Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Friday, 17 May 2019

एक गतिमान नेतृत्व सुरेश(भाऊ) होलगुंडे ✍️नितीनराजे अनुसे

महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश (भाऊ) होलगुंडे

       भरकटलेल्या तथा विखुरलेल्या धनगर समाजाला एकत्रित आणण्यासाठी ज्या माणसाने यशवंत सेना स्थापन करून त्या क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी केली, महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाजाला जागृत केले आणि क्रांतीची धगधगती मशाल युवकांच्या हातात दिली तीच क्रांतीची मशाल हातात घेऊन आज एकविसाव्या शतकातील अनेक युवक समाजाच्या न्याय व हक्कासाठी झटताहेत झगडताहेत त्यातीलच एक उमदे आणि तरुण तडफदार नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र यशवंत सेनेचे प्रमुख मा.सुरेश(भाऊ) होलगुंडे होत.
        सुरेश(भाऊ) होलगुंडे एक हसतमुख चेहऱ्याचे व्यक्तिमत्त्व असून धनगर आरक्षण लढ्यातील एक संघर्षमय नेतृत्व सुद्धा आहे. १४ ऑगस्ट २०१४ रोजी धनगर आरक्षण संदर्भात महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले सुरेश(भाऊ) होलगुंडे हे निस्वार्थीपणे या आंदोलनात धनगर समाजाचे नेतृत्व करत केले होते. याच धनगर समाजाच्या आंदोलनात मुंबईची Life Line अर्थातच जीवन रेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे आडवण्यात मा.सुरेश भाऊ यांचा सिंहाचा वाटा होता. अधिवेशन काळात विधानभवनाला घेराव घालून प्रत्येक आमदारांना गुलाब पुष्प देत आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज उठवण्याचे गांधी मार्गाने केलेल्या आंदोलनात शिवाय त्यानंतरच्या अधिवेशन काळात विधानसभेत घुसून सरकार विरोधात आरक्षणाच्या घोषणा देऊन यळकोट यळकोट जय मल्हार चा गजर करण्यात देखील ते हिरारीने सहभागी झाले होते. धनगर आरक्षण संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मधुकर पिचड याचा निषेध करत राष्ट्रवादी भवनावर जे आंदोलन झाले होते त्यातही मधुकर पिचड च्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलनात मा.सुरेश भाऊ होलगुंडे सहभागी होते. अशा एक ना अनेक आंदोलनात मोर्चात सहभागी होऊन समाजहितासाठी निस्वार्थीपणे कार्य करणारे नेतृत्व, गावभागातून मुंबई मध्ये येणाऱ्या तरूणांना मार्गदर्शन तथा मदत करणाऱ्या सर्वच जाती-धर्मातील युवकांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा सांभाळणाऱ्या सुरेश भाऊंच्या खांद्यावर महाराष्ट्र यशवंत सेनेची जी जबाबदारी दिली ती योग्यच आहे असे मला वाटते.
       क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेबांची विचारधारा आणि त्यांच्या क्रांतीची मशाल हातात घेऊन "नवे पर्व युवा सर्व" हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र यशवंत सेनेच्या शिलेदारांनी सुरेश भाऊ यांना प्रमुखपदाची जबाबदारी देऊन जो बेलभंडारा उधळला आहे त्यासाठी महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश (भाऊ) होलगुंडे  हे स्वतःला सिद्ध करून भविष्यात समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी पूर्वीप्रमाणेच प्राणपणाने झटतील व झगडतील अशी आशा मी बाळगतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी मल्हारी मार्तंड त्याच्या बाहुत बळ देवो, बुद्धी व चातुर्य देवो ही एक मल्हार चरणी प्रार्थना...
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
 📧nitinrajeanuse123@gmail.com

No comments:

Post a Comment