Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Sunday, 13 September 2015

समजेना हक्क मागतोय की भिक...??


आज आम्हाला खरंतर लाज वाटायला पाहिजे अरे जग जिंकायला निघालेल्या सिकंदराला भारत जिंकण्यापासून परावृत्त करणार्या आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या जातीत जन्माला आलेल्या तुम्ही-आम्ही औलादी, आशिया खंडावर अधीपत्य गाजवणार्या राजा सम्राट अशोकांचे तुम्ही-आम्ही वारसदार, अटकेपार झेंडे फडकवणारे धुरंदर लढवय्यै राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी अहिल्यामाई होळकर, महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर, वीरांगणा भिमाई होळकर अशा थोर पुरुषांचे मर्द मावळे आणि ज्यांनी आई-बहिणींच्या रक्षणासाठी अन्यायाविरोधात कुर्हाड उगारून तब्बल ३५ खून करून १४ वर्ष तुरूंगवास भोगला तरी आजही निर्दोष असलेल्या त्या बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरु वाटेगावकर म्हणजेच आमचे लाडके आप्पा आणि धनगर समाजाला जागं करुन आमच्या हातात क्रांतीची मशाल देणारे यशवंत सेनेचे संस्थापक स्व. बी के कोकरे साहेब यांच्याच जातीत जन्माला आलेल्या तुम्ही-आम्ही औलादी आज अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आज प्रस्तापितांकडे भिक मागत बसलोय याची आम्हाला खरंतर लाज वाटायला पाहिजे.
आमचे पुर्वज, थोर महापुरुष जर वरतून आमच्या नेत्यांच्या आणि समाजबांधवांच्या असल्या या पोरकट लीला बघत असतील तर कदाचीत वरतून थुंकत असतील ते आमच्यावर... त्यांनाही खेद वाटला असेल अरे कोणत्या समाजात आपण जन्माला आलो  म्हणून डोकं फोडून घेत असतील. अरे ज्यांना आपल्या न्याय व हक्कासाठी संघटित होऊन एकत्रितपणे लढता येत नाही झगडता येत नाही त्यांना अशा थोर महापुरुषांचे वारसदार म्हणायचं तरी कसं? " मल्हार आया मल्हार आया म्हटलं तर अफगाणीस्तानच्या अब्दालीला देखिल कापरं भरायचं. दुश्मनांचे डेरेच्या डेरे ओस पडायचे, तोंड कुठ लपवायचं हे शत्रुंना समजत नव्हतं अशा मल्हाररावांचे मावळे आम्ही... त्याचप्रमाणे "हे राज्य माझ्या पुर्वजांनी तलवारींशी खेळून प्रसंगी रक्त सांडून मिळवलेलं राज्य आहे. आणि मला एक अबला स्त्री समजून हे राज्य जर तुम्ही स्वताच्या घशात घालायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला साखळदंडाने बांधून हत्तीच्या पायी देईन नाहीतर सुळावर लटकवेल ....तरच मी मल्हारराव होळकरांची सून." अशा निर्भीड शब्दांत पेशव्याला खडसवणार्या अहिल्यामाईंचे मर्द मावळे म्हणवून घ्यायला आज आम्हाला लाज वाटायला पाहिजे.
अरे आज एवढं षंढ झालात तरी कसे?? कुठे गेला तो आमचा मल्हारी बाणा?? नुसत्याच महापुरूषांच्या जयंत्या आणि पुणतिथ्या साजर्या करत बसायचं का?? नुसतंच महापुरुषांच्या फोटोंची जंगी मिरवणूक काढून लाखो रुपये उधळपट्टी करुन धांगडधिंगा घालायचे धंदे आतातरी बंद करा. महापुरुषांचे विचार त्यांचा इतिहास आणि त्यांचे कार्य डोक्यात घालायला शिका. महापुरुषांचे अनुकरण करायला शिका. Ahilyadevi Holkar was the great administrator of the 18th century असं आम्हाला ब्रिटीश पार्लमेंटने सांगितलं, पण याच मातीत अहिल्यामाईंच्या मावळ्यांची दखल इथलं जातीवादी प्रशासन घेत नाही.  त्याच उत्तम राज्यकर्ती आणि उत्तम प्रशासक असलेल्या अहिल्यामाईंचे वारसदार आजच्या प्रशासनात आणि जिथे कायदे बनवले जातात तिथं नाहीयेत ही एक सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. आज धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून तहसीलदारला निवेदन द्यायला गेलं तर तो तहसीलदार त्या निवेदनाला केराची टोपली दाखवतो. मग कायद्यानुसार राज्यघटनेत दिल्याप्रमाणे धनगर समाजाला न्याय व हक्क मिळत नसतील तर मग आम्हाला लढायला पाहिजे झगडायला पाहिजे. जर प्रशासन आणि माजलेलं सरकार कायद्याप्रमाणे आणि राज्यघटनेप्रमाणे राज्यकारभार करत नसेल तर मग आम्ही का म्हणून कायदे पाळायचे?? आमच्या हक्काचं आम्हाला दिलं जात नसेल तर मग आम्ही का गप्प बसायचं.?? गप्प बसण्याइतपत आता आम्हाला *** औलाद समजू नका. कायदे हातात घ्यायला आता आम्हाला वेळ लागणार नाही. आता जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुमचे कायदे आमच्या आडवे आणू नका आणि आणायचे असतील तर तुम्ही अगोदर कायद्याप्रमाणे वागा. तरच आमच्या वाटेला जा नाहीतर मग तुमच्या वाटेवर येवून तुमची वाट लावल्याशिवाय या धनगराच्या औलादी कदापी शांत बसणार नाहीत. आम्हाला आमचे हक्क मागून मिळत नसतील तर आम्ही हिसकावून घेऊ.
७ डिसेंबर २०१५ पासून नागपूर विधानभवनात हिवाळी अधिवेशन पार पडणार असून धनगर समाजातील स्वार्थी नेत्यांनी वेगवेगळे मोर्चे आयोजित करून धनगर समाजाचं विभाजन करायचं ठरवलंय. कोणी ८ डिसेंबरला मोर्चा काढायचं म्हणताहेत तर कोणी १० डिसेंबरला तर कोणी अजून तळ्यात-मळ्यातच करत बसलेत. म्हणजे "धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा" ही म्हण सार्थ कराण्यासाठी धनगर समाजातील काही स्वार्थी नेत्यांनी जणू काय सुपारीच घेतलेली दिसते आहे. धनगर समाजातील सर्व नेत्यांना/संत्र्यांना/मंत्र्यांना आजी/माजी आमदार असतील नाहीतर कोणी जहागिरदार असतील त्यांना सांगायचं आहे की बाबांनो तुम्ही वेगवेगळं मोर्चे आयोजित करून स्वताच्या स्वार्थासाठी धनगर समाजाचं विभाजन करत बसाल तर संपूर्ण धनगर समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे. आजकाल व्हाटसपवर वेगवेगळ्या पोस्ट फिरताहेत त्यात प्रत्येकजण म्हणतोय नागपूर विधानभवनावर निस्वार्थीपणाणे आमुक-आमक्याच्या अन् तमुक-तमक्याच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजबांधवांचा भव्य मोर्चा. पण कोण कशासाठी मोर्चा काढतंय ?? हे आम्हाला चांगलंच माहित आहे आम्हाला शिकवायचा कोणीही प्रयत्न करू नका. जर तुम्ही निस्वार्थीपणे मोर्चा काढत असाल प्रत्येक संघटनेच्या पदाधिकार्यांशी तुम्ही कधी चर्चा केलीत का?? ज्या आजी/माजी आमदारांनी मोर्चा काढायचं ठरवलंय त्यांनी राज्यभरातील कीती जिल्ह्यातील धनगर समाजाच्या नेत्यांसोबत बैठका आयोजित करुन चर्चा केली?? उद्या डिसेंबर मध्ये नागपूर विधानभवनावर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मोर्चा काढायचा असेल तर नेत्यांनीही आणि संघटनेच्या पदाधिकार्यांनीही एकत्रित येऊन चर्चा विनीमय करावा आणि एकच कोणतातरी दिवस निश्चित करावा अन्यथा समाजाच्या नावावर स्वताची राजकिय पोळी भाजून मलिदा खायचा धंदा बंद करावा. धनगर समाजातील आजी/माजी आमदार असतील अथवा कोणत्यातरी एखाद्या सघटनेचे नेते पदाधिकारी असतील त्यांना मी नितीनराजे अनुसे ओपन चैलैंज करतो की नागपूर विधानभवनावरील "विराट जन आंदोलन" उभे करून यशस्वी करायचे असेल सर्वांशी चर्चा करा सर्व संघटनेच्या पदाधिकार्यांना चर्चेत घेऊन कोणत्यातरी एखाद्या संघटनेचे नाव अन् झेंडा न घेता एकच दिवस निश्चित करुन सर्वांना सोबत घेऊन चला तरच पाच लाखांच्या (५०००००) ऐवजी  पंचवीस लाखांच्या (२५००००० ) वरती धनगर समाजबांधव एकत्रित आणायची जबाबदारी माझी. अन्यथा २३ मार्चच्या मोर्चासारखी अवस्था करायचं ठरवलं तर तुमच्या नातेवाईकांव्यतिरीक्त तुम्हाला हाजरीनं लोकं जमवावी लागतील अणि सच्चे स्वाभिमानी समाजबांधव घरातून बाहेर सुद्धा पडणार नाहीत याची दखल घ्यावी. मग समाजात एकी करायची का बेकी करायची हे धनगर समाजातील नेत्यांनी ठरवायचं आहे. धनगर समाजातील नेत्यांच्या मागं मागं पळाणारा आता भोळा समाज नाही राहिला तर समाजप्रबोधनातून सक्षम आणि समर्थ समाज घडवतोय तो धनगर समाजातील नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.
कळावे.
जागो उठो संघर्ष करो।👊
अपने हक हासिल करो।✊
जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Wednesday, 9 September 2015

