Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday, 30 July 2016

मी समाजकार्य का करतोय? भाग-२

मी समाजकार्य का करतोय? भाग-२
भाग-१ वरतून क्रमश: http://nitinrajeanuse.blogspot.in/2016/07/blog-post.html?m=1
2. स्वार्थासाठी/मुलींसाठी आई बापाला सोडणाऱ्या औलादी अशी माझी बदनामी केली जातेय.
खरंतर ही जी टीका आहे ती हास्यास्पदच म्हणावी लागेल. बांधवांनो समाजकार्य करणारा प्रत्येक समाजप्रबोधक असो अथवा नेता असो तो समाजासमोर ठेवलेला एक आरसा असतो आणि त्या आरशासारखा तो वागत असतो. तो समाजप्रबोधक/नेता काय करतो? कसा वागतो? कुठे जातो? याकडे सर्व जनतेचे लक्ष असते. मग तो समाजप्रबोधक/नेता इतरांनी टीका करावी बदनामी करावी असा एकही पाॅइंट पाठीमागे ठेवत नाही. मग त्या टीका करणाऱ्या नालायकांना जरातरी अक्कल पाहिजे होती मी असा कोणता मुद्दा पाठीमागे सोडेल का.???  मी  कोणत्यातरी मुलीसाठी/स्वार्थासाठी आई-वडिलांना सोडले अशा पद्धतीने माझ्या चारित्र्यावर शिंताड्या उडवल्या. अरे असे लिहण्यागोदर कमीत कमी माझ्या घरी येऊन माझ्या आईवडिलांची विचारपूस  तरी करून जायला हवं होतं, घरी राहिले माझ्या गावात/तालुक्यात येऊन चौकशी करायला हवी होती तेव्हा तुला कळलं असतं अन् माझ्याबद्दल हे असं लिहायला तेव्हा तुला लाज देखील वाटली असती. अरे खऱ्या जन्मदात्या बापाऐवजी तु ज्या नेतृत्वाला तुझा बाप म्हणतोय कमीत कमी त्या बापाला तरी विचारायचे होते तो तुझा बाप माझ्या मातोश्रींना "आई" म्हणत तिच्या हातचे जेवण जेऊन गेला. बापाच्या नात्याने त्यांनी तुला सांगितले असते की नितीनराजे अनुसे कोणासाठी आई-वडिलांना सोडणारी/विसरणारी औलाद नव्हे. पण  मला समाजकार्यापासून परावृत्त करणाऱ्या हिजड्या प्रवृत्तीच्यांनो तुमच्यात जर धमक असेल तर समाजासाठी काम करा, तुमच्यात जर हिंमत असेल तर निस्वार्थीपणाने काम करा पण माझ्यावर टीका करायला मुद्दा सापडत नाही म्हणून माझ्या चारित्र्यावर विनाकारण शिंताड्या उडवायचा प्रयत्न करत असाल आणि मला बदनाम करायचं षड्यंत्र रचत असाल तर तो तुमचा हांडगापणा झाला.
3. १००-२०० रुपयांसाठी बाप बदलणाऱ्या औलादी अशीही माझ्यावर टीका केली जाते.
जो माझा जन्मदाता आहे तोच माझा बाप आहे माझ्या बापाची जागा दुसरं तिसरं कोणी घेऊ शकत नाही. एखादं नेतृत्व नालायक असेल, निष्क्रिय असेल, समाजाचा वापर करून स्वार्थ बघत असेल तर ते नेतृत्व अवश्य बदलायला हवं नाहीतर समाजाचं वाटोळं होईल. तुमची प्रवृत्ती अशी आहे की जो नेतृत्व करतो त्यालाच तुम्ही बाप मानता मग जन्मदात्याला काय म्हणतां कोणास ठाऊक?? असो ज्या नेतृत्वाला तुम्ही बाप मानता त्या बापाला  जाऊन विचार ज्यावेळी संघटना स्थापन केली आणि संघटनेला निधी गोळा करायचा विचार झाला तेव्हा सुरवातीपासून सात-आठ जणांमद्ये फाऊंडर मेंबर हा नितीनराजे अनुसे सुद्धा एक होता जो स्वताच्या पगारामधील दर महिन्याला हजार हजार रुपये वर्गणी देत होता. तेव्हा तो तुमचा बाप बाहेर संघटनेसाठी  दौरे करत होता. आज नितीनराजेंनी त्यांच्या चेहऱ्यावरचा चढवलेला खोटा मुकूट बाजूला केला, समाजासमोर तुमचा (निस्वार्थीपणाचा) बुरखा फाडला तेव्हा तुमच्या पायाखालची वाळू सरकली मग समाजात माझी बदनामी करायची म्हणून १००-२०० रुपयांसाठी नितीनराजे नेत्यांच्या मागे फिरतो असे लिहतां सांगता तर मग १ रुपयांसाठी जरी नितीनराजे एखाद्या नेत्यांच्या मागे पळालाय असा महाराष्ट्र राज्यात एकतरी नेता दाखवा मी तुमच्या टांगेखालून जातो. असा एकतरी नेता दाखवा ज्यांच्याकडे मी स्वार्थासाठी गेलोय.. लिहायचं स्वातंत्र्य दिलंय म्हणून बायल्यांसारखं उगाच काहीतरी लिहीत बसू नका समाज हसतोय तुमच्यावर याचं भान राखा. शेंबड्या पोरांचं सोडून द्या काहीही लिहीत बसताहेत अशिक्षित अर्धवट कुठले... पण कमीत कमी त्या मानलेल्या बापाला तरी अक्कल पाहिजे होती की पोरांवर चांगले संस्कार करावेत नाहीतर त्याला बापच जबाबदार राहतो आणि लोकं सुद्धा बापालाच नावं ठेवतात.
