Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday, 18 May 2019

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर (पुष्प तिसरे) ✍️नितीनराजे अनुसे

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर

💐पुष्प तिसरे 🎯युद्धनीती🏇
         तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक तसेच घोडेस्वारी यामध्ये नैपुण्य मिळवलेल्या जागतिक दर्जाच्या महाराणी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर या युद्धनीतीमध्ये पारंगत होत्या. तसे पाहता अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांनी अहिल्याईंना राजनीती सोबत युद्धनीतीचे देखील धडे शिकवले होते. मल्हारराव होळकर यांना सुद्धा अहिल्याईंच्या युद्धनीतीवर राज्यकारभारवर पूर्ण विश्वास होता इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते.
"चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा."
              त्या युद्धनीतीचा फायदा अहिल्याईंना घरातील सर्व वीर पुरूषांच्या मृत्यू पाश्चात्य झाला. पती खंडेराव होळकर यांना कुम्हेरीच्या किल्ल्यावर वीरमरण आल्यानंतर अवघ्या काही वर्षातच माळवाधिपती सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचाही मृत्यू झाला. खरंतर त्यांचा मृत्यू की हत्या? त्यामागचे गुढ अजूनही इतिहासकारांना उकलले नाही हे सुद्धा एक दुर्देवच म्हणावे लागेल. मल्हारराव पाठोपाठ अहिल्याई व खंडेरावांचे पुत्र राजे मालेराव होळकर हे सुद्धा गादीवर आल्यानंतर अवघ्या एका वर्षात देवाघरी निघून गेले. घरातील सर्व कर्त्या पुरूषांच्या एकापाठोपाठ एक जाण्यानं राज्यकारभाराची, लष्कराची जबाबदारी एकट्या अहिल्याईंवरतीच येऊन पडली होती परंतु अहिल्याई ना खचल्या ना डगमगल्या... पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, पती खंडेराव, सासरे मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात. पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले.
             एकदा राज्यातील कारभारी गंगोबातात्यांनी परस्परचच पेशवा राघोबादादा यास पत्र लिहून त्यांचे मनोबल वाढवताना सांगितले की अहिल्याई होळकर या स्त्री असून त्या राज्यकारभार कसे काय करु शकतात? त्यांच्या राजगादीला आता कोणीही वारसदार राहिला नसून होळकरांचे राज्य महाल, परगणे, दौलत आपल्या पदरात पाडून घ्यावेत. अहिल्याईंच्या राज्यातील सर्व बारीक सारीक हलचालींवरती लक्ष असायचे त्यातून गंगोबाचा हा पत्रव्यवहार चव्हाट्यावर आला. तिकडे कोणताही मागचा पुढचा विचार न करता राघोबा पेशवा इंदौर वरती आपला फौजफाटा घेऊन चालून येऊ लागला होता तोपर्यंत अहिल्याईंनी राघोबांना पत्र लिहून सरळसरळ इशारा दिला की, "मला एक अबला स्त्री समजून तुम्ही माझ्या राज्यावर चालून येत असाल तर लक्षात ठेवा माझ्याकडे तलवार बाजी मध्ये तरबेज असणाऱ्या दहा हजार महिलांची फौज तुमच्या स्वागतासाठी हजर असेल. जर यामध्ये माझी हार झाली तर मला काहीच वाटणार नाही परंतु एका स्त्री कडून तुमची जर हार झाली तर अखंड हिंदूस्थानात तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. हे राज्य काही भाट-भडवेगिरी करून मिळवलेले नाही तर आमच्या पूर्वजांनी होळकरांच्या फौजांनी प्रसंगी रक्त सांडून मिळवलेले हे राज्य आहे. त्यामुळे हे राज्य सहजासहजी मी तुम्हाला देणार नाही प्रसंगी माझा जीव गेला तर बेहत्तर. तरीही तुम्ही मला एक अबला स्त्री समजून इंदौर वर चालून येऊन हे राज्य जर तुम्ही स्वताच्या घशात घालायचा प्रयत्न कराल तर याद राखा तुम्हाला साखळदंडाने बांधून हत्तीच्या पायी देऊन स्वागत करेल नाहीतर तुमच्या हातात बांगड्या भरून तुम्हाला सुळावर लटकवेल ....तरच मी मल्हारराव होळकरांची सून म्हणवून घेईन." अशा परखड शब्दांत पेशव्यांना खडसवणाऱ्या अहिल्याई युद्धनीतीमध्ये इतक्या पारंगत होत्या की त्यांच्या या आवाहनाला राघोबा पेशवे घाबरले आणि आम्ही लढाईसाठी येत नसून तुमचे सांत्वन करण्यास येत असल्याचे सांगितले. अशा परखड व्यक्तिमत्वामुळे अहिल्याईंनी जवळजवळ २८ वर्षे राज्यकारभार केला त्यामुळे त्यांच्या राज्याकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिंमत झाली नाही.
        आजचे जातीयवादी इतिहासकार एकोणिसाव्या शतकातील झाशीच्या राणीचे गुणगान गाताना तिला आद्यक्रांतीकारी महिला म्हणून संबोधतात असे दिसून येतात पण त्यागोदर अठराव्या शतकात होऊन गेलेल्या दूरदृष्टी ठेवून पारदर्शक राज्यकारभार तथा प्रशासन चालवणाऱ्या महापराक्रमी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा विसर त्यांना पडतो हे भारताच्या इतिहासकारांचे आणि भारताचे दुर्दैव म्हणावे लागेल.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

No comments:

Post a Comment