👉धनगर समाजाच्या आरक्षणाचे राजकारण


"धनगर" जमात ही आदिम काळापासूनची जमात असून आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकिय या क्षेत्रात अतिशय मागासलेली जमात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत १९५० साली धनगर समाजाचा सामावेश अनुसुचित जमातीच्या कलम ३४२ वरती महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अ.क्र.३६ वरती केलेला आहे. पण "धनगर" या शब्दाचा हिंदी शब्द प्रयोग "धनगड" असा झाल्याने प्रस्थापित व्यवस्थेने या समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळू दिल्या नाहीत. यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष स्व. बी के कोकरे साहेबांनी सातारा-पुणे हायवेवरती असलेल्या खंबाटकीच्या घाटात लाखो यशवंत सैनिकांना सोबत घेऊन तीव्र रास्तारोखो आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दखल घ्यावी लागली पण धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात अशी मागणी असताना शरद पवारांनी माजी मंत्री स्व शिवाजी बापूंना हाताशी धरून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाला वाटाण्याच्या अक्षता दावल्या. दुधाची तहान ताकावरती भागवण्याचं राजकारण पवारांनी केलं आणि धनगर समाजाला स्वतंत्र सुचि बनवून  फक्त महाराष्ट्रापुरतं भटक्या जमाती (क) (एन.टी. क च्या) यादीत टाकलं. पण राज्यघटनेत दिल्याप्रमाणे आमच्या हक्काच्या  केंद्र शासनाच्या अनुसुचित जमातीच्या सवलती धनगर समाजाला मिळू दिल्या नाहीत. त्यामुळे धनगर समाजातील हजारो मुलं-मुली आय ए एस / आय पी एस होण्यापासून वंचित राहिली इंजीनीयर, डॉक्टर, वकिल बणन्याऐवजी लाखो पोरं शेतीकडे वळली आणि शेळ्या-मेंढ्या राखू लागली . धनगर समाजासाठी येणारा दरवर्षीचा कोट्यवधी रुपयांचा निधी घशात घालायचं काम त्या प्रस्तापितांनी केलं असताना धनगर समाजितले लाचार नेते आणि  माझा अज्ञानी असलेला धनगर समाज बांधव आजही त्यांच्या पाठीमागेच जातोय याचंच दुख वाटतंय.
आजही पवारांनी समाजातील दलालांना जवळ करून आरक्षणाचं गाजर दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे पण आदिवाशी समाजाच्या नेत्यांना विरोध करण्यास सांगून आदिवासी बांधव आणि धनगर समाजात भांडण लावायचा प्रकार शरद पवार करताहेत आजचा तरी धनगर समाजातील युवा वर्ग जागृत, सुशिक्षित आणि सुज्ञ असल्यामुळे शरद पवारांच्या बळीचा बकरा कोणी बनणार नाही हे मात्र निश्चित. धनगर समाजाला अनीसुचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी धनगर समाजातील बुद्धिजीवी वर्ग कायदेशीर लढा देण्यास सक्षम असतानाच रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी धनगर समाजातील युवा वर्ग पेटून उठला आहे. धनगर समाजातील सर्व संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी एकत्रित येवून विचार विनीमय करून नागपूर विधानभवनेवरील जन आंदोलनाचा कोणतातरी एक दिवस निश्चित करावा. धनगर समाजातील नेत्यांनी वेगवेगळे मोर्चे आयोजित करून धनगर समाजाची दिशाभूल करणे, धनगर समाजाचं विभाजन करणे अथवा धनगर आरक्षणाचे श्रेय लाटण्याचे असले धंदे बंद करावेत. मला कोणत्या नेत्याच्या विरोधात बोलून स्वतावरती रोष ओढवून घ्यायचा नाही. पण आज धनगर समाज एकत्रित येत असताना जर त्यामध्ये विभाजन करून स्वताची पोळी भाजायचे तुमचे राजकारण असेल तर माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा अजिबात वापर करू नका. तुम्ही मिडीया विकत घ्याल पण आमच्याकडे सोशल मिडीया आहे त्यामाध्यमातून आम्ही जनजागृती करून समाजाला योग्य न्याय द्यायचा प्रयत्न करू. आजपर्यंत धनगर समाजातील नेत्यांनी समाजाचं पार वाटोळं केलं आहे पण इथूनपुढंही माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचं जर वाटोळं करायचं तुम्ही ठरवलं असेल तर मग आम्हाला तलवरी हातात घ्याव्या लागतील ही धमकी समजा नाहीतर चेतावणी.
धनगर समाजातील काही नेत्यांनी प्रस्तापितांसोबत विधानभवनावर मोर्चा काढायचं ठरवलंय पण त्यागोदर काही दिवसापुर्वी धनगर समाजातील काही संघटनांनी जन आंदोलनाचा दिवस निश्चित केला असताना धनगर समाजातील नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने वागू नये. त्या त्या नेत्यांनी सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांशी चर्चा करावी. आजपर्यंत तुम्ही समाजासाठी काही चांगलं काम केलं असेल आणि समाजाचं वाटोळंही केलं असेल पण आता तुमची संधी संपली. चालायचं असेल तर समाजासोबत चला नाहीतर घरात बसून गप्प राहा पण माझ्या धनगर समाजात विभाजन करू नका. नाहीतर आम्ही पण शुरवीर लढवय्ये राजे यशवंतराव होळकरांचे वारसदार आहोत मग आम्हाला आमच्या औकातीवर यायला फार वेळ लागणार नाही. आजचा युवा वर्ग पेटला तर एकेकाला पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आरक्षण मिळाल्यानंतर अनुसुचित जमातीच्या सवलतीमधून आमदार/खासदार बनण्यासाठी राजकारण करा पण आज आरक्षणाचं राजकारण करू नका. एकत्रित येवून लढा द्या.
जागो उठो संघर्ष करो।👊
अपने हक हासिल करो।✊
जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
👉nitinrajeanuse.blogspot.com
👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Wednesday, 26 August 2015

खरंच धनगर असाल तर आताच पेटून उठा...


समाजातील माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजबांधवांच्या भावना व सद्य परिस्थिति लक्ष्यात  घेवून तसेच अनुभवातूनही माळरानावर आणि डोंगरदरीमध्ये वर्षानुवर्षे भटकंती करणार्या समाजबांधवांच्या भाषेत समाजातील सुशिक्षित शिकल्या सवरलेल्या सुज्ञ वर्गाला उद्देशुन रचलेलं हे काव्य आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक युवकांपर्यंत हे काव्य पोहचावं आणि त्यातून समाजप्रबोधन व्हावं हीच अपेक्षा. कदाचित माझे काही चुकत असेल तर समाजातील एक छोटासा समाजसेवक म्हणून मला माफ करावे ही विनंती.
  - नितीनराजे अनुसे
 
जिथं तिथं समाजाच्या नावावर घेऊनशान कोठा
खूप खूप शिकूनशान लय झाला रं तुम्ही मोठा
गडगंज पगार घेऊनशान जगताय तुम्ही आरामात
पण माझा भोळा समाज अजून माखतोय रं घामात

काय पाप केलं होतं रं या भोळ्या लोकांनी??
तुमचं कौतुक केलं रं समाजातल्या सगळ्यांनी
तुम्ही सगळीजण शिकूनशान गेला निघून तिकडं
आरं माघारी तर वळून बघा या माझ्या समाजाकडं

समाजातल्या नेत्यांनी फक्त वापरच करून घेतलाय
नुसतं "मत" नव्हं तर आमचा त्यांनी जीवच घेतलाय
निवडणूक जवळ येताच झोपडीत येवून हात जोडत्यातं
अन् निवडणूक झाली का पुन्हा पाच वर्सानंच दिसत्यातं

तुम्ही शिकलाय सवरलाय आता तुम्ही तर नीट वागा
कुणावर विस्वास ठेवायचा ते आता तुम्हीच सांगा
माझ्या समाजासाठी न्याय हक्क आतातरी मागा
नायतर आपल्या समाजाची अब्रू येशीवरच टांगा

बरं वाटतंय ना तुम्हाला असलं सगळं वाचायला??
समाजाचा पार तमाशा करून थायथाय नाचायला
अन्यायाविरोधात आवळा आता तलवारीच्या मुठा
लेकांनो खरंच धनगर असाल तर आताच पेटून उठा
           खरंच धनगर असाल तर आताच पेटून उठा

जय मल्हार!! जय अहिल्या!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Friday, 7 August 2015

"बेफामपणा" नसेल...तर जगण्यात कार अर्थ?