            बांधवांनो एवढंच नव्हे तर काही बहाद्दरांनी मला धमक्या देणे वार्नींग देणे असले प्रकार केले. नितीनराजेंना मुंबईत फिरू देणार नाही, सातारा मद्ये फिरू देणार नाही, हात पाय काढेल असल्या धमक्या त्या प्रस्तापितांच्या नव्हे तर माझ्याच धनगर समाजबांधवांच्या??? अरे काय तुमच्या बापाचं राज्य आहे का?? इथे दंडिलशाही नाही लोकशाही आहे याचं भान राखा.... पण मी असल्या फालतुक दादांच्या धमक्यांना जुमानत नाही आणि तुम्हाला धमक्या द्यायची माझी प्रवृत्ती नाही. तो काळ होता समाजावर अन्याय करणाऱ्या प्रस्तापित पवार पाटील देशमुख ठाकरे यांच्या विरोधात लिहायचं म्हटलं की त्यांची पॅंट ओली व्हायची, पाठीमागे आरक्षण लढ्यादरम्याण धनगर समाजाचा शत्रु असणाऱ्या सर्व प्रस्तापित पवार पाटील देशमुख ठाकरे यांच्यावर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी बेधडकपणे सडेतोडपणे लिहीत होतो तेव्हा आज कुठेतरी तरून पोरं डेरींग करून लिहायला लागली पण त्यातील काही दुसऱ्याला बाप माननारी ही शेंबडी कार्टी टांग वर करायला लागले याचेच वाईट वाटते. खरंतर मला हे लिहायचे नव्हते असल्या फालतु टीकेला प्रत्यूत्तर देत बसायचे नव्हते, भरपूर जणांनी मला फोन करून विचारले की नितीनराजे तुमच्यावर टीका होतेय पण तुम्ही बोलत का नाही?? प्रत्यूत्तर का देत नाही?? पण एका पत्रकाराने मला मोठ्या भावाच्या नात्याने सल्ला दिला होता की टीका वगैरे आणि प्रत्यूत्तर देत बसू नकोस समाजप्रबोधन चालूच ठेव. भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष्य देऊ नकोस तर त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांसाठी बिस्कीट फेकून पुढे चल पण दगड मारू नकोस, नाहीतर फुकटचा वेळ वाया जाईल पण माफ करा मला मी शांत राहून बघितले, एकदा पाहिलं दोनदा पाहिलं पण हे अति व्हायला लागलं, आपणच समाजप्रबोधन करत असताना असल्या फालतु गोष्टींमद्ये वेळ घालवणे यांत काही अर्थ नव्हता म्हणूनच गप्प राहिलो होतो, समाजप्रबोधन चालूच होते, अन्याय व अत्याचार याविरोधात आवाज उठण्यासाठी जवळजवळ साडेआकराशे व्हाटसप ग्रुप, फेसबुक अकौंटस, फेसबुक पेजेस, ब्लाॅग्ज या सोशल मिडीयाच्या माद्यमातून शक्य तेवढे प्रबोधन करतच होतो आजही करत आहे त्यात खंड पडू देणार नाही. पण जर कोणी विनाकारण माझ्या चारित्र्यावर शिंताड्या उडवत असेल तर त्याला त्याच शब्दात त्याची लायकी दाखविल्याशिवाय त्याला अक्कल येणार नाही म्हणून केलेला हा लेखप्रपंच.
कृपया माझी एक नम्रपणे विनंती आहे की इथून पुढे हे असले बदनामी करायचे, टीका करायचे, घाणेरडे प्रकार थांबवा टीका करायची असेल बदनामी करायची असेल तर वैयक्तिक वर यायचं असेल तर मी पण धनगराची औलाद आहे मला काही कमी समजू नका एकेकाची कापडे फाडून समाजासमोर त्याला ***उघडा करायची धमक माझ्यात आहे हे विसरू नका. पण हे माझ्यावर टीका करणाऱ्यांना नव्हे तर सर्वांनाच सांगतोय की असल्या फालतु गोष्टी मद्ये वेळ घालवत बसाल, नेत्यांवरती चिखलफेक करत बसाल तर काही साद्य करू शकणार नाही. तो चिखल उतरवता उतरवता विधानसभा/लोकसभा निघून जातील मग बसाल टाळ्या वाजवत. बांधवांनो तुमच्याकडे काही चांगले विचार असतील, समाजासाठी एखादे चांगले प्रकल्प असतील, काही योजना असतील तर त्यावरती चर्चा करून ते ते उपक्रम समाजासाठी राबवुया. मेंढपाळांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या, महिला सबलीकरण त्याचप्रमाणे धनगर आरक्षण हा एक आपल्या सर्वांचा आघाडीवर असलेला मुद्दा आहे. आणि आरक्षण आपल्या हक्काचे आहे, त्यासाठी श्रेय्यवाद बाजूला ठेवून सर्व संघटनेच्या पदाधीकाऱ्यांनी एकत्रित यावं, चर्चा करावी. एकीचे बळ हे खूप शक्तिशाली असते ते तुम्ही लहानपणापासूनच शिकला पण आहात आणि अनुभवलेलेही आहे. त्यासाठी एकत्रित या आणि एकत्रित येऊन समाजाचा विकास करूया.
रागाच्या भरात लिहताना जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर उदरांतकरणाने माफ करा🙏
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment