Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday, 14 May 2019

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर (पुष्प पहिले) ✍️नितीनराजे अनुसे



           या जगाच्या पाठीवर अनेक रत्नांनी जन्म घेतला त्यातीलच एक अनमोल रत्न म्हणजेच राष्ट्रमाता महाराणी अहिल्याई होळकर होत. विविधतेतून नटलेला, ज्या देशात अनेक जाती-धर्माची लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत अशा अतुलनीय भारत देशातील महाराष्ट्र राज्यात, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुकास्थित चौंडी गावचे पाटील माणकोजी शिंदे व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी जगविख्यात आदर्श प्रशासक तथा राज्यकर्ती असलेल्या अहिल्याईंचा जन्म ३१ मे १७२५ रोजी झाला. चौंडी हे सीना तीरावरील छोटेसे गाव आणि अहिल्याईंचे वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील असल्याने त्यांच्याकडून व आई सुशिलाबाई यांच्याकडून अहिल्याई यांच्यावर संस्कार करण्यात काहीच कसूर झाली नव्हती.
       अहिल्याईंच्या बाल जिवनातील विसंगत अख्यायिका सांगितल्या जातात. त्या कितपत खऱ्या/खोट्या यावरती लेखक/व्याख्याते/विचारवंत यांचे एकमत होणे आवश्यक होते ते अजूनही झाले नाही हे एक इतिहासाबाबतचे दुर्देवच म्हणायला हरकत नाही. त्यापैकीच एक अख्यायिका म्हणजे एकदा चोंडी गावात थोरले बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता. सीना नदीच्या काठी असलेल्या एका देवालयात दर्शनासाठी म्हणून छोटी अहिल्या आपल्या आईबरोबर गेली होती. तेथे नदीच्या वाळूत खेळताना अहिल्येने वाळूचे एक शिवलिंग बनविले. तेवढय़ात सैन्यदलातील एकाचा घोडा उधळला. उधळलेला घोडा आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून अहिल्याबरोबरच्या मैत्रिणी भिऊन पळून गेल्या. मात्र अहिल्या मुळीच डगमगली नाही. तिने आपण तयार केलेल्या शिवलिंगावर पालथे पडून त्या शिवलिंगाचे रक्षण केले.
          तेवढय़ात पाठीमागून आलेल्या श्रीमंतांनी थोडय़ाशा जरबेच्या आवाजातच अहिल्येला म्हटले की, पोरी तुला घोडय़ाने तुडवले असते तर? त्यावर अहिल्याबाई आपले डोळे श्रीमंतावर रोखत म्हणाली की, हे शिवलिंग मी घडविले आहे व आपण जे घडविले आहे त्याचे प्राणपणाने रक्षण करावे असे थोरली माणसे सांगतात. मी तेच केले आहे. तिचे बाणेदार उत्तर ऐकूण श्रीमंत तर खूश झालेच परंतु त्यांच्याबरोबर असलेले सरदार मल्हारराव होळकर यांनी छोटय़ा अहिल्येला आपली सून करून घेण्याचे ठरविले. अख्यायिका काही असली तरी त्यातून अहिल्याईंचा धाडसीपणा, करारी बाणा लक्षात येतो आणि अहिल्याईंवरती झालेले संस्कार स्पष्टपणे नजरेस पडतात ज्याच्या जोरावर पुढील जीवनात अहिल्याई होळकर या जगातील एकमेव उत्तम प्रशासक म्हणून गणल्या गेल्या.
क्रमशः.....
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

No comments:

Post a Comment