"बेफामपणा नसेल...तर जगण्यात काय अर्थ?
ज्या धनगर जमातीत आम्ही जन्माला आलो. शेळ्या-मेंढ्या राखत, खेळत-बागडत लहानाचे मोठे झालो शिकलो सवरलो म्हणून लिहायला लागलो अन् बोलायलाही. थोर महापुरूषांच्या आणि राजा महाराज्यांच्या जातीत जन्माला यायला नशिब नव्हे तर सळसळत्या रक्तासोबत वाघाचं काळीज असावं लागतं. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. ज्या धनगर समाजात मी जन्माला आलो त्या धनगर समाजाचं मी काहीतरी देणं लागतो. समाजासाठी मला काहीतरी करायला पाहिजे असा विचार प्रत्येक धनगर बांधवांनी करायला हवा. काहीजण सहज म्हणून जातात की समाजानं मला काय दिले??  माझे एक सांगणे आहे त्या समाजबांधवांना की समाजानं तुम्हाला काय दिलं त्यापेक्षा तुम्ही समाजाला काय दिले?? याचा विचार करा. मगच समाजाकडून अपेक्षा ठेवा. आपण सर्वजण प्रत्येकजन समाजातील एक घटक आहोत मग आपल्या जातीसाठी आपण माती खाऊ शकत नसेल तर मग दुसरा कोणी थोडीच आपल्या समाजासाठी धाऊन येणार आहे.
धनगर जमातीतील राजा महाराजांच्या इतिहासाचा वारसा असणारे आम्ही आज कोणतं जगणं जगतोय तेच आम्हाला कळत नाही. इंग्रजांनी फक्त १५० वर्ष भारतावर राज्य केले तर इंग्रजांनी भारतीयांना गुलाम बनवलं असे म्हणतात. आरे मग धनगर समाजातील राजा महाराजांनी ३५०  वर्षहून अधिकतम राज्यकारभार या देशावर केला होता मग आमची जागा काय असायला पाहिजे? आणि आमची सध्याची अवस्था काय आहे?? याचा अंदाज प्रत्येकाला घेता आला पाहिजे. ज्या इंग्रजांनी भारतावर राज्य केलं त्या इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारणारे महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर हे आद्य स्वातंत्र्यसेनानी म्हणून ओळखले जातात. स्वतः इंग्रजांशी लढा देत असताना देशातील इतर संस्थानांच्या राजा-महाराजांना इंग्रजांच्या विरोधात लढण्यास प्रवृत्त करत होते पण इतर संस्थानातील राजांनी मातृभूमिशी गद्दारी केली आणि इंग्रजांशी मुकाबला न करता त्या त्या राजांनी आपापले संस्थान ब्रिटिश पार्लमेंटकडे स्वाधीन केले. तरीही राजे यशवंतराव होळकर न खचता इंग्रजांच्या विरोधात लढत होते. शस्त्र सज्ज आणि शिस्तबद्ध फौजफाटा असणार्या इंग्रजांच्या विरोधात कधीही न हारता एकूण १८ लढाया जिंकणारे आणि इंग्रजांना रणांगणात कापून काढत ताणून ताणून मारणारे खरे भूमिपुत्र आणि आद्यस्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांची ओळख असताना त्यांचा हा खरा इतिहास राष्ट्रापासून आणि पर्यायानं धनगर समाजापासून दूर ठेवला. खरंतर धनगर समाजाचा इतिहास चुकीचाच लिहला गेला होता. कारण इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते. या पाठीमागे काहीतरी कपट होते आणि त्यामुळेच धनगर समाजात जागृति होऊ शकली नाही. आज थोर विचारवंत/इतिहासकार मा. संजय सोनवणी सर यांच्यामुळे धनगर समाजाचा खरा इतिहास समाजासमोर आला.
राजे यशवंतराव होळकर इंदौरहून पुण्याकडे येत असताना थाळनेर येथे तापी नदीच्या तीरावर मुक्काम पडला होता. पाराजीपंतांनी पुण्याहून एका चित्रकाराला पाठवून यशवंतरावांचे चित्र काढायला सांगितले होते. तेव्हा त्या चित्रकाराने शिकारीसाठी एक डोळा मिटून यशवंतराव बंदुकीचा नेम धरत असल्याचे चित्र रंगवले होते. तेव्हा महाराज तुळसाला म्हणतात की चित्रकार खूप चतुर आहे. कारण माळव्यातील खरोखरच्या  शिकारीत यशवंतराव होळकरांच्या एका डोळ्याला इजा झाली होती आणि तो दोष त्या चित्रामध्ये चित्रकाराने कुशलतेने टाळला होता.  त्यावेळी तुळसा राजेंना म्हणाली लहानपणी इकडची स्वारी खूप बेफामपणे वागत असे आणि या चित्रावरुन तोच गुण कायमचा दिसतो आहे. तेव्हा महाराज जे वाक्य बोलले ते आजच्या धनगर समाजबांधवांना प्रेरित आणि प्रोत्साहित करणारं वाक्य होतं. चौरंगावरून उठत महाराज म्हणाले "हा बेफामपणा कधीच जाणार नाही, कारण बेफामपणा आहे तोपर्यंतच आमच्या जगण्याला काही अर्थ आहे. तो बेफामपणा जेव्हा संपेल त्या क्षणी जगणंच नकोसं वाटेल".
आज धनगर समाजातील पोरं शिकली सवरली तेव्हा बेफामपणे लिहायला लागली अन् बोलायला लागली समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढू लागली. मग धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या सवलतीसाठीचा संघर्ष असो, समाजातील आई-बहिणींवरती होणारा अत्याचार, मेंढपाळ बांधवांवरती होणारा अन्याय असो अथवा विद्यार्थ्यांना बंद झालेल्या शिष्यवृत्तीचा मुद्दा असो त्या त्या ठिकाणी धनगर समाजातील यूवक बेफामपणे न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरू लागले. या संघर्षात जीव द्यावा आणि घ्यावा लागला तरी धनगर समाजातील यूवा वर्ग शांत बसू शकत नाही आणि माघारही घेऊ शकत नाही कारण माघार घेणं आमच्या रक्तातच नाही हा एक बार मोठा इतिहास आहे आणि त्याचं कारण म्हणजे राजा-महाराजांपासून थोर महापुरुषांपासून वारसानं आलेला हा "बेफामपणा" आमच्या रक्तात आणि नसानसात आहे म्हणूनच आज आमच्या जगण्याला अर्थ आहे. तो बेफामपणाच जर आमच्यात नसेल तर मग आमच्या जगण्यात तरी काय अर्थ???

जय मल्हार!! जय अहिल्या!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Thursday, 6 August 2015

धनगर समाजातील न्यूनगंड कसा दूर होईल?


