगर समाजामुळेच मिळाली हे कोणीही नाकारू शकणार नाही. पुढे सध्याचे कॅबिनेट मंत्री ना.प्रा.राम शिंदे व ना.महादेवजी जानकर यांना मंत्रीपद देऊन धनगर समाजाला गप्प बसवायचा प्रकार केला. परंतू धनगर समाज असा कसा गप्प बसेल? आणि शांत बसेल तो धनगर कसला? खासदारकी मिळाल्यानंतर विकास महात्मे मात्र गप्प बसले २०१५ नंतर २०१६ मध्ये त्यांनी एकाही मोर्चाचे आयोजन केले नाही. परंतू आपण स्वता एक समाजाचे प्रतिनिधी आहोत याची जाण असताना देखिल खासदार विकास महात्मे यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या स्टेटमेंटची पाठराखण केली. धनगर आरक्षणास मोदींचा नकार अशा बातम्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया वरतून झळकल्या, सोशल मिडीयावरती त्या वायूवेगापेक्षाही जास्त गतीने व्हायरल झाल्या. त्याचवेळी खासदार विकास महात्मे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की मोदींनी घेतलेल्या खासदारांच्या शाळेत धनगर आरक्षणाचा धडा नव्हताच. मग त्या विकास महात्मेंना माझे प्रश्न आहेत ते म्हणजे...
1. त्या खासदारांच्या शाळेत आरक्षणाचा धडा नव्हता तर मग हे त्या मोदींनी कबुल करायला पाहिजे होते तुम्हीच का पत्रकार परिषद घेऊन कबुल केले?
2. खासदार साहेब तुम्हाला त्या शाळेत समाजाचे प्रतिनिधी म्हणून बसवले आहे ते नेत्यांची पाठराखण करायला नव्हे तर जनतेचे समाजाचे प्रश्न सोडवायला. मग धनगर समाजामुळे तुम्हाला खासदारकी मिळाली आहे हे तुम्ही कार्यक्रमांमधून जाहिर केलेलेच आहे. मग धनगर आरक्षणाबद्दल तुम्ही त्या शाळेत शंका का उपस्थित केली नाही?
3. खासदार साहेब तुमचे समर्थक म्हणतात की राज्यसभेत/लोकसभेत आपले संख्याबळ कमी पडते मग महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत आमदार बच्चू कडू हे अपक्ष असताना देखिल अपंगासाठी किती लढतात आणि झटतात हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलंय. मग त्याप्रमाणेच धनगर आरक्षणाचा मुद्दा तुम्ही का उपस्थित करू शकला नाही.?
बर असो एवढे सगळे करून देखिल तुम्ही पुढच्या २०१९ च्या लोकसभा डोळयासमोर ठेऊन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ५ नोव्हेंबर २०१७ ला निर्णायक मेळावा आयोजित केला. त्याबद्दल माझे काही दुमत नाही परंतू आजपर्यंत नागपुरातील तुम्ही घेतलेल्या मोर्चाचे काय पारिपत्य केले? काय निर्णय झाला? म्हणून निर्णायक मेळावा आयोजित केला याचे स्पष्टीकरण तरी द्या. उठ की सुठ नुसतंच तुम्ही आरक्षण मेळावा पुकारला की आमच्या शेळ्या-मेंढ्या वाडग्यात कोंडून आम्ही नागपूरला यायचं का? हजारो नोकरदारांनी नोकऱ्या सोडून तरूनांनी ट्रेन मधून आदळआपट करत, हजारो लिटर डिजेल जाळत आणि करोडो रूपयांचा चुराडा करत तुमच्या भावी खासदारकीसाठी आम्ही तिथं नागपूरला यायचं का? आरक्षणाचा निर्णयच न झाल्याने मानसिक आणि शारिरिक नुकसान, आर्थिक नुकसान हे कधीही भरून न येणारे आहे. निर्णय झालाच नसताना मग निर्णायक मेळावा कसे काय म्हणायचे बरं? तसे प्रा.विष्णू कावळे सर यांनी देखिल तुम्हाला आवाहन केले आहे की आरक्षणाचा निर्णय करूनच तुम्ही मोर्चाला या आम्ही तुमचे स्वागत करू.
           नाहीतर सातारच्या मारूती जानकर यांनी ५ नोव्हेंबरचा नागपूरचा मोर्चा उधळण्याचे ठाण मांडलेच आहे. परंतू काहीतरी ठोस निर्णय घ्यायचा सोडून लोकशाही आहे म्हणून तुम्ही फोनवरून धमक्या देता मग त्यास काय म्हणावे? मारूती जानकर यांच्या निर्णयास आम्ही चालना देतोय असा विषय नाही परंतू त्यांचे उद्दीष्ट स्पष्ट आणि निस्वार्थीपणाचे आहे एक सामाजिक बांधिलकी या नात्याने मुख्यमंत्री यांना ते जाब विचारणारच कारण आंबेडकरांनी जनतेला लोकशाही बहाल केली आहे ना... तो त्यांचा मुलभूत अधिकार असून खोटी आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनीधींना फसवणूक केल्याबद्दल जाब विचारणारच कारण गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाज हा अनुसुचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे आणि माझ्या मते तब्बल ६७ वर्षे एखाद्या समाजावर राज्यघटनेत अधिकार दिले असताना देखिल विनाकारण अन्याय करणाऱ्यांवरती देशद्रोहाचा खटला का भरू नये? धनगर आरक्षण हा माझ्या एकट्याचा अथवा मारूती जानकर यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असा विषय नसून अखंड महाराष्ट्र राज्यातील एकाच रक्ताच्या आणि हाडामांसाच्या धनगर समाजबांधवांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जन्मापासूनच घोड्याचा लगाम हातात धरून अणवानी पायानं भटकंती करणाऱ्या भोळ्या-भाबड्या मेंढपाळांच्या मुला-बाळांचा हा प्रश्न आहे त्यामुळे न्याय हा मिळालाच पाहिजे. मग तोंड वाजवून जर न्याय मिळत नसेल त्यांच्या तोंडात वाजवून तरी न्याय मिळवा पण न्याय मात्र मिळालाच पाहिजे.
           खासदार विकास महात्मे यांनी ५ नोव्हेंबर ला मोर्चा घ्यावा अथवा घेऊ नये किंवा समाजबांधवांनी त्या मोर्चाला जावं कि जाऊ नये याबद्दल आमचे दुमत नाही. ज्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न परंतू माझ्या अज्ञानी असलेल्या आणि भोळ्या-भाबड्या मेंढपाळ बांधवांच्या नावावर भांडवलीकरण करून समाजाला कोणाच्यातरी ऐऱ्यागैऱ्यांच्या दावणीला बांधायचा प्रयत्न करू नये ही विनंती...
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com
nitinrajeanuse123.blogspot.com