ज्या धनगर समाजानं ५००० वर्षापुर्वी अक्षरांचा शोध लावला तीच अक्षरं आज धनगर समाजापर्यंत पोहचली नाहीत हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. ती अक्षरं आमच्यापर्यंत का पोहचली नाहीत? याचा उलगडा आम्ही कधी केलाच नाही. तितका विचार करण्याइतपत आम्ही सक्षम आहोत तरी कुठे? इंडोनेशिया मध्ये धनगर समाजातील एका मेंढपाळाने लोहचुंबकाचा शोध लावला त्या  चुंबकीय शक्तीच्या आधारे आजच्या तंत्रज्ञानाने जगात एवढी प्रगति केली की प्रत्येक क्षेत्रात लोहचुंबाकाचा सर्रास वापर केला गेला आणि वैज्ञानिक क्षेत्रात एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवला.
खरंतर धनगर समाजाने अक्षरांचा शोध लावला, लोहचुंबकाचा शोध लावला, जग जिंकायला निघालेल्या सिकंदराला भारत जिंकण्यापासून परावृत्त करणारा आद्य मौर्य सम्राट राजा चंद्रगुप्त मौर्य यांनी समृद्ध आणि शक्तिशाली भारताचे स्वप्न पाहिले, तद्नंतर राजा बिंदुसारा यांचा पुत्र म्हणजेच राजा चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू राजा सम्राट अशोक यांनी भारताच्या दक्षिणेकडील काही भाग वगळता आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर अफगानिस्तान सह इशान्येकडील नेपाळ, भूटानपर्यंतचा प्रदेश एका छत्रीखाली एकत्रित आणला होता. पाकिस्तानातील अटकेपार झेंडे फडकवणारे राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी कर्मयोगिणी महाराणी अहिल्यामाई होळकर, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे व शिवाजी महाराजानंतर राज्याभिषेक करून घेणारे महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर अर्थातच भारतीय नेपोलियन बोनापार्ट. वीरांगणा भिमाई होळकर, धनगर समाजाला हाक देऊन जागे करणारे लढवय्ये स्व बी के कोकरे साहेब व अन्यायाविरोधात आसूड उगारणारे आणि आजच्या तरूणांना लाजवणारे व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांचे लाडके आप्पा अर्थातच बोरगावचा ढाण्यावाघ बापू बिरू वाटेगावकर.
धनगर समाजाचा असा सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला इतिहास जर आम्ही अभ्यासला तर आजच्या धनगर समाजाबांधवांच्या मनातील न्यूनगंड दूर झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तितकेच सत्य आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "जो समाज आपला इतिहास विसरतो त्या समाजाचा कधीही विकास होत नाही". धनगर समाजाच्या बाबतीत अगदी असंच घडलंय. पण आमचा खरा इतिहास आमच्यासमोर का आला नाही?? याचा आम्ही कधी विचारच करत नाही. धनगर समाजातील अशा थोर महापुरुषांचा इतिहास अभ्यासू नये आणि याचा विचार धनगर बांधवांनी कधी करूच नये म्हणून समाजाला लाचार आणि गुलाम बनवनारी सनातनी आणि प्रस्थापित व्यवस्था या भारतात असल्यामुळेच धनगर समाजाचा विकास खुंटला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या भाषणात समाजाला केलेला उपदेश असा की, "देवाधिकाच्या भोदूबाबांच्या आणि भट-ब्राह्मणांच्या नादाला लागून तुमचा कधीच उद्धार होणार नाही. जर समाजाचा उद्धार करायचा असेल तर भारतीय संविधानानुसार जे कायदे बनवलेत त्या कायद्यांच्या आधारे राजसत्ता आणि राजपाठ हा मार्ग निवडला तरच समाजाचा उद्धार होऊ शकतो". आज धनगर समाज अज्ञानी असल्यामुळे अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला आहे आणि विकासापासून शेकडो मैल दूर असलेल्या या धनगर समाजाला विकासाच्या प्रगतिपतावर यायचं/आणायचं असेल तर धनगर समाजबांधवांच्या डोळ्यावरील अज्ञानाचं घोंगडं झटकून अंधश्रद्धेपासून त्यांची सुटका केली पाहिजे.
कोणीतरी माझ्या मदतीला येउन माझा उद्धार करेन हा न्यूनगंड जर मनातून काढून टाकला तर धनगर समाज यशाच्या वाटेवरती असेल. धनगर समाजाच्या मदतीला कोणीही धावून येणार नाही, धनगर समाजाचं नेतृत्व जर निस्वार्थी, सक्षम आणि सामर्थ्यशाली असेल तर धनगर समाजाची वाताहात होणार नाही. आजपर्यंत धनगर समाजाच्या मताधिक्याचा वापर परकियांनीच करून घेतला आणि आजही घेत आहेत पण धनगर समाजाच्या वाट्याला मात्र पाचवीला पुजलेलीच भटकंती आली आहे. राजकारण आपलं काम नव्हे असे म्हणून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष्य केल्याने प्रस्थापित जाती व्यवस्था धनगर समाजाच्या मताचा वापर करून स्वताची घरं भरू लागली. धनगर समाजाच्या मतावर प्रस्तापित आणि सनातनी लोक सरपंच, पं स. सभापति, जि.प. अध्यक्ष, आमदार, खासदार तसेच मंत्री झाले पण धनगर समाजाला या क्षेत्रात त्यांनी कधीच पुढे येवू द्यायचं नाही आणि या समाजावर सतत अन्याय करायचा असा त्यांनी डाव आखला.
दूरदृष्टी असलेले यशवंतराव चव्हाण त्यावेळी शरद पवारांना कानमंत्र देतात की धनगर समाजाला एकाऐवजी दोन घोंगडीने झोपवा कारण धनगर समाज जर जागा झाला तर या महाराष्ट्र राज्यात प्रस्तापितांना राजकारण करता येणार नाही. आज प्रस्तापितांचा एखादा उमेद्वार विधानसभा लढवत असेल तर आमचा भोळा-भाबडा धनगर समाज त्यांना मतदान करताना कधीही जातिभेद करत नाही पण धनगर समाजाचा एखादा उमेद्वार एखादी निवडणूक लढवत असेल तर प्रस्तापित आणि सनातनी व्यवस्थेतील लोक धनगर समाजाच्या उमेद्वाराला मतदान करत नाहीत हे वास्तव आणि सत्य आहे. कारण धनगर समाज्याच्या उमेद्वाराला मतदान करायला त्यांना लाज वाटतेय अशातला विषय नसून धनगर समाजाला विधानभवनात आणि संसदभवनेत पाठवायचं नाही हा त्यापाठीमागचा खरा उद्देश्य आहे. जिथं कायदे बनवले जातात तिथंच जर धनगर समाजाची माणसं नसतील तर मग काय खाक धनगर समाजाचा विकास होईल?? मग यावरून आतातरी धनगर समाजाला कळायला हवं की जातिभेद नक्की कोण करतंय? धनगर समाजाचा खरा शत्रु नक्की कोण आहे?
आज धनगर समाजाची अवस्था अशी आहे की आपापल्यातच एकमेकांचे पाय ओढायची सवय लागून गेली आहे. बरणीतल्या खेकड्यांसारखी प्रवृत्ति  जोपासल्याने धनगर समाजाची माणसं विधानभवनात आणि संसदभवनेत पोहचू शकत नाही आणि अशा प्रवृत्तीमुळे याचा फायदा प्रस्थापित आणि सनातनी व्यवस्थेला होतो, मग आम्ही आमच्यातल्या आमच्यात भांडायला सुरवात करतो. एकमेकांची जिरवाजिरवी अन् एकमेकांची डोकी फोडायला काठ्या कुल्हाडी हातात घेतो. महाराष्ट्र राज्यात परिणामी भारतात धनगर समाजाची लोकसंख्या अव्वल क्रमांकावरती असल्यामुळे प्रस्तापित पक्षांची मक्तेदारी संपवून धनगर समाजाच्या संघटना व पक्षाच्या उमेद्वारांना ग्रामपंचायतीपासून, सोसायट्या, कारखाने, मार्केट कमिटी, सुतगिरणी, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद, विधानसभा अथवा लोकसभा असो प्रत्येक ठिकाणी धनगर समाजाचा जर एखादा उमेद्वार निवडणूक लढवत असेल तर त्याच्या विरोधात निवडणूक लढवण्याऐवजी सर्वांनी त्या उमेद्वारास मतदान करून निवडून आणायला पाहिजे तरच धनगर समाजाला विविध पदे मिळतील. दक्षिण सोलापूर मध्ये मा. सिद्धेश्वर आवारे साहेब यांच्या "जय मल्हार युवा मंच महाराष्ट्र राज्य" या संघटनेनं हा उपक्रम राबविला आहे आणि असाच उपक्रम जर महाराष्ट्र राज्यभर राबविला तर २०१९ चा मुख्यमंत्री धनगर समाजाचा असेल हे मी अवर्जून आणि अभिमानानं सांगेन.
धनगर समाज जर एक झाला तर नेते आपोआप एकत्र येतील कारण कोणताही नेता हा समाजापेक्षा मोठा नसतो. त्यामुळे धनगर समाज कधीच एकत्रित येणार नाही अशी वायफळ आणि फालतू बडबड करण्याऐवजी प्रत्येकांनी सकारात्मक विचार करून, आजपर्यं चालत आलेला पारंपरिक विचार आणि मनातील न्यूनगंड दूर करुन स्वतःपासून १% जरी समाजजागृतीचे कार्य केले तर धनगर समाज १००% प्रगतिपथावर असेल. राज्यात धनगर समाजाच्या भरपूर संघटना आणि पक्ष सुद्धा आहेत पण राज्य पातळीवरती आणि राष्ट्रीय पातळीवरती त्या सर्व संघटना व पक्ष समाजहितासाठी/समाजरक्षणासाठी एकत्रित आले तरच राजा सम्राट अशोकांचं स्वप्न साकार होईल नाहीतर मग धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा असंच म्हणत बसायची वेळ येईल.

जय मल्हार!! जय अहिल्या!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Tuesday, 4 August 2015

चेष्टा लावलीय का धनगर जमातीची?


मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस काय चेष्टा लावलीय का तुम्ही धनगर समाजाची?? आपण कायदेपंडित आहात, आपणास कायद्याचं उत्तम ज्ञान आहे त्यामुळे आपणास असं करणं शोभत नाही. या राज्यातील जनतेला परिणामी ज्या धनगर समाजानं तुम्हाला सत्तेत आणून बसवलं त्या धनगर समाजाला आपल्याकडून खूप अपेक्षा असताना तुम्ही वेडेपणाचे भोळेपणाचे सोंग घेऊन आम्हाला फसवायचे धोरण आखताय ते कशासाठी?? आणि कोणाच्या सांगण्यावरुन?? शरद पवारांचे जातियत्व  स्विकारुन तुम्ही धनगर समाजावरती अन्याय करत आहात याचं भान राहुद्या. एखाद्या जमातीवरती गेल्या ६५ वर्षापासून विनाकारण अन्याय होत असेल आणि त्या जमातीला जर त्यांच्या हक्कापासून दूर ठेवलं जात असेल तर तुमच्यावरती देशद्रोहाचा खटला भरायला पाहिजे का??
धनगर समाजाची स्पष्ट मागणी अशी आहे की, भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या कलम क्र ३४२ वरती महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अ.क्र. ३६ वरती ओरॉन, धनगड (धनगर) असा स्पष्ट उल्लेख आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात प्रकाशित होणार्या २००७-०८ व २००९-१० या वार्षिक अहवालात ३६ क्रमांकावर ओरॉन, धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे. त्याशिवाय राज्यघटनेत धनगड असे टायप आहे त्यासाठी हिंदी शब्दकोश चाळा हिंदीमधील "ड" चा उच्चार मराठीत "र" असाच होतो आहे. म्हणून धनगड आणि धनगर या वेगळ्या जमाती नसून एकच "धनगर" नावाची जमात आहे. राज्यघटना अमलात आल्यापासून म्हणजे १९५० पासून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून दूर ठेवले आहे त्या सवलती धनगर समाजाला त्वरित लागू कराव्यात त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून केंद्र सरकारला फक्त अशी शिफारस पाठवायची आहे की "राज्यघटनेतील कलम ३४२ वरील अनुसुचित जमातीच्या महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टातील अ.क्र.३६ वरील ओरॉन, धनगड मधील "धनगड" ही जमात महाराष्ट्र राज्यात कोठेही वास्तव्यास नसून ती  "धनगर" हीच जमात आहे आणि गेल्या ६५ वर्षापासून या धनगर जमातीला "र" ऐवजी "ड" झाल्यामुळे सवलती देण्यात आल्या नाहीत त्या सवलती त्वरित लागू कराव्यात".
धनगर जमातीची मागणी साधी आणि सरळ असताना देवेंद्रजी फडणवीस तुमचे विधानभवनातील (पावसाळी अधिवेशनातील) विधान म्हणजे शरद पवारांचे जातियत्व स्विकारल्याचे समजून येते.  मुळात धनगर आणि धनगड या जमाती वेगवेगळ्या नसून धनगर ही नावाची एकच जमात आहे. (त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण  वाङमय खंड-१ दि ९ मे १९१६ हा संदर्भ तपासावा).  "भारत में जातिप्रथा संरचना, उत्पत्ति और विकास" या खंडामध्ये  डॉ बाबासाहेबांनी जातींच्या व जमातींच्या लोकसंख्येचा अहवाल सादर केला होता त्या अहवालामध्ये  पान क्र २३५ वरती "धनगर"  या जमातीचा स्पष्ट उल्लेख आहे याशिवाय धनगड या जमातीचा कोठेही उल्लेख नाही. महाराष्ट्र राज्यात परिणामी भारतात धनगड जमात आहे तरी कोठे?? काल-परवा बिहार सरकारने धनगड व धनगर वेगळे नसून एकच असल्याची घोषणा केली व बिहार मधील धनगर जमातीला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू केल्या.
महाराष्ट्र राज्यातील धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती न मिळाल्यामुळे धनगर जमातीची राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात पीछेहाट झाल्याने या जमातीचे पुढच्या ५०-६०  वर्षात सुद्धा न भरून येणारे नुकसान झाले आहे. आणि या सर्व नुकसानीस महाराष्ट्र राज्यातील प्रस्थापित व्यवस्था जबाबदार आहे आणि तुम्ही सुद्धा यास जबाबदार रहाल.
देवेंद्र फसणवीस तुम्ही विधानभवनात विधान केले की, "धनगर" आणि "धनगड' या जमाती एक आहेत की वेगवेगळ्या याची पडताळणी करण्यासाठी  टाटा रिसर्च इंन्स्टिट्यूट अॉफ सोशल सायन्स मुंबई आणि अदिवाशी विकास व प्रशिक्षण संस्था पुणे या दोन्ही संस्थांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्या त्या संस्थांनी अहवाल सादर केल्यानंतर अहवाल जर सकारात्मक आले तर धनगर जमातीला अनुसुचित जमातीमध्ये सामाविष्ट करण्यात येईल.  पण राज्यघटनेनुसार जर एखाद्या जमातीला अनुसुचित जमातीच्या यादीत सामाविष्ट करायचे असेल तर वरील संस्था अहवाल सादर करून ती संबंधित जमात त्या त्या प्रवर्गाचे निकष पुर्ण करते की नाही हे कळवतात तद्नंतर त्या जमातींना सामाविष्ट करायचे का नाही हा प्रश्न उपस्थित होतो.
पण एखादी जमात जर संविधानानुसार भारतीय राज्यघटनेत अगोदरच सामाविष्ट केली गेलेली असेल तर राज्य सरकारने केंद्र सरकारला फक्त शिफारस करायची आहे की ज्या जमाती अनुसुचित जमातीच्या यादीत सामाविष्ट आहेत त्या त्या जमातींना त्यांच्या सवलती व लाभ द्यायला पाहिजेत म्हणून धनगर ही जमात अगोदरच अनुसुचित जमातीमध्ये आहे त्याचे भक्कम आणि सबळ पुरावे उपलब्ध असताना मुख्यमंत्र्यांनी धनगर जमातीची घोर फसवणूक करू नये अन्यथा आम्हाला आमच्या औकातीवर यायला वेळ लागणार नाही.
आमची मागणी धनगर जमातीला आरक्षण द्या किंवा अनुसूचित जमातीमध्ये सामाविष्ट करा अशी नसून अगोदरच अनुसुचित जमातीमध्ये असलेल्या आमच्या धनगर जमातीला आमच्या हक्काच्या सवलती लागू कराव्यात आणि केंद्र सरकारकडे तशी शिफारस पाठवावी एवढीच आमची मागणी आहे. यासाठी
१) कोणत्याही संस्थेकडून अहवाल मागवण्याची गरज नाही.
२) यासाठी कोणतीही समिति नेमण्याची गरज नाही.
 मुख्यमंत्री महोदय तुम्ही वेळकाढूपणा करून धनगर समाजाला बोहल्यावर चढवण्याचा प्रकार करू नका आणि ते आता सहनसुद्धा केले जाणार नाही. आम्ही अगोदरच अनुसुचित जमातीमध्ये आहोत त्या अनुषंगाने त्वरित शिफारस करून आम्हाला आमच्या सवलती त्वरित लागू कराव्यात नाहीतर मग आम्हाला रस्त्यावर उतरायला क्षणमात्रही वेळ लागणार नाही. आतापर्यंत आम्ही शांत होतो पण तुम्ही आमचा अंत पाहू लागलात. आता आर या पार नाहीतर करो या मरो उद्धीष्ट डोळ्यासमोर ठेवून उद्या महाराष्ट्र पेटवायला आम्हाला वेळ लागणार नाही.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
             -नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday, 31 July 2015

"आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय"

आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय..
एकेकाळी राजा समाज असणारी आमची जमात आज डोळ्यावरती अज्ञानाचं घोंगडं पाघरूण गाढ झोपी गेली आहे. माझा-भोळा-भाबडा धनगर समाज निद्रावस्थेत असताना धनगर जमातीमधील नेत्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधली आहे की खरंच ते आंधळे झाले आहेत तेच समजेना. ज्या समाजाचं नेतृत्व निष्क्रिय नालायक आणि निर्लज्ज आहे तो समाज कधीच प्रगतीपथावर पोहचत नाही हे तितकेच सत्य आहे. ज्या दिवसी धनगर समाजाचे नेते प्रस्तापित पवार पाटील देशमुख ठाकरे फडणवीस यांची चमचेगीरी करायचे सोडून देतील त्याचवेळी धनगर समाज खर्या अर्थाने विकासाच्या दिशेने पाऊल टाकेल. समाजाचं बाजारीकरण जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत धनगर समाजाला न्याय मिळणार नाही. नाहीतर अन्याय आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे.
धनगर समाजातील नेत्यांची अवस्था आंधळ्यासारखी झालेली आहे. प्रस्तापितांचे बुट उचलायची आणि चाटायची घाणेरडी सवय समाजातील काही नेत्यांना आहे. स्वार्थासाठी समाजातील नेते त्या प्रस्तापितांची चमचेगीरी अन् हुजरेगीरी करताहेत आणि भोळ्या भाबड्या धनगर समाजाला प्रस्तापितांच्या अर्थातच लांडग्यांच्या दावणीला बांधायचे काम करताहेत पण या सर्वांचा फायदा होतोय त्या प्रस्तापितांना. प्रस्तापित पवार पाटील देशमुख ठाकरे फडणवीस सारखे लांडगे धनगर समाजातील काही नेत्यांना जवळ करून त्यांना फूस लावताहेत मग धनगर समाजातील विकले गेलेले नेते धनगर समाजाला फसवून त्या लांडग्यांच्या दावणीला घेऊन जातात. त्या प्रस्तापितांनी आजपर्यंत धनगर समाजाच्या एकाही व्यक्तीला खासदार म्हणून लोकसभेत पाठवले नाही एवढेच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात आणि परिणामी भारतात क्रमांक एक वरती लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचे विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार मात्र बोटावर  मोजण्याएवढेच कसे काय?
धनगर समाजाचे नेते त्या प्रस्तापितांच्या मागे जातात खरे पण त्यांना माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा विकास कधीही करता आला नाही. माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाबांधवांच्या भावना त्यांना कधी समजल्याच नाहीत. मग धनगर समाजाच्या त्या नेत्यांना नेते म्हणायचे की दलाल?? भूंक म्हणलं भुंकायचं छौ म्हणलं की पळायचं अन त्या प्रसतापितांच्या दावणीला जाऊन शेपूट हालवत बसायचं आणि प्रस्थापित पवार पाटील देशमुख ठाकरे फडणवीसांनी टाकलेल्या तुकड्यावर जीभाळ्या चाटायच्या आणि पुन्हा धनगर समाजाला फसवायच्या तयारीला लागायचं अशी अवस्था धनगर समाजातील काही अज्ञानी आणि स्वार्थी नेत्यांची आहे. अरे माणुसकी कुठेतरी शिल्लक असायला पाहिजे ना??
जर त्या संबंधित नेत्यांना इतिहासाची जाण असती तर अटकेपार झेंडे फडकवणार्या राजे मल्हारराव होळकर यांच्या शब्दाला थोरला बाजीराव पेशवा मान द्यायचा हा इतिहास त्या नेत्यांना कुणीतरी समजावून सांगा. सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांना विचारल्यानंतरच बाजीराव पेशवा निर्णय घ्यायचा पण आज त्यांच्याच जातीत जन्माला आलेले अन् स्वतःला मल्हाररावांचे वारसदार समजणारे नेते (धनगर समाजातील दलाल)  समाजासाठी एखादं काम करायचं ठरवलं तर प्रस्तापित आणि माजोरड्या नेत्यांचे सल्ले घेतात आणि प्रस्तापितांनाच पुढे करतात. अरे कुठे ती राजेशाही अन् कुठे आजच्या नेत्यांची ही गुलामगीरी?? खरंतर महाराष्ट्र राज्यातील जनतेला धनगर समाजातील नेते दिसत नाहीत तर दिसतात ते फक्त समाजाच्या नावावरती मलीदा खाणारे चोर अन् गोरगरीब शेतकर्यांच्या नर्डीवरून नांगर फिरवून टाळूवरचं लोणी खाणार्या त्या औलादी त्यांना स्वतःची घरं भरण्यापलिकडं व सत्ता संपत्ति मिळवण्यापलिकडं काहीच जमत नाही. म्हणून त्या प्रस्तापितांच्या आजूबाजूला फिरणारे धनगर समाजातील नेते आणि प्रस्थापित नेते यांच्यातील नातं म्हणजे "आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं" असंच आहे आणि अक्षरशा ही म्हण खरी ठरतीय असं म्हणायला मला काही वावगं वाटणार नाही.
म्हणून जे स्वतःला धनगर समाजाचे नेते म्हणवून घेताहेत त्यांना माझं सांगणं आहे की बाबांनो तुम्ही खरंच धनगराच्या औलादी असाल तर आजपर्यंत धनगर समाजावरती अन्याय करणार्या अन् आपल्याला हक्कापासून वंचित ठेवणार्या नेत्यांना बुटाखाली घ्यायला शिका, नाहीतर पुन्हा माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाकडे मताचा जोगवा अन् भिक मागायला आला तर पायातलं पायथान हातात घेऊन तुमच्या थोबाडात मारल्याशिवाय या धनगरांच्या औलादी कदापि शांत बसणार नाहीत.
जय मल्हार!! जय अहिल्या!!

          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Sunday, 19 July 2015

धनगर असाल तर पेटून उठा...

👉धनगर असाल तर पेटून⚡उठा..💪👊
देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष होत आली पण देशातील जनता अजूनही पारतंत्र्यातच आहे. १५० वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं आणि देश सोडून गेले पण याच देशातले काळे इंग्रज (पवार पाटील देशमुख ठाकरे फडणवीस) सत्ताधारी सत्तापिपासू मस्तवाल माणसं अजूनही आमच्या गोरगरीब जनतेच्या आणि शेतकर्यांच्या उरावर बसून राज्य करताहेत. गेल्या ६७ वर्षापासून या जनतेवर अन्याय होत आला आहे. विशेषता ज्या धनगर समाजाला राज्यघटनेतील अनुसुचित जमातीच्या यादीमध्ये कलम ३४२ वरती महाराष्ट्र राज्यासाठी असलेल्या नवव्या परिशिष्ठामध्ये ३६ व्या क्रमांकावरती ओरॉन, धनगड असा उल्लेख करून धनगर समाजाला त्याचवेळी डॉ बाबासाहेबांनी अनुसुचित जमातीचे हक्क दिलेले आहेत. राज्यघटनेत टायपिंग करताना "र" ऐवजी "ड" झाल्यामुळे सर्व राडा झाला आणि आमच्या धनगर समाजावर अन्याय होत आला आहे. आमच्या अज्ञानपणामुळे आणि अशिक्षितपणामुळे आम्हाला त्याची जाणीव झाली नव्हती पण हळूहळू आमच्या समाजातील समाजबांधव शिक्षित झाले तेव्हा ही चूक आमच्या लक्षात आली. महाराष्ट्र राज्यात धनगड नावाची कोणतीही जमात नाही अन् कोणी व्यक्तिही नाही मग धनगड या जमातीसाठी येणारा वार्षिक निधी, सामाजिक एवं शैक्षणिक निधी तसेच सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अधिकार आणि आरक्षण याचा उपयोग नक्की कोण करतंय?? आणि या समाजाचा निधी नक्की कोण खातंय?? याचा विचार कधी तुम्ही आम्ही केलात का?? कधी कधी तर या समाजाचा निधी वापरला न गेल्याने तसाच सरकार दरबारी परत गेलेला आहे. मग धनगड समाज महाराष्ट्र राज्यात नसताना त्याचा उल्लेख राज्यघटनेत कसा काय?? धनगड समाजाची एखादी व्यक्ति महाराष्ट्र राज्यात असती तर धनगर समाजाच्या मागणी दरम्याण कोणीच कसे पुढे आले नाही.?? किंवा त्या धनगड जमातीच्या व्यक्तिंनी कोणीच कसा विरोध केला नाही.??
खरंतर "धनगड" आणि "धनगर" या जमाती वेगवेगळ्या असतील तर मग ३६ व्या क्रमांकावर ओरॉन आणि धनगड असा उल्लेख असताना "ओरॉन" या शब्दाचा समानार्थी शब्द "धनगर" असल्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. (वन्यजनजाती अहवाल २००९-२०१० मध्ये ओरॉन, धनगर असाही उल्लेख आहे) तरीही ओरॉन, धनगड आणि धनगर या वेगवेगळ्या जमाती कशा काय?? याशिवाय हिंदी मधील र आणि ड शब्दांचा उच्चार इंग्रजीमध्ये R असाच केला जातो. त्यासंदर्भातील पुरावे सुद्धा आहेत.
मराठी व इंग्रजी शब्दांचा हिंदीमध्ये उच्चार करताना खालीलप्रमाणे करतात.
एकर(Acre) हिंदीमध्ये एकड
गुरगाव(Gurgaon)हिंदीमध्ये गुडगाव
छत्तीसगड (Chattisgarh): हिंदीमध्ये छत्तीसगढ़
त्याचपद्धतीने
धनगर(Dhangar): हिंदीमध्ये धनगड
याशिवाय श्री लक्ष्मणराव अघडते गुरूजी यांनी आदिवासी संशोधन केंद्रास पाठवलेल्या पत्रास प्रतिक्रिया देताना आयुक्तांनी धनगर आणि धनगड वेगळे आहेत असे नमूद केले पण धनगड ही जमात नांदेड व बीड या भागात वास्तव्यास असल्याचे कळवले पण तिथे त्यांनी नांदेड व बीड ऐवजी Nander व Bir असा उल्लेख केला आहे. माझा त्यां आयुक्तांना प्रतिसवाल आहे की महाराष्ट्र राज्यात नांदेर आणि बीर ही ठिकाणं नक्की कोठे आहेत?? ती ठिकाणे आम्हाला दाखवून द्याल का?? जर नांदेर आणि नांदेड व बीर आणि बीड हे वेगवेगळे आहेत असे दाखवून द्याल तर आम्ही आमची अनुसुचित जमातीच्या सवलती लागू करण्याबाबतची मागणी इथेच थांबवतो. पण जर महाराष्ट्रातील "नांदेर आणि नांदेड" व "बीर आणि बीड" ही ठिकाणे एकच असतील तर मग धनगर आणि धनगड ही जमातसुद्धा वेगवेगळी नसून एकच आहे हे मान्य करून आणि त्या अनुषंगाने त्वरित आम्हाला आमच्या अनुसुचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात ज्या गेल्या ६५ वर्षापासून प्रलंबित आहेत.
राहीला प्रश्न धनगर समाज आदिवासी असल्याचे निकष पुर्ण करतो की नाही??
तर उत्तर आहे होय, धनगर समाज आदिवासी असल्याचे निकष पुर्ण करतो.
प्राचीन अर्थातच आदिम काळापासून धनगर जमात वास्तव्यास आहे. आणि धनगर जमातीचा प्राचीन काळापासूनचा इतिहास सुद्धा आहे.
भौगोलिक स्थितीचा अभ्यास केल्यास धनगर जमात ही डोंगरदरी-रानावनात लोकवस्ती करून वास्तव्यास राहणारी जमात आहे.
वन्यजनजाती अहवालामध्ये गायी, म्हैसी, बकरी, शेळ्या, मेंढ्या, बैल, कु्त्रा, गाढव, घोडा खेचर आदी वन्य प्राणी पाळणारी जमात म्हणजे वन्यजनजाती अर्थातच आदिवासी तर मग धनगर समाज प्राचीन काळापासून शेळ्या-मेंढ्या, गायी, म्हैसी, बैल कुत्रा घोडा यांचे पालन करतो. त्याचप्रमाणे धनगर समाज बांधवांकडे शेती नसल्याने व शेती असली तर थोडकीच असते त्यासाठी शेळ्या-मेंढ्याचे पालन-पोषण करण्यासाठी एका गावावरून दुसर्या गावी भटकंती करण्यासाठी धनगर समाजाला वणवण करावी लागते. अर्थातच आदिवासी समाजापेक्षा अत्यंत हालाखीचे जीवन धनगर जमातीचे आहे.
लाजरे-बुजरेपणा: धनगर समाज मुळातच डोंगर-दरी खोर्यात व रानावनात राहत असल्याने लाजरे-बुजरेपणा त्यांच्या अंगी आहे. शिवाय धनगर समाज हा एकोप्याने राहणारा वाडी वस्तीवरती लोकवस्ती करून शहरापासून दूर आढळतो.
मागासलेपण: मुळातच धनगर जमात ही सतत भटकंती करणारी जमात असल्याने स्वतःची व शेळ्या-मेंढ्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी एका गावावरून दुसर्या गावी भटकंती करण्याची परिस्थिति उद्भवली ती आर्थिक मागासलेपण असल्यानेच. जर धनगर ही जमात धन-दौलतीने समृद्ध असती तर भटकंती करण्याची वेळ आलीच नसती. भटकंती आमच्या पाचवीलाच पुजली असल्याने धनगर समाजबांधवांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवरती आला. एखाद्या गावात शिक्षणासाठी मुलामुलींना ठेवायचं म्हणलं तर खर्च परवडत नसल्याने पोरांचं  आणि कोकरा-करडांचं लचांड सोबत घेऊन धनगर समाजबांधवांना वणवण करावी लागते. त्याशिवाय हा समाज भटका असल्याने राजकीय क्षेत्रात कधी पुढे आलाच नाही. अर्थातच आमचं नेतृत्व नव्हतं. राजकीय मागासलेपणा येथे दिसून येतो.
अशा पद्धतीने प्राचीन जीवनमान, भौगोलिक स्थिती व राहणीमान, पशूपालन, लाजरे-बुजरेपणा, मागासलेपणा यावरतून व सध्यस्थितीवरतून धनगर समाज आदिवासी असल्याचे निकष पुर्ण करतो. आदिवासी समाजापेक्षा अत्यंत बिकट आणि हालाखीची परिस्थिति धनगर जमातीच्या वाट्याला आली असताना धनगर समाजास अनुसुचित जमातीच्या सवलती देण्यास मागील सरकार ना नू करत होते त्यावेळी धनगर समाजाने त्यांना २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत हिसका दाखवला. सदरचे राज्यातील सरकार सुद्धा आश्वासने विसरून धनगर समाजास अनुसुचित जमातीच्या सवलती देण्यासंदर्भात वेळकाढूपणा करत असलेने धनगर समाजात तीव्र संतापाची लाट आहे. सदरच्या पावसाळी अधिवेशनात जर सरकारने आरक्षणाचा मुद्धा मार्गी लावला नाही तर धनगर समाज रस्त्यावर उतरून महाराष्ट्र पेटवून टाकायला मागे पुढे पाहणार नाही. रस्त्यावर कोणत्याही आमदार/खासदार अथवा मंत्र्यांची गाडी फिरकू देणार नाही अन् फिरकलीच तर चक्काचूर केल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही मग आमच्यावर गोळ्या झेलायची वेळ आली तरी बेहतर पण आमचे हक्क हिसकावून घेतल्याशिवाय कोणालाही सुखात जगू देणार नाही. कारण गेल्या ६५ वर्षापासून आम्ही अन्याय आणि दुख सहन करत आलोय आता आमचा संयम सुटलेला आहे.
सर्व समाजबांधवांनी २१ जुलै रोजी बारामती येथे उपस्थित रहावे. प्रस्थापित नेते आणि प्रस्थापितांचे तळवे चाटणारे धनगर समाजातील निष्क्रिय नालायक आणि निर्लज्ज नेते धनगर समाजामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र रचून त्याचदिवसी म्हणजे २१ जुलै रोजी मुंबई मध्ये मोर्चा आयोजित करून धनगर समाजाची दिशाभुल करताहेत. त्यासाठीच सुज्ञ शिक्षित आणि होतकरू युवकांनी  २१ जुलै रोजी जातीवंत धनगर समाज बांधवांना बारामतीमध्येच उपस्थित राहण्यास आवाहन करावे. ज्यांच्या अंगात फक्त धनगर समाजाचं रक्त सळसळतंय त्यांनीच २१ जुलै रोजी बारामती येथे उपस्थित रहावे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

अखिर हद कर दी आपने...

अखिर हद कर दी आपने...
धनगर समाजाच्या एकीमध्ये बेकी आणायचे काम धनगर समाजातीलच काही हुजरे नेते करताहेत. खरंतर गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाजाचं वाटोळं कोणी केलं असेल तर धनगर समाजातील काही नालायक नेत्यांची नावं पुढे येताहेत मला त्यांची नावे घ्यायची नाहीत. आजपर्यंत आम्ही विनाकारण प्रस्थापितांना दोष देत होतो आणि आजही देत आहे पण माझ्याच समाजाचं नेतृत्व नालायक, निर्लज्ज आणि निष्क्रिय असेल तर प्रस्थापितांना दोष देण्यात काय अर्थ?
स्वतःची बुद्धि आणि स्वतःचे विचार यांनी कधीच समाजाच्या हक्कासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वापरले नाहीत थोडक्यात सांगायचं म्हणलं तर धनगर समाजाचे सर्वच नव्हे  एक दोन नेते सोडले तर बाकीचे नेते इथपर्यंतचा विचार करण्याच्या लायकीचे वा पात्रतेचे नाहीत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.  स्वतःचा स्वाभिमान प्रस्तापितांच्या बुटाखाली गहाण टाकणार्या या औलादी धनगर समाजात जन्मालाच कशा येतात?? मग त्या औलादी खरंच धनगर समाजाच्या आहेत की आणखीन कोणाच्या?? असा प्रश्न उपस्थित राहतो.
आजपर्यंत रानोमाळी आणि डोंगरदरी-खोर्यातून पायांच्या नडग्या वाळवत शेळ्या-मेंढ्यांची राखण करणार्या माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला राजकारण काय असतं हेच माहित नव्हतं. धनगर समाजातील नेते कुठल्यातरी प्रस्तापितांची चमचेगीरी आणि हुजरेगीरी करताहेत याचं भानही नव्हतं. माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत या मस्तावलेल्या नेत्यांनी समाजाचं बाजारीकरण करून स्वताची घरं भरली, सात पिढ्या ऐशोआरामात बसून खातील एवढी संपत्ति त्यांनी गोळा केली. पण माझ्या गोरगरीब आणि भोळ्याभाबड्या धनगर समाजाच्या वाट्याला आली ती फक्त पाचवीला पुजलेली भटकंती आणि डोईवरती अन्यायची टांगती तलवार.
गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाजावरती अन्याय होत आला आहे धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लवकरात लवकर लागू व्हाव्यात यासाठी समाजबांधव संघर्ष करताहेत, पण राजकीय नेत्यांना त्याचं काही भानच नाही. दि ९ जुलै ते १२ जुलै पर्यंत राज्यातील सर्व आमदारांना आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासंदर्भात निवेदने दिली होती. तद्नंतर दि १५ जुलै रोजी राज्यातील सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली आणि हा उपक्रम सर्व समाजबांधवांनी यशस्वीरीत्या राबविला आणि पार पाडला होता. या उपक्रमातून कोणाला नेतेगीरी अथवा पुढारपण करायचं नव्हतं, कोणीही स्वार्थासाठी झटत आणि झगडत नव्हतं तर समाजावरती होत असलेल्या अन्यायाचं भान ठेवून निस्वार्थीपणे लढा उभा करत व प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून एकमेकांच्या हातात हात देवून आमदारांना, मंत्र्यांना व प्रशासनालादेखिल हातघाईला आणले आहे. या लढ्यानंतर जरी सरकारने आरक्षणासंदर्भात तोडगा काढला नाही तर दि २१ जुलै रोजी बारामती येथे धनगर आरक्षण कृति समितीच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. लाखोच्या संख्येने धनगर समाज बारामतीमध्ये उपस्थित राहणार आहे.
समाजातील तमाम बुद्धिजीवी वर्ग आणि तळागळातील सर्व समाजबांधव बारामतीला एकत्रित झाला तर प्रस्तापितांच्या ह्रदयात धडकी भरेल त्यांना कापरं भरतील म्हणून प्रस्तापितांच्या सांगण्यावरूनच म्हणा अथवा धनगर समाजात फाटाफूट करायची आणि धनगर समाजाला कधी एकत्रित येवू द्यायचं नाही म्हणून काही बाजारबुनग्यांनी त्याचदिवसी म्हणजे २१ जुलै रोजीच मुंबई येथील आझाद मैदानात मोर्चा आयोजित करुन विधानभवनावर आंदोलन करण्याच्या वल्गना करुन धनगर समाजाला संपवायचं षडयंत्रच रचलेलं आहे.
काहीही झालं तरी २१ जुलै रोजी धनगर समाज फक्त बारामतीमध्येच लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आणि आम्हीसुद्धा जातीनं तिथं पोहचणार. २१ जुलै रोजी मुंबई मध्ये मोर्चा आयोजित करण्यापाठीमागं काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे ते नाकारता येत नाही. २१ जुलै व्यतिरिक्त कोणत्याही दिवसी मुंबई मध्ये मोर्चा असो अथवा रास्तारोखो किंवा चक्काजाम आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देवून लढू पण २१ जुलै रोजी फक्त आणि फक्त बारामतीमध्येच प्रेरणा दिवस या निमीत्ताने लाखोच्या संख्येने उपस्थित राहू.
धनगर समाजाच्या संबंधित नेत्यांना माझी विनंती आहे की बाबांनो तुम्ही आजपर्यंत आमच्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाला फसवत आला आहात. माझ्या धनगर समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन समाजाला प्रस्थापित लांडग्यांच्या दावणीला बांधायचं पाप तुम्ही केले आहे आणि आजही करताय. तुम्हाला जर विधानभवनावर मोर्चा काढायचा असेल तर बिनदास्तपणे काढा पण २१ जुलै सोडून कधीही काढा आम्ही त्यावेळी तुमच्या सोबत राहू. पण जर २१ जुलै रोजी  मुद्दामहून तुम्ही मोर्चा आयोजित करत असाल तर मग २३ मार्चच्या मोर्चासारखी अवस्था करून ठेवेन. मग अब्रुचे खोबरे निघेल आणि तुम्हास कायमचाच राजकीय सन्यास घ्यावा लागेल. म्हणून आरक्षण लढ्यासाठी २१ जुलै रोजी बारामतीला उपस्थित रहा ते फक्त सर्वसामान्य समाजबांधव म्हणूनच...
माझा भोळाभाबडा धनगर समाज पेटून उठला तर एकेकाला पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही मग तिथे प्रस्तापित असोत अथवा प्रस्तापितांचे तळवे चाटणारे समाजातील दलाल असोत. सर्वसामान्य धनगर समाजबांधवांमध्ये फुट पाडायचा प्रयत्न केला तर मग आम्हाला तलवारी हातात घ्याव्या लागतील हे विसरु नका. आता धनगर समाजातील पोरं शिकली व सवरली आणि लिहायला व बोलायला लागली त्यामुळे समाजात जागृति होते आहे. तुमच्याकडे प्रिंट मिडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया असेल पैसे देवून तुम्ही त्यांना विकत घेऊ शकता पण आमच्याकडे सोशल मिडिया & माऊथ पब्लिसिटी आहे त्यामुळे समाजात जागृति जास्त प्रमाणात होते. याचा अंदाज तुम्हाला २३ मार्चच्या मोर्चावेळी आलाच असेल त्यामुळे समाजाचा इतका पुळका असेल तर व्यवस्थित विचार विनीमय करून निर्णय घ्या आणि समाजहितासाठी संघर्ष करा.

जय मल्हार!! जय अहिल्या!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Thursday, 2 July 2015

आता नाही माघार "आर नाहीतर पार"...


कोणावर कीती विश्वास ठेवायचा याला सुद्धा मर्यादा असतात. पण जर कोणी मर्यादाच ओलांडत असेल तर मग आमच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. मुळातच राजा समाज असणारे आणि या देशावर ३५० वर्षापेक्षा अधिक राज्यकारभार करणार्या महापुरुषांचे आम्ही वारसदार आहोत. बुद्धीच्या आणि मनगटाच्या जोरावर लढून आम्ही आमचे हक्क मिळवायला आज रणांगणात उतरणार अन् कारण हक्कासाठी लढाई करणं हे आमच्या रक्तातच आहे.
आजपर्यंत कोंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने आमच्यावरती अन्याय केला. त्या त्या वेळी आम्ही आंदोलन मोर्चा काढून रास्तारोखो करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी आम्हाला आमचे हक्क दिले नाहीत कारण जर धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी झाली तर या महाराष्ट्र राज्यात धनगर समाजासाठी लोकसभा व विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी राखीव/खुले होतील आणि पवार पाटील देशमुख ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्र राज्यात राजकारण करता येणार नाही. हा विचार डोक्यात ठेवून त्या आघाडी सरकारने आम्हास आमच्या हक्कापासून वंचित ठेवले होते.
गेल्या वर्षी म्हणजेच १५ जुलै २०१४ रोजी धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अमलबजावणी व्हावी म्हणून पंढरपूर-बारामती आरक्षण दिंडी निघाली होती आणि २१ जुलै २०१४ रोजी पंढरपूरहून निघालेल्या दिंडीत ४-५ लाख समाजबांधव सामील होऊन बारामती मध्ये दाखल झाले होते. तेथेच चार-पाच लाख धनगर समाजबांधवांनी ठिय्या मांडला होता आणि तेव्हा धनगर समाजातील १६ वाघ आमरण उपोषणासाठी बसले होते ९ दिवस उपाशी-तापाशी राहून समाजाला न्याय मिळावा म्हणून झगडत होते. सदरच्या भाजप सरकारने सत्तेत आल्यास १० दिवसात आरक्षणाची आमलबजावणी करतो असे आश्वासन दिले आणि उपोषण माघारी घ्यायला लावले. त्यानंतर ४ जानेवारी २०१५ रोजी नागपुर येथिल मेळाव्यात मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसात निर्णय घेतो असेही सांगितले होते. त्यानंतर सरकारकडे वेळोवेळी आरक्षणाच्या आमलबजावणीची मागणी केली तर त्या त्या वेळी आम्ही धनगर समाजावर आणि या विषयावर अभ्यास करतोय अशीच उत्तरं मिळाली. मग आम्ही हीच उत्तरं ऐकण्यासाठी भाजपला पाठींबा दिला आहे का???
येथे मला छोटसं उदाहरण द्यावसं वाटतंय, "जर लहान बाळ रडायला लागलं तरच आई त्याला दुध पाजते पण जर बाळ रडतच नसेल तर आई दुसरं काही तरी काम हाती घेते, जोपर्यंत बाळ शांत आहे तोपर्यंतच." धनगर समाजाच्या बाबतीत असंच झालंय धनगर समाज शांत बसलाय म्हणून त्यांच्याकडे लक्ष्य दिले जात नाही. मग तमाम धनगर बांधवांना माझा एकच प्रश्न आहे की, अजून कुठपर्यंत आणि कधीपर्यंत शांत बसायचं??
पण आता आम्ही शांत बसणार नाही आणि माघारही घेणार नाही आर नाहीतर पार हीच आमची भुमिका असेल. एकेकाळी राजा समाज असणारी राजेशाही थाटात वावरणारी आपली जमात आज आपल्याच हक्काची भीख मागू लागली आहे याचा जराही विचार तुमच्या-आमच्या मनात का येत नाही?? राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे कलम ३४२ वरती क्र ३६ वर धनगर [राज्यघटनेत धनगड असा उल्लेख] समाजाला स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसुचित जमातीमध्ये सामाविष्ट केले आहे. पण धनगर चा धनगड झाल्याने गेली ६५ वर्ष आमच्यावर अन्याय होत आला आहे. खरंतर धनगड नावाची जात आणि कोणी धनगड जातीचा व्यक्ति या महाराष्ट्र राज्यात कोठेही नाही.
मग राज्यघटनेमधील "धनगड" या जातीचं आरक्षण नक्की गेलं कुठे?? जर धनगड ही जात आहेच नाही तर मग बाबासाहेबांनी त्या जातीचा उल्लेख केला तरी कसा?? बुद्धिमान आणि थोर विचारवंत असणारे बाबासाहेब चूक करतीलच कसे?? १९५० पासून आजपर्यंत "धनगड" या जातीचे विवीध क्षेत्रातील आरक्षण आणि दरवर्षीचा समाजिक विकास नीधी यांचा वापर नक्की करतंय कोण?? कधी कधी हा निधी वापरला न गेल्याने तो सरकार दरबारी तसाच परत गेला. मग सरकारने त्यावेळीच योग्य निर्णय घेवून धनगर समाजाला न्याय द्यायला हवा होता पण स्वार्थी भावनेपोटी आणि स्वतःच्या खुर्चीसाठी धनगर समाजाला न्याय न देता सतत आमच्यावर अन्यायच केला गेला.
म्हणून आता गप्प बसून चालणार नाही वेळ आली तर आमच्या हक्काचं हिसकावून घ्यायला आम्ही मागे राहणार नाही. हवं तर रस्त्यावर उतरून आम्ही हिसकावून घेवू त्यासाठीच दि ९ जुलै २०१५ रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या २८८ आमदारांना व विधानपरिषदेच्या ७८ आमदारांना जे निवेदन द्यायचे आहे त्याचा मसूदा तयार करण्यात आला असून त्यादिवसी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील समाजबांधवांनी त्या त्या आमदारांना निवेदन द्यावे.
त्याचप्रमाणे दि १३ जुलै पासून पावसाळी अधिवेशन चालू होणार असून त्यामध्ये धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळण्याबाबतचा योग्य निर्णय घ्यावा यासाठी दि १५ जुलै २०१५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी/प्रांताधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्या त्या भागातील सर्व धनगर समाजबांधवांनी प्रत्येक कार्यालयात जावून १५ जुलैला एकाच दिवसी एकच निवेदन द्यायचे आहे असे ठरले आहे.
प्रत्येक मतदारसंघातील तसेच त्या त्या तालुक्यातील सर्व धनगर समाजबांधवांनी वैयक्तिक जबाबदारी घेवून सरकारला आवाहन करावे. त्याच दिवसी म्हणजे १५ जुलै २०१५ रोजी धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य डॉ शशिकांत तरंगे साहेब नागपुर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. जर धनगर समाजाला न्याय मिळाला नाही तर ९ अॉगस्ट २०१५ रोजी क्रांतीदीनाचे औचित्य साधून राज्यातील तमाम धनगर समाजबांधव रस्त्यावर उतरवून क्रांतीची मशाल पेटवणार आहेत. सरकार जर शहाणं असेल तर सरकारने वेळीच योग्य तो निर्णय घेवून धनगर समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा अन्यथा ९ अॉगस्ट २०१५ रोजी होणार्या जिवीत व वित्त हाणीस सरकार जबाबदार राहील. यासाठी दि ९ जुलै रोजी सर्व विधानसभा/विधानपरिषदेच्या आमदारांना तसेच दि १५ जुलै रोजी सर्व तहसीलदार/प्रांताधिकारी/जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहेत.  त्या त्या भागातील समाजबांधवांनी जबाबदारी घेवून प्रा.दत्ताजीराव डांगे सर (+919975924621), मा निवांत कोळेकर सर (+91 75887 97729), मा एम जी बोरकर सर (+919922581976) मा.हरिष कडू सर (+919921400567) अथवा माझे व्हाटसप अकौंट नितीनराजे अनुसे (+917666994123) वरती कळवावे ही नम्र विनंती.
निवेदनासाठी तयार करण्यात आलेला मसुदा वरती उल्लेख केलेल्या सर्व मान्यवरांकडे आहे तसेच सर्व व्हाटसप ग्रुप वरती पाठवण्यात आला आहे याची नोंद घ्यावी आणि हा ST आरक्षण आमलबजावणी बाबतचा लढा तीव्र करावा ही नम्रतेची विनंती.

जय मल्हार!!! जय अहिल्या!!!

         -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................